प्रतिक्रिया: IT WIFE आणि स्वयंपाक या लेखावर
कालच www.misalpav.com या संकेतस्थळावर लिहिलेला एक लेख वाचला. लेखकाचे शीर्षक होते स्वयंपाक आणि IT wife. (लेखाचा धागा : http://misalpav.com/node/13469 ) शिर्षकावरूनच यामध्ये काहीतरी विनोदी असणार हे मला लक्षात आले. आणि माझे गृहीतक योग्यच ठरले. सद्य परिस्थितीकडे एका विनोदी दृष्टीकोनातून पाहण्याचा प्रयत्न लेखात सदैव जाणवत होता. पण जेंव्हा मी या लेखांवरील प्रतिक्रिया पाहू लागलो तेंव्हा मात्र आश्चर्यचकित झालो. प्रतिक्रियांच्या माध्यमातून तिथे जणू काही द्वंद्वयुद्धच चालू होते. काहीजण त्या लेखाच्या बाजूने तर काहीजण त्याच्याविरुद्ध.
लेखाचा सर्वसाधारण आशय खालीलप्रमाणे:
‘सध्याच्या काळात लग्न करताना मुलगा आणि मुलगी (दोघेही) नोकरी, सुंदरता, या गोष्टीला महत्व देतात, पण स्वयंपाक हा विषय दुर्लक्षिला जातो. अर्थात पूर्वी मुलीला हमखास विचारला जाणारा हा प्रश्न असायचा पण सद्यस्थितीमध्ये तो काहीसा मागे पडला आहे. किंबहुना विचारला गेलाच तर या प्रश्नाचे उत्तर “थोडाबहुत येतो” हे लग्नामध्ये पुढे जाण्यास योग्य मानले जाते. यामुळे पुढे उद्भवणाऱ्या गोष्टींचे एक विनोद्पूर्ण वर्णन लेखकाने केले आहे. अर्थात हे त्याने स्वतःचे लग्न झाले आहे आणि बायको IT क्षेत्रातील आहे आणि तिला स्वयंपाक येत नाही अशी कल्पना करून लिहिले आहे. आणि आजच्या वेळेला मुलांनाही स्वयंपाक आला पाहिजे हे मत स्पष्ट करून लेखाची सांगता केली आहे.’
प्रथम माझी या लेखावर प्रतिक्रिया विचारता एक विनोदी लेख म्हणून एक चांगले लिखाण आहे. कारण मीमांसकामधील : उपक्रमोपसंहारौ अभ्यासोऽपूर्वता फलम् | अर्थवादोपपत्ती च लिङ्गं तात्पर्यनिर्णये ॥ या सूत्रानुसार खालील लेख गुणवत्तेबाबतीचच्या कसोटीवर खरा उतरतो.
ज्या विरोधी प्रतिक्रिया आहेत त्यामधून काढायचे दोन सरळ निष्कर्ष म्हणजे स्वयंपाक हे काम हल्लीच्या कुटुंबाच्या दृष्टीने दुय्यम आहे आणि त्यांचा स्त्री पुरुष समानतेबद्दल झालेला मानसिक गोंधळ. सर्वप्रथम पहिला मुद्दा विचारात घेतला स्वयंपाक हे दुय्यम दर्जाचे मानणेच पूर्णपणे चुकीचे आहे. कारण अन्न वस्त्र आणि निवारा या माणसाच्या तीन मुलभूत गरजांपैकी अन्न ही गरज पूर्ण करणारे काम दुय्यम असूच शकत नाही किंबहुना ते सर्वात महत्वाचे काम आहे. अशारीतीने जर ते महत्वाचे आणि गरजेचे काम आहे हे लक्षात घेतले तर स्वयंपाक न करण्याचा कंटाळा मुली (काही बाबतीत मुले) करणार नाहीत. कारण सद्यस्थितीत प्रत्येक जण आपण किती महत्वाचे आहोत किंवा किती महत्वाची कामे आपण करतो हे दाखवण्याचा आटोकाट प्रयत्न करत असतो.
दुसरा आणि फारच वादग्रस्त मुद्दा म्हणजे स्त्री पुरुष समानता. या बाबतीत हल्ली सगळेच गल्लत करताना दिसतात. इथे आपल्या पूर्वजांनी अतिशय विचारपूर्वक केलेल्या कामाची विभागणी लक्षात घेत नाहीत. स्त्री पुरुष समानता फार पूर्वी अस्तित्वात होती (मधील काही काळात स्त्रियांवर अत्याचार झाले हे मान्य आहे). पण समानता म्हणजे प्रत्येकाने सर्व कामे केली पाहिजेत असे नाही. पुरुष जे जे करतो ते सगळे स्त्रीला जमले पाहिजे किंवा स्त्री जे जे करते ते पुरुषाला आलेच पाहिजे हे शुद्ध वेडेपणाचे आहे. हे म्हणजे क्रिकेटमध्ये सगळ्या फलंदाजांना गोलंदाजी किंवा सगळ्या गोलंदाजाना फलंदाजी आलीच पाहिजे म्हटल्यासारखे आहे. जे निव्वळ अशक्य आहे. कुणी एका गोष्टीत वाकबगार असतो तर कुणी दुसऱ्या.
