मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

शिवसेनेचे हे काय चाललय

विजुभाऊ · · काथ्याकूट
मुंबईत ज्या पद्धतीने महापालीकेने कंगना राणावतचे घर पाडले तोडफोड केली त्या वरून शिवसेनेला राजकारणापेक्षा रस्त्यावर मारामार्‍या कर्‍अण्यातच जास्त रस आहे असे दिसतेय. एक क्षण असे समजूया कंगना ने घरात परवानगीशिवाय बांधकाम केले होते. मात्र हायकोर्टाच्या कोविड च्या काळात डिसेंबर पर्यंत कोणतीही तोडफोड करू नये अशा आदेशानंतरही महापालीकेने तोडफोड केली. कंगना घरात नसताना तीला नोटीसीला उत्तर देण्यासाठी वेळही न देता ही कारवाई केली गेली. ते देखील ती मुंबई मधे नसताना. मुंबई महापालीकेला कंगना च्या घरात बाथरून च्या जागी ऑफीस केले ही बातमी मिळते मात्र वांद्रे स्टेशनच्या बाहेरच्या पाच पाच मजली अनधिकृत झोपड्या कधीच दिसत नाहीत. मुंबई महापालीकेला कंगनाच्या घरावर ज्या तातडीने कारवाई करता आली तितकी तातडी महापालीका रस्ते दुरुस्तीबाबतीत , स्वच्छतेबाबत का दाखवत नाही. शिवसेनेचे म्हणणे आहे की ही कारवाई शिवसेनेने नाही तर मुंबई महापालीकेने केली आहे. शिवसेनेला अशी स्वतंत्र कारवाई करायचा काय अधिकार आहे का? दुसरे म्हणजे महापालीकेतली शिवसेना ही वेगळी शिवसेना आहे का? शिवसेना ज्या पद्धतीने हे प्रकरण हाताळत आहे. ते पहाता स्टॅलीन च्या दडपशाही ची आठवण होते. या सगळ्या प्रकरणात मविआ चे सर्वेसर्वा तथाकथीत जाणते राजे सोयीस्करपणे मुग गिळून बसलेत. बी एम सी ही एक सरकारी संस्था आहे. त्यांनी केलेल्या कोर्टाच्या आदेशा विरुद्ध जाऊन अनधिकृत कारवाई च्या विरोधात कोर्टात दाद मागितली तर अधिकार्‍यांवर काही कारवाई होईल असे नाही. त्यामुळे अधिकारी निर्धास्त आहेत. त्यामुळे त्यांना जनतेवर अन्याय करायला परमीट मिळाले आहे असे दिसतेय शिवसेनेचे हे नक्की काय चालले आहे तेच समजत नाही. ते स्वतःच्या हातानेच स्वतःचे भवितव्य खणून काढताहेत

वाचने 109508 वाचनखूण प्रतिक्रिया 293

विजुभाऊ Sat, 09/12/2020 - 12:42
केवळ कोणी एक व्यंगचित्र काढले तर त्यासाठी एका ६५ वर्षाच्या नौदल अधिकार्‍यास मारहान करणॅ हे सेनेच्या कोणत्या संस्कारात बसते. बाळासाहेब ठाकर्‍यांनी मार्मीक मधे अशी अनेक व्यंगचित्र काढली असतील याचाही सेनेला विसार पडलाय. दुसरे म्हणजे ज्याला मारले तो नौदल अधिकारी होता हे लगेच समजणे शक्य नाही. पण एखाद्या ६५ वर्षाच्या माणसाला मारहाण करणे म्हणजे सेनेच्या लोकांनी त्याम्च्या अहंगंडामुळे साधी माणूसकीही सोडली आहे याचे ठळक उदाहरण आहे. आता यावर सेना म्हणू शकेल की ज्यानी त्या अधिकार्‍याला मारले ती सेनेची अधिकृत भूमीका नव्हती. दुसरे म्हणजे राऊत कोणालाही काहिही बोलले तरी ते चालते. अजितदादांना " मुतर्‍या तोंडाचे ' गटारातला कीडा असले शेलके शब्द वापरतात त्यावर राउतांना काय न्याय लावायचा. राउताना अक्कल नाही असे एकवेळ समजले तरी राउताचा धनी उद्धव ठाकरे यानीही त्या विरोधात कधी चकार शब्द काढला नाही. कम्गना हा विषय सम्पला असे म्हणताना सामना मधे राऊत लिहीतात " उखाड दिया" . म्हणजे यानी जीभ उचलून टाळ्यालाच काय अगदी पायाच्या तळव्याला लावायची मात्र इतर कोणी त्यावर काही बोलले की म्हणायचे की हा विषय आमच्यासाठी सम्पलाय. पूर्वी बाळासाहेब असताना सेने बद्दल ममत्व होते. मराठी माणसाचा आवाज अशी एक आशा वाटायची ( तीही फोल ठरवली गेली होती ) त्याम्च्या नंतरची इतकी भेक्कड भित्री असेल असे कधीच वाटले नव्हते

Rajesh188 Sat, 09/12/2020 - 13:48
कंगना ल प्रती उत्तर देवून सेने चे चुकलंच. कंगना च्या ऑफिस वर आता कारवाई करणे सेने च्या अंगलट आले. सुशांत सिंग केस तपास जलद गती नी न करून bjp ल हात घालायला जागा दिली हे पण हुकलेच असे आताची स्थिती बघून वाटणे साहजिक आहे. पण एक गोष्ट सर्व विसरत आहेत. राडा करण्यासाठी ,टीका करणाऱ्या लोकांना दम देवून गप्प बसवण्यासाठी प्रतेक पक्ष कडे एकादी बेनामी संघटना असते वरवर तिचा संबंध पक्ष शी नसतो पण ती कार्य त्याच पक्षाचे करत असते. राष्ट्रवादी कडे अशा बेनामी संघटना आहेत हे पण जवळ जवळ सर्व लोकांना माहीत आहे ते राडे करायचे काम करतात पण राष्ट्रवादी चे त्या मध्ये नाव येत नाही. Bjp कडे पण बजरंग दल,हिंदू महासभा आहे ते गौरक्षक म्हणून bjp चेच काम करतात. काँग्रेस कडे अनेक संघटना आहेत . फक्त राडे करण्यासाठी सेने कडे अशी सुविधा नाही सर्व त्यांनाच करावे लागते मग ते बदनाम होतात.

Gk Sat, 09/12/2020 - 13:58
कसले कार्टून होते म्हणे ? ठाकरे कुटुंब चांगल्या कार्टूनवर चिडेल असे वाटत नाही घरात 2 कार्टुनिस्ट आहेत , बाळासाहेब आणि राज

प्रसाद_१९८२ Sat, 09/12/2020 - 17:33
कुठल्या ही पक्षातील नेते कसे का असेनात. मला ते नाशिकचे आर्मस्ट्रॉंग काका फार आवडतात. मला हेच खाते हवे, तेच खाते हवे यासाठी कधीही ते भांडताना दिसत नाहीत. मिळेल त्या खात्यात, 'खायच्या' संधी ते बरोबर शोधून काढतात. आता करोना काळात झालेला 'तांदूळ घोटाळा' पाहा.

गोंधळी Sat, 09/12/2020 - 21:23
भक्त लोकांना विचारायच आहे की त्यांना विकासाच राजकारण पाहीजे की असे मुर्ख भावनिक राजकारण पाहीजे आहे. कारण हे सर्व तुमच्या सपोर्टवर चालु आहे. दिल्ली निवड्नु़कांच्या वेळी असेच केल गेल होत पण दिल्लीकरांनी विकासाला निवडल. भक्त लोकांना विनंती आहे की चुकीच्या गोष्टींना डोक्यावर घेउ नका. मी कोण्त्याही पक्षाचा समर्थक नाही आहे.

In reply to by गोंधळी

बरोबर आहे तुमच, लोकांनी विकासलाच निवडलं पाहिजे. देशात २०१४ आणि २०१९ साली लोकांनी विकासा लाच निवडून दिलंय. राज्यात पण विकासलाच निवडलं होतं पण धोका दिला ती गोष्ट वेगळी. ज्या दिल्लीत लोकांनी विधानसभे साठी विकासाला निवडून दिल त्याच लोकांनी लोकसभे साठी ही विकासलाच निवडून दिलंय पण ते कदाचित दिसत नसावं. आपल्या आवडीचा पक्ष जिंकला की विकास जिंकला आणि ना आवडता जिंकला की भावनिक मुद्दे जिंकले हे बरोबर नाही. आपला तो बाबू दुसऱ्याच ते कार्ट.

In reply to by रात्रीचे चांदणे

Gk Sat, 09/12/2020 - 22:06
दुसऱ्या पक्षांना निवडून दिले तरी तात्या विंचू ओम भग भुगे करत शिरतो व परत तात्या विंचूचेच सरकार येते

In reply to by रात्रीचे चांदणे

गोंधळी Sun, 09/13/2020 - 11:33
मी कोण्त्याही पक्षाचा समर्थक नाही आहे. मी एक सामान्य नागरीक म्हणुन जे वाटते ते लिहील आहे. मल वाटत आपण कुठल्या पक्षाचे समर्थक म्हणुन नाही तर तटस्थ नागरीक म्हणुन विचार केला पाहीजे तरच आपल्याला वस्तुस्थीति कळेल. जर विकास राजकारणा चा मुद्दा असेल तर बकिचे अनावश्यक भावनीक मुद्द्यांना महत्वच मिळाल नसत. भारतीय जनतेने आता emotional होन सोडुन logical व्ह्ययला पाहिजे.

विजुभाऊ Sat, 09/12/2020 - 22:29
आत्ताच बातमी वाचतोय. माजी नौदल अधिकार्‍याला मारहाण प्रकरणी संजय राउतांनी " ती एक स्वाभाविक प्रतिक्रीया आहे" असे मत प्रदर्शीत केले आहे. ही अशी प्रतिक्रीया इतरांनी व्यक्त केली तर ? स्वतःचा मुख्य मंत्री असूनही सेना केवळ दंगा राडे यातून बाहेर येताना दिसत नाहिय्ये. एकूणच सेनेचे राजकारण पाहिले तर राजकारण कमी आणि टपोरीगिरी जास्त असेच दिसतय.

