✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

बाबा रामदेव, वेळीच जागा हो..! :)

व
विसोबा खेचर यांनी
Tue, 06/07/2011 - 09:45  ·  लेख
लेख
१) मी स्वत: कट्टर काँग्रेस अन् सोनिया विरोधी आहे, २) भ्रष्टाचार हटवण्याची किंवा काळा पैसा भारतात आणण्याची आजच्या केन्द्र सरकारची मानसिकता नाही आणि तशी प्रबळ राजकीय इच्छाशक्तिही नाही हेही मी ठामपणे नमूद करतो. ३) मी स्वत: रामबाबाच्या योगविद्येचा आदर करतो आणि त्याकरता माझा त्याला दंडवतच आहे. तरीही असे लिहावेसे वाटते की, पोलिसांनी आंदोलकांना रामलीला मैदानातून हाकलताना बायकांना आणि लहान मुलांना मारले असे रामबाबा सांगत आहे. परंतु त्यात फारसे तथ्य दिसत नाही. अन्यथा पोलिस लहानमुलांना आणि बायकांना फटकावताहेत, हे चित्र कुठल्या ना कुठल्या वाहिनीवर नक्कीच दिसले असते; कारण प्रत्येकच वाहिनी मध्यरात्रीची ती प्रत्यक्ष दृष्ये दाखवत होती. अर्थात, खरोखरच जर त्यांना मार पडला असेल तर ती सरकारची केव्हाही चूकच आहे.. तरीही पोलिस हरकत में आ गई आणि केवळ शक्तिप्रदर्शनाकरता जमवलेल्या ५०००० च्या त्या गर्दीला तेथून रातोरात हाकलले ते एका अर्थी बरेच झाले. त्या गर्दीत फुकाचे साधुसंत आणि यूपीतले बरेचसे रेमेडोके भय्येच अधिक दिसत होते हे आग्रहाने नमूद करावेसे वाटते..! बाकी सांगायचे म्हणजे एकूणच रामबाबाच्या ह्या आंदोलनात त्याने **अत्यंत ढोबळ अन् बेफाट** मागण्यांच्या निमित्ताने केलेले राजकीय (?) शक्तिप्रदर्शनच अधिक होते. ** १) आत्ताच्या आत्ता परदेशात जा अन् तेथील बँकातील काळा पैसा घेऊन या..! - म्हणजे पोतीच्या पोती घेऊन परदेशात गेले आणि तेथील सारा काळा पैसा घेऊन पुढच्याच विमानाने भारतात परत आले इतके हे सोप्पे आहे का? **२) ५०० आणि १००० च्या नोटा लग्गेच फर्मान काढून रद्द करा..! - अहो पण याला काही अन्य पर्याय..? **३) वैद्यकीय आणि अभियांत्रिकी शिक्षण हिंदी किंवा अन्य भारतीय भाषांत द्या.. - पण तुमच्याकडे तसा अभ्यासक्रम तयार आहे का? तसे शिक्षक आहेत का? तश्या काही ठोस योजना तयार आहेत का? वगैरे वगैरे.. ** योगविद्या शिकवणारा रामबाबा गेल्या काही काळापासून भलताच अहंकारी होत चालला होता. शिवाय तो एक हलक्या कानाचा अन् हुऱळून जाणारा साधूही आहे. त्याला आंदोलनाच्या ह्या हरबर्‍याच्या झाडावर कुणीतरी चढवला आणि तो सुसाट चढत सुटला. त्यातच अण्णांच्या आंदोलनाला सार्‍या देशाने आणि आंतरजाल जगताने दिलेला उत्स्फूर्त प्रतिसाद आणि त्याद्वारे रातोरात ष्टार झालेले अण्णा, हे पाहून रामबाबाही अंमळ खुळावला असावा, किंबहुना त्याचा जळफळाटच अधिक झाला असावा. आणि त्यामुळेच अण्णांचे हे आंदोलन तो काहीही करून हायजॅक करू पाहू लागला. मिडियाचे आपल्याकडे लक्ष जाऊन आपण सतत प्रकाशाच्या झोतात कसे राहू हे तो पाहू लागला. अण्णांच्या आंदोलनाला/उपोषणाला जशी काही एक भक्कम वैचारीक बैठक आहे तशी काहीही बैठक रामबाबाची नाही. शिवाय अण्णांच्या मागे अरविंद केजरीवाल नामक एक चाणक्यही आहे जो अत्यंत हुशार मनुष्य आहे, काही एक चांगले करू पाहणारा आहे. अत्यंत कर्तबगार आणि निस्पृह पोलिस अधिकारी असलेल्या डॉ किरण बेदी याही अण्णांच्या पाठीशी आहेत. तसे या रामबाबाच्या मागे कुणी आहे का? रामलीला मैदानावरील आंदोलनाच्या मंचावर ही ऋतंबरा कशाकरता आली होती? (तिला सारेजण 'साध्वी' ऋतंबरा असे संबोधतात. परंतु तिच्याबद्दल कुठलीही व्यक्तिगत माहिती मला नसताना मला व्यक्तिश: तिला 'साध्वी' असे संबोधणे उचित वाटत नाही. मनुष्यप्राणी हा जबर स्खलनशील आहे असा माझा ठाम विश्वास आहे. असो..!) :) दिल्लीहून हुसकून हरिद्वारला पाठवलेला रामबाबा तिथे गेल्यावर अजूनही काही वाट्टेल ते बरळतो आहे. म्हणे ५००० माणसे बेपत्ता आहेत, मला ठार मारण्याचा सरकारचा डाव होता वगैरे वगैरे.. अरे रामबाबा, मेल्या योगी ना तू? मग तू कसा काय इतका जबर अहंकारी? अण्णा हजारेंवर जळ जळ जळून तुझा नक्की काय फायदा होणार आहे? 'तुझे आहे तुजपाशी' नाटकात पुलं म्हणाले होते की सन्याशाची वस्त्र ही भयंकर असतात, ती सारे अंग भाजून काढतात. रामबाबा, तूर्तास तुझीही नेमकी तशीच अवस्था झाली आहे. लेका, तुझ्यासारख्या योग्यापेक्षा आठवड्याला एक-दोनदा क्वार्टर अन् मच्छीचं जेवण जेवणारे, सुंदर-आकर्षक आणि कमनीय बायकांकडे पाहून मनातल्या मनात पाघळणारे आमच्यासारखे भोगी बरे की रे..! :) तेव्हा रामबाबा, जागा हो. आजही तू एक मोठा योगाचार्य आहेस. तेव्हा तू आपला तुझी योग्यविद्याच आम्हा सार्‍या भारतीयांना शिकवून सोड कसा..! जमल्यास तुझ्या योगसामर्थ्याच्या बळावर मस्तपैकी एकसे एक स्त्री शिष्यांना पटव ( तूर्तास तसं काही नसावं हा माझा अंदाज! ;) ) आणि मस्त मजा कर, असा आपला जाता जाता माझा तुला एक व्यक्तिगत सल्ला..! ;) काय बोल्तो..? :) तुझा, तात्या.
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
47958 वाचन

💬 प्रतिसाद (90)

प्रतिक्रिया

विशेषतः **२) ५०० आणि १०००

गवि
Tue, 06/07/2011 - 10:17 नवीन
विशेषतः **२) ५०० आणि १००० च्या नोटा लग्गेच फर्मान काढून रद्द करा..! - अहो पण याला काही अन्य पर्याय..? अगदी अगदी.. एटीएम मधे हजार पाचशेच्या नोटा असतात म्हणून दिवसभर तरी पुरतात. शंभर पन्नासच्या ठेवल्या तर दर अर्ध्या तासाने एटीएम रिकामे होईल आणि कॅश व्हॅन पाठवावी लागेल. किंबहुना एक लोड करणारा मनुष्य आणि गनमॅन प्रत्येक एटीएमला कॅशची सूटकेस घेऊन बसवावे लागतील. त्यांच्या मागण्या अवास्तव आहेत, अशक्य कोटीतल्या आहेत. मूळ हेतू चांगला वाटतो, तरीही.
  • Log in or register to post comments

