हाही भाग वाचनीय.
दुवे देता आले तर बरे.
दुवा एक : त्यांच्या १३०० रु पेन्शनविषयी. असे दिसते की त्यावेळी लष्करप्रमुखांना १२०० रु पेन्शन असे. त्यापेक्षा १०० रु जास्त पेन्शनवर ते फील्ड मार्शल म्हणून निवृत्त झाले.
यात जेकब यांनी कोर्ट ऑफ इन्क्वायरी विषयी पण सूचक लिहिले आहे. Jacob recalls this incident and says, "It's not my wont and not in my character to give evidence, so I refused." But he adds, "Had I done so, it might have caused difficulties for Maneckshaw."
इतर सैन्याधिकार्यांच्या रोषाचे कारण कदाचित What's gnawing at most of his contemporaries is that, Maneckshaw also did go around claiming that he ran the show singlehandedly during the 1971 war. The insinuation was that the airforce and navy were answering to him, when again, this is not true. हे असावे.
दुवा दोन : त्यांच्या फील्ड मार्शल पदावरील नेमणूकीबाबतच्या घडामोडी.
(या भागात अपेक्षित नावांवर दोषारोप नसल्याने अनेकांचा अपेक्षाभंग होण्याची शक्यता). ;)
टेक्निकली फिल्ड मार्शल ह्या पदावरील व्यक्ती कधीच सेवानिवॄत्त होत नाही आणि या पदाचं वेतन मरेपर्यंत मिळतं.
त्यामुळं फिल्ड मार्शल व्यक्तीला सेवानिवृत्ती वेतन देणं हेच फारसं बरोबर नव्हतं. ते डॉ. अब्दुल कलामनी २००७ मधे १९७३ पासूनचा पागार आणि सरकारकडे राहीलेली इतर थकबाकी असे १.१६ कोटी रूपये मंजूर करून ती चुक दुरूस्त केली.
"......आणि या पदाचं वेतन मरेपर्यंत मिळतं.''
~ खरंय.... पण झारीतल्या काही शुक्राचार्यांनी त्यांचे हे 'वेतन'च फिक्स केले नाही ना. त्यामुळे ३५ वर्षे ते रुपये १३००/- च घेत राहिले. वेतनश्रेणी नसल्याने पे फिक्स नाही... अन् पे फिक्स नसल्याने कालानुरूप त्याचे रीव्हिजन झाले नाही.
इन्द्रा
"Had I done so, it might have caused difficulties for Maneckshaw."
~~ होय जनरल जेकब यांची ही प्रतिक्रिया मला माहित आहेच. चौकशीमध्ये क्वीनचा फोटो लावणे याशिवाय आणखीन एक बाब होतीच जिचा मी जाणूनबुजून उल्लेख केलेला नाही....कारण ती त्यांची (माणेकशॉ यांची) खाजगी बाब होती....पण त्या दरम्यान मेनन अँड को.ने ती काढली होती हे खरे. हा विषय विस्ताराने पुढील भागात घ्यावा असे वाटते.
"Maneckshaw also did go around claiming that he ran the show singlehandedly during the 1971 war."
~~ हे जरा पचायला जड जाते मला....पण उद्या परत इथल्या दोघांतिघांशी चर्चा करतो. [वाक्याच्या रचनेवरून तर असे वाटते की, सत्य नसून प्रवाद असावा.]
इन्द्रा
या भागात अपेक्षित नावांवर दोषारोप नसल्याने अनेकांचा अपेक्षाभंग होण्याची शक्यता
ह्यालाच एका चाचाने दुसर्या चाचाला पाठीशी घालणे असे म्हणत असावेत.
सहजराव म्हणतात तसे लेखन आणि त्यावरील प्रतिसाद दोन्हीही अप्रतिम. असे सुंदर लेखन, प्रतिक्रीया वाचण्यात आल्या की वाचनखुणेची उणीव हमखास जाणवतेच.
मी अनेक वर्षांपूर्वी जनरल थोरात यांच्या आत्मचरीत्रातील काही भाग बहुतेक दै. लोकसत्ता मधे वाचला होता. त्यांत नेहरू-मेनन यांची ध्येय्-धोरणे (?), जनरल कौल ह्यांचे इस्पितळातील खाटेवरून आदेश सोडणे, जनरल थिमय्यांचे ह्या सर्वांशी असलेले तणावपूर्ण संबंध वगैरे सर्व काही अगदी विस्ताराने दिले आहे.
टी प १ : हे लेख जेव्हा लोकसत्ता मधे प्रकाशित झाले तेव्हा स्वाभाविकच श्री. माधव गडकरी हे संपादक होते.
टीप २ : ही प्रतिक्रिया त्या वाचकांसाठी आहे जे नेहरू, मेनन ह्यांच्या व्यक्तिमत्वाचा सर्व बाजूने विचार करू शकतात. ज्यांनी त्यांना देवत्व अर्पण केले आहे आणि त्यांचे विरुद्ध मतांना जे देवावर आरोप असे समजतात त्यांनी ह्या प्रतिक्रियेकडे दुर्लक्ष करावे ...
