मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

चालू घडामोडी - फेब्रुवारी २०१९

वामन देशमुख · · काथ्याकूट
अर्थसंकल्प . २०१९चा लेखानुदान (अंतरिम अर्थसंकल्प) काल अर्थमंत्री श्री पियुष गोयल यांनी संसदेत सादर केला. अपेक्षेप्रमाणे लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन यात लोकप्रिय योजना प्रस्तावित करण्यात आल्या आहेत. अर्थमंत्र्यांच्या भाषणाचा संपूर्ण गोषवारा इथे इंग्लिशमध्ये वाचता येईल. अर्थसंकल्पातील काही ठळक योजना: महामार्ग बांधणीसाठी अतिरिक्त तरतूद क्रीडाक्षेत्रासाठी वाढीव तरतूद असंघटित क्षेत्रातील कामगार व शेतकरी यांच्यासाठी निवृत्तीवेतन उपभोक्त्याकडे अधिक पैसे राहणार या सुखांनो या! . एक प्रकट स्वगत: मोदी सरकारने आपल्या पहिल्या कार्यकाळात केलेल्या उल्लेखनीय बाबींपैकी एक म्हणजे सामाजिक-राजकीय चर्चेचा रोख केवळ दलित-अल्पसंख्यांक-शेतकरी-ग्रामीण जनता (पहिला गट) यांवरून मध्यमवर्गीय-छोटे व्यापारी-शहरी जनता (दुसरा गट) यांच्यावर आणला. म्हणजे, सर्वसाधारणपणे, कोणत्याही लाभप्रद योजना यापूर्वी मुख्यतः पहिल्या गटापैकी काही समाजघटकांसाठी असायच्या. दुसऱ्या गटाला शासनाकडून कुठल्या विशेष लाभाची गरजच नाही असा राजकीय विचारप्रवाह होता. खरंतर, दुसऱ्या गटातील समाजघटक हे अर्थव्यवस्थेचे key driving forces (मराठी?) असतात पण त्यांच्या लाभाची भाषा बोलण्यास आणि त्यांबध्दल काही करण्यास जणू काही अघोषित मज्जाव होता. अर्थव्यवस्थेतील एक प्रमुख घटक या न्यूनगंडानं पछाडलेला होता. त्यांच्यासाठी, आरक्षण, अतिरिक्त करमाफी, मुद्रा कर्ज, इ. योजना लागू करून, हे चित्र काही प्रमाणात बदलण्याचं श्रेय मोदींच्या आधुनिक राजकीय मांडणीला द्यायला हवं. तथापि, पहिल्या गटाकडे मोदी सरकारने दुर्लक्ष केलंय असं अजिबात नव्हे.

वाचन 544810 वाचनखूण प्रतिक्रिया 783

Blackcat Sat, 02/02/2019 - 09:25
कर भरण्याची पातळी वाढवली आहे , पण नेमके काय , माहीत नाही,

नगरीनिरंजन Sat, 02/02/2019 - 11:11
सहसा अंतरिम अर्थसंकल्पात मोठे निर्णय घेतले जात नाहीत. पण विधिनिषेध बाळगायचा नाही असं ठरल्यावर काही म्हणण्यासारखे उरत नाही. https://m.economictimes.com/news/politics-and-nation/view-why-this-budget-is-unethical-and-inequitous/articleshow/67792507.cms

In reply to by नगरीनिरंजन

डँबिस००७ Sat, 02/02/2019 - 11:50
विधिनिषेध बाळगायचा नाही असं ठरल्यावर काही म्हणण्यासारखे उरत नाही.... विधिनिषेध बाळगायचा नाही हा कॉंग्रेसचाच हक्क आहे अस काही आहे का ??

In reply to by नगरीनिरंजन

प्रसाद_१९८२ Sun, 02/03/2019 - 10:24
हणून तर कॉंग्रेसला लोकांनी नाकारलं. हे वेगळे असतील असं वाटलं होतं; पण... --- हे तुम्हाला किती लोकांनी पर्सनली येऊन सांगितले ?

In reply to by प्रसाद_१९८२

नगरीनिरंजन Mon, 02/04/2019 - 03:53
बातम्या वाचत असतो मी. तुमच्यासाठी काय वेगळं आहे तेही कळतंय.

In reply to by नगरीनिरंजन

ट्रेड मार्क Mon, 02/04/2019 - 04:12
२०१४ साली काँग्रेसने अंतरिम अर्थसंकल्प मांडला होता तो कदाचित तुमच्या विस्मरणात गेला असेल. या अंतरिम अर्थसंकल्पात काँग्रेसने कुठले बदल केलेत हे बघा. बाकी विधिनिषेध बाळगला नाही म्हणजे काय? गरिबांना आणि निम्न मध्यमवर्गीयांना फायदा होईल असे बदल सुचवले आहेत. फक्त त्यामुळे परिणाम काय होतील हे गोयल साहेब भाषण करत असताना रागाच्या चेहऱ्यावरून स्पष्ट दिसत होते. म्हणून तर कॉंग्रेसला लोकांनी नाकारलं. हे वेगळे असतील असं वाटलं होतं; पण... काँग्रेसला २०१४ मध्ये अंतरिम अर्थसंकल्प मांडताना विधिनिषेध पाळला नाही म्हणून नाकारलं असं म्हणताय? अति झालेली भ्रष्टाचाराची प्रकारणे, रिमोटवर चालणारे पंप्र, पॉलिसी पॅरालिसिस यासारखी बरीच कारणे होती.

In reply to by कंजूस

ट्रम्प Sat, 02/02/2019 - 11:47
अहो जगाच्या पोशिंदया ला धान्य द्या म्हणताय तुम्ही !!! त्यांना किमान गरजा मध्ये राहण्याची सवय असते पण शेतात पिकवलेल्या अन्नधान्य भाजीपाला ला योग्य भाव न भेटणे , खासगी सावकारी कर्ज आणि नैसर्गिक आपत्ति मुळे मेटाकुटि ला आलेला आहे तो . भाजीपाला , फळ प्रकिया उद्योग आणि वितरण व्यवस्था खेडोपाड़ी स्थापन न झाल्या मुळे सुद्धा सरकार च्या भिकेकड़े आशे ने पाहण्याची वेळ त्यांच्यावर येते . पण एकंदरीत भाजपा सरकार ने सुद्धा शेतकऱ्यांच्या तोंडाला पानेच पुसली आहेत . असू द्या , भविष्यात शेतकऱ्यांनां भाजप स्वतःच्या पायावर उभे होण्यास मदत करेल अशी खात्री आहे . म्हणूनच पुन्हा एकदा भाजप सरकारच येवो !!!!

In reply to by ट्रम्प

डँबिस००७ Sat, 02/02/2019 - 12:12
शेतकरी टॉमेटो कांद्याला भाव नसल्याने रस्त्यावर फेकतांना आपण बातम्यात खुपदा पाहीला असेल पण जो भाव शेतकर्याला मिळतो तितका स्वस्त माल कोणत्याही बाजारपेठेत ग्राहकाला मिळत नाही !! याचा अर्थ बाजारा असलेल्या मालाच्या किमतीतुन आपला खर्च व नफा व्यापारी काढुन घेत असतात. उरलेली किंमत शेतकर्याला मिळते ! शेतकर्याला स्वतःचा माल स्वतः विकल्या शिवाय पर्याय नाही !! असा प्रयत्न चंद्राबाबु नायडुंनी १० वर्षापुर्वी केला होता! त्यावेळेला रयत बाजार स्थापन केले होते जिथे शेतकरी आपला माल घेउन ग्राहकाला विकत असत ! ह्या योजनेला शेतकर्यांकडुन चांगला प्रतिसाद मिळाला होता ! भाजपा सरकार ने ह्याच धर्तीवर योजना बनवुन सत्यात उतरवलेली आहे !! शेतकरी आपला माल कुठेही घेउन न जाता, आपल्या शेतातुनच विकु शकेल !! हे सर्व ENAM (Electronic National Agri Market) ह्या योजने अंतर्गत आहे !!!

ट्रम्प Sat, 02/02/2019 - 11:26
भाजप चे विधिनिवेश गुंडाळने काँग्रेस च्या बरोबरीला आले की भाजप सरकार हाकलुन देवू !! त्यात क़ाय अवघड आहे ? म्हणजे त्या हिशोबाने अजुन किमान 20 / 25 वर्ष तरी भाजप ला संधी द्यावी लागेल .

पाच लाख किंवा कमी उत्पन्न असणार्यांना आता अच्छे दिन येणार हे बरे झाले. सरकार वित्तीय तूट कशी भरून काढणार ह्याचा विचार आता न केलेला बरा असे ह्यांचे मत.निवडणूक संपली रे संपली आणी नवे सरकार आले की मग पेट्रोल्/डिझेलचे भाव वाढणार ह्यात शंका नाही.

डँबिस००७ Sat, 02/02/2019 - 15:08
भाजपा सरकारने जबर दस्त बजेट आणल्याने भ्रष्ट कॉग्रेसच्या सपोर्टर्स करणार्या लोकांच्या पोटात भीतीने गोळा येऊन प्रा कवी यांनी काहीही बडबडायला सुरुवात केलेली दिसत आहे.

In reply to by विशुमित

lakhu risbud Sat, 02/02/2019 - 22:17
त्या तुमच्या IT Cell वाल्यांना ते आदिलशहाचे हेर आंतरजालावर सापडतात का ते बघायला सांगा की ! तेवढंच दाव्याच वजन वाढेल.

In reply to by lakhu risbud

विशुमित Sun, 02/03/2019 - 00:05

बर बर सांगतो..!
===
सायकल घेतली की काय नविन??
एकाच जागेवर गिरक्या मारताय म्हणून विचारले..!
===
तुंप खाऊन पोटावर साचलेली चरबीबाबत आपले मौलिक मत समजून घेण्यासाठी उत्सुक आहोत.
कधी पांयडल मारताय मग??

Blackcat Sat, 02/02/2019 - 18:39
भाजपे कलकलाट करत असलेल्या केसमध्ये रॉबर्ट ना जामीन मंजूर, भाजपाच्या काळात , सरकार गँभीर आरोप ठेवते , अन लोक जामिनावर सुटतात उदा , रॉबर्ट , तेलतुंबडे , कन्हैया मग बाइज्जत बरी होतात , उदा सलमान , शाहरुख, मग भक्त शहामृग होतात , नशीब , कसाब, अफजलला काँग्रेसने फाशी दिली नैतर आज भाजप काळात बाहेर आले असते

In reply to by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)

lakhu risbud Sat, 02/02/2019 - 22:20
व्यावसाईक आणि वैयक्तिक आयुष्यातील साचून राहिलेला उद्वेग,निराशा यांचा निचरा होण्यासाठी समाजमाध्यमे उपयोगी ठरतात या अर्थाचे संशोधन मागे वाचले होते. मिपा सारख्या व्यासपीठाचा... त्यातही काही ठराविक धाग्यांचा या कामासाठी ज्या सातत्याने आणि सफाईदारपणे वापर होत आहे ती बाब मिपा सारख्या माध्यमांचे महत्व चे आजच्या काळात अधोरेखित करणारी आहे का ? @ Blackcat तुमचे या विषय बद्दलचे मौलिक मत जाणून घ्यायला आवडेल. नको मोगाराया अन्त आता पाहु !!