२) ५०० आणि १००० च्या नोटा

मालोजीराव
Tue, 06/07/2011 - 11:56 नवीन
२) ५०० आणि १००० च्या नोटा लग्गेच फर्मान काढून रद्द करा..! दरडोई उत्पन्नाचे मोठ्या नोटेशी असलेले प्रमाण हे जास्तीत जास्त पटीमध्ये असायला हवे,जे आपल्याकडे फक्त २४ पट आहे आणि प्रगत देशांमध्ये ३०० ते ४०० पट आहे (उदा. जपान,युरोपियन देश,अमेरिका) .जशी अमेरिकेत सध्या सर्वात मोठी नोट फक्त १०० डॉलर आहे.याला कारण म्हणजे काळ्या पैश्याचा आणि रोखीच्या व्यवहाराचा वापर कमी व्हावा आणि प्लास्टिक मनी वाढावी म्हणून १९६९ साली रिचर्ड निक्‍सन यांनी १०० डॉलरवरील सर्व नोटा रद्द केल्या. पण या बाबाला यामागचं अर्थकारण काय कळणार आहे म्हणा....उचलली जीभ आणि लावली टाळ्याला... आणि अण्णानबद्दलचं अहंकारासन आणि जळफळाटासन...कधी सुटेल देव जाणे...यातून भ्रष्टाचार विरोधी ऐक्यात फुट पटेल बाकी काई नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

मोठ्या नोटा रोखीच्या (गैर)व्यवहारातच वापरायला सोयीच्या असतात

सुधीर काळे
Wed, 06/08/2011 - 00:49 नवीन
असे नाहीं. आज कुठला माणूस रोजच्या खरेदीला १०००च्या नोटा घेऊन जातो? या नोटा मूलत: रोखीच्या (गैर)व्यवहारात वापरायला सोयीच्या असतात. ५०० आणि १०००च्या नोटा तर नक्कीच रद्द झाल्या पाहिजेत. फार तर २०० रु.ची नवी नोट काढावी. इंडोनेशियासारख्या रोखीने(च) व्यवहार होणार्‍या देशातही मोठ्यात मोठी नोट ५०० रु.चीच आहे. तरी ५०० व १००० च्या नोटा काढून २०० ची नोट आणावी असे वाटते. शिवाय प्लास्टिक पैशाच्या व्यवहाराला (तेही कर्जबाजारी न करणार्‍या Debit Card वर भर देऊन) उत्तेजन द्यावे असे मला वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

तुमचे म्हणणे मान्य आहे. अगदी

इरसाल
Wed, 06/08/2011 - 11:14 नवीन
तुमचे म्हणणे मान्य आहे. अगदी सहमत आहे. ऐकीव माहितीनुसार कोणतीही नकली नोट बनवायचा खर्च साधारण १७ रुपये पडतो. ५०० आणि १००० च्या चलनामुळे त्यांना फायद्यात पडते. जर हेच चलन मोठ्यात मोठे १०० ठेवले तर नकली नोटा बनवणार्यांवर आळा बसेल अशी आशा वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुधीर काळे

मागे एकदा

राही
Wed, 06/08/2011 - 17:03 नवीन
एक हजार रुपयाची नोट खूप पूर्वी चलनातून रद्द झाली होती असे काही लोक सांगतात.ती अलीकडेच गेल्या काही वर्षांत पुन्हा जारी झालेली आहे. ५०० रु. च्या ही काही विवक्षित क्रमांकश्रेणींच्या नोटा चलनातून रद्द केल्या गेल्या होत्या. फारसा काही उपयोग झालेला दिसला नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इरसाल

जुने मिपा चाळताना हा लेख

पुंबा
Fri, 01/06/2017 - 14:42 नवीन
जुने मिपा चाळताना हा लेख सापडला. रामदेवबाबाबद्दल तात्यांनी लिहिलं आहे ते खरंच ठरत आहे. ५०० व १००० च्या नोटांबद्दल वाचून आता मनोरंजन होईल. अवांतरः रामदेवबाबा निश्चलनीकरणाचे कसा श्रेय घ्यायला कडमडला नाही ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

सरकारने जर रामदेवांची

५० फक्त
Tue, 06/07/2011 - 10:23 नवीन
सरकारने जर रामदेवांची भ्रष्टाचार करणा-याचे हात तोडण्याची मागणी मान्य केली तर, क्रुत्रिम हातांचा धंदा जाम भारी चालेल, कुणी पार्टनर म्हणुन येणार असेल तर हा धंदा करावा असा एक विचार आहे.
  • Log in or register to post comments

कृत्रिम कशाला?

गवि
Tue, 06/07/2011 - 10:29 नवीन
त्यापेक्षा हात तोडण्याची शिक्षा एक्झेक्यूट करणार्‍या सरकारी डॉक्टर किंवा जल्लादाला चायपानी देऊन म्यानेज केल्यास मूळ हातच नाही का वाचणार? हवे तर तोडल्याचे सर्टिफिकेट घेता येईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ५० फक्त

अत्यंत ये**वा आणि फालतू लेख

llपुण्याचे पेशवेll
Tue, 06/07/2011 - 10:31 नवीन
अत्यंत ये**वा आणि फालतू लेख आहे. मनुष्यप्राणी जसा अत्यंत स्खलनशील आहे तसा अत्यंत निर्धारी आणि निग्रही देखील आहे हे आजूबाजूला पाहीले तर सहज कळेल. असो.
  • Log in or register to post comments

प्रचंड सहमत...........

VINODBANKHELE
Tue, 06/07/2011 - 10:58 नवीन
वरिल प्रतिक्रियेशी प्रचंड सहमत...........
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: llपुण्याचे पेशवेll

पुपेंशी सहमत.

चिंतामणी
गुरुवार, 06/09/2011 - 00:18 नवीन
योगविद्या शिकवणारा रामबाबा गेल्या काही काळापासून भलताच अहंकारी होत चालला होता. शिवाय तो एक हलक्या कानाचा अन् हुऱळून जाणारा साधूही आहे रामलीला मैदानावरील आंदोलनाच्या मंचावर ही ऋतंबरा कशाकरता आली होती? अरे रामबाबा, मेल्या योगी ना तू? मग तू कसा काय इतका जबर अहंकारी? अण्णा हजारेंवर जळ जळ जळून तुझा नक्की काय फायदा होणार आहे? ' जमल्यास तुझ्या योगसामर्थ्याच्या बळावर मस्तपैकी एकसे एक स्त्री शिष्यांना पटव ( तूर्तास तसं काही नसावं हा माझा अंदाज! ) आणि मस्त मजा कर, असा आपला जाता जाता माझा तुला एक व्यक्तिगत सल्ला..! ही वाक्ये दर्जा दाखतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: llपुण्याचे पेशवेll

तात्या

गोगोल
Tue, 06/07/2011 - 10:50 नवीन
मस्त लिहिलत. १००% अ‍ॅग्री
  • Log in or register to post comments

असा मनुक्श्य तय्यार करायला टाकला आहे.

नरेशकुमार
Tue, 06/07/2011 - 12:07 नवीन
काल लई वेळ रामदेव बाबा टिव्ही वर बघत होतो, बघता बघता तसाच झोपि गेलो. हा प्रोब्लेम घेउन स्वप्नात मंग मि देवाकडे गेलो, आनं बोल्लो कि रे बाबा, १०० % प्रामानीक हुशार, भारताला पुढे घेउन जानारा असा एक तरी ह्या १२० कोटिंमध्ये जल्माला घाल. देव बोल्ला, असा मनुक्श्य तय्यार करायला टाकला आहे. पन त्याला खुप वेळ लागेल. तोवर जे कोन थोडेफार परमानिक आनी हुश्शार आहेत त्यांचावरच भागावा. . काय करावं आता. देवच जर असा कामचुकारपना करु राहीला आहे, तर काय होइल देवच जाने. . . बाकी रामदेव बाबाबद्दल जे काय चालले आहे.... चालू द्या.
  • Log in or register to post comments

पब्लिसिटी

आंसमा शख्स
Tue, 06/07/2011 - 12:12 नवीन
पब्लिसिटी स्टंट है सब, खुदा त्यांना चांगला रस्ता देओ.
  • Log in or register to post comments

खुदा त्यांना चांगला रस्ता

llपुण्याचे पेशवेll
गुरुवार, 06/09/2011 - 10:38 नवीन
खुदा त्यांना चांगला रस्ता देओ खुदा कसला चांगला रस्ता देतो आहे? सगळीकडे खुदा हुवाच आहे खुदाला देखील आधी खुदा हुवा नसलेला चांगला रस्ता शोधावा लागेल. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आंसमा शख्स

.

नितिन थत्ते
Tue, 06/07/2011 - 13:10 नवीन
.
  • Log in or register to post comments

काहीतरीच लिहितो वाद होतात पण

नर्मदेतला गोटा
Tue, 06/07/2011 - 14:10 नवीन
काहीतरीच लिहितो वाद होतात पण याचा वेळ बरा जातो -- हा कपिल सिब्बल दिग्विजयचा मानूस दिसतो हाये
  • Log in or register to post comments

चढेल तो पळेल!

