महाराष्ट्र दर्शन - भाग २/ "दौलताबाद"
भाग १ दुवा,
अंबाजोगैहून २ वाजता निघालो खरे, पण मोठा प्रॉब्लेम झाला , त्यादिवशी private गाड्या दिसतंच नव्हत्या,जादा गाडी ४ ची होती,म्हणजे जर ती गाडी पकडली असती तर पोहोचे पर्यंत ११-१२ वाजले असते. मग काय २.१५ च्या "लाल डब्यात" कसे बसे चढलो ( तिथेच माती खाल्ली).
ती बस already खच्चून भरलेली होती.... सुरु झाल्यावर कळलं , कि आपल्याला औरंगाबादच्या तिकिटात , Essel world ची सफर सुद्धा फुकटात लाभणार आहे.....खिळखिळेपणाचा कळस होती ती बस.... एवढ्या टिनपाट डब्यात पहिल्यांदाच बसलो होतो. पहिल्या १० मिनटातच सगळी हाडं ढिली झाली...
त्यात बसायला जागा नवती... पाऊस सुद्धा तोंड घेऊन पळालेला......डबा दुपारच्या रणरणत्या उन्हात चांगलाच तापलेला... अश्या परीस्थित अजून ६ तास काढायचेत या कल्पनेनेच भोवळ यायला लागली..... मास्तर एकदम मजेत होता... दर ५ मिनिटांनी सांगायचा "अहो फक्त २ तास उभे राहा बीड ला बसायला मिळेल तुम्हाला"........ पण देवाच्या कृपेने त्या आधीच शेवटच्या "शिटेवर" अस्मादिक्काना बसायला मिळाले..... हुश्श.................
रात्री पोहोचायला १०.३० वाजलेच तरी ....सुदैवाने औरंगाबादेद हाटेल झकास आहेत.... मस्त जेवून झोपून गेलो ...सकाळी ९.३० MTDC ची बस होती.. त्यामुळे आमच्या डोक्याला ताप नव्हता.. ते दाखवतील ते फक्त बघायचे बास्स... :) बरेच "गोरे" लोक सुद्धा होते... माझ्या बाजूच्या सीट वर दोघे "angry young man " बसलेले. बस निघाली, पहिलं ठिकाण होतं "दौलताबाद चा कणखर किल्ला" बरंच ऐकून होतो, आज प्रत्यक्ष बघायला मिळणार म्हणून मन अधीर झालं होतं.... त्या "गोरयांशी " पण एव्हाना गप्पा टप्पा चालू झाल्या होत्या... आणि आला एकदाचा देवगिरी....... आपल्या सह्याद्रीच्या किल्ल्यांपेक्षा एकदम वेगळ्या धाटणीचा
एव्हांना आमचा "गाईड" पेटला होता.. फुल टू जोश में तो सगळं वर्णन सांगत होता... (आता माझ्या सगळं काही लक्षात नाही, जाणकारांनी प्रकाश टाकावा) तर .. दौलताबाद हा भारतातील अतिशय मजबूत किल्ल्यांपैकी एक आहे ..१३२७ मध्ये "मोहम्मद तुघलक" याने हा किल्ला बांधला.आपल्या सह्याद्रीच्या किल्ल्यांसारखा हा एकदम उंचावर बांधलेला नाहीये, संपूर्ण पणे मुघली प्रभाव आहे याच्या बांधकामावर... चांद मिनार, किल्ल्याभोवती २.५ km व्यासाचे पाण्याचे खंदक, आणि किल्ल्यापर्यंत पोहोचण्यासाठी पार करावा लागणारा "भूलभुलैया"हि याची खास वैशिष्ठे.
किल्ल्याभोवती अजस्त्र तटबंदी आहे..............
किल्ल्याकडे जाणाऱ्या मार्गावर .. बहुतेक हे बाझार भरण्याचे ठिकाण असावे
माझी फोटूग्राफी
महाद्वार
महाद्वारातून आत गेल्यावर एक मस्त मोठे पटांगण लागते....
