( काल रातीला सपान पडलं )
हा ।। गुरु महिमा ।। चाच पुढील विस्तार आहे. ( बऱ्याच जणांच्या म्हणण्यानुसार विडंबन हि स्वतंत्र कविता आहे व ते स्वतंत्र धाग्यावर असावे म्हणून हा स्वतंत्र धागा. )
हा ।। गुरु महिमा ।। चाच पुढील विस्तार आहे. ( बऱ्याच जणांच्या म्हणण्यानुसार विडंबन हि स्वतंत्र कविता आहे व ते स्वतंत्र धाग्यावर असावे म्हणून हा स्वतंत्र धागा. )
आज असे हा वार गुरु
महिना चालू डिसेम्बरू
सप्त तारीख कॅलेंडरू
लेखणी माझी झाली सुरु
कित्ती विशेष हा असे दिनु
सहा वर्षांतूनी आगमनु
पहा अचंबूनी जाई मनू
कवीस पुरेसे हे कारणु
टाकुनी मागे त्या 'बुधि'या
धाव धावतो हा जरीया
धाव संपवी तो 'शुक्रि'या
शब्द वाकवी मी लीलया
एकेक दिन हा महामेरू
वाटे कविता त्याची करू
बसलो घेऊन मी बोरू
हवा कागदा स्पॉन्सरु
मिपा ने सर्व साहित्यिकांसाठी खुला मंच उभा करून या युगातील एक महत्कार्य केले आहे. खुला मंच, फुकटात प्रकाशन आणि फुकटात श्रोते. हे म्हणजे नवकवींच्या हाती लेखणी दिल्यासारखेच झाले. आम्ही या सर्व नवकवींचे खंदे समर्थक आहोत. ज्याप्रमाणे केशवसुतांनी "नवा शिपाई" या कवितेतुन नव्या पिढीचे मनोगत व्यक्त केले होते, त्याचप्रमाणे आम्ही या कवितेतून अशा सर्व नवकवींचे मनोगत व्यक्त करत आहोत
नवा कवी
नव्या कवितील नवकाव्याचा क्रूर कवी मी आहे
कोण मला वठणीवर आणू शकतो ते मी पाहे
गणहि नाही, छंदहि नाही, न मी जाणी वृत्ताला
ठेचे मीटर मी जे आडवती उगाच काव्याला
काही करण्या उरले नसता । आपली पाटी कोरी असता ।
काही बकांची ध्यानस्थ स्तब्धता । मत्स्यमारीकारणे ।।
दिसता कोणीही नवखा । लबाड साधिती मोका ।
त्याची बुडवती नौका । लागलीच ।।
पाडावी भोके यथेच्छ । भाषा तरी वापरावी स्वच्छ ।
भासवावे तयाते तुच्छ । आत्मक्लेशे ।।
कवीचे उडवावे शिरस्त्राण । मागाहुनि करावे शिरकाण ।
मनसोक्त मारावे पादत्राण । कवितेवरी ।।
आपण गाडिले कुठे झेंडे । आपल्या कापसा किती बोंडे ।
सगळे विसरून फेकती अंडे । अशावेळी ।।
अशाने होते तरी काय । कवी हतोत्साही होऊन जाय ।
परि अंतरी लागते हाय । कायमची ।।
घेईना कोणी मनावर सोडणे गझलेस 'त्या'
मी म्हणालो आपणच या काव्यास आता बॅलंसुया !
एक विनवतो त्या कवीस की बाबारे, भडकू नको
बक्ष या नवकवीस अन ते फुत्कार तू टाकू नको
*****
पास होण्यासारखे तुज ना मिळाले मार्कही
केटी अन रिव्हॅल झाले भरशी किती तू फॉर्मही
लावले ते क्लास किती अन गाईडेही आणिली
कोपऱ्यावर मारुतीला वाहिले तू तेलही
वागणे बालिश अन ते कोवळे वय वाटे परी
सांगती दाढीमिश्या ज्या वाढल्या गालावरी
आता लक्षात ठेउन वेगळ्या धाग्यावर कविता पाडणे आले
पेरणा सांगायलाच पाहिजे का?
ही पहा पाडली गजल,
ही पहा पाडली गजल, मी ही वेड्यासारखी
दाद त्यांनी द्यावी ज्यांना, मी दाद देतो सारखी,
उंच डोंगर, श्रावणसरी, यावरी काही लिहू,
शब्द येती ना समोरी, डिक्षनरीही बारकी,
कोप-यावरती जिन्याच्या, पिंक कोणी टाकली,
रंगते टाईल इथली, पान ठेल्यासारखी,
हो! जरा जेलस होतो, प्रतिसाद संख्या पाहूनी,
मीही मग लिहिली गजाली, सत्यजिता सारखी,
आत्ता इथे इतके वाजलेत,
म्हणजे आपल्या घरी आता तितके वाजले असतील.....
तिथे आता
हे हे असे असे घडत असेल
आणि इथे हे हे असे असे ..............!
स्मरणाचा एक तास काटा तिथे
तर एक इथे!
बाकी मन,
सेकंद काटा होऊन
सांधणाऱ्या प्रिय समुद्रासारखे
टिकटिकत राहते
दोन किनाऱ्यांमध्ये अष्टौप्रहर..............
.
.
.
दुसरं काय असतो
एकांत म्हणजे तरी!
-शिवकन्या
अत्यंत सुंदर अर्थवाही रचनेचे विंडंबन करणे जीवावर आले होते,पण नंतर लक्ष्यात आले ही कलाकृती विडंबन नसून चाल तिथून घेऊन केलेली स्वतंत्र वाट्चाल आहे.
दसरा मेळावा होऊन गेल्याने ही कवीता येणे आवश्यक होते.
मूळ कवींनी (राजेंद्र देवी) मोठ्या मनाने माफ करणे.
पाहून स्वप्ने सत्तेची
बोकाळली आहे संराशा१
आता कोठे होऊ लागल्यात
पाठवणी जराश्या
का करीशी भणभण
या वखवखलेल्या सत्ताबाजारात
आता कोठे मिळविल्यात
खुर्द्यात चवल्या जराश्या
अंदमानातले काळे पाणी,
कोलूबेड्याहंटरकदान्न
सोबत तीव्र अपमानाचा overtime !
साम्राज्याचा उग्र दर्प अन
देशाने केलेली प्रेमळ उपेक्षा.......
असे सगळे, अन वरती थोडी
जयहिंदची जाळी !
या जीवघेण्या विषाणूजिवाणूंमध्येही,
काही काही रक्तांचे
malnourishment कि काय ते झालेच नाही!
उलट,
तुरुंगाच्या अजस्त्र काळभिंतीही
त्यांच्या जहालहळव्या लेखणीने
cultured झाल्या!
मातृभूमीच्या मृत्युंजय विरोत्तमांसाठी,
.
.
.
दुसरं काय होता
एकांत म्हणजे तरी!
- शिवकन्या