चिंतातुर जंतू
Tue, 06/07/2011 - 14:17 नवीन
त्याला आंदोलनाच्या ह्या हरबर्‍याच्या झाडावर कुणीतरी चढवला आणि तो सुसाट चढत सुटला.
आणि पोलीस आल्यावर बायकांचे कपडे घालून सुसाट पळतही सुटला, आणि हे म्हणे आंदोलक आणि सत्याग्रही! यापेक्षा राखी सावंत बरी. तीसुद्धा पब्लिसिटी स्टंट म्हणून तोंडाला येईल ते बोलते, पण किमान असला भोंदूपणा तरी करत नाही.
  • Log in or register to post comments

वाह्वा ! आमची ती क्रांती

llपुण्याचे पेशवेll
Tue, 06/07/2011 - 14:58 नवीन
वाह्वा ! आमची ती क्रांती दुसर्‍याचा तो भोंदूपणा. टिपीकल मेणबत्ती मनोवृत्ती दिसली या प्रतिसादातून. मेणबत्या हातात घेऊन रस्त्यावरून चालणारे ते खरे सत्याग्रही आणि सत्याग्रह करणारे बाबा मात्र भोंदू. वा रे बुद्धीवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिंतातुर जंतू

फार्स

चिंतातुर जंतू
Tue, 06/07/2011 - 16:09 नवीन
नैतिक लढ्याला चेचायला पोलीस आले तर भुरट्या चोरासारखं पळून जायचं नसतं; अटक करून घ्यायची असते; त्यात डिग्निटी असते. हे कळायला उदाहरणार्थ फारशी अक्कल लागते असं वाटत नाही. त्यात बायकांचे कपडे वगैरे घातल्यामुळे बबन प्रभू - आत्माराम भेंड्यांचे फार्स पाहतो आहोत असं वाटलं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: llपुण्याचे पेशवेll

म्हणजे वेशांतर करून

llपुण्याचे पेशवेll
Tue, 06/07/2011 - 16:51 नवीन
म्हणजे वेशांतर करून पोलिसांच्या कचाट्यातून स्वतःची सुटका करून घेणारे क्रांतीकारक भुरट्या चोरासारखे पळून जात अथवा अनेक दिवस भूमिगत राहून काम करणारे अन्य देशभक्त भुरटे चोरांवतच होते असा माझ्या फारश्या नसलेल्या बुद्धीला बोधित होत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिंतातुर जंतू

भूमिगत?

चिंतातुर जंतू
Tue, 06/07/2011 - 17:13 नवीन
अनेक दिवस भूमिगत राहून काम करणारे अन्य देशभक्त भुरटे चोरांवतच होते
भूमिगत माणूस आणि दिल्लीला रामलीला मैदानात हजारोंच्या उपस्थितीत २४*७ वृत्तवाहिन्यांच्या कव्हरेजखाली असणारा सार्वजनिक उपोषणकर्ता यांत काहीच फरक नाही?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: llपुण्याचे पेशवेll

एक शंका अशी:रामदेव बाबांनी

गवि
Tue, 06/07/2011 - 17:30 नवीन
एक शंका अशी: रामदेव बाबांनी खरेच कधी असं म्हटलंय का की शुद्ध गांधीवादाने / गांधीतत्वाने ते सत्याग्रह करत किंवा करणार आहेत. हम किसीको छेडेंगे नही..लेकिन कोई हमें छेडे तो हम उसे छोडेंगे नही.. असं त्यांना म्हणताना आप की अदालतमधे ऐकलं होतं. मग त्यांचे मार्ग वेगळे असू शकतील असं म्हणायला काय हरकत आहे. मीडियाला स्वतःच्या आंदोलनावर रोखलेले ठेवणे यात काय गैर आहे? इतर राजकारणी नाही मिडीयात चमकोगिरी करत? एकूण रामदेवांवर जे आरोप म्हणून केले जाताहेत त्यातले बरेच "आरोप" म्हणून का उल्लेखले जाताहेत कोण जाणे. त्यांना खरोखर पोलीसांनी नग्नावस्थेत ठेवले तर मिळतील ती वस्त्रे नेसून त्यांनी लज्जारक्षण केले असेल तर त्यात कसला फार्स? आणि अगदी असं समजू की त्यांनी मूळ चांगल्या उद्देशाने (किंवा स्वार्थी उद्देशाने पण आउटपुट चांगला निघण्याची शक्यता असलेल्या मोहीमेसाठी) चमकोगिरी, प्रसिद्धीलोलुपता, फार्स, गिमिक, हिडन अजेंडा, राजकारण आणि इतर काहीही केलं तर त्याला हरकत का? सरळसरळ दुरित खेळ्या राजकारणी नेत्यांच्या चालू असतातच की. हा मनुष्य तरी उघडपणे काही भ्रष्टाचारविरोधी बोलतोय. स्वतःच्या ट्रस्टची संपत्ती किती हजार कोटी आहे ते जनतेसमोर बोलतोय. एवढ्यानेतरी त्याच्या उद्देशावर राळ उडवणे थांबवावे. अनलेस प्रोव्हन अदरवाईज..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिंतातुर जंतू

+१००

धमाल मुलगा
Tue, 06/07/2011 - 18:50 नवीन
सहमती. दुसर्‍या एका धाग्यात अगदी ह्याच्च अर्थाचं मत मांडलं होतं. सायबा, तुम्चा न माझा मत बराब्बर जुळतां !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

स्त्री वेशात पळून गेलो हे मी

मालोजीराव
Tue, 06/07/2011 - 18:17 नवीन
स्त्री वेशात पळून गेलो हे मी शिवाजी महाराजांचं अनुकरण केलं - रामदेव ... ... मुर्खासारखी विधाने करणे सोडणार नाई वाटतंय हा बाबा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिंतातुर जंतू

+१

स्वानन्द
Tue, 06/07/2011 - 17:42 नवीन
पुपे आणि गविंशी सहमत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: llपुण्याचे पेशवेll

लगे रहो पुपे.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Tue, 06/07/2011 - 18:21 नवीन
आमची ती क्रांती दुसर्‍याचा तो भोंदूपणा. टिपीकल मेणबत्ती मनोवृत्ती दिसली या प्रतिसादातून. मेणबत्या हातात घेऊन रस्त्यावरून चालणारे ते खरे सत्याग्रही आणि सत्याग्रह करणारे बाबा मात्र भोंदू. वा रे बुद्धीवाद. पुपेशी सहमत....! बाकी, चालू द्या....! -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: llपुण्याचे पेशवेll

त्या गर्दीत फुकाचे साधुसंत

नर्मदेतला गोटा
Tue, 06/07/2011 - 14:21 नवीन
त्या गर्दीत फुकाचे साधुसंत आणि यूपीतले बरेचसे रेमेडोके भय्येच अधिक दिसत होते हे आग्रहाने नमूद करावेसे वाटते. -- इथे युपीचा काय संबंध ? आंदोलन सगल्या देशासाठी चाललेय असे हे कूपमंडूक जाऊदे आपण टीवी बंद करावा जास्त पाहू नये
  • Log in or register to post comments

मस्त लेख..

योगी९००
Tue, 06/07/2011 - 14:38 नवीन
मस्त लेख...सर्वच मुद्दांशी सहमत. रामदेव बाबा मला पहिल्या पासूनच लबाड वाटतो...आता तर खात्रीच पटली. केवळ राजकिय हेतू ठेवून त्याने हे केले असे वाटते..
  • Log in or register to post comments

थोडे फोटो वगैरे आणि किरण बेदी.

चित्रा
Tue, 06/07/2011 - 16:02 नवीन
>>अन्यथा पोलिस ..अर्थात, खरोखरच जर त्यांना मार पडला असेल तर ती सरकारची केव्हाही चूकच आहे.. http://www.tehelka.com/story_main49.asp?filename=Ws050611mar.asp The injured Mr Sibal could not find Revati Laul New Delhi अत्यंत कर्तबगार आणि निस्पृह पोलिस अधिकारी असलेल्या डॉ किरण बेदी याही अण्णांच्या पाठीशी आहेत. तसे या रामबाबाच्या मागे कुणी आहे का? http://www.youtube.com/watch?v=A9oJMewaoMM ह्या घ्या किरण बेदी जंतर मंतर येथे :)
  • Log in or register to post comments

किरण बेदी आणि अण्णा हजारे या दोघांनी....