जनरल एस.पी.पी.थोरात यांच्यावर झालेल्या अन्यायाबाबत तर लिहिता येईलच पण एकूणच याही महान सेनानीच्या झगझगत्या कारकिर्दीबद्दलही तितक्याच आत्मियतेने लिहिता येईल...स्वतंत्रपणे.
".....त्यांनी ह्या प्रतिक्रियेकडे दुर्लक्ष करावे ..."
~ असे काही नसते, सागर. लोकशाही तत्वावर मिसळपावची कार्यप्रणाली चालते, तेव्हा तुम्हाला उद्या असे वाटले की, 'इन्द्रराज पवारां'च्या या लिखाणाला विरोध करु या....तर यू आर मोस्ट वेलकम. या उलट तुमचे एखाद्या प्रतिक्रियेतील मत मला पटले नाही तर मी देखील तसे इथे नोंदवू शकतो..... फक्त विरोध करताना प्रतिक्रियेतील भाषेचे सादरीकरण लाल असू नये.
इन्द्रा
भारताला या परिस्थिती पर्यंत पोहचवण्यास मदत करणार्या नेहरु-गांधींना कोपरापासुन नमस्कार!!!
उद्या गांधीं जयंती.,,. पांढरी टोपी घाला, हात जोडा म्हणा
रघुपती राघव राजाराम | पतित पावन सीताराम
कोण म्हणतो रे, दोन्ही बाजुला बाया चुकलो स्वयंसेविका हव्यात.. सेवा कराल मेवा मिळेल हो!!
मग तिकडे राम वनवासात का असेना??
हे आपल्याकडून अपेक्षित नाही. आपण मला वाटते हे लिहिण्यात चुकच केली आहे. आपण गांधींच्या विचारावर टीका करू शकता पण त्यांचे विचार काय होते हे पूर्णपणे समजून घेऊन. आपले वय काय आहे हे समजत नाही पण आपण जरा सबुरिने घ्यावे ही विनंती.
थत्ते काका, टापरे लावलेला घोडा असतो ना, त्याला कसे फक्त एकाच दिशेने बघता येते, बाकी सगळा अंधार असतो, तसे आहे हे. अनेक लोकांना जळी-स्थळी-काष्ठी-पाषाणी फक्त गांधी द्वेषच दिसतो. असो, आपण काय करणार त्याला ?
अजून एक या काळातली कॉन्ट्रोव्हर्सी म्हणजे १९७१ मध्ये बांग्लादेश निर्मिती नंतर एका वार्ताहरानं मुलाखत घेताना विचारलं की
'१९४७ मध्ये जर तुम्ही भारतीय सैन्यदलात सामिल न होता पाकिस्तानी सैन्यदलात सामिल झाला असता तर काय झालं असतं?'
त्यांचं उत्तर होतं ' कदाचित युद्धाचा निर्णय वेगळा लागला असता'. ह्या उत्तरावर बरीच रणधुमाळी माजली होती म्हणतात.
एका एनसीसी च्या संचालनात एका स्त्री कॅडेटला बक्षिस देताना त्यांचा हँडशेक करण्याऐवजी 'पेक ऑन द चीक' प्रकार बराच गाजला होता म्हणे. पण त्यांनी हे एका सैनिकाचं दुसर्या सैनिकाप्रति फक्त अफेक्शनेट वर्तन आहे हेच म्हणणं कायम ठेवलं.
२००१ मध्ये परवेझ मुश्शरफ भारत भेटी दरम्यान एअर चिफ मार्शल टिपणीसांनी मुश्शरफ ना फक्त हँड्शेक केला सॅल्युट नाही यांवर त्यांनी टिपणीस चूक आहेत आणि 'मी गणवेषात असतो तर मी सॅल्यूट केला असता' अस म्हटलं त्यावर थोडं वादंग होतं.
असे मनात असेल ते प्रमाणिकपणाने बोलणारे लोक बहुतेक वेळा वरिष्ठ लोकाना खूष ठेवू शकत नाहीत. माणेकशॉ हे स्पष्टवक्ते होते असं कोणी म्हणेल, तर कोणी याचं वर्णन फटकळपणा असं करील. आणखी कोणीतरी " स्वतःला खूप जादा समजतो काय?" असंही म्हणेल.
पण १०० त ९९ वेळा राजकारणी असोत किंवा बरोबरचे दुसरे कलिग्ज असोत, त्याना असे स्पष्टवक्ते लोक अडचणीचे ठरतात. आणि मग ते पद्धतशीरपणे बाजूला सारले जातात.
'हिंदी-चिनी भाईभाई' या चीनच्या कावेबाज प्रचाराला शांतिप्रिय पंडित नेहरूही चकले आणि नेमक्या याच क्षणी व्ही.के.कृष्ण मेनन यांची संरक्षणमंत्री पदी निवड झाली.
