निषेध व भावनिक स्फोट
लेखनप्रकार
चित्रपट हे मुळात मनोरंजनाचे साधन आहे. परंतु काही मोजक्या चित्रपटांतून आपले शिक्षणही होऊ शकते. काही चित्रपटात एखाद्या विशिष्ट मध्यवर्ती कल्पनेभोवती काही प्रसंग छान गुंफलेले असतात. त्यातून आपल्याला त्या विषयाची जाणीव होते. पुढे त्याचे कुतूहल वाटू शकते आणि त्यासंबंधी अधिक वाचण्याची प्रेरणाही मिळू शकते. अशा प्रकारे मी घेतलेल्या एका अनुभवावर एक लेख यापूर्वी इथे लिहिलेला आहे : पैशांवर डल्ला आणि स्टॉकहोम सिंड्रोम !
नुकताच असा दुसरा अनुभव मला आला. तो विशद करण्यासाठी हा लेख.
एकदा प्राईम व्हिडिओवर ‘आज काय पहावे’ म्हणून शोध घेत होतो. तिथे उपलब्ध असलेल्या बहुतेक इंग्लीश व भारतीय भाषांमधील मला आवडतील असे चित्रपट पाहून झालेले होते. त्यामुळे बराच वेळ धुंडाळून काही उपयुक्त असे गवसत नव्हते. अचानक एका स्पॅनिश चित्रपटावर नजर खिळली. त्याचे नाव इंग्लिशमध्ये ‘Wild Tales’ असे लिहिलेले होते. त्यातला वाइल्ड शब्द मनापासून आवडला नसला तरी त्याबद्दल कुतूहल वाटले. मग चित्रपटाचा सारांश वाचल्यावर लक्षात आले की त्यात सहा लघुकथा एकत्र केलेल्या आहेत. अलीकडे मला हा प्रकार सलग चित्रपटाऐवजी आवडू लागला आहे. अशा चित्रपटातील 1-2 कथा पाहिल्यावर पुढे पाहायचा की नाही याचा निर्णय सहज घेता येतो.
अखेर तो चित्रपट पाहू लागलो. पहिल्याच कथेने पकड घेतली. मग दोन टप्प्यात मिळून सर्व चित्रपट पाहिला. नंतर त्याचा काही भाग पुन्हा पाहिला. मानसशास्त्रात ‘भावनांचे विरेचन (निचरा)’ अशी एक संकल्पना आहे. त्यावर आधारित या सहा कथा आहेत. अर्थात त्यातील पात्रांचे विरेचन स्फोटक प्रकारे झालेले असल्याने चित्रपट ‘वाईल्ड’ ठरतो.
आधी चित्रपटाचा सारांश लिहितो आणि मग विरेचन या संकल्पनेकडे वळतो. चित्रपट 2014 चा असल्याने त्याबद्दल लिहिताना रहस्यभेद क्षम्य मानतो.
.....
.....
चित्रपटातील सर्व कथा ‘माणूस विरुद्ध समाजयंत्रणा’ या सूत्राभोवती गुंफल्यात. जगात सत्ता व संपत्तीचे मूठभर लोकांकडे केंद्रीकरण झालेले आहे. सामान्य माणूस कायमच भिऊन व दडपून जगत असतो. मग कुठल्यातरी अन्यायाच्या किंवा क्षोभाच्या प्रसंगी असा माणूस ही सर्व लादलेली सामाजिक बंधने झुगारुन आपल्या आतल्या पशुत्वासह व्यक्त होतो. या भावनिक स्फोटातून त्याला तात्पुरते का होईना पण ‘मुक्ती’चे सुख मिळते. ही चित्रपटाची मध्यवर्ती कल्पना. यातील काही कथा सत्य घटनेवर आधारित आहेत.
Pasternak ही याच नावाच्या तरुणाची कथा आहे. त्याला आयुष्यात अगदी बालपणापासून ते तारुण्यापर्यंत अनेकांनी त्रास दिलेला होता. खुद्द त्याच्या आईवडिलांनी त्याला सतत अपेक्षांच्या ओझ्याखाली दडपून ठेवले होते. कथेतील प्रसंगात जे विमान चाललंय त्याचा तो वैमानिक आहे. त्या उड्डाणात प्रवाशांमध्ये त्याला त्रास दिलेल्या बऱ्याच व्यक्तींचा समावेश आहे. किंबहुना त्या सर्वांवर सूड उगवण्यासाठीच त्याने या योगायोगाच्या मोहिमेची जुळणी केली आहे. तो केबिनचे दार आतून लावून घेतो आणि त्याच्या रागाच्या परमोच्च क्षणी ते विमान खुद्द त्याच्या स्वतःच्याच घरावर आदळवतो.