In reply to by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)

ट्रेड मार्क Sun, 02/03/2019 - 07:21
मोदी फॅसिस्ट आहेत म्हणून इतका आरडाओरडा करतात. मग त्यांचे विरोधी असणाऱ्याना कसे काय मोकळे सोडले जाते? सीबीआय तर मोदींच्या हाताशी आहेच, मग या सगळ्यांना पकडून तुरुंगात का नाही घातले बरं? नशीब , कसाब, अफजलला काँग्रेसने फाशी दिली काँग्रेसने फाशी दिली होय. आम्हाला वाटायचं कोर्ट फाशीची शिक्षा सुनावते आणि प्रशासनाला त्याची अंमलबजावणी करायला लागते. काँग्रेसच्या काळात कोर्ट स्वतंत्रपणे काम करायचं असे म्हणतात, म्हणजे कोर्टाच्या या निर्णयात काँग्रेसचा काही हात नसणार. अफझल गुरूच्या फाशीविरोधात कोणी प्रोटेस्ट केले होते? अफझल तेरे कातिल जिंदा है म्हणून कोणी घोषणा दिल्या आणि त्यांचे समर्थन कोणी केलं होतं? याकूब मेमनला वाचवण्यासाठी किती प्रयत्न कोणी केले? रात्री कोर्ट कोणी उघडायला लावले? त्याही पेक्षा मोठा प्रश्न अतिरेकी एवढे आत येऊन विध्वंस करतात याची जबाबदारी तत्कालीन सरकारवर का नाही? अतिरेकी हल्ले, बिनबोभाट चाललेली घुसखोरी, तयार झालेले नक्षली आणि अतिरेकी ही सगळी काँग्रेसचीच तर देण आहे. बाकी तुम्हाला घोटाळेबाज, देशाविरोधात घोषणा देणारे आणि अतिरेकी यांच्यातला फरक समजावा अशी देवाकडे प्रार्थना करतो.

In reply to by ट्रेड मार्क

Blackcat Sun, 02/03/2019 - 07:29
देशाविरुद्ध कुणी कुठे घोषणा दिल्या ? मोदी सरकारने त्यांना पकडले ना , कोर्टाने शिक्षा दिली की नाही ? की नेहमीप्रमाणेच फोटोशॉप बातमी अन फेक व्हिडीओ ?

In reply to by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)

ट्रेड मार्क Sun, 02/03/2019 - 07:38
ही बातमी नजरेआड केली वाटतं? का २०१९ मध्ये काँग्रेस सरकार आलं तर सगळे चार्जेस रद्द होतील याची खात्री आहे? लिंक मध्ये दिलेल्या वृत्तपत्रावर विश्वास नसेल तर गुगलून बघा. हां आता वायर किंवा स्क्रोल वगैरेवर किंवा ध्रुव राठी च्या तुनळी च्यानलवर ही बातमी मिळणार नाही पण बाकी सर्व मुख्य वर्तमानपत्रात ही बातमी मिळेल.

In reply to by ट्रेड मार्क

Blackcat Sun, 02/03/2019 - 07:48
देशाविरुद्ध कुणी कुठे घोषणा दिल्या ? मोदी सरकारने त्यांना पकडले ना , कोर्टाने शिक्षा दिली की नाही ? की नेहमीप्रमाणेच फोटोशॉप बातमी अन फेक व्हिडीओ ?

In reply to by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)

ट्रम्प Sun, 02/03/2019 - 11:00
एकदम बरोबर , भाजप सरकार नवखे असल्यामुळे त्यांना ' ते ' प्रकरण व्यवस्थित हताळता आले नाही आणि गल्लीतले फाटके पुढारी होण्याची लायकी असणारे देशपातळीवर चमकले !!! पण काहीही असो त्या घटनेचा काँग्रेस ला काडीमात्र ही फायदा झाला नाही , कारण फाटक्यांच्या विचारसरणी चे ' लोक ' भारतात खुप कमी आहेत . पर्रिकर प्रकरणात त्या दिवशी ब्लैककैट ने सुद्धा रागा निषेध केला होता याचा अर्थ ब्लैककैट ची सदसद्विवेक बुद्धि अजुन शाबित आहे .

डँबिस००७ Sat, 02/02/2019 - 22:28
नशीब , कसाब, अफजलला काँग्रेसने फाशी दिली अरे व्वा , मग तुमच्या लाडक्या चिदंबरमला अस का वाटल की काँग्रेसने अफझल गुरु ला फाशी देण्यात चुक केली. ईतकच नव्हे तर तुमच्याच लाङक्या शशी थरुर ला तर पुढे जाऊन अस वाटल की अफझल गुरुला फाशी देण म्हणजे देशाच्या सरकारनेच मर्डर करणे !! https://www.hindustantimes.com/india/grave-doubts-about-afzal-s-involvement-in-parl-attack-chidambaram/story-i1qk7FbuAXYZIMoqioDCaM.html https://www.indiatoday.in/india/story/meanwhile-congress-forgets-it-hanged-afzal-guru-285420-2015-07-30 आता ह्यावर मोगा खान कडे काही बोलायला नसेलच पण पिंक टाकायला विसरणार नाही !!

In reply to by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)

mayu4u Sun, 02/03/2019 - 13:36
व्यक्तींना आणि त्यांच्या पक्षाला जनता मतदानातून त्यांची जागा दाखवून देते. मग "नाचता येईना..." च्या चालीवर मतदान यंत्रावर खापर फोडतात.

In reply to by mayu4u

Blackcat Sun, 02/03/2019 - 19:44
आणि मते मिळवून खुर्चीत बसलेले भाजपे गांधी , नेहरू , जिना आणि आरक्षणावर खापर फोडतात

डँबिस००७ Sat, 02/02/2019 - 22:41
दिपक तलवार नावाच्या दलालला दुबईवरुन भारतात आणलय आणी त्याच्या चौकशीत काँग्रेसचे नेते नागडे व्हायला लागले आहेत . चौकशी अधिकार्यांना दिग्विजय सींगनी दिपक तलवारला लिहीलेल पत्रच हाती लागलय ! ह्या पत्रात दिग्विजय सींग यांनी दिपक तलवार यांना धन्यवाद दिले आहेत. दिग्विजय सींग यांच्या अमेरिका दौर्याच्या वेळेला दिल्ली ते अमेरीका दरम्यान विमान प्रवासाची अत्यंत महाग असलेल्या फस्ट क्लासची तिकीटे दिपक तलवार यांनी अ‍ॅरेंज करुन दिलेली होती. ह्या दिपक तलवारने राहुल गांधींना सुद्धा वेळोवेळी फस्ट क्लासची विमानाची तिकीटे काढुन दिलेली होती. त्या संबंधातले पुरावे आता हाती आलेले आहेत अस सुत्रांनी सांगीतल ! मोदी सरकार जाव हे ह्या भ्रष्ट कॉग्रेसच्या भ्रष्ट नेत्यांना वाटण स्वाभाविक आहे पण राहुल गांधीच्या जमोप्या सारख्या भक्ताला सुद्धा अस वाटण म्हणजे बेगाने शादी मे अब्दुल्ला दिवाना !! अस ही कमरेच सोडुन डोक्याला गुंडाळुन नाचायला ह्याचा हात को णीही धरु शकणार नाही !!

डँबिस००७ Sat, 02/02/2019 - 23:22
सीबीआयच्या डायरेक्टर नियुक्तीच्या वेळेला भ्रष्ट काँग्रेसच्या मल्लिकार्जुन खरगेचा खोडा !! गेल्या वेळेला सीबीआयच्या डायरेक्टर नियुक्तीच्या वेळेला व तसेच कामावरुन काढताना सुद्धा काँग्रेसच्या मल्लिकार्जुन खरगेचा खोडा घातलेला होता. श्री रीशी कुमार शुक्ला यांची सीबीआयच्या डायरेक्टरच्या पदावर नियुक्ती करण्यासाठी पं प्रधानासकट तिन लोकांची समिती तयार केलेली आहे. सीबीआयचा ईतका धसका ह्या भ्रष्ट काँग्रेसने घेतलेला आहे की सीबीआयच्या डायरेक्टर नियुक्तीच्या वेळेला खोडा घालायचे कामच करत आहेत.

In reply to by डँबिस००७

ट्रम्प Sun, 02/03/2019 - 11:15
विरोधी पक्षाचा मान भाजप ने काँग्रेस ला न दिल्यामुळे भाजपा च्या प्रत्येक निर्णया ला विरोध करण्याचे काम खडगे आणि काँग्रेस करत आहेत . निवडणूक आयोगाच्या माहिती प्रमाणे 2019 च्या निवडणुकीत 18 ते 39 वय असलेल्या मतदारांचे प्रमाण 45 % आहे आणि टेक्नोसाव्हि असलेली तरुण मंडळी मोदीनांच सपोर्ट करण्याची शक्यता असल्या मुळे सगळे विरोधीपक्ष घाबरले आहेत . अस्तित्त्व टिकवन्यासाठी त्यांनी जन्माचे वैरी असलेल्या बरोबर अनैतिक आघाड्या केल्या आहेत , भारतातील मुस्लिमसमाजाप्रमाणे हिंदू कट्टर नाहीत हे त्या सगळ्या अनैतिक अघाड़या च्या पथ्यावर पडले आहे , म्हणून ते देशद्रोही लोकांना एकत्र करून मोदींच्या विरोधात लढत आहेत .

In reply to by डँबिस००७

SHASHANKPARAB Mon, 02/04/2019 - 16:08
खर्गे भाऊंनी जे कारण दिलंय ते हास्यास्पद आहे.म्हणे १९८४ च्या बॅचच्या नव्या सीबीआय संचालकांकडे पुरेसा अनुभव नाहीय. यांना स्वतःला कुठलाही राजकीय अनुभव नसणाऱ्या सोनियाबाई यांना पक्षाध्यक्ष म्हणून चालतात (पंतप्रधान पण बनवणार होते, पण ऐनवेळी "आतला" आवाज आला) , मग गेली १४ वर्षे खासदारकीच्या नावाखाली झोप काढणारा राजपुत्रही चालतो, ज्याचे आतापर्यंतचे कर्तृत्व दुर्बीण घेऊन शोधायला लागेल.

In reply to by आनन्दा

प्रसाद_१९८२ Sun, 02/03/2019 - 10:31
देशाच्या तत्कालीन गृहमंत्री म्हणतो की मला मान्य नसताना कसाबला फासावर चढवले? म्हणजे सरकार चालवायचे तरी कोण? -- मला वाटते हा प्रश्न कधीतरी अमिताभच्या केबीसी मधे येऊ शकतो. जर असा प्रश्न केबीसीमधे कधी आलाच, तर या प्रश्नाचे चार ऑप्शन काय असू शकतात ?

सध्याचे वातावरण पाहता पुढचे तीन महिने अनेक चॅनेल्सवर खंडीभर करमणूक असणार आहे ह्यात शंका नाही. दाणे टाकून कोंबड्या झुंजवायच्या तसे प्रत्येक चॅनलवर पक्षाच्या प्रवक्त्यांना करायला लावणार हे नक्की. २६ जानेवारीला गडकरी व राहूल मस्तपैकी गप्पा मारत होते. दिवसा कार्यकर्त्यंना ,पाठिराख्यांना भांडायला लावायचे व रात्री एकत्र प्यायला बसायचे.. हे उद्योग सर्वपक्षीय नेते करतात.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

विशुमित Sun, 02/03/2019 - 17:08
https://www.loksatta.com/maharashtra-news/union-minister-nitin-gadkari-advise-party-workers-in-nagpur-1834639/ जो घर सांभाळू शकत नाही; तो देश सांभाळू शकत नाही- गडकरी नितीनजीने कार्यकर्त्यांचे (?) कान टोचले. === माई तुमचे 'हे' लक्ष देतात का तुमच्याकडे की फिरतात पतका घेवून कोणत्या पक्षाचा??

In reply to by विशुमित

पुर्वीचा मराठी माणूस राजकीयदृष्ट्या शहाणा होता असे ह्यांचे मत. म्हणजे सगळ्या पक्षांच्या जाहीर सभांना हजेरी लावायची, टाळ्यांचा कडकडाट करायचा, भाषण ठोकणार्या पुढार्याचे कौतुक करायचे पण मत मात्र आपल्या आवडत्या पक्षाला द्यायचे. शिवसेनेला हा अनुभव अनेक्वेळा यायचा असे म्हणतात. तत्कालिन पत्रकारही बिलंदर असायचे. ह.रा.महाजनी, गोविंद तळवलकर,गिरिलाल जैन ही मंडळी कोणत्या पक्षाला मत देतील हे अगदी त्यांच्या घरातील माणसांनाही सांगता येणार नाही..असा प्रकार होता.

