Skip to main content

ताज्या घडामोडी - फेब्रुवारी २०२५

लेखक माईसाहेब कुरसूंदीकर यांनी शुक्रवार, 07/02/2025 10:34 या दिवशी प्रकाशित केले.
डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे अध्यक्ष झाले आणि निवड्णुकपूर्व जाहीरनाम्यात जी वचने दिली होती, त्यांची पुर्ती करण्याची सुरुवात केली.अवैधरीत्या अमेरिकेत वास्त्वय करुन असणार्या परदेशी लोकाना परत पाठवणार हे एक वचन. अमेरिकेत एकंदर एक कोटीहुन अधिक परदेशी लोक बेकाय्देशीर वास्त्वव्य करून आहेत. ह्यात साधारण सात लाख भारतिय आहेत. ह्यातील १०४ लोकांची पहिली बॅच अमेरिकेच्या मिलिटरी विमानाने अम्रुतसर येथे उतरली.
"We thought we were being taken to another camp. Then a police officer told us that we were being taken to India. We were handcuffed, and our legs were chained. These were opened at Amritsar airport," he told news agency PTI. Singh added that he was kept in custody in the US for 11 days before being sent back home.
भारताची ह्यावर अधिक्रुत प्रतिक्रिया काय आहे?होती? की काहीच नाही? ह्या निमित्ताने ईतर देशांच्या सरकारानी दिलेल्या प्रतिक्रिया महत्वाच्या ठराव्यात. स्वाभिमान काय असतो ते हे प्रतिक्रिया बघितल्यावर लक्षात येते. "अशा पद्धतीने नागरिकांना नेणे अमानवी आणि अपमानस्पद आहे. अमेरिकेचे मिलिटरी विमान आम्ही उतरू देणार नाही" कोलंबियाचे अध्यक्ष गुस्ताव पेट्रो ब्राझील सरकारमधील मंत्र्यानेही अशीच प्रतिक्रिया दिली. मेक्सिको सरकारनेही अमेरिकेचे मिलिटरी विमान उतरवण्यास मनाई केली व चार्टड विमानाची व्यवस्था केली. https://www.indiatoday.in/india/story/us-deports-illegal-immigrants-don… भारताकडुन किंचितरी निषेध व्यक्त होईल अशी अंधुक आशा होती पण जयशंकर ह्यांच्या विधानाने तीही मावळली. "बेड्या घालुन नागरिकांना मायदेशी पाठवणे ही अमेरिकेची पद्धत आहे" असे जयशंकर म्हणाले. झालेला खर्च आम्ही देउ असेही विधान केल्याचे वाचले. आता ह्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी , डोनाल्ड ट्रम्प ह्यांच्या भेटीला चालले आहेत. "त्यांना आम्ही १२ तारखेला बोलावले आहे" असे व्हाईट हाउसकडुन सांगण्यात आले. "त्यांना आम्ही बोलावले आहे, म्हणजे?" ते नोकर आहेत अमेरिकेचे? प्रथमच भारत अमेरिकेचा एवढा मिंधा झाल्याचे दिसले. कोणाला वाचवण्यासाठी हे चालु आहे? ज्या कोलंबिया/मेक्सिको/ब्राझील ह्यांनी सणसणीत प्रतिक्रिया अमेरिकेला देउन स्वाभिमान दाखवुन दिला त्या देशात 'नेभळट' मानले जाणारे समाजवादी/डाव्या विचारांचे पक्ष सत्तेवर आहेत हे विशेष.

वाचने 34275
प्रतिक्रिया 253

प्रतिक्रिया

कसला डोंबलाचा मिंधा? आपल्या देशाचे नागरीक दुसर्‍या देशात अवैधपणे व्हिसा न घेता घुसले असतील तर त्यांचे चुकलेच. आपल्या नागरीकांच्या अशा चुकीचे समर्थन भारत सरकारने का म्हणून करायचे?मी तर म्हणतो की अमेरिकेने त्यांना अजून कडक शिक्षा करायला पाहिजे होती. आणि दुसर्‍या देशात असे अवैधपणे घुसून भारताचे नाव खराब केल्याबद्दल भारत सरकारनेही त्यांना शिक्षा करायला हवी. भारतात घुसलेल्या बांगलादेशींना आपण हाकलायला निघालो आणि बांगलादेश सरकारने त्यांच्या नागरीकांचे असे समर्थन केले तर आपल्याला ते आवडेल का? मग अमेरिकेत घुसलेल्या असल्या बेजबाबदार नागरीकांचे भारत सरकारने उघड समर्थन का म्हणून करायचे? तुमचे हे मत अजिबात पटले नाही माई.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

