मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

विश्वचषक २०११ भारत वि. पाक दुसरे सेमिफायनल

प्रशांत · · काथ्याकूट
भारत वि. पाक हा सामना बघण्याची उत्सुकता सर्वांना असते त्यात आजचा सामना म्हणजे विश्वचषक २०११ चे दुसरे सेमिफायनल त्यामुळे प्रत्येकाने सामना बघण्यासाठी विषेश तयारी केली असेलच.. आपल्या पंतप्रधानांनी तर हा सामना बघण्यासाठी फारच विषेश तयारी करत त्याच्या खास......... आमंत्रण दिलेले आहे.. तर आजचा सामना बघ्याण्यासाठी तुम्ही काय काय आणि कशी तयारी केली... सामना चालु झाल्यानंतर सामन्याचे धावते वर्णन आपण आपल्या मिपाच्या खास शैलित करुच..

वाचने 68473 वाचनखूण प्रतिक्रिया 300

कानडाऊ योगेशु Wed, 03/30/2011 - 10:53
फेसबुकवर वाचलेला विनोद डबंग डायलॉग बाय धोनी.. अख्तर आफ्रिदीसे डर नही लगता साब..मुनाफ नेहरा से लगता है! ;) बाकी सामना पाहायची कसली तयारी न कसले काय? ऑफिसातच अपडेट पाहत राहायचे!

In reply to by आत्मशून्य

वपाडाव Wed, 03/30/2011 - 18:28
२६०/९... पुर्ण ५० ओव्हर खेळल्याचा हबिमान... चला आता हगर्‍या बॉलरांच्या हातात आहे सग्ळं.. तेंडुलकर, भज्जी, युवराज अन रैना मिळुन ३५ ओव्हर टाकतील असं वाट्टंय.... काय म्हंता...

प्रशांत Wed, 03/30/2011 - 11:38
आफ्रिदी: हम सचिन को किसी भी हाल मी संचूरी कि संचूरी नही बनाने देंगे . शोयब : मगर हम उसे रोकेंगे कैसे ?? वो तो गजब कि फॉर्म मैं हें...? आफ्रिदी : साले ...!! हम १०० के अंदर आउट हो जायेंगे ना ...!!

नीलकांत Wed, 03/30/2011 - 11:49
मॅच बघायची आहे म्हणून आधीच झालेला प्रवास आज मॅचच्या वेळेस करणार आहे अशी घोषणा केलीये. म्हणजे कुणाचा मध्ये फोन नको. येथे नागपुर येथे मॅच बघण्यासाठी छत्रपती चौकात एका मित्राच्या फ्लॅटवर सर्व मंडळी जमणार आहेत. एकट्याने मॅच बघण्यात काय मजा ना? :) मॅच बघता बघता जे जे काही लागणार आहे त्याची तरतुद करणे चालले आहे. सर्वांसोबत दंगा घालत अशी मॅच बघण्याची मजा काही औरच आहे. मी सहसा मॅच बघत नाही मात्र अशी लढत न पाहून कसं व्हायचं ना? - नीलकांत

In reply to by नीलकांत

चिंतामणी Wed, 03/30/2011 - 14:11
टॉस जिंकला. मॅच बघता बघता जे जे काही लागणार आहे त्याची तरतुद करणे चालले आहे. मस्त. मजा करा. आपण जिंकणार आहोत.

