पानिपत जिंकतो तर....?
पानिपत युद्धाबद्दल अधिक काय लिहावे?? महाराष्ट्राची एक भलभळती जखम.
अनेकांनी विश्वास पाटील ह्यांची पानिपत कादंबरी वाचलीच असावी. मध्यंतरी पानिपत सिनेमाही येऊन गेला. त्यानंतर नेट आणी इतर ठिकाणीवर अनेक लेख लिहिले गेले. Youtube वर अनेकानी विडिओ बनवल्या. अनेक विडिओ खाली कमेंट बॉक्स मध्ये लांबलचक चर्चा झाली. युद्ध का झाले? कसे झाले? ह्यावर बराच काथ्याकूट आहे. पण हे युद्ध भारताचा इतिहास बदलणारे ठरले हे नक्की. पण पानिपत युद्ध मराठे जिंकते तर आजचा भारत कसा असता?? ह्यावर फार कमी लिखाण सापडले.
हिंदी भाषिकांच्या लेखात, चर्चेत आणी व्हिडिओत अनेक ठिकाणी ह्यावर लेखन केलंय. मराठीत ह्यावर खूप कमी लेखन मिळालं. काहीनी लिहिलंय की मुघल साम्राज्य संपल्यानंतर अब्दालीमुळे आज भारतात मुस्लिम टिकून आहेत. अब्दाली काही लोकांच्या दृष्टीने त्यांचा हिरो आहे.
मी इंटरनेटवर जितकी माहिती मिळवली त्यानूसार शावोन चौधरी ह्यांनी एक सुरेख लेख लिहिलाय त्यात त्यांनी सांगितलंय की जर मराठे पानिपतात जिंकले असते तर अब्दाली हरून पळत असता त्याची गाठ पंजाबात शिखांशी पडती आणी अब्दाली लाहोर युद्धात मारला जाता.
पानिपत विजया नंतर मराठयांनी दिल्लीत जल्लोश केला असता. त्यानंतर शहा आलम द्वितीय ह्याला दिल्लीच्या गादीवर बसवून शिंदेंना त्यांच्या रक्षणाची जबाबदारी दिली जाती.
नंतर मराठयांनी निजामशाही कायमची संपवली असती. आणी त्यांना निजाम जेवढा गरीब असल्याचं ढोंग करतोय त्यापेक्षा तो गडगंज श्रीमंत असलेला सापडला असता. शिखांचं साम्राज्य लवकर वाढतं आणी कदाचित मराठे आणी शीख दिल्लीसाठी एकमेकांशी भांडले असते. मद्रास आणी दक्षिण संपूर्णपणे मराठ्यांच्या ताब्यात असती. आणी कदाचीत टिपू सुलतानचा उदयच न होता. मराठे सरदार खुप ताकदवान होऊन एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीपर्यन्त संपूर्ण भारतावर मराठी सरदारांच वर्चस्व असतं. काहींनी लिहिलंय की भारत युरोपीय देशांसारखा छोट्या छोट्या तुकड्यात विभागला गेलेला पहायला मिळाला असता. मराठे जिथपर्यंत गेले तिथपर्यंतच आजचा भारत आहे असेही काही ठिकाणी वाचले. बंगालात मराठे जिथपर्यंत गेले तिथपर्यंतच आज बंगालची सीमा आहे.
मायबोलीच्या एका धाग्यात सांगितलंय की मराठ्यांची सर्वात मोठी चूक म्हणजे बंगाल, बिहार, उत्तरप्रदेश "साफ" न करता पंजाबात जाणे. तसेच अब्दाली ने दिल्लीत शहावलीउल्ला ह्याच्या सांगण्यानुसार दिल्लीत वहाबी विचारधारेचं राज्य स्थापन केले असते तर?? पुन्हा भारताला एका काळ्या युगाला सामोरे जावे लागले असते. पानिपत युद्धाने अनेक भीषण परिणाम घडवले. खरं तर ह्याला युद्ध न म्हणता महायुद्धच म्हणायला हवे.
एकंदरीत जे झाले ते झाले. पण ते जर झाले नसते तर?? मराठ्याएवजी अफगानांचे पानिपत झाले असते तर??
बक्सर च्या युद्धात मराठ्यांनी नक्कीच सर्वांबरोबर मिळुन इंग्रजाना धूळ चारली असती?
आजचा भारत कसा असता??
आज ह्या गोष्टीला महत्व नसलं तरी एकंदरीत स्वप्नरंजन म्हणून का होईना पण मराठा साम्राज्य कुठपर्यंत असतं? आजच्या भारताच्या सीमा कुठवर असत्या? सांस्कृतिक, राजनैतिक, भौगोलिक भारत कसा असता? आणी आजच्या राजकारणावर त्याचा काय परिणाम असता??
( इतिहासात जर तर ला महत्व नसतं. अशी पिंक टाकुन धाग्याच पानिपत करायला कृपया येऊ नका.)
वाचने
29810
वाचनखूण
प्रतिक्रिया
53
जयंत नारळीकरांनी लिहीलेली
In reply to जयंत नारळीकरांनी लिहीलेली by विजुभाऊ
धन्यवाद विजुभाऊ. मध्यंतरी
मराठीत ह्यावर खूप कमी लेखन मिळालं.
