मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

नुपुर शर्माचे यांचे काय चुकले? भारत सरकारची अशी प्रक्रिया अशी का?

Trump · · काथ्याकूट
काही प्रश्न १. त्यांनी कुराण आणि हदीथ यांचा संदर्भ दिला. त्यामुळे त्यांनी खोटे बोलल्याचे सिध्द होत नाही. नक्की त्यांच्या वक्तव्यामध्ये आक्षेपार्ह काय आहे? कोणत्या कायद्यांचा भंग होत आहे? २. त्यांना पक्षातुन काढुन टाकण्यामागे भाजपाची कोणती चाल / अपरिहार्यता असावी? देशातील मुस्लिम समाजाची होणारी प्रतिक्रिया किंवा इतर देशांची प्रतिक्रिया यांचा कितपत संबध असावा? ३. भारत सरकारने आखाती देशापुढे गुढगे का टेकले? तेथील भारतीय हिंदुच्या नोकर्‍या, येणारे तेल ह्याचा काय संबध आहे का? ते आखाती देश चीनबद्दल ब्र काढत नाहीत, मग भारत सरकार का असे वागत आहे? ४. हि तात्पुरती माघार आहे की मोदी सरकारने मुस्लिम लांगुलचालन सुरु केले आहे? ५. हिंदुत्व / हिंदुवादी लोकांची काय भुमिका असेल? ते भाजपाला एक अपरिहार्यता म्हणुन मतदान करणे चालु ठेवतील की पर्यांयाचा विचार करतील? ६. इतर पक्ष कॉंग्रेस, आप इ. कसे ह्याचा लाभ उठवतील?

वाचने 37619 वाचनखूण प्रतिक्रिया 155

sunil kachure Mon, 06/06/2022 - 13:38
1)नुपूर ही bjp ची प्रवक्ती आहे पक्षाची आणि सरकार ची भूमिका मांडणे हे त्यांचे काम. थोडक्यात त्या पक्ष आणि सरकार ह्यांची धोरणे,दृष्टिकोन मांडत असतात सत्ताधारी पक्षाशी संबंध असल्या मुळे सरकारचा दृष्टिकोन पण तोच आहे असे समजले जाते २) गरीब लोकांचे रोजगार आणि देशाचे हित जपण्यासाठी bjp sarkar नी आखाती देशासमोर गुडघे टेकले नाहीत अंबानी,अडाणी,आणि बाकी मित्र ह्यांचे आर्थिक हीत लगेच धोक्यात येईल .ह्याची जाणीव त्यांना मित्रांनी करून दिली . म्हणून कारवाई. ३)चीन जसे वागतो तसेच असं वागले तर जग react करणार नाही. फ्रान्स जसा मुस्लिम लोकांशी वागतो तसे आपण वागले तर मुस्लिम देश react करणार नाहीत.. हा विचार च चुकीचं आहे. किती ही ढोल वाजवत असला तरी भारत अजून पण मागास आहे. फक्त आपण ते मान्य करत नाही.

नुपूर शर्मांचे तसे काही चुकले नाही. जर हे प्रकरण देशातल्या देशात राहिले असते आणि तरीही पक्षाने त्यांना काढून टाकले असते तर ते अयोग्य ठरले असते हे नक्की. पण आताच्या काळात असे काही झाले तर ते भारताबाहेरच्या कोणाला समजणार नाही असे होणे अशक्य. त्यामुळे त्यांच्या वक्तव्यांची आखाती देशांमधून प्रतिक्रिया उमटली. गेल्या काही वर्षात आखाती देशांबरोबर- विशेषतः युएई आणि सौदीबरोबर संबंध सुधारायचे जाणीवपूर्वक प्रयत्न मोदींनी केले आहेत. त्याचाच परिणाम म्हणून म्हणा ३७० कलम हटविल्यानंतर टर्की आणि मलेशिया सोडून एकाही मुस्लिम देशाने पाकिस्तानला पाठिंबा दिला नव्हता. ऑगस्टा-वेस्ट्लँड प्रकरणातील आरोपी राजीव सक्सेना परंपरेप्रमाणे दुबईला पळून गेला होता. भारतीय अधिकार्यांनी त्याला तिथे जाऊन उचलून आणले हे युएई सरकारच्या सहकार्याशिवाय थोडीच झाले होते? असे संबंध चांगले होत असतील तर त्यात मिठाचा खडा टाकला जायची शक्यता या नुपूर शर्मांच्या वक्तव्यात होती. समजा भविष्यात पाकिस्तानविरोधात आणखी काही कोंडीत पकडायची पावले उचलायची असतील तर त्यावेळेसही मुस्लिम देशांनी ३७० प्रकारेच भूमिका घ्यावी हे आपल्या देशाच्या हिताचे आहे. तसेच आखाती देशांमध्ये अक्षरशः लाखो भारतीय (विशेषतः केरळी लोक) कामाला आहेत. त्यांना या प्रकरणामुळे अगदी जीवाला धोका नाही तरी अन्य काही अडचणींना (नोकरी जाणे वगैरे) सामोरे जावे लागायला नको हे पण बघणे गरजेचे होते. बहुदा म्हणून पक्षाने नुपूर शर्मांना काढलेले दिसते. एकदा प्रकरण देशाबाहेर गेल्यानंतर नक्की काय परिणाम होतील याविषयी आपल्यासारखे लोक नुसते असे तर्कच लढवू शकतात. नुपूर शर्मांचे काही चुकलेच असेल तर त्यांनी खूप शक्तीशाली लॉबीला अंगावर घेतले हेच. या निमित्ताने एक गोष्ट लिहाविशी वाटते. मुनावर फारूकीने हिंदू देवदेवतांची टवाळी केली होती आणि त्याबद्दल त्याला काही दिवस तुरूंगात टाकले आणि त्याचे शो होऊ दिले नाहीत म्हणून अभिव्यक्तीस्वातंत्र्याची गळचेपी वगैरे मोठ्यामोठ्या गोष्टी बोलणारे अनेक लोक होते. मिपावरही त्याविषयी एका प्रतिसादात लिहिले गेले होते. पण नुपूर शर्मा प्रकरणी मात्र कोणीच काही बोलायला तयार नाही. त्यांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य नाही का? विशेषतः जे काही बोलल्या त्यात काहीही चूक नसताना?

मदनबाण Mon, 06/06/2022 - 16:13

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- धर्म एव हतो हन्ति धर्मो रक्षति रक्षितः।

कॉमी Mon, 06/06/2022 - 16:48
ह्या नुपूर शर्मा बाईंना अधूनमधून किंचाळताना, "म्हाताऱ्या, तू मूर्ख आहेस, गप्प बस" टाईप गोष्टी प्राईम टाईम डिबेट वर ओरडताना पहिल्या आहेत. आता नक्की काय डिबेट होती, आणि त्यात काय कारणाने कुराण आणि हदीस चा संदर्भ देऊन बोलावे लागले काहीही कल्पना नाही. पण मुस्लिमद्वेष्टा कंटेंट टीव्हीवर चालू असतो- टाइम्स नाऊ, झी, सुदर्शन, रिपब्लिक इत्यादी वाहिन्यांवर इतके माहित आहे. एकूण आजपर्यंत ज्याज्यावेळेस ह्या नुपूर बाईंचे बोलणे ऐकले त्यात्या वेळेस त्या बाई पक्क्या सटकलेल्या आहेत आणि पक्षाच्या प्रवक्ता म्हणून ठेवण्याच्या लायकीचा नाहीत असेच मत झाले आहे. ती ओपी इंडियाची "पत्रकार" नुपूर शर्मा "अनसटलदेसी" नावाने वावरते, तिने बंदुकधारी मुलीचे चित्र ठेवलेले- जे भाजपाच्या नुपूर बाईंसारखेच दिसत होते. या बाईसुद्धा तितक्याच येड्यांच्या इस्पितळातून ट्विट करायच्या त्यामुळे सदर दोन्ही व्यक्ती एकच आहेत असा समज होता. कालपरवा "अन्स्टलदेसी नुपुरशर्माबीजेपी यांची मुलाखत घेणार" असे ट्विट वाचले तेव्हा कळले की ह्या दोन्ही मेंटल केसेस वेगवेगळ्या आहेत. असो. पहिले मुहम्मद झुबेर ह्यांचे बाबत. झुबेर ने लाईव्ह टीव्ही डिबेट मधली एक चित्रफीत टाकली असता प्रवक्त्या बाईंनी "एडिटेड क्लिप" "पर्सनल आट्याक" असा कांगावा केला. मी मेल्यास मुहम्मद झुबेरला जबाबदार धरा असे ट्विटरवर रडणे सुद्धा झाले. आता ह्या बाईंना जर हत्या आणि बलात्काराच्या धमक्या येत असल्यास ते नक्कीच अत्यंत चुकीचे आणि निषेधार्ह आहे. त्यांना सुरक्षा देणे, धमकावणाऱ्यांना अटक करणे इत्यादी गोष्टी नक्की केल्या जाव्यातच. पण बाई के बोलल्या तेच ट्विटरवर पोस्ट करणे ह्यात नक्कीच काही चुकीचे होत नाही. बाई काय बोलल्या त्यातल्या एका गोष्टीकडे त्यांनी लक्ष मात्र वेधून घेतले. त्यापुढे, नुपुरबाईंना हवे ते बोलायचा हक्क आहेच. त्यासाठी त्यांना जर जीवित हानी किंवा इतर प्रकारे आर्थिक हानी होत असेल तर चूक आहे. पण बोलणे पक्षहीत आणि राष्ट्रहित विरोधी असेल तर पक्षप्रवक्त्या हे पद त्यांच्याकडे असणे किती उपयोजक आहे? त्यामुळे त्यांना पक्ष प्रवक्त्या पदावरून काढून टाकणे ह्यात काहीही खळबळजनक वाटत नाही. बाकी कॉमेडियन काय बोलला आणि सत्ताधारी पक्षाच्या प्रवक्त्या काय बोलल्या ह्यात साम्य शोधणाऱ्या बुद्धीला मानाचा मुजरा !

In reply to by कॉमी

Trump Mon, 06/06/2022 - 17:49
Ad hominem ची तक्रार तुम्ही खुप वेळा करता. तुम्हीही तेच येथे केले आहे. असो. मुळ वक्तव्याबद्दल काहीच लिहीले नाही. https://en.wikipedia.org/wiki/Ad_hominem

In reply to by Trump

कॉमी Mon, 06/06/2022 - 18:02
नुपुरबाईंना हवे ते बोलायचा हक्क आहेच. त्यासाठी त्यांना जर जीवित हानी किंवा इतर प्रकारे आर्थिक हानी होत असेल तर चूक आहे. पण बोलणे पक्षहीत आणि राष्ट्रहित विरोधी असेल तर पक्षप्रवक्त्या हे पद त्यांच्याकडे असणे किती उपयोजक आहे?

In reply to by कॉमी

Trump Mon, 06/06/2022 - 18:16
आखाती देशातील देशांसोबत संबंध बिघडू शकतात हे कारण स्पष्ट नाही काय ?
म्हणजे आखाती देशांना कुराण आणि हदीथ मान्य नाही का? ते खोटे आहे असे समजतात का? तसे असेल तर त्यांना मुस्लिमद्वेषी का म्हणु नये?

In reply to by कॉमी

Trump Mon, 06/06/2022 - 18:16
आखाती देशातील देशांसोबत संबंध बिघडू शकतात हे कारण स्पष्ट नाही काय ?
म्हणजे आखाती देशांना कुराण आणि हदीथ मान्य नाही का? ते खोटे आहे असे समजतात का? तसे असेल तर त्यांना मुस्लिमद्वेषी का म्हणु नये?

In reply to by कॉमी

Trump Mon, 06/06/2022 - 17:50
Ad hominem ची तक्रार तुम्ही खुप वेळा करता. तुम्हीही तेच येथे केले आहे. असो. मुळ वक्तव्याबद्दल काहीच लिहीले नाही. https://en.wikipedia.org/wiki/Ad_hominem

In reply to by कॉमी

Trump Mon, 06/06/2022 - 18:01
तुम्हाला खरच समजत नाही की तुम्ही समजुन न समजल्यासारखे करताय?
ऍड होमिनेम कसे बुवा ? त्यांच्या वक्तव्यासाठी त्यांना शिक्षा किंवा इजा होऊ नये हे लिहिलेय ना ?
तुम्ही त्यांचे वक्तव्य चुकीचे कसे आहे किंवा नाही हे लिहीलेच नाही. परंतु त्याच्या चारित्राबद्दल आणि इतर गोष्टीबद्दल बरेच लिहीले आहे.

In reply to by कॉमी

त्यांचे वक्तव्य चुकीचे नाही. पण प्रवक्त्या म्हणून बेजबाबदारीचे आहे. कसेकाय?? तुम्हाला वाटते म्हणून का त्यामागे काही लाॅजीक देखील आहे?

In reply to by काड्यासारू आगलावे

कॉमी Mon, 06/06/2022 - 20:01
प्रवक्त्यांनी इतर देशांसोबत संबंध बिघडवू शकणाऱ्या गोष्टी बोलायच्या नसतात. आपल्या देशाच्या डिप्लोमाटिक इंट्रेस्ट वर दुष्परिणाम होईल अशा गोष्टी बोलायच्या नसतात. खऱ्या असल्या तरी.

In reply to by कॉमी

प्रवक्त्यांनी इतर देशांसोबत संबंध बिघडवू शकणाऱ्या गोष्टी बोलायच्या नसतात का? प्रवक्ता तर फक्त बोलली. चिन तर अनेकांच्या प्रत्यक्ष नांग्या ठेचतोय. चिनला भिती वाटते का संबंध बिघडायची? आपल्या देशाच्या डिप्लोमाटिक इंट्रेस्ट वर दुष्परिणाम होईल अशा गोष्टी बोलायच्या नसतात. खऱ्या असल्या तरी. मग सरकारी अधिकारी, मंत्री संत्रा काय फक्त विमानाचं पेट्रोल जाळायला ना फोटो काढायला परदेशात जाता का?? डिप्लोम्टीक ईंट्रेस्ट भाजप पक्ष प्रवक्त्याने सांभाळावा? सलाम तुमच्या बुध्दीमत्तेला.

