पुरोगामी, लिबरल्स लोकांनी आता करायचे तरी काय ??? कोणती नवी चाल खेळायची?
संघाचे काल भूमी पूजनाच्या निमित्ताने झालेले भव्य दर्शन त्या समस्त तथाकथित बुद्धिवंत पुरोगामी आणि लिबरल लोकांस किती त्रासदायक असेल ??? संघाच्या एक एक अजेंड्याची अशी पूर्तता होताना बघून किती यातना होत असतील ? चार पाच वर्षांपूर्वी पर्यंत स्वप्नात देखील या देशात कुणी कल्पना केली नव्हती की 370 कलम इतक्या लवकर हटवले जाईल. संघ गेली सत्तर वर्षे सातत्याने समस्त परिवारातल्या कार्यकर्त्याना 370 कलम हटविण्या संबंधीचा नारा देत होता आणि आपल्या उरीचे ते स्वप्न कार्यकर्ता जगत होता. सत्ता अशा स्वप्नांसाठी करायची आहे याची पदोपदी जाण होती आणि आहे. हमे राज नही, समाज बदलना है - कार्यकर्ता हेच तत्व जगतो आहे. त्यामुळे समाज बदलण्याच्या हेतूने सत्तेचा अट्टाहास केला. त्यात यश मिळाल्यावर - सत्ता मिळाल्यावर - देखील दांडगाईने पहिल्याच पाच वर्षात नव्हे, तर संपूर्ण संयत भूमिका घेऊन कायदेशीर मार्गानी, दंगेधोपे, गोंधळ न करता. सात्त्विक समाधानाची पखरण करत. हा हा म्हणता ते सत्तर वर्षाचे दुखणे असणारे 370 कलम हटवले गेले, शेतकरी एकशे चौतीस वर्षांनी बाजाराच्या बंधनातून मुक्त केला गेला, शेकडो वर्षे शाब्दिक घटस्फोटाच्या धाकात जगणाऱ्या मुस्लिम महिलेला मुक्त केले गेले आणि आता पाचशे वर्षे हिंदू समाजाच्या हृदयात बोचणारी सल नाहीशी केली, काल आत्मनिर्भर भारताची सुवर्ण वीट रचली. संघाचे हे विराट दर्शन किती छळत असेल त्या पुरोगामी, लिबरल्स वगैरे व्याख्या आणि बिरुदावली घेऊन समाजात वावरणाऱ्या ढोंगी लोकांना ??? अगदी ठामपणे सांगतो आज किंवा गेल्या काही वर्षात, दशकात ही लेबले लावून, खादीचे झब्बे घालून, खांद्यावर झोळी, अडकवून दाढीचे खुंट, वाढवून कपाळावर लालबुंद मोठी बिंदी लावून, कधी हातात डफली घेऊन, कधी गोलात बसून जागतिक हवामानाच्या मोठ्या मोठ्या गप्पा मारणारे, कधी ह्या पक्षाच्या कधी त्या पक्षाच्या खांद्यावर बंदूक ठेवणारे, इस्लाम खतरेमें है चा नारा देऊन गरीब पीडित मुसलमानांना फितवणारे आणि भारतीय समाजात फूट पाडून आपले अस्तित्व टिकवण्याच्या प्रयत्नात कोणत्याही नीचतम स्तराला जाणारे हे लोक ते खरे पुरोगामी नव्हेत. नवरा गेल्यावर पोरीला चितेवर ढकलणाऱ्या समाजाला जागेकरून पोरीला मुक्त करणारे किंवा जातीच्या उतरंडीमध्ये पिचून गेलेल्या दलित समूहांना माणूस म्हणून त्यांचे स्थान आणि प्रतिष्ठा मिळवून देणारे किंवा आजारी पडलेल्या माणसाला मांत्रिकाकडे नाही तर डॉक्टरकडे घेऊन जाण्यासाठी इथल्या अडाणी जनतेला शिक्षित करणारे किंवा भारतीय लेकीच्या हाती पाटी पेन्सिल देणारे इत्यादी हे सगळे खऱ्या अर्थाने आमच्या हृदयात सदैव आदरणीय असणारे पुरोगामी. आज आजुबाजुला दिसणारे पुरोगामी ते हे नव्हेत. हे कोण आहेत माहितीय ? कुठून आले कळलंय ??
