वा...मजा आली हा भाग वाचुन. :)
जो पर्यंत पाकड्यांकडुन अमेरिकेला दणका बसत नाही तो पर्यंत ते सढळ हातानी मदतीचा ओघ सुरुच ठेवतील. :(
या सर्वात मोठ नुकसान मात्र आपल्याच देशाचं झालेल दिसतयं.पाकडे माजलेत अन् ड्रॅगन तर पूर्ण तयारीतच बसला आहे...
मदनबाण.....
There is no need for temples, no need for complicated philosophies. My brain and my heart are my temples; my philosophy is kindness.
Dalai Lama
कुठलाही राष्ट्राध्यक्ष निवडून आला तरी अमेरिकेचे पाकिस्तानबद्दलचे धोरण कांहीं बदलत नाहीं. मी बराच विचार करतो पण खालील चार पर्यायांपैकी कुठला 'फिट' बसतो ते कांहीं उमजत नाहीं.
१) आधीच्या राष्ट्राध्यक्षांनी इतकी 'वाट' लावली आहे कीं पाकिस्तानला मदत नाहीं केली तरी संकट व केली तरी संकट अशी परिस्थिती आहे? ही पाक धोरणाची 'वाट' आयसेनहॉवरनी लावली (SEATO/CENTO मध्ये पाकला घेऊन) कीं निक्सननी लावली (चीनशी दोस्ती करतांना पाकिस्तानची मदत घेऊन) कीं रेगननी (अफगाणिस्तानमधून अमेरिकन रक्त न सांडता पाकिस्तानकडून ते आक्रमण परतवून लावण्यापायी नको ते धोके उचलून) हे अनाकलनीय आहे!
२) सगळे राष्ट्राध्यक्ष एकाच मुशीतून बाहेर आले आहेत काय? सगळे छापातले गणपती आहेत काय?
३) राष्ट्राध्यक्ष कुणीही असो, सनदी नोकरच सरकार चालवतात काय? अशा वेळी BBC वरील "Yes, Minister" या मालिकेची आठवण झाल्याशिवाय रहावत नाहीं!
४) हा पर्याय म्हणजे अमेरिकन जनतेलाही पाकिस्तान जवळचा वाटतो काय? हे खरे वाटत नाहीं कारण मला जे आम अमेरिकन लोक अमेरिकेत भेटले आहेत त्यांना राजकारणात, तेही विदेशी राजकारणात फारसा रस वा फारशी माहितीही नसते.
याबद्दल आम मिपाकरांचे व खास करून अमेरिकास्थित मिपाकरांकडून प्रतिसादांचे खास स्वागत आहे!
सुधीर काळे, जकार्ता
------------------------
दोन अत्यंत वाचनीय दुवे: http://www.dnaindia.com/opinion/main-article_dynasty-vs-government_1368625 (DNA) व http://indiatoday.intoday.in/site/Story/89840/Inhuman+rights.html?complete=1 (India Today)
तुमची ही मालिका वाचायला मला वेळ होत नाहीये परंतु काही भाग वरवर चाळलेत.
अमेरिकेचे धोरण का बदलत नाही हा प्रश्न तुम्ही विचारला आहेत.
'एका तेलियाने' ह्या गिरीश कुबेर लिखित पुस्तकात ह्याची थोडी उत्तरे मला मिळाली असे वाटते. वसाहतवाद हा अमेरिका आणि ब्रीटनसारख्या देशांच्या विचारांचा आत्मा आहे. अमेरिकेपुरते बोलायचे झाले तर ह्या ला दोन मुख्य पदर आहेत. अमेरिकन सरकारचे बोलविते धनी हे शस्त्रास्त्र निर्मिती करणारे कारखाने आणि बलाढ्य औषधकंपन्या आहेत हे सत्य आता जगजाहीर आहे. (काही दुवे शोधतोय सापडले की देतोच). त्यांच्या फायद्याचे जे असेल ते आणि तसेच सरकारने वागले पाहिजे ह्याकडे कटाक्षाने लक्ष दिले जाते.