दुसऱ्या कथेत एका दुष्ट सावकाराचा एका पीडित स्त्रीने त्याच्या पूर्वीच्या दुष्कृत्यांबद्दल सूड घेतलेला दाखवला आहे. इथे पीडित स्त्रीच्या मनात आधी खूप चलबिचल होते पण तिची मदतनीस तिचे मतपरिवर्तन करून तिला भरीस पाडते. शेवटी इच्छित कार्य पार पडते. इथे सूडाची भावना तीव्र झालेल्या दोन्ही स्त्रिया श्रमजीवी वर्गातील आहेत.
पुढच्या कथेत रस्त्याने कार चालवणाऱ्या दोन पुरुषांच्या मनोवृत्तीचे दर्शन घडते. मागील चालकाला पुढच्याने आपल्या पुढे जाऊ न दिल्यामुळे भांडण होते. पुढे त्याचे मारामारीत पर्यवसान होते. त्या दोघांपैकी एकाचे गलिच्छ व ओंगळवाणे कृत्य यादरम्यान दाखवले जाते. अखेरीस या मारामारीत दोघांचा अंत होतो. गलिच्छ कृत्य करणारा माणूस दबलेला व पीडित आहे. अशा प्रसंगात त्याच्यातील पशुत्व बाहेर आलेले प्रभावीपणे दाखवले आहे.
अन्य एका कथेत एका शहरातील नको इतका सक्रीय वाहतूक नियंत्रण कक्ष आणि त्याचा वाहनचालकांवर होत असलेला अन्याय हा विषय हाताळला आहे. रस्त्यावर योग्य ठिकाणी लावलेली एक कार सुद्धा त्या कक्षाकडून जप्त केली जाते. त्यावर दाद मागायला गेलेल्या वाहनचालकास न्याय देणे तर दूरच, उलट अरेरावीची उत्तरे मिळतात. असे जेव्हा त्याच्या बाबतीत पुन्हा घडते तेव्हा मात्र तो पेटून उठतो. त्याच्यातील सूडभावना जागृत झाल्याने तो कर संकलन कार्यालयच स्फोटाने उडवून देतो. सरकारी यंत्रणेकडून नागरिकांना पिडण्याचा अनुभव भारतात तर बर्याचदा येतो. किरकोळ गोष्टींवरून पांढरपेशांना सतावणारे वाहतूक पोलीस, टग्या व मस्तवाल मंडळींच्या बाबतीत मात्र सर्रास कानाडोळा करताना दिसतात हे आपण पाहतोच (यासंबंधीची एक प्रातिनिधिक बातमी नंतरच्या विश्लेषणात दाखवतो).
अखेरची कथा सर्वात लांब असून त्यात विवाहपूर्व लैंगिक संबंध हा विषय आक्रस्ताळेपणाने हाताळला आहे. भर लग्नाच्या मंडपात नवरीला लक्षात येते की आपल्या नवऱ्याचे तिथे मांडवात असलेल्याच एका अन्य स्त्री बरोबर संबंध होते. तिने त्याला तसे विचारताच तो कबुली देतो. त्याचा सूड म्हणून ही नवरी आक्रस्ताळेपणा करत तिथल्या गच्चीवर जाते आणि चक्क तिथे एका नोकराशी उघडपणे संभोग करते. अखेर दिलजमाई होऊन मूळ जोडप्याचे लग्न पार पडते. पण तिने त्याच्यावर सूड घेण्याचा हा प्रकार अतिशयोक्त व बटबटीत वाटला.
हा चित्रपट तिकीटबारीवर जोरदार राहिला आणि त्याला काही आंतरराष्ट्रीय पुरस्कारही मिळालेले आहेत.
अशा प्रकारे या चित्रपटातील प्रत्येक कथेमध्ये त्यातील मुख्य पात्राचा क्षोभ होऊन भावनिक स्फोट झालेला दिसतो. अशा प्रकारच्या विविध घटना कमी-अधिक प्रमाणात आपल्या अवतीभवती सुद्धा घडताना दिसतात. एखाद्या व्यक्तीच्या अशा वागण्यामागे जे मानसशास्त्र आहे त्याचा आता आढावा घेतो.