आता थोडा श्रेष्ठ कनिष्ठ याचा विचार करू. कुठलीही संस्था चालण्यासाठी विविध प्रकारची कार्य कृतीत आणणे गरजेचे असते आणि त्यासाठी कामाची वर्गवारी करणे आवश्यक असते. जर प्रत्येक जण मीच व्यवस्थापन करतो म्हणू लागला तर प्रत्यक्ष कृती कुणी करावयाची. किंवा सगळेच दिग्दर्शक बनले तर अभिनय कुणी करायचा. आता अभिनेता श्रेष्ठ कि दिग्दर्शक? व्यवस्थापक श्रेष्ठ कि कामगार? माझ्या मते तरी यापैकी कोणीही कमकुवत पडले तर ते संस्थेसाठी धोकादायक आहे. त्यामुळे प्रत्येकाने नेमून दिलेले काम करणे हेच श्रेयस्कर. आता स्वयंपाक मुलीने करायचा कि मुलाने. तर परमेश्वराने (जे देव मनात नाहीत असे म्हणतात त्यांच्यासाठी निसर्गाने) स्त्री आणि पुरुष हा भेदभाव केला आहे. (आता याबाबत निसर्गावर कुणी दावा लावत नाही म्हणू बरे आहे). निसर्गतःच स्त्री आणि पुरुषाची जडणघडण वेगवेगळी आहे. आणि समाजव्यवस्थेमध्ये जसजशी कामे येऊ लागली तसतशी त्याला लागणाऱ्या कुवतीप्रमाणे या कामांची विभागणी होत गेली. पूर्वीच्या काळी शेती हा मुख्य व्यवसाय बनला आणि त्याला लागणाऱ्या कष्टप्रद कामामुळे ते काम साहजिकच पुरुषाकडे आले. तर स्त्रीचा प्रेमळ स्वभाव थोडा स्वार्थीपणा (इथे स्वार्थीपणा चांगल्या अर्थाने घ्यावा) यामुळे घर सांभाळणे स्त्रीकडे आले. कालपरत्वे वेगवेगळी कामे येत गेली आणि त्यांची विभागणी सुद्धा होत गेली. काही गोष्टी जिथे दोघांना शक्य आहेत त्या दोघेही करू लागले. आणि ही अतिरिक्त कामे वाढल्यामुळे जुनी जी विभागणी होती ती कामे कुणी करावयाची हा प्रश्न साहजिकच उद्भवू लागला. सध्यातरी कुठलीही (काही अपवाद असतीलच : अपवादानेच नियम सिद्ध होतो) मुलगी माझा नवरा घरी बसुदे आणि मी १२ तास घराबाहेर राहून काम करते म्हणणे मला तरी अशक्यच वाटते. याला कारण स्त्रीस्वभाव आणि स्त्रीची शारीरिक तसेच मानसिक क्षमता. पण हल्ली माणसाला निसर्गाच्या विरुद्ध जाण्याचा नवा छंद जडला आहे. त्याची फळेही आपण भोगत आहोतच. या बाबतीमध्ये सुद्धा निसर्गाच्या विरुद्ध जाऊन तू का मी हा वाद करत बसलो तर उद्याची पिढी कुपोषित होण्याचीच शक्यता जास्त आहे. बाकी प्रत्येकजण आपल्या बुद्धीनुसार निर्णय घेतोच. यालाच हल्ली आपण स्वातंत्र्य म्हणतो. तेंव्हा सर्वांना त्यांच्या स्वातंत्र्याच्या शुभेच्या देऊन हे खरडणे बंद करतो.
(टिप्पणी: माझ्या लेखाचे वरील मीमांसक सूत्राप्रमाणे व्यवछेदन करू नये ही विनंती)
वर्गीकरण
प्रतिक्रिया
हीच प्रतिक्रिया आपण त्या
जयभीम प्रभो दादा
स्वागत
धन्यवाद
हवेत तीर?
ऋष्या पडत्या फळाची आज्ञा का रे .
रोज + पुन्हा + हाच + खेळ
मिपावर स्वागत
???
हे हे हे..
बायकांनी काय करावं हे त्यांना
देवाची शप्पथ , तुमच्या
माझे मत...
>>>मुलींनी स्वयंपाक करण्यालाच
मुलींनी स्वयंपाक करूच नये असा
क ह र
स्वातंत्र्य..
पहिली गोष्ट थोपवणं हा शब्द
तेच ते तेच ते... किती टक्के
धन्यवाद..
समजून घेतल्याबद्दल धन्यवाद.
तहान लागली की खणूच की
मनापासून सांगतो..
आदर भावना
जेवा आधि
>>याचा अर्थ असा घ्यायचा का की
हा प्रश्न या धाग्याच्या
मूलभूत प्रश्न
मलाही
असं.. मग केव्हाच द्यायला हवा
जातीं विषयी आपली काय मतं
हा एक वेगळाच पण चांगला मुद्दा
आधी झाडे लावा
>>अवांतर : तरी बर ही अदिती
ए गप रे! एकतर सारखे सगळेजण
पहिल्या वहिल्या लेखा बद्दल
>>अशारीतीने जर ते महत्वाचे
पक्या भाव मराठी काही म्हणी
बरोबर आहे, गणपा . त्यामुळेच
नुसतेच...
वाह वा!!! इतके दर्जेदार आणि
ऑनसाईट
सध्या ऐटीतील बायको सीझन चालु
(विषय दिलेला नाही)
सारंग कुलकर्णी, आपले लेखन
बायकोबी पायजे सुंदरबी
पुरुष जे जे करतो ते सगळे
आत्ताच जेवण करुन आलो, पुन्हा
मुद्दा
आयला आणि या विषयाची फॅशनच