दैव जाणिले कुणी |
दैव जाणिले कुणी?
"सुदैव असते,दुर्दैव असते असे तुम्ही मानता का?"
..
"मानतो म्हणजे? दैव हा शब्द मराठी भाषेत आहे.त्याचा अर्थ : भाग्य,नशीब असा आहे.
’सु’आणि’दु’ हे अनुक्रमे चांगले आणि वाईट या अर्थाचे उपसर्ग आहेत.सुदैव, दुर्दैव हे
मराठी भाषेत रूढ झालेले शब्द आहेत.ते न मानण्याचा प्रश्नच उद्भवत नाही."
..
"मला म्हणायचे होते तुमचा या संकल्पनांवर विश्वास आहे का?"
..
"तुम्हाला काय म्हणायचे आहे ते आले माझ्या ध्यानात. दैव संकल्पनेचा काय अर्थ
घ्यायचा,काय व्याख्या करायची यावर ते मानणे न मानणे अवलंबून आहे.
दैव म्हणजे विधिलिखित,प्राक्तन,संचित,प्रारब्ध. ते ब्रह्मदेवाने माणसाच्या कपाळी लिहिलेले
असते. असे मुळीच मानत नाही.असले काही खरे नसते."
..
"मग दैव शब्दाचा दुसरा कोणता अर्थ घ्यायचा?"
..
"समजा अनंत हा मुलगा श्रीमंत कुटुंबातील आहे तर बबन गरीब कुटुंबात जन्मला आहे.अशा
स्थितीत जन्माच्या बाबतीत अनंत सुदैवी तर बबन दुर्दैवी आहे असे म्हणणे योग्य होईल."
..
"पण अनंताचा जन्म श्रीमंताघरी तर बबनचा गरीबाघरी झाला याचे कारण काय?"
..
"हे पाहा, धनवंताना मुले होतात तशी गरिबांना सुद्धा होतात.धनवंत आई वडिलांनी आपल्या
मुलाचे नाव अनंत ठेवले. म्हणून अनंत श्रीमंत कुटुंबात जन्माला आला असे म्हणायचे,
अन्य कोणतेही कारण नाही.पूर्वपुणाई,पूर्वसंचित असे काही नसतेच.काही कुटुंबे श्रीमंत तर
काही गरीब असतात हे सामाजिक वास्तव आहे.तसे का हा प्रस्तुत चर्चेचा विषय नाही."
..
"अनंत आणि बबन यांच्या जन्मपत्रिका एकरूप(आयडेंटिकल)असू शकतील का?"
..
"हो! शंभर टक्के!महाराष्ट्रात एकाच वेळी एकाच रेखांशावर अनेक मुले जन्मतात.त्यांतील
काही जन्मत: श्रीमंत (अनंत) तर काही गरीब कुटुंबातील(बबन) असणारच.त्या सर्वांची
जन्मरास एकच. तसेच जन्मकुंडल्या एकरूप (आयडेंटिकल) असू शकतीलच.पण तो विषय
सध्या सोडा.आपण दैवाविषयी बोलतो आहोत."
..
"दैवाविषयी आणखी काय सांगता येईल?"
..
"मघाचाच मुद्दा अधिक स्पष्ट करतो.समजा एका दालनात एक मोठे टेबल आहे.त्या भोवती
तीस जण बसले आहेत.टेबलावर एक साधारण मोठा आणि एक लहान असे दोन डबे आहेत.
आता तिसांपैकी प्रत्येक जण पाचशे रुपयांची एक नोट मोठ्या डब्यात टाकतो आणि एका
चिठ्ठीवर आपले नाव लिहून ती दुमडून छोट्या डब्यात टाकतो."
..
"ठीक आहे.समजले.शेवटी मोठ्या डब्यात पंधरा हजार रुपये तर लहान डब्यात तीस चिठ्ठ्या
आहेत.प्रत्येक चिठ्ठीवर एक नाव आहे."
..
"आता एका मुलाला बोलावले.त्याने लहान डबा हालवून,डोळे मिटून त्यातील एक चिठ्ठी
काढली.चिठ्ठीवर महेश माने असे नाव आले.महेशला पंधरा हजार रुपये मिळाले.महेशला
असे पैसे का मिळाले?"
..
"काढलेल्या चिठ्ठीवर त्याचे नाव होते म्हणून."
..
"ते तर झालेच.पण कोणाचेही नाव येण्याची संभवनीयता तिसांत एक म्हणजे ३.३३% च
आहे."
..
"पण काढलेल्या चिठ्ठीवर कोणाचे तरी नाव असणारच ना?"
..
"आता कसे? अगदी बरोबर!तिसांतील कुणा एकाचे नाव असणारच.ते महेश मानेचे निघाले
एवढेच.अन्य कोणतेही कारण नाही."
.
" आले लक्षात.अशा वेळी महेश लकी ठरला,सुदैवी ठरला असे आपण म्हणतो."
.