भावनिक विरेचन
या संकल्पनेचा मानसशास्त्रात खूप अभ्यास झालेला आहे. सामान्य माणूस दैनंदिन जीवनात कामाचे ताणतणाव, काळजी, भीती आणि दडपण यासारख्या गोष्टीनी पिडलेला असतो. त्यातून त्याच्या सुप्त मनात अनेक विचारांचे द्वंद्व चालू असते. समाजात आजूबाजूला घडणाऱ्या अनेक अप्रिय गोष्टींचा त्याला प्रचंड राग येत असतो. त्यातून सतत चिडचिडेपणा आणि कधीकधी नैराश्यही आलेले असते. अशाच एखाद्या प्रसंगी त्याच्या संयमाचा बांध फुटतो आणि तो लोकांमध्ये स्फोटक प्रकारे व्यक्त होतो. या कृतीतून त्याच्या दीर्घकाळ दबलेल्या भावना मोकळ्या होतात. हा झाला या व्यक्त होण्याचा त्याला झालेला क्षणिक फायदा. नंतर जेव्हा असा माणूस आपल्या त्या कृतीचे आत्मपरीक्षण करतो त्यातून त्याला आणीबाणीच्या प्रसंगात वागण्याचा एक नवा दृष्टिकोनही मिळू शकतो.
कारणमीमांसा
ही स्पष्ट करण्यासाठी उदाहरणार्थ वरील चित्रपटातील वाहतूक कार्यालय उडवून द्यायची घटना आपल्या संदर्भात पाहू. साधारणपणे वाहतूक पोलिसांचे सामान्य पांढरपेशा/पापभीरू लोकांशी कसे अरेरावीचे वर्तन असते ते आपण जाणतो. याउलट, वाहतुकीचे अनेक नियम डावलून चाललेल्या बेफाम वाहनचालकांकडे पोलीस बरेचदा कानाडोळा करतात. बऱ्याच गाड्या अशा असतात की त्यांची क्रमांकाची पाटी नियमाविरुद्ध मराठीत रंगवलेली असते. त्यावरील क्रमांक मुद्दाम लहान आकारात व अस्पष्ट असतात. नियमानुसार पाटीवर गरज नसलेल्या अवांतर गोष्टी मात्र ठळक असतात. जसे की, अमुक-तमुकचा आशीर्वाद असे लिहीलेले आणि वर शेजारी फडकत्या झेंड्याचे चित्र. अशा मंडळींना वाहतूक पोलिसांनी कधी मान धरून पकडल्याचे दिसते का ? अगदी क्वचित.
नमुन्यादाखल ही बातमी पहा :
कोविडकाळात एखाद्या दुचाकीचालकाची नाकावरील मुखपट्टी थोडी जरी खाली सरकली असेल तरी पोलिस त्याला अगदी बकऱ्यासारखे पकडत होते (वास्तविक सिग्नलला गाडी थांबल्यावर संपूर्ण नाकावर पट्टी असेल तर चष्म्याच्या आतील बाजूस धुके साठू लागते आणि दृष्टीला अडथळा होतो. त्यासाठी ती थोडी खाली सारणे आवश्यक असते). पण याच काळात बरीच टगी मंडळी विनाहेल्मेट दुचाकी चालवत होती. त्यांना मात्र पोलिसांनी चक्क माफ केलेले दिसले ! अशा प्रकारच्या पक्षपाती वागण्यातून सामान्य नागरिकांचा सात्विक संताप होत राहतो. पोलिसांना जर नियमांची कठोर अंमलबजावणी करायचीच असेल तर मग ती सर्वांसाठी समान का नाही ? अशा द्वंद्वातूनच मग एखाद्या वेळेस एखाद्याची सटकते अन तो सरळ पोलिसाचीच तिथल्या तिथे धुलाई करतो. हेच ते विरेचन.
अन्य एक स्वानुभव सांगतो. ३० वर्षांपूर्वी माझ्या पहिल्यावहिल्या घरासाठी एका सरकारी संस्थेचे कर्ज घेतले होते. घराची नोंदणी करताना मला फक्त नोंदणी पावती दिलेली होती; मूळ दस्त अजून तयार व्हायचा होता. सदर कर्जसंस्थेने ती मूळ पावती मागितली. मी त्यांना ती दिली. त्यांच्या आवक वहीत त्याची व्यवस्थित नोंद झालेली पाहिली. आता मी त्यांच्या मंजुरीची वाट पाहत होतो. दरम्यान त्यांनी मला एकदा भेटायला बोलावले आणि माझ्यासमोर कागदपत्रांची धारिका चाळून मला सांगितले की तुमची सरकारी नोंदणीची पावतीच यात नाही. मी त्यांना सांगितले की ती तर मी केव्हाच दिली आहे. त्यावर त्या माणसाने खांदे उडवून बेफिकीरी दाखवली. मग मी त्याला म्हटलं, तुम्ही नीट शोधा. बरीच शोधाशोध झाली. त्याने पुन्हा एकदा आवक नोंदवही पाहिली. त्यात माझ्या पावतीची नोंद होती. तरी तो माणूस उडवाउडवीची उत्तरे देत होता. या प्रकारात दोन तास गेले. नंतर तो म्हणाला, अवघड आहे पावती नाही सापडली तर कर्ज कसे देणार ?
