शेतकरी आंदोलन, मागण्या आणि वस्तुस्थिती
सध्या आपण काही दिवसांपासुन शेतकरी आंदोलन आणि त्याविषयी माहिती घेतच आहात. मला आंदोलन का सुरु झाले? त्यात कोण पुढाकार घेत आहे, कोण आपल्या फायद्यासाठी कोणाचा वापर करीत आहे यापेक्षा यात शेतकरी वर्गाच्या मागण्या किती व्यवहारीक आणि सरकारने दिलेला प्रतिसाद यावर चर्चा अपेक्षित आहे.
शेतकरी नेतृत्वाने सरकारने मागील महिन्यात केलेले तीनही शेतीसुधारणा कायदे रद्द करावे ही पहिली मागणी केली. त्याला सरकारने नकार दर्शविला आणि त्यात सुधारणा करु. त्यात नवीन दुरुस्ती करणे शक्य आहे असे सांगितले. त्यानंतर आज काही मागण्या घेउन गृहमंत्री यांच्या सोबत बैठक निर्णयापर्यंत आली नाही. नवीन मागण्या माझ्या माहितीनुसार खालील प्रमाणे आहेत.
१. एम एस पी सक्तीची करा. खाजगी खरेदीदारांनी त्याखाली खरेदी करु नये अशी तरतुद करावी.
सरकारने एम एस पी कायम राहील असे लिखीत आश्वासन देण्याचे मान्य केले आहे.
खाजगी व्यक्ती किंवा कंपनी यांना अशी सक्ती कशी करता येऊ शकेल?
हे मला समजत नाही. जरी सरकारने असा कायदा केला तरी प्रत्यक्षात हे कधीही शक्य होणार नाही.
२. एम एस पी खरेदी सरकार बंद करणार नाही.
शासनाने आपण एम एस पी व्दारे होणारी खरेदी बंद करणार नाही असे लिखीत आश्वासन देण्याचे मान्य केले आहे.
सरकारने आपले धान्य एका स्थिर किमतीला घ्यावे असा आग्रह कोणत्या पिकात आणि का केला जातो हे आपण पाहिले तर कडधान्य, गहु, तांदुळ यांनाच केला जातो.
भाजीपाला, नगदी पिके, फळे, मसाले याबद्दल असा काहीही विचार शेतकरी करीत नाहीत. थोडक्यात असा माल जो आपण खुल्या बाजारात आपण विकु शकत नाही
तो एम एस पी त सरकारने विकत घ्यावा असा आग्रह आहे. थोडाक्यात बासमती आम्ही बाहेर विकु, पण हळा भात सरकारने घ्यावा.
३. खाजगी खरेदीदार आणि बाजार संघांवर कर लावावा.
मला हे कळत नाही की कोणावर कर लावावा किंवा लावु नये हा शेतकर्यांचा प्रश्न कसा असु शकतो? त्यामुळे सरकारची लढाई शेतकरी का लढत आहेत?
ए पी एम सी वाचवणे हे कोणत्या शेतकर्याला आवश्यक वाटते? का? कोणताही दुकानदार आपल्यावरील कर ग्राहकाकडुन वसुल करतो. यापुर्वी शेतकर्याकडुन कर
अथवा काही रक्कम वा अतिरिक्त माल नुकसान होतो म्हणुन व्यापार्यांनी घेऊ नये असे सरकारने स्पष्ट केले आहे तरी त्याची अंमलबजावणी होतांना दिसते का?
सरकारने असा कर राज्य सरकारने लावल्यास त्यास आपली हरकत नाही असे स्पष्ट केले आहे.
४. खाजगी खरेदीदार आणि बाजार संघांवर नोंदणी सक्तीची करा.
सरकारने याचा निर्णय राज्य सरकारवर सोडला आहे.
