मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

दिवाळीच्या गोड दुधात बचकाभर मीठ ......

चौकस२१२ · · काथ्याकूट
एकीकडे ऑस्ट्रेलिय सरकार ऑक्टोबर ला "हिंदू हेरिटेज मंथ" म्हणून साजरा करताय https://www.youtube.com/watch?v=yNLq5cpDO04 आणि दुसरीकडे आपलेच हिंदू त्यात मीठ काल्वत आहेत .. खरे तर हे मीठ कालवणारे हिंदू तरी आहेत कि नाही कोण जाणे ... पुढे वाचा कालच दिवाळी उत्सवसाठी गेलो , या वेळचा कार्यक्रम "हिंदू कौन्सिल" नि आयोजित केलेला असल्यामुळे अर्थातच कोणते "हिंदू विरोधी किडे" तिथे वळवळ तील याची काळजी होतीच गेली काही वर्षात पिवळे झेंडे वाले खलिस्तानी ( मग कधी सरळ खलिस्तान चा झेंडा फडकावीत नाहीतर कधी " फार्मर ऑफ ऑस्ट्रेलिया अँड इंडिया " असला बादरायण संबंध दाखवीत मीठ कालव्यायालाअसतात ... पण अहो आश्चर्य म .. ते नवहते कुठे एवढचं नव्हे तर लोकांमध्ये काही शीख पाहून आनंद वाटला ....अगदी निहंगे ( धर्माला वाहिली) शीख पाहून चांगले वाटले आणि मग दुधात मिठात खडा पडलाच कोणता तो खडा : " आम्ही तामिळ हिंदू आहोत आणि आमचा या रावण दहनाला विरोध आहे" आशि पत्रके वाटत होते बाहेर... प्रथम पत्रक घेताना वाटले कि काहीतरी आजच्या कार्य्रक्रमातील जाहिरात असेल , पण पाहतो ते काय .... पुढे असे कळले कि हे पेरियार वादि आहेत , आता रावण दहन हे प्रतीकात्मक आहे मनुष्यतील १० वाईट वृत्तीचे दहन वगैरे हे यानं कोण समजवून सांगणार ,,, आव्हान दहन करणे हे काही तामिळ लोकांच्या विरुद्ध आहे असे नाही .. पण मग एक प्रश्न पडला कि , पेरियार वादि, ह्यांचा रावणावर प्रेम आणि रावण तर ब्राह्मण मग पेरियार यांचा ब्राहमण द्वेष जगजाहीर मग हे असे कसे ? पेरियारवादि आहेत ते हिन्दु आहेत क? हिन्दु नस्तिल अणि जर धर्म बदलून बुद्ध झाले अस्तिल तर त्यांना हिन्दु धर्मबद्दल बोल्ण्याचा काय अधिकर आहे ?

वाचने 11197 वाचनखूण प्रतिक्रिया 66

चावटमेला Mon, 10/28/2024 - 14:58
एवढचं नव्हे तर लोकांमध्ये काही शीख पाहून आनंद वाटला ....अगदी निहंगे ( धर्माला वाहिली) शीख पाहून चांगले वाटले दिवाळी हा शीख धर्मियांचा सुध्दा महत्वाचा सण आहे म्हणून असतील कदचित. बादवे, रावण दहन तर दसर्‍याला असते ना?

In reply to by चावटमेला

चौकस२१२ Mon, 10/28/2024 - 18:15
दिवाळी हा शीख धर्मियांचा सुध्दा महत्वाचा सण आहे, बरोबर शीख हि दिवाळी साजरी करतात परंतु असे भारतीय सार्वजनिक कार्यक्रमात ते सुद्धा हिंदू कौन्सिल ने आयोजित केलेल्या कार्यक्रमात त्यांचे येणे हा सुखद धक्काच म्हणावा लागेल गेली काही वर्षातील वातावरण बघत ( उके कानडा ऑस्ट्रेल्या, न्यू झीलंड येथील काही शिखांचे वागणे बघून म्हणत आहे ( भारताचं एकूण लोकसंख्येच्य्या मानाने जरी शीख संख्यने कमी असले तरी येथे स्थलान्तरित भारतीयांचाय संख्येत शीखाचे प्रमाण जास्त आहे आणि त्या सख्यप्रेमाने धरले तर हिंदू मंदिरात किंवा आशय कार्यक्रमात फारसे दिसत नाहीत ) रावण दहन तर दसर्‍याला असते ना? हो रावण दहन दसऱ्याला असते पण येथे दोन्ही एकत्र करून करता कारण दोन वेळेस कार्यक्रम करणे अवघड असते

चौकस२१२ Mon, 10/28/2024 - 18:18
कंजूस जी काही संधर्भ द्याल का? पत्रिकेवर कोणतच नाव नवहते त्यात " We are Tamil Hindus , we celebrate Diwali but we don't burn other god ( Ravan) Lets celebrate our difference! असे म्हणले होते श्रीलकेच्या तामिळ हिंदूनं रावणाबद्दल प्रेम असणार हे तर्क असावं बहुतेक तुमचा, बरोबर?