Gk Sat, 09/12/2020 - 22:58
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना जाणीवपूर्वक लक्ष्य करून त्यांना बदनाम करण्याच्या बातम्या प्रसारित होत असल्याने ‘रिपब्लिक टीव्ही’ व ‘रिपब्लिक टीव्ही भारत’ या दोन वाहिन्या दाखवणे सुरू ठेवल्यास लोकांच्या रोषाला सामोरे जावे लागेल, अशा आशयाचे म्हणणे मांडत केबल चालकांना या वाहिन्या दाखवण्यास मनाई करणारे पत्र शिव केबल सेना या संघटनेने १० सप्टेंबर रोजी अनेक केबल चालकांना पाठवल्याचे म्हटले जात आहे. त्या पार्श्वभूमीवर, या दोन वाहिन्या चालवत असलेल्या ‘एआरजी आऊटलाय प्रायव्हेट लिमिटेड’ या कंपनीने ज्येष्ठ वकील निखिल साखरदांडे यांच्यामार्फत तातडीच्या रिट याचिकेद्वारे उच्च न्यायालयात धाव घेतली होती. ‘अशा वादांविषयी दाद मागण्याचा मंच हा टेलिकॉम डिस्प्युट्स सेटलमेंट अँड अॅपलेट ट्रिब्युनल (टीडीसॅट) हा आहे. मात्र १८ सप्टेंबरपर्यंत कामकाज बंद असल्याचे या मंचाने अधिसूचनेद्वारे नुकतेच स्पष्ट केले आहे. म्हणून आम्ही उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. आमच्या वाहिन्या दाखवणे बंद होऊ नये यासाठी राज्य व केंद्र सरकारला निर्देश द्यावेत’, अशी विनंती कंपनीतर्फे अॅड. साखरदांडे यांनी न्या. नितीन जामदार व न्या. मिलिंद जाधव यांच्या खंडपीठासमोर ‘व्हिडिओ कॉन्फरन्सिंग’द्वारे झालेल्या सुनावणीत केली. तर ‘याचिकादारांचे गाऱ्हाणे हे खासगी संस्थेविरोधात असल्याने त्याविषयी रिट याचिकेद्वारे दाद मागता येऊ शकत नाही. त्यांना अन्य मार्ग असून ते दिवाणी दावा दाखल करू शकतात’, असे म्हणणे सरकारी वकील ज्योती चव्हाण यांनी मांडले. https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/mumbai-high-court-rejected-the-plea-of-the-company-operating-republic-tv/articleshow/78080805.cms

Rajesh188 Sun, 09/13/2020 - 02:55
शिवसेना आता सत्तेत नेहमीच राहणार आणि विरोधी पक्षाची भूत जी सर्व व्यापी आहेत ते सेने ला त्रास देणार कधी अर्णव च्या रुपात,कधी कंगना च्या रुपात. सेने नी पण आता भूत निर्माण करावी आपल्या लोकांना वेगवेगळ्या नावाच्या संघटना निर्माण करण्यास बळ देवून त्यांना उभ करावे. आणि शिवसेनेची भूत निर्माण करावी वेगवेगळ्या नावांनी भुतं शी भुताच लढतील आपण नाम निराळे. काश्मीर मध्ये पाकिस्तान सैनिकांची भुतं च अतिरेकी बनून भारताशी सर्व नियम मोडून लढतात. ते अतिरेकी नसतात तर पाकिस्तान चे सैनिक च असतात. सर्व जग च हा फॉर्म्युला वापरात आहे. तेव्हा सेने नी तोडफोड,मारझोड,मोर्चे,ही सर्व काम भुतांकडे सोपवावित आणि स्वतः माणूस राहवे.

In reply to by Rajesh188

Rajesh188 Sun, 09/13/2020 - 03:20
अर्णव,कंगना ही भज्जी खाव आहेत ज्यांची plate त्यांचे गुणगान. सेनेचा भज्जी खाव लोक जवळ बळगवित. बिल त्यांचे पैसे आमचे. आपले फक्त पैसे जातील पण बिल त्यांचे फाडले जाईल.

In reply to by Rajesh188

शिवसेनेकडे शिकलेला-मध्यममार्गी मतदार नाही हे त्याचे कारण आहे रे राजेशा . सुरुवातीच्या काळात तो होता- म्हणजे ८७-८८ सालापर्यंत पण सेनेने मराठी झूल फेकली व हिंदुत्वाची झूल पांघरून राजकारण सुरु केले. मग हा मतदार हळुहळु भाजपाकडे वळला. शिवसेनेला जर भाजपा/कॉन्ग्रेसशी टक्कर द्ययची असेल तर आधी विकासाचे राजकारण त्यानी चालु करावे. 'सामना'/भाषणातून खंजिर्/कोथळा/किल्ल्ला असली भाषा बंद करावी. लोकाना ईतिहासात रममाण होण्यापासुन परावृत्त करावे. 'आम आदमी' पक्षाचे उदाहरण घ्या. फक्त आठ वर्षे झाली आहेत त्या पक्षाला. त्यानीही चुका केल्या पण त्या त्याना समजल्या व त्यानी आपली धोरणे आखली. आज त्यांचे विरोधकही त्यानी केलेली कामे मान्य करतात. महाराष्ट्रापुरते असाल तर राज्याच्या समस्यांपुरतेच बोला. द्रमुक पक्षाचे नेते कधी कश्मिर्/अयोध्या प्रकरणावर बोलताना दिसतात का ? उद्धव्/संजय राउत 'सामना'तून ईमरान खान/ट्रम्प ह्याना ईशारे का देतात? प्रत्येक समस्येसाठी मुस्लिम्/उत्तर भारतीय लोकाना जबाब्दार ठरवण्याचे सोडुन द्या. स्थानिक लहान उद्योग राज्य सरकार का निर्माण करू शकत नाही? हे जे काही कथित लोंढे म्हणता ते कॉन्ग्रेसने आखलेल्या चुकीच्या ओद्योगिक धोरणांमुळेच आले ना ? मग त्यासाटी काँग्रेसला/राष्ट्र्वादीला जाब कधी विचारणार?

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

Gk Sun, 09/13/2020 - 08:21
कुर्डुवाडीतून येऊन मुंबईत पाणीपुरीचा ठेला घालायला काँग्रेसने बंदी घातली का ? बांधकामे बंद पडलीत , कामगार नाहीत म्हणे , मग मराठी कामगार भेटत का नाहीत ??

In reply to by Gk

सुबोध खरे Sun, 09/13/2020 - 13:12
मोगा खान बिहार पश्चिम बंगाल मधील गरिबी पाहिली आहे का तुम्ही? बिहार मध्ये मैलोगणती केवळ शेती आणि गावं. उद्योग नाहीतच. दोन वेळच्या जेवणाची भ्रांत असलेले लोक मुंबईत येऊन 10 x 10 च्या खोलीत 15 जण राहतात. इतकी वाईट परिस्थिती कुर्डुवाडीत नाही. 1998 साली बिहार मध्ये शेतमजुराला दोन वेळचे जेवण आणि 1800 रुपये मिळत. महिन्याला नव्हे वर्षाला. मी स्वतः तेथील भयानक परिस्थिती पाहिली आहे. ओडिशा मध्ये दुष्काळ पडल्यावर लोक उंदीर खाउन जगताना पाहिले आहे.

In reply to by सुबोध खरे

Gk Sun, 09/13/2020 - 14:14
एका खोलीत 15 रहातात , कारण त्यांच्या कामातून , चहा विकणे , पाणीपुरी , द्रायव्हर वगैरे कामात त्यांना पगारच तितका मिळतो , पण असे ते जन्मभर रहात नाहीत , हळूहळू भाड्याचे घर , मग उपनगरात घर वगैरे घेतात , पुढची पिढी सामान्य मराठी कुटुंबाइतके सुखात रहाते , कुठल्याही सोसायटीत आज 20 ते 30 % लोक मराठीच असतात ह्या सगळ्याला काही काँग्रेसच जबाबदार आहे , असे नाही आणि लोंढे तर गुजरातवरूनही येतात , मग त्याला मोदी , गुजरात भाजप जबाबदार का ? स्वतः मोदींनी स्वतःची खासदारकी वारांनशीतून घेतली अन गुजरातची एक सीट वाचवली , पंतप्रधानकी सांभाळताना मतदार संघ फाफलला तर फाफलला , आणि भक्ताडे म्हणतात माँ गंगा ने बुलाया है, मग माँ साबरमती , माँ नर्मदा ह्या काय जिनपिंगला हाक मारतात काय ??

In reply to by Gk

Gk Sun, 09/13/2020 - 14:15
कुठल्याही सोसायटीत आज 20 ते 30 % लोक अमराठीच असतात ------ युज इट ऑर लूज इट

In reply to by Gk

सॅगी Sun, 09/13/2020 - 15:08
पंतप्रधानकी सांभाळताना मतदार संघ फाफलला तर फाफलला
पण नाही ना फाफलला? झालं तर मग....
मग माँ साबरमती , माँ नर्मदा ह्या काय जिनपिंगला हाक मारतात काय ??
हे नाही माहित...पण रागा किंवा सोगांना नक्कीच हाक मारत नसाव्यात....

In reply to by Gk

सुबोध खरे Sun, 09/13/2020 - 13:12
मोगा खान बिहार पश्चिम बंगाल मधील गरिबी पाहिली आहे का तुम्ही? बिहार मध्ये मैलोगणती केवळ शेती आणि गावं. उद्योग नाहीतच. दोन वेळच्या जेवणाची भ्रांत असलेले लोक मुंबईत येऊन 10 x 10 च्या खोलीत 15 जण राहतात. इतकी वाईट परिस्थिती कुर्डुवाडीत नाही. 1998 साली बिहार मध्ये शेतमजुराला दोन वेळचे जेवण आणि 1800 रुपये मिळत. महिन्याला नव्हे वर्षाला. मी स्वतः तेथील भयानक परिस्थिती पाहिली आहे. ओडिशा मध्ये दुष्काळ पडल्यावर लोक उंदीर खाउन जगताना पाहिले आहे.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

शेर भाई Sun, 09/13/2020 - 19:33
रात्री बाईकवरून जाताना ऐरोलीच्या / मानखुर्दच्या खारफुटीमुळे पूर्वी ज्या प्रमाणात थंडी वाजायची ती आता जाणवत देखील नाही. या मागची गंमत अशी आहे कि प्रत्येक नगरसेवकाने, आमदाराने खारफुटीमध्ये आपापल्या नावाने झोपडपट्ट्या निर्माण करून ठेवल्या आहेत. या झोपडपट्ट्या अनधिकृत असून सुद्धा त्यांना वीज, पाणी वगैरे सगळे फायदे देऊन प्रत्येक नगरसेवकाने, आमदाराने आपली जागा पक्की करून ठेवली आहे. या सगळ्यांना आपल्या सारख्या सर्वसामान्य मतदाराची गरजच आता नाही आहे.

गोंधळी Sun, 09/13/2020 - 11:32
मी कोण्त्याही पक्षाचा समर्थक नाही आहे. मी एक सामान्य नागरीक म्हणुन जे वाटते ते लिहील आहे. मल वाटत आपण कुठल्या पक्षाचे समर्थक म्हणुन नाही तर तटस्थ नागरीक म्हणुन विचार केला पाहीजे तरच आपल्याला वस्तुस्थीति कळेल. जर विकास राजकारणा चा मुद्दा असेल तर बकिचे अनावश्यक भावनीक मुद्द्यांना महत्वच मिळाल नसत. भारतीय जनतेने आता emotional होन सोडुन logical व्ह्ययला पाहिजे.

In reply to by गोंधळी

तुमचं हे म्हणणं मान्य आहे की लोकांनी विकासा साठीच मतदान करायला पाहिजे. पण दिल्लीत केजरीवाल जिंकले की विकासाला मतदान आणि त्याच दिल्लीत लोकसभेत भाजपा चे खासदार जिंकले की भावनिक मुद्दे, हे योग्य नाही. मद्यप्रदेश, राजस्थान मध्ये पण हेच झालं. विधानसभेला लोकांनी काँग्रेस ला आणि लोकसभेला भाजपा ला मतदान केलं. त्यामुळे जेवढे तटस्थ आपण आपल्याला हवा असलेला पक्ष जिंकला की असतो तेवढेच तटस्थ आपण आपल्याला नको असलेला पक्ष जिंकला तरी असायला हवं.

In reply to by रात्रीचे चांदणे

गोंधळी Sun, 09/13/2020 - 15:20
२०१४ ला मलाही वाट्ल होत की चला वाजपेयीं नंतर कोणीतरी चांगला पं.प्र. देशाला मिळाला. पण दोनच वर्षात त्यांची फेकाफेकी बाहेर यायला लागली. मोठ्या प्रमाणात मार्केटींग करणे व भावनीक मुद्दे हेच मोदी सरकार्चे USP आहेत नाहितर मोदींच्या गुजरात मधे विकास वेडा झाला नसता. आणि २०१९ निवडनुक ही पुलावामा च्या मुद्द्यावर लढवली. २०१४ नंतर भाजपा चा मोदीपा झाला आहे. पण यात मोदींना काय दोष देणार आपली लोकशाहीच तेव्हडी परीपक्व झालेली नाही. त्यामुळे जनतेला अनावश्यक कंगना सार्ख्या मुद्द्यांवर नाचवल जात आहे. आता त्या निवृत्त नौदल अधिकार्‍यास मारहाण झाली. यामध्ये परत सामान्य जनतेलाच त्रास. त्या कंगना ने मुद्दाम शिवसेनेला उचकावल आहे.या मध्ये सामान्य जनतेला पडायची काहिच गरज नव्हती. हे सगळ बिहार निवड्नुकी च्या वातावरण निर्मिती साथी केल जात आहे. कारण विकास आहे कुठे???