स्पा Wed, 03/30/2011 - 11:52
सामना पाहताना घ्यायची काळजी 1) ज्यांना हृदयाचा त्रास आहे किंवा ब्लॉकेज आहेत त्यांना असे सामने पाहताना हृदयविकाराचा झटका येण्याची शक्‍यता अधिक असते. अशा सामन्यांमध्ये थरार टीपेला पोहोचलेला असतो त्या वेळी उत्साह वाढलेला असतो हृदयाचे ठोकेही वाढलेले असतात आणि त्यामुळे हृदयावर ताण येऊ शकतो. 2) भावना अधिक प्रमाणात गुंतलेल्या असल्यामुळे पराभव पचविणे कठीण असते आणि त्यामुळे येणारा स्ट्रेस फार घातक ठरू शकतो. 3) अति मध्यमान, शरीरातील वाढलेले तापमान आणि एकाच ठिकाणी जास्त वेळ बसून राहणेसुद्धा धोकादायक ठरू शकते. 4) सामना पाहत असताना जंक फूड, साखरेचे प्रमाण अधिक असलेल्या पदार्थांचे सेवन करत राहणे हृदयावर परिणामकारक ठरू शकते. मुंबई - विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेचा फिव्हर चढलेला आहे आणि प्रत्येक जण बुधवारचे भारत-पाकिस्तान हे क्रिकेट युद्ध पाहण्याची तयारी करत आहे. एकत्रितपणे सामना पाहण्यासाठी मोठ्या स्क्रीनचीही तयारी करण्यात आलेली आहे. भारताचे पंतप्रधान मनमोहन सिंग आणि पाकिस्तानचे पंतप्रधान गिलानी यांनाही हा सामन्याने भुरळ पाडली आहे. अशा हायव्होल्टेज सामन्यात भावना गुंतलेल्या असतात. सामना पाहताना दडपण येत असते आणि त्याचा शरीरावर परिणाम होतो. 2006 मध्ये विश्‍वकरंडक फुटबॉल सामने पाहताना 11 चिनी प्रेक्षकांचा हृदयविकाराच्या झटक्‍याने निधन झाल्याचे वृत्त बीजिंगमधील एका वर्तमानपत्राने प्रसिद्ध केले होते. भावनांवर आवर घालू न शकल्याने मानसिक ताण आला आणि त्यामुळे त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता. हृदयरोगतज्ज्ञ शल्यचिकित्सक डॉ. रमाकांत पांडा यांनी सांगितले की, जेव्हा एक्‍झाइटमेंट वाढली जाते तेव्हा रक्तदाब वाढला जातो आणि ज्यांना मधुमेह, कॉलेस्ट्रॉल आदींचा त्रास असतो अशांना हृदयरोगाचा झटका येण्याची शक्‍यता असते. बुधवारचा भारत-पाक सामना पाहताना जर तुमच्या छातीत दुखू लागले किंवा हातातून कळा येऊ लागल्या तर जराही वेळ न घालविता 126126 या क्रमांकावर कॉल करा.

In reply to by स्पा

कुळाचा_दीप गुरुवार, 03/31/2011 - 06:25
म्हणुनच मी शेवटचे ५ ओव्हार्स राजाराम पुलावर जाऊन उभा होतो..उगाच सहन होत नाही तर पाहाव कशाला ...पण कान मात्र सतत लोकांच्या फटाक्यांकड़े होते !

In reply to by कुळाचा_दीप

वपाडाव गुरुवार, 03/31/2011 - 10:31
बरंय, नाहीतर कुलदीपकाची प्राणज्योत ..........
पण कान मात्र सतत लोकांच्या फटाक्यांकड़े होते !
अन डोळे काय पुलावर चाललेल्या चलचित्रपटाकडॅ (PDA) होते की काय?

In reply to by वपाडाव

कुळाचा_दीप Fri, 04/01/2011 - 06:29
PDA आपल्या साठी काय नवीन नाही ...आणि पहायची इच्छा झालीच तर राजाराम पुला पेक्षा उत्तम ठिकाणं आहेत ना :)

