पंतप्रधान मोदी यांचं नेतृत्व बदलण्याची गरज..!
आदरणीय पंतप्रधान मा. मोदी यांचं सरकार आल्यापासून देशात अनेक गंभीर प्रश्न निर्माण झालेले आहेत, ते सोडविण्यासाठीचे प्रयत्न करण्याऐवजी जे प्रश्नच नव्हते, त्या प्रश्नांकडे लक्ष वेधण्याचा सतत प्रयत्न केला जातो. सरकारसमोरील प्रश्न आणि त्याची सोयीस्कर उत्तरांनी देशात विविध माध्यमं सतत चर्चेत असतात. गेल्या वर्षभरापासून करोना या विषाणुच्या संक्रमाने भर घातली. आज जवळपास चार लाखांवर बाधीतांचा आकडा पोहचला आहे, मृत्युचं प्रमाणही वाढत आहेत. भारताच्या एकून आरोग्य व्यवस्थेचे धिंडवडे केव्हाच निघाले आहेत, अशावेळी असलेल्या व्यवस्थेत माणसं कशीतरी भयावह अवस्थेत जगत आहे, भारतीय जनता आपापल्या सगेसोय-यांच्या गमावलेल्यांच्या दुखात खिन्न मनाने कसेबसे आलेला दिवस ढकलत आहेत.जगण्याची शाश्वती राहीली नाही, अशी एक अनामिक भिती माणसाच्या मनात भरुन राहीलेली आहे. दुसरीकडे लशींचा देशातला, राज्यातला तुटवडा आणि लशीकरणाने विषानुवर नियंत्रण आणन्याचा प्रयत्न केंद्रस्तरावरुन प्रयत्न केला जात आहे. जगभरात करोना विषानुवर नियंत्रण येत असल्याचे दिसत आहे, त्याचवेळी भारताची अवस्था दुस-या लाटेत दिवसेंदिवस अधिक दयनीय होत चालली आहे. गेल्या वर्षभरापासून येणा-या विषाणुंच्या लाटेबाबत आपण गाफील राहीलो, प्रयत्न करण्याऐवजी स्वत:च कौतुक करण्यात केंद्रीय नेतृत्त्व गुंतलेले दिसले. आणि त्याचे आज परिणाम भारतीय जनतेला भोगावे लागत आहे. आता इतर देशांच्या तुलनेत आपले मृत्युदर कमी आहे, बाधीत संख्या कमी आहे, आकडे कमी आहेत, साख्यंकी, वगैरे दाखवून आपली परिस्थिती भली आहे, हे दाखविण्यात आता काहीही अर्थ उरला नाही, वास्तव समजून घेण्याची वेळ आली आहे.
देशभरात आरोग्यव्यवस्थेची मरणासन्न अवस्था झालेली आहे,आपत्ती व्यवस्थापनाचे धडे काय असतात त्याची कल्पना नसलेले नेतृत्व लोकांना जगण्याची उभारी देऊ शकले नाही. लोकांचे दुखदायक व्हीडीयो माध्यमातून फिरत आहेत. आपण जगू की नाही याची शाश्वती आता उरली नाही, अशी भिती प्रत्येकाच्या मनात निर्माण झाली आहे, अशावेळी जनतेमधे आश्वासक वातावरण करण्याऐवजी आपण कुंभमेळे भरवता ? आपण ठरवलं असतं तर ते थांबवता आलं असतं आता वाढलेल्या संसर्गाचे आकडे यायला लागले आहेत. पश्चिम बंगालची निवडणूक आपण प्रतिष्ठेची केली. मा.पंतप्रधान, देशाचे गृहमंत्री, केंद्रीयमंत्रीमंडळातील मंत्री, आमदार, खासदार, अभिनेते त्यांच्या रॅल्या, ते मोर्चे ती भाषणं यात अशावेळी जनतेच्या दु:खावर फुंकर घालण्याऐवजी आपणास पश्चिम बंगालची निवडणूक महत्वाची वाटली. रोम जळत होते तेव्हा निरो फिडल वाजवत होता अशा गोष्टीची आठवण होत होती. इतके, हे नेते आणि नेतृत्व असंवेदनशील असू शकतात ही कल्पनाच सहन होऊ शकत नाही. जीवाचा आटापीटा करुनही पश्चिम बंगाल मधे आपला दारुण पराभव झाला. जनतेने आपणास साफ़ नाकारले, एक संदेश दिला की आपण कोणत्या विषयांवर लक्ष केंद्रित केले पाहिजे त्याचं एक आत्मभान जनतेने दिले. . जनतेची आवश्यकता काय आहे, यातून आपण काही शिकाल अशी अपेक्षा करणे गैर आहे. विकत घेतलेली माध्यमं आपला जयजयकारात व्यस्त आहेत. कोणत्याही माध्यमाने हॉस्पीटल्समधील आवश्यक बेडची संख्या सांगितली नाही, उपचार कुठे मिळू शकतो ते सांगितले नाही, आपण करीत असलेल्या चुंकावर मौन बाळगले. मात्र पश्चिम बंगालमधे आपण कसे विजयी व्हाल त्याचे खोटे आकडेमोड करीत विविध वाहिन्या व्यापून टाकलेल्या होत्या. करोनाच्या पहिल्या लाटेत एका चित्रपटसृष्टीतील अभिनेत्यावर दिवसभर वाहिन्या त्याच विषयावर चर्चा करीत राहील्या तेव्हाही आपण जनतेच्या आवश्यकतेकडे अक्षम्य दुर्लक्ष केले.