Blackcat Sun, 02/03/2019 - 18:21
राहुल गांधी यांच्या पाटणा दौरापूर्वी एका पोस्टरमुळे वाद निर्माण झाला आहे. याआधी काँग्रेस कार्यकर्त्यांनी राहुल गांधींचे प्रभू रामाचा अवतारातील पोस्टर लावले होते.  या पोस्टरमध्ये राहूल गांधींना भगवान शंकराच्या अवतारात दाखवण्यात आले आहे. याच पोस्टरमध्ये प्रियंका गांधी यांना दुर्गामातेच्या तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना महिषासूराच्या अवतारात दाखवले आहे. दुर्गामातेने महिषासूराचा वध केल्याची प्रतिकृती या पोस्टरमध्ये उभा केली आहे. या पोस्टवर ‘राहुल-प्रियंका का सपना, खुशहाल हो देश अपना.’ असे लिहिण्यात आले आहे. हे पोस्टर काँग्रेसने लावल्याचा आरोप भाजपाकडून करण्यात येत आहे. याबाबत स्थानिक न्यायालयात तक्रार दाखल करण्यात आली आहे. या पोस्टरमधून हिंदूंच्या भावना दुखावल्या गेल्याचा आरोपही तक्रारीत केला आहे. --------- भाजपे प्रियंकाला शूर्पणखा , पुतना बोलत होते, आता काँग्रेसने मोदीना महिषासुर बोलले तर लगेच भावना दुखावल्या.

In reply to by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)

विशुमित Sun, 02/03/2019 - 20:18

पांचटपणा आहे हा कांग्रेसचा!!
===
पण त्यांचाही नाईलाज आहे म्हणा भारतीय मतदारांना especially उत्तर भारतीयांना असलेच उपद्व्याप आवडतात.
===
उगाच 2 वरुन बहुमताचे सरकार खेचून आणलं नाही !
आहात कुठे??

डँबिस००७ Sun, 02/03/2019 - 18:52
प्रियंकाला शूर्पणखा , पुतना बोलायला भाजपाचे लोक तुमच्या सारखे येडे नाहीत. शूर्पणखा, पुतनाच्या अगोदर आलेली म्हणजे सो गा = शूर्पणखा आणि प्रियंका= पुतना राहुल गांधींचे प्रभू रामाचा अवतारातील पोस्टर लावले होते. या पोस्टरमध्ये राहूल गांधींना भगवान शंकराच्या अवतारात दाखवण्यात आले आहे. याच पोस्टरमध्ये प्रियंका गांधी यांना दुर्गामातेच्या रुपात , अ रे रे सिक्युलर काँग्रेसची काय ही दशा झालेली आहे !! श्री राम हा भारताच्या इतिहासाचा भाग नसुन , हिंदु धर्मातला एक मिथ्थ आहे असे प्रतिपादन सु कोर्टात करणारी काँग्रेस आता हिंदु देवतांच्या अवतारात ?

डँबिस००७ Sun, 02/03/2019 - 19:25
नरेंद्र मोदी व अजित डोभाल यांच्या जोडीने दुबईत जे गुप्त ऑपरेशन केले ते वाचून तुमच्या अंगाचा थरकाप उडेल. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विदेश दौऱ्यांवर सतत ऊर बडवून घेणाऱ्या विरोधकांना नरेंद्र मोदींची ताकद तेव्हा नक्कीच समजली असेल जेव्हा मोदींनी एक गुप्त ऑपरेशन राबवून दुबईमधून ऑगस्टावेस्टलँड घोटाळ्यातील आरोपी राजीव सक्सेना व दीपक तलवार यांना अक्षरशः उचलले. 30 जानेवारी 2019 ला दुबईच्या सुरक्षा यंत्रणेने यांना त्यांच्या घरांतून उचलले आणि भारताच्या ताब्यात दिले. सध्या हे इडीच्या ताब्यात आहेत. ज्या पद्धतीने भारताने या दोन दलालांना दुबईमधून उचलले त्याला इस्त्रायलच्या गुप्त ऑपरेशन्ससारखे पाहिले जात आहे. अशी ऑपरेशन्स आजपर्यंत इस्रायलच करत आलेला आहे. भारताने कशा पद्धतीने हे गुप्त ऑपरेशन यशस्वी केले ते वाचाल तर तुम्हीही थक्क व्हाल! वाचा कशा पद्धतीने भारताने ऑपरेशन केले --: ईडीने वारंवार विनंती करूनही राजीव सक्सेना हा चौकशीला साथ देत नव्हता. कायदेशीर मार्गाने वारंवार विचारणा करूनही त्याच्याकडून काहीही प्रतिसाद न मिळाल्यामुळे मोदींनी राजनैतिक संबंधांचा वापर करून दुबईवर दबाव आणला की कुठल्याही पद्धतीने आम्हाला राजीव सक्सेना हा हवाच आहे. तर दुसरीकडे राजीव सक्सेनाला असे वाटत होते की आंतरराष्ट्रीय प्रत्यार्पणाची प्रक्रिया तर खूप वेळखाऊ आहे, आपण न्यायालयात जाऊ व या प्रक्रियेला भरपूर वेळ लावू. तोपर्यंत कदाचित 2019 ला भारतात सत्ताबदल होऊन काँग्रेसचे सरकार येईल व त्यानंतर त्याला कोणीही हात लावू शकणार नाही. पण नंतर पंतप्रधान मोदींच्या दबावामुळे दुबईमध्ये जे काही झालं त्याने देशातल्या लुटारूंची झोप उडेल. कोणतीही, अक्षरशः कोणतीही आंतरराष्ट्रीय प्रत्यार्पणाची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण न करता दुबईच्या सुरक्षायंत्रणांनी राजीव सक्सेनाला त्याच्या राहत्या घरातून उचललेले व गाडीत टाकले. राजीव सक्सेना आपल्या वकीलांबरोबर बोलण्याची विनंती वारंवार दुबईच्या यंत्रणेला करत होता. पण दुबईच्या अधिकाऱ्यांनी त्याची एकही गोष्ट मान्य केली नाही. त्यानंतर राजीवने आपल्या कुटुंबीयांसोबत भेटण्याची इच्छा व्यक्त केली व कमीतकमी औषधे तरी घेऊ देण्याची विनंती केली. पण दुबईच्या अधिकाऱ्यांनी त्याचं काहीही ऐकून न घेता त्याला सरळ एका प्रायव्हेट एअरपोर्टवर ते घेऊन गेले आणि एका प्रायव्हेट जेटमध्ये चढवले. जेटमध्ये भारताच्या अधिकाऱ्यांना बघताच राजीव सक्‍सेना अक्षरशः अवाक् झाला! दरम्यान राजीवच्या वकिलांना ही गोष्ट समजली व त्यांनी दुबईच्या यंत्रणेला विनंती केली की कमीत कमी एकदा तरी राजीवबरोबर बोलू दे. पण दुबईच्या यंत्रणांनी त्यांचही ऐकून न घेता त्यांना सांगितलं की तो आता भारताच्या ताब्यात आहे. तुम्हाला काय बोलायचं असेल ते भारताबरोबर बोला. राजीवला आम्ही विमानात बसवले आहे व विमानाच्या उड्डाणाला आम्ही आता थांबू शकत नाही! असं म्हटलं जातंय की कायदेशीर प्रक्रियेचे काहीही पालन न करता दुबईच्या यंत्रणांनी अवैधरित्या राजीवला उचलले व प्लेनमध्ये कोंबून भारताला पाठवले. एकाही आंतरराष्ट्रीय नियमाचे पालन केले गेले नाही. एका बाजूला राजीव सक्सेनाबरोबर हे चाललं होतं तर दुसऱ्या बाजूला ऑगस्टावेस्टलँड मधील आणखी एक आरोपी दीपक तलवार यालासुद्धा याच पद्धतीने दुबईच्या यंत्रणांनी उचललं. त्याचं काहीही ऐकून न घेता त्यालाही याच विमानात कोंबलं. जराही वेळ न दवडता भारतीय अधिकाऱ्यांनी दुबईतून ताबडतोब विमानोड्डाण केले व या दोघांनाही भारतात आणले. विमानतळावर उतरताच इडीच्या अधिकाऱ्यांनी त्यांचा ताबा घेतला. मोदींच्या ताकतीची जाणीव कदाचित पहिल्यांदाच काँग्रेसला झाली असेल. काँग्रेस आता समजून चुकलेली आहे की जगभरात मोदींची ताकद कशा पद्धतीने वाढलेली आहे!

In reply to by डँबिस००७

विशुमित Sun, 02/03/2019 - 20:12
अगदी ग्रेट वर्क डन..!! हायला ती दुबईची यंत्रणा मोदींनी छू केले की आरोपींना लगेच उचलून आणतीय आणि आपली देशभक्त यंत्रणा मल्या निरव चौक्सीला शेपटी हालवत देशाबाहेर घालवायला जातय... सरळ केल पाहिजेत एका एकाला!! === मागे कांग्रेसवाले ( बहुदा कारवान वाले) उगाचच आपल्या देशभक्त दोवळ साहेबांच्या मुलांवर बेछूट आरोप करत सुटले होते. पुढे काय झालं कोणाला काही माहिती आहे का??

In reply to by Chandu

विशुमित Mon, 02/04/2019 - 00:30
आमच्या सारखच त्यांचा पण एखादा IT सेलवाला ओळखीचा असेल. आजकाल खासदार आमदारांपेक्षा जास्त, IT सेल वाल्यांना आतली माहिती असते.

In reply to by विशुमित

lakhu risbud Sat, 02/16/2019 - 22:46
आणि हे "चहा पेक्षा किटली गरम" छापाचे IT cell वाले पण आंतरजालावर किलोच्या भावाने सापडतात. मिपा वरच्या एक बुद्धिमान सहकाऱ्याने हा शोध लावला आहे.

In reply to by अर्धवटराव

ती भारतात पळून आली होती अन कुणा परदेशी नागरिकांच्या मदतीने फ्रान्स की इंग्लंडला पळणार होती, पण डाव फसला बिचारीचा.

Chandu Sun, 02/03/2019 - 23:42
पुतना,शूर्पनखा,या हिन्दु देवता नव्हे.राम,शंकर,दुर्गा या हिंदूंच्या पूजनीय देवता आहेत.राहुल आणी प्रियंका या ख्रिस्च न व्यक्तीआहेत.त्याना या देवतांच्या रूपात दाखवल्यने हिन्दुंची धर्म भावनादुखावने स्वाभाविक आहे. बाकी चालू द्या.

In reply to by Chandu

Blackcat Mon, 02/04/2019 - 08:20
भारतीय मुस्लिम ख्रिश्चनमध्ये हिंदुत्व नसते ? साक्षात सावरकरांच्या विचारांचा अपमान ????

In reply to by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)

भंकस बाबा Mon, 02/04/2019 - 10:14
हया लोंकाची राजकारणात यायची? बाकी पाकिस्तानीना बाहेरुन एजेंट वेगेरे पाठवायाची काही गरज नाही , फक्त असहिष्णुता म्हणून गळा काढला की ढिगभर कुत्री मांजरी इथे गळा काढतात

In reply to by भंकस बाबा

Blackcat Mon, 02/04/2019 - 16:52
मेरी जान को खतरा है , असे साक्षात मोदीही बोललेत. आणि त्या काँग्रेसवाल्यांची लायकी आहे , म्हणून तर ते निवडून येतात ना ?

In reply to by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)

भंकस बाबा Mon, 02/04/2019 - 19:22
मेरा बाप मर गया , मेरी सास मर गयी असे बोलून तर कॉंग्रेसी मत मागत आले आहेत, फक्त त्या मरणाला बलिदानाचे नाव दिले की लोकांना इमोशनल ब्लैकमेल करता येते. मान्य मोदिनी स्वप्न दाखवली पण ती पूर्ण करण्याच्या प्रामाणिक प्रयत्न तर केला , आणि आमचे राजकुमार बटाट्याचे सोने करण्याचे पांचट प्रयोग करतात . निवडणुका अवघ्या दोन महिन्यावर येऊन ठेपल्या, अजुन हे जाहिरनाम्याची कलमे शोधण्याऐवजी कोणी युती करता का युती खेळत बसले आहेत. आणि साहेब तुमचा कोंग्रेसला पाठिंबा म्हणजे तुकडे गैंगला समर्थन असेलच?