चंद्रसूर्यकुमार, आपल्याशी सहमत आहे. एकिकडे 'बेकायदेशीर' हा शब्द वापरायचा आणि त्याच वाक्यात तश्या वागण्याचे समर्थनही करायचे! जास्त गम्मत वतर्मान्पत्रान्ची वाटते. कोणितरी गरीब बिच्चार्या लोकाना बघा कशी वागणूक देतय अश्या पद्ध्तीने लिहिले जातय. त्यात परत महिलान्ना पायात बेड्या घातल्या का नाही यावरून चर्चा. अश्या वेळी सोईस्कररित्या समानता विसरली जाते.

"We thought we were being taken to another camp. Then a police officer told us that we were being taken to India. We were handcuffed, and our legs were chained. These were opened at Amritsar airport," he told news agency PTI. Singh added that he was kept in custody in the US for 11 days before being sent back home.
मग काय त्यांना व्हाईटहाऊसवर बोलावून घेऊन ट्रम्पतात्यांनी हारतुरे देऊन सत्कार करायला पाहिजे होते का? असल्या लोकांना बेड्या घालायच्या नाहीत तर दुसरे काय करायचे? बादवे, २०१०-११ ची एक गोष्ट. व्हर्जिनियात ट्राय व्हॅली युनिव्हर्सिटी नावाचे एक विद्यापीठ होते. त्या विद्यापीठात गेलेले भारतीय विद्यार्थी विद्यापीठात न शिकता बाहेर नोकरी करणे वगैरे प्रकार करायला लागले. अमेरिकेच्या कायद्याचा हा भंग आहे. विद्यार्थी व्हिसावर आलेल्या विद्यार्थ्यांनी प्रत्येक सेमिस्टरला किमान ९ क्रेडिट तासांचे कोर्सेस घेतलेच पाहिजेत. ते न घेता ते विद्यार्थी बाहेर नोकरी करू बघत असतील आणि अमेरिकेचा कायदा मोडायचा प्रयत्न करत असतील तर ते कसे चालेल? तो प्रकार उघडकीला आल्यावर त्या विद्यार्थ्यांवर नजर ठेवायला म्हणून अमेरिकन पोलिसांनी त्या विद्यार्थ्यांच्या पायात जीपीएस असलेली उपकरणे अडकवली होती म्हणजे ते कुठे जातात हे कोणालाही ट्रॅक करता यावे. त्यावेळेस ट्रम्पतात्या नाही तर डापु गँगचा लाडका ओबामा अध्यक्ष होता बरं का. त्याविषयी मिपावर मागे चर्चाही झाली होती. https://www.misalpav.com/node/16543 म्हणजे तुम्ही बाहेरून येणार, वाटेल ते करणार, आमच्या देशाचे कायदे मोडणार आणि त्याबद्दल शिक्षा झाल्यास परत तुमच्या देशाच्या सरकारने उघडपणे तुमची बाजू घ्यावी अशी अपेक्षा बाळगणार? वा रे वा. जॉर्ज वॉशिंग्टनचे जावईच लागून गेले नाही का हे. त्यातूनही समजा त्यामानाने कमी गंभीर असा गुन्हा घडला (उदाहरणार्थ खिशातील पाकिट काढत असताना खिशात ठेवलेला कागद खाली पडला आणि त्याकडे लक्ष न गेल्याने तो तिथेच सोडला म्हणजे रस्त्यावर घाण केली अशाप्रकारचा) आणि त्याबद्दल वर्षभर तुरूंगवासाची शिक्षा दिली तर त्या नागरिकांच्या वतीने भारत सरकारने रद्दबदली केली तर समजू शकतो की जो काही ५०-१०० डॉलर दंड घ्यायचा असेल तो घ्या आणि त्यांना सोडा अशाप्रकारची. पण जेव्हा एखादा माणूस पनामा आणि कुठलीकुठली जंगले, मेक्सिको-अमेरिका सीमेवरील भयानक वाळवंट वगैरे पार करून अमेरिकेत शिरू बघत असतो तेव्हा ती चूक नजरचुकीने झालेली नसते आणि एकदम किरकोळ तर नक्कीच नसते. कोणत्याही परदेशी देशात व्हिसाशिवाय प्रवेश करणे ही अवैध घुसखोरीच मानली जाते आणि तो त्या देशाच्या कायद्याचा गंभीर भंगच मानला जातो. असल्या लोकांच्या बाजूने भारत सरकार उभे राहिले असते तर मात्र निराशा झाली असती.