बहुगुणी
Wed, 06/08/2011 - 17:37 नवीन
आता थोडा सावध पवित्रा घेतलाय असं दिसतं....या वृत्तावरून बाबा रामदेवांना या दोघांचा पाठींबा 'सरसकट' नसून 'कायद्याच्या चौकटीत बसेल इतकाच' असेल असे दिसावे असा सूर दिसतो. Hazare chose to distance their group from the Baba over his latest remarks - he said he is grooming an army of 11,000 men and women and they will be trained to fight back if the government tries to repeat what happened at his yoga camp over the weekend. Ms Bedi tweeted, "No question of supporting which is unlawful and threat to security law and order...the powerful side must show wisdom and restraint. And not let it slip in the hands of opportunists." She added, "The establishment needs to deal with his outfit with wisdom and maturity before we create a serious law and law challenge for future." भाजपातील काही नेते देखील संयम बाळगतील असं सुषमा स्वराज यांच्या या न-बोलक्या प्रतिक्रियेवरून वाटतं- When asked about the Baba's call to arms, Mrs Swaraj had avoided comment.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रा

हे आधि करा

उदयन
Tue, 06/07/2011 - 17:10 नवीन
ज काल आपला भारत देश म्हणजे मुर्खांनी भरलेला बाजार झालेला आहे...जो तो उठतो आंदोलन करतो...सत्याग्रह करतो...कशासाठी...त्याचे फलीत काय...भविष्य काय.........कुणाला काहीच माहीती नाही....एखादा कायदा किवां धोरण ठरवण्या साठी त्याचा परिणाम काय होइल... भविष्यात काय घडेल...या धोरण राबवण्यात आपली यंत्रना सज्ज आहे का पुरेशी आहे का.. इत्यादी... माहीती चापचुन पाहतात........ मुळातच आपले सरकार ही निष्क्रिय आहे त्यामुळे इतरांना संधी मिळते........अण्णा हजारे,,अग्निवेश, राम देव बाबा. ..शांतीभुषण इत्यादींना जर काही खरच विधेयक काम करायची इच्छा असेल तर सर्वात आधी हे हुकुम सोडणे बंद करा...स्वता:ची इच्छा झाली आणि स्वत: चे म्हणने पुर्ण करण्या साठी सरकार ला वेठीस धरणे थांबवा...या देशाला एक घटना आहे..काही नियम आहेत... त्या नियमात राहुन काम करा... जर कामच करायचे असेल तर रितसर निवडणुकीस उभे राहवा.......पक्ष काढा...... जसे या आंदोलना साठी लोक पैसे च्या पैसे देतात तर तुमच्या विधायक कामासाठी सुध्दा देतील...निवडुन या आणि पुढची ५ वर्षे जी सुधारणा करायची असेल ती करत बसा...पुर्ण देश आपल्या पाठीशी आहे...जर निवड्णुकीला उभे राहीलात तर समोरच्याचे डिपोझिट जप्त होइल... पण विधायक मार्गाने न जाता तुम्ही स्वतःची टिमकी वाजवु बघतात... नायक चित्रपटात एक छान वाक्य होते...परेश रावच्या तोंडी..अर्थ असा " सरकारला शिव्या देने सोपे असते...पण तिच कामे स्वतः ला करायला सांगितली की @#$ला शेपुट लाऊन पळुन जायचे..." आणि वर घरी जाउन पेपर वाचत बायको ला म्हणायचे की " डार्लिंग इस पोलिटिक्स ने देश को बेच खाया है.. सरकार चा विरोध नक्की करावा पण अशा घटनेला च आव्हान देण्याच्या पध्दती ने नव्हे तर...स्वता यंत्रणेचा एक भाग होउन... सचीन ला कसा चुकिचा फटका मारतोस हे आपण टिव्ही वर अख्तरची गोलंदाजी बघुन सहज संगतो..प्रत्यक्श मैदानात उभे राहुन एक चेंडु तर अख्तर चा नाही तर आगरकर चा तरी खेळुन दाखवा..... :)
  • Log in or register to post comments

जो तो उठतो आंदोलन

Dhananjay Borgaonkar
Tue, 06/07/2011 - 20:38 नवीन
जो तो उठतो आंदोलन करतो...सत्याग्रह करतो...कशासाठी...त्याचे फलीत काय...भविष्य काय.........कुणाला काहीच माहीती नाही रामदेव बाबा, अण्णा हजारे यांनी त्यांच्या सत्याग्रहाची कारणे आधिच स्पष्ट केलेली आहेत. आणि तो सत्याग्रह आपल्याच फायद्यासाठी आहे. प्रचंड प्रमाणात भ्रष्टाचार वाढला आहे तो नाहीसा (कमी) करण्यासाठी.काळा पैसा जो या राजकारणींनी परदेशातील बँकांमधे दडवुन ठेवला आहे तो परत आण्ण्यासाठी. भविष्य काय कोणालाच माहित नसत. म्हणुन प्रयत्नच करायचे नाहीत का?? मुळातच आपले सरकार ही निष्क्रिय आहे त्यामुळे इतरांना संधी मिळते म्हणुनच आंदोलन / सत्याग्रह चालला आहे. अण्णा हजारे,,अग्निवेश, राम देव बाबा. ..शांतीभुषण इत्यादींना जर काही खरच विधेयक काम करायची इच्छा असेल तर सर्वात आधी हे हुकुम सोडणे बंद करा हुकुम आणि मागण्या मधे गल्लत होते आहे तुमची. स्वता:ची इच्छा झाली आणि स्वत: चे म्हणने पुर्ण करण्या साठी सरकार ला वेठीस धरणे थांबवा...या देशाला एक घटना आहे..काही नियम आहेत... त्या नियमात राहुन काम करा... भ्रष्टाचारमुक्त भारत व्हावा. काळ्यापैशाचे साम्राज्य संपावे अशी फक्त आंदोलकांची नाही तरी तमाम भारतीयांची इच्छा आहे. शांतातापुर्ण सत्याग्रह करणे आंदोलन करणे हे घटनाबाह्य नाही. नियमात राहुनच सर्व चालत होते/ आहे. जर कामच करायचे असेल तर रितसर निवडणुकीस उभे राहवा.......पक्ष काढा सर्व स्वयंसेवी संस्थेचा पक्ष असतो का???? नायक चित्रपटात एक छान वाक्य होते...परेश रावच्या तोंडी..अर्थ असा " सरकारला शिव्या देने सोपे असते...पण तिच कामे स्वतः ला करायला सांगितली की @#$ला शेपुट लाऊन पळुन जायचे..." आणि वर घरी जाउन पेपर वाचत बायको ला म्हणायचे की " डार्लिंग इस पोलिटिक्स ने देश को बेच खाया है.. तुम्ही किती समाज विधायक कार्य केलीत?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उदयन

पटला नाही...

विकास
Tue, 06/07/2011 - 17:16 नवीन
हा लेख पटला नाही.
  1. एक म्हणजे आपल्याला (त्यात मी देखील आलो आणि समर्थनार्थ आधी लिहीलेले देखील आहे) अण्णा हजारे जरी मोठे वाटत असतील तरी ते महाराष्ट्राबाहेर आत्ताच्या आंदोलनाआधी विशेष माहीत नव्हते हे अनेकांशी बोलताना जाणवायचे.
  2. भ्रष्टाचार हा असा मुद्दा आहे आणि तो आता इतका गंभिर झालेला आहे की त्या विरोधात कोणीही आंदोलन केले तरी ते समर्थनीयच आहे. अण्णा हजार्‍यांनी केले आणि आता अजूनही काही न करता सरकार परत त्यांना खेळवायला लागले आहे. त्यामुळे सतत सरकारच्याय/राजकारण्यांच्या डोक्यावर टांगती तलवार असणे हे अत्यंत गरजेचे आहे. या संदर्भात रामदेवबाबांना पाठींबा न देताही मुद्याचे बोलणारे शबानाचे वक्तव्य मला आवडले: "I believe the issue of corruption has to be kept alive. And any public figure, who stands up against corruption should be welcomed."
  3. प्रत्येकाने आंदोलन कसे करावे आणि त्याची स्ट्रॅटेजी काय असावी हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. तेथे साध्वी ऋतंभरा का हा प्रश्न अनाठायी आहे. त्या भारताच्या नागरीक आहेत. सोनीया गांधीपण तेथे आल्या असत्या तरी ते योग्यच होते, आक्षेपार्ह नव्हते. :-) तेथे फक्त हिंदूच नव्हते तर इतर धर्मिय देखील आहेत. तीच गोष्ट ते पळून गेले का छाती पुढे करून उभे राहीले या संदर्भात. त्यामुळे काही फरक पडत नाही. स्वतंत्र भारतात उगाच कोणी हुतात्मा होण्याची गरज नाही. आणि परिस्थिती अशीच होती की ते हुतात्मा झाले असते. (आता काँग्रेस सोनीया/मनमोहनसाठी असेच कपिल सिबलना हुतात्मा करणार आहेत असे दिसतेय...) जर तेथेच राहीले असतेत्यामुळे पोलीसांनी आणि सरकारने अनावश्यक कारवाई केली ह्याचे गांभिर्य कुठेही कमी होत नाही.
  4. रामदेवबाबांना भरपूर समर्थक आहेत आणि त्यांच्या बळावर त्यांनी भ्रष्टाचाराचा मुद्दा परत प्रकाशात आणून मोठे काम केले आहे असे माझे मत आहे आणि त्यासाठी मी त्यांचा आभारीच आहे.
  5. बाकी त्यांचा हिडन अजेंडा आणि राजकीय अपरीपक्वता वगैरे मुद्यांसंदर्भात - उत्तर सिंपल आहे, शिकले नाहीत तर मार खातील. खाउंदेत. प्रत्येक नागरीकास उपोषण करण्याचा हक्क आहे, राजकारणात जाण्याचा हक्क आहे आणि ते जमले नाही की मार खाण्याचा देखील हक्क आहे... पण तसेच आत्ता वर्तमानात आहे असे समजून जेथे साप नाही तेथे भुई धोपटत दुसरीकडे झालेल्या सर्पदंशाकडे दुर्लक्ष करणे योग्य नाही, तर भ्रष्टच आहे.
  • Log in or register to post comments

रामदेव ब्रिगेड..