In reply to by चौकस२१२

कंजूस Mon, 10/28/2024 - 18:43
दिवाळी हा तमिळींचा सण नाहीच. पोंगल संक्रांत आहे. ऑक्टोबर ते डिसेंबर पाऊस पडून भात पिकते ते संक्रांतीला तयार होते. गायी पुष्ट होतात. तमिळनाडूचा कोइंबतुर भाग मात्र वेगळा आहे त्यांना दिवाळी आवडते. तिथले हवामान वेगळे आहे.

In reply to by कंजूस

चौकस२१२ Mon, 10/28/2024 - 19:02
त्या पत्रकांत असे लिहिले नवहते कि आम्ही डिवलाई साजरी करीत नाही शब्द आहेत " we do celebrate festival of lights" but we don't light ( burn) others god say no to ravan dahan " म्हणजे याचा अर्थ रावण दुसाऱ्यांचा ( तामिळ हिंदूंचा) देव आहे आणि तुम्ही त्याला का जाळंता? आणि खाली परत Stop Bullying ! https://www.youtube.com/watch?v=phsxgU3yj54&t=89s PATCA म्हणून काहीतरी संस्था आहे https://lawreform.nsw.gov.au/documents/Current-projects/s93z/prelim-subs/SV06_-_PATCA.pdf सर्वधर्म संम भावी ऑस्ट्रेल्यात पण हि लोक जात घुसवत आहेत

In reply to by कंजूस

टर्मीनेटर Mon, 10/28/2024 - 21:07
"दिवाळी हा तमिळींचा सण नाहीच." ऑ... माफ करा कंजूसकाका पण तुम्ही डोंबिवलीत माझ्या नंतर आला असाल तर... डोंबिवलीच्या गणपती मंदिरात (आताच्या तथाकथित गणेश मंदिर संस्थानात) दिवाळीच्या पहिल्या दिवशी नरकचतुर्दशीला त्या देवळात जायची प्रथा/परंपरा डोंबिवलीतल्या तामिळी ब्राम्हण परिवारांनी सुरु केली होती. आता गणेशमंदिर देवस्थान आणि त्याचे राजकारणी विश्वस्त ह्याचे श्रेय लाटू इच्छित असतील तर त्याला विरोध करायला मी बसलोय! आता अमेरिकेतही (टाइम्स स्क्वेअर मध्ये) असे प्रकार सुरु झाल्याच्या बातम्या वाचतोय पण त्याचे श्रेय सर्वस्वी तामिळ ब्राह्मणांना आहे हे मला विसरता येत नाही. पेरियार वगैरे फडतूस मंडळींना परदेशात काडीचीही किंमत दिली जात नाही हे उगाच नमूद करतोय त्यासाठी क्षमस्व!

In reply to by अमरेंद्र बाहुबली

टर्मीनेटर Mon, 10/28/2024 - 21:37
सामाजिक सुधारणा करुन जातवर्चस्व मोडून काढनारे पेरियार फडतूस?
नक्की कुठल्या सामाजिक सुधारणा केल्या त्यांनी हे समजुन घ्यायला आवडेल...

In reply to by अमरेंद्र बाहुबली

टर्मीनेटर Mon, 10/28/2024 - 21:50
का? पेरियार हा जगातला अत्यंत भिकारxx माणुस होता अशी माझी धारणा आहे. त्यांनी नक्की काय सामाजीक परिवर्तनाचे कार्य केले ते सांगा...

In reply to by अमरेंद्र बाहुबली

टर्मीनेटर Mon, 10/28/2024 - 22:09
असले फालतु प्रतिसाद देउन पळ काढु नका... विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर द्या!

In reply to by टर्मीनेटर

रामचंद्र Tue, 10/29/2024 - 16:36
डॉ. बाबा आढावलिखित सत्यशोधनाची वाटचाल या पुस्तकात पेरियारप्रणीत चळवळीचा आणि त्याच्या परिणामांचा थोडक्यात आढावा घेतला आहे. विशेष म्हणजे शाहू महाराजांनी याच धर्तीवर प्रयत्न करूनही ते अथवा त्यांनी सुरू केलेली चळवळ कोणत्या बाबतीत व का कमी पडली याचेही परखड परीक्षण केले आहे. गंमत म्हणजे आजवर शेठजीभटजींचा पक्ष म्हणून हिणवला जाणारा भाजप हा आज बहुजनसमाजात आपली पाळेमुळे रुजवताना दिसतो. पुरोगामी संघटनांना याचे आश्चर्य आणि वैषम्य वाटते, पण संबंधित पक्ष/मातृसंस्था हे कसे साध्य करते, ते आढावांनी थोडक्यात दाखवून दिले आहे. स्वजातीय शिक्षणसंस्थांच्या अंतर्गत राजकारणावरही त्यांनी नेमके बोट ठेवले आहे. पूर्वग्रह न ठेवता वाचल्यास सकस वाचनाचा आनंद मिळेल असे हे पुस्तक आहे.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