In reply to by काड्यासारू आगलावे

कॉमी Mon, 06/06/2022 - 20:47
प्रवक्ता तर फक्त बोलली. चिन तर अनेकांच्या प्रत्यक्ष नांग्या ठेचतोय. चिनला भिती वाटते का संबंध बिघडायची? चीन कडे भारतापेक्षा जास्त बार्गेनिंग पॉवर असावी. त्यामुळे चीन मुस्लिमांवर अत्याचार करत असून सुद्धा त्यांच्यासोबत जास्त खळखळ करता येत नाही.
सरकारी अधिकारी, मंत्री संत्रा काय फक्त विमानाचं पेट्रोल जाळायला ना फोटो काढायला परदेशात जाता का?? डिप्लोम्टीक ईंट्रेस्ट भाजप पक्ष प्रवक्त्याने सांभाळावा? सलाम तुमच्या बुध्दीमत्तेला.
डिप्लोमॅट ने तर सांभाळायचा असतोच. पण पक्ष प्रवक्त्यांचे बोलणे सुद्धा आंतराष्ट्रीय पातळीवर गंभीरपणे घेतले जाणारच.

In reply to by कॉमी

पण पक्ष प्रवक्त्यांचे बोलणे सुद्धा आंतराष्ट्रीय पातळीवर गंभीरपणे घेतले जाणारच. तालीबान प्रवक्त्यांना कोण सिरीयस घेतं? मुस्लिम ब्रदरहूडचा प्रवक्ता काय बोलला हे भारत सरकार पर्यंत तरी पोहोचतं का?

In reply to by काड्यासारू आगलावे

कॉमी Mon, 06/06/2022 - 21:29
उगाच वाट्टेल त्या तुलना करू नका. भारत तालिबानला सरकार म्हणून मान्यता देत नाही. भारत आणि तालिबान मध्ये कसलेही डिप्लोमॅटिक नाते नाही. भारताने काबूल मधली एम्बसी बंद केली आहे. त्यामुळे तालिबान वाले वाट्टेल ते बडबडले तरी डिप्लोमॅटिक नाते जे सध्या शून्य आहे ते आणखी खाली जाऊ शकत नाही. बाकी भारत फ्रंट वर तालिबान सध्या वाईट न बोलता भारताला आपल्या बाजूने घेण्याचा प्रयत्न करत आहे. इथे वाचु शकता.

आग्या१९९० Mon, 06/06/2022 - 16:52
शिवलिंग की फव्वारा हे अजून सिद्ध होण्यापूर्वीच बिजेपीच्या जिंदालाने तारे तोडले. आखाती देशांनी हिसका दाखविल्यानंतर लगेच पक्षातून बाहेर काढले. काय गरज होती नसते तारे तोडायची? आता घाबरून बसलाय.माझा पत्ता सार्वजनिक करू नका म्हणतोय. असुरक्षित देशात राहतोय ह्याचा त्याला गर्वच असेल. दुबळ्या सरकारचे दुबळे कार्यकर्ते.

आग्या१९९० Mon, 06/06/2022 - 16:59
बाकी कॉमेडियन काय बोलला आणि सत्ताधारी पक्षाच्या प्रवक्त्या काय बोलल्या ह्यात साम्य शोधणाऱ्या बुद्धीला मानाचा मुजरा ! अगदी बरोबर. तुलना करताना आपण ज्या व्यक्तीचे समर्थन करतोय तिला कुठल्या पातळीवर नेतोय हेच समजत नाही समर्थकांना. सवय नाही आगीशी खेळायची म्हणून गोंधळ होतोय.

या प्रकरणामुळे कुवेतच्या एका सुपरमार्केटमध्ये भारतीय उत्पादने काढली आहेत. https://timesofindia.indiatimes.com/india/kuwait-supermarket-pulls-indian-products-as-row-grows-over-prophet-remarks/articleshow/92039040.cms मागे डेन्मार्कमध्ये एका वर्तमानपत्रात व्यंगचित्रे छापून आली होती तेव्हाही त्या देशाच्या उत्पादनांवर बहिष्कार टाकायचे प्रकार झाले होते. अशा प्रकारामुळे व्यापारी आणि अन्य हितसंबंधांना धोका पोचत असेल तर त्यावर लवकरात लवकर नियंत्रण मिळवून पडदा टाकायचा प्रयत्न असावा असे दिसते.

sunil kachure Mon, 06/06/2022 - 17:57
नुपूर किती ही खरे बोलली असेल तर ती चूकच कारण. भारत सक्षक्त राष्ट्र नाही,powerful राष्ट्र नाहीं भारतीय राजकीय लोकांनी देशाला पूर्ण भिकेला लावले. भारत सशक्त असता तर नुपूर ही आज देशाची आदर्श व्यक्ती असते.

श्रीगुरुजी Mon, 06/06/2022 - 18:46
जगाला दाखविण्यासाठी नूपुर शर्मा व नवीन जिंदाल यांच्यावर तोंडदेखली कारवाई केलेली दिसते. अर्थात राहुल गांधी, कॉंग्रेस, समाजवादी पक्ष हे आग भडकावून आगीत तेल ओतण्याचे काम करून मजा पहात आहेत. ते दोघे काय बोलले त्यापेक्षा ही मंडळी आग लावण्याचे जे काम करीत आहेत तेच राष्ट्रविरोधी आहे. यातून मोदी अडचणीत येतील किंवा आपल्याला राजकीय फायदा होईल हा यांचा भ्रम आहे. यातून फक्त देशच अडचणीत येऊ शकतो.

In reply to by श्रीगुरुजी

जगाला दाखविण्यासाठी नूपुर शर्मा व नवीन जिंदाल यांच्यावर तोंडदेखली कारवाई केलेली दिसते. हिंदू धर्माचा कुणीही अपमान केला तर चालेल पण ईतर धर्माचा तुम्हा अपमान केला तर कारवाई होईल हा संदेश भाजपने दिलाय.

नुपुर शर्माचे यांचे काय चुकले? त्यांचे हे तुकले की आपण कोणत्या पक्षाच्या प्रवक्ता आहोत हे त्या विसरल्या. -आपल्या पक्षाचं काम हिंदूत्वाच्य् नावाने निवडणूका जिंकणं आहे ना की हिंदूंचा हक्कांसाठी लढणं. - मागे कमलेश तिवारी ह्या हिंदूत्वावाद्याची हत्या तथाकथीत हिंदूत्ववादी योगीच्या राज्यात दिवसाढवळ्या झाली. आपल्या मुलाच्या हत्येला योगी जबाबदार आहे हे त्याच्या मात्यापितांनी सांगीतले. - ऊद्या नूपूर शर्मांचेही तेच होनार. ना भाजप्याना फरक पडनार ना ढोंगी हिंदूत्ववाद्यांना.

गामा पैलवान Mon, 06/06/2022 - 19:00
Trump, वर चंद्रसूर्यकुमार यांनी म्हंटलंय ते बरोबर आहे. नुपूर शर्मांचं वक्तव्य बरोबर असलं तरी मोठ्या दबावगटास ( लॉबीस ) अंगावर घेतलं ही चूक आहे. बाकी, अमेरिका आखाती देशांना कस्पटासमान वागवते. तिचा निषेध करायची शक्ती कुणाच्याही अंगी नाही. भारत पडला नरम देश. म्हणून निषेध होतो. चालायचंच! आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

भारत पडला नरम देश. म्हणून निषेध होतो. चालायचंच! गामाजी दुरूस्ती सुचवतो. भारत पडला नरम नेत्याचा देश. म्हणून निषेध होतो. चालायचंच! (ईंदीरा गांधींचा काळ पहा)

महामानव मोदीजी नी महाताकदवान गृहमंत्री अमितशहा असतानाही नुपूर शर्मा नी नवीन जिंदाल ह्यांना भिती वाटत असेल तर ह्या देशात खरोखरच हिंदू खतरेमे है. हिंदूंनो स्वतःच स्वतः चा सुरक्षा करायला शिका सरकार फक्त बोलघेवडेपणा करायला आहे.

sunil kachure Mon, 06/06/2022 - 20:31
नुपूर आणि जिंदाल हे bjp चेच प्रवक्ते होते. आणि त्यांनी जी भूमिका मांडली ती bjp पक्ष म्हणून जी भूमिका मांडत आला आहे त्याच्या शी सुसंगत च आहे. त्याच जोरावर तर bjp हा हिंदू चा पक्ष म्हणून ओळखला जातो..मग . Bjp नी नुपूर आणि जिंदाल ल का काढून टाकले? ह्याचे उत्तर काय.

sunil kachure Mon, 06/06/2022 - 20:35
https://www.google.co.in/url?sa=t&source=web&rct=j&url=https://wap.business-standard.com/article-amp/companies/uae-s-ihc-to-invest-2-billion-in-three-adani-group-s-portfolio-companies-122040800412_1.html&ved=2ahUKEwjB8u_DjJn4AhUBgpQKHeYVCMUQFnoECAcQAQ&usg=AOvVaw3q_gQXQxFuoSKYdl2UC1EM

sunil kachure Mon, 06/06/2022 - 20:39
https://www.google.co.in/url?sa=t&source=web&rct=j&url=https://www.ndtv.com/world-news/adani-group-explores-partnerships-with-saudi-arabias-aramco-2833622/amp/1&ved=2ahUKEwjB8u_DjJn4AhUBgpQKHeYVCMUQFnoECBEQAQ&usg=AOvVaw3Q2LFi1YXqBTzBbwAOcL_y हे कारण तर नसेल.ही गुंतवणूक धोक्यात तर येणार नव्हती ना?

sunil kachure Mon, 06/06/2022 - 21:02
हिंदू संयमी आहे पण हिंदू च्या देव देवतांची निंदा नालस्ती करण्याचे पुरोगामी प्रकार भारतात पण खूप होतात..त्या वर हिंसक प्रतिक्रिया येत नाही कारण हिंदू संयमी आहे. ईश निंदा सारखा कायदा भारतात पण मोदी सरकार नी आणांवा. आणि त्या मध्ये हिंदू आणि मुस्लिम ह्या महत्वाचे धर्मांना च समाविष्ट करावे. खुप गरजेचं आहे.

सुक्या Mon, 06/06/2022 - 21:09
ही तोंड देखल कारवाई आहे हे मला वाटते. अखाती किंवा मुस्लिम राष्ट्रे आपापसात कितीही भांडत असली तरी कुराण / धर्म या बाबतीत ते एक होतात. त्यांच्या अस्तित्वाचा तो पाया आहे. त्यामुळे फतवे जारी केले जातात, बहिष्कार टाकला जातो. यात अगदी टोकाची भुमिका पण घेतली जाते ज्यात द्विराष्ट्रीय संबंध खराब होतात. भारतासारख्या देशाला ज्याच्या आजु बाजु असलेले देश नेहेमी काड्या सारत असतात, भारतातल्या अंतर्गत बाबी ना आंतर्राष्ट्रीय रुप देतात अशा वेळा वेळीच एखादा मुद्दा शांत झाला नाही तर दुरगामी परीणाम होतात. त्यामुळे अशी तोडदेखली कारवाई करावी लागते. पुढे काही महिण्यांनी जेव्हा सगळे शांत होइल तेव्हा नुपूर शर्मा व नवीन जिंदाल पुन्हा नवीन रुपात दिसतील.

In reply to by सुक्या

श्रीगुरुजी Mon, 06/06/2022 - 21:12
हैच मी आधीच्या प्रतिसादात लिहिलंय. काही वेळा प्रत्यक्षात चुकीची असली तरी पोलिटिकली करेक्ट भूमिका घ्यावी लागते. ही कारवाई तशीच पोलिटिकली करेक्ट आहे.

In reply to by श्रीगुरुजी

आग्या१९९० Mon, 06/06/2022 - 21:22
अशीच भूमिका मागील सरकारांनी केले तर लांगुलचालन, भेकडपणा, हातचे बाहुले असे संबोधून मोकळे व्हायचे.

कंजूस Mon, 06/06/2022 - 21:24
पण त्यांच्यातला दोष काढणे, सांगणे हे त्यांच्या एकीमुळे खपवून घेतले जात नाही. १३५ लाख परदेशींपैकी ८७ लाख लोक खाडी देशांत नोकरीला आहेत. उत्पादने काढली तशी यांनाही परत पाठवायची हिंमत ते देश दाखवू शकतात. कारण त्या देशांचे अडणार नाही. पण आपले अडणार.

.७०० शेतकरी मरू देनार्या नी कश्मिरी पंडीतांचे पलायन चालू असलेले दिसत असतांनाही दुर्लक्ष करनार्या मोदी सरकारला आखाता देशात वयनोकरी करनार्यांची पर्वा असेल हे एकतर वेड र लोका्ना रटेल किंवा भक्तांना पण वर कचुरेंनी लिंक दिल्याप्रमाणे अदाणीची डील धोक्यात येऊ नये म्हणूनच नुपूर शर्मा ह्यांना पक्षातून काढले असावे. शेवटी दोस्ती महत्वाची!

sunil kachure Mon, 06/06/2022 - 21:58
पाकिस्तान दहशत वादाला पाठिंबा देतो. काश्मीर मध्ये अतिरेकी नाहीत तर पाकिस्तानी फौज च हिंसाचार करत असते. उघड सत्य.. भारतासारख्या बलाढ्य,उत्तम प्रशिक्षित फौजेशी सामान्य अतिरेकी लढू शकणार नाही... ते पाकिस्तानी सैनिक च असतात..योग्य प्रशिक्षण घेतलेले. पण पाकिस्तान सरकार किंवा किंवा पाकिस्तान मधील सत्ता धारी पक्षाचे प्रवक्ते ते कधीच मान्य करत नाहीत. हे पाकिस्तानी लोकांना कळत. पण नुपूर आणि जिंदाल ह्या सत्ता धारी पक्षाच्या प्रवक्त्यांनी कळत नाही. म्हणजे त्यांची boudhik कुवत काय असेल. शितावरून भाताची परीक्षा.

In reply to by sunil kachure

सुबोध खरे Tue, 06/07/2022 - 12:15
काश्मीर मध्ये अतिरेकी नाहीत तर पाकिस्तानी फौज च हिंसाचार करत असते. मग मेलेल्या दहशतवाद्यांच्या कुटुंबाला निवृत्तीवेतन वगैरे देतच नसतील. कारण हे आमचे सैनिक नाहीतच असे सांगावे लागेल ना? जसे कारगिल मध्ये झाले होते. बाकी तुमचे कळफलक बडवणे चालू द्या. विचार वगैरे काय नंतर सुद्धा करता येईल

In reply to by सुबोध खरे

sunil kachure Tue, 06/07/2022 - 14:42
१९६९, cisf ची स्थापना आणि १९८२ अर्माड फोर्स चा दर्जा. मग १३ वर्ष कोणत्या कायद्याने सर्व सुविधा मिळत होत्या.(लॉ ऑफ पार्लमेंट ,काय असतो तो) भारतात हे घडू शकतं तर पाकिस्तान मध्ये काही ही घडू शकतं. निवृत्ती वेतन हा फालतू मुद्धा आहे.

