मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

प्रवासी

अनुस्वार · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
एका दिशेचा भेटला किनारा प्राक्तनाची दौड बाकी वाट दे तू सागरा. नाव माझी हलकी जरी मी खलाशी रानातला. लाटांची वादळे प्रचंड उरात लाव्हा तप्तला. आकाशी दुंदुभी गर्जना करावी वाऱ्यासवे वेगाची स्पर्धा हरावी. उन्मळून पडले गर्ववृक्ष सारे ओहोटीत गेले जीव सर्व प्यारे. पाहुणा मग पाऊस आला भरावया एक रिक्त प्याला. प्याला-होडी ची गल्लत मोठी झाली वल्हवणी आता पाण्यात शांत झाली. हे भास्करा, नको होऊस तू लुप्त लढणाऱ्यांना किती ठेवशील गुप्त. चांदण्यांचे मर्म थोडे वाटून घे निशेस सावलीची साथ दे.

वाचने 1462 वाचनखूण प्रतिक्रिया 2