In reply to by Gk

सुप्रिम कोर्टाने परवानगी दिल्यावरच ते बांधकाम तोडले होते रे जिक्या. https://timesofindia.indiatimes.com/city/ahmedabad/illegal-portion-of-sanjiv-bhatts-house-demolished/articleshow/65204743.cms दुसरे म्हणजे अनधिक्रुत बांध्कामाची तक्रार अहमदाबाद पालिकेकडे २०१२ साली होती. २०१६ मध्ये नोटिस् दिली होती. व जुले २०१८ मध्ये बांधकाम तोडले. तेव्हा मोदी पंतप्रधान होते.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

Gk Sun, 09/13/2020 - 14:56
कंगनालाही 2018 ला नोटीस दिली होती अन प्रत्येक हगल्या मुतल्याला सुप्रीम कोर्ट पाहिजे तर मग सगळीकडे सुप्रीम कोरटेच काढावीत

In reply to by Gk

४ तासाची नोटिस देउन पाडले ही थापेबाजी होती. हे सांगतेय. ड्रग्ज मुंबईत गेले अनेक वर्षे मिळतात.. हाय प्रोफाईल पार्ट्यंमध्ये ती वाटलीजातात. ही त्याना मिळवून देण्यात मुंबई पोलिसाना 'आपला वाटा' मिळतो. पोलिस-अंडरवर्ल्ड-बोलिवूड अशी ही अभद्र युती आहे. ती मोडून काढण्याचे काम होताना दिसत आहे. त्याचे आपण स्वागत केले पाहिजे. सुशांत मृत्यु प्रकरणात मुंबई पोलिसानी काय दिवे लावले ते आपण पाहिले. तपास चोख असता तर हे सगळे टळले असते. ह्या अशा संस्था हगल्या मुतल्यासारखा तपास करतात म्हणून सुप्रिम कोर्टात जायची वेळ येते.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

शा वि कु Sun, 09/13/2020 - 17:34
सुशांत मृत्यु प्रकरणात मुंबई पोलिसानी काय दिवे लावले ते आपण पाहिले.
काय ? हे ड्रग्ज संबंधित मुळात नव्हतंच. त्यामुळे मुंबई पोलिसांवर कितपत दोष मढता येईल ?

In reply to by Gk

सुबोध खरे Sun, 09/13/2020 - 17:00
कंगना चे बांधकाम तोडल्याबद्दल आक्षेप नाही तर मुंबईत 60000 अनधिकृत बांधकामे आहेत त्याबद्दल महापालिकेने इतकी तत्परत दाखवली नाही आणि येथे 24 तासाच्या आत जे सी बी बुलडोझर आणून बांधकाम तोडल्याबद्दल आहे. हे उच्च न्यायालयाने आपल्या अंतरिम निकालात स्पष्टपणे म्हटले आहे म्हणजे आम्हाला विरोध कराल तर आम्ही काय करू शकतो याचे शक्तिप्रदर्शन आहे. विरोधाचा आवाज दाबून टाकण्याच्या या वृत्तीबद्दल आक्षेप आहे.

In reply to by सुबोध खरे

Gk Sun, 09/13/2020 - 17:08
एकदा 2018 ला नोटीस दिली की जेसीबी मुन्शीपालतीच्या वेळेनुसार कधीही येईल, तुमच्या मर्जीने जेसीबी यायला ती काय एमबुलन्स आहे ?

In reply to by सुबोध खरे

Gk Sun, 09/13/2020 - 17:24
कंगना चे बांधकाम तोडल्याबद्दल आक्षेप नाही 60000 बांधकामे पाडायची असताना हिचेच का पाडले ? मग आता 60000 जेसीबी एकाच वेळी पाठवायचे ? आणि हा आक्षेप कोर्टाने घेणे हास्यस्पद आहे , कोर्टातही 60000 बलात्कार , फसवणुकीच्या अन पाडापाडीविरोधात कोर्ट केसेस पेंडिंग असतीलच की, मग हिची केस ताबडतोब का घेतली म्हणे ? जशी ही डिस्करीशनरी पॉवर कोर्टाला आहे तशीच बीएमसीलाही असेलच की

In reply to by Gk

सॅगी Sun, 09/13/2020 - 17:41
एक जेसीबीने एका महिन्यात कमीत कमी १० तरी अनधिक्रुत बांधकामे पाडता येतील. . . . या न्यायाने आतापर्यंत मुंबईतली सारी (किंवा किमान अर्धी तरी) अनधिक्रुत बांधकामे पाडली जायला हवी होती...नै का??? डिस्क्रिशनरी पॉवर जरी असली तरी कामाच्या वेळेत कामच झाले पाहीजे...झोपा काढण्यासाठी डिस्क्रिशनरी पॉवर दिलेली नाही....

In reply to by सॅगी

Gk Sun, 09/13/2020 - 20:17
बिंधास्त अतिक्रमण करा. आणि कारवाई झाला की राज्यपालाला भेटा

In reply to by Gk

सुबोध खरे Sun, 09/13/2020 - 22:07
आणि हा आक्षेप कोर्टाने घेणे हास्यस्पद आहे. रिट अर्ज किंवा रिट अधिकारकक्षा हा उच्च न्यायालयाचा घटनात्मक अधिकार आहे असा अधिकार इतर कोणत्याही संस्थेला नाही अगदी सर्वोच्च न्यायालयाला सुद्धा. एकदा वाचून पहा Discretionary power तर साध्या वाहतूक पोलिसालासुद्धा असते पण ती पूर्णपणे अधोरेखित आणि मर्यादित असते. अभ्यास वाढवा

Rajesh188 Sun, 09/13/2020 - 14:44
कंगना मुंबई ला pok म्हणली तर म्हणू ध्या. Pok हा भाग भारतील किती राज्यांपेक्षा सुंदर आहे.निसर्ग रम्य आहे.

Rajesh188 Sun, 09/13/2020 - 15:14
मुंबई महाराष्ट्र ला उपमा दिल्या बद्द्ल. Pok म्हणजे आझाद काश्मीर. आझाद काश्मीर ला स्वतःच पंतप्रधान असतो, आझाद काश्मीर ला स्वतःचे सर्वोच्च न्यायालय आहे. 3.2 billion dollar ची gdp aahe त्यांची. तेथील लोक 100 वर्ष जगतात. कंगना महाराष्ट्र pok बोलली च आहे तर मोदी ना सांगून एवढं बदल करायला सांग. महाराष्ट्र ला पण स्वतःचे सर्वोच्य न्यायालय, महाराष्ट्र च्या मुख्य मंत्री हा महारष्ट्र चा पंतप्रधान असेल अशी सुविधा द्यायला सांग.

Gk Sun, 09/13/2020 - 17:16
नेव्हीमधल्या माणसाला मारले म्हणून नाचत होते, तो इंडियन आर्मी नाही मर्चंट नेव्हीतला आहे. पोस्टमनाला बीएमसीवाला मर्चंट नेव्हीला नेव्हीवाला गांजेडी बाईला वीर राणी इथे कुणाला काय करतील नेम नाही राहिला

In reply to by Gk

सॅगी Sun, 09/13/2020 - 17:30
इंडियन आर्मी नाही मर्चंट नेव्हीतला आहे.
आर्मी = जमीनीवर युध्द करणारे नेव्ही = पाण्यात/समुद्रात युध्द करणारे फरक समजुन घ्या हो Gk काका

In reply to by Gk

सुबोध खरे Sun, 09/13/2020 - 22:10
मर्चंट नेव्ही चा नव्हे तर भारतीय नौदलातून निवृत्त झालेले पेटी अधिकारी आहेत ते CHELP(Chief petty officer electrical power) हा हुद्दा होता. त्यांना बेदम मारहाण केल्यामुळे डोळ्यात रक्तस्त्राव झाला आहे. Subconjunctival hemorrhage. त्यासाठी ते नौदलाच्या अश्विनी रुग्णालयात भरती झालेले होते.

In reply to by Gk

मामाजी Mon, 09/14/2020 - 08:33
निरक्षर राजा आणि अडाणी जनता हे आपण आपले स्वत: बद्दल चे केलेले वर्णन एकदम योग्य आहे.आपले कंपांउडरप्रेमी राजे बेताल वक्तव्य करतात आणि आपल्या सारखे अडाणी पाठीराखे कोणताही शहानिशा न करता नाचायला लागतात व नंतर तोंडावर आपटले की पळून जातात..

शिवसेनेला सत्ता कधीही पचत नाही. सत्ता आली की ते माजतात. हे वास्तव आहे, इतिहास आहे. त्यात ही ओरबाडून घेतलेली सत्ता मग काय विचारता.. दोष द्यायला आहेच कॉन्ग्रेस, भाजपा. राष्ट्रवादी नाही ते सध्या अन्नदाते आहेत. पाच वर्ष (किंवा यांनी स्वतः राजकिय आत्महत्या करे पर्यंत) हा तमशा बघण्याव्यतिरिक्त जनता काहीही करु शकत नाही

In reply to by मिसळलेला काव्यप्रेमी

सॅगी Sun, 09/13/2020 - 17:32
त्यात ही ओरबाडून घेतलेली सत्ता
चोरलेली सत्ता असा एक माफक बदल सुचवतो.

In reply to by मिसळलेला काव्यप्रेमी

सॅगी Sun, 09/13/2020 - 17:56
पण बहुमत युतीला असताना आघाडीवाल्यांच्या पाया पडून दिवसाढवळ्या सत्तेची चोरी केली हे सुचवायचे होते. बाकी तुमच्या मतांशी सहमत आहेच..

In reply to by सॅगी

Gk Sun, 09/13/2020 - 20:27
सुरुवात तर फडणवीसने केली पार्टनरला सत्तेत वाटा दिला नाही ( आणि हे म्हणे तुम्हाला 15 लाख देणार ) राष्ट्रवादी हा दुसरा पार्टनर निवडला. मग तीच खेळी सेनेने केली , पण इथे निदान मुमं पदाबाबत तरी एकवाक्यता आहे.

In reply to by Gk

सॅगी Sun, 09/13/2020 - 21:43
पार्टनर आता सत्तेत येउन काय उजेड पाडतोय ते दिसतंच आहे....बरं केलं सत्तेत वाटा दिला नाही ते... आणि कमवा की १५ लाख तुमचे तुम्हीच? कोणी अडवलंय??