"अरे वा! तुम्हाला सगळे समजलेच की! तो सुदैवी ठरला त्याला त्याची पत्रिका,
ग्रहयोग,अचानक धनलाभयोग असे कोणतेही कारण नाही.अशा गोष्टींना कोणतेही
कारण नसतेच.इथे कोणताही प्रसिद्ध ज्योतिषी,वाचासिद्धयोगी आला असता तर कोण
जिंकणार याचे भाकीत करू शकला नसता.काढलेल्या चिठ्ठीवर कोणते तरी एक नाव
असणारच. ते महेश माने निघाले एवढेच.हे यदृच्छेने घडते."
.
"यदृच्छा म्हणजे कोणाची इच्छा? देवाची का?"
.
"छे! छे! यदृच्छा या संस्कृत शब्दाचा अर्थ सहजता,आपोआपता,रॅंडमनेस असा आहे. इथे
इच्छेचा काही संबंध नाही.देवाचा सुद्धा नाही.एक सत्य गोष्ट सांगतो.माझ्या परिचयाचे एक
गृहस्थ आहेत.त्यांच्या तरुण मुलाला एक दुर्धर आजार झाला आहे.त्यावर उपाय नाही.
वीस हजार माणसांतील एखाद्याला हा रोग होतो.तो आनुवंशिक नाही. असे डॉक्टर सांगतात.ते
गृहस्थ म्हणतात:--
वीस हजारांत एखाद्यालाच होतो तो आमच्या वाट्याला का आला? आम्ही कोणाचे कधी काही
वाईट केले नाही.कुणाला फसवले नाही.नाडले नाही.मुलगा निर्व्यसनी आहे.सद्गुणी आहे.मग
आम्हाला असे दु:ख का?"
.
"असा प्रश्न त्याच्या आई वडिलांना पडणारच.मग ते पत्रिका, ज्योतिषी,पूर्वसंचित, नारायण
नागबळी अशा गोष्टींच्या मागे लागणारच."
.
"म्हणून यदृच्छेचे तत्त्व (लॉ ऑफ़ रॅंडमनेस्) समजून घेतले पाहिजे. हा विशिष्ट आजार
वीस हजारांत एखाद्याला होतो.शहराची लोकसंख्या तीस लाख असेल तर तिथे साधारणपणे
दिडशे लोक या आजाराने बाधित असणार.(समजा १००ते २००).त्या दिडशेमध्ये या मुलाचा
अंतर्भाव झाला हे त्या मुलाचे आणि त्याच्या माता पित्यांचे दुर्दैव म्हणायचे.त्याला अन्य
कोणते कारण दिसत नाही.हे समजून घ्यायला हवे आणि आलेल्या प्रसंगाला धीराने सामोरे
जायला हवे.दुसरा उपाय नाही.इथे कोणताही दैवी उपाय निरर्थक ठरतो.त्याने अंतत: अधिक
नैराश्य येते."
.
"खरे आहे तुमचे म्हणणे.एखाद्या कुटुंबात मतिमंद मूल जन्माला येते.आपल्यावरच असा
प्रसंग का?असे आई वडिलांना वाटणे स्वाभाविक आहे.पण त्या मुलाच्या प्रवेशासाठी ते जेव्हा
एखाद्या अशा संस्थेत जातात तेव्हा लक्षात येते की हा प्रसंग आपल्या एकट्यावरच नाही.अशी
अनेक कुटुंबे आहेत.म्हणून दैवी उपायांच्या मागे न लागता आलेल्या प्रसंगाला तोंड देत योग्य
तो मार्ग शोधला पाहिजे.असेच ना?"
.
"अगदी बरोबर."
**************************************************************
वर्गीकरण
प्रतिक्रिया
अगदी
"माझ्याच माथी हे भोग का?" असं
+१
+१
माही व्हाय नॉट मि म्हणत
"अगदी बरोबर."
स्टॅटिस्टिकल प्रॉबॅबिलिटी आहे
+१ असंच म्हणते
फ्रेम ऑफ रेफरन्स...
सहमत
सगळी उत्तरं स्टॅटिस्टिकल
........
छान
पटले
हाइंडसाईट
दैव जाणिले कुणी? अर्थातच
दैवम
गीतेतील श्लोक
असेच
किंचित् व्याकरण दोष
उद्धरण
पौरुषम्
म् m+h
युक्ती झट् पट्
एक वाचनीय विन्ग्रजी दुवा
विचारा॑चि मा॑डणी चा॑गली वाट्ली
दैव म्हणजेच योगायोग (मराठीत
मला वाटते
मनुष्य स्वभाव
बरोबर आहे! प्रतिसाद आवडला.
बरोबर आहे! प्रतिसाद आवडला.
सुन्दर प्रतिसाद वि बे.
बाण बरोब्बर "बैलाच्या
१०००००० वेळा सहमत
चौथा प्रकार..
+१
+१
मस्त आहे लेख
यनावालाजी संभाषणातुन अगदी
एक प्रतिसाद द्यायचा आहे. एका
उत्तम लेख
सॉल्लीड गंडलाय लेख.