आता माझी सटकली. आवाज चढवून म्हटलं, “तुमच्या वहीत नोंद आहे आणि जर पावती सापडत नसेल तर त्याचा अर्थ उघड आहे. ती तुम्ही हरवली आहे”. तरी तो काही सौजन्याने बोलेचना. मग शेवटी मी म्हणालो, “आज तुमच्या इथे ती पावती सापडेपर्यंत तुम्ही आणि मी दोघेही हे कार्यालय सोडायचे नाही. बघू कसे जाताय पाच वाजता निघून !“ हा जो माझ्यात संचार झाला तो माझ्या कल्पनेपलीकडचा होता. त्याचा परिणाम मात्र झालेला दिसला. पुढच्या अर्ध्या तासात अनेक जण शोधकार्याला लागले आणि ती पावती मिळाली. मलाही हुश्श झाले ! माझ्या घराची मालकी प्रस्थापित करणारा तो एकमेव महत्त्वाचा पुरावा होता. अशा वेळेस मी जर गुळमुळीत राहिलो असतो तर या असल्या हलगर्जी लोकांनी माझ्या डोक्यावर मिरे वाटले असते.
असे एक ना अनेक अनुभव आपल्यातील अनेकांना येत असतात. जर का त्यातून अन्यायाची पातळी वाढत गेली तर मग एका बिंदूवर तो विरेचनाचा क्षण येतो. श्रमजीवी वर्गाचे बारकाईने निरीक्षण केले असता काही गोष्टी जाणवतात. एकंदरीतच ही माणसे समाजव्यवस्थेपुढे दबलेली असतात. त्यातून त्यांच्या मनात राग खदखदत असतो. त्यांची कामेसुद्धा काहीशी रटाळ स्वरूपाची असतात. मग ती करता करता येता-जाता थुंकणे, शिव्या देणे हे जे काही होत असते ते एक प्रकारे विरेचनच असते.
विरेचनाचे प्रकार
वरील विवेचनात भडक वा स्फोटक पद्धतीने झालेल्या प्रकारांचा उल्लेख आहे. मात्र निव्वळ याच प्रकारे विरेचन होते असा गैरसमज होऊ नये. शांततेने विरेचन होण्याचे देखील काही मार्ग आहेत. त्यांचा आता आढावा घेऊ.
काही लोकांमध्ये, कितीही ताणतणावाचा किंवा अन्यायाचा प्रसंग आला तरी त्याप्रसंगी मानसिक समतोल ठेवून राग काबूत ठेवण्याची प्रवृत्ती असते. अशा लोकांना आपल्या भावना मोकळ्या करण्यासाठी खालील मार्गांचा अवलंब करता येईल :
१. आपल्या जवळच्या व्यक्तीशी आपल्याला होत असलेल्या त्रासासंबंधी अगदी मनमोकळेपणाने, कुठलाही आडपडदा न ठेवता बोलणे.
२. आवडते संगीत तल्लीन होऊन ऐकणे. शक्य असल्यास त्याच्या तालावर आपणच मोठ्याने गाणे म्हणणे. यावरून आपल्याला लहानपणापासून सांगितलेली एक युक्ती आठवते. एखाद्या गोष्टीचा प्रचंड राग आला असताना आपल्या हातून कुठलीही आततायी कृती होऊन नये, म्हणून मोठ्याने सरळ एक ते दहा अंक म्हणावेत आणि वेळ पुढे न्यावा.
३. जोरकस व्यायाम करणे. अशा वेळी चेव येऊन (आणि वाटल्यास मनात १-२ शिव्या हासडून) काही प्रकारचे व्यायाम करणे हे उपयुक्त.
४. लेखन : वरती बोलून मोकळे होण्याचा मुद्दा आला आहे. ज्या लोकांना लेखनाची थोडीफार सवय आहे अशांनी तणावाच्या प्रसंगी लेखनाचा मार्ग जरुर चोखाळावा. ज्या प्रसंगाने आपल्याला त्रास होत आहे त्याला अनुरूप असे काही लेखन केले तरी भावना मोकळ्या होतात. विख्यात इंग्लिश लेखक सॉमरसेट मॉम यांनी या मुद्द्यावर एक सुंदर परिच्छेद लिहिलेला आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, अनेक वर्ष मनात साचून राहिलेल्या व खदखदणाऱ्या भावना त्यांनी लेखनाद्वारे मोकळ्या केल्यात.
