तांदूळगड - तांदूळवाडी
ऑगस्टच्या एका विकांताला आमच्या क्लब पटनीने एक ट्रेक करायचा ठरवला. तो होता तांदूळवाडीचा, पलघर जवळ. तशी ह्या ट्रेकची डिफिकल्टी लेवल मध्यम आहे, त्यामुळे तसा काही हा जिवघेणा ट्रेक नव्हता. पण ह्या ट्रेक मधे दोन पॅच असे आहेत जे पुर्ण दगडी आहेत. नेहमी ट्रेक करणारा ते नीट पार करु शकतो पण कधितरी करणार्याला दोरखंडाचे सहाय्य लागेल.
काही भाग हा फक्त पायवाटेचा आहे.डाव्या हाताला डोंगर उजव्या हाताला दरी. मधे दोन पाय ठेवता येईल इतकी जागा.
डव्या बाजूला आधार धरायला झाडं पण नाहीत फक्त माजलेले गवत.आणी अशाच एका ठिकाणी आमच्या आधीच्या विकांती क्लबचा एक सदस्य उतरताना पाय घसरून पडला होता. त्याला पट्ट्याच्या साह्याने वर काढून दोघेजण खांद्याचा आधार देत खाली घेऊन आले होते.
ट्रेकची तयारी क्लबने एका ट्रेकिंग / ईव्हेंट जमवणार्या कंपनीस दिली होती सो तयारी चा काही त्रासच नवता. (खरं तर ट्रेकची तयारी हा ट्रेकचा सगळ्यात मजेशीर भाग आहे.) आम्ही काही लोक ठाण्यातून, काही दादर तर काही वाशी असे निघालो.
ह्या ट्रेक साठी मुंबई - अहमदाबाद हा राजमार्ग घ्यावा लागतो. सफाळे च्या पुढे एका ठिकाणी डावीकडे वळाले की १०-१५ मिनिटाच्या अंतरावर तांदूळवाडी गाव लागते.
(मुंबई - अहमदाबाद राजमार्गावरून दिसणारा तांदूळगड - धुक्यात न्हालेला)
गडाच्या पायथ्याला पोचून चहा-नाश्टा केला. प्रत्येकाला स्वतःचे खाण्याचे डबे मिळाले आणी १०-१५ जणांचे कंपू करून सर्वांनी ट्रेक ला सुरूवात केली.
(पायथ्याहून दिसणारा तांदूळगड)
साधारण एक तृतियांश टप्पा पाऊण-एक तासात पार झाला की खालील दृश्य दिसते. हा चढा टप्पा पार केला की वर सांगितलेला इकडे डोंगर तिकडे दरी वाला प्रवास चालू होतो.
मस्त आरामात एक एक टप्पा पार करत टवाळक्या करत , प्रत्येक ठिकाणी फोटोसेशन करत आंम्ही आडीच-तीन तासाने वर पोहोचलो. एकसलग केला तर हा गड दोन तसात चढता येतो.
हा गड शिवरायांच्या काळात मुलुखावर लक्ष ठेवण्यासाठी वापरत असल्याने यावर इमारती जवळजवळ नाहीतच.
एक तळे आहे सध्या फक्त आणी थोडे भग्नावशेष. खाली गडावरील अथवा टप्प्यांवरील काही छायाचित्रे.
(ह्या फुलाचे नाव माहित नाही. जाणकार कृपया सांगतील का?? )
काटेसावर
इतकी छान हिरवळ होती कि तिथल्यातीथे मस्त लोळून घ्यावे वाटत होते...वाराही मस्त सुटला होता..थोडा बोचराच...उडून जाउ की काय वाटत होतं..पण काय ती गवताची सळसळ....मन खुष करून गेली.
हिरवे हिरवे गार गालिचे, हरिततृणांच्या मखमालीचे !
हिरवे हिरवे गार गालिचे, हरिततृणांच्या मखमालीचे ! - गडाच्या दुसर्या बाजूने
गडावर पोहोचल्यामुळे आनंदीत मी व माझे रूम पार्टनर्स
गडमाथ्यावरून वैतरणानदीचा खूपच सुंदर आणी विस्तीर्ण नजारा दिसतो.
गडमाथ्यावरच एक बोडकं झाड होतं...आधी रायगडावर आणी आता भर पावसाळ्यात बोडकं झाड बघून खरं तर अचंबाच वाटला.