स्पा Wed, 03/30/2011 - 11:53
आपली टीम आणि मंडळी आणि आजची मॅच आणि फ़िक्सिंग आणि..... ... .. ..... भारताची कुंडली ही मकर लग्नाची असून सप्तमस्थानी रवि , शुक्र , बुध , शनि , चंद्र व प्लूटो असे सहा ग्रह आहेत. दशमात तूळेचा गुरु आहे. सहाव्या स्थानी मंगळ आणि पंचमात राहू व लाभात केतू अशी स्थिती आहे. या कुंडलीशी ३० मार्च २०११ चे ग्रहमान अनुकूल आ...हे. ३० तारखेला धनिष्ठा नक्षत्र असून नक्षत्र असून चंद्र मकर राशीच आहे. भारताचे मकर लग्न आणि रवि , गुरु , मंगळ, हर्षल मीन राशीत असल्याने भारत प्रतिस्पर्ध्याला लोळवेल. मुळ कुंडलीचा दशमेश शुक्र गोचरीचा दशमाच्या लाभात आहे. आपल्या टीम मधे सचिन, धोनी, झहीर, युवराज सारखे मातब्बर खेळाडू आहेत असा माझा समज होता, जो साफ़ चुकीचा निघाला. वरील सहा ग्रह हे आपले अष्टपैलू आहेत आणि उरलेल्या राशी बॉलर्स. but it seems match is already fixed :) लग्नाच्या गाठी स्वर्गात बांधतात ठाऊक होते, मॅचच्याही गाठी स्वर्गात? :D मकर आजची राशी ऑफ़ द मॅच. :)

In reply to by स्पा

वपाडाव Wed, 03/30/2011 - 13:38
लग्नाच्या गाठी स्वर्गात बांधतात ठाऊक होते...
आहे का नाही... कसा पकडला चोराला... दिल मे शादी के लड्डु फूटरेले इस्के तो... पण साला हे वाक्य हर्षदने भेळेत टाकायला पाहिजे होते..

चिरोटा Wed, 03/30/2011 - 12:27
वा वा. अगदी सर्व अंगांनी होणार्‍या सामन्याचा 'अभ्यास' चालू आहे.खालील माहिती हवी आहे- १)मोहालीचा ईतिहास. २)मोहालीकरांच्या क्रिकेटवेडाच्या काही कहाण्या. ३)१९५० पासून मोहालीला झालेले सामने. ४)पाक खेळाडू जिथे उतरले आहेत तिकडची सुरक्षा व्यवस्था. बाकी आम्ही तयार आहोतच- १२ सोनकेळी/अर्धा किलो बटाटा वेफर्स्/खारे दाणे/धारवाडी पेढे/दर अर्ध्या तासाने चहा/लिंबु सरबत. दोन्ही गालांवर तिरंगा/India असे लिहिलेली टोपी घालूनच सामना बघायचा आहे.

In reply to by सुधीर१३७

चिरोटा Wed, 03/30/2011 - 12:41
स्वतालाच की वो. आय सी सी वाले स्वतःचे खिसे भरणार्,खेळाडू रग्गड पैसा मिळवणार्,जाहिरातबाजी करून कंपन्या नफा मिळवणार.'देशप्रेम' जागवून सरकार लोकांचे लक्ष दुसरीकडे वेधणार. आपण स्वतःलाच टोपी घालायची अन म्याच बघायची.

मृत्युन्जय Wed, 03/30/2011 - 16:27
विराट युवराज गेले. धोनी जाण्याच्या मार्गावर (तो आला आहे हेच त्याच्या जाण्याचे द्योतक आहे). सचिन असाही आउट होण्यासाठी खुप प्रयत्न करतो आहे. मॅच संपली.