जनतेला उपचार, लशीकरण, आणि योग्य मार्गदर्शन यांचे योग्य नियोजन हवे होते. ऑक्सीजनचा तुटवडा जाणवत होता, इंजेक्शचा तुटवडा होता. लोक रुग्णालयाबाहेर तळमळतांनाची छायाचित्रे व्हीडीयो व्हायरल होत होती, आजही होत आहेत. मा.सर्वोच्च न्यायालयाने फटकारल्यानंतरही आपल्यात काहीही जवाबदारीचं भान दिसलं नाही. आपण वाढती लोकसंख्या आणि तुटपुंज्या उपायात आम्ही किती काम करीत आहोत हे दाखविण्यात व्यस्त राहीलात. आपण टीका करणा-यांवर कायदेशीर कार्यवाहीत व्यस्त राहीलात. मा.सर्वोच्च न्यायालयास सांगावे लागले की सकारवर टीका करणा-यांवर आपण कार्यवाही कराल तर याद राखा, आपल्या दडपशाहीबद्दल मा.न्यायव्यवस्थेला आपलाला समज द्यावी लागते. आपण जनतेच्या गरजांकडे दुर्लक्ष आजही करीत आहात. आपली असंवेदनशीलता अनेकदा दिसून आली. आसामचा प्रचार असो, की पश्चिमबंगालचा प्रचार असो. बाकी इतर पक्षांच्या नेतृत्वाने काय केले यापेक्षा आपण एक आदर्श उभा करायला हवा होता. राजकारण करायला माणसं जगली तर भविष्यकाळात आपणास भरपूर राजकारण करता येणार आहे. दीर्घकालीन नियोजनांचा अभाव, विविध पक्षांच्या भूमिका, पक्षीय धोरणे, मतभेद या पलिकडे जाऊन राष्ट्रहित लक्षात घेऊन नियोजन करणे गरजेचे होते.
जगभरातील आंतरराष्ट्रीय दैनिके दुस-या लाटेतील भारताच्या बेजवाबदारीबद्दल लिहित असतांना आपण त्या त्या राष्ट्रांना आपापल्या परदेशातील दुतावासामार्फत भारताची बदनामी थांबवा, असे म्हणत आहात. सरकारवर टीका करणा-यांची ट्वीटर खाती गोठवायला सांगत आहात. आपल्या देशातील माध्यमे कदाचित आपल्याविरुद्ध लिहिणार नाहीत, सरकारच्या प्रशासनाबद्दल लिहिणार नाहीत कारण त्यांचे हित त्यात गुंतलेले आहेत, भारतीय माध्यमांना पॅकेजेसप्रमाणे वार्तांकन करावे लागतही असेल, परंतु परदेशातील सरकारे, लोक आणि देश नागरिकांचे अभिव्यक्तीस्वातंत्र्य जपतात त्या टीकेचा आदर करतात, आपणास टीका सुद्धा सहन होत नाही. टीकेकडे सकारात्मक पद्धतीने बघायला हवे, त्यातले चांगले म्हणून काही घ्यावे असे आपण आणि आपल्या मंत्रीमंडळास वाटत नाही. आपण आपल्या अपयशाचे खापर राज्यांवर फोडण्याचे प्रयत्न करीत आहात, कुरघोडीचे राजकारण करीत आहात असे वाटावे इतकी ती तफावत आपल्या प्रशासकीय भेदाच्या वर्तनातून दिसून येते.