-मी वाचलेल्या एका पुस्तकात (The unfought war of 1962 : the NEFA debacle / J. R. Saigal) म्हटल्याप्रमाणे - याउलट नेहरूंनाच आपल्या सैन्याबद्दल गैरवाजवी आत्मविश्वास आणि चिनी सैन्याच्या शक्तीबद्दल गैरवाजवी अंदाज होता. त्यामुळे आपण नेफा-(अरुणाचला)ची सीमा निश्चित केली तर चिनी त्याला विरोध करणार नाहीत म्हणून त्यांनीच सैन्याच्या हालचाली नेफा बॉर्डरवर सुरू केल्या असा उल्लेख आहे. चीनने दिलेल्या इशार्यांना न जुमानता त्यांनी तिथे आपली औटपोस्ट स्थापायला सुरुवात केली त्यामुळेच ६२चे युद्ध झाले. ते 'शांतिप्रिय' होते हे तितकेसे खरे नसावे.
तुमचे काय मत आहे?
होय. ते शांतिप्रिय नव्हते तर धोरणी होते असा दावा नरहर कुरुंदकर यांनी केला आहे. त्यांची धोरणे चुकली असतील किंबहुना चुकलीच पण त्यामागे शांतिप्रियता हा हेतू नव्हता. भारतासारख्या दुबळ्या, गरीब राष्ट्राला स्वातंत्र्य मिळाल्या मिळाल्या कोणतेही युद्ध परवडण्यासारखे नव्हते. म्हणून त्यांनी शांततेचा लांबरुंद लतामंडप उभारुन ठेवला. भारतात रणगाड्यांचे प्रॉडक्शन(५४ किंवा ५६ साली) सुरु करण्यामागे पंडित नेहरु यांचा इनिशिएटिव्ह आहे ही बाब लक्षात ठेवली पाहिजे. पंडित नेहरु काय किंवा महात्मा गांधी काय ते शांतिप्रिय होते, अहिंसावादी होते या सगळ्या फार नंतरच्या गोष्टी आहेत. या सगळ्याआधी ते दोघेही एक मुत्सद्दी, धूर्त,कावेबाज राजकारणी होते ही बाब लक्षात ठेवली पाहिजे.
वाचनीय भाग.
अवांतर वाटेल, परंतु कोणत्याही व्यक्तीस केवळ काळ्या वा पांढर्यात रंगवले जाऊ नये म्हणून सांगावेसे वाटते.
संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत भारताचे प्रतिनिधित्व मेनन यांनी केले होते. २३ जानेवारी १९५७ रोजी काश्मिर ह्या विषयावर सलग आठ तास भाषण करून त्यांनी भारताची बाजू मांडली. अती थकव्याने कोसळले. वैद्यकीय तपासणीसाठी त्यांना इस्पितळात नेले गेले. तिथून परत परिषदेत आले. पुन्हा तासभर बोलून भाषण संपवले.
निवृत्तीनंतर माणेकशा अनेक कंपन्यांच्या डायरेक्टर बोर्डावर होते (ज्यात ओबेरॉय हॉटेलचाही समावेश होता). त्यामुळे, १३०० रुपये निवृत्तीवेतन (ते ही नियमाप्रमाणे मिळणारे) हा फारसा बाऊ करण्याचा विषय नसावा. हे कदाचित नंतरच्या भागात येईलही.
श्री.सुनील....
~~ तुम्ही या लेखाचा सुरूवातीचा पॅरा वाचला तर लक्षात येईल की मी म्हटले आहे "श्री.मेनन हे अत्यंत बुद्धीमान समजले जात" (कारण ते सत्यच होते.... ज्या व्यक्तीचा इंग्लंडमध्ये बर्नार्ड शॉ समवेत जाहीर सत्कार केला जातो...आणि तोही इंग्लिश कम्युनिटीकडून.... ती व्यक्ती नक्कीच एक्स्ट्राऑर्डिनरी टॅलेन्टची असणार यात संदेह नाही...). मात्र पुढे जेव्हा ते नेहरूना अतिप्रिय झाले त्यावेळी त्यांच्यातील 'बुद्धिजीवी' बाजूला जाऊन एका राजकारण्याने तिथे प्रवेश केला, ज्याने त्या बुद्धीला 'मी इतरापेक्षा वेगळा....' हे झालर दिली. फार हट्टी झाले होते नंतर नंतर....कारण? परत तेच....नेहरूंचे त्यांनी मिळविलेले प्रेम.
~~ येस ऑफ कोर्स....आम्हा सर्वांना ते ८ तासाचे मॅरेथॉन काईंड भाषण माहित आहे, इतकेच काय युनोच्या आजवरच्या इतिहासातील सर्वात मोठे भाषण त्याची अशी नोंद आहे. त्याबद्दल त्यांना सलामच केला पाहिजे. खुशवंतसिंग यांनी लंडन हायकमिशनरच्या कार्यालयात त्यांच्याबरोबर काम केले आहे. त्यांनी सांगितलेल्या आठवणीवर इथे एक लेख देण्याचा विचार आहेच....पण थोडक्यात इतका बुद्धीमान माणूस वैयक्तिक आकसावर उतरून दुसर्यास हिणवतो ही नाही म्हटले तरी क्लेशदायक आहेच आहे.