वामन देशमुख Tue, 10/29/2024 - 16:22
सामाजिक सुधारणा करुन जातवर्चस्व मोडून काढनारे पेरियार फडतूस?
१. कोणत्या सामाजिक सुधारणा केल्या? २. कुणाचे जातवर्चस्व मोडून काढले? नेमके प्रश्न विचारले आहेत, नेमकी उत्तरे द्या.

In reply to by वामन देशमुख

मनुवाद्याना पेरियार माहित नसणे म्हणजे हमासच्या अतिरेक्यांना इस्राईल माहीत नसल्यासारखे आहे. :)

In reply to by अमरेंद्र बाहुबली

वामन देशमुख Tue, 10/29/2024 - 20:50
आडातच नाही ते पोहरयात कुठून येणार? तुमच्यासारख्या फुरोगाम्याकडून यापेक्षा वेगळ्या प्रकारच्या पळपुट्या उत्तराची अपेक्षा नाही.

In reply to by वामन देशमुख

Vichar Manus Wed, 10/30/2024 - 08:40
मला वाटते की बाहुबली यांनी तमिळनाडूचा इतिहास आणि पेरियार यांच्यावर एक मालिकाच लिहिली होती मायबोलीवर, त्यामुळे त्यांना बरीच माहिती आहे, त्यांच्यावर असा आरोप करणे योग्य नाही.

In reply to by Vichar Manus

चौकस२१२ Wed, 10/30/2024 - 12:59
या धाग्याचा मूळ हेतू हा होता कि "जगात इतरत्र हिंदूंचं सण साजऱ्या करण्याच्या हकक्कावर हे हिंदूंच्या फूट पडणारे गट कसे त्रास देतात ते दाखवणे " हे पेव गेल्या काही वर्षात फुटलाय बर जातीयवाद म्हणाल तर भारतात हा प्रश्न असेल, येथे जातीनिहाय संस्था काढे अवघड आहे तुम्ही पेरीरय आंबेडकर थिंक ग्रुप ने कारण नसताना न्यू सैऊथ वेल्स ( सिडनी) सरकार कडे फालतू तक्रार केली आणि कारण नसताना त्यात हिंदू कौंसिल ला ओढले.. सरकार ने त्या तक्ररीकडे दुर्लक्ष केले / फेटाळून लावली याची लिंक मी आधी दिली होती आता बाहुबळीना मारे असेल पेरियार संबंधी खूप माहिती पण त्याचा येथील घटनेशी काय संबंध ? सात पैकी ३ चा ब्राहमण आहेत मग जातीवाद कसा ? Shri Prakash Mehta – Director, Governing Education Shri Bhagwat Chauhan – Director, Governing Charity Shri Ashwin Sharma – Director, Governing Seniors Shri Sai Paravastu – Director, Overall Responsibility Shri Makarand Bhagwat – Director, Governing Interfaith & Grants Smt. Shoba Deshikan – Director, Governing Events

In reply to by चौकस२१२

"जगात इतरत्र हिंदूंचं सण साजऱ्या करण्याच्या हकक्कावर हे हिंदूंच्या फूट पडणारे गट कसे त्रास देतात ते दाखवणे "
आलात का इकडे ? दीपावलीच्या शुभेच्छा. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

चौकस२१२ गुरुवार, 10/31/2024 - 05:01
इकडे/ तिकडे तुम्हाला दुसऱ्याना उचकवण्याशिव्या दुसरा काही येत का प्रोफेश्वर , तुमच्या तिकडे नसेल हा प्रश्न तर "पेरिअय जय " म्हणून देशभर ओरडत फिरा कोण नाही म्हणताय.... इथे जे अनोभावले ते मांडले पण परत तुमहाला सांगून काय उपयोग म्हणा ...

