आम्ही दोघीच्या निमित्ताने
पूर्ण बघताना कंटाळा आला नाही म्हणजे चित्रपट आवडला असं समजायचं का? की चित्रपटाच्या व्यक्तिरेखांच्या आयुष्यात जे घडतं त्याने तुम्हाला फरक पडला तर त्या चित्रपटाचा प्रभाव पडला असं म्हणता येईल?
पूर्ण बघताना कंटाळा आला नाही म्हणजे चित्रपट आवडला असं समजायचं का? की चित्रपटाच्या व्यक्तिरेखांच्या आयुष्यात जे घडतं त्याने तुम्हाला फरक पडला तर त्या चित्रपटाचा प्रभाव पडला असं म्हणता येईल?
Dear Camera,
देवाने आम्हाला दोन डोळे दिले, पण त्यात एकच लेन्स बसवली. तू आलास, आणि मला तिसरी, चौथी, पाचवी.... कितवी तरी लेन्स मिळाली. जग तुला तिसरा डोळा म्हणते. मी म्हणत नाही. कारण तिसरा डोळा उघडला कि हाहाकार माजतो. मी तुला अंतर्चक्षु म्हणते. आतले डोळे.
सूचना: आरंभ या जानेवारी २०१८ पासून सुरु झालेल्या ई-मासिकातील फेब्रुवारी अंकातील माझा हा अभिनव प्रयोग - माध्यमांतर!
खास येथे मिसळपाव वाचकांसाठी देत आहे!) टीव्ही एपिसोड लिखित स्वरूपात म्हणजे माध्यमांतर! दृकश्राव्य माध्यम ते छापील माध्यम!
आरंभ येथून डाउनलोड करता येईल: https://play.google.com/store/apps/details?id=com.marathi.magazine.aarambh
पूर्वतयारी:
१. अगदी हार्डकोर ममव१ असणं, आणि मराठी मालिकाविश्वात लागेबांधे असणं गरजेचं. चांगला शब्दसंग्रह, चांगली भाषा इत्यादी फुटकळ गोष्टी नसल्या तरी चालतील. फ्रेशर्सना प्राधान्य. आधी काही दर्जेदार लिहीलं असेल तर ह्या वाटेला जाऊ नये. हा लेखप्रकार फक्त मधल्या वेळचं/संध्याकाळचं ह्यात येतो. विचारप्रवर्तक वगैरे हवं असेल तर स्वत:चा कल्ट२ पहिले काढावा. तुमचे अनुयायी आपोआप तुमच्या लेखनाला 'युगप्रवर्तक' पर्यंत नेऊन पोहोचवतील.
'सिद्धार्थ' आणि शशी कपूर
(आपला आवडता अभिनेता दिवंगत झाला कि च त्याच्या आठवणीत काही लिहावे हे वाईट आहे! पण तसं होतंय खरं. )
मला त्याचा आवडून गेलेला चित्रपट म्हणजे 'सिद्धार्थ'.
नोबेल परितोषिक विजेत्या Hermann Hesse या जर्मन लेखकाच्या 'Siddhartha' या कादंबरीवर आधारित हा सिनेमा Conrad Rooks ने निर्माण केला.
तरुण सिद्धार्थ आत्मशोध घेण्यासाठी घराबाहेर पडतो.... आणि मग त्याला येत गेलेले अनुभव, आणि शेवटी त्याला उमगलेले सत्य, असा सगळा प्रवास या चित्रपटात टिपला आहे.
टॉक करत डोक्यातील विचारचक्रे फिरवणारा, लोकांच्या मदतीला धावून जाणारा, आपल्या हुशारीने गुंडाना, देशद्रोह्यांना पकडून देणारा हा सहावी-सातवीत भेटलेला हा सुपरटॅलेंटेड सुपरहिरो विदाउट सुपरपॉवर पुन्हा येतोय हे कळल्यावर पहिली प्रतिक्रिया होती अर्थातच टॉक!! नवरा देखील फाफे फॅन असल्यामुळे चित्रपट पाहायला जायचा निश्चितच होतं. मग पहिल्या दिवशीच जाऊन आलो.
प्रस्तावना :
तीन वर्षांपूर्वी आमच्या व्हाट्सएपच्या ग्रुपवर पूर्ण शंभर दिवस मी एक मालिका चालवली होती. मी रोज माझ्या प्रोफाइल फोटोमध्ये एक फोटो डकवत असे, आणि स्टेटसमध्ये त्या फोटोसंबंधी काही चविष्ट लिहीत असे.
प्रोफाइल फोटो मी कुठूनही मिळेल तिथून घेत असे. काही फोटो आंतरजालावरून घेई, तर काही मी स्वतः काढलेले असत. तसेच काही स्वतःचे, कुटुंबाचे आणि मित्रांचे असत. फोटोबाबत असा काही विधिनिषेध नव्हता. बस! फोटो मनात कुठेतरी क्लिक व्हायला हवा. मग मी तो माझ्या संग्रहात ठेवायचो आणि रोज एक फोटो घेऊन पाऊण तासाच्या माझ्या लोकल प्रवासात त्यावर स्टेटस लिहायचो.
महागुरू सचीन 'पीळ'गावकर हे एक महान व्यक्तिमत्व आहे. आता, त्यांचे कर्तृत्वच इतके महान की स्वतःविषयीचे गौरवोदगार त्यांनी काढले नाहीत तर बोलणंच बंद करावे लागायचे त्यांना. काही नतद्रष्ट मात्र टिंगल करतात त्यांची, पण म्हाग्रु त्या सर्वांना पिळून(सॉरी, पुरून) उरलेत. महाराष्ट्राचा अल पचिनो असे त्यांना म्हणतात खरे पण जॉनी डेप ला अमेरिकेचा सचिन पीळगावकर म्हणतात हे कुणी नाही सांगत.(ये बीक गयी है मिडिया, दुसरं काय?) विग घालून का होईना, पण तारूण्य काय टिकवलंय म्हाग्रुंनी!
प्रेमसंबंधांमध्ये परस्पर संमतीनं दोघेही शरीरसंबंध ठेवतात. पण प्रेमसंबंध तुटल्यानंतर काही महिला कायद्याचा अस्त्र म्हणून वापर करत बदल्याच्या भावनेतून संबंधित व्यक्तीनं आपल्यावर बलात्कार केल्याचा आरोप करतात, असं स्पष्ट मत दिल्ली उच्च न्यायालयानं नोंदवलं आहे. यावेळी न्यायालयानं बलात्कार प्रकरणातून एका सरकारी अधिकाऱ्याची निर्दोष सुटका करण्याचा कनिष्ठ न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला आहे.
पुढे असंही म्हटलंय
डोकलामच्या टापूवर रस्त्याच्या बांधणीची चीनची वेळ चुकली का ? माहित नाही, शस्त्रास्त्र स्पर्धेत चीन भारतापेक्षा आघाडीवर असला, आणि डराकाळ्या कितीही फोडल्या तरी याक्षणी मुत्सद्देगिरीच्या बाबतीत प्रत्यक्षात अडचणीत आहे. इथे ९९ गुण डोवाल डॉक्ट्राईनला १ गुण आमेरीकनांच्याही अडकलेल्या हाताला. दोन देशात खरेच युद्ध झाले तर आर्थीक आणि जिवीत हानीची दोन्ही देशांना मोठी किंमत मोजावी लागेल हे खरे असले तरी मुत्सद्देगिरीच्या बाबतीत एखाद्या वस्तुचा सौदा करण्याचा प्रयत्न करतो तशी स्थिती असते. बाजारातला सौदा फिस्कटला तर युद्धे होत नाहीत.