In reply to by भंकस बाबा

Blackcat Mon, 02/04/2019 - 20:01
काँग्रेसला मत द्यायला बंदी आहे का ? देणारच की

In reply to by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)

Blackcat Mon, 02/04/2019 - 21:28
आणि बलिदानाची दांडगी यादी काँग्रेसकडे आहे , म्हणून ते त्याच्या जीवावर मत मागतात , भाजपाकडे आहे तरी काय ? ना नाव , ना बलिदान , गोडसेचे पुस्तक अन बाजपेयींच्या कविता , तुम्ही हे दाखवून मत मागा , कोण अडवले आहे ?

In reply to by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)

डँबिस००७ Tue, 02/05/2019 - 00:03
बलिदान ? अय्या, कोणी केल म्हणे बलिदान ? गांधी परिवाराने ? काय सांगताय ? फार तर गांधी परिवारातल्या लोकांच्या हत्या झाल्या होत्या अस म्हणता येईल ! हत्या करायला भाग पडेल ईतक कोणाला दुखवावच का अस मी म्हणेन प्रियांका म्हणे हुकुमाचा एक्का आहे मग आता पर्यंत पप्पु जोकर घेउन कॉंग्रेस का खेळत होते याच उत्तर द्या !!

In reply to by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)

भंकस बाबा Tue, 02/05/2019 - 19:22
एक्के हरवले बहुतेक ! यांचे पांचट कुमार रामभक्त आणि शिवभक्त म्हनवुन घेतात, आणि त्याच पक्षाचे वकील राममन्दिराच्या विरुद्ध केस पण लढवतात, पांचट कुमाराची अजुन एक कामगिरी समोर आली आहे, नितिन गड़करीना उकसवण्याची ! मानले पाहिजे बाबा या कोंग्रेसच्या समर्थकाना! ऐसे म्हणतात की जहाज बुडायला आले की उंदीर सर्वात आधी पळतात, इथे मात्र उंदीर बुडलेल्या जहाजाच्या डोलकाठीवर बसून झोके मिळण्याचा आनंद दाखवतील.

In reply to by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)

ट्रम्प Tue, 02/05/2019 - 19:58
सध्या काँग्रेस मध्ये खूपच आनंदाचे वातावरण आहे , सगळे गुलाम , राण्या आणि जोकर वापरून कुठल्याही परिस्थितीत त्या दोन जागा निवडून आणनारच !!!!! बाकी गेल्या तरी चालतील = ) = )

In reply to by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)

ट्रम्प Tue, 02/05/2019 - 19:59
सध्या काँग्रेस मध्ये खूपच आनंदाचे वातावरण आहे , सगळे गुलाम , राण्या आणि जोकर वापरून कुठल्याही परिस्थितीत त्या दोन जागा निवडून आणनारच !!!!! बाकी गेल्या तरी चालतील = ) = )

In reply to by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)

ट्रम्प Tue, 02/05/2019 - 19:59
सध्या काँग्रेस मध्ये खूपच आनंदाचे वातावरण आहे , सगळे गुलाम , राण्या आणि जोकर वापरून कुठल्याही परिस्थितीत त्या दोन जागा निवडून आणनारच !!!!! बाकी गेल्या तरी चालतील = ) = )

In reply to by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)

डँबिस००७ Tue, 02/05/2019 - 20:29
अय्या , यादी करायला काय लग्नातल्या गोष्टी आहेत ? ,बाकी बलिदान कोणीही करा काँ ग्रेस टाळु वरच लोणी खायला पुढे !! म्हणे ह्यांच्या कडे बलि दान केलेल्या लोकांची यादी आहे. फक्त बलिदान केलेल्यांच्या नावाने सत्ता उपभोगली पण बलिदान केलेल्या स्वातंत्र्य वीरांच्या कुटूंबीयांकडे बघायला सुद्धा ह्या काँग्रेसीना वेळ अधी मिळाला नाही !! पत्याच्या कॅट मध्ये ४ एक्के असतील पण तुमच्या लाडक्या भ्रष्ट काँग्रेस मध्ये मात्र एक जोकर दोन राण्याच आहेत !! बाकीचे सगळे गुलाम !!

In reply to by भंकस बाबा

ट्रम्प Mon, 02/04/2019 - 22:54
गांधी च्या वंशजानी पूर्वजांच्या नावावर भीक मागून ! मागून ! 55 वर्ष सत्ता अक्षरशः भोगली , हजारो कोटिची माया ओरबडुन खाल्ली . गरीब हा गरीबच राहिला , काँग्रेस जिंदाबाद चे नारे देवून ! देवून ! लाचारिचे जीवन जगत राहिला . गरीबी हटाव च्या अपयश बद्दल जाब न विचारता आरक्षण वर डोलत राहिला . भाजप हा उच्चवर्णियांचा पक्ष म्हणून सतत शिव्या दिल्या पण उत्तर प्रदेश , हरियाणा ,मध्यप्रदेश , राजस्थान मधील काँग्रेस चे आतापर्यंतचे मुख्यमंत्री हे उच्चवर्णीयच होते या कड़े मात्र दुर्लक्ष करत राहिला !!!!!!

ट्रेड मार्क Mon, 02/04/2019 - 04:42
ममताबानोच्या राज्यात कलकत्ता पोलिसांनी सिबीआयच्या अधिकाऱ्यांनाच अटक केली. यावर दीदी धरण्यावर बसणार असून मोदींच्या इशाऱ्यावर डोवाल यांनी हे कारस्थान रचले असल्याचा आरोप केला. एवढेच नव्हे तर अनैतिकरीत्या जबरदस्तीने सत्ता हस्तगत करण्याचा मोदींचा डाव आहे असाही त्यांनी आरोप केलाय.

In reply to by ट्रेड मार्क

ट्रम्प Mon, 02/04/2019 - 13:47
म्हणे प बंगाल मध्ये येण्यास इतर भारतीय लोकांना पासपोर्ट सक्तिचा सर्किट दीदी करणार आहे अस कळलय , आणि या बाबी ला हुशार राजपुत्र नीं समर्थन दिले आहे !!!!!! सगळे चोर कोलकत्ता च्या केस मुळे गर्विष्ठ दीदी च्या पाठीशी उभे राहिले आहेत !!! मुख्यमंत्री सरकार हाकायचो सोडून स्वतः आंदोलन करण्याची चूकीची पद्धत पूर्वी भगोड्या केजरी आणि आता दीदी ने केली .

In reply to by अनन्त अवधुत

ट्रम्प Mon, 02/04/2019 - 22:24
भाजप नेत्यांचे हेलीकॉप्टर उतरु न देणे , सी बी आय ला प्रवेशबंदी या तिच्या चक्रम वागणुकी साठी उपरोधिक वक्तव्य होते हो ते !!!!

डँबिस००७ Mon, 02/04/2019 - 21:03
वेस्ट बंगाल मधल्या गौड बंगाल !! ममता बॅनर्जीनी सी बी आय च्या लोकांनाच लोकल पोलिसा कडुन अटक करवली आहे. केजरीवाल नंतर धरणे देण्यासाठी बसणारी दुसरी मुख्यमंत्री पण मुख्यमंत्र्या बरोबर धरण द्यायला एखादा पोलिस कमिशनर पहिल्यादाच बसलेला असेल.

Blackcat Mon, 02/04/2019 - 21:33
इंडियन आर्मिने कारगिल विजयबाबत 2019 चे कॅलेंडर काढले आहे, आरमी , भाजपा व बाजपेयीं ह्यांचे अभिनन्दन. चावडीवर कॅलेंडर पीडीएफ दिले आहे , लाभ घ्यावा.

Blackcat Mon, 02/04/2019 - 21:51
भारती घोष नामक एक आयपीएस अधिकारी होत्या. त्यांच्यावर CID ने रेड टाकली होती.तेंव्हा घरात अडीच कोटी रुपये सापडले होते. आज त्याच भारती घोष यांनी भाजपा जॉईन केली. भाजपाने भ्रष्टाचार संपवायची एक नवीन परिभाषा विकसित केलीय,कितीही भ्रष्ट असू देत,तो भाजपात आला की झाला तो पवित्र..!

UK home secretary approves Vijay Mallya's extradition to India ब्रिटिश सरकारच्या या अनुमतिमुळे, विजय मल्ल्याच्या एक्ट्रॅडिशनच्या मार्गातील, एक फार मोठी पायरी पार झालेली आहे. मात्र, या अगोदरच्या न्यायालयाने दिलेल्या स्पष्ट निकालामुळे, मल्ल्याची बाजू पुढच्या न्यायालयात टिकेल असे दिसत नाही. तरीही, येत्या १४ दिवसांत युके हाय कोर्टात अपिल करून मल्ल्या त्याचे एक्ट्रॅडिशन अजून काही दिवस पुढे ढकलू शकतो. अर्थातच, पाश्चिमात्य लोकशाहीमधून यापेक्षा वेगळी अथवा जास्त वेगाने कारवाई होणे शक्य नाही, हे पण तितकेच खरे. या पार्श्वभूमीवर, नुकतेच,... कोर्टाची कारवाई टाळून, युएईमधून, अगुस्ता वेस्टलँड प्रकरणातील दलाल, राजीव सक्सेना आणि दीपक तलवार यांना, तडक खाजगी विमानात टाकून आणले गेले... या कारवाईचे वेगळेपण स्पष्ट व्हावे. अशी कारवाई यापूर्वी केवळ अमेरिका (व गुप्तपणे बहुदा इझ्रेल) यांच्या तर्फेच केली गेली आहे.

ट्रम्प Tue, 02/05/2019 - 07:33
अरुण शौरी , जेठमलानी , शत्रुघ्न सिन्हा , यशवंत सिन्हा या भाजप मधील नेत्यांनी मोदिवर हल्ले करण्यात काहीही बाकी ठेवले नव्हते आता त्यात भर गडकरीचीं पडली आहे . फरक इतकाच आहे की गडकरी नाव न घेता टोमणे मारत असतात , आणि हे निवडणूक जवळ आलेली असताना खचितच चांगले नाही . राजकीय महत्वकांक्षे साठी ' एकी हेच बळ 'असले सुविचार थोर माणसे खुंटी ला अडकवून ठेवतात आणि त्यांच्या असल्या वागण्याने कार्यकर्ते / मतदार संभ्रमित होतात .

In reply to by ट्रम्प

शाम भागवत Tue, 02/05/2019 - 15:44
हल्ली मिडियावाले टीआरपीसाठी मूळ वाक्याची फार मोडतोड करायला लागले आहेत. गडकर्‍यांच्या टोमण्यांची युट्युब लिंक मिळेल का? संपूर्ण ऐकून मग मत ठरवीन म्हणतो.

In reply to by शाम भागवत

डँबिस००७ Tue, 02/05/2019 - 16:07
खर आहे श्याम , कसही करुन भाजप व मित्र पक्षात सुरुंग लावाला याच प्रयत्नात विरोधी पक्ष व मिडीया आहे !! ईतकी बायस्ड मिडीया या पुर्वी कधीही पाहिली नसेल !!

चौथा कोनाडा Tue, 02/05/2019 - 16:37
रागानं शारदा चिटफ़ंड घोटाळ्यात आधी ममता आणि टोळी या विरोधात भुमिका घेतली होती, आता सीबीआय प्रकरणानंतर या बरोअबर उलटी ! मिडियात याची चीरफाड होत आहे.