इन्द्रा
पण थोडक्यात इतका बुद्धीमान माणूस वैयक्तिक आकसावर उतरून दुसर्यास हिणवतो ही नाही म्हटले तरी क्लेशदायक आहेच आहे.
खरंतर बुद्धीमान माणूसच वैयक्तीक आकसावर उतरला तर त्रास होतो. ज्यांना विचार नाही करता येत त्यांच्याबद्दल काय राग येणार?
असो. इंद्रा, चांगला लेख. सुनील यांच्या प्रतिसादामुळे कृष्ण मेनन यांचाही चांगला भाग समोर आला.
धन्यवाद स्वाती....
~ पण लेखमालेविषयी सूचनाही करीत जावा. हे एवढ्यासाठी म्हणतो की, त्यामुळे अशा विषयातील अभ्यासाला आणखीन नवीन दिशा मिळते. उदा. वर श्री.सुनील यांनी श्री.कृष्ण मेनन यांचा आदरार्थी उल्लेख केला आहे...तो वाचल्यानंतर मेनन यांच्याविषयी आपला अभ्यास कमी पडतो की काय अशीही शंका येते. त्यामुळे 'चला, त्यांची ती बाजुही पाहू...' हा विचार येतो....अभ्यासकाला हा ही एक फायदाच.
इन्द्रा
सुंदर आहे पण एकांगी होऊ नये ह्याची काळजी घेणे आवश्यक आहे असे मला वाटते. म्हणूनच मी अगोदर एकदा म्हटले होते की मेनन ह्यांच्याविषयी नुसते खुशवंत सिंगांच्या (तथाकथित) खुसखुशित लिखाणाव्यतिरीक्त इतरही काही संदर्भ तपासावेत. वर सुनील ह्यांनी एक चांगला उल्लेख केलेला आहे. नेहरूंच्या चीनविषयक धोरणावरील माहितीही (जिचा तुम्ही येथे ओझरता उल्लेख केला आहेत), विसूनानांकडून एक वेगळाच अँगल मिळाला आहे.
अत्यंत कर्तबगार माणसे अनेकदा फटकळ असतात, त्यांच्या वर्तनाचा फटका त्यांच्या हाताखालील कामे करणार्यांना तसेच बरोबरीच्यांनाही बसलेला असतो. ह्या दुखापतींचे कोठे ना कोठे पडसाद उमटणार हे स्वाभाविक आहे. त्यात तुम्ही दर्शवलेली असूयाही आहेच.
जाता जाता: फोटोतील सैनिकांत अनेक जायबंदी दिसतात, कुणाचा पाय बँडेजमधे आहे, कुणाचे डोके! तरीही सर्व हसताहेत, माणेकशा सैनिकांत अत्यंत पॉप्युलर असले पाहिजेत.
इंद्रांनी त्यांच्या लेखात केलेल्या विधानाविषयी आणि 'विसूनानां' नी त्याबद्दल उपस्थित केलेल्या प्रश्णाविषयी थोडसं:
नेहरू शांतिप्रिय होते की नव्हते? यापेक्षा त्यांची देशाचे नेते म्हणून लष्कराविषयीची (आणि एकूणच जागतीक राजकारणाविषयीची) जाण किती होती? हा महत्वाचा मुद्दा आहे, असं मला वाटतं. स्वातंत्र्यानंतर "भारत कोणावरही कधीच हल्ला करणार नाही. त्यामुळे, आम्हाला सैन्याची गरजच नाही (सैन्यदलं विसर्जीत करावीत). आमच्या अंतर्गत सुरक्षेसाठी केवळ पोलिसदलच पुरेसे आहे." (संदर्भः 'इंडियन डिफेन्स रिव्हु', स्वातंत्र्यानंतरचे भारताचे पहिले लष्करप्रमूख जनरल सर लोखार्ट यांनी १९४७ मध्ये भारताची सुरक्षा योजना कशी असावी? ह्याविषयीचा अहवाल नेहरूंना सादर केल्यावर नेहरूंनी दिलेले हे उत्तरः “Rubbish. Total Rubbish. We don’t need a defence plan. Our policy is non-violence. We foresee no military threats. Scrap the Army. The police are good enough to meet our security needs").
ह्यातून ते आंतरराष्ट्रीय राजकारणात किती नवखे ('naive') होते, हेच दिसून येते. त्यावेळच्या बर्याच लष्करी अधिकार्यांच्या मते १९४८ च्या पाकिस्तानी काश्मिरवरच्या आक्रमणामुळेच भारतीय लष्कर विसर्जीत होण्यापासून वाचले.