In reply to by अमरेंद्र बाहुबली

टर्मीनेटर Tue, 10/29/2024 - 23:33
अगदी अगदी... ब्रिगेडी लोकांना सीग्रेडी विचारांतला फरक जसा कळत नाही तसेच काहीसे 😀

In reply to by टर्मीनेटर

कंजूस Tue, 10/29/2024 - 04:14
तमिळनाडूत संक्रांतच. द्रविड मुनेत्र चळवळीनंतर तमिळी ब्राह्मण तिथून बाहेर पडून कोइंबतूर आणि पलक्कड (पालघाट) केरळमध्ये गेले.जे दुसरीकडे गेले त्यांनी दिवाळीकडे लक्ष दिले. ऑक्टोबर - नोव्हेंबरमध्ये खूप पाऊस पडतो तमिळनाडूत तेंव्हा एखादा सण साजरा करणे अशक्य वाटते.

कंजूस Mon, 10/28/2024 - 18:38
संदर्भ असा नाही पण....... १) रावण वाईट होता, श्रीलंकेत होता आणि रामाने त्याला मारले हे त्यांना आवडत नाही, पटत नाही. २) उत्तर हिंदुस्तानाच्या गोष्टींना विरोध करणे. हिंदीला विरोध करणे. इकडे त्यांना विरोध केला जातो पण ऑस्ट्रेलियात संधी साधली. ३) तसं मध्य प्रदेशातील एक गावही रावणाला जावई मानते, दहन करत नाहीत.

In reply to by कंजूस

हिंदी भाषिकांना/भाषेला विरोध ह्या पलिकडे त्यात अर्थ नाही. सध्या प्रत्येक राज्यातील लोकांना "आपण ईतर भाषिकांपेक्षा कसे वेगळे आहोत्,आपली भाषा,संस्क्रुती कशी वेगळी आहे' हे सांगायची स्पर्धा चालु आहे. परदेशात गेल्यावर ही स्पर्धा अधिक तीव्र होते. मग भाषिक बालवाडी,एकत्र येऊन नाचगाणी वगैरे दंगा सुरू होतो. त्यात पेरियारवादी म्हणजे विचारायला नको. भाजपावाले बरोबर त्याउलट.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

चौकस२१२ Mon, 10/28/2024 - 19:21
भाजपावाले बरोबर त्याउलट. इथे काय संबंध? हिंदूंनी सार्वजनिक रित्या येथील सर्व नियम पळून सण साजरे कारायायचे नाहीत ? आयोजनकी सांगतले कि त्यांना धमख्य हि आलया होत्या पण येथील सरकार ला हि बहुतेक कळून चुकलंय कि येथील हिंदू शांतताप्रेमी आहेत ( बघू कदाचित येतेच हि कानडिअन त्रिदेव असले हि ..) असो हे अति होतंय गेली काही वर्षे येथील हिंदूंना असा त्रास दिला जातोय हे फक्त इतर देशातलं हिंदूनं समजावे म्हणून येथे लिहिले बार हा त्रास कोणाकडून तर कोना मुस्लिम संघटने कडून नाही किंवा ख्रिस्ती संघटन कडून नाही हिंदू कॉन्सुल काही इथे "बघ हे आबेडकर कर वाडी कसे वित्त म्हणून पत्रक फेकत हिंडत नाहीत " येथील समाजरचनेत जो अधिक राहे त्याचे पालन करून जसे चिनी आपले नाव वर्ष साजरे करतात तसे आम्ही करतो ....

कॉमी Mon, 10/28/2024 - 18:58
We are Tamil Hindus , we celebrate Diwali but we don't burn other god ( Ravan) Lets celebrate our difference! असे नीट लिहिले असेल तर काही वावगे वाटत नाही. आपापले धार्मिक विश्वास एकमेकांना पद्धतशीर, सुसंस्कृतपणे सांगण्यात काही चुकीचे वाटत नाही. आणि जर ते सुद्धा हिंदू असतील तर मग त्यांनी आपले धार्मिक विश्वास हिंदू हेरिटेज मंथ मध्ये मांडण्यात काय चुकीचे आहे? का हिंदू म्हणजे रावणदहन कंपल्सरी असते?

In reply to by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)

चौकस२१२ Mon, 10/28/2024 - 19:27
जाम म्हणजे जाम तिडीक गेली / बहुतेक भारतीय असावेत कारण बाहेर अगदी लुंगी नेसून चांगले कपडे घालू पत्रक वाटत होते आव भाव तर अगदी साजरे करायला आल्या सारखे , पण पत्रकात काय होते ते नंतर कळले आणि आत्त्ता तर त्यामागे कोण आहे कळले ,, हिंदूनं फक्त त्रास देणे .... अरे xxxx जावा ना मग धर्म सोडून आंबेडकरांनी दिशा दाखवली ना जावा तिकडे .. आम्हाला का हि कटकट सर्व जातीचे हिंदू मिळून साली आम्ही आमचे सण पण साजरे कारायचे नाहीत का ... ??

In reply to by चौकस२१२

अरे xxxx जावा ना मग धर्म सोडून आंबेडकरांनी दिशा दाखवली ना म्हणजे आम्ही सांगू तोच धर्म. एखाद्याला सुधारणा हवी असलेंटर त्याने धर्म सोडून जावे?? आपला कॉपी राईट आहे का धर्मावर?