गडावरील काही आधुनीक प्रेमविरांचे नक्षीकाम
गड चढताना बारीक बारीक पाउस पडत होता..नव्हता म्हटले तरी चालेल..जेवण करून गड भटकून आणी थोडे टीम बिल्डींग गेम खेळून झाल्यावर उतरताना मस्त पाऊस पडायला सुरूवात झाली. चढताना ज्या दोन खडकाळ पॅच ला दोरखंड बांधले होते ते उतरताना शेजारच्या गावातील तरूण चोरून घेउन गेले. पोरींची आणी नॉनट्रेकर्सची पंचाईत झाली. त्यात एकजण एक पॅच उतरताना पाय मुरगाळून बसला. त्याला एक ऑर्गनायजर आणी आम्ही तीन मित्रांनी खांद्याचा अधर देउन खालपर्यंत उतरवले.
गड उतरल्यावर मस्त चहा-भजीचा पोटोबा करून घरी परतलो...जाता -येता बसमधे सुंदर ललनांच्या साथीत अंताक्षरी खेळताना वेळ कसा गेल हे समजलेच नाही.आणी त्या अंताक्षरीत सगळ्यात हीट गाणं होतं हीरो नं. १ मधलं "सातो जनम तुझको पाते ,गोरी तेरे नैनो मै हम बस जाते" =))
(खास मिपाकरांसाठी : या गाण्याची २-४ मस्त विडंबनं पण उस्फुर्तपणे जागच्या जागी सादर झाली)
गडाच्या पायथ्याला पोचून चहा-नाश्टा केला. प्रत्येकाला स्वतःचे खाण्याचे डबे मिळाले आणी १०-१५ जणांचे कंपू करून सर्वांनी ट्रेक ला सुरूवात केली.
(पायथ्याहून दिसणारा तांदूळगड)
साधारण एक तृतियांश टप्पा पाऊण-एक तासात पार झाला की खालील दृश्य दिसते. हा चढा टप्पा पार केला की वर सांगितलेला इकडे डोंगर तिकडे दरी वाला प्रवास चालू होतो.
मस्त आरामात एक एक टप्पा पार करत टवाळक्या करत , प्रत्येक ठिकाणी फोटोसेशन करत आंम्ही आडीच-तीन तासाने वर पोहोचलो. एकसलग केला तर हा गड दोन तसात चढता येतो.
हा गड शिवरायांच्या काळात मुलुखावर लक्ष ठेवण्यासाठी वापरत असल्याने यावर इमारती जवळजवळ नाहीतच.
एक तळे आहे सध्या फक्त आणी थोडे भग्नावशेष. खाली गडावरील अथवा टप्प्यांवरील काही छायाचित्रे.
(ह्या फुलाचे नाव माहित नाही. जाणकार कृपया सांगतील का?? )
काटेसावर
इतकी छान हिरवळ होती कि तिथल्यातीथे मस्त लोळून घ्यावे वाटत होते...वाराही मस्त सुटला होता..थोडा बोचराच...उडून जाउ की काय वाटत होतं..पण काय ती गवताची सळसळ....मन खुष करून गेली.
हिरवे हिरवे गार गालिचे, हरिततृणांच्या मखमालीचे !
हिरवे हिरवे गार गालिचे, हरिततृणांच्या मखमालीचे ! - गडाच्या दुसर्या बाजूने
गडमाथ्यावरून वैतरणानदीचा खूपच सुंदर आणी विस्तीर्ण नजारा दिसतो.
गडमाथ्यावरच एक बोडकं झाड होतं...आधी रायगडावर आणी आता भर पावसाळ्यात बोडकं झाड बघून खरं तर अचंबाच वाटला.
गडावरील काही आधुनीक प्रेमविरांचे नक्षीकाम
वाचने
6402
वाचनखूण
प्रतिक्रिया
27
मस्त रे.
In reply to मस्त रे. by गणपा
असेच
छान भटकंती
वर्णन आणि
सुंदर
तांदूळवाडी
In reply to तांदूळवाडी by jaypal
नक्कीच
In reply to नक्कीच by प्रभो
अमेरिका वरिस हर्दिक शुभेच्छा
सुंदर वर्णन...
सुरेख रे !
वा वा वा !!!!
तांदूळवाडी माझ्याही काही आठवणी ..
छानच झाला की ट्रेक!
फिर
अहाहा !!
मस्त
चला तूही विमुक्त झालास म्हणायचा! ;)
In reply to चला तूही विमुक्त झालास म्हणायचा! ;) by चतुरंग
>>बाय द वे
In reply to >>बाय द वे by प्रभो
हं..
भावा,
In reply to भावा, by शाहरुख
>>भावा,
मस्त भटकंती केलेली दिसते
मस्त!
प्रभो मस्त रे...!
मस्त आहेत
सर्व
मस्त!