भारतीय जनतेने आपणास बहुमताने निवडून दिले आहे ते जनता पूर्वीच्या सरकारांमुळे त्रस्त होती, अपेक्षांना उतरत नव्हती म्हणून. आपण काही चमत्कार कराल, काही बदल कराल, आपल्या वकृत्वामुळे लोक भारावून गेले होते. आपण जसे जसे, जे जे म्हणाल ते ते लोकांनी केले. आपण दिवे लावा म्हणालात, लोकांनी दिवे लावले, आपण थाळीनाद करा म्हणालात लोकांनी आपल्या डोक्याचा वापर न करता थाळी नाद केला. आपण जे जे म्हणाल ते ते सर्व केले. अजूनही आपण काही चमत्कार कराल म्हणून जनता आपल्याकडे आस लावून बसली आहे, पण दुर्दैवाने आपलं अपयश आता लपविणे शक्य नाही. सरकारातील सध्याच्या अवस्थेबद्द्ल निवडून दिलेले प्रतिनिधीसुद्धा बोलत नाहीत, दयनिय अवस्थेबद्दल तक्रार करीत नाहीत. सत्तेच्या मोहापोटी लोकांच्या गरजांबद्दल प्रतिनिधी बोलत नाहीत, इतके लाचार लोकप्रतिनिधी पहिल्यांदा बघावे लागत आहेत.
सध्या सोशियल मिडियात मा.पंतप्रधान यांच्यावर खुप टीका होतांना दिसते, टींगल टवाळी होतांना दिसते. प्रधानमंत्र्यांबद्दलचा आदर लोक विसरत चालले आहेत, ही टीका थेट सन्माननीय पंतप्रधान आणि गृहमंत्री यावर असते, देशभरातून त्यांच्यासंबंधी संतप्त प्रतिक्रिया उमटत असतात, टीका करणे ही सहज प्रतिक्रिया असते. पंतप्रधान म्हणून असलेल्या जवाबदा-यांपासून त्यांन पळ काढता येणार नाही, लोकभावनेचा विचार करावाच लागेल. आज परदेशात लशीवाटपापेक्षा देशात लशींची आवश्यकता आहे, परराष्ट्रीय धोरण म्हणून काही मदत करावी लागत असेल पण आपण जगाला मदत करीत आहोत त्याचवेळी इथे देशात काय अवस्था आहे, हा विचार करु नये असा संतप्त सवाल लोक करीत असतात.
भारतीय जनतेने काही आमुलाग्र बदल होतील म्हणून जनतेने सत्तांतर केले. पण गेली काही वर्षात असलेल्या प्रश्नांचा नीपटारा झाला का ? वाढती बेरोजगारी, वाढती महागाई, गरिबी, या आणि असंख्य प्रश्नांना घेऊन सत्तेवर आपण आलात आता त्यात काही बदलही झाले नाहीत. खोटे युक्तीवाद केले तरी, असलेल्या प्रश्नांपासून सुटका होऊ शकत नाही, लोकांनी ज्यासाठी निवडून दिलं, तो हेतू पूर्ण झाला नाही तर लोक बदल घडवतात हा या देशातला इतिहास आहे, लोकशाहीने भल्या भल्यांचे होत्याचे नव्हते केले. तरीही आपण काहीही शिकला नाहीत, आपण जे ठरवू ते झाले पाहिजे या अट्टाहासाने देशाला अजून किती वेठीस धरणार, संकटाच्या खाईत लोटणार हा प्रश्न आहे, अशावेळी आता काही बदल होणे आवश्यक वाट्ते.
