निसर्गाचा न्याय
निसर्गाचा न्याय
हिवाळा उन्हाळा पुन्हा पावसाळा,
युगे युगे असे ऋतुचक्र फिरे,
निसर्ग देतो भरभरून सारे
मानवाची हाव तरिही ना सरे !!
मानवाचे अनाचार वाढले,
निसर्गचक्र सारेच बिघडले
अवघी सृष्टी धरूनी वेठीस
स्वार्थासाठी तीला लुबाडले !!
मग प्रलय बनूनी पाऊस आला
झोडपून टाके सर्व जगाला,
नदीच झाला सारा गाव ,
सर्वस्व सवे घेऊन गेला !!
डोंगर कुशीतलं टुमदार गाव
निसर्ग सौंदर्याने डोळे दिपले
पाऊस माराने पडली दरड
उभे गावच गाडले गेले !!
निसर्गाचे नुकसान केले
गोठल्या मानवाच्या संवेदना,
हिशोब त्याचा तो घेतोय करून,
मागे उरतेय. , फक्त वेदना !!
सावर आता तरी माणसा,
नवी झाडे लाव, थांबव जंगलतोड,
सिंमेंटची जंगलं पुरेत आता,
विश्वासाचं नातं निसर्गाशी जोड !!
निसर्गाचा आदर राख. फुल, पक्षी
पशु, झाडं यांचेही हक्क समजून घे,
विकास म्हणून फक्त स्वतःसाठी,
निसर्गाला ओरबाडणं सोडून दे !!
-वृंदा
चांगली कविता!
एक विचार
मला वाटतं कालचक्र परत मागे
छान कविता...
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी : - Gravitas: India's left leaders celebrate Chinese communismचिपळूणचा दुसर्या विडीओमधल्या
चिपळूणचा दुसर्या विडीओमधल्या
मदनबाण.....
छान.
कवितेशी सहमत..