त्यामुळे, "याउलट नेहरूंनाच आपल्या सैन्याबद्दल गैरवाजवी आत्मविश्वास आणि चिनी सैन्याच्या शक्तीबद्दल गैरवाजवी अंदाज होता." हे विधान तितकसं बरोबर नाही. नेहरूंनी जनरल कौल, मेनन, आय. बी. चे प्रमूख एन. बी. मल्लिक आणि कं. यांच्या विषयी अवास्तव विश्वास दाखवला, हा त्यांचा दोष नक्कीच होता. पण आपल्या सैन्याबद्दल गैरवाजवी आत्मविश्वास होता, हे म्हणणं बरोबर नाही कारण चीन आपल्या 'फॉरवर्ड पॉलिसी' ला सैनिकी विरोध ('मिलिटरी रेसिस्टन्स') करणार नाही, हा नेहरूंचा समज होता. १९६२ च्या युद्धाविषयीचा 'हेंडरसन ब्रूक्स रिपोर्ट' आजही जनतेला खुला नाही. केवळ, नेव्हिल मॅक्स्वेल यांनी (त्यांच्यामते रिपोटमध्ये काय असेल ह्याचा) लिहिलेला सारांश जालावर आहे. जिज्ञासूंनी जरूर वाचावा: http://www.claudearpi.net/maintenance/uploaded_pics/AnIntroductiontotheHendersonBrooks.pdf
पुढील भागात इंद्रराज ह्या विषयावर अधिक भाष्य करतील, अशी अपेक्षा आहे. त्यामुळे विस्तारभयास्तव तुर्तास इतकेच.
मुशाफिर.
अवांतरः 'नेहरू आंतरराष्ट्रीय राजकारणात किती नवखे ('naive') होते.....', हे मी बरेचसे संयतपणे मत मांडायचं म्हणून म्हटलयं. एकदा एका मित्राशी याविषयी झालेल्या चर्चेच्यावेळी त्याने "नेहरू मुर्खांच्या नंदनवनात राहात होते आणि चीन्यांनी हे बरोबर ओळखलं होतं" असं मत नोंदवल होत. ज्याच्याशी मी खूपच जास्त सहमत आहे. तो पुढेही बरचं काही बोलला होता पण ते इथे लिहिण्यासारखं नाही :). असो!
".......ही फॉरवर्ड पॉलिसी काय होती...?
~~ या विषयावर इथे या लेखमालेत लिहिणे म्हणजे मूळ विषयाशी फारकत घेतल्यासारखे होईल, त्यामुळे थोडे थांबावे लागेल, कारण एकूणच भारताने स्वातंत्र्यप्राप्तीनंतर पाहिलेल्या सर्व युध्दांविषयी एक स्वतंत्र लेखमाला मिपावर लिहिण्याचा मानस (अन्य सदस्यांसमवेत) आहे, त्यावेळी इथे चर्चा झालेल्या सर्व पैलुंवर सविस्तर चर्चा होईल असा विश्वास आहे.
इन्द्रा
होऊन १९४७ मध्ये दोन वर्षांचा काळ लोटल्यानंतरही नेहरुंची आंतरराष्ट्रीय राजकारण आणि युद्ध ह्याबद्दलची ही मते असतील तर खरंच सखेदाश्चर्याची बाब आहे! :(
तुमचं धोरण शांततेचं असणं हे ठीक आहे पण अरे समोरच्याचं तसं हवं ना? आणि समोरच्यांच धोरण कंपल्सरी शांततेचं असावं ह्याकरता तुम्ही सज्ज असणं गरजेचं असतं हे निर्विवाद!
-रंगा
माहीतीपूर्ण लेख व तितकेच माहीतीपूर्ण प्रतिसाद यामुळे ही मालीका अतिशय रंगत आहे.
पुन्हा एकदा मिपाच्या तांत्रीक व्यवस्थापनाला विनंती की कृपया वाचनखुण साठवा सोय लवकरात लवकर उपलब्ध करुन द्यावी.
माझ्या उपरोक्त (इतर) प्रतिसादातील सहगल यांच्या पुस्तकात अशीच माहिती होती असे स्मरते.
“The new posts set up (भारताने निर्माण केलेल्या) in the western sector during March- April 1962 and which led to firing by Chinese troops were not necessary at the time. It is not that Nehru was left with no flexibility. He was prepared to negotiate but chose to impose too many preconditions; almost in all instances he wanted the Chinese to withdraw first as a price for talks."
रोचक दुवा.
काही पुस्तके माहित असल्यास त्यांचीही माहिती द्यावी.
".....लेखाच्या शेवटी संदर्भांची यादीही देत चला."
~ जरूर. आता लेखमालेच्या शेवटी एकत्रीतच देतो. झाले असे, श्रा.मो., की, बरीचशी ऐकीव माहितीही मी गोळा केली आहे (पंजाब/हरियाणा/दिल्ली या पट्ट्यातून)...आत्ताच नव्हे, तर मिपाचा सदस्य होण्यापूर्वीपासून. 'लष्कर' हा माझा फार प्रिय असा विषय आहे, आणि तुम्ही जाणताच की वरील तीन ठिकाणी असणार्या विविध गटातील कार्यरत्/निवृत्त सनदी+लष्करी अधिकारी/जवान यांच्याकडून किती आणि कसल्या प्रकारची माहिती मिळू शकते. या भागातील दोनतीन जिल्हे तर असे आहेत की, आपल्याकडील जिल्ह्यात जसे साखर कारखाने, जि.प., जिल्हा बॅन्क, दूध सोसायट्या, ग्रामपंचायत या विषयावर संध्याकाळी गावकट्ट्यावर/देवळाच्या हक्काच्या सभामंडपात अगदी हमरीतुमरीवर येऊन चर्चा चालू असतात, त्याचप्रमाणे इकडील गप्पांचा विषय लष्कर आणि शेती.,....फक्त तबकडीला एक पिन देण्याचा अवकाश, असे काही फुलतात हे लोक, की बस्स पुछो मत.