छान माहित दिलीत! स्वाभिमान हा देशप्रेम असेल तर असतो, आडातच नाहीतर पोहऱ्यात कुठून येणार? त्यामुळे ह्या सरकारकडून फार अपेक्षा करू नयेत. मागे युक्रेन मधून आणलेल्या मुलाना नरेंद्र मोदी झिंदाबादच्या घोषणा द्यायला लावल्या होत्या, आता ह्या बेड्या घातलेल्या माणसाना ही द्यायला लावा म्हणाव!

In reply to by अमरेंद्र बाहुबली

गौतम अदानीवर तेथील ग्रॅण्ड ज्युरीनी वॉरंट काढले आहे. सुऱक्षा सल्लागार अजित दोवाल ह्यांच्यावर समन्स बजावण्यात आले आहे. गुरपतवंत सिंग पन्नु ह्याने "भारत सरकारने माझ्या खुनाचा कट रचला" असे न्यु यॉर्क येथे सांगितले. त्यामुळे पंतप्रधान मोदी सप्टेंबरमध्ये अमेरिकेत गेले तेव्हा डोवाल जाउ शकले नव्हते. आता ह्यावेळी तरी डोवाल जातात का ते बघायचे.

यापूर्वीही अमेरिकेत बेकायदेशीरपणे प्रवेश केलेल्या भारतीयांना अमेरिकेने भारतात परत पाठवले होते. तेव्हाही हीच पद्धत ( बेड्या घालून ) वापरली होती का? असेल तर माध्यमांना विमानतळापासून दूर का ठेवले होते? कसली लाज वाटली सरकारला?

In reply to by आग्या१९९०

भारताने निषेध नोण्दवयला हवा होता. ते अवैध जाणारे भारतिय भले चुकले असतील पण तरीही "त्यांना बेड्या घालुन अमानवी पद्धतीने आणण्याची अजिबात गरज नव्हती".. हे सांगायला काहीच हरकत नव्हती. ह्यापुर्वि साध्या विमानांनी अवैध लोकांना पाठवायचे असे वाचले आहे. ट्रम्प ह्यांना जगाला(विशेष करुन तिसरे जग) सांगायचे आहे की अवैध रीतीने याल तर असा धडा शिकवु. 'अबकी बार् ट्रम्प सरकार'/मैत्री वगैरे सगळे दुय्यम आहे. भारताने निषेध नोंदवायलाच हवा होता. ईतर देशांनी तो नोंदवलाच आहे. कोलंबियाच्या अध्य़क्षांनी नोंदवलेला निषेध- “I cannot allow migrants to remain in a country that does not want them; but if that country sends them back, it must be with dignity and respect for them and for our country,” https://www.aljazeera.com/economy/2025/1/27/how-trump-coerced-colombia-…