In reply to by सुबोध खरे

sunil kachure Tue, 06/07/2022 - 15:07
हिंसा करणे हे दोघांचे ध्येय.. योजना आखणे दोघे ही करतात. पण योजना आखली जाते तेव्हा अनेक घटक सहभागी असतात एक सू नियंत्रित यंत्रणा असते मुंबई पोलीस नी ह्या गुंडांना असेच संपवले थोडी मोकळीक दिली तर पोलिस देशाला गुंड मुक्त करतील. इतके गुंड कच्चे आहेत. पण अतिरेकी हे फौजेला भारी पडतात. ह्याचा अर्थ सरळ आहे ..योग्य ,शास्त्रीय प्रशिक्षण,शिस्त,आणि नियोजन. Support system, ह्या सर्व सुविधा असतात आणि हे फक्त लष्करात च शक्य आहे. काश्मीर मध्ये पाकिस्तानी सेना च हिंसाचार करत आहे. ह्या वर मी तरी ठाम आहे किरकोळ गुंड,अतिरेकी लोकांना ते शक्य नाहीं.

sunil kachure Mon, 06/06/2022 - 22:40
बेजबाबदार सत्ता धारी bjp पक्षा मुळे भारत एकाकी पडेल. जे देश आज पर्यंत भारताला पाठिंबा देत होते ते बेजबाबदार वागण्या मुळे भारताच्या विरुद्ध गेले. अमेरिका,चीन,पाश्चिमात्य राष्ट्र भारताचे कधीच समर्थन करणार नाहीत. एक नंबर चे स्वार्थी देश आहेत ते. सत्ता धारी आहात विचारपूर्वक वागले पाहिजे. मध्ये जपान नी पण भारत सरकार वर टीका केली होती. बुलेट ट्रेन साठी पैसे त्यांचे आणि त्यांच्याच अधिकाऱ्यानं इन्कम टॅक्स. ह्या भारताच्या धोरण वर. अधिकारी काय करत आहेत सरकार चे नियंत्रण हवे.

sunil kachure Mon, 06/06/2022 - 23:15
कोणत्या टीवी चॅनेल वरील debate मध्ये मुक्ताफळं उधळली होती. त्या टीव्ही चॅनल च नाव गुप्त का ठेवण्यात आले आहे. बातम्या मध्ये पण त्या न्यूज चॅनल च नाव घेतले जात नाही. सरकार प्रस्तुत रिपब्लिक तर नाही ना?

sunil kachure Tue, 06/07/2022 - 00:47
Bjp शी जवळीक असलेली पत्रकार आहे. सम्राट पृथ्वीराज ह्या सिनेमा च्या प्रीमिअम लं ही हजर होती .आणि भारताचे सूचना प्रसारण मंत्री पण हजर होते. ही bjp चीच आहे. सरकार नी टाइम्स now ह्या चॅनेल वर कारवाई करून त्याला टाळा लावला असता तर . भारताला आखाती देशांची माफी मागावी लागली नसती. आणि आपल्या प्रवक्त्या वर कारवाई करण्याची पण गरज पडली नसती

सुखीमाणूस Tue, 06/07/2022 - 04:55
तेव्हा नाही झाला बहिष्कार घालण्याचा प्रकार. पण मुस्लिम देशात उमटलेल्या प्रतिक्रिया https://en.wikipedia.org/wiki/Demolition_of_the_Babri_Masjid#International_reactions तेव्हा केन्द्रा मध्ये कौन्ग्रेस् सरकार होते. त्यामुळे सरकारला अर्थात डाव्यान्ची सहानुभुती असल्यामुळे आन्तरराष्ट्रिय प्रतिक्रिया ही भारत सरकारला त्यासाठी जबाबदार धरणारी नव्हती. शिवाय तेव्हा social media नव्हते त्यामुळे घटनाक्रम आणि प्रतिक्रिया यान्चा वेग थोडा कमी होता. भारतात भाजपा सोडुन सगळे पक्श यासाठीच मुस्लीम धर्म आणि लोकान्शी पन्गा घेत नाहीत (आठवा सम्भाजी महाराजान्वरची दूरदर्शन मालिका किती दाखवली गेली आणि कधी बन्द झाली.) शिवसेनेने देखिल काळाची पावले ओळखुन secular होण्याकडे वाटचाल सुरु केली आहे, ती मराठी हिन्दु मत यापुढे पुरेशी पडणार नाहीत म्हणुनच. भाजपा मधुन काढलेल्या या दोघाना सध्याची शिवसेना शिवबन्धन बान्धण्याचे आमन्त्रण देइल काय? माझ्यासारख्याना असे प्रकार झाले की हिन्दु धर्मिय हतबल आहेत ही बाब परत अधोरे़खित होते आणि लोकसन्ख्या नियन्त्रण आणि समान नागरी कायदा लवकर् यावा असे वाटते. हिन्दु धर्मिय बाजु बरोबर असली तरी सेक्युलर कधीच त्यासाठी आवाज उठवणार नाहीत यावर शिक्कामोर्तब होते.

sunil kachure Tue, 06/07/2022 - 08:34
आता जे काही घडले आणि भारत सरकार आणि मुस्लिम देश ह्या घटनेवर ज्या प्रकारे react झाले त्या वरून हिंदू हतबल झाले असा निष्कर्ष काढता येत नाही. पाहिले तर भारतीय न्यूज चॅनल ल सरकार नी काही सूचना करणे गरजेचे आहे. न्यूज चॅनेल जास्त करून हिंदी चॅनेल ह्यांना पत्रकारिता म्हणजे काय हेच माहित नसावे. रशिया,युक्रेन युद्धात पण चुकीच्या बातम्या दाखवण्या मुळे,चुकीची माहिती प्रसारित केल्या मुळे रशिया नी नाराजी व्यक्त केली होती. त्या निवेदिका,अशा काही उच्च स्वरात बोलत असतात की त्यांचा आवाज एक मिनिट पण ऐकून घेणे मोठ्या कष्टाचे वाटते.. त्या मध्ये ह्यांचे debate. म्हणजे महाभयंकर शो.ते मोठमोठ्याने ओरडणे ,फालतू विषयावर चर्चा. भारताची चुकीची प्रतिमा जागतिक स्तरावर निर्माण होण्यास हे न्यूज चॅनेल जास्त जबाबदार आहेत. योगी चे लाल करण्याच्या नादात मुस्लिम गुन्हेगारांना दिलेली वागणूक ह्याच्या बडबडीत कहाण्या हेच चॅनेल रोज प्रसारित करत होते. त्याचा एकत्रित परिणाम पण आता जसे मुस्लिम राष्ट्र react झाले त्या मागे आहे लता मंगेशकर गेल्या तेव्हा पाकिस्तान सारख्या देशाच्या न्यूज चॅनल किती मस्त तो प्रसंग कव्हर केला होता.

१. त्यांनी कुराण आणि हदीथ यांचा संदर्भ दिला. त्यामुळे त्यांनी खोटे बोलल्याचे सिध्द होत नाही. नक्की त्यांच्या वक्तव्यामध्ये आक्षेपार्ह काय आहे? कोणत्या कायद्यांचा भंग होत आहे? भावना दुखावणे. भारत्,पाकिस्तान सारख्या देशांमध्ये भावनेचे राजकारण चालु असते रे ट्रम्पा.किंबहुना आता जगभरात अनेक देशांमध्ये भावनेचेच राजकारण चालु आहे.

साहना Tue, 06/07/2022 - 12:35
* भाजप आपल्या प्रवक्त्यांना किंवा सभासदांना कश्या प्रकारे वागवतो हा त्यांचा आंतरिक मामला आहे. त्यामुळे नुपूर शर्मा ह्यांची हकालपट्टी हि अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी होत नाही. नुपूर आता आपल्या खाजगी पातळीवर त्याच गोष्टी बोलू शकतात. आता नुपूर ह्यांना धमक्या वगैरे मिळत आहेत तेंव्हा त्यांचे संपूर्ण संरक्षण करणे सरकारची जबाबदारी आहे. त्यांत सरकार अपयशी ठरल्यास ती स्वातंत्र्याची गळचेपी ठरेल. नुपूर ह्या काहीही खोटे बोलल्या नाहीत. त्यांनी फक्त हदीत मध्ये लिहिले आहे तेच सांगितले होते. * भारत सरकारचे कतार पुढील सपशेल लोटांगण त्यांच्या घाबरट स्वभावाचे द्योतक असण्यापेक्षा बोलबच्चन बाबू मंडळींच्या अकार्यक्षम पणाचे उत्तर उदाहरण आहे. नुपूर शर्मा भारतीय नागरिक आहे, भारत एक लोकशाही आणि (किमान कागदावर) मुक्त समाज असल्याने कुठल्याही देवदूत वगैरेवर टीका करण्याचा त्यांना अधिकार आहे आणि हा अधिकार वापराने "fringe" वगैरे ठरत नाही. त्यामुळे भारत सरकारचे कतार ला पाठविलेले पत्र अतिशय ढिसाळ आणि कमजोरपणाचे वाटते. भाषा पाहू : > “In line with our civilisational heritage and strong cultural traditions of unity in diversity, Government of India accords the highest respect to all religions. Strong action has already been taken against those who made the derogatory remarks,” नुपूर विरुद्ध कुठलीही ऍक्शन घेण्याचा अधिकार भारत सरकारला नाही. कारण मुळांत त्या काहीही खोटे बोलल्या नाहीत. कुठल्याही भारतीय कायद्याचा त्यांनी भंग केला नाही, केला असेल तर कोर्टांत जाऊन ते सिद्ध करावे लागेल. माझ्या मते कोर्टांत कुणी जाणार नाही कारण कोर्टांत त्या नक्की काय बोलल्या, ते सत्य होते कि नाही इत्यादी विषय वर येतील. आणि नंतर काय होते ते पाहण्यासाठी जाणकारांनी "कोलकाता कुराण पिटिशन" वाचावे. >"These are the views of fringe elements," नुपूर ह्यांना भाजपने आपला प्रवक्ता नेमले होते. हा पक्ष बहुसंख्य भारतीयांचे प्रतिनिधित्व करत आहे. त्यांना "fringe" म्हणणे चुकीचे तर आहेच पण भारतीय नागरिक fringe असला तरी जो पर्यंत प्रत्यक्षांत त्याने कायदा भंग केला नाही त्याला इतर देशांपुढे हेटाळणे बरोबर ठरत नाही. **अरब - भारत संबंध** भारताला ह्यांच्या सोबत चांगले संबंध पाहिजे ह्यांत चुकीचे काहीही नाही. त्यांचा धर्म जुनाट आणि बुरसटलेला असला तरी ती भारताची समस्या नाही. त्याच वेळी भारतांत काय होते ह्यांच्याशी त्यांना देणे घेणे नाही. ज्या पद्धतीने ह्या देशांनी आपल्या देशांत ब्लास्फेमी कायदे केले आहेत तसे कायदे भारतांत नाहीत त्यामुळे कुठल्याही तथाकथित देवदूतावार टीका करणे भारतांत १००% ग्राह्य आहे. हे भारतीयांचे अत्यंत महत्वाचे स्वातंत्र्य असून हे योग्य भाषेंत सौम्य पणे समजावून सांगणे आवश्यक होते. भारत लोकशाही असल्याने लोकांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे पण ह्याचा अर्थ कुठल्याही भारतीयचे मत हे भारतीय सरकारचे मत नाही ह्या व्यतिरिक्त कतार किंवा कुठल्याही देशाला आणखीन काही ठोस तक्रार असेल तर भारत याचा पाठपुरावा करेल इतके उत्तर दिले असते तरी पुरेसे असते. ** घरचे भेदी ** शांतताप्रिय समाजाने आपली नांगी आता वर काढली आहे. नुपूर ह्यांना ठार मारण्याची आणि बलात्कार करण्याची धमकी मिळाली आहे. कमलेश तिवारी ह्यांच्या उदाहरणावरून ह्या धमक्या किती खऱ्या ठरू शकतात ह्याची कल्पना आम्ही करू शकतो. त्याशिवाय भारताला लोटांगण घालवले लागले म्हणून काँग्रेसी जनता आणि शिळी सेना इत्यादींनी सुद्धा प्रचंड आनंद दाखवला. धिम्मी मुबई पोलिसांनी तर नुपूर ह्यांना तुरुंगांत डांबण्याची तयारी केली आहे. थोडक्यांत कठीण काळांत "वयं पंच शतम" म्हणून भारत देशाच्या सन्मानासाठी उभे न थकता विविध शत्रूंनी ह्या संधीचा फायदा उठवला आहे. राणा अयुब, अरिफ alt news इत्यादींनी ह्यांत भरपूर हात धुवून घेतले आहेत. काही मंडळी तर तथाकथित देवदूताचा अपमान करणाऱ्या प्रत्येक हिंदूंचे नाव गोळा करवून कतार इत्यादी देशांना पाठवत आहेत. ** पुढे काय ** भाजप/ संघ धिम्मी आहे आहे आधीपासून मला ठाऊक आहे. आता नुपूर ह्यांची हकालपट्टी करून त्यांनी त्यावर अगदी औपचारिक शिक्का सुद्धा मारला आहे. तथाकथित देवदूत ह्यांनी नक्की काय दिवे लावले हे सत्य सुद्धा सांगणार्यांना भाजपांत नेते म्हणून सोडा पण सदस्य म्हणून सुद्धा जागा नाही हे आता स्पष्ट झाले आहे. इथून शांतता प्रिय समाज फक्त escalate करेल. मूर्तिपूजा हि सुद्धा इस्लामचा अपमान आहे हे पुढची स्टेप असेल. भाजपने आपली कितीही लाज काढून घ्यावी मला फरक पडत नाही पण "देश झुकने नही दूंगा" म्हणता म्हणता महाशयांनी अक्षरशः कतार सारख्या टूच्च देशापुढे लोळण घेतली. सीताराम गोयल ह्यांनी आधीच लिहिले होते कि काँग्रेस हि आधुनिक मुस्लिम लीग तर भाजप आधुनिक काँग्रेस पार्टी बनेल. ते भाकीत खरे ठरत आहे. मोदी ह्यांची IT सेल आणि बुद्धी गहाण ठेवलेली मंडळी आता मोदी ह्यांची शरणागती हि प्रत्यक्षांत कसा मोठा मास्टरस्ट्रोक आहे, गनिमी कावा आहे, मोदी एक मोठ्ठाला निर्णय लवकरच घेणार आहेत, फक्त अरबांचा बुद्धी भ्रम करण्यासाठी कशी हि छोटीशी खेळी आहे इत्यादी इत्यादी जबर थेयर्या काढणार आहेत. हे copium (आत्मभ्रम निर्माण करणारे रसायन) मोठ्या प्रमाणात whatsapp वरून वाटणार आहेत. पण आम्हाला त्याचे काय ? इथे मुख्य मुद्दा असा आहे कि भारत देशांत देवदूतावार टीकाच काय पण काहीही निगेटिव्ह बोलण्यावर बंदी आहे हेच भारताने अरब प्रदेशाला सांगितले आहे. आणि ह्या भानगडीत मालदीव पासून अफगाण पर्यंत आणि इंडोनेशिया पासून यूएई पर्यंत सर्वानी भारताला "जलील" केले आहे. ** सहिष्णुता ** सहिष्णू असणे चांगली गोष्ट आहे, पण असहिष्णू लोकांपुढे झुकणे चुकीची गोष्ट आहे. ** सामान्य हिंदू काय करू शकतो ** नुपूर ह्यांनी जी तथ्ये सांगितली ती प्रकाशीत करावी आणि सगळीकडे शेयर करावीत. त्यांत सर्व अरब राष्ट्रे आणि त्यांचे दूतावास तसेच भारतीय भेदी ह्यांना टॅग करावे. देवदूताच्या अब्रूची लक्तरे करून सर्वत्र टांगली गेली कि पुन्हा हि मंडळी डोके वर काढणार नाहीत.