सध्याचं प्रशासनातील पंतप्रधानांचं अपयश पाहता, लोक ज्या पद्धतीने पंतप्रधान पदाची त्यांच्या भाषणाची खिल्ली उडवत आहेत ते सर्व पाहता, आता पक्षाच्या कार्यकर्ते, नेते, आणि सल्लागारांनी तज्नांनी आता नेतृत्त्वात बदल करण्याची आवश्यक्ता वाटते. आपणास बहुमत आहे, त्यामुळे आपण पंतप्रधान आणि मंत्रीमंडळ बदलू शकत नसलो, तरी आता अन्य चेह-यांना प्रयोग म्हणून आता नव्या चेह-याला नवी संधी दिली पाहिजे, आपल्याकडून जे काही नेतृत्त्व म्हणून अपेक्षित आहे, त्यात जर काही होत नसेल तर आता भाकरी फ़िरवली पाहिजे. भाकरी फ़िरवली नाही तर ती करपते त्या प्रमाणे सध्याच्या नेतृत्वात आता बदल करणे आवश्यक आहे, असे वाटते. आपल्या सरकारमधे अनेक अनुभवी व्यक्ती आहेत, कोणास तरी नवी संधी दिली पाहिजे. सुडाचे राजकारण न करता आता माणसाच्या जगण्याला प्राधान्य देणा-या कृतीची गरज आहे.
नाकर्ते शासन-प्रशासनामुळे माणसाच्या जगण्याची शाश्वती वाटत नसेल तर लोकांना अशी शक्तीशाली व्यवस्था लोकशाहीच्या माध्यमातून बदलता येते, हा येथील इतिहास आहे, पक्षातील लोकप्रतिनिधींची एक मर्यादा असते, सत्तेचा लोभ असतो. परंतु ज्या नागरिकांचे नातेवाईक गमावले गेले आहेत त्या नागरिकांनी सनदशीर मार्गाने सरकारच्या धोरणाला विरोध केला पाहिजे, नागरिक म्हणून तरी आपली काहीही मजबुरी नाही. सरकारविरुद्ध शिक्षितांनी लिहिले बोलले पाहिजे. सरकारला बहुमत आहे, सध्या सत्तांतर शक्य नाही, परंतु, पंतप्रधान मोदी यांची पक्षीय कारकीर्द पाहता, इतिहास सोडून द्या. पण, पक्षाच्या पद्धतीप्रमाणे त्यांना नेता म्हणून जसे निवडले तसे त्यांचं नेतृत्त्व आता बदलण्याची वेळ आली आहे. एका नव्या चेह-याची गरज आहे, पंतप्रधान मोदी यांचा अपयशी कारकीर्दीचा पाढा असाच वाढत राहीला तर तो पक्षाला घातक ठरेलच पण देशासाठी ही वाटचाल घातक ठरणार आहे. त्यामुळे वेळीच ही व्यवस्था बदलेल, अशी अपेक्षा करायला हरकत नाही. पश्चिम बंगालच्या अनुभवावरुन काही तरी शिकून भारतीय लोकांना ’अच्छे दिन’ येतील अशी अपेक्षा करु या, पश्चिम बंगालने या दोन्ही नेत्यांना स्पष्ट थेट नाकारले आहे आणि देशाला वाचवले. एक नवा संदेश बंगालने दिला आहे. हुकुमशाही प्रवृत्तीला लगाम लावला आहे. लोक अशा कोणत्याही भूलथापीला बळी पडत नाही, हे पश्चिम बंगालने दाखवून दिले, तरीही, पक्षाने तीनाचे सत्तर पंचाहत्तर कसे केले, याच जयजयकारात पक्ष राहणार असेल, आणि 'गीरे भी तो टांग उपर'करुनच फ़िरायचे असेल तर तर पक्षाची अवस्था पून्हा एकदा दोन खासदारांवर जाऊन थांबायला वेळ लागणार नाही. आणि जनता म्हणून तोपर्यंत आपण सर्व देशोधडीला लागलेले असू...!
मोदींना बदलण्याची गरज वाटत नै
In reply to मोदींना बदलण्याची गरज वाटत नै by प्रचेतस
शिवाय निकाल लागल्यावर
In reply to शिवाय निकाल लागल्यावर by प्रचेतस
प्रादेशिक पक्ष आणि नेतृत्व.
In reply to प्रादेशिक पक्ष आणि नेतृत्व. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आज तरी त्यांना मोमता दिदींना
In reply to आज तरी त्यांना मोमता दिदींना by बापूसाहेब
नरेंद्र मोदी सुद्धा निर्विवाद
In reply to मोदींना बदलण्याची गरज वाटत नै by प्रचेतस
आभार.
In reply to आभार. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
योगी तुम्हाला चेहरा वाटत असेल
In reply to योगी तुम्हाला चेहरा वाटत असेल by प्रचेतस
मला वाटते तब्येत बरी झाली असेल तर
In reply to योगी तुम्हाला चेहरा वाटत असेल by प्रचेतस
नवा चेहरा, नवा खेळ.
