त्रासदायक आठवणींपासुन सुटका कशी करुन घ्यावी?
साधारणपणे दहा-बारा वर्षापूर्वी बेंगलोरमध्येच भाड्याच्या घरात राहत होतो. घराची मालकणी शगुफ्ता नामक (नाव मुद्दामुन लिहिले आहे.वस्सकन अंगावर येऊ नये.)एक स्त्री होती. घराचे डिल होण्याअगोदर तोंडात साखर ठेवुन बोलायची.माझे नुकतेच लग्न ठरले होते.गोड तर इतकी बोलत होती कि मी माझ्या होणार्या बायकोचा व तिचाही लग्नाअगोदर फोनवर संवाद घडवुन आणला.
उदा. भाईसाब आप फिकर मत किजिए. आय विल बी अॅट युअर सर्विस.वगैरे. (हेच वाक्य लक्षात राहण्याचे कारण पुढे येईलच.)
पण जेव्हा घरात राहायला सुरवात केली व अॅग्रीमेंट वगैरे सोपस्कार..त्यापेक्षा बेंगलोरच्या रितिनुसार साधारण आठ-दहा महिन्यांचे आगाऊ भाडे अनामत म्हणुन तिला दिले त्यानंतर तिने खरे रंग दाखवायला सुरवात केली. म्हणजे एकदम विलन न बनता काही छोटी मोठी कामे घरात निघाली तर वो आप ही देख लो हेच पालुपद. ( आय विल बी अॅट युअर सर्विस ची ऐशीतैशी )ह्यात ड्रेनेज लॉक होणे, पाण्याचे मीटर खराब होणे असे काही गंभीर समस्या होत्या. मालकीणीचा चार फ्लॅट असलेला इंडिपेंडंट बंगला होता त्यामुळे बाकिच्या भाडेकरुंशी संवाद साधुन ही कामे करावी लागत आणि भाडेकरुही तिने केवळ अर्थप्राप्ती हा निकष ध्यानात घेऊन ठेवले होते. (बॅचलर्स वगैरे).त्यांना मॅनेज करणे अजुन एक दिव्य होते. ती स्वतः दुसरीकडे राह्त होती मालकीणीचा नवरा चांगल्या कंपनीत कामाला होता व एकदा ती उपलब्ध नसल्याने पाणी न येण्याची एक समस्या त्याच्या कानावर घालुन कृपया हीच निराकरण करा अशी विनंती केली असता घर खाली करण्याची धमकी दिली होती त्यामूळे जपूनच बोलणी करावी लागत. ते असो. पुढे त्या घरातुन दुसरीकडे शिफ्ट झालो तेव्हाही तिने पत्नीचा अप्रत्यक्ष पाणउतारा केला. पत्नी ह्याबद्दल तारतम्य बाळगुन विचार करणारी असल्याने तिने ह्याकडे कानाडोळा केला. पण आज बारा वर्ष होत आली आणि ही गोष्ट अधेमधे आठवत असायची.पण सध्या लॉकडाऊनच्या काळात का कुणास ठाऊक माहीती नाही पण सकाळी उठल्या उठल्या प्रातर्विधी उरकतानाच एकदा तरी आठवत राहते(त्या दृष्टीने प्रातःस्मरणीयच) आणि मनस्थिती लगेच बदलते. थोडक्यात प्रेमभंग झालेल्या प्रेमीसारखी मनस्थिती होते.(!) थोडा बारीक विचार केला असता लक्षात आले कि माझा जो काही पाणउतारा केला तो एकवेळ मी विसरलो असतो पण पत्नीचा केलेला पाणउतारा विसरणे अवघड वाटतेय. ह्याबाबतीत खुद्द पत्नीलाच विचारले असता तिने सांगितले कि अश्या गोष्टींचा ती जास्त विचार करत नाही. ती स्वतः दिल्लीत राहीली आहे आणि अश्या गोष्टी आधीही अनुभवल्या आहेत.ते ही असो पण ह्या गोष्टीनंतर गोड बोलणार्या कुठल्याही व्यक्तीवर पटकन विश्वास बसत नाही. लगेच अँटीना चालु होतो कि काहीतरी उद्देश अस्णार. पण अश्या मनस्वास्थ्य बिघडवणार्या आठवणींपासुन सुटका कशी करुन घ्यावी?
प्रतिक्रिया
ह्म्म्म
मी पण योगेशच व सध्या बंगलोरला
ती स्वतः दिल्लीत राहीली आहे
होय. पत्नीने सांगितल्यानुसार
तो अपमान तुम्ही अजून का धरून ठेवला आहे?
राणेसाहेब तुमचे विश्लेषण
योग्या, मला तर चांगलाच ओळखतो
नाय रे गण्या. आता बारा
योग्या,
सिग्नलच चुकीचा पकडला
जास्त विचार नका करू. व्यक्ती
ती तुमचा विचार अजूनही करत
थोडक्यात..
भुजंगराव तुमच्या
हे नक्की आहे काय?
तुमच्यातल्या सुप्त पुरुषी
मला अस वाटत तुम्ही उगाचच
अठवणी किंवा विचारांपसून सुटका
योग्य लिहिले आहे राजाभाऊ.
आणि घटना जरी कुणीही घडवली
आणि घटना जरी कुणीही घडवली
त्रासदायक आठवणींपासुन सुटका
म्हन्जे
त्रासदायक
हा मानसिक त्रास त्या
रोज लक्षात ठेवून एक वेळ ठरवून
२००७ साली मी माझ्यावर
हा प्रतिसाद धागाकर्त्यासाठी
@ शाम भागवत: जमल्यास मी तुम्हाला व्यनि करेन.
भागवत सर व्यनि नक्की करा.
विस्तृत लिहायला वेळ लागेल.
व्यनि पाठवला आहे.
माझं पूर्वी असं माझ्या
पुनर्जन्म?
@ वीणा३ : माझ्याकडे पुनर्जन्म या व्यतिरिक्त उत्तर नाही
पलायनवाद तर पलायनवाद. मला जर
@ कानडाऊ योगेशु : पलायनवाद तर पलायनवाद !
पुनर्जन्मच असे नाही पण आपणही
@ कानडाऊ योगेशु: आपणही कोणावर जाणतेपणी..
देखणी काश्मिरी स्त्री आणि
@ कानडाऊ योगेशु :बोलणे मोहक म्हणता येणार नाही
माझ्याकडे माझी कामवाली बाई
@ वीणा३:८-१० महिन्याचे पैसे आगाऊ दिलेत
इतकी रक्कम देण्यापूर्वी
गणेशा..
मोहातून सुटका न होण्याचं कारण सुद्धा
पुनर्जन्म... असफल विवाह..
@ मोदक : पुनर्जन्म... असफल विवाह..?
प्रत्येक असफल विवाहामागे मोहच
प्रत्येक असफल विवाहामागे मोहच दडलेला दिसेल !या कमेंटचा धाग्याशी काय संबंध आहे..? माझा मानसशास्त्रीय अभ्यास सांगतो आहे की, तुम्ही कोणताही विषयाला बादरायण संबंध लावून फाटे फोडता आणि अकारण विषयांतर करून समोरच्याला निरूत्तर करण्याचा प्रयत्न करता.@ मोदक: या कमेंटचा धाग्याशी काय संबंध आहे..?
Pagination