In reply to by अमरेंद्र बाहुबली

चौकस२१२ Tue, 10/29/2024 - 04:47
यात कसली सुधारणा... रावण दहन म्हणजे प्रतीकात्मक आहे आणि ते म्हणजे काही सती देण्याची प्रथा नाही कि सुधारणा करायल पाहिजे काहीतरी बाष्कळ प्रतिसाद

चौकस२१२ Mon, 10/28/2024 - 19:14
हिंदू म्हणजे रावणदहन कंपल्सरी असते? असे कुठे म्हणलय ? पण जे करीत आहेत त्याना का विरोध तुमचाच तर्क लावूयात "धार्मिक विश्वास हिंदू हेरिटेज मंथ मांडण्यात काय चुकीचे आहे?" हाच विश्वास किंवा चालीरीती हिंदू या महिन्यात दाखवीत आहेत त्यात काय चुकला ? हजारो संख्येने एकत्र आलेले हिंदू जर शेकडो वर्षांची परंपरा साजरी करताय ते सुद्धा कुणाला नावे ना ठेवत तर ह्यांचं पोटात का दुखतंय? या मागील जी संघटन आहे ती हिंदूनं त्रास देणारी आहे हे पुढे शोध घेतल्यावर स्पष्टच दिसतंय ... सतत हींच कौन्सिल बरोअबर भांडण हे यांचे उद्योग जे एक राजय सरकारे धुडकावून लावले , काय तर म्हणे हिंदू कौन्सिल जातीनिहाय बेभेद दभाव करते? हे पहा सरकारचे उत्तर https://www.parliament.nsw.gov.au/lc/papers/Pages/qanda-tracking-details.aspx?pk=98414 असा जातीनिहाय भेदभाव कारेन येतेच संस्थेला शक्य नाहीये तेव्हा या पेरियार वाल्यांना काह्ही करून जिथे तिथे हिंदूनं त्रास द्यायचंय या पेरिय्यर वालयासाचें उप अध्यक्ष हिंदू हि नाहीत Dr. Haroon Kasim च्यामारी ह्यांचा काय संबंध हिंदू धर्माशी

In reply to by चौकस२१२

कॉमी Mon, 10/28/2024 - 19:25
तुम्ही दिलेल्या मजकूरात विरोध दिसत नाही. Lets celebrate our difference! म्हणत आहेत. हिंदू धर्माचा महिमा म्हणून अश्या गोष्टी अनेकवेळेस सांगितल्या जातात की बघा, हिंदू रावणाची पूजा करणारे पण आहेत आणि रामाची पूजा करणारे पण आहेत वैगेरे. बाकी तुम्ही दिलेल्या लिंक मधून फारसे काही समजले नाही.

In reply to by कॉमी

चौकस२१२ Mon, 10/28/2024 - 19:35
तुम्हाला वाटते तेवढे "पापभिरू निरुपद्रवि " नव्हेत ते बरं पत्रकावर स्वतःचे संस्थेचे लिहायची पण हिंमत नाही संधी साधून हिंदूनना फोड येथील ग्रोयान्चायत सम्ब्र्हम निर्माण करा ... तुम्ही अनुभवले असतेत ना तर "एक वेळ ओवेसी किंवा मुस्लिम लीग परवडला" असे वाटले असते सरळ भिडता तरी येते भारततात दहीहंडी किंवा रावण दहनाचे वेळेलाबघितलंय कधी असले प्रोटेस्ट? लिंक म्हणाल तर या मागे असली पेरियार वाडी संघटन कशी सरकार कडे तक्रार करते आणि सरकारे ती टँकर कशी धुडकावून दिली याचा पुराव ,

In reply to by कॉमी

चौकस२१२ Mon, 10/28/2024 - 19:48
बाकी तुम्ही दिलेल्या लिंक मधून फारसे काही समजले नाही. हे पेरियार वाले "ऑस्ट्रेलियात जातीनुसार भेदभाव केलला जातो " म्हणून सरकार कडे धावले त्याचे काय झाले त्याची लिंक दिली होती रोख अर्थात हिंदू कॉन्सिल सारखया संघटनांवर एक तर येथे असा भेदभाव करणे अतीशय अवघड आहे दुसरे हिंदू कौंसिल चे पधाधिकरी बघा देशिकन , गोयल , जैन , कोण एका जातीचे आहेत का? https://hinducouncil.com.au/team/

