मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

(चकणा जरा)

प्रसाद गोडबोले · · जे न देखे रवी...
आमची प्रेर्ण्रा : चांदणचुरा - https://www.misalpav.com/node/49620 मागवतो चकणा जरा नेक्स्ट पेग आधी घाल पाणी, घाल सोडा "कच्ची" पोटास बाधी || चालते व्हिस्की किंवा रम माँन्कच्या वतीने टाळतो आता बीयर ढेरी सुटायच्या भीतीने || संपवला चकणा पुन्हा न पिणार्‍या हातांनी अन पिणारे केव्हाच गेले उंच आकाशी विमानी || रंगते रात्र पुन्हा अन पडे गफ्फांचा सडा, किचन बंद होण्याआधी मागवु चकणा जरा || - टल्ली * वैधानिक सुचना : मद्यपान शरीरास हानीकारक आहे , पण जास्त चकणा खाणे हे त्याहुन जास्त हानिकारक आहे. जास्त चकणा खाल्ल्याने फक्त आठव्या पेग नंतर आपला "वकार युनुस" होतो अन नंतर अतिषय हुच्च दर्जाची बिर्याणी खाण्याच्या आनंदास आपण मुकतो.

वाचने 5490 वाचनखूण प्रतिक्रिया 9

चित्रगुप्त Sat, 12/11/2021 - 20:01
कविता काय किंवा चित्र वगैरे काय, ते जर 'कळत' नसेल, तर ते काहीतरी लई भारी, हुच्च दर्जाचे आहे, आपल्याला कळले नाही यात आपलीच काहीतरी चूक आहे, अशी ओशाळलेपणाची भावना वाचका/दर्शकाच्या मनात निर्माण करणे, हा आधुनिक कवी/चित्रकार इत्यादींचा आवडता उद्योग असतो, आणि अशांनाच वाहवा, गिर्हाईक, बक्षिसे, अध्यक्षपदे वगैरे मिळतात.... एकतर या कवितेत हळवा स्पर्श, हळव्या वाटा, हळवे श्वास, हळवे अमूक, हळवे तमूक, गंधित आणाभाका, कोवळी पहाट, लाजरे ओठ, तांबडी वाट, प्राजक्तफुलोरा, गहिवर, पैंजण, किणकिण वगैरे वगैरे काहीच नाही, त्यातून कहर म्हणजे ही कविता तर कुणालाही सहज पूर्णपणे कळेल अशी आहे, आता काय करावे बरे ?? कुठे फेडाल हे महत्पाप कविवर्य ?

Bhakti Sat, 12/11/2021 - 21:45
छ्या ! रंगते रात्र पुन्हा अन पडे गफ्फांचा सडा, किचन बंद होण्याआधी मागवु चकणा जरा || हे मला का नाही सुचलं 😃 भारीच!

कर्नलतपस्वी Sun, 12/12/2021 - 17:49
पहिला साधा मग पटियाली नको सोडा नकोच पाणी बर्फाच्या तुकड्यावरूनी घसरत जाऊ गिरी शिखरावरती मग नकोत काजू नकोत पापड दिव्यत्वाची येईल झापड मुक्त मनाने विहार करू मग एव्हरेस्ट ही रेश्ट न करता लिलया पार करू

In reply to by कर्नलतपस्वी

मुक्त विहारि Sun, 12/12/2021 - 19:32
सहमत आहे दर शनिवारी, आमची अशीच अवस्था असते... सुक्ष्मात जायचे आणि 3-13-1760 ह्या ग्रहावर फेरफेटका मारून यायचा...

वैधानिक इशार्‍यासकट वाचली आणि आवडली, कडव्या कडव्यात नशा ठासून भरला आहे. वकार युनुस प्रसन्न होणे ही अत्यंत वैयक्तीक बाब आहे, कोणाला तो अर्ध्या पेगात पावतो तर कोणाला खंबा रिचवूनही दर्शन देत नाही. पैजारबुवा,