२७५ किंवा ३०० पेक्षा अधिक धावा झाल्या पाहिजेत. धोणीने आज धावा भरपूर धावा केल्या पाहिजेत. आता मागे फक्त रैना आहे. धोणी चेंडुला नुसतं ढकलून ढकलून किती धावा काढेल कोणास ठाऊक ? --दिलीप बिरुटे

In reply to by निखिल देशपांडे

>>>भारत पुर्ण ५० ओव्हर बॅटिंग करेल का?? सच्याला अजून दोनतीन जीवदान आणि दोन तीन जीवदान धोणी मिळाले तर पन्नास ओव्हर खेळणे अवघड नाही.;) -दिलीप बिरुटे

In reply to by निखिल देशपांडे

मृत्युन्जय Wed, 03/30/2011 - 16:47
सचिनचे ४ झेल सोडले आहेत. एक स्टंपिंग जस्ट मिस झाले. एक एलबी जस्ट मिस आहे. तो नक्की काय करतो आहे? औट होण्यासाठी याहुन अजुन जास्त प्रयत्न कोणी करु शकणार नाही

In reply to by मृत्युन्जय

भारतीय क्रिडा रसिकांनी देवाला केलेल्या प्रार्थना कामी येत आहेत.:) -दिलीप बिरुटे

स्पा Wed, 03/30/2011 - 16:39
धोनीचा फॉर्म पुरता गेला आहे, नुसता ढकला ढकली, मला तर वाटत त्याने हॉकीत जायला हवं,....... आज नेहराला घ्यायची चूक त्याला जाम महागात पडणार आहे

In reply to by स्पा

>>>नुसता ढकला ढकली, मला तर वाटत त्याने हॉकीत जायला हवं,....... हॉकीत कॉर्नर मारायला चांगला खेळाडू आहे. :) >>>आज नेहराला घ्यायची चूक त्याला जाम महागात पडणार आहे शेवटच्या ओव्हरीत पंचवीस धावा लागत असल्यावर नेहरा चार ते पाचच चेंडूत हे आव्हान पूर्ण करण्यास मदत करेल असे वाटते :) काय सांगावे आज त्याला विकेटा मिळाल्या तर....! सच्याचे शंभर होतात बॉ.....! -दिलीप बिरुटे

साबु Wed, 03/30/2011 - 16:59
काळजी नको.... सच्याचे शतक नक्कि होणार.....धोनी... अरे नीट मारे रे ...

नीलकांत Wed, 03/30/2011 - 17:02
शेवटच्या ओव्हर्स धाडधाड मारायला कुणीतरी रहा रे बाकी. सचीनचे शतक नक्की आहे आज. धोनी टिकला पाहीजे. सुरूवातीला अतिशय फटकेबाज खेळ आता संथावला आहे . - नीलकांत

साबु Wed, 03/30/2011 - 17:08
फिल्डिन्ग फार महत्वाची असणार आहे,.... catches win matches.... एक हि झेल सुटता कामा नये.

स्मिता. Wed, 03/30/2011 - 17:33
धोनी पण गेला... भारत पूर्ण ५० ओवर खेळेल की नाही शंका वाटतेय :(

In reply to by गणपा

गेला आपला आवाज त्यांच्यापर्यंत घेतला पॉवरप्ले एकदाचा. आता जे होईन ते होईन. सहा षटकात कमीत कमी सत्तरची अपेक्षा. दोनशे सत्तर ऐंशी व्हावा स्कोर. -दिलीप बिरुटे

In reply to by सखी

आठ धावा वसूल. पुढील पाच षटकात चाळीस-पन्नास धावा व्हाव्यात. रैनाने चांगली सुरुवात केली. कमॉन इंडिया.........! :) -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सखी Wed, 03/30/2011 - 17:59
तिसरी फोर पण मारीली पण त्या सेहवागसारखे नको व्हायला, तो फोरशिवाय बोलत नव्हता, पण गेला ना लवकर.

चतुरंग Wed, 03/30/2011 - 17:41
प्रेशर प्लेइंग इट्स रोल!! मेंटल टफनेसची कसोटी लागणार आहे. अजूनही वेळ गेलेली नाही. सगळ्या ओवर्स खेळून काढणे आणि नंतर अशक्य चांगली फील्डिंग आणि बॉलिंग करावी लागणार!!!

चिरोटा Wed, 03/30/2011 - 17:51
६ सोनकेळी,पाव किलो वेफर्स संपले. आता खायची ईच्छा गेली.