In reply to by चौथा कोनाडा

डँबिस००७ Tue, 02/05/2019 - 17:23
शारदा, नारदा चीट फंड स्कॅम हा २०१३ च्या अगोदरचा आहे, २०१३ ला त्रृणमुल काँग्रेस वे स्ट बंगाल मध्ये सत्त्येत आलेली. त्या नंतर शारदा, नारदा चीट फंड स्कॅम वर एस आय टी बनवली ! ह्या एस आय टी च्या चौकशीने संतुष्ट न झाल्याने २०१४ साली काँग्रेस व डाव्या पक्षांनी सु कोर्टात ह्या चौकशी विरुद्द याचिका दाखल केली व सीबीआय च्या चौकशीची मागणी केली. २०१४ मध्ये सु कोर्टाने सीबीआय चौकशीचे आदेश दिले. ह्या आदेशात शारदा, नारदा चीट फंड स्कॅम बरोबरच कोण कोण बडे लोक ह्यात शामिल आहेत, त्या पैश्याचा ट्रेल घोटा ळ्याची व्याप्ती वैगेरे सगळ खणुन काढायचे स्पष्ट आदेश दिले. २०१४ च्या सु कोर्टाच्या आदेशानुसार, सीबीआयने आपला तपास सुरु केला व त्याच बरोबर पश्चिम बंगाल पोलिसांनी बनवलेल्या एस आय टी लाच चौकशी साठी बोलावले . ह्या एस आय टी ने सीबीआय समोर यायच आता पर्यंत टाळलेल !! आता सीबीआय अटकच करणार मग एस आय टी ची कसुन तपासणी होणार व ह्या घोटाळ्यात अडकलेल्या त्रृणमुल काँग्रेस च्या बड्या धेडांचे नाव उघड होईल ह्या भीतीने ममता बॅनर्जी डायरेक्ट धरण्यावरच बसली. णमुल काँग्रेस च्या बड्या नेत्यांना आता पर्यंत ह्या केस मध्ये जेल झालेली आहे. पण त्यावेळेला सुद्धा गप्प बसणार्या ममता बॅनर्जीच्या आता धरण्यावर बसल्याने सगळ्यांच्या भुवया उंचावलेल्या आहेत. २०१४ साली काँग्रेस व डाव्या पक्षांनी सु कोर्टात ह्या चौकशी विरुद्द याचिका दाखल केली व सीबीआय च्या चौकशीची मागणी केली तेच आता ममता बॅनर्जीच्या बाजुने केंद्र सरकार विरुद्ध बोलत आहेत .

In reply to by डँबिस००७

चौथा कोनाडा Tue, 02/05/2019 - 22:22
बरोबर ! आता धरणे संपवून ममता दिदी मी जिंकल्या असं म्हणतायत. मिडियावाले यावर काथ्याकूट करताहेत. सध्या तरी पारडं केंद्र सरकार कडं झुकल्या सारखं वाटतंय !

Blackcat Tue, 02/05/2019 - 21:27
मोदींनी 120 देशांच्या लोकांकडून वैष्णव जन तो म्हणवून घेतले म्हणे, ह्यांचे ते माहिश्मती साम्राज्यम् नमस्ते नमस्ते , ते विसरले ? गांधींचे गाणे ? https://youtu.be/Uz5LKjx5oYY मोदींचे अभिनंदन

In reply to by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)

डँबिस००७ Tue, 02/05/2019 - 23:12
मोदींनी " वैष्णव जन तो" 120 देशांच्या लोकांकडून म्हणवून घेतले !! तुमच्या लाडक्या भ्रष्ट काँग्रेसवाल्यांनी "राम नाम जपना पराया माल अपना " हे भजन किमान ५ देशाच्या लोकांकडुन तरी म्हणवुन घ्यावे !! रेफ : https://www.youtube.com/watch?v=3_tw9hIrwSQ

In reply to by डँबिस००७

विशुमित Wed, 02/06/2019 - 01:13
अगदी बरोबर आहे. ===2019 ला आपलं सरकार आले की माहिश्मती साम्राज्यम् नमस्ते नमस्ते, याचे विडियो गाणं पुढच्या वर्षी आपल्या बाबुल आणि अभिजित कडून फुकट गाऊन घेऊ. हाय काय आणि नाय काय ..!!

Blackcat Wed, 02/06/2019 - 09:07
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला गोळी मारुन त्यांची पुण्यतिथी साजरी करणाऱ्या हिंदू महासभेची राष्ट्रीय सरचिटणीस पूजा पांडे आणि तिचा पती अशोक पांडे या दोघांना अलिगढ पोलिसांनी तप्पाल येथून ताब्यात घेतले आहे. गांधीजींच्या पुण्यतिथीदिनी ३० जानेवारी २०१९ रोजी हा प्रकार घडला होता. याच दिवशी १९४८ रोजी नथुराम गोडसेने महात्मा गांधींची गोळी झाडून हत्या केली होती. हा सगळा प्रकार इतका विकृतपणे करण्यात आला होता की, पूजा पांडेने गोळी मारताच गांधींच्या पुतळयामधून रक्त वाहण्यास सुरुवात झाली. हे कृत्य केल्यानंतर पांडेने महासभेच्या सदस्य आणि समर्थकांना मिठाई वाटली. महात्मा गांधींची हत्या करणारा नथुराम गोडसे अखिल भारत हिंदू महसभेशी जोडलेला होता. अखिल भारत हिंदू महासभा नेहमीच गांधी पुण्यतिथी शौर्य दिवस म्हणून साजरा करते. पण आतापर्यंत गांधीजींच्या पुतळयाला गोळी मारण्यापर्यंत त्यांची मजल गेली नव्हती. मात्र, यंदा त्यांनी आपल्या विकृत वागण्याचा कळस केला. हिंदू महासभेच्या या कृत्याचा देशात सर्वच स्तरातून निषेध करण्यात आला होता. तसेच पूजा पांडेवर कठोर करवाईची मागणी होत होती. या प्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी गप्प का आहेत? असा सवालही अनेकांनी विचारला होता. https://www.loksatta.com/desh-videsh-news/aligarh-police-has-arrested-hindu-mahasabhas-pooja-pandey-for-recreating-mahatma-gandhis-assassination-1836139/

In reply to by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)

ट्रम्प Wed, 02/06/2019 - 17:09
अहो इथ निरपराध माणसांना गोळ्या घालणाऱ्या , बॉम्बस्फोट मध्ये उडावणाऱ्या अतेरिक्याची फाशी टाळन्या साठी ढोंगी निर्लज्ज काँग्रेस ची जमात एकत्र येते . त्यां जमाती बरोबर तथाकथित बुद्धिवादी रात्रीचे कोर्ट ऊघडायला लाऊन त्या अतेरिक्या ला वाचवन्याचा प्रयत्न करणारे ज्यास्त दोषी का पुतळ्या ला खोट्या गोळ्या मारणारे दोषी ?

In reply to by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)

अर्धवटराव Wed, 02/06/2019 - 21:18
केवळ कठोर निषेध किंवा न्यायालयीन कारवाई पुरेशी नाहि. या लोकांना समाजाने वाळित टाकायला हवे. सामाजीक दृष्ट्या दाभोलकर मर्डरच्या पातळीचं हे कृत्य आहे (दोन्ही कृत्य अगदी कुठल्याही राजकीय चालबाजीने प्रेरीत असले तरी)

डँबिस००७ Wed, 02/06/2019 - 11:05
पूजा पांडे आणि तिचा पती अशोक पांडे या दोघांना अलिगढ पोलिसांनी तप्पाल येथून ताब्यात घेतले आहे पोलिसांनी ह्या दोघांना कोणत्या गुन्ह्या खाली अटक केली ? गांधीजींची हत्या केली म्हणुन ?? एका आरोपीला अगोदरच फाशी दिलेली आहे ना ह्या गुन्ह्या खाली ? आणी ती शिक्षा चुकीची होती अस कॉंग्रेसच्या कोणत्याही मोठ्या नेत्याने कधीही बोललेल स्मरणात नाही !! तो हक्क फक्त मुसलमान लोकांनाच असतो, कदाचीत !!!

डँबिस००७ Wed, 02/06/2019 - 23:20
लोक महात्मा गांधीजींच्या हत्येचा मातम ७० वर्षांनंतर अजुनही मनवतात !! पण , फाळणीच्या वेळेला मारले गेलेल्या लाखो लोकांना, निर्वासित झालेल्या लाखो लोकांच्या दुःखाच काय !! त्या निष्पाप निरपराध लोकांच्या मृृृत्युला जवाबदार असलेल्यांना जाब विचारणे सोडा, त्याच्या आत्म्याच्या शांतीची कामना सुद्धा कोण करताना दिसत नाही !!

In reply to by डँबिस००७

Blackcat गुरुवार, 02/07/2019 - 02:15
त्या दुखीताना पक्ष श्राद्ध करा, जिवन्त असलेल्याना मदत करा, आणि जाब कुणाला विचारणार ? माउंटबेटन , जिना , नेहरू , गांधी सगळे केव्हाच वर गेलेत, आणि इतके दुःख होते पाक , बांगला भूमी तुटली म्हणून , तर तिकडचे नागरिकत्व घ्या व शाखा सुरू करा.

In reply to by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)

डँबिस००७ गुरुवार, 02/07/2019 - 02:29
तिकडचे नागरिकत्व घ्या व शाखा सुरू करा. हे तुम्हाला जास्त लागु होतय !! तुमच्याच भाउ बंधुंनी वेगळा देश पाकिस्तान मागीतला होता ना ? तुम्ही भारतात कश्याला उरलात ? एक तर मोगा मिया, वर हिंदुची ईतकी अँलर्जी !! पाकिस्तान तुमच्या स्वभावाला खुप मानवेल ! तिथे कोण्या काफिराची सावली सुद्धा पडणार नाही तुमच्यावर ! आणी बोनस म्हणजे गाढवाच्या मटणावर मेजवानी करता येईल !!

In reply to by डँबिस००७

Blackcat गुरुवार, 02/07/2019 - 06:41
ज्यांनी स्वतंत्र देश मागितला , ते गेले , उरलेले इथलेच आहेत , इथेच आहेत . गांधीबद्दल इतकी वर्षे खोटे नाटे लिहून झाले , आता पुतळा उभा करून गोळी घालणे , हा सण हिंदुत्ववादी मोदी सरकारात सुरू झाला, मग पूर्वी इतिहासात नरकासुर , हिरण्यकश्यपू , रावण , बाबर वगैरे वाईट म्हणून चितारले आहेत , ते कितपत खरे मानायचे ?

In reply to by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)

ट्रम्प गुरुवार, 02/07/2019 - 07:29
पौराणिक कथा मध्ये इतिहास ? खर म्हणजे ही सगळी संत मंडळी होती , त्यांनी त्यांच्या सात्विक विचारानी ब्लैककैट सारख्या जनतेला सन्मार्ग दाखविला !!!! बाबर सोडला तर बाकीचे पौराणिक कथामधील होते , फक्त श्री बाबर यांनी श्री ब्लैककैट सारख्या भक्तांना पूण्य मार्ग दाखविन्या साठी काहीशे वर्षापूर्वी जन्म घेतला . त्यांनी त्यांच्या काळात भक्तांच्या सुवर्ण भविष्यासाठी हिंदू राजे व जनतेला मोक्ष प्राप्ति दिली .तसे पाहता बाबर च्या आधी व नंतर चे सगळे त्यांच्या कार्य महात्म्या मुळे संतपदी पोहोचले आहेत . भारतातीय व परदेशी इतिहासकारानीं त्या सगळ्या संतानां जुलमी , आक्रमक , निर्दयी , धर्मांध असे संबोधुन त्यांच्यावर केलेला अन्याय वर्तमान काळातील त्यांचे भक्त श्री ब्लैककैट दूर करण्याचा प्रयत्न करत आहेत .

In reply to by ट्रम्प

Blackcat गुरुवार, 02/07/2019 - 11:05
बाबरजन्म झाला नव्हता , तेंव्हाही हिंदू राजे इतर राजे व प्रजा ह्यांना मोक्ष देतच होते , युद्धामध्ये सैनिकांना मोक्ष माझ्यामुळे मिळतो , तू फक्त निमित्त रे !

In reply to by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)

Blackcat गुरुवार, 02/07/2019 - 11:19
जगभरचे सगळे राजे हेच करत होते , irrespective of any factor like name , age , gender , religion etc, काँग्रेसने व बाबासाहेबानी आम्हाला लोकशाहीचे वरदान दिले.