In reply to by सॅगी

Gk Mon, 09/14/2020 - 07:11
फडणवीस बिहारला गेले , भाषण द्यायला व चिठ्ठ्या वाटायला . आता 5 वर्षात बिहारचा ब्रिस्बेन होईल

In reply to by सॅगी

गणेशा Mon, 09/14/2020 - 08:56
Bjp आनि bjp समर्थकांनी हाच अहम बाजूला ठेवला पाहिजे कि सेनेने रडत खडत त्यांच्या मागुन आलेच पाहिजे होते.. जर युती धर्म पाळायचा असला तर तो दोघांनी पाळला पाहिजे.. आणि सेनेचे पुन्हा शुन्य येतील कि जास्त हे जनता उत्तर देईलच. पण त्यांनी भाजपाने जसे म्हणेल तसेच वागले पाहिजे हा अहम कशा साठी? युती करायला bjp च गेली होती ना मातोश्री वरती? त्या आधी शिवसेना वेगळी लढलेली होतीच ना? कितीदा तेच तेच.. म्हणे ओरबाडून, मग कर्नाटक, गोवा येथे ओरबाडलेली नाही का सत्ता bjp ने? आणि काँग्रेस ची लोकं फोडून भर करोना काळात सत्तेचेच डोहाळे मध्य प्रदेश मध्ये लागलेले होतेच कि.. आणि महाराष्ट्राचे बोलायचे झाल्यास, काँग्रेस बरोबर हातमिळवणी शिवसेनेची चूक.. किंवा जूने शिवसैनिक दुखावलेत वगैरे.. मग ज्या राष्ट्रवादीला, काँग्रेस ला भ्रष्ट म्हणताना हयात घालवली, त्यांनाच आपल्या पक्षात घेऊन उमेदवारी दिल्याने जूने bjp समर्थक दुखावलेत असे का नाही? किती तरी उमेदवार हे मूळचे काँग्रेस राष्ट्रवादी चे होते, मग ते चालते का? अजित पवार बरोबर युती करून, एका दिवसात 9 केसेस बंद केल्यात bjp ने त्याचे काय? तेंव्हा कोणी दुखावत नाही..? त्यामुळे स्वतः नीट असल्यास bjp आणि समर्थकांनी इतरांना बोलावे. नाही तर त्यांनी तरी विकासावर प्रश्न विचारावेत.. उजेड कोणीच पाडला नाहि.. 2014 ला कुठे नेहून ठेवला महाराष्ट्र माझा, यातल्या प्रश्नांची उत्तरे 2019 ला निवडणुकीला सामोरे जाताना bjp का देऊ शकली नाही, ह्याचे आपण का काही पाहत नाही? 2019 ची महाराष्ट्र निवडणूक काश्मीर 370 मुद्दयांवर लढवायची काय गरज होती? असो..असे अनेक मुद्दे आहेत.. आजकाल लोकांनी एका पक्षाची पालखी वाहायची ठरवलेली असल्याने त्यांना दुसरे चूकच दिसतात, जे चूक ते चूक, जे बरोबर ते बरोबर हा सारासार विचार जो पर्यंत जनता करणार नाही, तो पर्यंत bjp, सेना, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि इतर या असल्या अंध समर्थकांना पुढे रेटून आपल्याला जे पाहिजे तेच करत राहणार.. असो

In reply to by Gk

चौकस२१२ Mon, 09/14/2020 - 08:16
जुना वाद उकरलाच आहे तर आम्ही पण त्या गावघाणीत लोळून घेऊ म्हणतो... "पार्टनरला सत्तेत वाटा दिला नाही " म्हणजे मुमु पद ना? अरे तुमचे ५६ आणि भाजपचे १२० मग मुमु कसे रे मिळणार...नुसत्या डरकाळ्या का गणित चंद्रावर शिकला ? मग धूर्त काकांनी शिवसेनेचा वाघ ( म्याव करणारा) सोन्यताईंकडे घेऊन नेला आणि "मांडवली केली" ( मध्यलामध्ये पुतण्याने का "रात्रीस खेळ केला " आणि त्याला फडणवीसांपासून मोदी आणि शहा कसे तयार झाले/ गंडले हे २१ वय शतकातले एक गूढ कधी कळणार कोन जाणे.. काकांचीच फूस असे म्हणतात तर असा तमाशा ते करतील असे वाटत नाही...त्यांना भाजपला बाहेरून पाठिंबा देणे तर सहज शक्य होते मग सोनोयताईंचे तोंड पण बघावे लागले नसते पण त्यांनी तसे का केले नाही? खरंच पुतण्याने काकांचा मामा ( १-२ दिवन्संपुरता ) केला काय ?)

In reply to by चौकस२१२

शा वि कु Mon, 09/14/2020 - 08:48
आरोप काय होते हे बघण्याचे तरी कष्ट घ्या बचावला येण्यापूर्वी ! "२.५ वर्ष सेनेचा मुख्यमंत्री असेल, असे अमित शहांनी वचन दिले होते" असा आरोप आहे सेनेचा. त्यात ५६ आणि १२० चा काय हो संबंध ? (आता सेना खोटारडी आणि फडणविस/शहा खर्रेखुर्रे असलं काही नका सांगू. आपल्याला खरं काय माहित नाही हेच खरं आहे.) नाही तुम्हाला तुमच्या पूजनीय नेत्यांचे रक्षण करायचे आहे जरूर करा, पण उगाच उसना आवेश आणून काहीही बोलू नका. बादवे, शिवसेनेचा वाघ म्याव करतो म्हणजे काय ? गुरकावता पाहिजे म्हणजे काय ? हि आताची तोडफोड आणि हाणामारी गुरकावत्या वाघाचीच लक्षणे आहेत. सो मेक अप योर माईंड. हे जे चाललंय ते हवं का नको.

In reply to by शा वि कु

चौकस२१२ Mon, 09/14/2020 - 09:15
अहो आंधळा बचाव नाही करत आहे, औटघटकेचा सरकार बनवताना "भाजप ने लाज सोडली हे मान्य" करूनच बोलतोय.. ते चुकलंच त्यांचं घाणेरडे वागले ( अजित पवार काय वागले त्या पातळीवर भाजपने कशाला जायचा?).. बाकी मी पाहिलेलंय लोकशाहीत तरी १२०/५६ अश्या परिस्थिती १२० चाचा मुख्य असतो हे साधा गणित आहे. अमित शहाणी खरंच अशी ग्वाही दिली होती का? आणि हे सगळं उघड आधी ठरतेआणि जनतेला कळवले असते ( परिपक्व लोकशाहीत) शिवसेनेला काह्ही करून आपणच मुख्य हे करायचे होते..... आपण तर बुवा सेनाला १० पैकी २ भाजपला १० पैकी ४ आणि द्यायचेच तर राष्ट्रवादीला १० पैकी ७ गन देणार ( ७ एक तर आलेली साधनही त्यांनी वापरली.. त्यात काही चूक नाही निर्लज्ज पण असेल तर तो हाच कि दगाबाजी करणाऱ्याला परत उपमुख्यमंत्रीपद दिला.. पण राष्ट्रवादी पक्ष कुठाय ते तर एक घराणं मग केला पुतण्याला माफ.. जनतेचा काही संबंध नाही ) सेनायचवागाह्चे म्याऊ चा अर्थ असा कि "स्वबाल वैगरे" गर्जणारा वाघ शेवटी काँग्रेस चाय साथीत गेलं म्हणून म्याऊ....उपहासात्मक

In reply to by चौकस२१२

कपिलमुनी Mon, 09/14/2020 - 10:32
शाह समोर उठा स्पष्ट बोलले होते , की निम्मा वाटा म्हणजे सर्व पदाचे समसमान वाटप ! पूर्वी इथं व्हिडीओ पण डकवले होते, तेव्हा भक्त गण गायब झाले होते. बहुधा गणेशा च्या धाग्यावर चर्चा झाली होती

In reply to by कपिलमुनी

चौकस२१२ Mon, 09/14/2020 - 14:57
युती मध्ये जपर्यंत आमूलाग बदल होत नाही तोपर्यंत धाकटा भागीदार मोठा भहगीदार हे असणारच १९२३ पासून असलेली एक युती मला माहित आहे ती कधी देशाच्या सत्तेत आली कधी नाही पण फुटली नाही आणि असा तमाशा करून तर नाहीच पण ती भारताबाहेरील आहे त्यामुळे उगाच " भारताशी काय संबंध" हे ऐकायला नको म्हणून सोडून देऊ... अर्थात जगातील संसदीय लोकशाही या व्याप्तीत बोलायचे तर ते उदाहरण बघू शकतो जाऊदे याचा परिणाम दोन्ही पक्षांवर होणार (राऊतांसारख्यांची दिव्य विधाने ऐकून सेनेचा सच्चा विचारवंत पाठीराखा सुद्धा तोंड लपवून बसलेला असेल ) आणि फायदा पवार कुटुंबाचा होणार हेच दिसतंय.. नशीब राज्याचं

Rajesh188 Sun, 09/13/2020 - 18:14
ज्या पक्षाकडे बहुमत त्याची सत्ता हाच नियम आहे. ज्या उमदेवराला निवडणुकीत प्रतिस्पर्धी उमेदवार पेक्षा जास्त मतं मिळतील तो आमदार. मग ती मत कशी मिळवली हे बघितल जात नाही ओरबाडून घेतली की दम देवून की खोटे बोलून. आपल्या आमदार होण्याच्या पद्धतीत च दोष आहे . त्या मुळे ओरबाडून सत्ता मिळवली असे नाही म्हणता येणार.

In reply to by Rajesh188

आनन्दा Mon, 09/14/2020 - 06:53
खरे आहे, कायदा हे बघत नाही, पण मतदार बघतो, त्यामुळे दूरगामी राजकारण करणारे तात्कालिक फायद्यासाठी इतके रसातळाला जात नाहीत.. आज सत्ता आहे, 5 वर्षांनी काय? राष्ट्रवादीकडे त्यांचे बालेकिल्ले आहेत, तुमच्याकडे आहेत का? आता बदलत्या परिस्थितीत एकटे लढून मनसेपेक्षा अधिक जागा तरी येणार का तुमच्या?

In reply to by आनन्दा

Rajesh188 Mon, 09/14/2020 - 12:14
He सत्य तिन्ही पक्षाला माहीत आहे. तिन्ही पक्षा ना सामान मुद्ध्य वर एकमत घडवून सामान कार्यक्रम ठरवून निवडणुकी ला सामोरे जावे लागेल. सेने ला हिंदुत्व सोडून देण्या शिवाय पर्याय नसेल. आणि हिंदुत्व च सोडले तर सेनेत वेगळे असे काही राहणार नाही.भूमिपुत्र च्या भूमिकेला राष्ट्रवादी पाठिंबा देईल पण काँग्रेस देणार नाही. Bjp barobar यूती होती तेव्हा सेने नी भुमिपत्र फर्स्ट ही भूमिका सोडून दिली होती..

Gk Sun, 09/13/2020 - 20:25
https://youtu.be/dTXVy-84XMA यु ट्यूबवर अनेक ज्योतिषी महाराअष्टर सरकार पडावे अशी इचछा व्यक्त करून सरकार पडणार अशी भविष्यवणीही करत आहेत गम्मत म्हणजे हे बहुतांश भविष्य पंडित महाराष्ट्राबाहेर रहात असावेत असे वाटते

In reply to by Gk

सरकार पडण्याची शक्यता कमी पण शिवसेना नेते असाच मूर्खपणा करत राहिले तर सरकार पडायला वेळ लागणार नाही. ह्याचे सर्वात टेन्शन आहे ते कॉन्ग्रेसला. ज्या पक्षाला 'कम्युनल' म्हणत आलो त्याच पक्षाशी युती करावी लागली. सोनिया गांधींचा सेनेशी युती करायला अगदी टोकाचा विरोध होता पण नाईलाजाने त्यानी मान्यता दिली. गेल्या महिन्याभरात सोनियानी थोरात्/पृथ्विराज वगैरे नेत्यांची शाळा घेतली असणार हे नक्की.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

Rajesh188 Mon, 09/14/2020 - 11:38
जास्त च संकट आली तर मुख्यमंत्री राजीनामा देतील मुख्यमंत्री चा राजीनामा म्हणजे सरकार चा राजीनामा . तेव्हा केअर taker म्हणून उद्धव जी मुख्यमंत्री राहतील जो पर्यंत नवीन निवडणुका होत नाहीत. किती आमदार आपली आमदारकी पणाला लावायला तयार आहेत? आता निवडणुका झाल्या तर bjp निवडून येण्याची शक्यता किती आहे. तशी शक्यता नसेल तर bjp च सरकार पडून देणार नाही. किंवा मुख्यमंत्री राजीनामा देतील इथ पर्यंत तानानार नाहीत.

