चालू घडामोडी - सप्टेंबर 2018
नोटबंदी नंतर रद्द झालेल्या पाचशे व हजार रुपयांच्या 99 .3 टक्के नोटा बँकिंग यंत्रणेत परत आल्या आहेत , अशी माहिती रिझर्व्ह बँकेने दि 29 /8/2018 ला दिली . सरकारने काळा पैसा आणि भ्रष्टरचाराला आळा घालण्यासाठी उचललेल्या नोटाबंदीच्या पावला नंतर अतिशय कमी नोटा परत आलेल्या नाहीत , हे यातून स्पष्ट झाले आहे .
नोटबंदी नंतर जमा झालेल्या रद्द नोटांची मोजणी करण्यास रिझर्व्ह बँकेने सुमारे पावणेदोन वर्षाचा कालावधी लावला व अखेर ही मोजदाद पूर्ण झाली असून याबाबतची आकडेवारी बँके च्या वार्षिक अहवालात देण्यात आली आहे .
रद्द केलेल्या चलनातील नोटांचे मूल्य -15.41 लाख कोटी रु.
परत आलेल्या नोटांचे मूल्य - 15. 31 लाख कोटी रु
परत न आलेल्या नोटांचे मूल्य - 10 ,720 कोटी रु .
यावर ' नोटबंदी ही मोदीनिर्मित दुर्घटना असून नोटबंदी तुन सरकारला तीन लाख कोटींचा फायदा होईल व काळा पैसा संपुष्टात येईल असा दावा करणारे मोदी आता का गप्प आहेत ? ' असा काँग्रेस ने सवाल केला .
आता माझे मत :----
परत न आलेल्या 10 हजार कोटींच्या नोटा मूळे नोटबंदी अपयशी ठरली असा निष्कर्ष तथाकथित तज्ञ कसे काढू शकतात ? जर पाचशे आणि हजार रुपयांच्या खऱ्या नोटांचे मूल्य 15.41 लाख कोटी रु होते तर ज्या बनावट नोटांचा बाजारात सुळसुळाट होता त्या नोटांचे मूल्य किती हे तज्ञ मंडळी सांगू शकली का ? ज्या बनावट नोटा मूळे भारताच्या आर्थिक अवस्थेला कीड लागली होती त्या मूल्य एक लाख करोड जरी गृहीत धरले तरी त्या आता बाद झाल्या नाहीत का ?
नोटबंदी करण्यामुळे सामान्य माणसांना खूप मानसिक व आर्थिक त्रास झाला पण तो माणूस त्याही परिस्थिती मध्ये खुश होता कारण त्याला मनात कुठे तरी धनदांडग्याच्यावर वरवंटा फिरल्या मूळे परिस्थिती बदलण्याची आशा लागली होती . आता जरी नोटबंदी अपयशी ठरली असा विरोधकांनी कांगावा केला तरी त्या सामान्य माणसाला माहीत आहे मोदींनी चांगल्या अपेक्षेने केलेली नोटबंदी धनदांडग्यानीं फेल केली त्यामुळे मला नाही वाटत सामान्यवर्ग भाजपा वर नाराज असेल.
नोटबंदी फेल करण्यात सगळ्या पुढाऱ्यां मध्ये भाजपचे चोर सुद्धा आहेत . सर्वपक्षीय पुढारी , गब्बर व्यापारी आणि बिल्डर , माजलेले गुंठामंत्री आणि काही अंशी आपल्या सारख्या सामान्यांनी त्या नोटा कायद्याच्या कचाट्यात न सापडता व्यवस्थित जिरवल्या आणि आता अपयशाचे खापर मोदींच्या गळ्यात मारून नोटबंदी अपयशी ठरली अशी बोंब मारायला मोकळे झाले .
तुम्हाला नोटबंदीच्या अपयशाबद्दल काय वाटते ? यात मोदी दोषी आहेत का ? .
वर्गीकरण
प्रतिक्रिया
सप्टेंबर संपू देत की आधी!!