In reply to नवा चेहरा, नवा खेळ. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
जोपर्यंत मोदी यश देताहेत
In reply to योगी तुम्हाला चेहरा वाटत असेल by प्रचेतस
+१
In reply to आभार. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
नितीन गडकरी अगदी योग्य आहेत
In reply to आभार. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
दुसरे कोण?
In reply to दुसरे कोण? by गोंधळी
थुकरट वाडीच्या चार टिनपाट
In reply to थुकरट वाडीच्या चार टिनपाट by सुबोध खरे
वस्तुस्थिती
In reply to वस्तुस्थिती by गोंधळी
पैश्यांच्या जोरावर ,मिडियाला
पैश्यांच्या जोरावर ,मिडियाला/विरोधी पक्षातील लोकांना प्रचंड प्रमाणात पैसे देवुन त्यांना गप्प करुन, सुप्रिम कोर्ट,निवड्नुक आयोग, सिबिआय,......... ह्यांना हाताशी धरुन सत्ता मिळ्वत आली आहे. हे खोटे आहे का???हे १०० टक्के खोटे आहे. या मार्गाने सत्ता मिळविता येत असती तर बंगाल, दिल्ली, केरळ, तामिळनाडू वगैरे राज्यात पराभव झाला नसता.हिम्मत असेल तर विरोधी पक्षातील एकालाही न घेता ,विकासाच्या मुद्द्यावर जिंकुन दाखवा.बहुतेक सर्व पक्षात इतर पक्षातून आलेले/आणलेले नेते आहेत. अगदी नेहरूंच्या काळापासून हे सुरू आहे. भाजपने २०१४ व २०१९ ची निवडणुक विकासाच्या मुद्द्यांवरच जिंकली होती. तेव्हा जाहीरनाम्यात श्रीराम मंदीराचा उल्लेखही नव्हता. त्यामुळे भाजपने श्रीराममंदीराचा मुद्दा सोडला अशी टीका झाली होती. म्हणजे तो मुद्दा घेतला तर जातीयवादी राजकारण अशी टीका आणि नाही घेतला तर घेतला नाही म्हणून टीका.तेव्हा फक्त चमकोगिरिकरन्या साठी ह्यांचे महान देव बाकीच्या देशात लस/ऑक्सीजन पाठवत होते.कोविशिल्ड ही लस भारताची नसून ऑक्सफर्डची आणि व भारतात त्या लसीचे फक्त उत्पादन होत आहे. कोवॅक्सिन भारतीय लस आहे. दोन्ही लसींंसाठी लागणारे बरेच घटक इतर देशांकडून येतात व करारानुसार त्यांना या लसींचा काही प्रमाणात पुरवठा करावाच लागतो. परंतु हे समजणे मोदीद्वेषाने अंध झालेल्यांच्या आवाक्याबाहेरचं आहे. आम्हाला अभिमान आहे मोदीद्वेषाने अंध झाल्याचा.In reply to पैश्यांच्या जोरावर ,मिडियाला by श्रीगुरुजी
असहमत
In reply to असहमत by गोंधळी
खुप चुक. उलट तेव्हा मोकळ रान
In reply to असहमत by गोंधळी
ओ तेच ना नेहरु आणि तुम्च्यत
ओ तेच ना नेहरु आणि तुम्च्यत मग काय फरक आहे.काय हे, हे सुद्धा सांगायला हवं? हे फरक जगजाहीर आहेत. चीन, काश्मीर, वेगळे कायदे असे अनेक गुंते नेहरूंनी करून ठेवले आणि हे सरकार हे गुंते सोडवित आहे. हे फरक दिसत नाहीत का?खुप चुक. उलट तेव्हा मोकळ रान होत कारण समोर कोणच नव्हत. म्हणुन जिंकले .येथे तुम्हीच स्वतःचा मूळ दावा चुकीचा आहे हे सिद्ध केलंत.मोदींनी पाहीजे त्या प्रमाणात लसींच्या orders च दिल्या नव्हत्या.