In reply to मराठीत ह्यावर खूप कमी लेखन मिळालं. by महासंग्राम
ते ही आहेच. पण इन युद्धात
मुळात नादीरशहा, अब्दाली यांचे
In reply to मुळात नादीरशहा, अब्दाली यांचे by राघव
खरंय. मराठ्यांनी एकही
In reply to मुळात नादीरशहा, अब्दाली यांचे by राघव
माझे निम्न लिखीत हे
In reply to माझे निम्न लिखीत हे by माहितगार
प्रतिसाद आवडला. बाजीरावांनी
माझ्या पानिपतच्या लढाईवरच्या
In reply to माझ्या पानिपतच्या लढाईवरच्या by मनो
मुद्देसूद प्रतिसाद.
In reply to माझ्या पानिपतच्या लढाईवरच्या by मनो
खूप छान प्रतिसाद मनो. महादजी
In reply to माझ्या पानिपतच्या लढाईवरच्या by मनो
खुप छान. असंही अब्दाली
In reply to माझ्या पानिपतच्या लढाईवरच्या by मनो
प्रतिसाद आवडला.
In reply to माझ्या पानिपतच्या लढाईवरच्या by मनो
- ब्रिटिशांची कुवत जोखण्यात
In reply to माझ्या पानिपतच्या लढाईवरच्या by मनो
मनो यांचा विस्तृत आणि मुद्देसुद प्रतिसाद आवडला आणि पटला.
In reply to मनो यांचा विस्तृत आणि मुद्देसुद प्रतिसाद आवडला आणि पटला. by बबन ताम्बे
बबनजी सैन्य पोटावर चालतं,
In reply to मनो यांचा विस्तृत आणि मुद्देसुद प्रतिसाद आवडला आणि पटला. by बबन ताम्बे
बबनजी सैन्य पोटावर चालतं,
In reply to बबनजी सैन्य पोटावर चालतं, by अमरेंद्र बाहुबली
अमरेंद्रजी, मी इंग्रज चांगले होते म्हटलेच नाही..
In reply to अमरेंद्रजी, मी इंग्रज चांगले होते म्हटलेच नाही.. by बबन ताम्बे
बबनजी, हे तर प्रत्येक युद्धात
In reply to बबनजी, हे तर प्रत्येक युद्धात by अमरेंद्र बाहुबली
"हे तर प्रत्येक युद्धात करावं लागतं. "...
In reply to माझ्या पानिपतच्या लढाईवरच्या by मनो
भारी!!
In reply to माझ्या पानिपतच्या लढाईवरच्या by मनो
मनो, पुस्तकाची वाट बघतो आहे.
In reply to मनो, पुस्तकाची वाट बघतो आहे. by चित्रगुप्त
अरेच्चा. २०२० चा लेख आणि प्रतिसाद मी आजच पहिल्यांदा वाचले
In reply to अरेच्चा. २०२० चा लेख आणि प्रतिसाद मी आजच पहिल्यांदा वाचले by चित्रगुप्त
वरती म्हणलेले पुस्तक ते जुने,
In reply to वरती म्हणलेले पुस्तक ते जुने, by मनो
वाहवा. खूपच छान असेल नवीन ग्रन्थ.
In reply to वरती म्हणलेले पुस्तक ते जुने, by मनो
वाचण्यास उत्सुक आहे. जरूर
In reply to वरती म्हणलेले पुस्तक ते जुने, by मनो
वाचणार, शुभेच्छा.
लाख टके की एक बात !
आले, लुटले, आणि गेले !
In reply to आले, लुटले, आणि गेले ! by चौकस२१२
बादशहाच्या नावानं
In reply to आले, लुटले, आणि गेले ! by चौकस२१२
मराठ्यांच्या हातात इतकी
In reply to मराठ्यांच्या हातात इतकी by मनो
हा हे कळलं
बिना कष्टाची?
In reply to बिना कष्टाची? by चौकस२१२
तुमची माहिती चुकीची आहे.
In reply to तुमची माहिती चुकीची आहे. by मनो
आणि रघुनाथरावांनी अटकेपार
In reply to तुमची माहिती चुकीची आहे. by मनो
मुघल बादशाह ला उडवून तिथे छत्रपती
In reply to मुघल बादशाह ला उडवून तिथे छत्रपती by चौकस२१२
चौकस सर, हा प्रश्न मलाही पडला
In reply to चौकस सर, हा प्रश्न मलाही पडला by अमरेंद्र बाहुबली
सिंहासनावर बसणार कोण?
उत्तम चर्चा.
In reply to उत्तम चर्चा. by अर्धवटराव
कुठे गायब होतात भो?
In reply to कुठे गायब होतात भो? by प्रचेतस
खुप बिझी होतो रे..
In reply to खुप बिझी होतो रे.. by अर्धवटराव
=))
शिवाजी महाराज व पहिले बाजीराव
In reply to शिवाजी महाराज व पहिले बाजीराव by शाम भागवत
कुणाला किती आयुष्य असावं हे
In reply to कुणाला किती आयुष्य असावं हे by शाम भागवत
तेव्हा त्या छावणीत
In reply to कुणाला किती आयुष्य असावं हे by शाम भागवत
सिध्दी जोहराला प्रतापराव
In reply to कुणाला किती आयुष्य असावं हे by शाम भागवत
भागवत साहेब शंभ टक्के सहमत.
In reply to कुणाला किती आयुष्य असावं हे by शाम भागवत
आता ते कळस कापण्याचे व
हो.हो. बहलोलखान. :) _/\_
पानिपत युध्दाआधीची परिस्थिती,
मनों चे पुस्तक आले का ?
अबा लेख व प्रतीसाद वाचनीय
अबा लेख व प्रतीसाद वाचनीय