असा एक माझा अनुभव सांगतो (यापूर्वी अन्य धाग्यावर लिहिला असू शकेल). माझ्या नात्यातील एका जवळच्या व्यक्तीला एका नातेवाईकाच्या वागण्यामुळे बराच मानसिक त्रास झाला होता. या व्यक्तीवर एक दुःखद प्रसंग गुदरला होता. त्या प्रसंगात संबंधित नातेवाईकाने त्यांच्या भेटीत त्याचा साधा उल्लेख करणे सुद्धा टाळले होते. वास्तविक त्या दोघांचे नाते बऱ्यापैकी जवळचे होते. त्या नातेवाईकाच्या अशा वागण्याने ही व्यक्ती खूप दुखावली गेली होती. तीन चार दिवस तिचे कामावरून लक्ष उडाले होते. मग मी यावर एक उपाय केला. त्या व्यक्तीला सांगितले की तुला जे काही दुःख त्या प्रसंगातून होत आहे ते तू मोकळेपणाने लिहून काढ. तिला तशी लेखनाची सवय नव्हती. तरीसुद्धा तिने काही लिहून मला दाखवले. मग मी त्यात थोडे फार बदल केले. त्या दरम्यान एका दैनिकात “मोकळे व्हा” या प्रकारचे सदर चालू होते. तिथे अनेक जण आपापल्या दुःखासंबंधी स्वानुभव लिहित. या व्यक्तीचा अशा प्रकारचा लेख तयार झाल्यावर मी तिला तो दैनिकाकडे पाठवायला सांगितले. योगायोगाने तो लेख प्रसिद्ध झाला. तो वाचल्याचे तिला काही जणांनी कळवले. या सगळ्या प्रकारातून तिला एक मानसिक समाधान मिळाले. विरेचनाचा हा अगदी विधायक प्रकार म्हणता येईल.
विरेचन आणि समाजविघातकता
जोपर्यंत एखाद्याचे विरेचन वर लिहिल्याप्रमाणे शांततामय मार्गांनी होत आहे तोपर्यंत इतरांना त्याचा त्रास नाही. परंतु स्फोटक प्रकारे झालेल्या विरेचनातून कित्येकदा संबंधित व्यक्ती समाजविघातक कृत्ये करून बसते (जसे की, या चित्रपटातील कार्यालय जाळण्याची घटना).
ज्या माणसांच्या बाबतीत विरेचन वारंवार स्फोटक पद्धतीने होऊ लागते ती माणसे अर्थातच समाजासाठी त्रासदायक ठरतात. अशा माणसांचा मानसशास्त्रीयदृष्ट्या अभ्यास केला असता काही माहिती मिळते. अशा लोकांची दोन गटांमध्ये वर्गवारी करता येईल :
१.समाजकंटक आणि
२. मनोविकारग्रस्त
त्यांच्यातील काही फरक लक्षणीय आहेत.
समाजकंटकाच्या बाबतीत त्याची सदसद्विवेकबुद्धी जागृत असते परंतु ती दुबळी झालेली असते. असा माणूस क्षोभाच्या प्रसंगी एखादे घातक कृत्य करून बसतो खरा, परंतु लवकरच त्याला त्याचा पश्चात्ताप होऊ शकतो. थोडक्यात, हा माणूस गरम डोक्याचा असतो. क्षणिक उद्रेकानंतर ते डोके व्यवस्थित शांत होते.
मनोविकारग्रस्त ही मात्र अधिक वाईट अवस्था आहे. ही माणसे सदसद्विवेकबुद्धी गमावून बसलेली असतात. त्यांच्या हातून एखादे घातक कृत्य घडले तर त्याचा त्यांना पश्चात्ताप होत नाही. उलट, आपण केले ते योग्यच केले अशी त्यांची धारणा असते. एरवी समाजात घडणाऱ्या किंवा दृश्य माध्यमांमधून दाखवल्या जाणाऱ्या हिंसक घटना पाहून अशा व्यक्तींना सुप्त आनंद होत असतो.
अखेर मनुष्य हाही एक प्राणीच आहे. निसर्गानुसार त्याच्यात सुद्धा पशुत्वभावना आहे. परंतु विविध सामाजिक बंधनांमुळे ती दाबलेली असते. किंबहुना माणसाचे सुसंस्कृत आणि असंस्कृत वर्तन यांच्या दरम्यानची सीमारेषा काहीशी धूसर असते. जेव्हा एखाद्या प्रसंगामुळे एखाद्याचा भावनिक स्फोट होतो तेव्हा ती सीमारेषा ओलांडली जाते. त्यातून वेळप्रसंगी माणूस समाजविघातक कृत्य करून बसतो. या सूत्रावर आधारित भावनिक विरेचन ही मानसशास्त्रीय संकल्पना आहे. तिच्याभोवती गुंफलेला हा चित्रपट पाहून मला हा लेख लिहिण्याची प्रेरणा मिळाली. वाचकांना तो रोचक वाटेल अशी आशा आहे.