In reply to by साहना

गामा पैलवान Tue, 06/07/2022 - 14:07
साहना, तुमच्या या संदेशाशी नव्व्याण्णव टक्के सहमत आहे. एक टक्का असहमती मोदींसाठी. त्यांना बरीच व्यवधानं पाळायची असतात. आखाती देश अमेरिकेचे बटीक आहेत. मोदी बटक्यांना त्यांची जागा दाखवून देतील. मला असं वाटतं ही हे प्रकरण हिंदूंची एकी किती हे तपासायला उकरून काढलेलं आहे. म्हणून मी नुपूर शर्मांना माझा पूर्ण पाठिंबा व्यक्त करतो. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

गामाजी, ७०० शेतकर्यांना मरू देनार्या, कोरोना काळात लाखो लोक मरू देनार्या, नी कश्मिरी हिंदू पळून येताहेत त्यांचीही फिकीर न करनार्या मोदींना आखातातील भारतींयांची पर्वा असेल हे समजने भोळेपनाचे आहे. बाकी नुपूर शर्मांना मी देखील पाठींबा जाहीर करतो. नी तियांना पकिषातून हकलनार्या भाजपचा नी भाजपेयी प्रवृत्तींचा निषेध करतो.

In reply to by काड्यासारू आगलावे

sunil kachure Tue, 06/07/2022 - 14:36
ह्यांना देश आणि देशाचे नागरिक ह्यांच्या शी काही देणे घेणे नाही. मित्र भिकारी बनू शकतात ह्या भीती मुळे कुवेत सारख्या फालतू देश समोर साष्टांग नमस्कार.

In reply to by गामा पैलवान

साहना Tue, 06/07/2022 - 21:52
सर्व हिंदूनी नुपूर शर्मा आणि नवीन जिंदाल ह्यांचा मागे कणखर पणे उभे राहायची गरज आहे. ज्या वक्तव्याने शांतताप्रिय समाजाला मिरच्या झोंबल्या आहेत तीच वक्तव्ये आता सर्वत्र उगाळली जात आहेत ह्यांतच शांतता प्रिय समाजाचा ह्रास आहे.

sunil kachure Tue, 06/07/2022 - 13:33
१) भारतीय न्यूज चॅनल आणि बाकी मीडिया ह्यांनी राजकीय पक्षांना बांधून घेतले आहे. राज्यसभा सदस्य पासून बाकी लाभ मीडिया किंग लोकांना राजकीय पक्ष देत अस्तात. म्हणजे मीडिया,राजकीय पक्ष ह्यांचे व्याव्यारिक नात आहे. त्या मुळे निःपक्ष,समतोल,विचारी, विषयाचा अभ्यास करून नंतर समतोल विचार मांडणारी पत्रकारिता भारतात आज तरी अस्तित्वात नाही. २) नुपूर शर्मा नी नक्की कोणत्या विषयावरील चर्चे दरम्यान ही कॉमेंट केली? तिथे अजून कोण कोण आमंत्रित होते. ही माहिती दिली जात नाही. अगदी कोणत्या चॅनेल वर ही चर्चा झाली हे पण आता लपवले जात आहे. ३) नुपूर चे वक्तव्य योग्य आहे की अयोग्य हा विषय नाही.सत्ताधारी पक्षाची प्रवक्ते म्हणून तसे वक्तव्य करणे योग्य की अयोग्य हा वादाचा मुद्धा आहे. नवीन जिंदाल आणि नुपूर ह्यांनी अनेक वेळा अशी वृत्ती दाखवली आहे. सामान्य माणूस म्हणून तिने वक्तव्य केले असते तर कोणत्याच देशाने हरकत घेतली नसती. ४) मिळत धार्मिक debate मध्ये राजकीय लोकांचे काय काम?धार्मिक debate मध्ये धार्मिक प्रतिनिधी च हवा. ५) काही तरी हिंदू मुस्लिम वाद काढून त्या वर debate ठेवायचे आणि हिंदू चे प्रतिनिधी म्हणून bjp चे प्रवक्ते भाग घेणार. असे खूप कार्यक्रम होत असतात चॅनेल चा आवडाता उद्योग आहे हा. पण bjp हिंदू ची प्रतिनिधी आहे हे चॅनेल वाल्यांनी कशावर ठरवले. राजकीय फायदा त्याच पक्षाला मिळावा हा हेतू .

sunil kachure Tue, 06/07/2022 - 13:52
असे कोणी टाईप केले की खूप हसायला येते.ते हसणे थांबत च नाही. कायदा आणि कायद्याचे राज्य ते पण भारतात. एक उत्तम उदाहरण फुलंन देवी .गुन्हे असंख्य. तरी दोन वेळा लोकसभेत निवडून गेली. समाजवादी पक्षाने सर्व गुन्हे मागे घेतले . जे खरेच घडले होते. कोणता कायदा. उद्या दाऊद पण लोकसभेत गेला तर आश्चर्य वाटून घेवू नका.

वामन देशमुख Tue, 06/07/2022 - 15:09
नुपूर शर्मा यांचे संरक्षण करण्याऐवजी त्यांची हकालपट्टी करणे ही श्री नरेंद्र मोदींची आजवरची सर्वात कणाहीन कृती आहे. आठ वर्षे झालीत, बघू पुढच्या दोन वर्षांत अजून काय काय होतंय ते.

कॉमी Tue, 06/07/2022 - 19:47
रिअलपॉलिटीक आणि नैतिक विचार हे वेगवेगळे व्हावेत. पण दोन्ही होणे गरजेचे आहे. आपल्या कोणत्या तत्वासाठी किती मोठ्ठा आर्थिक आणि राजनैतिक फटका बसणार हे पाहणे गरजेचे आहे. कोणत्या तत्वाची किती प्रमाणात आणि कश्या प्रकारे पायमल्ली होते- आणि त्या पायमल्लीचा विरोध करून काय गमवावे लागणार आहे असा विचार होत असतो. आणि जर तत्व समर्थनामुळे टाळले जाणारे नुकसान मोजायला लागणाऱ्या किमतीपेक्षा जास्त असेल तरच कणखर भूमिका घेतली जाते. त्यामुळे मोदींच्या समर्थकांनी सुद्धा कणाहीन वैगेरे शब्द वापरणे माझ्यासाठी तरी आश्चर्यकारक आहे. असल्या चिंटूपिंटू गोष्टीत कशाला कणा बिणा दाखवायचा आहे ?

In reply to by कॉमी

श्रीगुरुजी Tue, 06/07/2022 - 21:01
+ १ आंतरराष्ट्रीय राजकारण, देशाचे हितसंबंध, कूटनीति, पोलिटिकली करेक्ट विधाने व पोलिटिकली करेक्ट निर्णय हे विषय ज्यांना अजिबात समजत नाहीत त्यांनाच मोदी कणाहीन, गुडघे टेकणारे वगैरे असल्याचे भ्रम होतात. IC814 मधील १७० प्रवाशांना सोडविण्यासाठी कोणताही पर्याय शिल्लक नव्हता व त्यामुळे ३ अतिरेकी नाईलाजाने सोडावे लागले तेव्हा सुद्धा वाजपेयी कणाहीन, गुडघे टेकणारे आहेत असाच दुष्प्रचार या अज्ञान्यांनी केला होता.

sunil kachure Tue, 06/07/2022 - 21:25
दोन प्रवक्ते हटविले म्हणजे प्रकरण संपले असे होत नाही. दीर्घ कालीन त्याचे परिणाम होत असतात. गहू अजून फिरत च आहे. कच्चे तेल भारताला चढ्या किमतीत विकले जाईल. सहकार्य आता पहिल्या सारखे केले जाणार नाही. परिणाम तर दीर्घ कालीन होणारच. व्हिसा कायदे भारतीय लोकांसाठी प्रतिकूल केले जातील.

In reply to by sunil kachure

आनन्दा Tue, 06/07/2022 - 21:51
हे सगळं झालं म्हणजे मग इथे एक धागा काढून आम्हाला सांगा. त्यावेळेस मान्य करू. ओपेकची मस्ती कमी करायची असेल तर दीर्घकालीन योजना कराव्या लागतील. त्या परिस्थितीत जर एखादे पाऊल मागे घ्यावे लागले तर तुमच्यासारख्याना आनंदाच्या उकळ्या फुटणे साहजिक आहे. पण थोडी शक्ती 2024 साठी शिल्लक ठेवा..

आनन्दा Wed, 06/08/2022 - 08:13
असो, पण या निमित्ताने समान नागरी कायदा आल्यावर काय काय होऊ शकते याची एक झलक पाहायला मिळाली.. आता सरकार काय काय करते हे बघणे रोचक ठरेल. कायदा येईल तेव्हा येईल, पण त्यावेळेस समर्थकांनी बोलताना किती सावध राहिले पाहिजे याचा धडा या निमित्ताने सर्वांना मिळाला आहे.

In reply to by श्रीगुरुजी

सावत्र आईचे ऐकणारे आणि पत्नीला वनवासात घेउन जाणारे प्रभु श्रीराम शहाणे नव्हते असे विधान ओवेसीनी केले तर नुपुर शर्मा/जिंदाल ऐकुन घेणार का? की भावना दुखावतील?

In reply to by श्रीगुरुजी

सुबोध खरे Wed, 06/08/2022 - 12:34
श्री कलबुर्गी यांनी गणेश मूर्तीवर मूत्र विसर्जन केले होते त्या बद्दल कुठे मोर्चे किंवा दंगली झाल्या होत्या का?

In reply to by सुबोध खरे

श्रीगुरुजी Wed, 06/08/2022 - 13:21
थोडी सुधारणा. यू आर अनंतमूर्ती यांनी एका हिंदू मूर्तीवर (गणेश मूर्ती नाही) मूत्रविसर्जन केले होते व तसे आत्मचरित्रात लिहिले आहे. कलबुर्गींनी एका भाषणात त्याचा संदर्भ देऊन त्या प्रकारचे समर्थन केले होते.

In reply to by सुबोध खरे

sunil kachure Mon, 06/13/2022 - 14:22
दाभोलकर,कलबर्गी आणि त्या लिस्ट मधील बाकी गुलाम.. हे तज्ञ,किंवा हुशार नव्हतेच. हे राजकीय पक्षांचं गुलाम होते ह्यांना पैसा नक्कीच कोणी तरी हिंदू विरोधी पुरवत होता. दाभोलकर ची मुलाकात बघितली. तेव्हा त्याने एक मत व्यक्त केले .बालवाडी पासूनच च हिंदू धर्म,संस्कार,निती,हे शिक्षण पद्धती मधून काढून टाकायचे . म्हणजे हा गुलामच होता ह्यांचे हेतू च साफ नव्हते . संत गाडगे महाराज,संत नामदेव महाराज ह्यांनी हिंदू धर्मातील चुकीच्या कर्मकांड विरुद्ध अतिशय कठोर शब्दात टीका केली आहे . तरी ते आम्हाला प्रेरणा देणारे,आदरणीय च आहेत. कोणताच हिंदू त्यांचा द्वेष करत नाही..कारण त्यांचा हेतू अतिशय पवित्र होता . हिंदू नी नेहमी लवचिकता दाखवली आहे.. म्हणून हिंदू म्हणून मला हिंदू धर्माचा खूप अभिमान आहे.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

अनन्त अवधुत गुरुवार, 06/09/2022 - 02:19
असली वक्तव्ये करायला ओवेसीची गरज नाही, कितीतरी हिंदुच असले अपमानास्पद बोलतात. ती वक्तव्ये कानाआड केल्या गेली. पण यापुढे, तसे होणार नाही.

In reply to by श्रीगुरुजी

साहना Wed, 06/08/2022 - 12:05
कायच्या काही ! नुपूर ह्यांची बडतर्फी त्यांनी अप्रिय भाष्य केले म्हणून नाही विदेशी शक्तींनी मागणी केल्याने हकालपट्टी केली गेली आहे. नाहीतर कतार च्या पत्राची वाट पाहायला भाजप अध्यक्ष बसले नसते. जो पर्यंत कतार ने आक्षेप व्यक्त केला नव्हता तो पर्यंत ह्याच पक्षाचे नेते अतिशय हिरीरीने हे "सत्य" शेर करत होते. बरे हे "सत्यम ब्रूयात" वगैरे मनुस्मृतीतील तत्वे भाजपाची नाहीत आणि भारत सरकारची नाहीत. नाहीतर येव्हाना अर्धा भाजपा बडतर्फ झाला असता कारण बहुतेक मंडळी एक तर धांदात खोटे किंवा अत्यंत अप्रिय अश्याच गोष्टी बोलत असतात. आणि मनुस्मृतीत तत्वे आचरणात आणायचीच असतील तर सर्वच आणावीत. म्लेंछ लोकांच्या संदर्भांत मनुस्मृती काय म्हणते हे भारत सरकारने १९४७ मध्येच गांभीर्याने घेतले असते तर आजची वेळच अली नसती. दुसरी गोष्ट म्हणजे उगाच आपल्या चाटूगिरीला सोयीस्कर असे सुभाषित उचलायचे आणि त्यालाच जणू काही आपले तत्व म्हणून ठोकून द्यायचे आणि विद्वत्तेचा आव आणायचा. म्हणजे आपल्याला घाई आहे तेंव्हा "कल करे सो आज" हा कबीर ह्यांचा दोहा. ठोकून द्यायचा आणि आळस वाटत असेल तर "धीरे धीरे रे मना, " हा कबीर ह्यांचाच दोहा ठोकून द्यायचा. मनुस्मृतीतील सदर सुभाषितावर अत्यंत सविस्तर टीका विविध विद्वानांनी केली आहे. सनातन धर्मातील तत्वे (उदा क्षमा इत्यादी) जेंव्हा म्लेंच्छना लागू केली तेंव्हा म्लेंच्छानी त्याचा येथेच्छ फायदा घेऊन हिंदूंनाच धूळ चारली. कुठले तत्व कुठे लावावे ह्याला सुद्धा तारतम्य असायला पाहिजे. नुपूर ह्यांनी असत्य किंवा अप्रिय असे काहीही बोलले नव्हते त्यांचा प्रत्येक शब्द सरळ हदिथ मधूनच उचललेला आहे.