In reply to by चौकस२१२

"हजारो संख्येने एकत्र आलेले हिंदू जर शेकडो वर्षांची परंपरा साजरी करताय ते सुद्धा कुणाला नावे ना ठेवत तर ह्यांचं पोटात का दुखतंय?" कारण पंतप्रधानपदी मोदी आहेत आणि सत्तेवर भाजपा आहे. आणि २०२९ पर्यंत तरी हे चित्र बदलणार नाही आहे. विरोधी पक्षांनी प्रचंड विरोध करूनही २०२४ साली पुन्हा भाजपा सत्तेवर आली. कितीही नावे ठेवली तरी अनिवासी भारतियांमध्ये मोदी/भाजपा लोकप्रिय आहेत. ती लोकप्रियता कमी करायची तर त्यांच्या समर्थकांना चिडवायला बघायचे म्हणजे रागाने हे समर्थक हाणामार्या करतील आणि मग ते पथ्यावर पडेल.

मंदसौर ह्या मध्यप्रदेशातील जिल्ह्यात रावणाला जावई मानून पूजा करतात. तो धर्माला विरोध नसतो. महाराष्ट्रात महायुतीत असलेल्या श्री अमोल मिटकरी ह्यानी २०२४ च्या दसऱ्याच्या दिवशी रावणाची पूजा केली. https://marathi.abplive.com/news/politics/dasara-ncp-amol-mitkari-demad-to-stop-the-practice-of-burning-ravana-on-dussehra-and-mitkari-donate-20-lakh-to-ravana-temple-akola-1318838/amp हा धर्माला विरोध नसतो. पण पेरियारवाद्यांनी रावण दहन करू नका ही मागणी केली तर तो धर्माला विरोध असतो?? खरं कारण पेरियारवादी जाती व्यवस्थेला विरोध करतात ह्यामुळे पोटात दुखतय की काय?

In reply to by अमरेंद्र बाहुबली

चौकस२१२ Tue, 10/29/2024 - 04:38
पेरियारवादी जाती व्यवस्थेला विरोध करतात ह्यामुळे पोटात दुखतय की काय? इथे परदेशात कसली आलीय जातीयता? सर्व जातीचे कार्यकर्ते आहेत हिंदू कॉन्सिल मध्ये उगाच विरोधाला विरोध करताय , पण तुमचं तोंडी कोण लागणार म्हणा

कंजूस Mon, 10/28/2024 - 21:16
त्यांना हे बिंबवायचं असेल की ..... उत्तर हिंदुस्थानात जे जसं साजरं होतं तसं आणि तेच म्हणजे भारतीय नव्हे. ............. दुसरं उदाहरण - ओणम. केरळ. यावेळी बलीची पुजा होते. बलीचं महत्त्व आणि पराक्रम थांबवण्यासाठी वामनाने त्यास पाताळात ढकलले. पण बली हा महाविक्रमी म्हणूनच ओळखला जातो तिकडे.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

कंजूस Tue, 10/29/2024 - 04:06
समुद्रगमन करण्यास.......... हिंदू शब्द नाही. ब्राह्मणांना वाळीत टाकले जायचे. प्रायश्चित्त घ्यावे लागायचे. (म्हणजे काही मंत्र आणि दान). रामानुजम आणि टिळक.

In reply to by कंजूस

रामचंद्र Tue, 10/29/2024 - 16:07
भारतात एकाच छापाचा हिंदू धर्म नाही हे यावरूनही दिसते असे वाटते. आजही कटकला कार्तिक पौर्णिमेपासून सात दिवस बलियात्रा उत्सव साजरा होतो. शेकडो वर्षांपूर्वी घरटी उडिया कुटुंबातील एक पुत्र असे उडिया दर्यावर्दी आग्नेय आशियातील देशांमध्ये व्यापारनिमित्ताने या काळात निघत असत अशी समजूत आहे त्याला अनुसरून हा उत्सव आजही तिथे साजरा होतो. केरळमध्येही दर्यावर्दी परंपरा आहेच आणि तिथेही कट्टर शैवमताचे हिंदू आहेत. काही केरळी हिंदू राजांनी श्रीलंकेत हल्ले करून तिथेही आपली राज्ये स्थापन केल्याचे संदर्भ वाचायला मिळतात. एकंदरीत, सर्वच भारतभरातील हिंदू हे कूपमंडुक प्रवृत्तीचे, आत्मरत होते असे नाही. मात्र हे सार्वत्रिक उदाहरण नाही हेही खरे.

In reply to by रामचंद्र

चौकस२१२ Tue, 10/29/2024 - 18:46
किती का प्रकारचचच्या हिंदू उपससना साधना असोत माझी हरकत येवढ्यालाच कि असे लोका नाच्या उत्सवात धवलाढवळ करू नये आणि हे काही वर्षांपूर्वी नवहते येथे , आता प्रत्येक अश्या सार्वजनिक किंवा खाजगी उत्सव करिताना आयोजकांना हि कटकट सहन करावी लागते आणि त्यापेक्षा गंभीर म्हणजे धमक्या आणि अप्रचार ...