.................................................................................
चित्र सौजन्य :
१.आंतरजाल
२. दैनिक सकाळ
कोविडकाळात एखाद्या दुचाकीचालकाची नाकावरील मुखपट्टी थोडी जरी खाली सरकली असेल तरी पोलिस त्याला अगदी बकऱ्यासारखे पकडत होते (वास्तविक सिग्नलला गाडी थांबल्यावर संपूर्ण नाकावर पट्टी असेल तर चष्म्याच्या आतील बाजूस धुके साठू लागते आणि दृष्टीला अडथळा होतो. त्यासाठी ती थोडी खाली सारणे आवश्यक असते). पण याच काळात बरीच टगी मंडळी विनाहेल्मेट दुचाकी चालवत होती. त्यांना मात्र पोलिसांनी चक्क माफ केलेले दिसले ! अशा प्रकारच्या पक्षपाती वागण्यातून सामान्य नागरिकांचा सात्विक संताप होत राहतो. पोलिसांना जर नियमांची कठोर अंमलबजावणी करायचीच असेल तर मग ती सर्वांसाठी समान का नाही ? अशा द्वंद्वातूनच मग एखाद्या वेळेस एखाद्याची सटकते अन तो सरळ पोलिसाचीच तिथल्या तिथे धुलाई करतो. हेच ते विरेचन.
अन्य एक स्वानुभव सांगतो. ३० वर्षांपूर्वी माझ्या पहिल्यावहिल्या घरासाठी एका सरकारी संस्थेचे कर्ज घेतले होते. घराची नोंदणी करताना मला फक्त नोंदणी पावती दिलेली होती; मूळ दस्त अजून तयार व्हायचा होता. सदर कर्जसंस्थेने ती मूळ पावती मागितली. मी त्यांना ती दिली. त्यांच्या आवक वहीत त्याची व्यवस्थित नोंद झालेली पाहिली. आता मी त्यांच्या मंजुरीची वाट पाहत होतो. दरम्यान त्यांनी मला एकदा भेटायला बोलावले आणि माझ्यासमोर कागदपत्रांची धारिका चाळून मला सांगितले की तुमची सरकारी नोंदणीची पावतीच यात नाही. मी त्यांना सांगितले की ती तर मी केव्हाच दिली आहे. त्यावर त्या माणसाने खांदे उडवून बेफिकीरी दाखवली. मग मी त्याला म्हटलं, तुम्ही नीट शोधा. बरीच शोधाशोध झाली. त्याने पुन्हा एकदा आवक नोंदवही पाहिली. त्यात माझ्या पावतीची नोंद होती. तरी तो माणूस उडवाउडवीची उत्तरे देत होता. या प्रकारात दोन तास गेले. नंतर तो म्हणाला, अवघड आहे पावती नाही सापडली तर कर्ज कसे देणार ?
आता माझी सटकली. आवाज चढवून म्हटलं, “तुमच्या वहीत नोंद आहे आणि जर पावती सापडत नसेल तर त्याचा अर्थ उघड आहे. ती तुम्ही हरवली आहे”. तरी तो काही सौजन्याने बोलेचना. मग शेवटी मी म्हणालो, “आज तुमच्या इथे ती पावती सापडेपर्यंत तुम्ही आणि मी दोघेही हे कार्यालय सोडायचे नाही. बघू कसे जाताय पाच वाजता निघून !“ हा जो माझ्यात संचार झाला तो माझ्या कल्पनेपलीकडचा होता. त्याचा परिणाम मात्र झालेला दिसला. पुढच्या अर्ध्या तासात अनेक जण शोधकार्याला लागले आणि ती पावती मिळाली. मलाही हुश्श झाले ! माझ्या घराची मालकी प्रस्थापित करणारा तो एकमेव महत्त्वाचा पुरावा होता. अशा वेळेस मी जर गुळमुळीत राहिलो असतो तर या असल्या हलगर्जी लोकांनी माझ्या डोक्यावर मिरे वाटले असते.
असे एक ना अनेक अनुभव आपल्यातील अनेकांना येत असतात. जर का त्यातून अन्यायाची पातळी वाढत गेली तर मग एका बिंदूवर तो विरेचनाचा क्षण येतो. श्रमजीवी वर्गाचे बारकाईने निरीक्षण केले असता काही गोष्टी जाणवतात. एकंदरीतच ही माणसे समाजव्यवस्थेपुढे दबलेली असतात. त्यातून त्यांच्या मनात राग खदखदत असतो. त्यांची कामेसुद्धा काहीशी रटाळ स्वरूपाची असतात. मग ती करता करता येता-जाता थुंकणे, शिव्या देणे हे जे काही होत असते ते एक प्रकारे विरेचनच असते.