In reply to by आग्या१९९०

श्रीगुरुजी Wed, 06/08/2022 - 11:33
असे म्हणणारे मूठभर धर्मांध असतील. त्यांचे मारेकरी कोणत्याही धर्माचे असू शकतील कारण मारेकरी कोण होते, त्यांना मारण्यामागील हेतू काय हे अजून स्पष्ट नाही. मारण्यात वापरली गेलेली शस्त्रे, वाहने इ. पुरावे अजूनही सापडलेले नाहीत. अनेक वेगवेगळ्या लोकांवर संशय घेऊन अनेकांना अटक करून चौकशी करूनही कोणतेही सबळ पुरावे मिळाले नाहीत. मुळात त्यांना धार्मिक कारणावरून मारले की त्यामागे अन्य कारणे होती हेच अजून सांगता येत नाही.

In reply to by श्रीगुरुजी

आग्या१९९० Wed, 06/08/2022 - 13:47
सगळ्यांचे मारेकरी हिंदूच संघटना असणार हे आज ना उद्या उघड होईलच. तपास यंत्रणांची संशयाची सुई हिंदू संघटनांकडेच कशी वळते?

In reply to by आग्या१९९०

श्रीगुरुजी Wed, 06/08/2022 - 13:55
कारण गुन्हे घडले त्या काळात महाराष्ट्रात व कर्नाटकात हिंदूविरोधी सरकार सत्तेत होते. २००८ मध्ये मालेगाव स्फोटानंतर पवारांनी व २०१३ मध्ये दाभोळकर हत्येनंतर पृथ्वीराज चव्हाणांनी संशयाची व तपासाची दिशा जाणूनबुजून हिंदू संघटनांकडे वळविली होती. इतक्या वर्षांनंतर आजतागायत काहीही पुरावे मिळाले नाहीत व काहीही सिद्ध झाले नाही.

sunil kachure Wed, 06/08/2022 - 13:10
इस्लामी देशात अशा गुन्ह्याला फाशी हीच शिक्षा आहे आणि ती योग्यच आहे. कोणाचा तरी एकाचा किडा वळवळा करतो आणि तो करोडो लोकांचे श्रद्धा स्थान असणाऱ्या देव देवतांच्या वर गल्लीच्छ टीका करतो. हा गुन्हाच.ईश निंदा हा कायदा भारतात पण हिंदू आणि मुस्लिम ह्या धर्माच्या देव देवता विषयी लागू झाला पाहिजे. हिंदूंच्या देव देवता वर पण काही अती शहने नीच शब्दात कॉमेंट करत असतात. पण हिंदू मुस्लिम लोकांसारखे हिंसक प्रतिक्रिया देत नाहीत त्याचा फायदा उचलला जातो हे खरेच आहे. ईश निंदा कायदा असता तर कितीतरी पुरोगामी कायद्याच्या चापात अडकले असते आणि तो प्रकार बंद झाला असता. Bjp कडे पूर्ण बहुमत आहे हिदू हिताचा कायदा bjp नी परित करावा.

In reply to by sunil kachure

वामन देशमुख Wed, 06/08/2022 - 15:35
Bjp कडे पूर्ण बहुमत आहे हिदू हिताचा कायदा bjp नी परित करावा.
BJP तसं काहीही करणार नाही. --- आठ वर्षे झाली. हिंदुत्वाच्या नावाने, हिंदूंच्या मतावर बहुमत मिळवलेल्या सरकारने - १. हिंदूंच्या फायद्याचा एकतरी नवीन कायदा आणि त्याची अंमलबजावणी केला आहे का? २. हिंदूंचे नुकसान थांबेल असा एकतरी जुना कायदा रद्द केला आहे का? माझ्या माहितीनुसार आणि समजुतीनुसार एकही नाही. --- केवळ सत्ता प्राप्त करून चालत नाही, आपली व्यक्त-अव्यक्त उद्दिष्टे साध्य करण्याची इच्छाशक्ती, धमक असावी लागते. सध्याच्या तथाकथित हिंदूहितवादी सरकारात ती धमक कधीही दिसली नाही. याउलट, पूर्वीच्या मुस्लिमहितवादी सरकारात, "या देशाच्या साधनसंपत्तीवर पहिला हक्क मुस्लिमांचा आहे" हे ठणकावून सांगण्याची आणि तशी प्रत्यक्ष कृती करण्याची धमक होती. --- "पाठ्यपुस्तकांतून शिकवला जाणारा इतिहास खोटा आहे, तो बदलण्याची गरज आहे" असे पांचजन्य / ऑर्गनाइझर मधून नुसते सांगायचे पण हाती सत्ता असुनही प्रत्यक्षात मात्र काहीही करायचे नाही. उलट आम्ही चार वर्षांत पाठ्यपुस्तकांचे एकही प्रकरण बदलले नाही असे सांगणाऱ्या बुळ्या लोकांकडून काय अपेक्षा ठेवणार? --- प्रश्न केवळ नुपूर शर्मांच्या बडतर्फीचा नाही; आठ वर्षांत प्रचंड बहुमत असूनही या सरकारने हिंदूंच्या हिताचे काहीही केले नाही, ही निराशा, सल, खदखद मनात आहे. --- अवांतरः मरतुकड्या सौभाग्यापेक्षा ढळढळीत वैधव्य बरे अशी हिंदूंची मनोधारणा होत चालली आहे आणि २०२४ च्या निवडणुकीत ती प्रतिबिंबित होणार आहे.

In reply to by वामन देशमुख

आग्या१९९० Wed, 06/08/2022 - 16:47
हिंदूंकडून सतत होणारी समान नागरी कायद्याची मागणी पूर्ण करू शकते हे सरकार परंतु किती हिंदू पाठींबा देतील ह्या कायद्याला ? कारण "हिंदू अविभक्त कुटुंब कायद्याचे" फायदे हिंदूंना मिळणार नाहीत.

In reply to by श्रीगुरुजी

आग्या१९९० Wed, 06/08/2022 - 17:14
माहीत नाही. परंतु हिंदूंची समान नागरी कायद्याची मागणी हिंदू हितापेक्षा दुसऱ्या धर्मातील नागरिकांना धार्मिक सवलती मिळू नये ह्याबद्दल असते.

In reply to by श्रीगुरुजी

कॉमी Wed, 06/08/2022 - 19:29
मी चुकत नसल्यास अहिंदूंना दुय्यम दर्जाचे नागरिक बनवण्यात यावे अशी वामनजींची इच्छा आहे. चुभुद्याघ्या.

In reply to by कॉमी

शलभ Wed, 06/08/2022 - 20:02
असहमत. मला अजिबात नाही वाटत असे. एक कायदा RTE संदर्भात असू शकतो. सर्व शाळांना लागू केला जावा. मुघलांशी संबधीत अभ्यासक्रम बदलला जावा. ते अजुन त्यांची लिस्ट देतीलच.

In reply to by कॉमी

वामन देशमुख Wed, 06/08/2022 - 20:02
मी चुकत नसल्यास अहिंदूंना दुय्यम दर्जाचे नागरिक बनवण्यात यावे अशी वामनजींची इच्छा आहे. चुभुद्याघ्या.
नाही हो, असे नाही. आधीच भारतात हिंदू हे दुय्यम दर्जाचे नागरिक आहेत त्यांना किमान समान अधिकार तरी मिळावेत अशी माझी इच्छा आहे. मागे एका चर्चेत मी "हिंदूंनी खरेतर हिंदूंना झुकते माप देणारा असमान नागरी कायदा करावा यासाठी प्रयत्न करावेत" असे म्हटले होते पण ते एका वेगळ्या संदर्भात होते. (हिंदूंनी भारतात हिंदू म्हणून रहावे + अहिंदूंनी हिंदू व्हावे यासाठी काय इन्सेन्टिव्ह आहेत असा तो संदर्भ होता.) प्रस्तुत चर्चा वेगळी आहे.

In reply to by वामन देशमुख

प्रदीप Wed, 06/08/2022 - 22:46
आता येथे ह्या संदर्भांत थोडी चर्चा सुरू आहे, म्हणून जे. साई दीपक ह्या, सर्वोच्च न्यायालयांतील कार्यरत वकिलांचे ह्याबद्दलचे मत येथे ऐकावे. तसेच त्यांनी एका चर्चेच्या दरम्यान ह्याच विषयावरील काही तांत्रिक माहिती (पूर्वपीठिका) विशद केली आहे, तीही ०२:२० पासून ऐकावी.

In reply to by श्रीगुरुजी

वामन देशमुख Wed, 06/08/2022 - 19:57
हिंदूहित किंवा हिंदूंचा फायदा होण्यासाठी कोणते कायदे करावै लागतील?
उदा. १. शिक्षण हक्क कायद्यात हिंदूंवर अन्याय करणाऱ्या तरतुदी रद्द करणे. (साहना यांनी त्याबद्धल मिपावर भरपूर लिहिलंय) २. जातीय हिंसाचार प्रतिबंधक कायदा प्रस्ताव २०११ यामध्ये हिंदूंच्या अस्तित्वावर घाला घालणाऱ्या तरतुदी उलट मार्गे बदलून तो कायदा लागू करणे. https://www.legallyindia.com/views/entry/the-ugly-truth-behind-the-communal-violence-bill-2011-please-forward-it-to-as-many-people-as-you-can ३. पाठ्यपुस्तकांतून चुकीचा इतिहास बदलून हिंदूंचा गौरव होईल असा खरा इतिहास मांडणे. अश्या अनेक बाबी करण्यासारख्या आहेत.

In reply to by वामन देशमुख

श्रीगुरुजी Wed, 06/08/2022 - 20:23
१) याविषयी मला फारशी माहिती नाही. हिंदू आहे म्हणून कोणत्याही शिक्षणसंस्थेत माझ्यावर कधीही अन्याय झालेला नाही. परंतु सवर्ण असल्याने नक्कीच अन्याय झाला आहे. २) हे विधेयक तत्कालीन मनमोहन सिंग सरकारने मागे घेतल्याने त्याचे कायद्यात रूपांतर झाले नाही. https://www.google.com/amp/s/www.ndtv.com/cheat-sheet/after-fierce-debate-anti-communal-violence-bill-is-dropped-heres-why-549881/amp/1 ३) पाठ्यपुस्तकातून मुघलांवरील लेखनाचे प्रमाण कमी करून त्याऐवजी हिंदू राजांच्या सविस्तर इतिहासाचा समवेश २०१७ पासून केला गेला आहे. त्याविरूद्ध निधर्माधांनी खूप आरडाओरडा केला होता. https://www.google.com/amp/s/www.firstpost.com/india/mughals-disappearing-from-textbooks-across-the-country-as-history-seems-subject-to-change-3903053.html/amp https://www.google.com/amp/s/www.indiatoday.in/amp/india/story/chapter-on-mughals-removed-from-maharashtra-textbooks-opposition-attacks-bjp-1028605-2017-08-08

In reply to by वामन देशमुख

वामन देशमुख Fri, 06/24/2022 - 13:04
>>> नुपुर शर्माचे यांचे काय चुकले? भारत सरकारची अशी प्रक्रिया अशी का? नुपुर शर्माचे यांचे काय चुकले हे जाणून घेण्यासाठी - नुपुर शर्मा नेमकं काय बोलल्या? त्यांच्या बोलण्याचा नेमका संदर्भ काय होता? चर्चा नेमकी काय सुरु होती? हे माहित असायला हवे. ते कुठुनही माहित होणार नाही. त्या चर्चेचा विडिओ सर्व ठिकाणांहून हटविण्यात आला आहे. किमान मलातरी सापडला नाही, कुणाला सापडल्यास इथे लिंक द्यावी. शांतिदूतांनी सांगितले की नुपूर शर्मांनी गुन्हा केला आहे मग झाले, तो विडिओ बघण्याची काय गरज आहे? थेट शिक्षा द्यायला हवी नाही का? --- प्रश्न नुपुर शर्माचे यांचे काय चुकले हा नाही, प्रश्न हा आहे की भारत सरकारची अशी प्रक्रिया अशी का? कारण मोदी-प्रणित केंद्र सरकार कणाहीन आहे; हिंदूहितैषी तर नाहीच नाही, भारतीय-नागरिकहितैषी देखील नाही. --- नुपूर शर्मा ह्या दोषी आहेत / निर्दोष आहेत हे, जर हे प्रकरण कोर्टात गेले तर कोर्ट ठरवेल. पण त्याआधी एक भारतीय नागरिक म्हणून / एक हिंदू व्यक्ती म्हणून / एक स्त्री म्हणून / भाजपाच्या प्रवक्त्या म्हणून शर्मांचे संरक्षण करण्यात भाजपने / केंद्र सरकारने कोणतीही पावले उचलली नाहीत. उलट भाजपने लांडग्यांच्या तोंडी शेळीला हवाली केले. आणि भाजपने असं पहिल्यांदाच केलंय असं नाही! --- केवळ सत्ता प्राप्त करून चालत नाही, आपली व्यक्त-अव्यक्त उद्दिष्टे साध्य करण्याची इच्छाशक्ती, धमक असावी लागते. सध्याच्या तथाकथित हिंदूहितवादी सरकारात ती धमक कधीही दिसली नाही.