In reply to by चौकस२१२

मग सर्व भारतीयांच्या नावाने कार्यक्रम करायचा नाही. आपल्या विचारसरणीच्या लोकांचा वेगळा समुह बनवून सण साजरे करावे.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

चौकस२१२ Wed, 10/30/2024 - 04:51
तुम्हाला नक्की काय म्हण्यायचंय ते कळतंय का? सर्व भारतीयांच्या नावाने कार्यक्रम ? तसे असतातच या शिवाय जसे येथे इस्लामिक कौन्सिल आहेत विवीध चर्चेस आहेत तसे हिंदू कौन्सिल या शिवाय बंगाली मराठी इत्यादी भाषिक माडले आहेत ... तुमचा नक्की प्रॉब्लेम काय आहे? हिंदू कॉन्सिल पदाधिकारी बहुतेक "ब्राह्मणेतरच " आहेत म्हणजे तिथे हि जातोयवादाचा आरोप करू शकत नाही नुसती खुसपट काढायची आपली वृत्ती सरळ दिसतोय आहे .. चालुद्या "नंगेको खुदा डरता है " तसेच आहे

In reply to by कंजूस

कॉमी Mon, 10/28/2024 - 21:29
मलाही तसेच वाटले. आणि त्यांनी कार्डवरचा कंटेन्ट दिला आहे त्यातले लिखाण सुद्धा तसेच वाटले. पेरियार गटातले असले तरी सभ्य शब्दात आपले म्हणणे मांडू शकतातच की.

In reply to by कॉमी

चौकस२१२ Tue, 10/29/2024 - 04:53
सभ्य शब्दात आपले म्हणणे मांडू शकतातच की. "स्टॉप बूलिइन्ग" हे पत्रकारवार कशाला? हि सभ्यता? कोण बुली करताय कोणाला? आणि हे सगळे "प्रोटेस्ट" गेल्या काही वर्षातच चालू झालेत... कारण स्पष्ट आहे भारतात ज्या पक्षाचे सरकार गेली १० वर्षे आले आहे हे पचतच नाही लोकशाही पद्धतीने आलेले असून सुद्धा , पचतच नाही... मग अश्या कर्पट ढेकरा जगभर पेरियार वाले , खलिस्तानी देत राहणार ...

In reply to by कंजूस

चौकस२१२ Tue, 10/29/2024 - 04:41
उत्तर हिंदुस्थानात जे जसं साजरं होतं तसं आणि तेच म्हणजे भारतीय नव्हे. हो बरोबर पण म्हणून हे जे उत्सव साजरे करतो इथे ते काही फक्त उत्तर भारतीय नाहीत,,,बरं ती परंपरा शेकडो वर्षे आहे ना याना फक्त हिंदूंचाट फूट पा डायची आहे दुसरे काही नाही आणि हे इथे असले उद्योग करताना एकूण भारतीयांची बदनामी होते स्थानकिक म्हणतात काय हि कटकट

In reply to by कंजूस

रामचंद्र Tue, 10/29/2024 - 16:10
ओणमच्या उत्सवात केरळी मुस्लिम नाही पण केरळी ख्रिश्चन बऱ्यापैकी सहभागी होताना पाहिले आहे.

भृशुंडी गुरुवार, 10/31/2024 - 01:06
एक कंजूस काकांचे प्रतिसाद सोडले तर "लेख आणि प्रतिक्रिया कशा असू नयेत", यासाठी वाचनखूण म्हणून साठवून ठेवत आहे.

चौकस२१२ गुरुवार, 10/31/2024 - 05:09
भृशुंडी लेख कसा असू नये म्हणजे? गेली काही वर्षे दिसत असलेली/ अनुभवलेली व्यथा मांडली तर काय चुकले .... भारतात नाही गणेश विसर्जनाचाय मिरवणुकीवर दगडफेक होत , इथे त्याचाच हा दुसरा सौम्य प्रकार ,,, मुसलमानांचा द्वेष समजू शकतो एकवेळ पण हे स्वतः "अम्हि तामिळ हिंदू " म्हणवणारे किंवा ज्यानं हिंदूंनी नेहमीच भाऊ मानले ते शीख जेव्हा असा त्रास देतात तेव्हा हा मुद्दा उठवलाच पाहिजे आता तुम्ही म्हणत असाल कि मिपावर बहुतेक करून भारतीय आहेत मग इथे मांडण्याचे प्रयोजन काय? तर जगातील घडामोडी बंडाळी एक भारतीय हिंदू म्हणून मिपावर पण अनेक सहभाजि होतात त्यांचचे साठी लिहिलंय असे समजा जिथे तिथे जातियात आणणारी काही आई डी ना नसेल पचत तर त्यांनी दुर्लक्ष करावे नाही तर मुद्यायचे बोलावे

In reply to by चौकस२१२

रामचंद्र गुरुवार, 10/31/2024 - 06:07
बरोबर आहे. या निमित्ताने भारताबाहेर विशिष्ट संदर्भात काय घडामोडी होत आहेत याची एक बाजू समोर येते. तशी ती वर्तमानपत्र किंवा माध्यमांतूनही समोर येऊ शकते पण प्रत्यक्ष अनुभव म्हणून ती महत्त्वाची.