विरेचनाचे प्रकार
वरील विवेचनात भडक वा स्फोटक पद्धतीने झालेल्या प्रकारांचा उल्लेख आहे. मात्र निव्वळ याच प्रकारे विरेचन होते असा गैरसमज होऊ नये. शांततेने विरेचन होण्याचे देखील काही मार्ग आहेत. त्यांचा आता आढावा घेऊ.
काही लोकांमध्ये, कितीही ताणतणावाचा किंवा अन्यायाचा प्रसंग आला तरी त्याप्रसंगी मानसिक समतोल ठेवून राग काबूत ठेवण्याची प्रवृत्ती असते. अशा लोकांना आपल्या भावना मोकळ्या करण्यासाठी खालील मार्गांचा अवलंब करता येईल :
१. आपल्या जवळच्या व्यक्तीशी आपल्याला होत असलेल्या त्रासासंबंधी अगदी मनमोकळेपणाने, कुठलाही आडपडदा न ठेवता बोलणे.
२. आवडते संगीत तल्लीन होऊन ऐकणे. शक्य असल्यास त्याच्या तालावर आपणच मोठ्याने गाणे म्हणणे. यावरून आपल्याला लहानपणापासून सांगितलेली एक युक्ती आठवते. एखाद्या गोष्टीचा प्रचंड राग आला असताना आपल्या हातून कुठलीही आततायी कृती होऊन नये, म्हणून मोठ्याने सरळ एक ते दहा अंक म्हणावेत आणि वेळ पुढे न्यावा.
३. जोरकस व्यायाम करणे. अशा वेळी चेव येऊन (आणि वाटल्यास मनात १-२ शिव्या हासडून) काही प्रकारचे व्यायाम करणे हे उपयुक्त.
४. लेखन : वरती बोलून मोकळे होण्याचा मुद्दा आला आहे. ज्या लोकांना लेखनाची थोडीफार सवय आहे अशांनी तणावाच्या प्रसंगी लेखनाचा मार्ग जरुर चोखाळावा. ज्या प्रसंगाने आपल्याला त्रास होत आहे त्याला अनुरूप असे काही लेखन केले तरी भावना मोकळ्या होतात. विख्यात इंग्लिश लेखक सॉमरसेट मॉम यांनी या मुद्द्यावर एक सुंदर परिच्छेद लिहिलेला आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, अनेक वर्ष मनात साचून राहिलेल्या व खदखदणाऱ्या भावना त्यांनी लेखनाद्वारे मोकळ्या केल्यात.
असा एक माझा अनुभव सांगतो (यापूर्वी अन्य धाग्यावर लिहिला असू शकेल). माझ्या नात्यातील एका जवळच्या व्यक्तीला एका नातेवाईकाच्या वागण्यामुळे बराच मानसिक त्रास झाला होता. या व्यक्तीवर एक दुःखद प्रसंग गुदरला होता. त्या प्रसंगात संबंधित नातेवाईकाने त्यांच्या भेटीत त्याचा साधा उल्लेख करणे सुद्धा टाळले होते. वास्तविक त्या दोघांचे नाते बऱ्यापैकी जवळचे होते. त्या नातेवाईकाच्या अशा वागण्याने ही व्यक्ती खूप दुखावली गेली होती. तीन चार दिवस तिचे कामावरून लक्ष उडाले होते. मग मी यावर एक उपाय केला. त्या व्यक्तीला सांगितले की तुला जे काही दुःख त्या प्रसंगातून होत आहे ते तू मोकळेपणाने लिहून काढ. तिला तशी लेखनाची सवय नव्हती. तरीसुद्धा तिने काही लिहून मला दाखवले. मग मी त्यात थोडे फार बदल केले. त्या दरम्यान एका दैनिकात “मोकळे व्हा” या प्रकारचे सदर चालू होते. तिथे अनेक जण आपापल्या दुःखासंबंधी स्वानुभव लिहित. या व्यक्तीचा अशा प्रकारचा लेख तयार झाल्यावर मी तिला तो दैनिकाकडे पाठवायला सांगितले. योगायोगाने तो लेख प्रसिद्ध झाला. तो वाचल्याचे तिला काही जणांनी कळवले. या सगळ्या प्रकारातून तिला एक मानसिक समाधान मिळाले. विरेचनाचा हा अगदी विधायक प्रकार म्हणता येईल.
विरेचन आणि समाजविघातकता
जोपर्यंत एखाद्याचे विरेचन वर लिहिल्याप्रमाणे शांततामय मार्गांनी होत आहे तोपर्यंत इतरांना त्याचा त्रास नाही. परंतु स्फोटक प्रकारे झालेल्या विरेचनातून कित्येकदा संबंधित व्यक्ती समाजविघातक कृत्ये करून बसते (जसे की, या चित्रपटातील कार्यालय जाळण्याची घटना).