बहुदा राजकीय सभा होत असाव्यात त्या काळी तेथे.......
आता तिकडे एक "भारत मातेचे" देऊळ बांधले आहे.....
तिथून उजवीकडे बाहेर पडल्यावर आपण "सुप्रसिद्ध चांद मिनार" पाशी पोहोचतो ...
याची उंची साधारण ३ ते ४ मजले, इतकी आहे ... वर जाण्यासाठी आतून पायऱ्या सुद्धा आहेत,
पण सुरक्षिततेच्या कारणासाठी हल्ली वर जाऊ देत नाहीत
काही कलाकृती ....
ह्या किल्ल्याचा नकाशा , भिंती आणि प्रवेशद्वाराची रचना अशी योजनाबद्ध
रीतीने करण्यात आलेली आहे की , शत्रूच्या हल्ल्यापासून किल्ला सुरक्षित
राखता येईल असे वळणा-वळणाचे अरुंद रस्ते शत्रुसैन्याच्या सहज प्रवेशाला
थोपवून धरतात. तर उंच , उंच भिंती किल्लेबंदी करणा-या उरतात. संपूर्ण
किल्ला चहूकडून जलमय कालव्यांनी वेढलेला आहे. किल्ल्याची उंची
गाठण्यासाठी डोंगर पोखरुन तयार करण्यात आलेल्या दूर्गम , अतिसुरक्षित असे
अंधारे बोगदे ओलांडावे लागतात. किल्ल्याच्या या रचनेमुळे लक्षात येते
की , शत्रुची दिशाभुल करण्यासाठी आणि त्याला फसवण्यासाठी अशी रचना केलेली
असावी.
तिथून पुढे आपण खंदकापाशी येऊन थांबतो....
या पाण्यात पूर्वी विषारी पाणसाप, अजस्त्र मगरी तसेच सुसरी असत ...
खंदकातून किल्ल्यात जाणारा एकमेव रस्ता
किल्याच्या एका बुरुजावर एक अजस्त्र अशी " मेंढा तोफ " आहे....
अतिशय सुंदर अशी पंचधातूने बनलेली हि तोफ वजनाने तब्बल "१४ टन" भरते.......
५०० -६०० वर्षांनंतर सुद्धा तिचं सौंदर्य तसंच टिकून आहे.....
कै च्या कै ऊन होतं.... त्या समोरच्या डोंगराचा हेवा वाटत होता......
शेवटी आसपास भटकलो......
हे राव मस्त "दुपारचं भोजन " घेत होते
"my angles" :)
आता अजून फिरणं मनात इच्छा असून देखील शक्य नव्हतं... एकतर उन्ह खूप होत ,शिवाय अजून वेरूळ चा पल्ला गाठायचा होता..........
बस मध्ये बसलो आणि..बस वेरूळ कडे निघाली........
क्रमश:
एव्हांना आमचा "गाईड" पेटला होता.. फुल टू जोश में तो सगळं वर्णन सांगत होता... (आता माझ्या सगळं काही लक्षात नाही, जाणकारांनी प्रकाश टाकावा) तर .. दौलताबाद हा भारतातील अतिशय मजबूत किल्ल्यांपैकी एक आहे ..१३२७ मध्ये "मोहम्मद तुघलक" याने हा किल्ला बांधला.आपल्या सह्याद्रीच्या किल्ल्यांसारखा हा एकदम उंचावर बांधलेला नाहीये, संपूर्ण पणे मुघली प्रभाव आहे याच्या बांधकामावर... चांद मिनार, किल्ल्याभोवती २.५ km व्यासाचे पाण्याचे खंदक, आणि किल्ल्यापर्यंत पोहोचण्यासाठी पार करावा लागणारा "भूलभुलैया"हि याची खास वैशिष्ठे.
किल्ल्याभोवती अजस्त्र तटबंदी आहे..............