In reply to by वामन देशमुख

सुबोध खरे Fri, 06/24/2022 - 20:13
आंतरराष्ट्रीय राजकारण हि एक वेगळीच कथा आहे. केवळ एक वक्तव्य केल्याबद्दल नुपूर शर्मा याना पदावरून हटवले तसेच श्री महातीर महम्मद यांनी काश्मीर वर टिप्पणी केल्याबद्दल भारताशी संबंध खराब झाले https://economictimes.indiatimes.com/news/politics-and-nation/mahathir-mohamad-admits-malaysias-ties-with-india-strained-due-to-his-kashmir-remarks/articleshow/77417205.cms यानंतर भारताने मलेशियाच्या पाम तेलावर निर्बंध घातले आणि त्यामुळे मलेशियाचे अतोनात आर्थिक नुकसान झाले आणि त्यामुळे होणाऱ्या घडामोडीनंतर श्री महातीर याना पदावरून हटवले गेले. https://www.reuters.com/article/us-india-malaysia-palmoil-exclusive-idUSKBN1ZC0T6 भारताने सध्या गरम असलेल्या तेलाच्या किमतीत अजून आग लागू नये म्हणून नुपूर शर्मा याना पदावरून हटवले आणि मध्यपूर्वेतील लोकांशी संबंध सध्या तरी बिघडणार नाहीत याची काळजी घेतली. यासाठी श्री मोदींना भाजप विरोधीच नव्हे तर समर्थकांकडून हि शिव्या खाव्या लागल्या. पण अशा गोष्टी आंतरराष्ट्रीय राजकारणात घडतच असतात

In reply to by वामन देशमुख

वामन देशमुख Wed, 06/29/2022 - 20:43
राजस्थानात नुपूर शर्मांचे समर्थन केले म्हणून कन्हैय्यालालची हत्या पुन्हा एका काफिराला, त्याने कुफ्र करण्याची शिक्षा मिळाली. अर्थात, सध्या केंद्र सरकारच्या / भाजपच्या धोरणानुसार हे चालायचेच. नुपूर शर्मांची पाठराखण करू न शकणाऱ्या मोदी-शहा, भाजप, संघ यांच्याकडून दुसरी काय अपेक्षा करणार? --- बंगालातल्या निवडुणकोत्तर हिंसाचारात मारले गेलेले, जखमी झालेले भाजप कार्यकर्ते (सामान्य नागरिक सोडा, ते तर खिजगणतीतही नाहीत) अजूनही न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत. त्यातल्या अनेकांनी बंगाल राज्य सोडून इतरत्र स्थायिक झालेले आहेत. त्यांचे संरक्षण करू न शकणाऱ्या मोदी-शहा, भाजप, संघ यांच्याकडून दुसरी काय अपेक्षा करणार? --- दिल्लीत २०२०च्या दंगलीत मारले गेलेले, जखमी झालेले हिंदू लोक अजूनही न्यायाच्या प्रतीक्षेतच आहेत. त्यांचे संरक्षण करू न शकणाऱ्या मोदी-शहा, भाजप, संघ यांच्याकडून दुसरी काय अपेक्षा करणार? --- रच्याक, नुपूर शर्मांच्या वक्तव्याची विडिओ लिंक कुणाला सापडली का? अर्थात, इतरांचे सोडा, भाजपलाही शर्मांची पाठराखण करायची नाहीय, मग त्यांच्या निर्दोषत्वाचे पुरावे सांभाळून ठेऊन तरी काय करायचे आहे म्हणा? --- केवळ सत्ता प्राप्त करून चालत नाही, आपली व्यक्त-अव्यक्त उद्दिष्टे साध्य करण्याची इच्छाशक्ती, धमक असावी लागते. सध्याच्या तथाकथित हिंदूहितवादी सरकारात ती धमक कधीही दिसली नाही.

In reply to by वामन देशमुख

रच्याक, नुपूर शर्मांच्या वक्तव्याची विडिओ लिंक कुणाला सापडली का? कालपर्यंत ह्या धाग्यावरचीच लिंक एक्टीव होती. तुम्हा पाहीली नाही का क्लिप? युट्युब ला सर्च करून खोदकाम करा. सापडेल.

sunil kachure Wed, 06/08/2022 - 13:59
भावना भडकावून हिंदू हीत साधता येणार नाही. म्हणून मी bjp विरोधी मत देतो. खुप पुढचे प्लॅन असावे लागतात. सहणा किंवा बाकी जे एक्साईट होवून बोलत आहेत ते खऱ्या परिस्थिती शी विपरीत भावनेच्या आहारी जावून बोलत आहेत. त्याला काडी ची किंमत नाही सर्व मुस्लिम देश विरोधी गेले तर भारत मोठ्या आर्थिक संकटात सापडेल. सरकार मूर्ख नाही . फक्त भारत हाच हिंदू चा देश आहे.हिंदू चे शत्रू फक्त मुस्लिम नाहीत . जाती धर्म,भाषा,पुरोगामी हे सर्व शत्रू आहेतं Bjp ची कुवत असेल तर ते भारताला हिंदू राष्ट्र बनवू शकतात. पण त्या साठी नियोजन हवे फालतू भावनिक जोश नको. 1)प्रतेक हिंदू आर्थिक बाबतीत सक्षम असावा कायदेशीर आणि बे कायदेशीर सर्व मार्ग वापरून. २) प्रशासन मध्ये बदल करून फक्त हिंदू हीत ,आणि हिंदू प्रेम असणारेच लोक योग्य ठिकाणी हवीत. कायदे बदला तुम्हाला बहुसंख्य हिंदू सत्तेवर बसवतील. ४) आखाती देश ना कोंडीत पकडायची एक संधी सोडू नका. तालिबान लं पाठिंबा देवून अमेरिका नी तेच केले. मुस्लिम लोकांनाच आखाती देशात हिंसाचार करण्यास पूर्ण सहकार्य करणे.. प्लॅन नसेल तर फक्त तोंडाची हवा bjp नी घालवू नये. पोकळ बडबडीला कुत्रा पण विचारत नाही.

sunil kachure Wed, 06/08/2022 - 14:22
अलेक्झांडर,ब्रिटिश,जर्मनी . मुस्लिम लोकांना जग जिंकणे जमले नाही. खुप कमी भू भाग मुस्लिम लोकांकडे आहे. कारण .. फक्त भावनिक जोश योजना नाहीत,नियोजन नाही. भारत ब्रिटिश लोकांनी ताब्यात घेतला जोशात येवून नाही भारत हिंदू राष्ट्र व्हावे असे वाटत असेल तर योजना हव्यात,संयम हवा ,आणि नियोजन तर हवेच .नुपूर वर फालतू बडबड करून काही फायदा नाहीं

sunil kachure Wed, 06/08/2022 - 14:49
हे भारतीय राज्य भारतासाठी डोके दुखी आहे बांगलादेश,पाकिस्तान ,इंडोनेशिया हे देश सोडले तर जगातील कोणत्या ही मुस्लिम देश पेक्षा उत्तर प्रदेश मध्ये जास्त मुस्लिम आहे..देशासाठी सर्व बाबतीत डोके दुखी.

sunil kachure Wed, 06/08/2022 - 15:11
नुपूर चुकीची बोलाली की बरोबर ह्याला काही अर्थ नाही. भारत सरकार तिच्या बोलण्यावर कडक react होण्यास सक्षम आहे का? हा प्रश्न आहे.. भारतात सत्ता मिळवणे हा हेतू मनी ठेवून . कोणी हिंदू हीत वादी असतो,कोणी मुस्लिम हीत वादी,कोणी दलित हीत वादी. पण ही सर्व नाटक असतात . ज्यांचे प्रतिनिधित्व आपण करतो त्यांचे हीत कोणी जपत नाही. अक्कल शून्य नेते आणि अक्कल शून्य जनता हे समीकरण भारतात यशस्वी होते.

sunil kachure Wed, 06/08/2022 - 15:11
नुपूर चुकीची बोलाली की बरोबर ह्याला काही अर्थ नाही. भारत सरकार तिच्या बोलण्यावर कडक react होण्यास सक्षम आहे का? हा प्रश्न आहे.. भारतात सत्ता मिळवणे हा हेतू मनी ठेवून . कोणी हिंदू हीत वादी असतो,कोणी मुस्लिम हीत वादी,कोणी दलित हीत वादी. पण ही सर्व नाटक असतात . ज्यांचे प्रतिनिधित्व आपण करतो त्यांचे हीत कोणी जपत नाही. अक्कल शून्य नेते आणि अक्कल शून्य जनता हे समीकरण भारतात यशस्वी होते.

sunil kachure Wed, 06/08/2022 - 15:15
नुपूर चुकीची बोलाली की बरोबर ह्याला काही अर्थ नाही. भारत सरकार तिच्या बोलण्यावर कडक react होण्यास सक्षम आहे का? हा प्रश्न आहे.. भारतात सत्ता मिळवणे हा हेतू मनी ठेवून . कोणी हिंदू हीत वादी असतो,कोणी मुस्लिम हीत वादी,कोणी दलित हीत वादी. पण ही सर्व नाटक असतात . ज्यांचे प्रतिनिधित्व आपण करतो त्यांचे हीत कोणी जपत नाही. अक्कल शून्य नेते आणि अक्कल शून्य जनता हे समीकरण भारतात यशस्वी होते.

तर्कवादी Wed, 06/08/2022 - 18:06
नुपूर शर्मा चुकीचं बोलल्यात असं दिसत नाहीच. पण बोलण्याची पद्धत काहीशी चुकली असं म्हणता येईल एखाद्या धर्मग्रथांत काही गोष्टी अशास्त्रीय असतील तरी धर्मग्रंथ लिहिले गेलेत तो काळ, संदर्भ , त्याकाळी त्या व्यक्तीपर्यंत पोहोचलेले ज्ञान ई गोष्टी विचारात घ्याव्या लागतात. पुढे काही गोष्टी शास्त्रीय कसोट्यांवर चुक असल्याचे दिसून येते. अनेक धर्माच्या ग्रंथात वा समाजोपयोगी आणि आदरणीय मानलेल्या ग्रंथांत अशा चुका असू शकतात. माझ्या आठवणीप्रमाणे , आयुर्वेदातही काही अशास्त्रीय गोष्टी आहेत (कृपया संदर्भ मागू नये , आता नेमके आठवत नाही ) पण त्यामुळे आयुर्वेदाचे महत्व कमी होत नाही किंवा त्यामुळे आयुर्वेदाची खिल्ली उडवणे समर्थनीय ठरणार नाही. तसेच धर्मग्रंथात लिहिलंय म्हणून "पृथ्वी सपाट आहे" असं मानणारे फारसे कुणी असतील असं मला वाटत नाही. सर्वच समाजात शास्त्रीय ज्ञानाचा स्वीकार वाढलाय , वाढतोय. धर्मग्रंथांतील काही उपयुक्त , काळाच्या कसोटीवर टिकणार्‍या गोष्टी त्या फक्त घेवून बाकी ग्रंथ हळूहळू बासनात बांधून ठेवायला हवे. या सगळ्याला थोडा वेळ लागेल. याकरिता अधिकाधिक विज्ञानवादी नेते पुढे यायला हवेत... "आता वेळ आली आहे, धर्मग्रंथ बाजूला ठेवायची" असा हळुवार शब्दात पण ठामपणे संदेश सामान्य जनतेला देवू शकतील असे नेते हवे आहेत. पण सध्या याबाबत प्रगती होताना दिसत नाही, उलटपक्षी आतापर्यंत नास्तिक म्हणून ओळख असलेल्या नेत्याबाबतही आता ते नास्तिक नव्हेतच असा दावा त्यांच्या निकटवर्तीयांकडून केला जात आहे. जणू काही नास्तिक असणे म्हणजे पाप आहे !! असो. "काय तुमचे ते धर्मग्रंथ ? काय फालतु अशास्त्रीय लिहिलेय त्यात ?" अशा प्रकारचा सूर लावणे उचित नाही. नुपूर शर्मा यांचा सूर काहीसा तसा वाटला. असे मुद्दे वेगळ्या प्रकारे हाताळले गेले पाहिजेत. मी त्या कार्यक्रमाची संपुर्ण चित्रफित पाहिलेली नाही. . टीव्ही चॅनेलवरच्या चर्चा मी फारशा बघत नाही, किंबहून वृत्त वाहिन्याच फारशा बघत नाही. पण तरी जेव्हा कधी अशा चर्चा पाहिल्यात तेव्हा दिसून आले की या चर्चांमध्ये (खरंतर यांना चर्चा का म्हणायचं हा प्रश्न आहे) औपचारिक चर्चा वा वादविवादातले सभ्यतेचे किमान नियमही पाळले जात नाहीत. एक व्यक्ती बोलत असताना तिचे बोलणे तोडत दुसरी व्यक्ती बोलते आपलेच बोलणे ऐकले जावे म्हणून लोक मोठ्यामोठ्याने ओरडून बोलतात. अँकरलाही बहुधा हेच हवे असते. [ प्रत्येकाला बोलायला काही मिनिटे दिलीत , एक जण बोलत असताना दुसरे लोक शांतपणे ऐकतायत, कुणी कुणाचे बोलणे तोडत नाही , आरडाओरडा न करता अभ्यासपुर्ण मुदे मांडले जात आहेत - अशा सभ्य वातावरणातल्या चर्चा कोणत्या वाहिनीवर चालत असतील का ? असल्यास कृपया तपशील द्यावा. ] बाकी गोरक्षकांकडून झालेल्या हत्या वगैरेवर शांत असलेले इस्लामिक देश एका वृत्तवाहिनीवरील टुकार चर्चेतील दोन चार वाक्यांनी अचानक जागे झालेत आणि एकमुखाने निषेध वगैरे व्यक्त करु लागलेत हे अनाकलनीय आहे. दाल मे कुछ काला है !!

In reply to by तर्कवादी

श्रीगुरुजी Wed, 06/08/2022 - 18:21
बाकी गोरक्षकांकडून झालेल्या हत्या वगैरेवर शांत असलेले इस्लामिक देश एका वृत्तवाहिनीवरील टुकार चर्चेतील दोन चार वाक्यांनी अचानक जागे झालेत आणि एकमुखाने निषेध वगैरे व्यक्त करु लागलेत हे अनाकलनीय आहे. दाल मे कुछ काला है !! त्या चर्चेत नूपुर शर्मा जे बोलल्या त्याचा कांगावा राहुलसहीत अनेक निधर्माधांनी अगदी आंतरराष्ट्रीय मंचावर सुद्धा केल्याने ते इस्लामिक देशांपर्यंत पोहोचलं. अन्यथा भारतातील एका वाहिनीवरील चर्चेतील दोनचार वाक्यांकडे भारतात सुद्धा कोणी लक्ष देत नाही.

In reply to by तर्कवादी

Trump Wed, 06/08/2022 - 23:27
श्री तर्कवादी,
एखाद्या धर्मग्रथांत काही गोष्टी अशास्त्रीय असतील तरी धर्मग्रंथ लिहिले गेलेत तो काळ, संदर्भ , त्याकाळी त्या व्यक्तीपर्यंत पोहोचलेले ज्ञान ई गोष्टी विचारात घ्याव्या लागतात. पुढे काही गोष्टी शास्त्रीय कसोट्यांवर चुक असल्याचे दिसून येते.
१. एकाद्या धर्मग्रंथात (उदा. इस्लाम, इसाई) यांच्यात लिहीले सगळे बरोबर. ते सगळे इतर कोणत्याही कायद्यापेक्षा वरती. २. ते देवाने पाठवलेला हा शेवटता हा शेवटचा प्रेषित आहे. तो (प्रेषित) नेहमीचे बरोबर असतो, काहीच चुका करत नाही. ३. आणि फक्त आमचाच देव आणि प्रेषित बरोबर बाकीचे चुकीचे. अश्या जर असेल तर तुम्ही त्यांना कसे काही गोष्टी सोडण्यास किंवा सुधारण्यास सांगाल?

