आकांत
लेखनविषय:
प्राण झाला शांत आता
संपला आकांत आता
यायचे ना फिरुन येथे,
सोडला हा प्रांत आता
तोडले सारेच धागे,
का पडावी भ्रांत आता?
सावल्यांच्या संगतीने
बोलतो एकांत आता
सोहळे सोसून फसवे
जीव झाला क्लांत आता
वादळाचे धुमसणे हे
का न होई शांत आता?
वाचने
3583
वाचनखूण
प्रतिक्रिया
20
छान
नेहमीसारख
सावल्यांच
क्या बात है /!!
सावल्यांच
In reply to सावल्यांच by अनामिक
+१
In reply to सावल्यांच by अनामिक
असेच म्हणतो!
वा वा
यायचे ना
सावल्यांच
शांत आता
सुंदर
In reply to सुंदर by नितिन थत्ते
+१ असंच म्हणते...
एकदम
सुंदर.
गझल आवडली
व्वा !
सुरेख
वा वा
सुंदर कविता....!