आचार्य अत्र्यांच्या स्मृतिदिना निमित्त त्यांच्या कर्तुत्वाची आठवण करून दिल्याबद्दल धन्यवाद! त्यांच्या भाषेत गेल्या दहा हज्जार वर्षात तयार झालेली ही असामान्य व्यक्ती आहे!
विनोदा इतकेच गंभीर लेखन आणि राजकारणा इतकेच समाजकारण पण सहजतेने हाताळणारे फारच विरळ. मुलांचे मानसशास्त्र पण त्यांना चांगले अवगत होते.
जसे सावरकरांनी त्यांना आचार्य ही पदवी दिली तशीच अत्र्यांनी सावरकरांना स्वातंत्र्यवीर ही! त्याच सावरकरांच्या सैन्यभरती धोरणाचा अर्थ लक्षात आला नाही तर त्यांना रिक्रूटवीर पण हेच म्हणाले आणि नंतर समजल्यावर चूक मोकळ्यामनाने मान्य पण केली!
असे बरेच काही...
ह्म्म असे उत्तुंग व्यक्तिमत्व एखाद्यावर टिका करताना त्याच्या बायकोच्या बाळंतपणासाठी दिलेले १५० रूपये जाहीरपणे काढत असे हे ही नाकारता येणार नाही.
(संदर्भः वासूनाका वर केलेली टिका. लिखाण अर्वाच्य म्हणत म्हणत केलेली अत्र्यांची टिका वासूनाका पेक्षा जास्त अर्वाच्य वाटते.)
- नी
http://saaneedhapa.googlepages.com/home
आत्म्याची शांती ढळेल असे काही बोलु नये म्हणतात. ;)
जुनी पुस्तकं विशेषतः मुलाखती वाचल्या की बर्याच थोर लोकांमधील 'माणसाची' जाणिव होते आणि मग आदर कमी होतो. असो!
अत्र्यांमधील मला भावलेल्या व्यक्तीमत्त्वाला आदरांजली! :)
अत्रे म्हणाले होते की:
मेल्यावर अमुचे सगळे, उभारतील दगडी पुतळे |
भवताली धरतील फेर, आज परी करती जेर ||
हे अक्षरश: खरे ठरले आहे.
त्यांच्या झेंडूच्या फुलातील खोबरे खाणारेच असंख्य आहेत.
अष्टपैलू व्यक्तीमत्व असलेल्या कै.आचार्य अत्रे यांनी संयुक्त महाराष्ट्राचा लढा अत्यंत जोमाने चालवला होता. ते चालवीत असलेले मराठा हे वर्तमानपत्र महाराष्ट्राचे मुखपत्र झाले होते. त्यांच्या जीवनातील या महत्वाच्या पर्वाची माहिती द्यायला हवी.
त्यांच्या स्मृतीला अभिवादन.
आनंद घारे
मी या जागी चार ओळी खरडल्या आहेत, जमल्यास वाचून पहाव्यात.
http://360.yahoo.com/abghare
http://anandghan.blogspot.com/
प्रतिक्रिया
!! त्रिवार प्रणाम!!
चांगली माहीती
विडंबन
आचार्य
ह्म्म असे
आत्म्याची
+१
त्यांच्या झेंडूच्या फुलातील खोबरे खाणारेच असंख्य आहेत!
संयुक्त महाराष्ट्राचा लढा