अजातशत्रु
Wed, 06/08/2011 - 16:23 नवीन
Elite class सोडला तर सध्याची देशाची स्थिती/भ्रष्टाचार/ बजबपुरीने इथला प्रत्येक नागरीक पिचला आहे, प्रत्येकाला इथल्या व्यवस्थेविषयी अत्यंतीक चीड आहे, पण दुर्देवाने ती निर्माण करणारे त्याला हातभार लावणारेहि आपणच आहोत ना.. बाहेर असलेला,देशात असलेला काळा पैसा/ भ्रष्टाचार थांबावा, काळा पैसा सरकारी तिजोरीत जमा व्हावा हे इथल्या प्रत्येक नागरिकांना वाटणे स्वाभाविक आहे मग ते फ्लॅट मधे राहणारे असो की झोपडीत राहणारे, मग असे काहि घडत असले कि प्रत्येकजण त्यात आपला रोष प्रकट करतो, याचाच फायदा संधीसाधू अन् स्वार्थी लोक घेतात,आपला राग/चीड याचा उपयोग ते त्यांच्या आंदोलनात Divert करुन आपली पोळी भाजून घेतात, दुर्देवाने हे आजहि आपल्या जनतेला कळत नाहि,आणी कळले तरी वळत नाहि, वर sumiit यांनी म्हणल्या प्रमाणे आपला भारत देश म्हणजे मुर्खांनी भरलेला बाजार झालेला आहे, जो तो उठतो आंदोलन करतो,सत्याग्रह करतो....कशासाठी...त्याचे फलीत काय...भविष्य काय.........कुणाला काहीच माहीती नाही....एखादा कायदा किवां धोरण ठरवण्यासाठी त्याचा परिणाम काय होइल... भविष्यात काय घडेल...या धोरण राबवण्यात आपली यंत्रना सज्ज आहे का पुरेशी आहे का.. इत्यादी... माहीती चापचुन पाहतात.... जर कामच करायचे असेल तर रितसर निवडणुकीस उभे राहवा.......पक्ष काढा...... जसे या आंदोलना साठी लोक पैसे च्या पैसे देतात तर तुमच्या विधायक कामासाठी सुध्दा देतील...निवडुन या आणि पुढची ५ वर्षे जी सुधारणा करायची असेल ती करत बसा...पुर्ण देश आपल्या पाठीशी आहे...जर निवड्णुकीला उभे राहीलात तर समोरच्याचे डिपोझिट जप्त होइल... या देशात लोकशाहि आहे, घटनेनुसार उपोषण/सत्याग्रह करणे हा श्रिमंतापासून गरिबापर्यंत सर्वांचा तो हक्क आहे, मग कुणी बाबा असो संन्यासी असो नाहितर शंकराचार्य,अण्णा असोत नाहितर रामदेव, अगदि पंतप्रधानालाहि आपण जाब विचारु शकतो न पटलेल्या गोष्टिंचा निषेध करु शकतो, त्यासाठी वेग वेगळे मार्ग आहेत, पण स्वत:च्या स्वार्थासाठी स्वत:चे हट्ट पुर्ण करण्यासाठी आणी आपल्या गैरवाजवी मागण्या मान्य करुन घेण्यासाठी सरकारला वेठीस धरणे कधिही चुकच आहे, मग ते सरकार कॉग्रेसचे असो वा एनडिए... आपला हेतू स्वच्छ आणी प्रामाणिक असेल तर त्यांना पाठींबा द्यायला कुणाचीच हरकत नसावी, पण या बाबाचा हेतू स्वच्छ न्हवताच हे कुणीहि सांगेल, सरकारने मागण्या मान्य केले असे पत्र दिले होते दुसर्‍याच दिवशी आंदोलन संपले होते पण लाईम लाईट मधे राहण्यासाठी ह्या लबाडाने ते न स्विकारता विधेयक आणा म्हणून अडून बसला, म्हणजे याच्या मागण्या पुढे किती वाढल्या असत्या? इथे एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी म्हणजे सरकारच्या काहि जबाबदार्‍या/मर्यादा असतात, असे जर रोज उठून सगळे आंदोलन करू लागले तर मग काय होईल या देशाचं? विषय जरी वेगळे असले तरी तिकडे जाट समाज/ ईकडे मराठा समाज उद्या आणखी कुणी वेगळे विषय घेऊन असे उपोषणे करून जर सरकारला आपल्या गैरवाजवी मागण्या मान्य करुन घेण्यासाठी वेठीस धरु लागले तर यातून वेगळ्याच समस्या निर्माण होतील, उद्या उपोषण करुन वेग वेगळे प्रदेश मागणी होऊ लागली तर..? याचा अर्थ आंदोलन करुच नये असा नाहि पण त्या बरोबर संसद, न्यायालय, शासन आणि प्रशासन यांचे अवमूल्यन होणार नाही आणि समतोल ढळणार नाही, याची दक्षता घेतली गेली पाहिजे. मुळात अण्णानी केलेल्या उपोषण आंदोलनातूनच यानी आपल्या मागण्या पुर्ण करुन घ्यायला हव्या होत्या ते का झाले नाहि? बरं विरोधी पक्षहि कुचकामी यांना जर खरेच हे करायचे आहे तर त्यानी स्वतः संसदेत एक वेगळे खाजगी विधेयक/बिल आणून त्यावर चर्चा करुन ते पास करुन घ्यावे उगा लोकांना भावनीक मुद्द्यांवर भडकवून घाणेरडे राजकारण कशाला खेळायचे ? विरोधकांचे विचार कितीही टोकाचे असले तरी ते ऐकले जातात, भारतातील संसदीय लोकशाही पद्धती भारतात पूर्णत: यशस्वी ठरली आहे असे मत विरोधी पक्षनेते पांडूरंग फुंडकर यांनी एकदा एका जाहिर कार्यक्रमात व्यक्त केले होते, आज दुर्देवाने असा सक्षम विरोधी पक्ष हि अस्तित्वात नाहि,घोटाळेसुध्दा RTI कार्यकर्त्यांनी उघड केले आणी आयते कोलीत यांच्या हातात दिले पण फक्त कामकाजावर बहिष्कार टाकून पैशांचा चुराडा करणे एवढच काम यांनी केलं आहे, काहि लोकांचे नवल वाटते त्यांना गुंड / ढोंगी / स्वार्थी प्रवृत्तीच्या लोकांनी काहि लोकोपयोगी काम केले आणी त्यात त्यांचा स्वार्थ जरी दिसत असला तरी काहि वाटत नाहि हे त्यांना समर्थनच देनार, (सत्यसाई बाबा असो नाहितर रामदेव बाबा सगळे साले ढोंगीच) उद्या दाऊद/ राजन/लादेन (आता मेला तो) यांनी सुध्दा काहि लोकोपयोगी काम केले लोकांसाठी हॉस्पिटल्स काढली की हे त्यांनाहि साष्टांग घालतील वर त्यांचा हेतू चांगला आहे ते परोपकारी आहेत वगैरे वगैरे बोलत बसतील, यामुळेच राजकारणात अशा गुंड / ढोंगी / स्वार्थी प्रवृत्तीच्या लोकांची संख्या वाढली आहे आणी मग व्यवस्था भ्रष्ट आहे म्हणून नावेहि ठेवायची अन् गळेहि काढायचे... दिवसेंदिवस ही परिस्थिती अधिकच चिघळत जाणार आहे. त्यामुळे आहे ती परीस्थिती सुधारु शकणार नाहि,यंत्रणाहि कार्यक्षम होऊ शकणार नाही, बाबाने आता भक्तांना शस्त्र चालविण्याचे प्रशिक्षण देण्यात येनार आहे असे जाहिर केले आहे हे सगळे तो सुड बुध्दिने करत आहे हे वेगळे सांगायला नको, पुढील वेळी दिल्लीच्या रामलीला मैदानावर लढाई हरावी लागू नये यासाठी ११ हजार पुरुष व महिलांची सेना रामदेव ब्रिगेड तयार करण्यात येणार आहे असे त्याने पत्रकार परिषदेत जाहिर केले आहे, यातून काय बोध घ्यावा? हा लोकांना शस्त्र चालविण्याचे प्रशिक्षण देउन कसला सत्याग्रह करणार आहे की गांधीगिरी? बाबा सरळ सरळ सरकार विरुध्द युध्दाची भाषा बोलत आहे,आणी हे सरकार हा देश चालवत आहे (सध्या तरी) म्हणजे मग देशा विरुध्दच हे सगळ चालु आहे असे म्हनावे काय? एकुणच बाबा दिसतो तितका नाहि तर त्याहि पेक्षा धुर्त आणी घातक आहे, पण मला वाटतेय हि विनाश काले विपरीत बुध्दि आहे दुसरे काय? कालांतराने यावर बंदि आली तर आश्चर्य वाटायला नको.. आता पुढे पाहू काय काय प्रशिक्षण देणारे ते पाणबुड्या वगैरे.... अवांतरः या बाबाने सोनिया गांधीना विदेशी मुद्द्यावरुन टार्गेट केलेय, पण हास्यास्पद गोष्ट अशी की या बाबाचा राईटहॅण्ड किंवा असीस्टंट बाळकृष्ण हा चक्क नेपाळी म्हणजेच अभारतीय निघाला आहे, त्याने बोगस कागदपत्रे देऊन पासपोर्टही बनवला आणी तो विदेश वार्‍याहि करुन आलाय..बाबाला नेपाळि चालतोय मग ईटली का नको? महत्वाचे राहिलेच या बाळकृष्ण कडे एक पिस्तुल अन् एक रायफल विथ लाईसेंस आहे, या गोष्टि सहजा सहजी सामान्य माणसांना मिळत नाहित आता अध्यात्मीक / योगगुरु यांना या गोष्टि कशाला हे एक गुढच आहे बुवा भयंकर आहे सगळं... अती अवांतरः पंतप्रधानहि नक्की काय करतात हे हि एक गुढच आहे,याना रिमोट कंट्रोल शिवाय स्वतःचे निर्णय घेता येत नाहित.. आणी त्यात तुम्हाला वाटतोय तितका मी दोषी नाहि, असे म्हणून स्वतःचा थोडा का होइना दोष मान्य करणार्‍या पंतप्रधानांना तिथे राहण्याचा नैतीक अधिकार आहे काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास

अगदी अगदी

राही
Wed, 06/08/2011 - 17:06 नवीन
सहमत आणि जोरदार अनुमोदन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजातशत्रु

अगा या या या ! अजातशत्रु

परिकथेतील राजकुमार
Wed, 06/08/2011 - 18:17 नवीन
अगा या या या ! Image removed. Image removed. अजातशत्रु अहो किती चोर्‍या करायच्या लोकांच्या शब्दांच्या ? स्वतःचे निदान दोन शब्द तरी लिहा की राव. किती दिवस लोकाच्या बुद्धीमत्तेवर तुम्ही मिशांना पिळ भरणार ? थोडे कठोर शब्द वापरतोय त्याबद्दल क्षमस्व. पण मला लेखनचौर्याचा अतिशय संताप आहे. आणि तुम्ही तो वारंवार करता ह्याचे दु:ख आहे. तुमचा प्रतिसाद वाचताना १) याचा अर्थ आंदोलन करुच नये असा नाहि पण त्या बरोबर संसद, न्यायालय, शासन आणि प्रशासन यांचे अवमूल्यन होणार नाही आणि समतोल ढळणार नाही, याची दक्षता घेतली गेली पाहिजे. आणि २) भारतातील संसदीय लोकशाही पद्धती भारतात पूर्णत: यशस्वी ठरली आहे असे मत विरोधी पक्षनेते पांडूरंग फुंडकर यांनी एकदा एका जाहिर कार्यक्रमात व्यक्त केले होते, हि वाक्ये राहून राहून कुठेतरी वाचली आहेत असे वाटत होते. थोडे कष्ट घेतल्यावर तुमच्या ह्या महान प्रतिसादाची दोन उगमस्थाने सापडली. (आता कृपया माझ्या विचारांन योग्य शब्द सापडत नव्हते ते तिथे मिळाले वैग्रे कारण प्लिज देउ नका.) थोड्या वेळात जर माझे काम संपले तर तुमच्या प्रतिक्रियेची उरलेली उगमस्थाने पण हजर करिनच :) तोवर हे घ्या :- १) http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/7953652.cms २) http://marathwadaneta.com/MarathwadaNeta/20101209/5637751116095387937.htm
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजातशत्रु

अरेरे..विंचू चावल्या सारखेच झालेय तुमचे तर..

अजातशत्रु
Wed, 06/08/2011 - 19:16 नवीन
१) याचा अर्थ आंदोलन करुच नये असा नाहि पण त्या बरोबर संसद, न्यायालय, शासन आणि प्रशासन यांचे अवमूल्यन होणार नाही आणि समतोल ढळणार नाही, याची दक्षता घेतली गेली पाहिजे. आणि २) भारतातील संसदीय लोकशाही पद्धती भारतात पूर्णत: यशस्वी ठरली आहे असे मत विरोधी पक्षनेते पांडूरंग फुंडकर यांनी एकदा एका जाहिर कार्यक्रमात व्यक्त केले होते,
माझ्या हातुन घडलेल्या चुकांना मी कधीहि नाकबूल करत नाहि, हे दोन्ही विधाने पेपरातलीच आहेत त्याने काय फरक पडतो? काय, पेपरा मधून कुणी इथे काहि देत नाहि? आपल्याला ज्ञात असणार्‍या माध्यमातून मिळालेली माहिती देण्यास बंदी आहे काय? आता म्हणाल उल्लेख करा... मग २ ओळी साठी वेगळी लिंक द्यायची? तशी गरज वाटली न्हवती बाकी ज्याला जे वाचायचे ते वाचतील बापडे, आमचं काम माहिती द्यायच आहे काड्या घालणे नाहि..:) अवांतरः आमच्या योग्यते नुसार आम्हाला जमतात तेवढी २ शब्द लिहीतो आम्ही.. उगा याने इथे प्रतिक्रिया दिली नाही फलान्याने इथे लिहीले नाही, ते लोक प्रतिक्रिया द्यायला आले नाहि.... असे लोकांच्या प्रतिसादां कडे दॉले लावून बसत नाहि, आणी प्रतिसाद द्यायला भागही पाडत नाहि जमल्यास वाचकांसाठी उर्वरीत प्रतिक्रियेची उरलेली उगमस्थाने हि जाहिर करावी, म्हणजे माझे किती अन् चौर्य किती ते ही कळेल..:) जाता जाता: जास्तच संताप होत असेल तर ईनो घ्या आराम मिळाला तर मिलाला...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

ऑबॉबॉबॉ.....

धमाल मुलगा
Wed, 06/08/2011 - 19:07 नवीन
म्हणजे? इतकं बचाबचा किलोकिलोनं टाकलेले प्रतिसाद सगळे उचलाउचलीचेच का काय म्हणायचं? भले भले.... डायरी आणा रे गिफ्ट रॅप करुन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

ऑबॉबॉबॉ.....

अजातशत्रु
Wed, 06/08/2011 - 19:36 नवीन
इतकं बचाबचा किलोकिलोनं टाकलेले प्रतिसाद सगळे उचलाउचलीचेच का काय म्हणायचं?
माणसं कामाला लावली आहेत.... शोध मोहिम संपली की ते सगळ उलगडेल ह..तोवर दम धरा...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा

खुलाशाबद्दल धन्यवाद. मंडळ

धमाल मुलगा
Wed, 06/08/2011 - 19:53 नवीन
खुलाशाबद्दल धन्यवाद. :) मंडळ जोरात आभारी आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजातशत्रु

खुलासे...