वपाडाव Wed, 03/30/2011 - 18:18
भज्जी भी गया.... २४६/७, ४८ ओवर.. शेवटचे षटक... ४ चेंडु बाकी... झहीर गेला.... २५६/८.. पुर्ण षटकं तरी खेळा म्हणावं.... नेहराने १ रन काढला...

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

झहीर केला आता येणार आमचे करन अर्जुन. नेहरा आणी मुनाफ नेहरा मुनाफ ला म्हणालाय तयार रहा . मी हजेरी लावून येतो .( ह्या लोकांमुळे रैनाची उडाली दैना )

स्मिता. Wed, 03/30/2011 - 18:23
भारताच्या ९ गडी गमावून २६० धावा झाल्या आहेत. बातम्या दिल्यासारखं वाटलं ;)

चिरोटा Wed, 03/30/2011 - 18:25
आपले गोलंदाज आता काय करतात बघुया. प्रभादेवी/दादरचे कोणी आहे का? सिद्धिविनायकाला जरा जावून या,ह्यांच्यातर्फे.

मुलूखावेगळी Wed, 03/30/2011 - 18:27
नेहराचे १० हुकले १ रन नी :( :( :( : ( आय अ‍ॅम वेरी वेरी अपसेट आनि सचिनचे १०० :( लै फ्रेन्डली आनि सौजन्यसप्ताहात मॅच चाल्लिये. बघु आता काय होते ते.

विकास Wed, 03/30/2011 - 18:31
राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम

In reply to by गणपा

विकास Wed, 03/30/2011 - 18:38
इच्छा असली तरी बघू शकत नाही कारण हापिसात आहे.... :( त्यामुळे रिमोट कंट्रोल हातात नाही! माझ्याकडून कुठलीही चूक होत नाही आहे. कल्जी नसावी! :)

In reply to by यशोधरा

सखी Wed, 03/30/2011 - 19:16
यशो माझे बाई २४० नको, थोडं त्याच्या आधी नाही का चालणार, २४० होईपर्यंत आम्ही आमचा जीव कुठं टांगुन ठेवायचा?

In reply to by पुष्करिणी

सखी गुरुवार, 03/31/2011 - 18:16
अनामिक आणि पुष्करिणी अहो यशो २४० म्हणत होती, म्या तिला बार्गेन करुन २३० वर तयार केलं, मला पण ५०% पाहीजे हां :) आणि यशो ते इरसाल पार्टीचं काहीतरी म्हणत होते, आपल्याला काय पाहीजे ते मिळल, तेव्हा तुझी लिस्ट तयार ठेव गं, माझी झालीच आहे ऑलमोस्ट :)

मंडळी सामना आपण जिंकायची शक्यता ३०-७० अशी दिसत आहे. सामन्याचा निकाल धक्कादायक लागण्याची शक्यता ग्रहित धरुन मित्र म्हणत आहेत कुठेतरी 'बसून' सामन्याचा आनंद लूटू. :) तेव्हा आम्ही आपली रजा घेतो. धन्यवाद......! :) -दिलीप बिरुटे

In reply to by प्रीत-मोहर

आमची मते बहुतेक वेळा खरी ठरतात . आता घी घरी नाही आहे पण बटर मे शक्कर मिलाके काम चला लेंगे. ''चक दे इंडिया''

सामना जिंकतोय अशी शक्यता वाटल्यामुळे पुन्हा हजर झालोय. लवकर दोन विकेट पाडा बरं. आपापले सर्व कुलदैवत वगैरेंना प्लीज नवस वगैरे बोला. :) सालं वर्ल्ड कप नको पण पाकिस्तावर विजय मिळवलाच पाहिजे. :) -दिलीप बिरुटे

In reply to by सखी

आत्ता बाद होईल हो तो. त्याचे काय टेन्शन नाय. फक्त कोणत्या क्षणी बाद होईल ते पाहात राहू या.