Rajesh188 Mon, 09/14/2020 - 11:41
अगोदर च मुख्यमंत्री राजीनामा देवून पेच निर्माण करतील. जाणता राजा असलेले पवार साहेब सर्व खेळी खेळण्यात आणि योग्य वेळ ओळखण्यात तरबेज आहेत. त्या मुळे सरकार ची चिंता करू नका. राहील का जाईल ते.

In reply to by Rajesh188

कानडाऊ योगेशु Mon, 09/14/2020 - 13:15
सगळं पवारसाहेबच करणार असतील तर शिवसेनेचे स्वतःचे अस्तित्व (हिंदीमधेय वजूद) ते काय उरले.? असेच चालु राहिले तर शिवसेना राष्ट्रवादीची बी टीम ठरेल. आताही तेच होते आहे. स्वतःचा फायदा जिथे आहे तिथेच सल्ले द्यायचे व जिथे आवश्यक आहे पण फायदा नाही तिथे मीठाची गुळणी धरायची असेच धोरण पवारसाहेबांचे राहिलेले आहे. राऊतांनी घेतलेल्या हास्यास्पद मुलाखती पाहिल्यावर तर हे प्रकर्षाने जाणवतेय.

गामा पैलवान Mon, 09/14/2020 - 13:34
गणेशा,
मग ज्या राष्ट्रवादीला, काँग्रेस ला भ्रष्ट म्हणताना हयात घालवली, त्यांनाच आपल्या पक्षात घेऊन उमेदवारी दिल्याने जूने bjp समर्थक दुखावलेत असे का नाही?
अगदी नेमका प्रश्न आहे. मी कट्टर शिवसैनिक असूनही माझ्या मते देवेंद्र फडणवीस हेच महाराष्ट्रास लाभलेले सर्वोत्तम मुख्यमंत्री आहेत. पण महाराष्ट्र भाजप विषयी लोकांना विश्वास वाटंत नाही. खडसे भ्रष्ट व तोंडाळ आहेत म्हणून त्यांना घरी बसवलं. ठीके. मग अजित पवार काय धुतल्या तांदळासारखे आहेत काय? अजित पवारांचं जाउद्या. चंद्रशेखर बावनकुळे तर भाजपचे एकनिष्ठ, स्वच्छ व कार्यक्षम मंत्री होते ना? त्यांना का घरी बसवलं? गडकरींशी जवळीक म्हणून? चंद्रकांत पाटील पुण्यात कशाला उभे राहिले? कोल्हापुरात भाजपविरोधी लाटबिट अजिबात नव्हती. या अशा कारणांपायी महाराष्ट्र भाजप विषयी मला भरवंसा वाटंत नाही. आ.न., -गा.पै. तळटीप : शिसेनेनेही भाजपप्रमाणे स्वकीयांचं खच्चीकरण केलंय. प्रताप सरनाईक व विजय शिवतरे ही नावं चटकन आठवली. या दोघांना (व अशांसारख्या इतरांना) उद्धव ठाकऱ्यांनी जाहीर दिलासा द्यावा अशी एक आरामखुर्चीतील कट्टर शिवसैनिक या नात्याने मी मागणी करतो.

In reply to by गामा पैलवान

राघव Mon, 09/14/2020 - 19:03
माझ्या ऐकीव माहितीप्रमाणे बावनकुळेंनी शहांच्या मर्जीतल्या व्यक्तीचं घोडं अडवलं. त्यामुळे मग वेळ आली तेव्हा स्कोर सेटल करण्यात आलेत.

Rajesh188 Mon, 09/14/2020 - 13:49
प्रशासकीय सेवेतील मित्र न बरोबर च्या चर्चेत काही मुध्ये माहीत पडले. त्यांच्या मता नुसार. Bjp सरकार निर्णय घेताना विचारपूर्वक पूर्वक घेत नव्हती. एकदा निर्णय घेतला तो निर्णय आमलात आणण्यासाठी नियम ठरले की सरकार अमलबजावीसाठी प्रशासकीय अधिकाऱ्यांना निर्देश देत असे. नियमाची पूर्तता करून अमलबजाणी ची वेळ वेळ आली नी नियमात बदल करून प्रशासनाच्या मेहनतीवर पाणी सोडले जायचे परत नवीन नियम परत फिरून सर्व नवीन नियमात बसवणे चालू असले प्रकार bjp च काळात खूप झाले. सत्ता कशी रबाबवावी ह्या विषयी mature पना नसणे किंवा अनुभव नसणे त्या मुळे असा प्रकार घडत असाव. काँग्रेस ,राष्ट्रवादी अनेक वर्ष satte वर असल्यामुळे त्यांच्या कडून हा प्रकार घडत नाही. सेना तर फर्स्ट टाइम lead rol मध्ये आहे सरकार मध्ये त्या मुळे थोडे बावरत आहेत . चुका करत आहेत.

In reply to by Rajesh188

असे काही नसते रे राजेशा. बाकीच्या राज्यांत सरकारे चालतातच की. आणि १९४७ साली नेहरूना काय अनुभव होता ? आंबेडकराना काय अनुभव होता ? लाल बहादूर शास्त्रिना काय अनुभव होता ? लोकप्रतिनिधी आहात, निवडून आला आहात. हाताशी सुविधा आहेत. बदलणारे वातावरण समजत नसेल,लोकांच्या अपेक्षा काय आहेत हे समजत नसेल तर सरळ राजीनामा द्यावा. कोणत्याही पक्षाचा असो मग तो.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

Rajesh188 Mon, 09/14/2020 - 15:26
मी प्रशासन ला सरकार कसे अडचणीत आणत होते हे सांगितले आहे. त्या मुळे सरकारी निर्णयाची अंमबजावणी ला वेळ लागला . देवेंद्र जी च्या काळात. आत्ताचे ताजे उदाहरण देतो. कर्ज चे हफ्ते corona काळात स्थगित ठेवले जातील असे आदरणीय पंतप्रधान जाहीर पण म्हणजे तसे घडले का ? कारण तसे सरकारी आदेश निघाले नाहीत. जे भाड्या नी राहतात त्यांचे भाडे मालकांना मागता येणार नाही असे आपले आदरणीय पंतप्रधान म्हणाले त्या नुसार त्यांनी योजना बनवून मालकांना आर्थिक मदत देण्याचे आदेश दिले का? कंपन्यांनी कामगार ना corona काळात पगार द्यावा आणि कोणाला ही नोकरी वर काढू नये असे आपले आदरणीय पंतप्रधान म्हणाले. सर्रास लोकांना कामावरून काढले गेले.लोकांना पगार दिले गेले नाहीत. आपले आदरणीय पंतप्रधान आहेत राजकीय नेत्यांसरखे त्यांना बोलता येणार नाही त्यांचे वाक्य ,वाचन हा सरकारी निर्णय समजलं जातो मग ते सर्रास खोटे का बोलले ...ते जे बोलले त्याची अंमलबावणी सरकार म्हणून नियमात बसते का ,सरकार ला तो अधिकार आहे का . हे त्यांना एकतर माहीत नाही किंवा ते खोटे बोलण्यात mahir आहेत.

In reply to by Rajesh188

खरे तर या धाग्यावर प्रतिसाद लिहायचा नव्हता पण वरील प्रतिसादातली काही विधाने खटकली म्हणून लिहिणे भाग पडले...
कर्ज चे हफ्ते corona काळात स्थगित ठेवले जातील असे आदरणीय पंतप्रधान जाहीर पण म्हणजे तसे घडले का ? कारण तसे सरकारी आदेश निघाले नाहीत.
अशा सुचना आल्या आहेत, व त्याची अंमलबजावणी सुध्दा झाली आहे ( मी स्वतः आमच्या कंपनीतल्या काही कामगारांना हप्ते स्थगित करुन घेण्या साठी मदत केली आहे.
कंपन्यांनी कामगार ना corona काळात पगार द्यावा आणि कोणाला ही नोकरी वर काढू नये असे आपले आदरणीय पंतप्रधान म्हणाले. सर्रास लोकांना कामावरून काढले गेले.लोकांना पगार दिले गेले नाहीत
. सरकार ने अशा प्रकारच्या सुचना सुध्दा जारी केल्या होत्या (माझ्या माहितीतल्या सर्व कंपन्यां मधे याची अंमलबजावणी झाली आहे) कोरोनाच्या आधी किती कामगार होते व आता किती आहेत अशा प्रकारची माहिती सुध्दा कामगार आयुक्तांनी मागितली होती. घरभाड्या बद्दल माहित नाही, कदाचित असतीलही. साधारण अशा प्रकारचे आदेश कायदा करुन / बदलुन देता येत नसावेत म्हणून ते मार्गदर्शक सुचनांच्या स्वरुपात दिले गेले होते. पैजारबुवा,

In reply to by कपिलमुनी

Rajesh188 Mon, 09/14/2020 - 15:54
Bjp चे मुख्यमंत्री योगी ह्यांनी नवीन force तयार केली आहे.. आणि बिना warrant , Bina चोकशी ,कोणत्या ही व्यक्ती ला अटक करण्याचे अधिकार त्यांना दिले आहेत. तिकडे जरा लक्ष ध्या हिटलर पण वर स्वर्गात लाजला असेल योगी चे निर्णय ऐकून.

In reply to by कपिलमुनी

सॅगी Mon, 09/14/2020 - 16:14
त्रिपुराचे भाजपा प्रवक्ते नंबेदु भट्टाचार्य यांनी हे आरोप फेटाळून लावले. त्यांनी या घटनेचा निषेध केला असून पोलीस योग्य तपास करत आहेत, असं सांगितले.
मारहाणीचा निषेधच आहे, पण प्रवक्त्यांनी "स्वाभाविक प्रतिक्रीया" म्हणून हात झटकलेले नाहीत हेही नसे थोडके......

Gk Tue, 09/15/2020 - 22:16
डोलकर शर्मा भाजपात सामील मर्चंट नेव्ही म्हणजे मराठीत डोलकर ना ?

Gk Fri, 10/16/2020 - 17:58
महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी करणारी याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली आहे. दिल्लीमधील तीन व्यक्तींकडून ही याचिका दाखल करण्यात आली होती. याचिकेत महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची तसंच उद्धव ठाकरेंच्या नेतृत्त्वातील महाविकास आघाडी सरकार बरखास्त करण्याची मागणी करण्यात आली आहे. याचिका फेटाळताना सुप्रीम कोर्टाने याचिकाकर्त्यांना चांगलंच फटकारलं आहे. सरन्यायाधीश शरद बोबडे यांनी याचिका फेटाळताना तुम्ही राष्ट्रपतींकडे विचारणा करु शकता असं सांगितलं. “देशाचे एक नागरिक म्हणून तुम्हाला राष्ट्रपतींकडे अर्ज करण्याचं स्वातंत्र्य आहे,” असं सुप्रीम कोर्टाने सांगितलं. यावेळी त्यांनी “तुम्हाला माहित तरी आहे का, महाराष्ट्र किती मोठे राज्य आहे?,” अशा शब्दांत याचिकाकर्त्यांना फटकारलं. वकील रिषभ जैन, गौतम शर्मा आणि सामाजिक कार्यकर्ते विक्रम गेहलोत यांच्याकडून याचिका दाखल करण्यात आली होती. महाराष्ट्रात कायदा आणि सुव्यवस्था ढासळली असल्याचा दावा त्यांनी याचिकेत केला होता. याचिकाकर्त्यांकडून सुशांत सिंह राजपूत मृत्यू, कंगनाच्या ऑफिसवरील कारवाई आणि माजी नौदल अधिकारी मदनलाल शर्मा यांना झालेली मारहाण या घटनांचा उल्लेख करण्यात आला होता. https://www.loksatta.com/maharashtra-news/supreme-court-dismisses-plea-seeking-imposition-of-president-rule-in-maharashtra-sgy-87-2303392/

In reply to by Gk

बाप्पू Fri, 10/16/2020 - 18:44
न्यायालयाने योग्य निर्णय दिला. आणि त्याचे स्वागत. पण काही सदस्य (जसे राजेश188) इथे बोंब मारतात कि न्यायालय निष्पक्ष नाहीत, अराजक माजले आहे वगैरे वगैरे ते कुठल्या बिळात लपलेयत?? आपल्याला नावडता निर्णय आला कि लगेच न्यायव्यवस्थेवर अविश्वास दाखवून ढोल बडवायचे?? हा कोणता अजेंडा?