अडचण इतकीच की, अशी ही माहिती अधिकृत धरता येत नाही....पण त्यांचा रेलेव्हन्स लक्षात आला की अभ्यासातील खुमारी खूप वाढते.
एक आहे....'मिलिटरी' या विषयावर फार फार प्रेम आहे या तीन राज्यातील लोकांचे. त्यातही 'सॅम माणेकशॉ' हे नाव याना देवासमान वाटते. [यात आश्चर्यही नसावेच.]
इन्द्रा
बरीचशी ऐकीव माहितीही मी गोळा केली आहे (पंजाब/हरियाणा/दिल्ली या पट्ट्यातून)...आत्ताच नव्हे, तर मिपाचा सदस्य होण्यापूर्वीपासून.
हे पूर्ण गृहीतच धरले होते मी तुमच्या एकंदर लेखनाची पद्धत, आणि मुद्यांविषयीचा अधिकार पाहिल्यानंतर. पण एक आहे - अशी माहिती अधिकृत धरता येत नाही, असे तुम्ही म्हणता, त्यात अधिकृत म्हणजे काय? माझे चुकत नसल्यास सोशल अँथ्रॉपॉलॉजीमध्ये अशा स्वरूपात माहिती संकलनाला महत्त्व आहे आणि या स्रोतांचा उल्लेख प्रत्येकवेळी जाहीर केलाच पाहिजे असे मानले जात नाही. असे स्रोत अनेकदा झाकून ठेवता येतात संशोधकाला. तुम्ही अगदी काटेकोर संशोधनाच्या पद्धतीने जात नसालही, नाहीही. पण म्हणून अशा स्रोतांकडून मिळणारी माहिती (येथे माहिती हा शब्द महत्त्वाचा आहे. केवळ गप्पा नव्हेत!) दुय्यम ठरत नाही. एखाद्या घटनेविषयीचे ते एक परिमाण, व्हर्शन असू शकते. कारण कोणत्याही घटनेचे स्वरूप पाहणाऱ्याच्या दृष्टीतून वेगवेगळे असू शकते. टक्कर की धडक, असा हा पेच असणारच आहे. त्यामुळे असे स्रोत जिथे आवश्यक आहे तिथे झाकून बाकी गोष्टी जरूर मांडा. त्याचे एक वेगळे महत्त्व आहे.
"....(येथे माहिती हा शब्द महत्त्वाचा आहे. केवळ गप्पा नव्हेत!)
सोशल अॅन्थ्रॉपॉलॉजीची तुम्ही व्यक्त केलेली संकल्पना योग्यच आहे. किमान तशी ती आहे म्हणून तर जगभरातील कित्येक संस्कृतीचे लिखित स्वरूपात होण्याअगोदर मौखिक स्वरूपात जतन झाले होते. फिल्ड स्ट्डीज करताना यात सहभागी असणार्यांच्या बोलण्याच्या ओघातून जी माहिती येत असते ती कितपत 'गप्पा' गटातील नाही हे त्याच्या बोलण्यातील 'इंटेन्सिटी' वरून मला जाणवते, इतपत मी म्हणू शकतो. उदा. भटिंडामध्ये अशीच एक गप्पाची [निव्वळ या विषयावरील नव्हे...दुसरेही होतेच...] रात्र होती; तिथे एका सैनिकाच्या चुलत्याना [जे त्यावेळी ४थ्या शीख रेजिमेन्टमध्ये 'सुबेदार' पदावर होते] १९६५ च्या भारत पाक युद्धात केलेल्या पराक्रमाबद्दल मरणोत्तर 'महावीर चक्र' प्रदान करण्यात आले (जे मला पुढे प्रत्यक्ष पाहायलादेखील मिळाले....असो.)...तर त्यांच्या पराक्रमाविषयी गप्पा रंगात आल्या असतानाच 'आधुनिक शस्त्रां' च्या साहाय्याने तसे पराक्रम करायला आणखीन हुरूप येत असे असा कुणीतरी सूर लावला....जो मला थोडावेळ समजला नाही. पुढे १९६२ मध्ये चीनने केलेल्या नामुष्कीच्या वेळी जर चिन्यांसारखी एक-४७ रायफली आमच्या सैनिकांना दिल्या असत्या तर चित्र वेगळे दिसले असते, इथपर्यंत चर्चेची गाडी आली. आता एके-४७ चा तर आपण हल्लीहल्ली [विशेषतः दहशतवादाचा उगम झालेल्या काळापासून] उल्लेख ऐकतो/वाचतो; पण गप्पातील एक म्हातारबुवा तर १९६२ मध्येदेखील चीनी सैन्याकडे एके-४७ ही अत्याधुनिक रायफल व आमच्याकडे सिंगल बुलेट बॅरेल [मी नेमके नाव विसरलो या मेक चे] होती त्यामुळे आमच्या पराक्रमाला कुठेतरी मर्यादा आली, असे म्हणाले.