गांधीजींच्या दांडी यात्रेत शेवटी शेवटी असणारे आणि ट्रॅफिक पोलिसाच्या थाटात रस्त्यात मध्येच 'चलो चलो आगे बढो' म्हणत लोकांना हाकणारे. पण अगदी पुढल्या फळीतल्या गांधींवर लाठी चार्ज करत इंग्रजांचा पोलीस पुढे सरकतो आहे असे समजल्यावर हळूच रस्त्याच्या कडेला उभे असणाऱ्या आजुबाजुच्या बघ्यांमध्ये सामील होणारे किंवा त्या मागच्या झाडीमध्ये लपून बसणारे, गांधी आमरण उपोषणाला बसले की त्यांच्या तंबूत काहीकाळ आपण देखील उपोषणाला बसलो आहोत असा आव आणणारे पण धोतराच्या वळचणीला बायकोने दिलेला नागलीचा लाडू लपविणारे, जेपींच्या चळवळीत गल्ली बोळातून हातात झेंडा घेऊन बिल्ले लावून फिरणारे पण आणिबाणी पुकारल्यावर घरी बायकोला सांडगे पापड बनवायला मदत करणारे, मोरारजीभाईंना खुर्चीवर बसवून सत्तेच्या जवळपास गेले पण ज्या साठी एकत्र आलो त्या संकल्पाशी प्रामाणिक न राहता सत्ता गमवायला भाग पडणारे, नंतर मात्र फक्त घरी बसून राहिलेले आणि संध्याकाळी घरी आल्यावर विजार घालताना बायकोला फर्मास शिरा करण्याचे फर्मान सोडणारे ते सगळे असे तेच ! मग लिंबाचे लोणचे खोचलेला शिरा मिटक्या मारत खात "एक दिवस हा देश विकणार लेकाचा" "हे लोक घातक" "ते ही घातक" "शिक्षणाची फार दुरावस्था झाली आहे" "मंदिर काय लेको शाळा किंवा हॉस्पिटल बांधा म्हणावं तिथे" "शेवटी हे निधर्मी राष्ट्र आहे म्हणावं..... " अशी रोज एक दोन वाक्ये बायकोसमोर आरामखुर्चीत बसून टाकणारे ! पुढे फेसबुक व्हॉट्सऍप आल्यावर साने गुरुजी, गांधी, विनोबा इत्यादींच्या जयंत्यांना त्यांच्या विषयी फोटोसह पोस्टी टाकणारे आणि उर्वरित दिवसात विचारधन गुरुजी मोदी यांची टिंगल टवाळी करणाऱ्या पोस्टी फॉरवर्ड करणारे....! . यांचा ना समाजाला कधी उपयोग झाला ना या जमातींनी कधी काही करण्याची तसदी घेतली. संघटीत होऊन समाजासाठी भरीव काही केल्याचे दाखले भारतीय इतिहासात सापडतात का बघाना ! यांना साधे संघटीत देखील होता आले नाही, रचनात्मक काही काम उभे करणे तर दूरच राहिले. एकोणीसशे पन्नास सालापासून संघाच्या नावाने सतत खडे फोडणाऱ्या या फुटकळ लोकांनी पर्यायी व्यवस्था का उभी केली नाही ? एखादी ग्राम पंचायत तरी स्वतःच्या तत्वावर उभा केलेल्या पक्षाच्या जोरावर यांना कधी घेता आली आहे काय ? माफीवीर, तडीपार, हिटलर अशी गलिच्छ टीका टिपण्णी करण्याव्यतिरिक्त या लोकांनी काय केलं आपल्या देशात आजवर ? फक्त आणि फक्त ढोंग आणि ते करत संघाला बदनाम करण्यासाठी वेगवेगळ्या क्लुप्त्या शोधणे. बस्स. हिंदू मुस्लिम अशी फूट पाडण्याचे आणि ती पाडून संघाला