दुसरे म्हणजे तेल हे अमेरिकन जीवनाचे रक्त आहे ते आटले तर अमेरिका संपलीच (तसे संपूर्ण जगाचेच रक्त तेल आहे पण अमेरिकेचे अवलंबित्व पराकोटीचे आहे) तेलाचे राजकारण हा मध्यपूर्वेतल्या एकूण सत्ताकांक्षेचा केंद्रबिंदू आहे. तेलाचे साठे असलेले देश आपल्या ताब्यात रहावेत ह्या एकाच उद्देशाने सीआयए ने गुप्तहेरगिरी केली काय वाट्टेल ते करुन तिथे सत्ता प्रस्थापित करायचीच हे एकमेव धोरण (वेनेझुएलाचा चावेज ह्याच कारणाने अमेरिकेच्या डोळ्यात सलतोय कारण तोही प्रचंड तेलसाठ्यांच्या खजिन्यावरचा नाग आहे!)
त्याच बरोबर सोविएत रशिया ह्या एकेकाळच्या बलाढ्य कम्युनिस्ट राष्ट्राशी सतत स्पर्धा हा एक उद्देश - मध्यपूर्वेत त्यांनी मुसंडी मारु नये हा खरा हेतू. ८० च्या दशकात अफगाणिस्तानात रशिया घुसली तेव्हा लादेन आणि त्याची पिल्ले ह्यांना कोणी पोसले? सीआयए (अमेरिका) ह्यांनीच! पुढे त्यांचा भस्मासूर झाला.
इराण - इराक - अफगाणिस्तान - जॉर्डन - इजिप्त - इस्राएल - पॅलेस्टाईन हे सगळे भूभाग सतत अस्थिर ठेवायचे कारण तिथे स्थिर सरकारे आली की त्यांना विचार करायला वेळ मिळतो आणि एकदा तसा वेळ मिळाला की मग अमेरिकेला तिथून काढता पाय घ्यायला लागेल! युद्ध खेळायचे ते त्यांच्या भूमीवर काय रक्तपात होईल, पिढ्या बरबाद होतील, सर्वंकश हानी होईल ती तिथे, आपल्या घराला झळ लागता कामा नये. भले शेकड्यानी अमेरिकन सैनिक मरोत आणि अब्जावधी डॉलर्सचा चुराडा होवो फिकिर नाही!
'पाकिस्तान प्रेम' हे असेच संधीसाधू आहे. एकूण भूभागाचा विचार करता पाकिस्तान हा स्ट्रॅटेजिकली कळीचा भाग आहे. एकतर दक्षिणेला अरबी समुद्र त्यामुळे अमेरिकन युद्धनौका थेट पोचू शकतात. त्यातून एका बाजूला अफगाणीस्तान, अग्नेयेला भारत, उत्तरेला रशिया, ईशान्येला ड्रॅगन. तिथे सत्ता असली तर अनेक संवेदनक्षम टापू एकाच टप्प्यात नजरेखाली राहतात! भारताच्या महत्त्वाकांक्षांना पाकिस्तानच्या माध्यमातून चाप लावायची ही नामी संधी ते कशी सोडतील! एकीकडे ड्रॅगनला बाबापुता करुन चुचकारत ठेवणे त्यांना गरजेचे ठरते. पाकिस्तानात मुसंडी मारुन सगळे तालिबानी हाकलून लावणे एवढे कठिण नाहीये अमेरिकेला पण ते तसे करणार नाहीत फक्त धमक्या देत रहाणार. कारण पाकिस्तानातली अस्थिरता हा त्यांचा उद्देश आहे. अस्थिर रहा आणि आमच्यावर अवलंबून रहा. मदत देऊ त्याबदल्यात आम्ही तिथे येऊन पाहिजे ती माहिती मिळवू.