In reply to by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)

सुबोध खरे गुरुवार, 02/07/2019 - 11:53
मोगा खान स्वातंत्र्याच्या अगोदर काँग्रेस हि सर्वसामान्य माणसांची चळवळ होती. स्वातंत्र्य मिळाल्यावर काँग्रेसचे काम संपले आहे तेंव्हा ती विसर्जित करावी असे खुद्द महात्मा गांधी यांनी सांगितले होते तेंव्हा ती काँग्रेस आणि स्वातंत्र्याच्या नंतरची काँग्रेस यात काहीच साम्य नाही नाव सोडले तर. आताची काँग्रेस म्हणजे नेहरू खानदानाची पिढीजात जहागीरी आहे. तेंव्हा आताची काँग्रेस हि इंदिरा काँग्रेसची पिलावळ आहे आणि त्यांच्या नतद्रष्ट वारसांच्या पुढे लोटांगण घालणाऱ्या अक्कल विकलेल्या गुलामांची खोगीरभरती आहे. केवळ नावासाठी स्वातंत्र्याच्या अगोदरच्या काँग्रेसचा वारसा सांगायचा त्यांना कोणताही हक्क पोचत नाही. जाता जाता --लोकशाहीसुद्धा केवळ डॉ आंबेडकरांनी दिलेली देणगी नसून त्यांच्या बरोबर असलेल्या असंख्य नेत्यांची आणि कायदेतज्ञांच्या प्रयत्नांचे फळ आहे. घटना समिती (Constituent Assembly of India) हि मुळात श्री मानवेंद्रनाथ रॉय या साम्यवादी चळवळीच्या प्रणेत्याने सुचवलेली मूलभूत लोकशाहीची कल्पना आहे.(१९३४) घटनेचा मूळ मसुदा श्री बी एन राव यांनी असंख्य वेगवेगळ्या देशांच्या राज्यघटनांचा अभ्यास करून तयार केला घटना समिती (Constituent Assembly of India)च्या एकंदर १३ उपसमित्या होत्या त्यातील मसुदा तयार करणाऱ्या समितीचे प्रमुख म्हणून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली घटनेचा विस्तृत मुद्दा तयार केला गेला. डॉ बाबासाहेब आंबेडकर हे प्रमुख असले तरी इतर असंख्य कायदेतज्ञांचे योगदान तितकेच (किंवा जास्त महत्त्वाचे) होते. आपल्या वाचनासाठी खाली दुवा देत आहे. https://en.wikipedia.org/wiki/Constituent_Assembly_of_India तेंव्हा स्वातंत्र्य मिळवले आणि घटना तयार केली म्हणून कोणतेही श्रेय ढापण्याचे आजच्या इंदिरा (आणि पिलावळ) काँग्रेसला काहीही कारण नाही. नुसती पचपच करण्यापेक्षा आपण अभ्यास वाढवा

In reply to by सुबोध खरे

सुबोध खरे गुरुवार, 02/07/2019 - 12:01
जाता जाता -- शांतताप्रिय धर्मात लोकशाहीला कोणतेही स्थान नाही. फक्त खलिफाच्या नेतृत्वाखाली शरियत प्रमाणे चालणारी सल्तनत असू शकते बाकी सगळे काफिर आहे. इस्लामच्या शिकवणी प्रमाणे भारत हा दार अस स्सलाम (house/abode of Peace) नसून दार अल हरब "house of war" आहे. https://en.wikipedia.org/wiki/Divisions_of_the_world_in_Islam#Dar_al-Islam

In reply to by सुबोध खरे

तेजस आठवले गुरुवार, 02/07/2019 - 18:41
अहो, त्यांचा सगळाच गोंधळ आहे.ते हिंदू ब्राह्मण म्हणून जन्मले. मग आयुष्यातील काही वैयक्तिक अडचणींचे खापर हिंदू धर्मावर फोडून मनोमन मुसलमान झाले. कायदेशीररित्या नाही, मनातल्या मनात. हरकत नाही. मग आता जिकडे तिकडे हिंदू धर्मावर घाण उडवत असतात. त्यांच्या चिखलातून काही सकारात्मक हाती लागले तर घ्यावे.हिंदू धर्मातल्या सुधारणांना त्यांच्या कडून काही हातभार लागत असला तर चांगलेच आहे की, त्यांच्या सध्याच्या धर्मात सुधारणा हा शब्दच नाही. ह्यांना मिपाचे झाकीर नाईक म्हणायला हरकत नाही.

In reply to by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)

डँबिस००७ गुरुवार, 02/07/2019 - 11:39
त्यांनी वेगळा देश मागीतला आणि ह्यांनी देशाचे तुकडे केले ! वेगळा देश मागीतला आणी ते गेले तरी ईथे ह्यांनी ईथल्या रस्त्यांना नाव दिली " औरंगजेब रोड", "बाबर रोड !! पाकिस्तानच्या निर्मिती बरोबरच त्यांनी आपले रंग दाखवायला सुरु केले ! ब्रिटीशांना अहिंसेच्या मार्गाने देश सोडायला लावणार्यांना पाकिस्तानला सरळ करता आल नाही !!

In reply to by डँबिस००७

lakhu risbud गुरुवार, 02/07/2019 - 09:32
काहीही बोलता राव तुम्ही ! उघड उघड धर्म बदल करणे हि क्षुल्लक गोष्ट आणि तिची तुलना उठसूट कळफलक बडवण्या सारख्या प्रचंड अवघड ,धारिष्ट्याच्या आणि जोखमीच्या कामाशी कशी करू शकता तुम्ही ? त्यासाठी लागणार दम अंगात आणि इतर ठिकाणी नाही असा आरोप तुम्ही अप्रत्यक्षरीत्या करत आहात. एवढ्या विद्वान माणसाला या अशा पातळीवर आणून ठेवलेत तुम्ही?? छे छे !! असहिष्णुता वाढली आहे हेच खरे. जामोप्या राव, व्यावसाईक आणि वैयक्तिक आयुष्यातील साचून राहिलेला उद्वेग,निराशा व वैफल्य यांचा निचरा होण्यासाठी समाजमाध्यमे उपयोगी ठरतात या अर्थाचे संशोधन मागे वाचले होते. मिपा सारख्या व्यासपीठाचा... त्यातही काही ठराविक धाग्यांचा या कामासाठी ज्या सातत्याने आणि सफाईदारपणे वापर होत आहे ती बाब मिपा सारख्या माध्यमांचे महत्व चे आजच्या काळात अधोरेखित करणारी आहे का ? तुमचे या विषय बद्दलचे मौलिक मत जाणून घ्यायला आवडेल.

In reply to by डँबिस००७

विशुमित गुरुवार, 02/07/2019 - 07:03
मला काय वाटतं आहे ह्या कांग्रेसवाल्यांना देशात दुसरा कोणी गांधी बनून द्यायचा नाही आहे. गांधींविचार पुढे घेऊन जाणार्याला गोळ्या घातल्या जातील मग गांधीना कोण लक्ष्यात ठेवतय! त्यांचा इतिहासच पुसला जाईल. === बाकी छान प्रतिवाद करत आहात. येऊ द्या आणखी. मोदींना 2019 ला निवडून आणायचे असेल तर असेच धडाडीने झटले पाहिजे. विजय सोपा होईल.

In reply to by विशुमित

डँबिस००७ Fri, 02/08/2019 - 00:13
गांधीना कोण लक्ष्यात ठेवतय! त्यांचा इतिहासच पुसला जाईल गांधी म्हणजे भारत आणी भारत म्हणजे गांधी अस काही आहे का ?? बाकी इतिहास पुसला जाईल ह्या बद्दल म्हणाल तर भारताचा ईतिहास ईतका पुसलेला आहे की भारतीय लोकांना पक्षी वतने-हिंद च्या लोकांना ईतिहास असा शिकवला गेला की भारतात फक्त मोघल राजे ग्रेट होते !! भारतातील हिंदु राजे जसे की राजा दाहिर व राजा हेमु हे होउन गेले व त्यांनी अतुलनीय शौर्य गाजवल हे भारताच्या ईतिहासातुन गायब केले गेलय ! भारतीय ईतिहासाशी खेळण्यात नेहरु सुद्धा सर्वांत पुढे होते ! राजे शिवाजी बद्दल त्यांचे वाईट उद्गार थोड्या लोकांना ज्ञात आहे! त्यांनीच अशोका सारख्या एका हिंदु धर्म त्याजुन बौद्ध धर्म स्विकारणार्या राजाला ईतिहास तोडुन मोडुन, ग्रेट करुन ठेवल ! भारताच्या त्यावेळच्या गरीब अशिक्षित लोकांनी ग्रेट नेत्यांवर विश्वास ठेउन सिंधु प्रदेशा शिवाय उरलेल्या भारताला कबुल केल !! आयुष्य भर वैष्णव जन तो गाणार्या नेत्याला त्यांनी भारताशी दगा केला आहे ह्याची जाणिव ठेवली नाही ! ह्याच नेत्यांनी भारताची पहिली ओळख पुसुन टाकली व त्या जागी गंगा नदीला ती जागा दिली ! जो प्रदेश पाकिस्तानला दिला तिथल्या लोकांनी मुस्लिम लीगला कधीही निवडुन आणलेल नव्हत ! त्यांना सर्वात मोठा त्याग करावा लागला !

सुबोध खरे गुरुवार, 02/07/2019 - 10:17
गांधीजी डॉ आंबेडकर याना देवत्व दिले गेले असल्यामुळे त्यांच्या विचारांची वास्तववादी चिकित्सा करणे कठीणच नव्हे तर अशक्य होऊन बसले आहे. गांधीजींच्या विचाराना सर्व राजकारण्यांनी एवढेच नव्हे तर सामान्य माणसांनी सुद्धा कधीच तिलांजली दिली आहे त्यामुळे गांधीजींच्या पुतळ्याला गोळ्या घालणे हि एक भंपक गोष्ट आहे. त्याला इतकी प्रसिद्धी दिलीच नसती तर त्याचा एवढा गवगवा झाला नसता. श्री मोदी, श्री शाह, श्री केजरीवाल (किंवा इतर राजकारणी) यांचे पुतळे किती ठिकाणी जाळले जात आहेत त्यावर कोणी पत्रकार गदारोळ करताना दिसत नाही. पुरोगामी म्हणवून घेण्यासाठी आणि आपलाच अजेंडा रेटण्यासाठी पत्रकारांचा आटापिटा किती होत आहे साठी आणि त्याला तथाकथित सुशिक्षित आणि पुरोगामी कसे बळी पडत आहेत याचा हा उत्तम पुरावा आहे. दांभिकपणाचा कळस आहे.

In reply to by सुबोध खरे

डँबिस००७ गुरुवार, 02/07/2019 - 12:41
गांधीजींच्या पुतळ्याला गोळ्या घालणे हि एक भंपक गोष्ट आहे ,..................... १००% सहमत !!

In reply to by उगा काहितरीच

मामाजी गुरुवार, 02/07/2019 - 23:18
मला तर हा माध्यमांचा खोडसळपणा वाटतो. हिंदुमहासभेच्या वेबसाइट वर या संबंधित कोणतीही बातमी नाही. जी माध्यमे सनसनीखेजच्या नावाखाली शेतकर्यांच्या आत्महत्येच लाईव्ह प्रक्षेपण घडवून आणू शकतात त्यांच्या साठी तर हा पोरखेळ आहे. ना आगा ना पीछा, चार सोंग जमवून यासारखी नौटंकी मोबाइल वर शूट करायची आणि ब्रेकिंग न्यूज म्हणून प्रसारित करून धूराळा उडवुन द्यायचा. मग त्यावर आधी मर्कट त्यात मद्य प्याला ही उक्ती सार्थ करत कृष्णमार्जारे धिंगाणा घालायला लागतात.

व्ही. डी. सी. गुरुवार, 02/07/2019 - 12:08
नथूराम गोडसेचे समर्थक या भुतलावरुन जय दिवशी नष्ट होतील तो दिवस भारतीयांच्याच नव्हे तर जगाच्या दृष्टीने सुदीन म्हणावा लागेल!

व्ही. डी. सी. गुरुवार, 02/07/2019 - 12:09
नथूराम गोडसेचे समर्थक या भुतलावरुन ज्या दिवशी नष्ट होतील तो दिवस भारतीयांच्याच नव्हे तर जगाच्या दृष्टीने सुदीन म्हणावा लागेल!

In reply to by व्ही. डी. सी.