Ajit Gunjal Fri, 10/16/2020 - 20:58
Shivsena शिवसेना सरकार राज्यात चांगले काम करीत आहे,. कोविड सारख्या भयंकर आजारावर नियंत्रण आणण्याचे काम प्रामुख्याने शिवसेनेने केले आहे.
Latest Marathi News Live

In reply to by Ajit Gunjal

सुबोध खरे Sat, 10/17/2020 - 11:39
कोविड सारख्या भयंकर आजारावर नियंत्रण आणण्याचे काम प्रामुख्याने शिवसेनेने केले आहे. ह ह पु वा विनोद चांगला होता अजून येऊ द्या

विजुभाऊ Sat, 01/22/2022 - 11:00
धागा काढून दीड वर्ष झाले. दरम्यानच्या कालात पुलाखालून आणि डोक्यावरून बरेच पाणी वाहून गेले. सेनेचे आणि राष्ट्रवादीचे काय झाले आहे ते जाहीर आहे. मात्र त्या दोघांपैकी कोणालाही काहीही फरक पडलेला नाहिय्ये.

Trump गुरुवार, 02/24/2022 - 19:07
“अर्धी मुंबई हिंदी भाषेत बोलते”, गोरखपूरमधील प्रचारसभेत संजय राऊतांनी सांगितलं उत्तर प्रदेशसोबतचं ‘नातं’! https://www.loksatta.com/elections/shivsena-sanjay-raut-in-gorakhpur-up-elections-2022-claims-hindi-language-in-mumbai-pmw-88-2818253/
शिवसेना कोठे पोचली बघा.

In reply to by Trump

चौकस२१२ Fri, 02/25/2022 - 09:54
पूर्ण पक्ष जर स्थानि कात यावर निर्माण झाला असेल तर त्याला पुढेच जाऊन राष्ट्रीय पक्ष होणे अवघड असते ! उदा द्रविड मुन्नेत काझघम ला हिमाचल मध्ये कोणी विचारेल का ! महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला कोणी ओडिशात स्थान देईल का ! आणि सेनेची सध्याची केविलवाणी लाचारी दुसरे काय पूर्वी ऐकलेली म्हण शिवसेनेचाच वाघ ऐनवेळी आपली शेपटी कुठे घालेल सांगता येत नाही !

In reply to by चौकस२१२

सुबोध खरे Fri, 02/25/2022 - 10:16
ऐनवेळी आपली शेपटी कुठे घालेल मुळात आघाडी केली तेंव्हा पासून शेपटीदोन पायातच आहे. बाकी गुरगुरणे चालू असले तरी त्याला कोणीच भीक घालत नाही. नवाब मलिक यांचा राजीनामा मागण्याची हिम्मत श्री उद्धव ठाकरे दाखवतील काय?

In reply to by चौकस२१२

sunil kachure Fri, 02/25/2022 - 10:51
राष्ट्रीय पातळीवर निवडणूक लढण्याचे कारण च नाही.राज्य पातळीवर चे प्रश्न राज्याचा विचार करूनच सोडवणे आणि राज्यातील लोकांस त्यांच्या होताच राजकीय पर्याय देणे . हाच मूळ हेतू स्थानिक पक्षाचा असतो. केंद्रात वर्चस्व निर्माण करण्यासाठी राष्ट्र पातळीवर निवडणुका लढण्याचे काही कारण नाही स्वतःच्या राज्यातील सर्व लोक सभेच्या जास्तीत जास्त जागा जिंकल्या तरी . केंद्र सरकार मधील अत्यंत महत्वाची बलाढ्य ताकत म्हणजे हे स्थानिक पक्ष च असतात. सेने नी राज्यात च लक्ष द्यावे. हिंदुत्व चा नाद सोडून द्यावा ते आरक्षण फक्त bjp लाच असू ध्या.

In reply to by sunil kachure

सेनेने हिंदूत्वाचा नाद सोडला तर हिंदूंनी कुणाकडे पहायचे?? हिंदूंच्या हितीचं रक्षण करनारा दुसरा कुठलाही पक्ष भारतात नाही. भाजपचं म्हणाल तर त्यांचं हिंदूत्व फक्त सत्ता मिळवण्यासाठी.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

सेनेने हिंदूत्वाचा नाद सोडला तर हिंदूंनी कुणाकडे पहायचे?? हिंदूंच्या हितीचं रक्षण करनारा दुसरा कुठलाही पक्ष भारतात नाही.
खो खो खो. दाऊद इब्राहिमच्या सहकार्‍यांना मंत्रीमंडळात ठेवणारा पक्ष म्हणे हिंदुत्ववादी.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

हे कुणी ठरवले आता?? नाही म्हणजे पुरावे वगैरे पाहून ह्या आधी कोर्ट ठरवायचे. आता तुम्ही स्वतः कोर्ट बनलात का?

In reply to by अमरेंद्र बाहुबली

मग राफेल प्रकरणी काहीही पुरावा नसताना थयथयाट करणार्‍या रागाचे नाक कोर्टाने कापले तरी त्याला तुमची टिपूसेना डोक्यावर घेतच आहे ना? त्याचे काय? तेव्हा हे तत्वज्ञान कुठे जाते?

In reply to by अमरेंद्र बाहुबली

बाकी अर्णब गोस्वामीला कोर्टाने दोषी ठरविले आहे का? त्याबद्दल काय? म्हणजे कसे असते की यांच्याविरोधात कोणी बोलले की खराखोटा कोणताही मुद्दा हे उकरून काढणार आणि स्वतःच न्यायनिवाडा करणार. पण यांच्या अंगाशी आले की मात्र कोर्ट ठरवू दे हे तत्वज्ञान पाजळणार. असले ढोंग क्षणभरही आता टिकणार नाही.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

प्रकरण केरिटात आहे दोघांचे ही. कोर्ट ठरवेल काय ते. पण तुम्ही तर स्वत जज बनून नियायनिनाडा करायला लागलात.

In reply to by चौकस२१२

Trump Fri, 02/25/2022 - 11:03
मुळातच शिवसेना मराठी माणसांना न्याय ह्या मुद्द्यावर स्थापन झाली होती. त्या पक्षाने राष्टीय स्वप्ने पाहणे म्हणजे किती शहाणपणाचे? असल्या उद्योगामध्ये आहे तो हक्काचा मराठी मतदार सोडुन जायचा.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

Trump Fri, 02/25/2022 - 11:59
शिवसेने सारख्या पक्षाने काय करावे हे तुम्ही ठरवनार का?
ह्यावर काय उत्तर अपेक्षित आहे?
मुळातच शिवसेना मराठी माणसांना न्याय ह्या मुद्द्यावर स्थापन झाली होती. त्या पक्षाने राष्टीय स्वप्ने पाहणे म्हणजे किती शहाणपणाचे? असल्या उद्योगामध्ये आहे तो हक्काचा मराठी मतदार सोडुन जायचा.
ह्याबद्दल बोला.

In reply to by Trump

सुबोध खरे Fri, 02/25/2022 - 12:14
शिवसेने सारख्या पक्षाने काय करावे हे तुम्ही ठरवनार का? शिवसेनेने जे करायचे ते करावे निदान दुटप्पी पणा करू नये एवढेच म्हणणे आहे. श्री बाळासाहेबांची असंख्य भाषणे उपलब्ध आहेत त्या सर्वाला हरताळ फासून आजची शिवसेना सत्तेत आली आहे. उदा. शिवसेना कधीही सोनिया गांधींच्या बरोबर जाणार नाही तसे झाले तर मी माझी संघटना बंद करून टाकीन किंवा “हिजड़े झुकते हैं सोनिया के सामने” (Eunuchs now down to Sonia) This is what Balasaheb Thackeray thought about the Congress & Sonia Gandhi! पहा गुगलून जर बाळासाहबांच्या मार्गावर चालायचे नसेल तर निदान त्यांचे नाव घेऊन मते मागू नका किंवा त्यांना वचन दिले म्हणून येन केन प्रकारेण काँग्रेस / रा कॉं च्या कुबड्या लावून मुख्यमंत्री पद घेऊ नका एवढेच म्हणणे आहे

In reply to by सुबोध खरे

sunil kachure Fri, 02/25/2022 - 12:56
ही bjp ला प्रिय होती,bjp सेना युती खूप वर्ष होती.सेना नालायक होती तर bjp नी त्यांच्या शी युती च का केली. ती पण अनेक वर्ष. आता पण सेने नी युती तोडली नाही तर आज पण bjp नी सेनेच्या गळ्यात गळे च घातले असते. युती कोणी तोडली? असा प्रश्न जाहीर रीत्या bjp च्या कोणत्या ही मोठ्या नेत्याला विचार . तो उत्तर देईल सेने नी. पण कोणताच bjp नेता जाहीर पने असे आक पण बोलू शकतं नाही की. सेना नालायक पक्ष होता म्हणून आम्हीच युती तोडली. बाकी शिवसेना नी मुंबई मधील मराठी लोकांसाठी खूप काही केले आहे. मराठी कलाकार,मराठी दुकान दार,रिक्षावाले,टॅक्सी वाले. गरीब कष्टाळू मराठी लोकांना सेने नी आधार दिला आहे. ते प्रामाणिक पना असेल तर कोणी ही मान्य करेल. ९३ च्या दंगलीत शिवसेना होती म्हणून हिंदू वाचले हे पण सत्य च आहे. Bjp चे सर्व कार्यकर्ते गायब होते जेव्हा हिंदू संकटात होते तेव्हा. त्या मुळे bjp नी तरी सेने वर टीका करू नये. ठाकरे नी फक्त डोळा मारला तरी फडणवीस सकाळी सकाळी सरकार स्थापन करायला येतील. अजून त्यांना आस आहे.