In reply to by Trump

तर्कवादी गुरुवार, 06/09/2022 - 11:35
ट्रम्पजी
अश्या जर असेल तर तुम्ही त्यांना कसे काही गोष्टी सोडण्यास किंवा सुधारण्यास सांगाल?
तुम्ही म्हणताय तसं काही लोक मानत असतील तरी घटना व कायदा सर्वश्रेष्ठ आहे. घटनेनुसारच राज्यकारभार चालतो व कायद्याप्रमाणेच न्याय केला जातो. बाकी पृथ्वी गोल आहे की सपाट , देव आहे की नाही , पुनर्जन्म आहे की नाही, स्वर्ग -नरक संकल्पना या आणि तत्सम अनेक बाबतीत एखाद्याची वैयक्तिक मते काहीही असली तरी त्याने कायद्याने चालणार्‍या राज्यात फरक पडत नाही. पण हे खरे की आपले जीवनमान उंचावण्याकरिता, स्वतःची व कुटुंबाची सर्वांगीण प्रगती करण्याकरिता या भ्रामक कल्पनांपासून दूर जाणे योग्य. एखाद्या समाजातील सगळेच लोक शास्त्रीय दृष्टीकोन बाळगून असतात किंवा एखाद्या समाजातील सगळेच लोक अशास्त्रीय दृष्टीकोन बाळगतात असे नाही. आधुनिक ज्ञानाचा स्वीकार सर्वच समाजात कमी अधिक प्रमाणात झालेला आहे व होत आहे आणि होत राहिल. नाहीतर पृथ्वी सपाट आहे असं मानणार्‍या समाजातून डॉ कलाम सारखे रॉकेट शास्त्रज्ञ निर्माण झाले नसते विज्ञानवादी नेते, शिक्षक यांनी सक्रीय पुढाकार घेतल्यास धर्मातील कालबाह्य कल्पनांपासून दूर जाण्याच्या प्रक्रियेला बळ व वेग मिळेल.

In reply to by तर्कवादी

Trump गुरुवार, 06/09/2022 - 11:40
तुम्ही म्हणताय तसं काही लोक मानत असतील तरी घटना व कायदा सर्वश्रेष्ठ आहे. घटनेनुसारच राज्यकारभार चालतो व कायद्याप्रमाणेच न्याय केला जातो.
हे तुमचे मत झाले, त्यांचे नाही. त्यांना बदलावयाचे आहे, तुम्हाला नाही.

In reply to by Trump

तर्कवादी गुरुवार, 06/09/2022 - 11:50
हे तुमचे मत झाले, त्यांचे नाही
त्यांचे कुणाचे ? देशाचा कारभार कसा चालतो ? घटनेनुसार वा कायद्यानुसार राज्यकारभार चालत नाही असे तुम्हाला म्हणायचे आहे का ?

कॉमी Wed, 06/08/2022 - 19:45
#IStandWithNupurSharma असे किंवा तत्सम काहीतरी लिहिल्याबद्दल जम्मू काश्मीरमध्ये पोलिसांनी तीन भाजपेयींवर गुन्हा दाखल केला ! आता हे मात्र बेण्डिंग ओव्हर वाटतेय. देशाने अधिकृतपणे प्रवक्त्यांचे विधान दूर करणे वेगळे आणि सोशल मीडियावर पोस्ट केली म्हणून धरणे वेगळे.

sunil kachure Wed, 06/08/2022 - 20:16
समान नागरी कायद्याला विरोध करण्याचे मुस्लिम लोकांस काही कारण नाही.मुस्लिम लोकांपेक्षा पुरोगामी जास्त विरोध करतात. समान नागरी कायदा झाले की . सर्व धर्मीय एकच कायद्याच्या कक्षेत येतील ही पोट दुखी आहे. 1)घटस्फोट चे नियम सर्वांस सारखे. २) किती बायका करू शकतो हा नियम सर्वांस सारखा. ३) वारसा हक्क हा नियम सर्वास सारखा. ४)पोडगी चा नियम सर्वास सारखा. आणि सर्वात महत्वाचे. लग्न केल्यानंतर पण बायको नवऱ्यावर बलात्कार ची केस करू शकते हे पुरोगामी लोकांचे फॅड बंद होईल. हिंदू ची कुटुंब व्यवस्था नष्ट करून हिंदू च्या मुळावर च घाव घालणारे कायदे करा असे हट्ट धरणारे पुरोगामी शांत होतील. समान नागरी कायद्या मुळे काही फायदा आणि काही तोटा पण होईल . पण स्वतः काही तरी वेगळे आहोत ही धारणा नष्ट होईल.

कॉमी Wed, 06/08/2022 - 20:22
पुरोगामी समान नागरी कायद्याला विरोध करतात ? कोण आहेत हे पुरोगामी, काही उदाहरणे आहेत का ? मी तर जो बघेल तो समान नागरी कायद्याला समर्थनच देतोय असे अनुभवतो आहे. मिसळपाववर तुम्ही स.ना.का. ला का समर्थन करत नाही असा चॅलेंज कम प्रश्न ज्या ज्या वेळी झाला आहे त्या त्या वेळी पुरोगाम्यांनी समर्थन करतो असेच उत्तर दिले आहे. उदाहरणार्थ- मी, आग्या आणि गणेशा ह्यांनी तरी समर्थन केल्याचे मला आठवते आहे.

sunil kachure Wed, 06/08/2022 - 20:39
भारतातील एका ही मुस्लिम नेत्याने जाहीर पने आखाती देश ना घडसावले नाही. की. आमच्या देशात तुम्ही हस्तक्षेप करू नका ,आमचे प्रश्न आम्ही सोडवू. हे स्वतःला पाहिले मुस्लिम आणि नंतर भारतीय मानत असतील तर. तर भारतात त्यांना दुय्यम नागरिक म्हणूनच कायद्याने मान्यता देण्यात काही चुकीचे नाही.

sunil kachure Wed, 06/08/2022 - 21:26
मुस्लिम कसे ही असले तरी हिंदू देव देवता वर अभद्र टिपनी ते करत नाहीत. अपवाद असतील. ते स्वतः आस्तिक असल्या मुळे हिंदू च्या धार्मिक भावना दुखावतील असे वक्तव्य ते करत नाहीत. हिंदू धर्मावर ,त्यांच्या देव देवतावर अभद्र टीपणी दुसराच वर्ग करत असतो. त्यांच्याकडे लक्ष द्यावे इतके ते प्रबळ नसल्या मुळे कोणी लक्ष पण देत नाही. हा भाग वेगळा.

मदनबाण Wed, 06/08/2022 - 21:32
मोदी सरकारच्या या एका घोडचूकीमुळे हिंदू जनमानसात प्रचंड क्रोध \ उद्वेग निर्माण झाला आहे. नुपुर शर्माने जर इस्लाम मधील ग्रथांचा /पुस्तकांचा इइइ. संदर्भ देऊन वक्तव्य केले असेल आणि भगवान भोलेनाथांच्या टिंगल टवाळीला प्रतिउत्तर देताना तीने व्यक्तव्य केले तर तिला देशा समोर आणि जगासमोर चूक का ठरवले गेले ? हा प्रश्न लोकांना सातत्याने पडला आहे. सोशल मिडियावर भाजपाची चांगली खिल्ली उडवली जात आहे,लोक राग व्यक्त करत आहेत. जाता जाता :- हिंदू स्त्रीस जिहादी लांडग्यां समोर टाकुन दिल्या बद्धल भाजपाचे अभिनंदन ! तुम्ही जगाला दाखुवुन दिले की समोराच्या ने वाक म्हंटले तर आम्ही लोटागण तर घालतो पण आमच्या स्त्रियांचा सन्मान देखील स्वाहा करु शकतो.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- “It takes a great deal of courage to stand up to your enemies, but even more to stand up to your friends.” – J. K. Rowling

In reply to by मदनबाण

Trump Wed, 06/08/2022 - 23:33
हिंदू स्त्रीस जिहादी लांडग्यां समोर टाकुन दिल्या बद्धल भाजपाचे अभिनंदन !
तिने जोहार करण्याची धमकी द्यायला हवी. मोदी / भाजपची पळता भुई थोडी होईल.

सुक्या Wed, 06/08/2022 - 22:20
https://www.lokmat.com/national/bhim-army-announces-rs-1-crore-reward-for-nupur-sharmas-tongue-cutter-a594/ ह्या प्रकरणात आता कुणीही हात धुवुन घेत आहे. मुस्लिम लांगुलचालन आता जवळ्पास सारे करत आहेत. अचानक? ही भीम आर्मी आता बक्षिस देणार आहे. गंम्मत म्हणजे ह्या भीम अर्मी चे ब्रीद वाक्य आहे "भारत एकता मिशन" काय एकता दाखवताय बघा ...

मदनबाण गुरुवार, 06/09/2022 - 12:43
तिने जोहार करण्याची धमकी द्यायला हवी. अशी वेळ कोणत्याच हिंदू किंवा इतर स्त्रियांवर येऊ नये. मोदी / भाजपची पळता भुई थोडी होईल. तिच्यावर जर प्राण घातक हल्ला झाला तर मात्र लोक भाजपा ला सोडणार नाहीत. जाता जाता :- कराचीवुड मधला नसीरुद्दीन नावाचा विषारी आणि महा नॉटी साप परत बाहेर येऊन फुत्कार टाकु लागला आहे, या सापाने मागे मुघल आक्रमक अत्याचारी नव्हे, राष्ट्रनिर्माते होते अशी इस्लामी गरळ ओकली होती. याकुब मेमनच्या फाशी विरुद्ध दया याचिकेवर या सापाने सही केली होती. हा देशद्रोही साप लव्ह जिहाद बद्धल, हिंदू देवतांच्या टिंगल करण्या बद्धल मात्र चकार शब्द काढणार नाही. ही भीम आर्मी आता बक्षिस देणार आहे. गंम्मत म्हणजे ह्या भीम अर्मी चे ब्रीद वाक्य आहे "भारत एकता मिशन" काय एकता दाखवताय बघा सन्माननिय बाबासाहेब यांचे नाव घेऊन हिंदू द्रोह करण्याचा प्रकार बर्‍याच काळा पासुन चालु आहे, जय भीम जय मीम घोषणा वगरै देखील दिल्या जातात. बरेच तथाकथित नेते स्वतःचे उपद्रव मुल्य दाखवण्यासाठी देखील बाबा साहेबांचे नाव घेऊन त्यांनाच बदनाम करत आले आहेत. आता बाबा साहेबांनीच काय लिहले आहे ते इथे देतो :- P1 P2

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- जेव्हा सूर्य काजव्यांची मन धरणी करू लागतो तेव्हा सौरमंडल सुद्धा त्याच्या बाजूने उभे असत नाही. :- विनायक दामोदर सावरकर

sunil kachure गुरुवार, 06/09/2022 - 13:16
राजकीय पक्षांना कोणाची पर्वा नाही हे सत्य आहे .हिंदू नी पूर्ण विश्वास ठेवून bjp ल पाठिंबा दिला तर तेच बहुसंख्य हिंदू ना कमजोर करतील . मुस्लिम लोकांचे तारणहार पण त्याच लायकीचे आहेत फक्त मत हवी आहेत. भीम आर्मी नी काय दीवा लावला आहे दलितांची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी. सर स्वतःच्या स्वार्थासाठी कार्यरत आहेत. हिंदू ची नवीन संघटना स्थापन केली पाहिजे. अराजकीय . आणि खोगीर भरती नको . बाळासाहेब ठाकरे,प्रमोद महाजन आणि असे अनेक नेते आता हवे होते ज्यांच्यावर विश्वास ठेवता आला असता. मोदी,शाह हिंदू चे हीत रखतील ह्या विषयी संशय आहे.. वांझोटी चर्चा आहे . हिंदू ना नेता च नाही.

sunil kachure गुरुवार, 06/09/2022 - 14:00
१) कट्टर मुस्लिम पासून हिंदू वाचतील. २)हिंदू ना आर्थिक सशक्त bjp करेल ,सत्तेत सहभागी करेल. ३)पुरोगामी ना कायदेशीर कारवाई करून कमजोर करेल. तर जे काही घडणार नाही. हिंदू नेहमी मुस्लिम आणि पुरोगामी ह्यांच्या दबावात राहतील अशीच व्यवस्था ते करतील. हिंदू च्या मुळावर घाव घालणारा . Atrocity सारखा कायदा न्यायालयाने रद्द केला होता . हा कोर्टाचा निर्णय bjp नीच फिरवला. ह्या एका उदाहरण वरून ह्यांची नियत फक्त सत्ता मिळवणे हीच आहे. नुपूर चे कडक पने समर्थन bjp नी केले नाही. हे दुसरे उदाहरण समोर आहे.. बाळासाहेब ठाकरे मध्येच ही धमक होती. मोदी आणि शाह मध्ये नाही. योगी तर पिल्लू आहे .फक्त प्रचार.

दिगोचि Mon, 06/13/2022 - 11:48
ईश निंदा अक्षम्य करणारा कायदा मोदी सरकारने भारतात आणावा. हे आजच्या परिस्थितीत योग्यच ठरेल. कारण अनेक अहिन्दु आणि हिन्दुसुद्धा हिन्दुविशयी आणि त्यान्च्या धर्माविशयी अचकट विचकट विधाने करत आहेत त्यान त्यामुळे जरब बसेल.