भंकस बाबा Fri, 02/08/2019 - 08:29
गांधी पुतळ्याला गोळी घालणाऱ्याला कोण्या कलमाखाली खटला चालवणार हे जरा सांगाल क़ाय? तोंड फोडून घेणार त्यांना अटक करणारे ! चरखा चला चला के स्वराज लिया ही शिकवण ज्या दिवशी भारत देश विसरेल तो खरा सुदिन

In reply to by भंकस बाबा

व्ही. डी. सी. Fri, 02/08/2019 - 09:06
मूर्खपणाची वायफळ बडबड, नव्हे तर काय? पूजा पांडेने केलेल्या कृत्याचे तुम्ही समर्थन करीत असाल तर तुमचे विचार तुम्हाला लखलाभ!

In reply to by व्ही. डी. सी.

mayu4u Fri, 02/08/2019 - 11:06
गांधीहत्येच्या समर्थनाला, नथुरामच्या समर्थनाला की गांधींच्या मूर्तीला गोळी मारली त्याला. मग पुढे चर्चा करू. प्रत्येक प्रतिसादात तुम्ही नवी कोलांटीउडी मारताय. पवार समर्थक का? :D

In reply to by भंकस बाबा

Blackcat Fri, 02/08/2019 - 12:52
15 दिवस न्यायालयीन कोठडी दिली आहे म्हणे, म्हणजे काहीतरी कलम असणार

In reply to by mayu4u

विशुमित Fri, 02/08/2019 - 09:41
अगदी अगदी...!! हे समर्थक जगभरातील सगळयाच चांगल्या वाईट गोष्टींचा, परंपरांचा आणि विचारसरणींचा यथेच्छ उपभोग घेतील, पण मूळ अन् कुळ कधी सोडणार नाहीत. वरून तिच परंपरा पुढच्या पिढीला पास ऑन करतील. जी अजून फरलांग भर पुढे गेलेली असेल. त्याच्यात अशा शाखाकर्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. त्यामुळे तुमच्या म्हणण्यात तथ्य आहे.

In reply to by विशुमित

mayu4u Fri, 02/08/2019 - 11:10
परंपरा पुढच्या पिढीला पास ऑन करायचं म्हणाल, तर काँग्रेस मध्ये तेच सुरु आहे. ब्रिगेड ब्राह्मण द्वेष पिढ्यानपिढ्या पोसतेय. काही लोक नथुरामद्वेष पिढ्यानपिढ्या पोसतायत. नथुरामच्या न्यायालयातल्या प्रतिपादनाचं खण्डन मात्र करता येत नाही. मग बिनबुडाची, विनापुराव्याची विधानं करत सुटायचं. चालू द्या,

In reply to by mayu4u

Blackcat Fri, 02/08/2019 - 13:00
नथुरामाला फाशी दिली , म्हणजे त्याचा ( व त्याच्या गुरूंनी लिहून दिलेल्या) सगळ्या प्रतिवादांचे खंडन झाले, नैतर कोर्टाने त्याला सोडून दिले असते,

In reply to by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)

mayu4u Fri, 02/08/2019 - 15:24
नथुराम ला फाशी झाली ती खुनाची शिक्षा म्हणून. त्याविरोधात नथुराम ने पण काही म्हटलं नव्हतं. आता त्याला फाशी झाली म्हणजे त्यानं केलेलं सत्यकथन चूक कसं? कुठल्या धर्मग्रन्थातलं तर्कशास्त्र म्हणे हे? आणि अहिंसेचा पुरस्कार करणाऱ्या आणि "An eye for an eye makes the whole world blind" म्हणणाऱ्या महात्म्यांच्या खुन्याला देहांताची शिक्षा यातला विरोधाभास कळतोय का? र च्या क ने, भगतसिंगांनी संसदेत बॉम्ब फेकले, ते त्यांचं प्रतिपादन न्यायालयात आणि वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध व्हावं म्हणून. मदनलाल धिंग्रांनी त्यांना अटक झाल्यावर त्यांचं प्रतिपादन प्रसिद्ध करा ही मागणी केली होती. तसेच, इथं नथुरामचं प्रतिपादन प्रसिद्ध होणं महत्वाचं होतं. बथ्थड डोक्यात काही प्रकाश पडला का? का आता पुन्हा या बोटावरची थुंकी त्या बोटावर करणार?

In reply to by mayu4u

Blackcat Fri, 02/08/2019 - 17:38
कसले बतथड डोके ? अपवादात्मक परिस्थितीत खून करणे , हे तर कायदाही मान्य करतो , उदा , स्त्रीने बलात्कार करायला आलेल्याचा खून करणे, नथुरामाणे दिलेले ( किंवा त्याच्या गुरूने लिहून दिलेले ) जस्टीफिकेशन महात्मा नीच व खुनास योग्य व्यक्ती आहे , हे सांगण्यासाठीच होते ना ? कोर्टाला ते पटले नाही , म्हणूनच फाशी झाली ना ? मग आता त्याने कोर्टास काय सांगितले , ह्याचे रडगाणे कशाला ?

In reply to by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)

भंकस बाबा Fri, 02/08/2019 - 15:28
ते रागा पण दुसर्याने लिहून दिलेले वाचतात , मग गोंधळ उडतो आणि टैमपास शो फुकटात बघायला मिळतो . गोंधळ पण असा की कैलासमांनसरोवरला जाउंन नक्की क़ाय करायचे हेच ठाऊक नव्हते राजकुमाराना ! नथुरामाचा असा गोंधळ नक्कीच उडाला नव्हता

In reply to by mayu4u

विशुमित Fri, 02/08/2019 - 14:01
अहो मी कौतूक केले आहे. उलट मला हेवा वाटतो, या लोकांचा! ... बाकी पुरावे द्याच्यचे ठरवले तर काही सन्माननीय मला लगेच कांग्रेसी, ब्रिगेडी असेले शिक्के मारायला सुरुवात करतील. त्यात मला रस ही नाही आणि वेळ देखील नाही. कारण सगळं करून शेवटी पालथ्या घड्यावर पाणीच पडणार. त्यामुळे थोडक्यात सारांशरुपात मला काय म्हणायचं ते सांगितलं आहे. बाकी तुम्ही सुज्ञ आहात!

डँबिस००७ गुरुवार, 02/07/2019 - 17:14
नितीन गडकरीच्या कामाची सोनिया गांधींकडुन प्रशंसा !! https://timesofindia.indiatimes.com/india/sonia-gandhi-appreciates-nitin-gadkaris-performance/articleshow/67882217.cms "नितीन गडकरी हे देशाच्या विकासात महत्वाचे काम करत आहेत व देशाच्या विकासात ते महत्वाचे आहे. तो विकास आता सत्यात उतरलेला आहे !!" असे उद्गार सोनिया गांधींनी प्रश्नोत्तराच्या वेळेला सदनाच्या पटलावर काढले !! विरोधी पक्ष नेत्या सुद्धा मानायला लागलेल्या आहेत पण मिसळपाव वरच्या भक्तांना कोण सांगणार ?

In reply to by डँबिस००७

मोहन गुरुवार, 02/07/2019 - 17:49
२०१९ निवडणूकांत भाजप सगळ्यात मोठा पक्ष राहणार हे तर विरोधकही मान्य करत आहेत. जर आघाडीची वेळ आलीच तर मोदींना तरी हटवता आले पाहीजे. ह्या करता गडकरींना Prop-Up करणे चालू झाले असावे. हेच Narretive पुढ्ल्या काही दिवसात सगळी कडे दिसू लागल्यास आश्चर्य वाटायला नको.

In reply to by मोहन

डँबिस००७ गुरुवार, 02/07/2019 - 19:05
सध्याच्या पंत प्रधानांनीच नितीन गडकरी याम्ना फ्री हँड देऊन त्यांना हे महत्वाचे पोर्ट फोलियो दिलेला आहे. सध्या पंत प्रधानाच्या खालोखाल सध्या तरी तीन चारच मंत्री विषेश कामगीरी बजावताना दिसत आहेत. त्यात नितीन गडकरी, सुशमा स्वराज, पियुश गोयल, धर्मेंद्र प्रधान ईत्यादीचा सामावेश होतो. बाकी बरीच मंत्री पद ही वेगवेगळे मंत्री भुषवत असली तरीही लोकांच्या डोळ्यात भरेल अस काम होताना दिसत नाही. त्यामुळे वेळोवेळी खाते बदल ही होत होते. रेल्वे , रस्ते विकास हा असा पोर्ट फोलियो आहे जिथे विकास समोर दिसु शकतो, मोजता येऊ शकतो. नितीनजीच्या पुर्वानुभवाच्या आधारे त्यांना हा महत्वाच काम देण्यात आलेल आहे आणी २०१९ च्या निवडणुकीत हक्काने व्होट माग ण्या करता याचा खुप उपयोग होणार आहे. मुळातच पंत प्रधान पद हे मॅनेजमेंट करणार्या कॅप्टनच पद आहे त्यांना सर्व खात्याच्या कामतली जुजबी माहीती असावी लागते पण त्यातल्या कोणत्याही खात्याचा एक्सपर्ट असण्याची गरज नसते. कारण त्या त्या खात्याला एक असा डेडीकेटेड मंत्री असतो जो त्या खात्याला सांभाळुन घेत असतो. सध्याचे पंत प्रधान, त्यांच्यावरचे आरोप, कामाच प्रेशर सहज स्वतःवर घेत असतात त्यामुळे ईतर मंत्र्ञांवर त्याचा लोड जात नाही. त्यामुळेच मंत्री आपले दिलेले काम यशस्वी पुर्ण करु शकतात. त्यामुळे नितीनजीनी पंत प्रधानपद स्विकारल तर मात्र ज्या डेडीकेशनने ते आताच्या खात्याच्या कामातुन विकास घडवत आहेत ते करु शकणार नाही.

In reply to by व्ही. डी. सी.

डँबिस००७ Fri, 02/08/2019 - 14:14
भक्त हे साधेसुधे भक्त नसून मतिमंद, अंधभक्त आहेत त्याचबरोबर नमोरुग्ण देखील आहेत..... ६५ वर्षे कॉंग्रेसची जुलमी राजवट सहन करुन वर अजुन त्यांचीच सत्ता असावी अशी आशा करणारे ह्या सर्व विषेशणा पलिकडचे असावेत !! ६५ वर्षे गरीब जनतेला नाडणार्यांना आता जनता माफ करणार नाही ! जे सरकार जनतेच्या भल्यासाठी काम करेल ते सरकार जनता पुन्हा पुन्हा निवडणार !! २ रु चा रेशन वर चा तांदुळ व गावठी दारुची बाटली ह्या वर आता गरीब जनता भुलणार नाही ! ह्या सरकारने ५५ महिन्यात जे करुन दाखवलय ते कॉंग्रेस, जनता दल व कम्युनिस्ट पक्षाला ५५ वर्षांत जमल नाही . खरतर त्यांची ईच्छाच नव्हती जनते साठी काही करायची ! जनतेच्या उपक्रमासाठी आलेले प्रत्येक रु व $ चा अपहार ह्या पक्षांनी आपली तुंबडी भरण्यासाठी केला ! आज सोनिया गांधी जगातील सर्वाधीक श्रीमंत महिलांच्या यादीत सर्वात वर आहे ! छगन भुजबळां सारखे थोड्याच काळात आपल साम्राज्य उभे करणारे मग्रुर नेते तर आपल्या डोळ्या समोर आहेत ! त्याच्या विपरीत दर रोज १८-१९ तास जनतेसाठी न थकता काम करणारे, दर दिवाळी देशाच्या सिमेवर सैनिकांबरोबर साजरी करणारे जनतेचे लाडके नेते श्री मोदीजी !! अश्या ह्या आपल्या लाडक्या नेत्याला फॉलो करणार्या ९९% जनतेला तुम्ही अंध भक्त ठरवणारे तुम्ही कोण ??