बदनाम करण्याचे डाव सातत्याने हे लोक खेळत आले. आपण काही करू शकलो नाही याचे वैफल्य पदरी होतेच पण संघ दिसामाजी वाढतो आहे याची चरफड देखील. याच मुळे या तमाम जनतेने या देशात मुस्लिम समाजाला संघाविरुद्ध फितविण्याचे सातत्याने प्रयत्न केले. अर्थात संपूर्ण मुस्लिम समाजावर किंवा ख्रिस्ती समाजावर प्रभाव उत्पन्न करण्याची क्षमता आणि लायकी यांच्याकडे कधीच नव्हती. त्यामुळे संघाला बदनाम करण्याचे यांचे प्रयत्त्न कधीच यशस्वी होऊ शकले नाहीत ना कोणत्या धर्मियांनी यांच्या आवईला कधी भीक घातली. कालचे भूमीपूजन झाल्यावर देशभरात पसरलेल्या समाधानाने आणि शांततेने हे दाखवून दिले की यांचे समाजात दुफळी माजविण्याचे गेल्या सत्तर वर्षातले प्रयत्न उध्वस्त झाले आहेत. यांना प्रश्न असा पडला असेल की आता काय करायचे ? नेहरू तत्कालीन राष्ट्रपती राजेंद्रबाबूंवर सोमनाथच्या जीर्णोद्धार समारंभाला गेले म्हणून उखडले होते. आपले राष्ट्र निधर्मी असल्यामुळे आपल्यापैकी कुणी अशा समारंभांना जाणे हा गुन्हा आहे असे नेहरूंचे म्हणणे होते. इथे तर चक्क पंतप्रधान आणि सरसंघचालक यांच्या नावाने निमंत्रण पत्रिकाच छापली असे नव्हे तर दोघांनी एकत्रित एका मंदिराचे भूमिपूजन केले ! त्या समस्त पुरोगामी लिबरल इत्यादी लोकांनी आता काय स्वतःला उलटे टांगून मिरचीची धुरी लावून घ्यायची काय ??? सत्तर वर्षाच्या षडयंत्राचा असा खेळखंडोबा झाल्यावर आता पुढे काय आणि कसे करायचे या विवंचनेत असतील मंडळी. त्यामुळे गेल्या दोनचार दिवसात फारशा पोस्टी नाहीत. हिंदू मुस्लिम या विषयात तंटे दंगे धोपे झाले नाहीत तर प्रश्न या जमातींच्या अस्तित्वाचा आहे !!!
@सुधीर मुतालीक
वाचने
26994
वाचनखूण
प्रतिक्रिया
74
राम मंदिराची पहिली केस
In reply to राम मंदिराची पहिली केस by कपिलमुनी
एका शब्दात घ्या ....
In reply to एका शब्दात घ्या .... by सुधीर मुतालीक
उत्तरे नसलि की असे प्रतिसाद
In reply to उत्तरे नसलि की असे प्रतिसाद by कपिलमुनी
चालेल
In reply to राम मंदिराची पहिली केस by कपिलमुनी
अरेरे
.
In reply to . by Gk
गंडल्या तारखा....
In reply to गंडल्या तारखा.... by सुधीर मुतालीक
कुठे आहे पत्र?
नेटवर इतके मिळाले
In reply to नेटवर इतके मिळाले by Gk
बर्रर्रर्र...
In reply to नेटवर इतके मिळाले by Gk
नकारघंटा
In reply to नकारघंटा by चौकस२१२
सेक्युलर
.
मस्तच... सुधीर मुतालीक
In reply to मस्तच... सुधीर मुतालीक by चौकस२१२
हो हो !
@ सुधीर मुतालिकजी
In reply to @ सुधीर मुतालिकजी by Bhakti
एका शब्दात...