कंट्रोल...
अहो दोन दिवस तयारी करत होतो !
हाच प्रश्न मलाही पडला आहे. पण
चिनार्या
तुमचे "हे"पण आहेत???
अर्बन नक्सल !! पोल खोल !!
अगदी हेच मत
ओम नेपोटिझमाय नम: ओम जमाईराज नमः
71% surge in ITRs filed till
दहीहंडीचा बळी
जस्ती चेलमेश्वर
जग प्रसिद्ध मल्याळम स्टार
रागा ने यात्रे च्या सुरवातीला
भाजपा सरकारच्या काळात हिंदू दहशतवादी का निर्माण होत आहेत?: उद्धव
मला तर वाटतं की हे सगळे
म्हणजे रागा ला महत्व देऊन
Pakistan's military has
परत बोलणी चालू करा
भारतिय "पिसनिक" आणि "स्वमग्न
आगदी बरोबर पण धुराळा उडणार हे
घाटकोपरच्या
देर आये, शिस्तीत आये
ट्रम्प राव
कंट्रोल च व्हॅयना वो !!!
भाजप असली कुत्री का सांभाळत
डिग्गी राजा, श्री. मणिशंकर
संबंधित पक्षांनी त्यांना
आत्ता ! तसल्या मान्सांचं
नाही हो !
बहोत हो गयी डॉलर की मार, अब
अरे पर आज दो ईसीसवाले पकडे
२०१९ लोकसभा निवडणुकीपर्यंत
माझ्या नावकरी ने घेतलेल्या
कान्ग्रेसनं प्येट्रोलचे भाव
गब्रिएल, तेव्हाचे क्रुडचे दर
*'व्हायला नको.' असे वाचावे.
आत्ता ! आपली कातडी बचवाय्ला
कंफ्यूज सेना !!!!
Scientists looking for
इंधनदर व महागाई
असंच वाटतंय..
<strong>Raghuram Rajan's Sensational Disclosure </strong>
एनपीएला तत्कालीन यूपीए सरकार
बरं झालं माजी सोनाराने कान
काय करणार ? असते एकेकाचे
भाजप वर नवीन बॉम्ब
टेक्नॉलॉजी मास्टर अॅपल-करुन दाखविले.
केरळ : ख्रिस्ती धर्मगुरूवर ननचा बलात्काराचा आरोप; चर्चच्या मौनान
चर्चच्या मौनाने प्रश्नचिन्ह
चर्चच्या मौनाने प्रश्नचिन्हचर्चने मौन पाळलेले नाही तर त्या पिडीत ननचे चारित्र्यहनन करणे चालू केले आहे. त्याशिवाय, तिला १० एकर जमीन देण्याची ऑफर देऊन गप्प बसविण्याचा प्रयत्न होत आहे असाही आरोप आहे. तिच्या बाजूने उभ्या राहिलेल्या इतर नन्सवरही अनेक प्रकारे दबाव येत आहे. त्या ननने आता व्हॅटिकनकडॅ तक्रार केली आहे. हे कमी झाले की काय म्हणून एका केरळी आमदाराने त्या ननवर घृणास्पद आरोप करून दबाव टाकण्याचा प्रयत्न केला आहे. केरळमध्ये १८% ख्रिश्चन लोकसंख्या आहे, तेव्हा त्या धर्मगुरूच्या विरुद्ध एकही राजकारणी उभा राहिला नाही... हे अगदी भारतीय राजकारणाला शोभेसेच झाले आहे ! :( पण, तरीही, खुट्ट झाले की मेणबत्ती मोर्चा काढणार्या आणि जगभरच्या माध्यमांत भारताची नाचक्की करण्यात पुढे असलेल्या "तथाकथित" विचारवंतांची आणि मानवाधिकारांच्या कैवार्यांची अजूनही दातखीळ बसलेली आहे, यामुळे त्यांचा विचारवंती फोलपणा (पक्षी : हायपोक्रिसी) जगजाहीर होत आहे.