जो व्यापारी खरेदी करतो तो कायम राहुन व्यापार करत असेल तर त्याची नोंदणी आवश्यकच असावी. व्यापारी सुध्दा त्यास नकार देणार नाही. पण हे व्यापारी संघटीत
झाले तर पुन्हा येरे माझ्या मागल्या. पण द्राक्ष, डाळींब याचे खरेदीदार तत्कालीन असतात. त्यांचा आपसी व्यवहार शेतकरी आणि व्यापारी आपापसात ठरवितात त्यात
शेतकरी फसला तर त्यास कोण जबाबदार?
५. शेतकरी आणि करार करणारी कंपनी याच्यातील करार नोंदणी, त्यावरील मतभेदांसाठी योग्य नियामक यांची मागणी.
यास सरकारने मान्यता दिली आहे.
हे खरोखर योग्य आहे. पेप्सिको आणि गुजराथ मधील शेतकरी यांच्या मधील बटाटा पिकाबद्दल वाद सर्वोच्च न्यायालयात गेला. निकाल शेतकर्यांच्या बाजुने लागला.
६. जमीन गहाण ठेवणे, जप्त करणे हे करारात घेता येणार नाही.
सरकार यास तयार आहे.
दोन पक्ष किंवा व्यक्तींमधील करार हा दोन्ही पक्षांना योग्य वाटल्या शिवाय प्रत्यक्षात येवु शकत नाही. शेतकी कंपन्या यावर नवीन तोडगा काढतील. शेतकरी इतका
सोपा नाही.
७. कराराविरोधात न्यायालयात जाण्याची मुभा द्यावी.
सरकार यावर सकारात्मक आहे.
वरील मुद्द्यांमधील ५, ६, ७ हे मुद्दे सर्वात महत्वाचे आहेत असे मला वाटते, हे सरकारने अगोदरच करावे असे माझे मत आहे. पण त्यावरील १ ते ४ हे मुद्दे सगळे फक्त शेतकरी विरोधी आहेत असे नाही. त्यात आजपर्यंत मागील अनुभव पाहुन थोडी अधिक बाजार मोकळीक आहे असे मला वाटते.
शेती आणि शेतकरी यांचा खरा विकास करायचा असेल तर खरेदीदारांना जे हवे ते तसे देण्यास सुरु केले तरच होईल. सरकारी कुबड्या घेउन आजवर कोणताही व्यापार यशस्वी झाल्याचे उदाहरण नगण्य म्हणावे असे आहे. आपण गावात पाहतो की तोच शेतकरी यशस्वी दिसतो जो सरकारी योजनांचा लाभ घेतो, बँकेचे कर्ज काढतो, वेळेवर कर्ज फेड करतो, त्यासोबत दुध, कुक्कुट पालन, मस्त्यशेती, शेणखत यांपैकी एखादा व्यवसाय करतो. आपल्या परिसरात कोणता भाजीपाला विकला जातो तो पिकवतो. साधा मुद्दा आहे. भारताची लोकसंख्या, शिक्षण, आर्थिक स्थिती यामुळे जगण्याची स्पर्धा कठीण होत आहे. हे फक्त शेतीसाठी आहे असे नाही. साध्या नोकर्या करणारे अनेक लोक प्रचंड कष्ट आणि अवहेलना सहन करीत असतात. आपण संघटीत आहोत म्हणुन कोणत्याही मागण्या केल्या आणि अडवणुक करु असा पवित्रा असेल तर कायमस्वरुपी नुकसान होऊ शकते हे समजले पाहिजे. कृपया मी लेखात कोणत्याही पक्ष किंवा संघटना यांचे नाव घेतले नाही. हे लक्षात घेउन फक्त मुद्द्यांवर चर्चा केली तर बरे होईल.
वाचने
174620
वाचनखूण
प्रतिक्रिया
559
https://www.facebook.com
शेतकऱ्यांच्या समस्या काय आहेत .
In reply to शेतकऱ्यांच्या समस्या काय आहेत . by Rajesh188
राजेश जी तुमचा हा निबंध
जानु जी लेख आणि आपल्या मतांशी
In reply to जानु जी लेख आणि आपल्या मतांशी by बाप्पू
बाप्पु, राजकीय पक्ष कितीतरी
@ राजेश,
बाजारावर आधारित उद्योग पण नसतात
देशात असणाऱ्या मोठ्या उद्योगात
या कायद्यानुसार
Msp सक्ती ची करा म्हणजे.