किल्ल्याकडे जाणाऱ्या मार्गावर .. बहुतेक हे बाझार भरण्याचे ठिकाण असावे
माझी फोटूग्राफी
महाद्वार
महाद्वारातून आत गेल्यावर एक मस्त मोठे पटांगण लागते....
बहुदा राजकीय सभा होत असाव्यात त्या काळी तेथे.......
आता तिकडे एक "भारत मातेचे" देऊळ बांधले आहे.....
तिथून उजवीकडे बाहेर पडल्यावर आपण "सुप्रसिद्ध चांद मिनार" पाशी पोहोचतो ...
याची उंची साधारण ३ ते ४ मजले, इतकी आहे ... वर जाण्यासाठी आतून पायऱ्या सुद्धा आहेत,
पण सुरक्षिततेच्या कारणासाठी हल्ली वर जाऊ देत नाहीत
काही कलाकृती ....
ह्या किल्ल्याचा नकाशा , भिंती आणि प्रवेशद्वाराची रचना अशी योजनाबद्ध
रीतीने करण्यात आलेली आहे की , शत्रूच्या हल्ल्यापासून किल्ला सुरक्षित
राखता येईल असे वळणा-वळणाचे अरुंद रस्ते शत्रुसैन्याच्या सहज प्रवेशाला
थोपवून धरतात. तर उंच , उंच भिंती किल्लेबंदी करणा-या उरतात. संपूर्ण
किल्ला चहूकडून जलमय कालव्यांनी वेढलेला आहे. किल्ल्याची उंची
गाठण्यासाठी डोंगर पोखरुन तयार करण्यात आलेल्या दूर्गम , अतिसुरक्षित असे
अंधारे बोगदे ओलांडावे लागतात. किल्ल्याच्या या रचनेमुळे लक्षात येते
की , शत्रुची दिशाभुल करण्यासाठी आणि त्याला फसवण्यासाठी अशी रचना केलेली
असावी.
तिथून पुढे आपण खंदकापाशी येऊन थांबतो....
या पाण्यात पूर्वी विषारी पाणसाप, अजस्त्र मगरी तसेच सुसरी असत ...
खंदकातून किल्ल्यात जाणारा एकमेव रस्ता
किल्याच्या एका बुरुजावर एक अजस्त्र अशी " मेंढा तोफ " आहे....
अतिशय सुंदर अशी पंचधातूने बनलेली हि तोफ वजनाने तब्बल "१४ टन" भरते.......
५०० -६०० वर्षांनंतर सुद्धा तिचं सौंदर्य तसंच टिकून आहे.....
कै च्या कै ऊन होतं.... त्या समोरच्या डोंगराचा हेवा वाटत होता......
शेवटी आसपास भटकलो......
हे राव मस्त "दुपारचं भोजन " घेत होते
"my angles" :)
आता अजून फिरणं मनात इच्छा असून देखील शक्य नव्हतं... एकतर उन्ह खूप होत ,शिवाय अजून वेरूळ चा पल्ला गाठायचा होता..........
बस मध्ये बसलो आणि..बस वेरूळ कडे निघाली........
क्रमश:
प्रतिक्रिया
पण सुरक्षिततेच्या कारणासाठी
झकास रे
मस्त मस्त ,पन अजुन काहि फोटो
पन अजुन काहि फोटो का नाहि
फटू जबराट
इतिहास
माहितीबद्दल धन्यवाद.. वल्ली
"पण नंतर भाउसाहेब पेशवे
बरोबर आहे
वल्ली
छान!
हा पण
कै च्या कैच
खरय....
थोडं यादव राज्याबद्दल....
प्रत्यक्ष सफरीचा आनंद...!!
चांगले फोटो
+१. असेच म्हणतो. रामदेव आणि
मस्तच...
मस्त रे!!
मस्त लिहितो आहेस..
इतिहास उलगडून दाखवल्याबद्दल
झक्कास!!!!!!!!!!
लेख आवडला. हा देखील भाग