एकदर गोग्गोड, कोणालाही खोट काढता येईल असे काहीही न बोलणारा, एकदम सुसंस्कृत, सभ्य, जंटलमन असा जो बायडन अध्यक्ष असताना अशा घुसखोरांसाठी मोकळे रान मिळाले होते. जेवढे दक्षिण अमेरिकेतील देशांमधून असे घुसखोर अमेरिकेत गेले त्या तुलनेत भारतीयांचा आकडा बराच कमी आहे आणि ते अपेक्षितही आहे. अशा घुसखोरांना दर महिन्याला १५०० डॉलर द्यायच्या हालचाली बायडन आणि कमळी करत होते ना? न्यू यॉर्क शहरात असल्या लोकांनी निदर्शने केली होती की आम्हाला लॉजसारख्या ठिकाणी न उतरवता चांगल्या ठिकाणी उतरवा म्हणून. ते बघून अमेरिकन नागरिकांचा संताप संताप झाला असेल तर ते समजू शकतो. मी अमेरिकन असतो तर माझा संताप संताप नक्कीच झाला असता. अशा काही अमेरिकन नागरिकांनी त्या युट्यूब व्हिडिओवरील प्रतिक्रिया वाचल्या की आमचे सरकार आमच्यासारख्या नागरिकांसाठी पण इतके करत नाहीये तितके या घुसखोरांविषयी करत आहे. आता तो बुळा जो बायडन अध्यक्ष नाहीये. खरं तर बुळा नाही महानालायक आणि हलकट जो बायडन अध्यक्ष नाहीये. अशा लाखो घुसखोरांना अमेरिकेचे नागरिकत्व देऊन त्यांना स्विंग स्टेट्समध्ये वसविले असते तर यावच्चंद्रदिवाकरो डेमॉक्रॅटिक पक्षाचाच अध्यक्ष व्हाईट हाऊसमध्ये जाऊन बसला असता अशी व्यवस्था करायची होती का? भारतात घुसलेल्या बांगलादेशींना प्रोत्साहन देणारे राजकारणी आहेत त्यापेक्षा जो बायडन किंचितही वेगळा वागला नाही. असली घाण आपल्या देशातून हाकलायलाच लोकांनी ट्रम्पतात्यांना मते दिली आहेत. ते त्यांची अपेक्षा पूर्ण करत आहेत. त्यात त्यांचे काहीही चुकले नाही. जर दक्षिण अमेरिकेतील देश आपल्याच लोकांना घ्यायला तयार नसतील तर त्यांना समुद्रात टाकावे किंवा हेलिकॉप्टरमधून ढकलून देऊन अमेरिकेच्या सीमेबाहेर टाकावे. कसला फालतूपणा चालू आहे? असल्या घाणीचे समर्थन भारत सरकार करत नसेल तर त्याच काडीमात्र चूक भारत सरकारची नाही.

"आपल्या देशाचे नागरीक दुसर्‍या देशात अवैधपणे व्हिसा न घेता घुसले असतील तर त्यांचे चुकलेच. आपल्या नागरीकांच्या अशा चुकीचे समर्थन भारत सरकारने का म्हणून करायचे" त्यांचे समर्थन करा असे कोणीच म्हणत नाही. खलिस्तानची मागणी करणारा गुरपतवंत सिंग पन्नु हा ट्रम्प ह्यांच्या शपथविधीला उपस्थित होता. पन्नुला भारताच्या ताब्यात देणे सोडाच, उलट अजित दोवाल ह्यांच्यावरच तेथील कोर्टाने समस बजावले आहे. अमेरिकेच्या भूमिकेतून खलिस्तानची मागणी करण्यात काहीच गैर नाही. ह्याबद्दलही भारताने आ़क्षेप घ्यायचे कारण नाही? आणी अजित डोवाल अमेरिकेत आले तर त्यांना खुशाल अटक करा असे भारताने सांगायचे? गौतम अदानी आणि त्यांच्या सहकार्यांनी लाच वाटल्याच्या आरोपावरुन ग्रॅन्ड ज्युरीनी त्यांच्यावर वॉरंट काढले आहे. येथे मात्र सरकारच नाही तर सत्ताधारी पक्षाचे प्रवक्तेही अदानींच्या मदतीला आलेले होते. सोरोसचा हातही अनेकांना ह्यात दिसला होता. आता पंतप्रधान अमेरिकेला गेल्यावर ट्रम्प ह्यांच्याकडे कोणत्या विनवण्या करणार? ते पहायचे.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