आपण पाकिस्तानात कसे काम करतो आहोत, पाकिस्तान सरकार दहशतवादाला पायबंद घालायला कसे प्रयत्नशील आहे असे अधूनमधून सांगत रहायचे की झाले! पाकिस्तान फारच आगळिक करतोय असे दिसले तर त्यांना समज द्यायची. मधून मधून भारत कसा अण्वस्त्रयुक्त देश आहे आणि त्यामुळे अमेरिकेला कशी काळजी वाटते ते सांगायचे. असे आलटून पालटून चालू असते.
पाकिस्तान जर मोडला तर तिथला अंकुश जाईल. चीन टपलेलाच आहे. भारत-पाकिस्तानात सख्य होऊ देणेही त्यांना परवडणारे नाहीच.
मदत केली तर संकट आणि नाही केली तरी संकट अशीच परिस्थिती आहे पण आता अमेरिकेची परिस्थिती अंडरवर्ल्डमध्ये शिरकाव केलेल्या गुंडासारखी आहे. माणसे मारणे थांबवता येत नाही सुपार्या घेत रहायच्या माणसे टिपत रहायची परतीचा मार्ग बंद आहे. थांबले की संपले!
चतुरंग
चतुरंग-जी,
पण अमेरिका फारच अदूरदृष्टीच्या धोरणाने वागते आहे असे वाटते, कारण त्यांना पुढच्या दशकात भारताचीच मदत लागणार आहे! जेंव्हा पाकिस्तानला वगळून आपल्याबरोबर मुलकी परमाणू करार तिने केला तेंव्हां मला वाटले होते कीं चीनशी लढण्यासाठीची ही पूर्वतयारीच सुरू केली तिने. पण पाकिस्तानसारखा fickle मित्र कुणालाच काय कामाचा?
Both US and Pakistan deserve each other असे एका वाचकाने एका प्रतिसादात लिहिले होते ते खरे आहे!
अमेरिका एक 'सुपारी' घेतलेल्या गुंडाच्या भूमिकेतून राजकारण करते आहे हा तुमचा मुद्दा interesting आहे.
धन्यवाद!
सुधीर काळे, जकार्ता
------------------------
दोन अत्यंत वाचनीय दुवे: http://www.dnaindia.com/opinion/main-article_dynasty-vs-government_1368625 (DNA) व http://indiatoday.intoday.in/site/Story/89840/Inhuman+rights.html?complete=1 (India Today)
कोणीच कोणाचा कायमचा शत्रू वा मित्र नसतो. सगळे गरजेनुसार असते.
कारण त्यांना पुढच्या दशकात भारताचीच मदत लागणार आहे! जेंव्हा पाकिस्तानला वगळून आपल्याबरोबर मुलकी परमाणू करार तिने केला तेंव्हां......
बरोबर आहे. पण सध्या पाकिस्तान गरजेचा आहे ना मग घ्या मदत! जेव्हा त्यात वापरण्याजोगं शिल्लक रहाणार नाही तेव्हा भारताला जवळ करा. त्यासाठीच सध्या परमाणू करार करुन ठेवलाय! तेवढीच चीनलाही थ्रेट!
अदूरदृष्टीने नाही कावेबाजपणाने आहे. सुपारी घेतलेल्या गुंडाची उपमा मी अशाकरता दिली की आता काही धोरणे अंगावर आली तरी त्यात ते इतके गुंतलेले आहेत की सहजी माघारीचा मार्ग नाही ती आत्महत्त्या ठरेल त्यामुळे पुढे जात रहायचे.
चतुरंग
ते इतके गुंतलेले आहेत की सहजी माघारीचा मार्ग नाही ती आत्महत्त्या ठरेल त्यामुळे पुढे जात रहायचे.
म्हणजे पहिला पर्याय त्यातल्या त्यात जवळचा ठरेल.... मलाही असेच वाटते! अगदी तानाजीचा सिंहगडावरचे सगळे दोरखंड कापल्याचा पवित्रा!
१) आधीच्या राष्ट्राध्यक्षांनी इतकी 'वाट' लावली आहे कीं पाकिस्तानला मदत नाहीं केली तरी संकट व केली तरी संकट अशी परिस्थिती आहे?
सुधीर काळे, जकार्ता
------------------------
दोन अत्यंत वाचनीय दुवे: http://www.dnaindia.com/opinion/main-article_dynasty-vs-government_1368625 (DNA) व http://indiatoday.intoday.in/site/Story/89840/Inhuman+rights.html?complete=1 (India Today)
शीर्षक कसे बदलायचे? मला फसवणूक-प्रकरण आठवे-अननसाचा केक (Pineapple Upside-Down Cake) असे बदलायचे आहे
सुधीर काळे, जकार्ता
------------------------
'न्यूक्लियर डिसेप्शन' या मालिकेचे प्रकाशन आज 'ई-सकाळ'मध्ये सुरू झाले. प्रस्तावना: http://epaper.esakal.com/esakal/20100417/4956582226686397045.htm
या लेखमालेच्या प्रकरणांबद्दल बरेच 'मिपा'कर मला 'व्यनि'वर व्यक्तिगत प्रतिसाद देणे पसंत करत असावेत. त्यात एकाने मला या प्रकरणाच्या शीर्षकाचा (अननसाचा केक किंवा Pineapple Upside Down cake) अर्थ किंवा त्याचा मुख्य मजकुराशी संबंध काय असा प्रश्न विचारला.
खरं तर या पुस्तकातील बर्याच प्रकरणांची शीर्षकें जराशी 'फिट्ट' वाटत नाहींतच. उदा. आपल्याला जोडणारे धागे किंवा ज्यू मनोवृत्ती वगैरे. बर्याच वेळी मूळ प्रकरणात त्यांचा उल्लेख जरासा ओढून-ताणूनच वाटतो.
मी माझ्या पत्नीस या केकची कांहीं खासियत आहे कां असे विचारले. ती म्हणाली हा केक अननसाच्या चकत्या सर्वात वर टाकून बनवितात व काढताना इतर केक्स प्रमाणे हाही उलटाच बाहेर येतो. पण वरच्या बाजूला अननसाच्या चकत्या लावलेल्या असल्यामुळे त्या बाजूला icing करता येत नाहीं म्हणून तो तळाला icing असल्यामुळे उलटाच पेश केला जातो.
या प्रकरणात या केकचा बादरायणी संबंधच आहे! कुलदीप नायर जेंव्हा खानसाहेबांच्या घरी जातात तेंव्हा हेनीबाईंनी (सौ. खान) हा केक नायरना आवडतो म्हणून बनविला असतो.
नायर लिहितात कीं मला बरे वाटावे म्हणून खानदांपत्याने बराच खोलवर अभ्यास करून माझा पाहुणचार केला असावा.
All said and done, they wanted to (mis)use the good offices of Mr Kuldip Nayar, though due to Dr Khan's "overdrive", the eposode boomranged to a large extent!
सुधीर काळे, जकार्ता
------------------------
'न्यूक्लियर डिसेप्शन' या मी 'मिपा'वर लिहीत असलेल्या मालिकेचे प्रकाशन आज 'ई-सकाळ'मध्ये सुरू झाले. प्रस्तावनेचा लेख वाचा: http://epaper.esakal.com/esakal/20100417/4956582226686397045.htm
आज एक फारच महत्वाची बातमी ई-टाइम्समध्ये वाचली.
http://timesofindia.indiatimes.com/world/us/articlelist/30359486.cms
या बातमीत उत्तर वझीरिस्तानमधून पळविल्या गेलेल्या ISI ऑफिसर्सची निवेदने आहेत. त्यात अस्लम बेग व हमीद गुल यांचे उल्लेख आहेत.
याच दोन लष्करी अधिकार्यांनी बेनझीरला तिच्या पंतप्रधानकीच्या पहिल्या सत्रात राज्य करू दिले नव्हते व हे अधिकारी पूर्णपणे आतंकवादाला पाठिंबा देणारे होते/आहेत. याची माहिती 'फसवणूक'च्या येत्या कांहीं प्रकरणांत येणार आहे.
अस्लम बेग व हमीद गुल यांनीच या पकडल्या गेलेया ISI अधिकार्यांना तालीबानच्या नेत्यांना भेटायला पाठविले होते हे त्या पकडलेल्या अधिकार्यांनी सांगितले आहे.
९/११च्या आधी नवाज़ शरीफ यांची ओसामा बिन लादेन यांच्याबरोबर भेट घडवून आणल्याचा दावा करणारा खालिद ख्वाजा हा अधिकारीही यात आहे!
सुधीर काळे, जकार्ता
------------------------
'न्यूक्लियर डिसेप्शन' या मी 'मिपा'वर लिहीत असलेल्या मालिकेचे प्रकाशन आज 'ई-सकाळ'मध्ये सुरू झाले. प्रस्तावनेचा लेख वाचा: http://epaper.esakal.com/esakal/20100417/4956582226686397045.htm
श्री. सुधीर काळेजी,
आपल्या लेखमालेचा मी पहिल्यापासूनचा वाचक आहे. आधी मिपा चा फक्त वाचक होतो. आपल्याला प्रतिसाद देता यावा म्हणून त्वरेने सदस्य बनलो.
बरेच दिवसात पुढचा भाग आला नाही. वाट पहात आहे.
---------------------
हे शेतकर्यांचे राज्य व्हावे.
सातबारा-जी,
(खरे नाव कळले तर जास्त आवडेल. आपल्याला प्रशस्त वाटत असल्यास कृपया व्यनिवर पाठवा. ते माझ्यापुरतेच राहील.)
गेला आठवडा प्रवासात गेला. आधी ३-४ दिवस पुण्यात होतो. तिथं खूप कांहीं कामंही होती व ३-४ दिवसांसाठी इंटरनेटची सेवा घेण्यातही अर्थ नव्हता. अमेरिकेत आल्यावर एका दिवसात जेटलॅग झटकला व परत लिहायला सुरुवात केली व आताच ९वे प्रकरण संपवले.
ई-सकाळला हे लिखाण मालिकेच्या रूपात प्रसिद्ध होऊ लागल्यामुळे आता लिहीत रहाणे व वेळेवर ई-सकाळला लेख पुरवणे ही जबाबदरी माझ्या अंगावर आलेली आहे. पण काम आवडीचे असल्याने मजा येतेय् करायला.
त्यात आपल्यासारख्यांचा असा उत्साहवर्धक प्रतिसाद वाचला कीं केल्या श्रमाचे सार्थक झाल्यासारखे वाटते.
प्रतिसादाबद्दल मनापासून आभार.
९ व्या प्रकरणावर एक 'सफाई'चा हात फिरवून बहुदा उद्या इथे पोस्ट करेन.
सुधीर काळे, सध्या मुक्काम ओबमांच्या पंढरपुरी (हो, वॉशिन्ग्टन डीसी येथे)!
------------------------
'ई-सकाळ'वरील फसवणूक मालिकेचे दुवे: प्रस्तावना: http://tinyurl.com/36pvtbn; प्रकरण पहिले: http://tinyurl.com/24rlna9
प्रतिक्रिया
वा...मजा आली
अमेरिकेचे पाकिस्तानबद्दलचे धोरण बदलताना कां दिसत नाहीं?
सुधीर काका
Both US and Pakistan deserve each other?
राजकारणात
म्हणजे पहिला पर्याय त्यातल्या त्यात जवळचा ठरेल!
शीर्षक कसे
अननसाचा केक तळाला icing असल्यामुळे upside down पेश केला जातो!
एक महत्वाची बातमी ई-टाइम्समध्ये वाचली
फारच चांगली लेखमाला ...
असा उत्साहवर्धक प्रतिसाद वाचला कीं केल्या श्रमाचे सार्थक होते