आता ही चर्चा [एके-४७] 'माहिती' धरावी की 'गप्पा' हा संभ्रम माझ्यापुढे पडतो....कारण १९६२ च्या युद्धात खरंचे चिन्यांकडे तशी आधुनिक शस्त्रे होती का...? आणि असल्यास आपल्या पराभवाचे ते एक कारण होऊ शकेल का? हा भुंगा फडफडतो.
सोशल अॅन्थ्रॉपॉलीजीचा उपयोग माहिती गोळा करायला खूप होतो....फक्त 'पुरावा द्या' असे इथे कुणी म्हटले की....आम्ही थंडच !
इन्द्रा
सिंगल बुलेट बॅरेल = एन्फील्ड रायफल नव्हे काय? अगदी नक्की सांगायचे तर -
ही 'ली-एन्फील्ड' किंवा Ishapore 2A/2A1
(प्रकाशचित्र विकीवरून साभार)
चीनकडे एके-४७ असावी. कारण ज्यांचा सैन्याशी काही संबंध नाही पण वाचन चांगले आहे अशा वयस्कांच्या म्हणण्यानुसार - चीनकडे एकास दहा सैनिक आणि प्रत्येक सैनिकाकडे एकास दहा बंदुकीच्या गोळ्या होत्या. त्यांच्याकडे मशिनगन होत्या हे सर्वश्रुत आहे.
(दुव्याचा रंग बदलल्यास बरे)
"....ही 'ली-एन्फील्ड' किंवा Ishapore 2A/2A1"
~~ धन्यवाद श्री.विसुनाना....दुव्याबद्दल आणि फोटो टाकल्याबद्दल. हीच ती 'मेक' होती का याबाबत थोडी चौकशी करतो (म्हणजे प्रत्यक्ष त्या युध्दातील सहभागी यांच्यासमवेत नव्हे तर आता या क्षणी जे लष्करात आहेत अशा येथील अधिकारी वर्गासमवेत चर्चा करून...). पण अजून एके-४७ चे कोडे कोडेच आहे. चिन्यांच्याकडील 'मशिनगन' हे तर कॉमनच असावे, कारण ते दुसर्या महायुद्धातील महत्वाचे आयुध होतेच...पण दुर्दैवाने मशिनगनदेखील जर आपल्या सैनिकांकडे (सन १९६२ मध्ये) नसेल तर आपली 'आधुनिक शस्त्रास्त्रां'नी सुसज्ज सैन्य याची व्याख्या तरी काय होती त्या काळात?
(श्री. जयंत कुलकर्णी यावर प्रकाश - अधिकारवाणीने - प्रकाश टाकू शकतील असे वाटते.)
(ता.क. : दुव्याचा रंग बदलणे गरजेचे होते, ते आता कळते.....आणखी दोघांनी तसे सुचविले. पण आता हा लेख 'संपादन' करता येत नाही असे दिसत आहे, कारण तो टॅब पानावर दिसत नाही. ~~ पुढ्च्या भागात ही दुरुस्ती अंमलात आणतो...इन्द्रा)
सर्वप्रथम - अप्रतिम लेखमाला. वाचतोय. अभ्यासाचे कौतुक वाटण्याच्या पलीकडली माहिती देताहात. ग्रेट!
एके ४७ चिन्यांकडे असेल किंवा नसेल, ६२ साली. काही गोष्टी ध्यानात घेतल्या तर एके ४७ ची गरज तेंव्हा वाटत होती का याचा विचार करता येईल.
३०३ बंदुक ही ५०० - ७०० मीटर रेंजपर्यंत इफेक्टिव्ह असते/ असायची. म्हणजे माणूस मारायला सक्षम. माणूस मारायला त्याच्या व्हायटल पार्ट (उदा. धड) वर किमान ८० जुल इतक्या उर्जेचा आघात होणे आवश्यक आहे. ३०३ बंदुकीतनं मारलेली गोळी एवढ्या अंतरापर्यंत ८० जुल उर्जा वाहून नेते. त्यापुढे ती साधारण दीड-दोन किलोमीटर जाऊ शकते, पण हाताने दगड फेकल्यासारखी.
स्नायपर बंदुकांची इफेक्टिव्ह रेंज दीड दोन किमी असू शकते, म्हणजे खूप दुरून दुर्बीण लाऊन एखाद्या खाशाला टिपता येते. (एनिमी अॅट दि गेट्स मध्ये हा प्रकार सुरेख दाखवला आहे).
आपल्याकडे आर्मीने अलीकडे रिटायर केलेली एस एल आर (सेल्फ लोडिंग रायफल) ही माणूस मारण्यासाठी उत्तम बंदूक होती. सध्या ही सीआरपी, सी आय एस एफ, डी एस सी यांच्याकडे बघायला मिळते. हिची रेंज होती ७०० मी. म्हणजे इफेक्टिव्ह रेंज.