In reply to by sunil kachure

हाच प्रश्न उलटाही विचारता येऊ शकेल. इतकी वर्षे भाजपशी युती होती मग अचानक भाजप वाईट कसा दिसायला लागला? कसं असतं काही लोकांची एक वाईट सवय असते- आपलं ठेवायचं झाकून आणि इतरांचं बघायचं वाकून. आधी या प्रश्नाचे काय ते बघा आणि मग इतरांना प्रश्न विचारायला जा. त्यावर तुमचे उत्तर असेल की वाजपेयी-अडवाणींचा भाजप वेगळा होता आणि मोदी-शहांचा भाजप वेगळा आहे तर त्याचप्रमाणे आम्ही पण म्हणतो की बाळासाहेब असतानाची शिवसेना वेगळी होती आणि आताची शिवसेना वेगळी आहे.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

sunil kachure Fri, 02/25/2022 - 13:27
अडवाणी ,वाजपेयी जी चा bjp आणि मोदी जी ,आणि अमित शह जी. ज्यांचा bjp एकच आहे. तेव्हा प्रमोद महाजन आणि मुंडे जी होते ते दोन्ही पक्षात समन्वय ठेवत होते. आज फडणवीस आणि चंद्रकांत जी आहेत त्यांना तो समतोल राखता आला नाही. युती तुटण्याच्या पाठी हेच कारण असावे. फडणवीस मुख्य मंत्री असताना सेने च्या आमदार च्या भागातील काम होवू न देणे. लोकप्रिय योजना राबवताना युती चा धर्म न पाळणे. असले राजकारण करत होते . आणि असे राजकारण राष्ट्रवादी करते. सेने चा समज होणे साहजिक आहे की फडणवीस ऐन वेळी राष्ट्रवादी शी युती करवून . सेने ला तोंडावर पाडतील. त्याचा परिणाम म्हणून आज जी स्थिती आहे ती आहे

In reply to by सुबोध खरे

शिवसेनेने जे करायचे ते शिवसेनेने दुटप्पीपणा केलेला नाही, कोंग्रेस बरोबर जानार नाही ह्याचा अर्थ भाजप बरोबरच राहू असाही नाही, २०१४ ते २०१९ सेनेला सत्तेत डावलणे, केंद्रात दुय्यम दर्जाचे मंत्रीपद देणे वगैरे प्रकार भाजपने केले, २०१९ ला युती असुनही सेने विरोधात भाजपने ठिकठिकाणी बंडखोर ऊभे केले होते. ह्याचा वचपा सेनेने वेळ आल्यावर बरोबर घेतला. भाजपची साथ सोडणे हा ठाकरेंच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम निर्णय होता. सेनेने भाजपला संधीदिली होती पण भाजपने पहाटेच्या शपथेने माती खाल्ली, नी सेनेला नाईलाजाने काॅंग्रेस बरोबर जावे लागले. ईतकीच जर भाजपला हिंदूत्व नी सेनेची काळजी होती तर द्यायचं होतं अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद. आताही बाहेरून पाठींबा देऊ शकतात सेनेला. पण नाही भाजपला हवी आहे फक्त नी फक्त सत्ता. त्यासाठी कुठलंही कपट करायला भाजपेई तयार असतात. मग सत्तेसाठी पहाटे अजित दादांबरोबर शपथ घ्यायची असो की मातोश्री पुढे नतमस्तक व्हायचे असो. थोडक्यात “कपटी मित्रापेक्षा दिलदार शत्रू बरा“ “कपटी भाजप पेक्षा दिलदार काॅंग्रेस पक्ष कधीही चांगला.”

In reply to by अमरेंद्र बाहुबली

सुबोध खरे Fri, 02/25/2022 - 19:50
कोंग्रेस बरोबर जानार नाही ह्याचा अर्थ भाजप बरोबरच राहू असाही नाही सेनेला नाईलाजाने काॅंग्रेस बरोबर जावे लागले

श्री बाळासाहेबांची असंख्य भाषणे उपलब्ध आहेत त्या सर्वाला हरताळ फासून आजची शिवसेना सत्तेत आली आहे. उदा. शिवसेना कधीही सोनिया गांधींच्या बरोबर जाणार नाही तसे झाले तर मी माझी संघटना बंद करून टाकीन किंवा “हिजड़े झुकते हैं सोनिया के सामने”

शिवसेनेने काँग्रेसच कशाला हवं तर दाऊद इब्राहिम /ओवैसींशी सुद्धा युती करावी. पण निदान बाळासाहेबांच्या आत्म्याला त्रास होउ नये म्हणून त्यांच्या नावाची ग्वाही देणे, त्यांना वचन दिले होते म्हणून मुख्यमंत्री झालो सांगणे आणि त्यांच्या नावाने मते मागणे असले दुटप्पीपणा करणे बंद करावे इतकेच म्हणणे आहे. अर्थात तुमचे एकंदर प्रतिसाद पाहून तुम्ही या बोटावरची थुंकी त्या बोटावर करणार हे माहिती होतेच पण तुमचाही दांभिकपणा उघड करावा म्हणून हा प्रतिसाद होता

In reply to by अमरेंद्र बाहुबली

सुबोध खरे Fri, 02/25/2022 - 19:51
मराठी मतदार सेनेच्या पाठी नेहमी राहील फक्त मराठी माणूस सेनेच्या पाठी जोडे घेऊन (मारायला) राहील असे काही करू नका म्हणजे झाले.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

सहमत. मराठी मतदार नेहमीच आपल्या पाठीशी असेल ही खात्री असल्यानेच का महापालिका निवडणुक वेळेत घेतली जात नाहीये? मुंबई महापालिकेची मुदत निदान फेब्रुवारी २०२२ मध्ये तरी संपत आहे. इतर काही महापालिकांच्या (नवी मुंबई वगैरे) सप्टेंबर २०२० मध्येच संपली तरी अजून निवडणुक घेण्यासाठी कोणतीही हालचाल दिसत नाही. विधानपरिषदेची निवडणुक अप्रत्यक्ष होणार होती म्हणजे स्थानिक जिल्हा परिषद, महापालिका वगैरे स्थानिक स्वराज्य संस्थांचे सदस्य त्यात मत देणार होते तरीही ती निवडणुक बिनविरोध व्हावी यासाठी प्रयत्न केले जात होते. म्हणजे प्रत्यक्ष मतदार तर सोडाच आपल्याच महाभकास आघाडीचे नगरसेवक आणि जिल्हा परिषद सदस्यही आपल्यामागे नसतील ही खात्री असल्याने निवडणुक बिनविरोध व्हावी यासाठी प्रयत्न केले जात होते का? त्यात महापालिका निवडणुक वगैरे स्थानिक मुद्द्यांवर लढवली जाते. तरीही या सरकारची कामगिरीच इतकी दिव्य आहे की महापालिका निवडणुकांमध्येही त्याचा त्रास आपल्याला होईल याची खात्री आहे म्हणून निवडणुका टाळल्या जात आहेत का? बघू. घोडामैदान फार लांब नाही. कधीतरी निवडणुक घ्यावीच लागेल.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

sunil kachure Fri, 02/25/2022 - 22:54
पर प्रांतीय लोकांची संख्या खूप वाढत आहे रोजगार मिळण्याचे एक मेव ठिकाण म्हणजे महाराष्ट्र मधील शहर हे सूत्र च देश पातळीवर आहे. महाराष्ट्र नी आयुक्त ना जास्त अधिकार देवून नगरसेवक चे अधिकार कमी करण्यासाठी कायदेशीर तरतुदी चा वापर करावा मुंबई महानगर पालिका निवडणूक म्हणजे राज्य सरकार च्या कामाची पोच पावती नसते.

In reply to by sunil kachure

मुंबई महानगर पालिका निवडणूक म्हणजे राज्य सरकार च्या कामाची पोच पावती नसते.
नसतेच की. मी कधी म्हटले आहे? पण मग तरीही मुंबई महापालिका निवडणुक घेण्याच्या दृष्टीने काहीच पावले का नाहीत? नवी मुंबई महापालिकेची मुदत संपून दीड वर्ष झाले तरी तिथे निवडणुक घेण्यासाठी काहीही का केले जात नाहीये? राज्य सरकार नक्की कशाला घाबरले आहे?
पर प्रांतीय लोकांची संख्या खूप वाढत आहे महाराष्ट्र नी आयुक्त ना जास्त अधिकार देवून नगरसेवक चे अधिकार कमी करण्यासाठी कायदेशीर तरतुदी चा वापर करावा
बोंबला. कालपरवाच कोणीतरी उत्तर प्रदेशात जाऊन मुंबईतील अर्धे लोक हिंदी बोलतात असे म्हटले होते ना? मुंबई तुमचे घर आहे असे पण कोणीतरी बोलले होते ना? मग परप्रांतीय म्हणजे नक्की काय? कुठून आले ते?

In reply to by चंद्रसूर्यकुमार

सुबोध खरे Sat, 02/26/2022 - 09:56
कुठं त्यांच्या नादाला लागताय डाव्या मेंदूला माहिती नाही उजवा मेंदू काय करतोय आणि तसेच उलटे. (ACC) हा एक आजार आहे. ज्यात मेंदूच्या दावा आणि उजव्या भागाला जोडणाऱ्या नसा ( केबल्स) नीट तयारच होत नाहीत. Agenesis of the corpus callosum (ACC) is a birth defect that affects the brain when the development of the corpus callosum, the band of white matter connecting the two hemispheres in the brain, in the embryo is disrupted. The corpus callosum is a thick bundle of nerve fibers that connects the right and left hemispheres (halves) of the brain.

In reply to by सुबोध खरे

sunil kachure Sat, 02/26/2022 - 10:47
माझ्या पोस्ट समजायला तुम्हाला वेळ लागेल.आणि लागतो पण. 1)मी कॉमेंट महानगर पालिका निवडणुकीवर दिली होती २) निवडणुका पुढे नेल्या जात आहेत .राज्य सरकार उस्तुक नाही असे चंद्र सूर्य कुमार ह्यांची पोस्ट होती. ३) त्याचे उत्तर म्हणून मी जे लिहलेले आहे त्याचा अर्थ लपलेला असा आहे. ," मुंबई किंवा नवी मुंबई महानगर पालिकेच्या निवडणुकीत परप्रांतीय लोकांचे बहु मतं आहे.हे परप्रांतीय लोक सेना किंवा महाराष्ट्र वादी लोकांस मत देत नाहीत.त्यामुळे ह्या महानगर पालिका bjp परप्रांतीय यूपी,बिहारी,गुजराती ह्यांच्या जोरावर जिंकेल. तेव्हा राज्य सरकार नी त्यांच्या असलेल्या अधिकाराचा वापर करून नगर सेवक आणि महापौर ह्यांचे अधिकार कमी करावेत आणि तो अधिकार आयुक्तांना द्यावा" मर्जी मधील मराठी आयुक्त तिथे नियुक्त करून मराठी लोकांचीच सत्ता महानगर पालिकेत पण राहील. अशी खेळी खेळता येईल आणि असे अधिकार राज्य सरकार ला आहेत. असा सर्व अर्थ आहे त्याचा. खरे तुम्हाला राजकीय पोस्ट वरचे खाच खळगे कळत नाहीत चंद्रसूर्य कुमार ह्यांना माझ्या पोस्ट चा अर्थ समजला पण तुम्हाला नाही समजला.

In reply to by sunil kachure

परप्रांतीय लोक सेना किंवा महाराष्ट्र वादी लोकांस मत देत नाहीत.त्यामुळे ह्या महानगर पालिका bjp परप्रांतीय यूपी,बिहारी,गुजराती ह्यांच्या जोरावर जिंकेल. तेव्हा राज्य सरकार नी त्यांच्या असलेल्या अधिकाराचा वापर करून नगर सेवक आणि महापौर ह्यांचे अधिकार कमी करावेत आणि तो अधिकार आयुक्तांना द्यावा"
म्हणजे लोक आपल्याला मते देत नाहीत हे लक्षात आल्यावर निर्वाचित प्रतिनिधींचे अधिकार कमी करावेत? वा वा.

Trump Fri, 02/25/2022 - 12:36
अजुन एक मुक्तफळ राऊतांना शिवसेना बरबाद करुन बहुदा आप किंवा काँग्रेसमध्ये जायची योजना दिसते आहे.
२०२४ साली केंद्रातून मोदी, शहा व त्यांच्या ‘नाझी’ फौजांचे पूर्ण पतन व्हावे ही श्रीरामाचीच इच्छा दिसते असंही यावेळी म्हटलं आहे. दरम्यान शिवसेना खासदार संजय राऊत यांनी यासंबंधी बोलताना देशात यापेक्षा वेगळं वातावरण दिसत नाही असं म्हटलं आहे. https://www.loksatta.com/mumbai/shivsena-sanjay-raut-saamana-editorial-narendra-modi-amit-shah-investigation-agencies-sgy-87-2819099/

In reply to by Trump

म्हणूनच संजय राऊत मला जाम आवडतात. शिवसेनेच्या १०० कट्टर विरोधकांना जे जमले नसते ते सहजपणे संजय राऊत एकहाती करत आहेत.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

Trump Fri, 02/25/2022 - 12:45
शिवसेना मराठी माणसांच्या हितासाठी, मुळ उद्देशासाठी टिकुन राहावी असे वाटते. पण हल्लीचे माकडचाळे आणि कोंलाटउड्या बघुन हळु हळु तीही इच्छा कमी होउ लागली आहे.