कारण १८/१९ तास बंगाल कसे जिंकायचे याचे काम करत होते.https://www.google.com/amp/s/m.businesstoday.in/lite/story/received-order-for-26-crore-covid-19-vaccine-doses-from-centre-serums-adar-poonawalla/1/438152.htmlThreats from powerful, head will be chopped off if I comment on elections or Kumbh: SII CEO Adar Poonawallaहे वाक्य मुद्दाम मोडूनतोडून लिहिलंय. मूळ वाक्य खाली दिलंय. On being asked who must carry the blame for the situation India finds itself in, Poonawalla said, "If I give you the right answer, or any answer, my head would be chopped off. I can't comment on the elections or Kumbh Mela. It's too sensitive. I don't think even God could have forecast it was going to get this bad." महाराष्ट्राला सर्वात आधी लस दिली नाही तर तुमच्या कारखान्यातून लसीचा एकही ट्रक बाहेर जाऊन देणार नाही - मविआ आघाडीतील राजू शेट्टी पूनावालांना महाराष्ट्रासाठी व देशासाठी खूप काही करता आलं असतं. - धाकटे पवार खंडणी, धमक्या यासाठी कोणते पक्ष कुप्रसिद्ध आहेत हे माहिती असेलच. केंद्राने लसीसाठी पूनावालांना १७२८ कोटींचे advance payment केले आहे, यावर पुढाऱ्यांचं लक्ष असतंच.In reply to ओ तेच ना नेहरु आणि तुम्च्यत by श्रीगुरुजी
खंडणी, धमक्या यासाठी कोणते
खंडणी, धमक्या यासाठी कोणते पक्ष कुप्रसिद्ध आहेत हे माहिती असेलच. केंद्राने लसीसाठी पूनावालांना १७२८ कोटींचे advance payment केले आहे, यावर पुढाऱ्यांचं लक्ष असतंच.उद्योजक अंबानी धमकी प्रकरण ताजे आहे. त्यामागे कोण होते हे देखील बाहेर आले आहे.In reply to खंडणी, धमक्या यासाठी कोणते by श्रीगुरुजी
सिरम इन्स्टिट्यूटला लस
In reply to सिरम इन्स्टिट्यूटला लस by सुबोध खरे
हे...
In reply to वस्तुस्थिती by गोंधळी
घोडा चतुर घोडा चतुर
In reply to घोडा चतुर घोडा चतुर by सुबोध खरे
व्ययक्तीक प्रतिसाद
In reply to व्ययक्तीक प्रतिसाद by गोंधळी
वस्तुस्थिती गुलाम अंध
वस्तुस्थिती गुलाम अंध भक्तांनी जाणुन घ्यायची गरज आहे.
हे आपलेच वाक्य आहे ना ?In reply to वस्तुस्थिती गुलाम अंध by सुबोध खरे
सुरुवात कोणी केली
In reply to सुरुवात कोणी केली by गोंधळी
हायला
In reply to दुसरे कोण? by गोंधळी
नक्किच
In reply to मोदींना बदलण्याची गरज वाटत नै by प्रचेतस
बिरुटे सरांनी फारच संयमित
पश्चिम बंगालने या दोन्ही
In reply to पश्चिम बंगालने या दोन्ही by यश राज
बंगाली ब्रेकर....
In reply to बंगाली ब्रेकर.... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद,
In reply to बंगाली ब्रेकर.... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
धार्मिक कट्टरवाद्यांच्या भूमिकेकडे !
कशाला उगाच एकांगी आणि
घंटानाद !
In reply to घंटानाद ! by कंजूस
कम्युनिस्ट तरी आहेत का?
तिकडे सिनेमेही असेच येतात.
१९६० मध्ये महाराष्ट्र आणि
In reply to १९६० मध्ये महाराष्ट्र आणि by सुबोध खरे
बंगाली लोकांना स्वतःच्या
डॉक्टर साहेब, लेख आवडला, पण
In reply to डॉक्टर साहेब, लेख आवडला, पण by खेडूत
मराठी पंतप्रधान होणे शक्यच नाही ....
In reply to मराठी पंतप्रधान होणे शक्यच नाही .... by मुक्त विहारि
मराठी पंतप्रधान होणे शक्यच नाही ....
पटले
In reply to पटले by प्रसाद गोडबोले
मार्कस बाबू पाय कुठे आहेत
In reply to पटले by प्रसाद गोडबोले
मार्कस बाबू पाय कुठे आहेत
भा ज पा काही नेतृत्व बदल करत
In reply to भा ज पा काही नेतृत्व बदल करत by अमर विश्वास
महाराष्ट्र राज्यातील भाजपच्या सीटस् कमी होतील ....
आणि हो .. अजून एक ...
ठेच लागली म्हणून पायच कापून
निवडणूक लढविण्याची तयारी