ज्या माणसांच्या बाबतीत विरेचन वारंवार स्फोटक पद्धतीने होऊ लागते ती माणसे अर्थातच समाजासाठी त्रासदायक ठरतात. अशा माणसांचा मानसशास्त्रीयदृष्ट्या अभ्यास केला असता काही माहिती मिळते. अशा लोकांची दोन गटांमध्ये वर्गवारी करता येईल :
१.समाजकंटक आणि
२. मनोविकारग्रस्त
त्यांच्यातील काही फरक लक्षणीय आहेत.
समाजकंटकाच्या बाबतीत त्याची सदसद्विवेकबुद्धी जागृत असते परंतु ती दुबळी झालेली असते. असा माणूस क्षोभाच्या प्रसंगी एखादे घातक कृत्य करून बसतो खरा, परंतु लवकरच त्याला त्याचा पश्चात्ताप होऊ शकतो. थोडक्यात, हा माणूस गरम डोक्याचा असतो. क्षणिक उद्रेकानंतर ते डोके व्यवस्थित शांत होते.
मनोविकारग्रस्त ही मात्र अधिक वाईट अवस्था आहे. ही माणसे सदसद्विवेकबुद्धी गमावून बसलेली असतात. त्यांच्या हातून एखादे घातक कृत्य घडले तर त्याचा त्यांना पश्चात्ताप होत नाही. उलट, आपण केले ते योग्यच केले अशी त्यांची धारणा असते. एरवी समाजात घडणाऱ्या किंवा दृश्य माध्यमांमधून दाखवल्या जाणाऱ्या हिंसक घटना पाहून अशा व्यक्तींना सुप्त आनंद होत असतो.
अखेर मनुष्य हाही एक प्राणीच आहे. निसर्गानुसार त्याच्यात सुद्धा पशुत्वभावना आहे. परंतु विविध सामाजिक बंधनांमुळे ती दाबलेली असते. किंबहुना माणसाचे सुसंस्कृत आणि असंस्कृत वर्तन यांच्या दरम्यानची सीमारेषा काहीशी धूसर असते. जेव्हा एखाद्या प्रसंगामुळे एखाद्याचा भावनिक स्फोट होतो तेव्हा ती सीमारेषा ओलांडली जाते. त्यातून वेळप्रसंगी माणूस समाजविघातक कृत्य करून बसतो. या सूत्रावर आधारित भावनिक विरेचन ही मानसशास्त्रीय संकल्पना आहे. तिच्याभोवती गुंफलेला हा चित्रपट पाहून मला हा लेख लिहिण्याची प्रेरणा मिळाली. वाचकांना तो रोचक वाटेल अशी आशा आहे.
.................................................................................
चित्र सौजन्य :
१.आंतरजाल
२. दैनिक सकाळ
वाचने
13816
वाचनखूण
प्रतिक्रिया
34
जबरदस्त
मला वाटतं
In reply to मला वाटतं by जेम्स वांड
+१
In reply to मला वाटतं by जेम्स वांड
@ जेम्स, भडास कॅफेचे
In reply to मला वाटतं by जेम्स वांड
बहुतेक चीनबद्दल असं एक उदाहरण ऐकलं होतं...
वरील सर्वांना धन्यवाद !
अतिशय सुंदर लेख
@ कुमार,
होलि रे होलि
वरील सर्वांना धन्यवाद !
वरती शिव्या देण्याचा उल्लेख आहे
योग्यच...
कॅफे भडास बद्दल...
धन्यवाद !
छान लिहिलंय.
भावनांचा निचरा: काही स्फुट विचार
वरील सर्वांना धन्यवाद !
मनसोक्त रडणे
भावनांचा निचरा
धन्यवाद !
In reply to धन्यवाद ! by हेमंतकुमार
नंबर दोन साठी, एक उत्तम उपाय आहे
मु वि
मु वि
चित्रपटाची ओळख आणि मानवी भावनांची घातलेली सांगड आवडली!
In reply to चित्रपटाची ओळख आणि मानवी भावनांची घातलेली सांगड आवडली! by टर्मीनेटर
धन्यवाद !
विरेचन
In reply to विरेचन by नगरी
नगरी,
भारी लेख. असे प्रसंग घडलेले
In reply to भारी लेख. असे प्रसंग घडलेले by चौथा कोनाडा
छान !
अश्या विरेचनांचे प्रकार
सहमत आहे.
चाचणी प्रतिसाद
मनोविकारग्रस्तता
नागरिकांचे प्रत्युत्तर