In reply to by दिगोचि

ईश निंदा अक्षम्य करणारा कायदा मोदी सरकारने भारतात आणावा.
पण इथे ईश्वर नाही तर ईश्वराच्या प्रेषिताविषयी बोलले गेले आहे. आणि जे काही बोलले गेले आहे ते पण त्यांच्याच ग्रंथामध्ये केलेल्या उल्लेखाला धरून आहे. आणि तरीही इतके आकांडतांडव होत असेल तर त्याला औषध काय? शुक्रवारी जो प्रकार झाला त्यानंतर योगींनी बुलडोझर वापरले तशाप्रकारेच जरब बसविणे हाच एक उपाय. दुसरे काय?

sunil kachure Mon, 06/13/2022 - 13:43
नुपूर शर्मा असेल किंवा बाकी बिनडोक पुरोगामी.एकच लायकीचे आहेत. धर्म,संस्कृती,मानवाचा इतिहास,धर्माचा इतिहास हा खूप मोठा विषय आहे. आलतू फालतू लोकांनी त्या विषयात न बोलणेच उत्तम. कागदी डिग्री आणि सरकारी स्टॅम्प पडला की कोणी ज्ञानी होत नाही हे शिक्षित अडाणी च असतात. जी लोक पूर्ण आयुष्य माणसाचा इतिहास,धर्माचा इतिहास,संस्कृती च इतिहास हे समजून घेण्यासाठी वेचातात. तेव्हा त्यांना काहीच टक्के सत्य माहीत पडते. खुप गहन आहे विषय. पुरोगामी डिग्री वाले, आणि अडाणी ,अविचारी,बिलकुल बुध्दी नसणारे, बेवडे जेव्हा महान हिंदू धर्मावर फालतू प्रश्न करून त्यांच्या फालतू बुध्दी चे दर्शन घडवतात . तेव्हा अशा लोकांना भर चौकात नागडे करून मारावे अशी इच्छा होते त्या साठी ईश निंदा कायदा हवा आणि त्या मध्ये ही तरतूद हवी. हिंदू मध्ये जे असे अती शहाणे आहेत त्यांना मी जे पुरोगामी चे वर्णन केले आहे तेच लागू होते. नुपूर शर्मा त्या मधील एक त्यांना पण त्याच कायद्याखाली शिक्षा हवी. ज्या महान लोकांनी पूर्ण आयुष्य धर्म आणि संस्कृती हे समजून घेण्यासाठी वेचले आहे. ते एक तर उथळ बोलत नाहीत. त्या लोकांच्या मताला ग्राह्य समजण्यात काही कमी पना नाही.

डँबिस००७ गुरुवार, 06/30/2022 - 10:57
उदयपुर मध्ये कन्हय्या नावाच्या एका टेलरची इस्लामीक प्रकाराची नूशंस हत्त्या केली गेली. ह्या सर्व प्रकरणाची सुरुवात झाली , फेसबुकवर नुपुर शर्माला सपोर्ट दिल्याबद्दल. कन्हय्याला दोन मुल आहेत. एक २१ तर दुसरा १५-१६ वर्षांचा. त्यातल्या मोठ्या मुलाने आपल्या कुटूंबातील एकुलत्या एक स्मार्ट फोन वरुन फेसबुक वर पोस्ट टाकली. कन्हयाला स्मार्ट फोन चालता येत नाही. त्याचा काही संबंध नव्हता. कन्हय्याच्या शेजारी रहाणार्या एका मुसलमान माणसाने कन्हय्याला धमकावायला सुरु केले. पोलिसात तक्रार केली. पोलिसांनी तत्परता दाखवत कन्हय्याला अटक करुन आत टाकल. कन्हय्याच्या कुटुंबाने कन्हय्याला बेल देऊन बाहेर काढल. त्याच वेळेला कन्हय्याच्या शेजार्याने आपल्या समाजात , मस्जिदीत जाऊन ह्या बद्दल लोकांना सांगीतले. कन्हय्याला धमक्या मिळु लागल्या. धमक्या मिळाल्यामुळे कन्हय्याने पोलिसांत तक्रार केली. ह्या वेळेला पोलिसांनी मात्र कन्हय्यालाच समजावल की तुला काही होत नाही. देखाव्यासाठी दोन समाजा तील लोकांना समोर बसवुन समेट घडवुन आणण्याचा देखावा केला. मुसलमान समाजाने समेट मान्य करुनही , मस्जिदीतील लोकांनी ह्याला आपले परम कर्तव्य समजून एका निरपराध माणसाचा वध केला. महम्मद रियाझ व महम्मद गौस हे त्या दोन हत्यार्यांची नावे आहेत. हे दोघेही उदयपुरचेच आहेत. त्यातला एक मशिदीत काम करतो. तर दुसरा पण अशीच बाहेरची कामे करतो. दोघेही अतिरेकी नाहीत. त्यांचा पाकिस्तानशी, कराचीशी काहीही संबंध नाही सर्वात धक्कादायक गोष्ट ही आहे की, ह्या दोघांना ह्या हत्येचा खेद वाटत नाही उलट तो एक पराक्रमच आहे असे वाटते, म्हणुनच त्यांनी ह्या सर्व प्रकरणावर धारदार चाकुसारख्या हत्यारांसकट व्हीडीयो बनवुन नेटवर टाकला. पोलिसांनी हे अतिरेक्याच काम आहे, त्यांची पाकिस्तानशी संबंध आहे असे खोटेच सांगुन वेळ मारुन नेलेली आहे. पोलिसांच्या निष्काळ्जीपणामुळेच ही हत्या झालेली आहे. अतिरेकी, पाकिस्तान असे संबंध दाखवले की हत्या करणारे दुसरेच कोणी होते, ते ईथले नव्हतेच असा संदेश जातो त्यामुळे भाबडी जनता सुद्धा शांत होते. पण असे होणे हिंदु समाजासाठी धोकादायक आहे. ह्या उदाहरणावरुन एक धडा मिळतो की, कोणाही हिंदुंकडुन महम्मद पैगंबरचा अपमान करण्याची शिक्षा द्यायला पाकिस्तानातुन कोणी यायची गरज नाही. भारतातल्या मुसलमान समाजात बरेच व्हॉलेंटीयर बसलेले आहेत जे अशी हत्या कोणतेही गिल्ट शिवाय करु शकतात. १० -२० वर्षांपासुन आपल्या शेजारी रहाणारे शांतीदुत वेळ आलीतर आपली नूशंस हत्त्या लिलया करु शकतात अश्या पोलिसांना राजस्तानच्या काँग्रेस सरकारने बढती दिलेली आहे अस ईथेच मिपावर कोणीतरी सांगीतल आहे. एका हिंदुची हत्या होऊ दिल्याबद्दल पोलिसांना बक्षिस दिली असावी.

In reply to by डँबिस००७

वामन देशमुख गुरुवार, 06/30/2022 - 11:06
महम्मद रियाझ व महम्मद गौस हे त्या दोन हत्यार्यांची नावे आहेत. हे दोघेही उदयपुरचेच आहेत. त्यातला एक मशिदीत काम करतो. तर दुसरा पण अशीच बाहेरची कामे करतो. दोघेही अतिरेकी नाहीत. त्यांचा पाकिस्तानशी, कराचीशी काहीही संबंध नाही सर्वात धक्कादायक गोष्ट ही आहे की, ह्या दोघांना ह्या हत्येचा खेद वाटत नाही उलट तो एक पराक्रमच आहे असे वाटते, म्हणुनच त्यांनी ह्या सर्व प्रकरणावर धारदार चाकुसारख्या हत्यारांसकट व्हीडीयो बनवुन नेटवर टाकला. पोलिसांनी हे अतिरेक्याच काम आहे, त्यांची पाकिस्तानशी संबंध आहे असे खोटेच सांगुन वेळ मारुन नेलेली आहे. पोलिसांच्या निष्काळ्जीपणामुळेच ही हत्या झालेली आहे. अतिरेकी, पाकिस्तान असे संबंध दाखवले की हत्या करणारे दुसरेच कोणी होते, ते ईथले नव्हतेच असा संदेश जातो त्यामुळे भाबडी जनता सुद्धा शांत होते. पण असे होणे हिंदु समाजासाठी धोकादायक आहे. ह्या उदाहरणावरुन एक धडा मिळतो की, कोणाही हिंदुंकडुन महम्मद पैगंबरचा अपमान करण्याची शिक्षा द्यायला पाकिस्तानातुन कोणी यायची गरज नाही. भारतातल्या मुसलमान समाजात बरेच व्हॉलेंटीयर बसलेले आहेत जे अशी हत्या कोणतेही गिल्ट शिवाय करु शकतात. १० -२० वर्षांपासुन आपल्या शेजारी रहाणारे शांतीदुत वेळ आलीतर आपली नूशंस हत्त्या लिलया करु शकतात
अगदी बरोबर.

In reply to by डँबिस००७

अमरेंद्र बाहुबली गुरुवार, 06/30/2022 - 11:30
अश्या पोलिसांना राजस्तानच्या काँग्रेस सरकारने बढती दिलेली आहे अस ईथेच मिपावर कोणीतरी सांगीतल आहे. एका हिंदुची हत्या होऊ दिल्याबद्दल पोलिसांना बक्षिस दिली असावी.
मीच. जिवावर खेळून त्या पोलिसांनी हत्यार्यांना पकडले म्हणून त्यांना बढती दिलीय.

In reply to by डँबिस००७

वामन देशमुख गुरुवार, 06/30/2022 - 16:50
लढाई भारत-पाकिस्तान, अतिरेकी-सामान्य नागरिक अशी नाहीच. लढाई इस्लाम-काफिरियत अशी आहे.

In reply to by डँबिस००७

वामन देशमुख Fri, 07/01/2022 - 10:44
कन्हैय्यालालपासून सुरुवात झालीय (पहिल्यांदाच झाली असे नव्हे!) , पाहूया अजून किती काफिर मोदींच्या राज्यात बळी पडतात! https://hindupost.in/bharatiya-bhasha/hindi/not-only-kanhaiya-lal-but-umesh-kolhe-and-vikky-are-also-victim-of-jihad/ --- दिवसाढवळ्या जिहादी येतात, एका काफ़िराची हालहाल करून हत्या करतात, जाहीरपणे विडिओ पोस्ट करतात, पुढचा काफिर शोधतात. शासनाचा दरारा, भीती, वचक अजिबात नाही. कारण मोदी-प्रणित केंद्र सरकार कणाहीन आहे; भारतीय नागरिकांचे ते रक्षण करू शकत नाही. --- अवांतरः मरतुकड्या सौभाग्यापेक्षा ढळढळीत वैधव्य बरे अशी हिंदूंची मनोधारणा होत चालली आहे आणि २०२४ च्या निवडणुकीत ती प्रतिबिंबित होणार आहे.

In reply to by डँबिस००७

वामन देशमुख Fri, 07/01/2022 - 10:44
कन्हैय्यालालपासून सुरुवात झालीय (पहिल्यांदाच झाली असे नव्हे!) , पाहूया अजून किती काफिर मोदींच्या राज्यात बळी पडतात! https://hindupost.in/bharatiya-bhasha/hindi/not-only-kanhaiya-lal-but-umesh-kolhe-and-vikky-are-also-victim-of-jihad/ --- दिवसाढवळ्या जिहादी येतात, एका काफ़िराची हालहाल करून हत्या करतात, जाहीरपणे विडिओ पोस्ट करतात, पुढचा काफिर शोधतात. शासनाचा दरारा, भीती, वचक अजिबात नाही. कारण मोदी-प्रणित केंद्र सरकार कणाहीन आहे; भारतीय नागरिकांचे ते रक्षण करू शकत नाही. --- अवांतरः मरतुकड्या सौभाग्यापेक्षा ढळढळीत वैधव्य बरे अशी हिंदूंची मनोधारणा होत चालली आहे आणि २०२४ च्या निवडणुकीत ती प्रतिबिंबित होणार आहे.

In reply to by वामन देशमुख

डँबिस००७ Fri, 07/01/2022 - 12:24
हिंदुंची अशी दशा ह्याच शतकात झालेली नसुन ती गेले अनेक शतके चालुच आहे. हिंदुंची अशी दशा कोणत्या कारणामुळे झालेली आहे ह्याच्या मुळात कोणीही गेलेल नाही. १. हिंदु समाज हा अनेक गटात विखुरला गेलेला समाज आहे. त्या विरुद्द शांतीदुत संघटीत व घेट्टो करुन रहातात. २. गेल्या शतकात बुद्धी वाद्यांनी ( कम्युनिस्टांनी) हिंदु समाजाला अहिंसावादी ठरवलेल आहे ज्यांच्या देव तर सोडाच, देवता सुद्दा हत्यारबंद आहेत. स्वःता हिंदु सुद्धा शस्त्र चालवायची कला विसरुन गेलेला आहे. त्या मुळे तो जास्तच हतबल दिसतो. ३. या ऊलट शांतीप्रिय समाजातील लोक दर वर्षी कुर्बानी देऊन आपली चाकु चालवायची सवय, रक्त पाहायची सवय चालुच ठेवलेली आहे. ४. खुले आम हिंदु देवी देवतांचा अपमान शांती प्रिय समाजातील लोक करणार पण प्रेषिताचा अपमानाची सजा "सर तन से जुदा" ! ५. हिंदु समाजाने सर्व अपमानासाठी न्यायालयाचे दरवाजे वाजवायचे पण हे लोक आपल्या अपमानाचा बदला दुसर्या गुन्ह्याने घेणार. ६. शांतीदुता करवी केलेल्या हत्येचा जाहिर निषेध कोणताच मुस्लिम लिडत कधीच करत नाही त्यामुळे त्याम्च्या दृष्टीने हे बरोबरच आहे.

डँबिस००७ गुरुवार, 06/30/2022 - 16:03
जिवावर खेळून त्या पोलिसांनी हत्यार्यांना पकडले म्हणून त्यांना बढती दिलीय. जिवावर खेळुन हत्यार्यांना पकडले ? रिअली ?? पोलिसांनी एका काल्पनीक तथाकथित मु पैगंबराची अवमानना झालेली आहे अश्या मुसलमानांच्या तक्रारीवर लगेच एक्शन करत कन्हय्याला तुरुंगात टाकल, पण जेंव्हा जिवंत कन्हय्याने आपल्या जिवाला ह्या मुसलमानांपासुन धोका आहे अस पोलिस स्टेशन मध्ये येऊन सांगीतल आणि संरक्षण मागितल तेंव्हा त्याला उपदेश देऊन त्याच लांडग्यासमोर टाकल. पोलिसांनी कन्हय्याला सांगीतल होत की ५ - ६ दिवस आपल टेलरींगच दुकान बंद ठेव. बिचार्याने ठेवल सुद्धा पण आपल कर्तव्य विसरले तर ते धर्मांद कसले ? कन्हय्याच्या शेजार्याने कन्हय्याचा पत्ता फेसबुक वरुन सार्वजनिक केला . हत्या करुन मारेकर्यांनी व्हीडीयो बनवुन नेटवर टाकला. त्यांना कश्याचीच भिती नाही. अश्यांना पकडण्यासाठी पोलिसांना बढती दिली म्हणजे राजस्तान पोलिसांनी मोठीच मर्दुमकी दाखवत एका हिंदुला मरु दिल व त्याच्याच मारकर्यांना पकडल व सरकार कडुन बढती सुद्धा मिळवली. काँग्रेसच्या सरकारात हिंदुच्या जिवाची किंम्मत किती हे वेळीच ओळखा !!