हिला रिटायर केली आणि इन्सास आणली. इण्डियन नॅशनल स्मॉल आर्म्स सिस्टम. हिची रेंज चारशे मीटरच्या आतबाहेर. म्हणजे एके ४७ च्या जवळपास. रेंज छोटी, बंदुकीचे वजन कमी. या कमी झालेल्या वजनामध्ये जास्तीचे अॅम्युनिशन सैनिकाला सोबत घेता येणार, म्हणजे जास्तीच्या गोळ्या मिळाल्या, हे फायदे.
पण विचारांमध्ये हे जे बदल होत गेले त्याचे लॉजिक असे होते - गोळ्या झाडल्या जातात ते शत्रूसैनिक दृष्टीपथात आल्यावर. ही गोळीबारीची लढाई साधारण तीनशे ते साडेतीनशे मीटरच्या टप्प्यात होते. मग या टप्प्यासाठी सातशे मी रेंजवाल्या बंदुकीचे ओझे का बाळगायचे? हे एक. दुसरे, माणूस मारण्यापेक्षा त्याला जखमी करणे हुशारीचे लक्षण. शत्रू मेला की त्यांचा एक माणूस निकामी झाला. पण जखमी झाला, की त्याला खांद्यावर घेणारा, आणि त्यांना कव्हर देणारा असे तीन शत्रू एकाच गोळीत निकामी होऊ शकतात.
हे लॉजिक चिन्यांनी ६२ मध्ये वापरले होते का याविषयी साशंक आहे. शिवाय ऑटो मोडमध्ये गोळ्यांची खैरात करणार्या एके सरसकट आघाडीवरच्या सैनिकांना द्यायला तेवढे अॅम्युनिशन चिन्यांकडे होते का हापण प्रश्न आहेच. गोळ्या संपल्या की बंदूक म्हणजे काठीच. (ती पुढे लावलेली संगीन सोडली तर).
एके ४७ अजूनही आर्मीसाठी आदर्श बंदूक समजली जात नाही, असे सेनादलातल्या अनेक अधिकार्यांचे मत ऐकले आहे. अर्बन वॉरफेअर, इंटर्नल सेक्युरिटीसाठी ते एक आदर्श शस्त्र आहे. बट फोल्ड करुन कोटात लपवता येते. गोळ्या स्प्रे करुन भिती दाखवता येते. कमी अंतरावर जानलेवापण असते. अशी आखुडशिंगी बहुदुधी आहे. अतिरेक्यांचे ते म्हणूनच आवडते शस्त्र आहे.
(माणेकशांवरच्या लेखाला हा प्रतिसाद अवांतरच आहे, पण विषय निघाला म्हणून ऐकलेली माहिती टंकली. तपशिलात चुका असू शकतात, गाढा वगैरे अभ्यास नाही!)
'बंदुकीचा टप्पा आणि त्याचा युद्धातील वापरावर परिणाम' या विषयावर अभ्यासपूर्ण माहिती दिल्याबद्दल धन्यवाद.
युद्धे केवळ बंदुकांनी लढली जात नाहीत हे मात्र खरे. अपयशाचे खापर कुठेतरी फोडायचे म्हणून बंदुकांचे कारण दाखवायचे , इतकेच! :(
चीन-भारत युद्ध ही भारताच्या इतिहासातील शरमेची गोष्ट आहे.
प्रतिक्रिया
मस्तच
वाचनीय.
टेक्निकली फिल्ड मार्शल ह्या
पे फिक्सेशन
१३०० रू. हे ही सेवानिवृत्ती
जनरल जेकब
कोण बॉ?
या भागात अपेक्षित नावांवर
अगदी अगदी!
जनरल थोरात यांचे आत्मचरित्र ...
भाषेचे महत्व
दंडवत..
हे आपल्याकडून अपेक्षित नाही.
त्यांच्याकडे उत्तर नसते
?
थत्ते काका, टापरे लावलेला
अजून एक या काळातली
स्पष्टवक्ते
शांतिप्रिय (?) नेहरू
होय. ते शांतिप्रिय नव्हते तर
सुरेख लेखमाला
व्ही.के.कृष्ण मेनन...!
पण थोडक्यात इतका बुद्धीमान
माहितीपूर्ण लेखमाला!
लेखमाला
लेखमाला
अतिशय वाचनीय.. पुढच्या
शांतिप्रिय नेहरू....
'फॉरवर्ड पॉलिसी'
स्वतंत्र लेखमाला
दुसरं महायुद्ध
वाचनीय
हेच म्हणतो
वाचतोय...
इथे नेहरू आणि चीन पॉलिसी यावर
नेहरु
असेच काहीसे वाचले होते
वाचतो आहे...
संदर्भ
अडचण नाही
सोशल अॅन्थ्रॉपॉलीजी
सिंगल बुलेट बॅरेल
मशिनगन
एनफिल्ड .३०३
बंदुकींविषयी थोडे
विचार आणि माहितीपूर्ण प्रतिसाद
अभ्यासपूर्ण माहिती
आराचा अप्रतिम प्रतिसाद आणि
+१
एके ४७ बरीच जुनी आहे...