In reply to Msp सक्ती ची करा म्हणजे. by Rajesh188
बाजारात टोमॅटो 60 रुपये ने
https://maharashtratimes.com
In reply to https://maharashtratimes.com by प्रसाद_१९८२
हो
शेतक-यांना वाटतं ना....
In reply to शेतक-यांना वाटतं ना.... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
शेतकरी म्हणत आहेत, कायदे रद्द
In reply to शेतकरी म्हणत आहेत, कायदे रद्द by गवि
खरंच मनोरंजक
In reply to शेतकरी म्हणत आहेत, कायदे रद्द by गवि
आपल्या मताचा आदर
In reply to आपल्या मताचा आदर by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
खरंय
In reply to खरंय by सॅगी
१००%
In reply to आपल्या मताचा आदर by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
अशा वेळी चांगलं वाईट काय आहे,
In reply to आपल्या मताचा आदर by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
. शेतक-यांच्या प्रश्नांना आणि
In reply to . शेतक-यांच्या प्रश्नांना आणि by सुबोध खरे
डॉक्टर साहेबांशी मन की बाते....
In reply to डॉक्टर साहेबांशी मन की बाते.... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
टिपिकल बुद्धिवादी, वाममार्गी
In reply to शेतक-यांना वाटतं ना.... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
माफ करा पण हसू आले.
In reply to माफ करा पण हसू आले. by वगिश
मग काय..
शेती आणि कंपनी...
In reply to शेती आणि कंपनी... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
शेती, शेतकरी, जमीन, उत्पादन,
In reply to शेती, शेतकरी, जमीन, उत्पादन, by बाप्पू
आभार....
In reply to आभार.... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
प्रा आणि डॉ हे दोन शब्द नवा
In reply to प्रा आणि डॉ हे दोन शब्द नवा by बाप्पू
नावाआधी अशी विशेषणे लावणारे...
In reply to नावाआधी अशी विशेषणे लावणारे... by mayu4u
खोट्या
In reply to नावाआधी अशी विशेषणे लावणारे... by mayu4u
हं
In reply to प्रा आणि डॉ हे दोन शब्द नवा by बाप्पू
बाप्पू
In reply to बाप्पू by डॅनी ओशन
कागदरूपी डिग्री इंजिनीरिंग ची
जेव्हा नरसिंग राव सरकारने
प्रकरण पहिले.
तीन नवे कृषिकायदे
शेतकरी (अधिकार व संरक्षण) करार, किंमत हमी व शेती सेवा
कायदा सन २०२०.
हे तिन्ही कायदे एकमेकाशी पूरक आहेत
In reply to हे तिन्ही कायदे एकमेकाशी पूरक आहेत by Rajesh188
बरोबर....
सरकारला ईतकी शेतकऱ्यांच्या
शेती,पाणी,हवा ह्याच्या वर मालकी हक्क हवाच
In reply to शेती,पाणी,हवा ह्याच्या वर मालकी हक्क हवाच by Rajesh188
एका महान मानवाचे स्वप्न
उधोगाला संरक्षण व हमी भाव एक नाहीत ..
हे जरूर वाचा
In reply to हे जरूर वाचा by चलत मुसाफिर
खूप छान विश्लेषण केलंय या लेखात!
In reply to हे जरूर वाचा by चलत मुसाफिर
वाचला लेख
पास...
एकतर्फी ठरवून लिहला गेलेला लेख
In reply to एकतर्फी ठरवून लिहला गेलेला लेख by Rajesh188
तुमच्या अगाध ज्ञानापुढे नतमस्तक व्हायला होते प्रभू!
In reply to तुमच्या अगाध ज्ञानापुढे नतमस्तक व्हायला होते प्रभू! by अथांग आकाश
+1
मला अतिशय तोकडे ज्ञान आहे ह्या विषयात.