अजातशत्रु
Sat, 06/11/2011 - 16:10 नवीन
असे खुलासे आम्हाला वरचे वर द्यावेच लागतात.. आमच्या हितचिंतकांसाठी..... कारण ते बिचारे , आमचे लेखन अगदि डोळ्यात तेल का तेलात डोळे असे घालून लक्ष ठेवून असतात... ते रात्री सुध्दा झोपत नसावेत त्यांचे २४ x ७ शोध कार्य चालू असते... त्यामुळे निट झोप मिळत नसल्या मुळे दिवसा उजेडी ते झोपेतच साप साप म्हणून दोरिलाच धोपटून स्वतःच्या बालिश बालबुध्दिचे उथळपणे प्रदर्शन करतात.. अजातशत्रु अहो किती चोर्‍या करायच्या लोकांच्या शब्दांच्या ? स्वतःचे निदान दोन शब्द तरी लिहा की राव. किती दिवस लोकाच्या बुद्धीमत्तेवर तुम्ही मिशांना पिळ भरणार ? आता खालील वाक्य पहा.. भारतातील संसदीय लोकशाही पद्धती भारतात पूर्णत: यशस्वी ठरली आहे असे मत विरोधी पक्षनेते पांडूरंग फुंडकर यांनी एकदा एका जाहिर कार्यक्रमात व्यक्त केले होते, इतकी साधी सोपी वाक्य रचना असताना यात इतका स्पष्ट उल्लेख आहे की,असे मत विरोधी पक्षनेते पांडूरंग फुंडकर यांनी एकदा एका जाहिर कार्यक्रमात व्यक्त केले होते, मग हि चोरी ठरते काय? म्हणजे यापुढे कुणाचेहि मत इथे उल्लेख करुनहि प्रकाशीत करणे हि चोरी ठरावी काय? असे असेल तर मग आनंदच आहे :) बाकी त्यांच्या या पोरकटपणावर कंपुबाज लोकांना फार काळ हसता आले नाहि याचे वाईट वाटतेय.. अवांतर :उर्वरीत प्रतिक्रियेची उरलेली उगमस्थाने शोधकार्य जोरात चालू आहे वाटते.. त्यामुळे काड्याघाल उद्योगाला जोरात शुभेच्छा...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा

भय्या हातपाय पसरी...

योगप्रभू
Tue, 06/07/2011 - 17:22 नवीन
अण्णा मराठी आणि रामदेवबाबा भय्या! हम्म्म! स्वतंत्र आंदोलनाचा विषय आहे खरा. राजाबाबूंना सांगा रे कुणीतरी.... :) (सर्व भक्तांनो ह. घ्या.)
  • Log in or register to post comments

पुपेंशी अतिशय सहमत, कुणीतरी

५० फक्त
Tue, 06/07/2011 - 17:44 नवीन
पुपेंशी अतिशय सहमत, कुणीतरी उभं राहतंय हे महत्वाचं. त्याच्या मागं उभं राहता येत नसेल तर किमान समोर आडवं तरी जावु नये. आणि ५०० -१००० च्या नोटा बंद करणं हा उपाय खरोखर जबरा आहे, पुर्ण नाही तर थोडा तरी आळा बसेलच या मुळं भ्रष्टाचाराला. पण असं झालं तर लाच देण्यासाठी वेगळी कार्डे बँका इश्यु करतील अशी शंका आहे.
  • Log in or register to post comments

इंतरेस्तींग टोपीक.

आत्मशून्य
Tue, 06/07/2011 - 19:30 नवीन
.
  • Log in or register to post comments

भगोडा रामदेवबाबा..

अजातशत्रु
Tue, 06/07/2011 - 20:24 नवीन
हो हिच उपाधी योग्य आहे या माणसाला.. मुळात हा रामदेव बाबा कोण आहे? अल्प परीचय.. जन्म :हरीयाणा मधील सय्यदपुर.१९६५ शिक्षण - ८ वी. व्यवसायः व्यावसायीक योगगुरु प्रभाव : रामप्रसाद बिस्मिल / सुभाषचंद्र बोस सुरुवातीला हरिद्वार येथे योगशिक्षण घेतले,पुढे २००३ पासून योग उपचार शिबिर सुरु केले आणी ते मग पुढे वाढतच गेले देशव्यापी झाले,हि जमेची बाजू यातूनच ते प्रसिध्दिच्या झोतात आले, भ्रष्टाचारा बद्दल तर रामदेवबाबा प्रसिध्दिच्या झोतात आल्या पासूनच बोलत होता पुढे २००८ पासून रस्त्यावर उतरण्याची भाषा करायला लागला,पण धाडस होत न्हवते मुहुर्त मिळत न्हवता, अशातच अण्णा हजारेंनी त्या विरोधात आंदोलन केले,आणी ते यशस्वी झाले, आंदोलनाचे फलीत लोकपाल बिल या नावाने अमलांत येईल, यात अण्णांना देशभरातून पाठींबा मिळाला हे पाहून प्रसिध्दिच्या झोतात असणार्‍या रामदेव बाबाला हि असच काहि करावे असे वाटल्यास नवल ते काय? वास्तवीक बाबाने त्या आंदोलनातच सक्रिय सहभाग घ्यायला हवा होता,तसे न करता त्याने अण्णाना बाहेरुनच पाठींबा दिला.तसेच आंदोलन यशस्वी झाल्यावर समिती मध्ये भुषण पिता-पुत्र का? डॉ.किरण बेदिंना का घेतले नाहि? असे आक्षेप घेऊन त्यातली हवा काढण्याचा प्रयत्न केला, इथूनच अण्णा आणी रामदेव या द्वंयी मध्ये मतभेद निर्माण झाले, मग आपली वेगळी चुल मांडून त्याने स्वत:चे वेगळे महत्व दाखवून देण्याचा प्रयत्न केला, आणी वेगळे आंदोलन केले.. तसे बाबा ने आपला स्वाभिमान पक्ष स्थापन करुन सक्रिय राजकारणात उतरण्याचे सुतोवाच अगोदरच केले होते, आंदोलनाद्वारे किती जनाधार मिळतो?त्याचीच हि चाचपणी, या बाबाला व्हायचेय पंतप्रधान, कसे ते पहा बाबाच्या मागण्या- १.भारताचा पंतप्रधान हे जनतेने निवडून दिलेली व्यक्ती म्हणजे नगरपालीका निवडणूका होतात तसे निवडून यावा मग बाबा अगोदरच फेमस व्यक्ती कोण अडवणार? २.लोकपाल बिलातून पंतप्रधान पद/ सर्वोच्च न्यायालय वगळण्यात यावे, यावरुन तरी असच वाटतेय..कि या बाबाला पंतप्रधान व्हायचेय, आता आंदोलना कडे पहा खर्च किती केलाय, सर्वांनीच हे आंदोलन पंचतारांकीत आंदोलन आहे अशी रास्त टिका केली होती. २.५ लाख स्क्वे.फि.चे वाटर प्रुफटेन्ट मैदान भाडे दिल्ली महानगरपालिका रु ३.१० लाख ९०० -प्रसाधनगृह अंदाजे रु २ करोड ५०००-पंखे + ६००-कुलर अंदाजे रु १.७५ करोड १०-एल.सी.डी.स्क्रिन/साऊंड (भक्तांनी बाबाला बघण्यासाठी) अंदाजे रु १.५ करोड ५०० आरओ प्लांट पिण्याच्या पाण्यासाठी अंदाजे रु ८ करोड १०००-स्वयंसेवक,केअरटेकर जेवण बनविण्यासाठी खास खानसामे काशी/मथुरा वरुन हा ढोबळ खर्च आहे काहि आकडे हे कमी जास्त होऊ शकतात. (माहिती दै.भास्कर/ आयबीएन लोकमत/ स्टारमाझा) हे आहे काळा पैसा आणन्या साठीचे पांढरे पैसेवाया घालवणे उपोषण, इतका खर्च सबंध भारतात कुणीच कुठल्या आंदोलनासाठी केला नसेल अचानक असे काय घडले की एका सायकलवर फिरणारा बाबा एकदम चार्टड प्लेन मध्ये उडू लागला? असे म्हणतात कि एके काळी ती सायकल पंक्चर झाली तर ती दुरुस्त करायला बाबा कडे पैसे नसायचे आणी तोच बाबा पहा कसा गगन भरारी मारतोय.. त्याच्यावर असाहि एक आरोप आहे(आता त्याने कॉग्रेसशी पंगा घेतल्यामुळे ते लोक हा आरोप सिध्दहि करतील अशि शक्यता आहे) की ज्या हरिद्वार येथील आश्रमात त्याने योगशिक्षण घेतले ते त्याचे गुरु श्री.शंकरदेव यांनाच त्याने गायब केले, हे दोघे एकाच खोलीत रहात होते एक दिवस अचानक ते लुप्त झाले ते आजतागायत कुणालहि सापडले नाहित,त्यांच्या बरोबर नक्की काय झाले हे आजहि एक गुढ आहे,(बहुतेक ते सदेह वैकुंठाला गेले असावेत काय?) असो नेहमी टिव्ही वर प्रत्येक मुलाखातीत हा बाबा स्वतःछाती ठोकून सांगत असे की या देशासाठी माझे प्राण गेले तरी मी ते हसत हसत देईन, भ्रष्टाचारा विरोधात लढताना मला मरण आले तरी बेहत्तर. अशी वाक्ये नेहमीच आपल्या भोळ्या भक्तांकडून टाळ्या मिळवून देतात हि याची मुक्ता फळे आहेत हा तोच बाबा आहे जो कालच्या आंदोलनात पोलिसांच्या फक्त लाठ्या आणी अश्रु धुराला घाबरुन पाय लावून पळून गेला? अश्रु धुरापासून वाचण्यासाठी हा एका भिंती मागे २ तास लपला-इती बाबा, आपला स्वतःचा जिव वाचविण्यासाठी त्याने चक्क एका महिलेचा ड्रेस घातला.. आणी महिलांच्याच घोळक्यातून निसटायचा अयशस्वी प्रयत्न करु पहात होता.. धिक्कार आहे अशा पळपुट्या बाबाचा स्वतःला क्रांतीकारी देशासाठी लढणारा संत असे म्हणवून घेणारा बाबा भोळ्या भाबड्या लोकांच्या भावना भडकवून त्यांचा उपयोग स्वतःच्या स्वार्थासाठी करत होता, आणी जेव्हा बलिदानाची वेळ आली तेव्हा हा महाभाग त्या अबला महिला/ लहान मुलांना तिथेच लाठ्या खायला सोडून स्वतः स्टेज वरून उडी मारुन उडन छू झाला, तिथून पळून जाताना त्याने त्याच्यावर भरोसा ठेऊन आपल्या लहान मुलाबाळांना घेऊन आलेल्या महिला/ वयोवृध्द यांचा जरातरी विचार केला काय? जर झालेल्या धावपळीत कुणी दगावले असते तर त्याची जबाबदारी कुणाची सरकारची? का ती गर्दी जमविणार्‍या बाबाची? हसायला तर तेव्हा आले जेव्हा हा बाबाच वरील घटनाक्रम स्वतःच मिडीयाला रडत रडत सांगत होता वारेवा भगोडे बाबा तुझ्या सारखे जर या देशात क्रांतीकारी असते तर या देशाला स्वातंत्र्य कधि मिळालं असतं का? त्यांच्या बलिदानातून हा देश आज उभा आहे, त्यांच नाव घ्यायची पण नैतीकता नाहि या बाबा मधे, यावरुन काहि प्रश्न विचारता येउ शकतात इतकेच देश प्रेम आहे तर जसे अण्णा हजारे जाहिर करतात तसे यांनी हॉटेल मधील गुप्त बैठकीत काय झाले ते देशाला का सांगीतले नाहि? अण्णा नेहमी चर्चा/ कामकाज मिडीया समोर चालावे असा आग्रह धरतात बाबा नेमका उल्टा सर्व चर्चा/ कामकाज गुप्तपणे आणी स्वतः एकटाच का? बाल क्रुष्णला कुठल्या मोहिमेवर पाठवले आहे? यानेच सांगीतलेय कि त्याला एका गुप्त मोहिमेवर पाठवले आहे,म्हणजे नक्कि काय गौडबंगाल आहे? ५००० माणसे बेपत्ता हे याला कस काय कळलं? एकदा पळून गेल्यावर मागे माणसे मरतात का जगतात याच्याशी काय संबंध? आंदोलन जर शांततेत चालू होते तर मग आंदोलनकर्ते दगड घेऊन का बसले होते? पोलिसांवर दगडफेकहि झाली आहे, हे पुर्व नियोजीत असावे असेच वाटतेय..म्हणजे पोलिस आले की दगडफेक करून अफरा-तफरी घडवून आणायची आणी मग दंगल..त्यामुळे पोलिसांना लाठीमार करावा लागला असणे शक्य आहे, त्यात आर एस एस/भाजपवालेही होतेच त्यांनी हे आंदोलन हायजाक करण्याचा प्रयत्नहि केला होता होम-हवन करुन/ अगदि मुंबईलाहि इथे गरिबांना तेल मिळत नाहि आणी खुशाल त्यात साजुक तुप-लोणी भस्म करत होते.. त्यात ऋतंबराला बोलायला देऊन बाबानेहि त्यांना तसे सहकार्य केलेच, यामुळे खरेतर अण्णा आणी त्यांचे साथीदार चिडले होते त्यामुळे या दोघांमध्ये निदान ७ वाजताच्या लेटेस्ट न्युज पर्यन्त तरि ते बेबनाव व टिका चालू होती पण सरकारने जी कारवायी केली त्यामुळे अण्णांना पुन्हा नाईलाजाने बाबाला पाठींबा द्यावा लागला,नाहितर चित्र थोडे वेगळे असते. आता कॉंग्रेस सरकारने केलेली कारवायीहि अति उत्साहाने आणी कोणताहि विचार न करता केलेली आहे, इतक्या अपरात्री एवढ्या मोठ्या जन समुदायाला तिथून हाकलवून लावणे खुपच वाईट अन् अयोग्य आहे निषेधार्हच आहे.त्याची फळे कदाचीत त्यांना भोगावी लागतील, अवांतरः भ्रष्टाचाराविरुद्ध केंद्र सरकारविरोधात सुरू असणाऱ्या रामदेवबाबांच्या आंदोलनावर सरकारने केलेली कारवाई योग्य असल्याचे मत पुरी पीठाचे शंकराचार्य अधोक्षजानंद देव यांनी व्यक्त केले आहे. देव म्हणाले, ""भगव्या वस्त्रांचा वापर रामदेवबाबांनी गैरमार्गासाठी करून घेतला. रामलीला मैदानावर घडलेल्या प्रकारास रामदेवबाबाच जबाबदार आहेत. त्यामुळे याप्रकरणी त्यांनी माफी मागावी.'' योगविद्येचा वापर रामदेवबाबांनी व्यावसायिक कारणांसाठी केल्याचा आरोपही शंकराचार्य यांनी केला. [http://72.78.249.107/esakal/20110606/4694246564413535153.htm ]
  • Log in or register to post comments