एक वामपंथी बडे जोरो से बोल
एक वामपंथी बडे जोरो से बोल
छान लेख ! --
जहाल पण योग्य लिखाण. भारत हे
In reply to जहाल पण योग्य लिखाण. भारत हे by दिगोचि
can you name any muslim
In reply to can you name any muslim by NiluMP
मुस्लिम राष्ट्रात
In reply to मुस्लिम राष्ट्रात by सुबोध खरे
छान
In reply to छान by Gk
मग इथले स्कॉलर लोक तिकडे
माझ्या मते अमेरिका कानडा,
याच विषयावर , "सर्वधर्मसमभाव
In reply to याच विषयावर , "सर्वधर्मसमभाव by मराठी_माणूस
हे पत्र दत्तप्रसाद दाभोळकरांचे आहे
In reply to हे पत्र दत्तप्रसाद दाभोळकरांचे आहे by गामा पैलवान
.
In reply to . by Gk
ज्यांनी ही मागणी केली त्यांना
In reply to ज्यांनी ही मागणी केली त्यांना by सुबोध खरे
.
In reply to हे पत्र दत्तप्रसाद दाभोळकरांचे आहे by गामा पैलवान
असल्या फडतुस माणसांचे पत्र
In reply to हे पत्र दत्तप्रसाद दाभोळकरांचे आहे by गामा पैलवान
हे सगळं दत्तप्रसाद दाभोळकरांना सांगणार कोण?
मंदीर वही बनाएंगे लेकीन तारीख
In reply to मंदीर वही बनाएंगे लेकीन तारीख by प्रकाश घाटपांडे
:-)
इतिहासाचा विपरीत अर्थ काढून
लेख आवडला!
+++१
लेख आवडला
In reply to लेख आवडला by मूकवाचक
छान
In reply to छान by Gk
मंदिर कमिटीत एकाच जातीचे लोक
In reply to मंदिर कमिटीत एकाच जातीचे लोक by कांदा लिंबू
जमा मशिदीचे शाही इमाम आणि
In reply to जमा मशिदीचे शाही इमाम आणि by सुबोध खरे
असं घडलं तर भारताचा स्वर्ग
In reply to मंदिर कमिटीत एकाच जातीचे लोक by कांदा लिंबू
ते पुरावा देत नसतात.. फक्त
In reply to छान by Gk
कायप्पा ढकलपत्र
In reply to छान by Gk
कायप्पा ढकलपत्र
In reply to कायप्पा ढकलपत्र by कांदा लिंबू
'गाय आणि ब्राह्मण यांचे
In reply to 'गाय आणि ब्राह्मण यांचे by चौकस२१२
हिंदूच्यात फूट
In reply to हिंदूच्यात फूट by Gk
ती तर मुसलमान , ख्रिश्चन
In reply to कायप्पा ढकलपत्र by कांदा लिंबू
'तलवार के सामने सलवार उतारने
In reply to 'तलवार के सामने सलवार उतारने by Gk
.
In reply to . by Gk
कोणीच नाही
In reply to कोणीच नाही by गामा पैलवान
करा
In reply to करा by Gk
ती झालीच आहे हिंदू.
In reply to . by Gk
तुमच्या या प्रतिक्रियेतच
In reply to तुमच्या या प्रतिक्रियेतच by चौकस२१२
.
लिबरल, सेक्युलर, पुरोगामी होणे म्हणजे काय असते ?
In reply to लिबरल, सेक्युलर, पुरोगामी होणे म्हणजे काय असते ? by शा वि कु
वाउ
लेख आवडला
लेख खुप आवडला !!
आवडला
.
In reply to . by Gk
...
In reply to ... by Gk
.
In reply to . by Gk
सर्वोच्च न्यायालय
In reply to सर्वोच्च न्यायालय by Rajesh188
.
In reply to . by Gk
जाणकार बोलले
In reply to . by Gk
हायला
इतरान्ना हिन्दु करा
धर्म हा सक्तीचा विषय नाही.
धर्म पाळणारी लोक पर धर्मावर टीका करत असतात.
In reply to धर्म पाळणारी लोक पर धर्मावर टीका करत असतात. by Rajesh188
कसली संधी ?
In reply to धर्म पाळणारी लोक पर धर्मावर टीका करत असतात. by Rajesh188
धर्मांध आणि निधर्मांध (यात
जगभरात मुस्लिमांची जनसंख्या