विवेकपटाईत Tue, 11/12/2024 - 10:35
पेरियर हा तामिळ हिंदूंचा प्रतींनिधी नाही. अधिकान्श तामिळ लोकांच्या मते हा फक्त ब्रिटीशांचा दलाल होता. तमिळनाडूचा खोटा इतिहास सांगणारा. कारण पेरियार स्वतला ब्राम्हण विरोधी म्हणत होता आणि ब्राम्हण रावणाचा दहन त्याला मान्य नाही. सर्वच विचित्र आहे. ब्रिटीशांनी भारताला जाती जातीत विभाजित करून राज्य करायचे होते. त्यासाठी अनेक , खोटे इतिहास प्रचारीत केले. केले. श्रीराम आणि रावण युद्धाला उत्तर दक्षिण युद्ध असा प्रचार केला. बाकी रामायणचे सत्य दक्षिण भारतीय तामिळ जनतेच्या मदतीने श्रीरामाने ब्राम्हण रावणाचा वध केला. अधिकान्श नव आंबेडकर वादी ही अश्या खोट्या प्रचारला बळी पडतात. दिल्लीत अनेकांशी चर्चा झाली. यातील अधिकान्श ने धर्मग्रंथ कधीच वाचले नसतात.

In reply to by विवेकपटाईत

अधिकान्श तामिळ लोकांच्या मते हा फक्त ब्रिटीशांचा दलाल होता. तमिळनाडू सोडून पळून गेलेले मूठभर मनुवादी तमिळ म्हणजे अधिकांश तामिळ होत नाहीत. पेरियारणा तमिळनाडूच्या राष्ट्रपित्याचा दर्जा आहे. तामिळनाडूत आलटून पालटून सत्तेत येणाऱ्या पार्ट्या ह्या पेरियारांच्याच आदर्शावर आहेत. मनुवादी पेरियारांची हेटाळणी करतात कारण त्यानी तिथली जातिव्यवस्था उलथवून समानता आणली ह्यामुळे काही मूठभर मनुवादी दुखवले गेले कारण ते स्वतःला उच्च नी इतराणा तुच्छ मानायचे. उत्तरेतील नी महाराष्ट्रातील मनुवादी पेरियारद्वेष्टे आहेत ते ह्यामुळेच. पेरियार ह्या शब्दाचा अर्थच महात्मा असा आहे

In reply to by सुबोध खरे

कुठे छगनराव सहमत, आता छगन भुजबळ तुमच्या दृष्टीने आदरणीय झाल्यावर आमची ती काय कुवत? उद्या म्हणाल कुठे दाऊद नी कुठे…. :)

कंजूस Tue, 11/12/2024 - 19:16
आंदोलक "तमिळ हिंदू" म्हणत होते...का...तमिळ ब्राह्मण? १.तमिळ ब्राह्मण नव्हे. २.पेरियार जो कुणी आहे तो हिंदूविरोधी आहे का ब्राह्मण विरोधी आहे? ३. तमिळ इतिहास लेखमाला ही जेएनयूचे एक अध्यापक झा/ प्रकाश झा यांच्या पुस्तकातील उतारे आहेत. किंवा रुपांतरीत लेखन आहे. ते मूळ पुस्तक मिळाले तर वाचेन. म्हणजे त्या लेखकाने काय उद्देश समोर ठेवून लेखन केले आहे. शिवाय इतिहास म्हटला की कालखंड प्रथम द्यावा लागतो. संदर्भही लागतात. ४. श्रीलंकेतील तमिळ असतील तर ..... त्यांना भारत सरकारने पाठिंबा दिला नाही श्रीलंका सरकारविरोधी आंदोलनात याचा राग आहेच. रावणाने सीतेला पळवून अपमानाचं उट्टं काढण्याचं साध्य केलं. पण पुढे मर्यादा ओलांडली नाही कारण तो पापभीरू शिवभक्त होता. रावणाची जनता त्याच्या राज्यात सुखी आणि आनंदी होती म्हणतात. त्यांचा राजा त्यांना प्रिय होता. तर दूरान्वये त्या तमिळींनी तिकडे आंदोलन केले असावे.