शिक्षणासंदर्भात

विकास
Tue, 06/07/2011 - 22:24 नवीन
बाबा रामदेवांच्या बाजूने अथवा विरोधात लिहीण्याचा प्रश्न नाही आणि उद्देशही नाही, मात्र त्यांचे शिक्षण कमी असण्याबाबत आधी देखील प्रसिद्धी माध्यमात लिहून आलेले आणि आत्ता वर पाहीले आहे. म्हणून लिहीत आहे. त्यांचे शिक्षण आठवी पर्यंत झाले म्हणून त्यांची नकळत नालस्ती करणारे अण्णा हजार्‍यांचे शिक्षण केवळ सातवीपर्यंतच झाले आहे हे सांगतात का? का असे एकाचे हसे करत दुसर्‍याचे लपवणे हा देखील भ्रष्टाचार? बरं यात हसे करण्यासारखे काय आहे? ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर विद्यापिठातून शिकले नाहीत का शिवाजी शिवाजी विद्यापिठातून... ते झाले जुने. पण तुम्ही आम्ही वापरत असलेले मायक्रोसॉफ्ट विंडोजवाला गेट्स अथवा फेसबुक वाला झकरमन पण हार्वर्ड ड्रॉप आउट आहेत तेच अ‍ॅपलवाल्या स्टीव्ह जॉबबद्दल... बाकी नंतर...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजातशत्रु

आणि किती मंत्री अशिक्षित आहेत

रणजित चितळे
Wed, 06/08/2011 - 10:34 नवीन
शिक्षण फक्त शाळेत जाऊन, कॉलेजात पाट्या टाकल्याने होते असे नाही. लता मंगेशकर - चवथी पास आहेत. सोनिया गांधी किती शिकलेत (इंग्रजी येते म्हणजे शिकलेले असे गृहीत धरले म्हणजे बोलणेच संपले) त्या बद्दल प्रश्न आहे. राहूल गांधी किती शिकला त्या बद्दल प्रश्न आहे. शिक्षणापेक्षा दृष्टीकोन काय आहे. दूरगामी, उत्तुंग विचार, दूरदृष्टी व व्हीजन ह्याचे निकष लावले तर बरे होईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास

+१

नितिन थत्ते
Wed, 06/08/2011 - 10:51 नवीन
>>शिक्षण फक्त शाळेत जाऊन, कॉलेजात पाट्या टाकल्याने होते असे नाही. सहमत आहे. तसेच मंत्री वगैरेंचे शिक्षण किती आहे याचीही उठाठेव करू नये असे वाटते*. *हे श्री. चितळे यांच्यासाठी नाही पण बर्‍याच वेळा आपले राज्यकर्ते किती शिकलेले आहेत / असावेत याची "सुशिक्षितांमध्ये" चर्चा चालते त्यासाठी आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रणजित चितळे

+११....

कुंदन
Wed, 06/08/2011 - 10:56 नवीन
चाचा , तुम्ही इतके शिकलेले नसता तर तुम्हालाही एक खाते देवविले असते प्रा डॉ ना सांगुन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते
  • 1
  • 2
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा