कोणी तरी म्हटले आहे की, ''मैत्री ही श्रावनातल्या पावसासारखी असते, ऊन-पाऊस असणारच तेव्हा विचलित होऊ नका. याही खेळाचा आनंद घ्या...!''
अनोळखी माणसाशी खूप बोलावं वाटतं.... आपण अधिक चिरपरिचित झालो की त्याचा कंटाळा यायला लागतो. कधी कधी जगरहाटीमुळे भेटी होत नाही. मग औपचारिकपणा शिल्लक राहिला की काय असे वाटायला लागते इतके दुरावतो. पुन्हा नव्या मित्र-मैत्रीणींची आयुष्यात घुसखोरी होते. पुन्हा पुर्वीच्या मित्रांची आठवण होते, बोलावंस वाटतं,हरवलेले क्षण शोधावेसे वाटतात.... आणि हे चक्र सतत चालू राहते. आणि हीच भावना आपल्या लेखनातून अगदी सहज व्यक्त झाली आहे.
आपल्या मैत्रीणीची आणि आपली जरुर भेट होईल.
पुढील लेखनासाठी शुभेच्छा....!!!
-दिलीप बिरुटे
प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.
हे माझे स्वत्:चे मनोगत नसून स्वतः एक मुलगी आहोत असे स्वसंमोहण करूण लिहिलेले हे मनोगत आहे.
श्री(स्वतःच्या नावासमोर श्री लावयचे नसते हे ठाऊक आहे.) रविंद्र भालचंद्र गायकवाड
>>स्वतः एक मुलगी आहोत असे स्वसंमोहण करूण लिहिलेले हे मनोगत आहे.
मला वाटलं तुम्ही मुद्दामहुन मुलाचे 'रविंद्र गायकवाड' असे नाव मिपावर [मुलांच्या धाकाने] घेतली की काय ! :)
>>श्री(स्वतःच्या नावासमोर श्री लावयचे नसते हे ठाऊक आहे.) रविंद्र भालचंद्र गायकवाड
श्री,श्रीमान,श्रीमती,महोदया, अशी आदरार्थी वचने कोणाच्या नावापुढे लावतात, लावली पाहिजे, त्याबद्दल कुठे माहिती वाचायला मिळेल...?
-दिलीप बिरुटे
फार काही सांगता येणार नाही.
कु, श्री, सौ, कै, वै, डॉ, प्रो एवढेच माहीत आहेत.
बाकी स्वतःच्या नावापुढे श्री लावणे शिष्ट समजले जाते. इथे केवळ पुरुषार्थी उल्लेखासाठी श्री वापरलेले आहे.
प्रतिक्रिया
छान मनोगत...!
धन्यवाद
खुलाशाबद्दल आभारी....!
फार काही
कसं काय ?