आठवणींचा पाऊस
काव्यरस
रात्रभर पडणारा पाऊस
सकाळी नकोसा होतो
कितीही हलका का असेना
जेव्हा सतत बरसतो
संध्याकाळी उदास वातावरणात
मुसळधार कोसळतो
तेव्हा नको त्या आठवणींचा
पूर मात्र मनात येऊन जातो
रात्र उदास जाण्याची चाहूल लागते
मग रात्रभरचा पाऊस नकोसा होतो.
- पाभे
१३/०७/२०२२
वाचने
3156
वाचनखूण
प्रतिक्रिया
5
एकदम मस्त पाभे
छान.
पाने लई मागं न्हेलं
आठवणींचा पाऊस: रसग्रहण
छान लिहिली आहे