In reply to by डँबिस००७

व्ही. डी. सी. Fri, 02/08/2019 - 16:54
एन डी ए (मोदी सरकार) सरकारने पावणे पाच वर्षांमध्ये काय काय केले? १. गाईला आई म्हटले, बैल त्यांचा बाप झाला. लव्ह जिहाद, गोहत्या बंदी सारख्या संवेदनाशील विषयांना चिथावणी दिली. धार्मिक तेढ वाढवण्याचे काम केले. अनेक लोक 'मॉब लिंचिंग' चे बळी ठरले. भारतावर असहिष्णुतेचा ठपका बसला. अनेक विचारवंतांनी मिळालेले पुरस्कार परत केले. काहींना पाकिस्तानात जाण्याचा अविवेकी सल्ले देण्यात आले. विरोध करणाऱ्या लोकांवर देशद्रोही असल्याचा ठपका ठेवण्यात आला, मूर्खपणाचा कळस झाला. २. नोटाबंदीचा किंवा नोटा बदलीचा (५०० आणि १००० च्या नोटा) अर्थतज्ञ् व्यक्तींशी सल्ला न घेताच आततायीपणे निर्णय घेतला. निर्णय चुकीचा झाला तर चौकात फाशी द्या, असे सांगितले गेले. शब्दाला जागणे यांना मान्य नाही, हे सिद्ध झाले. १०० पेक्षा जास्त लोक बँकांच्या रांगेत राहून मरण पावले, त्यांच्या मृत्यूची जबाबदारी घेतली नाही, बँकांचे सुद्धा काही कर्मचारी दगावले गेले. काळा पैसा चलनात येणार अशी हमी दिली गेली मात्र प्रत्यक्षात 'डोंगर पोखरून उंदीर' सुद्धा मिळाला नाही. २००० ची नोट छापण्यामागचे कारण सांगण्यात अपयश आले. ५००० कोटी पेक्षा जास्त पैसा नव्या ५०० आणि २००० च्या नोटा छापण्यात व्यर्थ घालविले. देशवासियांना प्रचंड मानसिक त्रास झाला, ते वेगळेच. भारतीय अर्थव्यवस्थेची पुरती वाट लागली. अनेक लहान लहान उद्योग बंद पडले, बेरोजगारी मोठ्या प्रमाणावर वाढली. चाय-पकोडे विका असे सल्ले देऊन बेरोजगार तरुणांच्या जखमेवरती मीठ चोळले गेले. देशवासीयांच्या मनातून कायमचे उतरले! चूक मान्य केली नाही, जनतेला मूर्ख बनविण्याचे काम आजतागायत चालू आहे.

In reply to by व्ही. डी. सी.

व्ही. डी. सी. Fri, 02/08/2019 - 17:20
३. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीच्या आधी दिलेल्या आश्वासनांची पूर्तता केली नाही उदा. परदेशातला काळा पैसा ९० दिवसात भारतात परत आणणार, प्रत्येकाच्या बँक खात्यात १५-१५ लाख रुपये जमा करणार, दाऊद इब्राहिमला लगेच भारतात परत आणणार, शेतकऱयांचे उत्पन्न दुप्पट करणार, स्वामिनाथन आयोगाच्या सर्व शिफारशी आमलात आणणार, तरुणांना प्रत्येक वर्षी २ कॊटी नोकऱ्या देणार (पाच वर्षात १० कोटी नोकऱ्या), शेतकऱयांच्या आत्महत्या रोखण्यासाठी ठोस पाऊले उचलणार, प्रत्यक्षात तो 'चुनावी जुमला' होता म्हणून निर्लज्जपणे मुलाखती दिल्या. ४. राम मंदिर बांधू म्हणून निवडणुकीपूर्वी हिंदू मतदारांना शब्द दिला, आता म्हणत आहेत कि सर्वोच्च न्यायालयाची वाट पाहणार, कायदा करून राम मंदिर बांधण्याचे सर्व प्रस्थाव फेटाळण्यात आले. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतरच मंदिर बांधले जाईल असे घोषणापत्रात कुठेच लिहिलेले नव्हते. राम मंदिर बांधण्यासाठी एक पाऊल सुद्धा पुढे टाकले नाही. अनेक कंगोरे काढून जनतेला फसविण्याचा काम अजूनही अव्याहतपणे चालू आहे.

In reply to by व्ही. डी. सी.

व्ही. डी. सी. Fri, 02/08/2019 - 17:53
५. विजय माल्या, नीरव मोदी, मेहुल चोक्सी सारखे अनेक लोक चौकीदाराच्या नाकावर टिच्चून बँकांचे हजारों कोटी रुपये घेऊन भारतातून फरार झाले. हे हातावर हात ठेऊन नुसते बघत बसले. बँका 'लो बॅलन्स ' च्या नावाखाली जनतेकडून त्याची भरपाई करण्याचा वेडगळ प्रयत्न करीत आहेत. 'ना खाऊंगा , ना खाणे दूंगा' हि वल्गना साफ खोटी ठरली. त्यामुळे अर्थव्यवस्थेचे पुरते वाटोळे झाले. जी डी पी, बेरोजगारीची खोटी आकडेवारी जनतेसमोर ठेऊन जनतेला मूर्ख बनविले. ६. जी एस टी ची अंमल बजावणी करण्यात नोटबंदी प्रमाणेच प्रचंड अपयश आले. व्यवस्थित पूर्वतयारी न करताच जी एस टी सुरु करण्यात आली. वेगवेगळ्या पदार्थांवरील कर प्रणाली वारंवार बदलण्यात आली, ते अजूनही चालूच आहे. व्यापारी तसेच ग्राहक या दोघांना त्यामुळे मनस्ताप सहन करावा लागला. व्यापारी वर्गाला मोठं-मोठे मोर्चे काढायला भाग पाडले. अनेक व्यापाऱ्याना व्यापार बंद करावे लागले, बहुतांश लोक व्यापारी व्यवसायातून बाहेर पडले. हे सर्व अनर्थ या सरकार मुळे झाले.

In reply to by व्ही. डी. सी.

व्ही. डी. सी. Fri, 02/08/2019 - 18:30
७. देशात धार्मिक विद्वेष पसरविण्याचे काम या सरकारने (भाजपच्या मंत्री आणि नेत्यांनी) केले. परधर्मीय लोकांची हेटाळणी केली गेली. रामाला कोणी दलित, कोणी आदिवासी, कोणी ब्राह्मण, कोणी मुस्लिम होता अशी निरर्थक शेरेबाजी केली. गणपतीला 'प्लास्टिक सर्जरी' चे उदाहरण असल्याची कोल्हे-कुई केली. व्यर्थ अंधश्रद्धा पसरविण्याचे काम केले. घरात गाईचे मांस असल्याच्या संशयावरून मुस्लिम लोकांच्या हत्या घडवून आणल्या. स्वयंघोषित गोरक्षकांनी देशात अक्षरशः हैदोस घातला. या सरकारने योग्य ती कारवाई न केल्याने ते चांगलेच मस्तवाल बनले. ८. बलात्काराच्या अनेक घटनांमध्ये भाजपचे नेते तसेच कार्यकर्ते सापडले मात्र तात्काळ कारवाई न करता सरकारने त्यांना पाठीशी घालण्याचे मूर्खपणाचे वर्तन केले. जनतेचा जास्त दबाव वाढल्यानंतरच कारवाईचे करण्याचा चुकीचा पायंडा पडला. कट्टर धार्मिक संघटना स्वतः च सत्तेस असल्यासारखे वागू लागले, आमचे सरकार आहे, आम्हाला कोणीही हात लावू शकणार नाही, अशा गुर्मीने बोलू लागले. स्वतः देशप्रेमी असल्याचे ढोंग करून इतर लोकांना देशद्रोही असल्याची प्रमाणपत्रे जाहीरपणे वाटू लागले. सरकारच्या धोरणांवर टीका करणाऱ्या लोकांना देशद्रोही म्हणू लागले, एवढी यांची पातळी घसरली कि उठसूट कोणालाही पाकिस्थानात जाऊन राहण्याचे सल्ले निर्लज्जपणे देऊ लागले.

In reply to by व्ही. डी. सी.

व्ही. डी. सी. Fri, 02/08/2019 - 18:47
९. 'स्मार्ट सिटी' च्या नावे दिंडोरा पिटण्यात आला, हजारों कोटी रुपये त्यासाठी मंजूर करण्यात आले, आजतागायत संपूर्ण भारतात एक सुद्धा शहर 'स्मार्ट सिटी' म्हणून उदयास आलेले नाही. १०. 'स्वछ भारत' योजना चालू केली, हातात झाडू घेऊन छायाचित्रे काढून घेतली, प्रसार माध्यमात झळकले, नंतर हि योजना कुठे गायब झाली कोणालाच कळाले नाही. लोखों - कोटी (खोटे आकडे) संडास बांधल्याचे नाटक केले गेले, प्रत्यक्षात योजनेचे तीन-तेरा वाजले. गावेच्या गावे हागणदारी मुक्त केल्याचे जाहीर केले, मीडियाने त्या गावांना भेट दिल्यावर सरकारचे पितळ उघडे पडले. गंगा साफ करण्यासाठी केंद्रात स्वतंत्र खाते तयार करण्यात आले, कोटी-कोटी रुपये मंजूर करून देण्यात आले मात्र गंगेची अवस्था 'जैसे थे' च राहिली.

In reply to by व्ही. डी. सी.

व्ही. डी. सी. Fri, 02/08/2019 - 19:08
११. 'स्टार्ट अप' इंडिया, 'मेक इन इंडिया', 'स्किल इंडिया' या योजनांची पुरती वाट लागलेली आहे, त्या फक्त कागदोपत्रीच अस्तित्वात आहेत. एवढी गावांत वीज पोहोचली तेवढ्या गावांत वीज पोहोचली अशा आरोळ्या ऐकण्यात आल्या तथापि प्रत्यक्षात काहीच झाले नसल्याचे सिद्ध झाले. १२. लोकांना गॅस देण्याची योजना आणली ती सुद्धा फसली. गरिबी रेषेखालील (मासिक उत्पन्न १०२० रुपये) करोडो महिलांना गॅस दिल्याचे सांगण्यात आले, गॅस धारकांची संख्या फुगवून सांगितली गेली. तो नुसताच फार्स ठरला, सिलेंडर चे दर एवढे जास्त करून ठेवले की जवळपास ९०% लोकांनी दुसरा सिलेंडर विकत घेताच आला नाही. सिलेंडरचे दर ९२० रुपयांवर (मासिक उत्पन्न १०२० रुपये) पोहोचले होते. गॅस आल्यामुळे रॉकेल मिळणे सुद्धा बंद झाले आता ती कुटुंबे सरपणावर (लाकडे, पालापाचोळा) जेवण बनवीत आहेत, ही वस्तुस्थिती आहे.

In reply to by व्ही. डी. सी.

व्ही. डी. सी. Fri, 02/08/2019 - 19:35
१३. कच्चा तेलाचे जागतिक बाजारपेठेत दर एकदम कमी असताना सुद्धा प्रचंड नफा कमवून (भरमसाठ कर लादून) या सरकारने देशातील जनतेला अक्षरशः लुटले. पेट्रोलियम पदार्थ [पेट्रोलियम पदार्थ (पेट्रोल, डिझेल, गॅस इ.)] जी एस टी च्या अंतर्गत आणता आले असते मात्र या सरकारने तसे न करता करांमध्ये खूप वाढ करून जनतेला लुबाडले. पेट्रोल तर काही ठिकाणी शंभरी पार झाले होते. निवडणूक (कर्नाटक, मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड) जवळ आल्या कि दर वाढवायचे नाहीत अन निवडणुका संपल्या कि पुन्हा लुबाडणे चालू, हे सामान्य जनतेने अनुभवलेले आहे. या सरकारने यातून प्रचंड माया जमा केलेली आहे. १४. स्वायत्त संस्था (सीबीआय, ईडी इ. ) या सरकारने आपल्या मुठीत ठेवल्या आहेत. त्यांची स्वायत्तता सरकारने धुळीस मिळविली आहे. त्या संस्थाचा वापर विरोधकांना वेगवेगळ्या चौकशांत अडकविण्यात करण्यात येत आहे. हा खूप मोठा दुरुपयोग आहे. जनता सर्व बघत आहे, ती जेवढ्या तत्परतेने डोक्यावर घेते त्याच्या कितीतरी पटीने जातात जमिनीवर आपटायला कमी करीत नसते.