मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

प्रो.देसाई एक वल्ली

श्रीकृष्ण सामंत · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
प्रो.देसाई एक वल्ली प्रो.देसाईंचा माझ्या कवितेत वरचेवर संदर्भ येतो.तर हे गृहस्थ कोण असावेत? हे समजण्यासाठी त्यांची ओळख करून देणं आवश्यक आहे असं मला वाटु लागल्याने हा प्रपंच. भाऊसाहेब म्हणून मी त्यांना ओळखतो.हे गृहस्थ मुंबईच्या एका कॊलेज मधे गणिताचे प्रोफ़ेसर होते.त्यांना एक मुलगा आणि दोन मुली आहेत. मिसेस देसाई आणि प्रो.देसाई यांचं लव्ह म्यारेज होतं.ती त्यांची विद्यार्थीनी होती. ते म्हणतात”ती हुशार होतीच पण दिसायला पण सुन्दर होती.एकच तिला व्यंग होतं की लहानपणी तिला पोलियो झाल्याने ती एका पायाने लंगडत होती ते पुढे म्हणतात “माझं प्रेम आंधळं होतं” उतार वयात त्या दोघानी मुलांकडे रहाण्याचा निर्णय घेतला होता असा निर्णय कां घेतला त्याबाबत मला त्यांनी लेक्चर पण दिलं होतं. प्रोफेसरच ते म्हणा. ते म्हणाले, “हे बघा सामंत खूप लोक आम्हाला उपदेश देत काय तर म्हणे मुलांकडे कायमचं रहायला जाऊं नका,इकडचं घर(भारतातलं) तुम्ही विकू नका,ताट द्यावं पण पाट देऊं नये,सध्या भंरवश्याचे दिवस नाहीत वगैरे वगैरे. आम्ही सर्वांचं ऐकत होतो आणि आमच्या मनाचंच करणार होतो.पुढे ते सांगू लागले, “त्याचं असं आहे सामंत,आम्हाला असे पण लोक भेटले आणि त्यांचं म्हणणं असं की दूरवर विचार केल्यास एकमेकाच्या अडचणी सांभाळून राहिल्यास मुलांकडे पण दिवस जाऊ शकतात.मुलं इकडे (भारतात) रहात नसल्याने कुणाच्या तरी “दाढीला हात लाऊन कामं करून घ्यावी लागतातच ना!.” पुढे भाऊसाहेब सांगू लागले, ” सामंत, हे बघा काम सांगीतलं की खूप लोक पैसे देऊन सुद्धा कामात अडवाअडवी करतात.त्यांचीही चूक नव्हती म्हणा,” “अहो या वयात मुलांकडे जाऊन राहावं बघा” असाही लोक आम्हाला उपदेश देत असत. आता बघा सामंत, “ऐकावे जगाचे आणि करावे मनाचे”हेच खरं ना? आम्ही सर्व तयारी करून मुलांकडे येऊन रहाण्याचं ठरवलं.इथे जस जसे अनुभव येऊं लागले तस तसे मी तुम्हाला विषय देऊन कविता लिहा म्हणून सांगत असतोच ना?” असं म्हणून प्रो देसाई थोडे भाऊक झाले. तर असे हे आमचे प्रो.देसाई उर्फ भाऊसाहेब.वेळोवेळी ते मला भेटल्यावर आपलं मन माझ्याकडे मोकळं करीत असतात.आणि मग एखाद्या विषयावर कविता लिहायला उद्वीप करीत असतात एव्हडंच.

वाचने 3586 वाचनखूण प्रतिक्रिया 11

चित्रगुप्त Mon, 05/06/2024 - 05:05
मशारनिल्हे प्रोफेश्वर मजकूर दिवसभर आपला वेळ कसा घालवतात ? गणिताखेरीज आणखी कोणकोणत्या विषयांचा त्यांचा व्यासंग आहे ? ते मिसळपाव वा मराठी पुस्तके वाचतात का ? त्यांचे छंद वगैरे कोणकोणते आहेत ? त्यांच्या आहार, व्यायाम वगैरेंच्या सवयी, त्यांचे आवडते लेखक, संगीतकार, कवी, गायक, चित्रकार, अभिनेते-अभिनेत्री वगैरे कोणकोणते आहेत वगैरे माहिती पण दिलीत तर ही ओळख परिपूर्ण होईल. इथे फक्त त्यांनी लम्या केले आणि अमेरिकेत येऊन स्थायिक झालेत एवढीच माहिती मिळते. --- इथे त्यांचा 'वल्ली' असा उल्लेख केलेला आहे, त्याअर्थी त्यांच्या 'अंगी नाना कळा' असाव्यात असे वाटते. 'इसम' आणि 'वल्ली' अगदी वेगळे असतात. नाही का ? तुमच्या आगामी लेखासाठी विषय पुरवत आहे, तुम्ही त्यावर विस्ताराने अवश्य लिहाल अशी आशा आहे.

In reply to by चित्रगुप्त

कांदा लिंबू Mon, 05/06/2024 - 14:29
खवचट शंका: मशारनिल्हे, अकारविल्हे यांना English मध्ये काय म्हणतात? --- स्वाक्षरी: कांदा-लिंबू नसेल तर मिसळपावला चव नाही.

गांधीनी मरताना "हे राम " असे म्हणले होते म्हणे, इथे तुमचे लेख वाचून तुम्ही मिपाकरांना "हे कृष्णा" म्हणायला लावणार बहुतेक . #आवरा :))))

In reply to by प्रसाद गोडबोले

इतक्यात थकलात? त्यानी आता पर्यंत १४०० लेख लिहिलेत. रोज २ जरी टाकले मीपावर तरी ७०० दिवस सहज जातील. म्हणज्व जवळपास पाऊणे दिन वर्षे. अध्येमध्ये प्रोफेसर देसाईंशी भेटीगाठी, फोनवर बोलणे होतच राहिल. काय बोलणं झालं ह्यावर मिपावर सविस्तर लेख येईलच. असे आणखी सहासातशे लेख होतीलच. अबकी बार २००० पार

गवि Mon, 05/06/2024 - 09:00
ओह. प्रो. देसाई = प्रचेतस.. ओके. आणखी एक्सेल शीट येऊ द्या. ;-)

चौथा कोनाडा Mon, 05/06/2024 - 12:50
सतत काही तरी म्हणणार्‍या, सांगणार्‍या वल्लींचे व्यक्तिचित्र आवडले. अशा व्यक्ति दुर्मिळ झाल्यात नै ? अर्थात मिपावर दिसतात काही आर्मस्ट्रॉन्ग किंवा वहीरावनसारखे ... अर्थात तेवढे चालायचेच ! पुढील लेखाच्या प्रतिक्षेत !

In reply to by चौथा कोनाडा

Bhakti Mon, 05/06/2024 - 13:47
हा हा ...मी पण तेच म्हणणार होते....कंटाळत कशी नाही मंडळी..ह्यांचं तर अबकी बार नाही... आम्ही वारंवार भारंभार.. हे घोषवाक्य असतं...ठीक आहे करमणूक तर होते आठवडाभर.. थोडंफार नवीनही समजतं ;)