चौथा कोनाडा Fri, 02/25/2022 - 22:49
“शिवसेनेचा आवाज तोच आहे. त्यातला खणखणीतपणाही तोच आहे. पण पिढीप्रमाणे थोडा बदल व्हायला हवा. मी शिवसेनाप्रमुखांचे विचार सोडले नाहीत, ते कधीच सोडणार नाही. जनतेची सेवा करणारी आमची आदित्यला धरलं तर सहावी पिढी आहे. त्याच्या आधीही आमचे पूर्वज धोडपच्या किल्ल्याचे किल्लेदार होते असं म्हणतात. माझ्यावर सुरुवातीला टीका झाली की याला बाळासाहेबांसारखं बोलता येत नाही. मला नाहीच येत. मी भाषण करतो असं मला अजूनही वाटत नाही. मला भाषण करताच येत नाही हे तुम्ही लोकांनीच ठरवून टाकलं हे बरंच झालं. प्रत्येक काळ वेगळा असतो. बाळासाहेबांचा काळ दगडाची मूर्ती तयार करण्याचा होता. आता मूर्ती बनल्यानंतर देखील त्या शिल्पकाराचा पोरगा त्या शिल्पावर घण घालत बसला, तर ती मूर्ती तुटेल. दगडाचीच मूर्ती होते. त्यानंतर तिच्यावर फुलं वाहायची असतात ! ” - उद्धव ठाकरे (लोकसत्ताच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी लोकसत्ताचे संपादक किरीश गुबेर यांनी उद्धव ठाकरेंची छोटेखानी घेतली त्यातील उद्गार )

In reply to by चौथा कोनाडा

मुक्त विहारि Sat, 02/26/2022 - 08:51
हटाव लुंगी और बजाव पुंगी... ते.... भय्ये पण आपलेच .... व्हाया .... केम छो वरली आणि जलेबी अने फाफडा, उद्धव ठाकरे आपडा.. आणि तरीही काही मागुघपा जनतेला, शिवसेना मराठी माणसांना न्याय देणारी वाटते... इतकेच जर शिवसेनेला मराठी आणि हिंदू माणसांचा कळवळा होता तर, गिरणी कामगारांना घरे का नाही दिली?

In reply to by मुक्त विहारि

sunil kachure Sat, 02/26/2022 - 23:55
सेने न च नाही तर कोणत्याच पक्षांनी गिरणी कामगार ना घरे देण्यात इंटरेस्ट दाखवला नाही त्या मध्ये bjp पण आहे. आर्थिक फायदा जिथे असेल तिथे पक्षा मधील सीमा रेषा नष्ट होवून ते एक होतात. हजारो उदाहरण आहेत.

In reply to by सुबोध खरे

चौथा कोनाडा Sat, 02/26/2022 - 12:32
नुसती फुलं नाही तर भिंतीला फोटो टांगून हार देखील घालू ! हा .... हा .... हा .... ! जय मराठी, जय शिवसेना, जय महाराष्ट्र !

इरसाल Sat, 02/26/2022 - 12:10
- उद्धव ठाकरे (लोकसत्ताच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी लोकसत्ताचे संपादक किरीश गुबेर यांनी उद्धव ठाकरेंची छोटेखानी घेतली त्यातील उद्गार ) तुम्हाला "मुलाखत" म्हणायचे असावे असे गृहीत धरतो. :))

विजुभाऊ Sat, 02/26/2022 - 16:07
राउत आणि नबाब हे एकाच माळेचे मणी आहेत. एकूणातच राऊत बहुतेक सेनेचे दुसरे मुख्यमंत्री व्हायचा प्लॅन करताहेत. ( अर्थात बारामतीच्या काकांंच्या मांडीवर बसून ). पण त्यांना हे माहीत नसावे की बारामतीचे काका काय करतील ते स्वतःही सांगु शकत नाहीत

In reply to by विजुभाऊ

मुक्त विहारि Sat, 02/26/2022 - 17:28
पण, त्यांच्या दुर्दैवाने, ते ज्या पक्षाच्या खांद्यावर हात ठेवतात, ते पक्ष लयाला जातात किंवा डबघाईस येतात... शेकाप, कॉंग्रेस, मनसे ही उदाहरणे पुरेशी आहेत .... वैयक्तिक सांगायचे तर, शरद पवार यांना, काळाची पावले व्यवस्थित ओळखता येतात. त्यांच्या बुद्धिमत्तेला तोड नाही. भरपूर वाचन, उत्तम स्मरणशक्ती, हे त्यांचे चांगले गूण आहेत ... पण उदारमतवादी हिंदू हा त्यांचा, माझ्या दृष्टीने अवगूण आहे.... खरंतर, मुंढे घराणे, ठाकरे घराणे इतकेच कशाला, छत्रपती भोसले घराणे पण आज शरद पवारच एकत्र आणू शकतात .... समजा, ही तिन्ही घराणी एकत्र झाली तर हिंदू नक्कीच एकाच व्यासपीठावर येतील.... एक हिंदू म्हणून, शरद पवार यांच्या कडून, माझी तरी इतकीच अपेक्षा आहे...

sunil kachure Sat, 02/26/2022 - 18:17
हे जुन्या पिढी मधील नेते आहेत.तेव्हाच्या नेत्यांचे एक वैशिष्ट होते त्यांचा लोकांशी संपर्क असायचा. आपल्या मतदार संघात किंवा राज्यात कोणत्या गोष्टी च गरज आहे. विविध क्षेत्रात प्रगती करायची असेल तर प्रतेक क्षेत्राची गरज काय आहे . ह्याची उत्तम जाणीव त्या नेत्यांना होती. महाराष्ट्रात असंख्य दिग्गज नेते त्या काळात आणि अगोदर होऊन गेले. त्या मधील एक म्हणजे शरद पवार. आज कोणत्या ही नेत्याचे उदाहरण घ्या राजकारण हा धंदा केला आहे. त्यांना कोणत्याच प्रश्नांची जाण नाही. विविध क्षेत्रांचा सखोल अभ्यास नाही. विरोधी विचार पण ऐकून घेण्याची कुवत नाही. सर्व उथळ,लोक नेते म्हणून मिरवत आहेत. त्या मुळे शरद पवार सर्वात उठून दिसतात. ते राजकारण कसे करतात,डावपेच कसे खेळतात तो विषय पूर्ण वेगळा आहे. अभ्यासू,प्रामाणिक,कष्टाळू, राजकीय नेत्यांचा काळ निघून गेला आहे.

In reply to by sunil kachure

सुबोध खरे Sat, 02/26/2022 - 19:55
शरद पवार सर्वात उठून दिसतात. उठूनच काय बसूनही दिसत नाहीत. ज्यांना स्वबळावर एकदाही मुख्यमंत्री होता आले नाही. एकदाही कारकिर्दीची ५ वर्षे पूर्ण करता आली नाहीत. एकदाही पूर्ण १० खासदार निवडून आणता आले नाहीत एकदाही २८८ पैकी ७५ आमदार निवडून आणता आले नाहीत केवळ सर्वाना ( पत्रकार पोलीस बाबू इ लोकांना) सरकारी कोट्यात घर, भूखंड, बारचा परवाना सारख्या खिरापती वाटून त्यानी मिंधे करून ठेवलेले आहे. यामुळे सहसा पत्रकार आणि इतर त्यांच्याविरुद्ध बोलताना दिसत नाहीत. (खाल्ल्या मिठाला जागणे) ( हे श्री स्वामिनाथन अंकलेसारिया अय्यर या ख्यातनाम पत्रकाराने हिंदू वृत्तपत्रात लिहून ठेवले आहे. यांचे कनिष्ठ बंधू एके काळी भाजप चे स्टार प्रचारक होते श्री मणिशंकर अय्यर) ) त्यामुळे साहेब काहीही करू शकतात सारखे पालुपद त्यांचे चेले, चमचे, गुलाम, सदा सर्वकाळ आळवत असतात. सत्याचा आणि त्याचा दूरत्वाने सुद्धा संबंध नाही

In reply to by अमरेंद्र बाहुबली

मुक्त विहारि Sat, 02/26/2022 - 21:49
आणि ते उपरोधिक बोलणे, माननीय शरद पवार यांना देखील समजले असेलच. कारण, खुद्द शरद पवार देखील कधीकधी उपरोधिक बोलतात.. आपण जसे एखाद्याला, "विद्वान", म्हणतो, तसेच आहे... मोदींची भाषा समजून घ्या... ते योगी, तेजस्वी सुर्या, हुकुमदेव नारायण यादव, यांच्या सारखे कधीकधी स्पष्ट बोलतात तर कधी उपरोधिक .... राजकारणी लोकांच्या भाषा समजून घेतल्या तरच, तारतम्यता अंगी बाणवता येते...

In reply to by अमरेंद्र बाहुबली

प्रदीप Sun, 02/27/2022 - 11:01
अलिकडेच तुम्हाला मिपावरील ज्येष्ठ व अर्थातच, एमिमंट वगैरे विचारवंत अ.बा. ह्यांनी 'विचारांतील गोंधळ कमी करा' अशा अर्थाचा सल्ला दिलाच होता. आता येथे पहा, त्यांना मोदी उपरोधिक वगैरे काही बोलले नव्हते, हे ठामपणे कसे सांगता आले? त्यामगे त्यांचा प्रखर अभ्यास, मनन व चिंतन आहे. ते येतेहे जे काही पिंकतात, त्यामागे हे सर्व काही आहे. तेव्हा हे लक्षांत घ्या त्यांच्याशी प्रतिवाद करतांना.

In reply to by प्रदीप

खिक्क. सर मी ज्येष्ठ नाही नी एमीमंट तर आजिबात नाही. :) पण मुवि काकांचे एका बाजूला झूकलेले विचार दाखवतो. ईतर पक्षाना घराणेशाही वरून बोलायचे पण जय शहा, राणे, विखे, फडणवीस ह्या कुटूंबातील घराणेशाहीबद्दल मुवीकीका मूग गिळून गप्प बसतात. सेनेने भाजपला सोडले म्हणजे हिंदूत्व सोडले प्रकारचे महान विचार :) भाजप म्हणजे हिंदूत्व ख्या ख्या. पुणे महापालिकेतील काहीतरी भ्रष्टाचारामुळे राज्य सरकारला जबाबदार धरणे. आता मोदी पवाराना गुरू मानताहेत पण मुवीकाकाना मोदींचे गुरू पवार म्हणून स्विकारले जात नाहीत. : ) ऊद्या ह्याच पवारांचेया पाठींब्याने भाजप सत्तेत परतली तर पवार मोदींचेच नाही तर बायडन, पुतीन ह्यांचेही गुर आहेत असं मुवीकाका ईथेच जाहीर करतील. :)

In reply to by सुबोध खरे

यामुळे सहसा पत्रकार आणि इतर त्यांच्याविरुद्ध बोलताना दिसत नाहीत. (खाल्ल्या मिठाला जागणे)
तो निळू दामले बऱ्याच दिवसांनी टीव्ही वर मोदींविरुद्ध गरळ ओकताना दिसला. लवासा नावाचं पुस्तक त्यानेच लिहिलं होतं ना?

In reply to by Trump

विजुभाऊ Fri, 06/24/2022 - 14:56
धागा काढून जवळजवळ दोन वर्षे झाली. पण काही प्रतिसाद वाचताना हा धागा कालच काढल्यासारखा वाटतोय. सेनेच्या वागण्यात काहीच फरक पडला नाही. राऊत अधीकच बरळत चाललेत. राष्ट्रवादी अधीकच आपमतलबी झालेली आहे

In reply to by विजुभाऊ

सुबोध खरे Fri, 06/24/2022 - 18:52
राष्ट्रवादी अधीकच आपमतलबी झालेली आहे हा आपला स्पष्ट गैरसमज आहे १०० % गोष्टीत अधिक काही कसं मिळवता येईल.