अहो माई, अमेरिका पूर्वीपासूनच खलिस्तानवाद्यांना समर्थन देत आली आहे. १९८५ मध्ये लोकसभेत बोलताना काँग्रेसचे खासदार के.के.तिवारी यांनी इंदिरा गांधींच्या हत्येचा कट अमेरिकेत शिजला होता असा आरोपही केला होता. १९८२ मध्ये जगजितसिंग चौहानला अमेरिकेने व्हिसा दिला होता. वाजपेयी अमेरिकेत गेलेले असताना खलिस्तानी आणि काश्मीरी समर्थकांनीही घोषणा देणे, बॅनर लावणे असले प्रकार केलेच होते. अमेरिका आपला (खरं तर पश्चिम युरोपातील देश सोडले तर कोणाचाच) मित्र नाही हे तुम्हाला माहित नाही का? बायडनपेक्षा ट्रम्प बरा वाटतो कारण बायडनने बांगलादेशात उघड उघड काड्या घातल्या होत्या, भारतातही शेतकरी आंदोलनाच्या निमित्ताने अस्थिरता निर्माण करायला फूस लावली होती असे म्हणायला जागा आहे तसले प्रकार ट्रम्पनी केलेले नाहीत. यु.एस एड वगैरे संस्थांच्या मार्फत भारतातील बांडगुळवादी डाव्या एन.जी.ओना पैसा कशावरून पुरवला जात नसेल? ट्रम्पतात्यांनी यु.एस एडच बंद करून टाकली आहे. त्यामुळे बायडनपेक्षा ट्रम्प बरा इतकेच. याचा अर्थ ट्रम्प आल्यावर लगेच स्वर्ग येईल असे आम्हाला वाटते असे गुलामांना वाटत असले तर वाटू दे. गुलामांना काय वाटते आणि ते आमच्या विषयी काय बोलतात हा अजिबात दखलही न घेण्यासारखा विषय आहे. असो. बाकी अमेरिकेत नियुक्त केलेले न्यायाधीशही एखाद्या पक्षाच्या बाजूचे असतात हे तुम्हाला माहित असेलच. असल्या न्यायाधीशांना अडानीच्या विरोधात काही वॉरंट काढले समजा. ठीक आहे. अमेरिकेची न्यायव्यवस्था आहे. अमेरिकन नागरिकांचे पैसे घेऊन काही गैरवापर केला असा आरोप असेल तर त्या प्रोसेसच्या अंतर्गत असे वॉरंट काढले. आता त्यात भारतातील सत्ताधारी पक्ष कुठे आला? कारण भारतातील विरोधी पक्ष सतत अडानी अडानीचा जप करत असतो, त्याचे वेळेत अमेरिकेत डेमॉक्रॅटिक जो बायडन सत्तेत, त्याच वेळेस असे वॉरंट निघणे, मग लगेचच भारतातील विरोधी पक्षांनी त्याच्याविरोधात रान उठविणे याची ती प्रतिक्रिया होती. बादवे, अडानीविरोधात गरळ ओकणारा हिंडेनबर्गच आटोपला हे माहित नाही का?
आता पंतप्रधान अमेरिकेला गेल्यावर ट्रम्प ह्यांच्याकडे कोणत्या विनवण्या करणार? ते पहायचे.
बघूच या. आपल्या आदिल शहरयार या मित्राला अमेरिकेतील तुरूंगातून सोडविण्याच्या बदल्यात भोपाळ वायुगळती प्रकरणातील वॉरन अँडरसनला जाऊ द्यायचे डील करणार्‍या राजीव गांधींपेक्षा कमी नुकसान करणारी विनवणी असावी अशी अपेक्षा :)

२०१३ मध्ये देवयानी खोब्रागडे ह्या भारताच्या राजदूतानी सन्गिता रिचर्ड ह्या महिला मदतनीसाची व्हिसा भरताना चुकीची माहिती दिली म्हणुन झडती घेण्यात आली होती. ती तेथील,अमेरिकेच्या नियमांनुसारच होती. पण भारताने तात्काळ जोरदार निषेध नोंदवला होता. The strong Indian reaction came as a "shock and disbelief" here, especially to those who have anything to do with the country's foreign policy, as they had never expected such a strong retaliatory measure from New Delhi. https://economictimes.indiatimes.com/news/politics-and-nation/devyani-k… धोरण लकवा/काहीच भूमिका घेत नाहीत म्हणून टीका व्हायची ते मनमोहन सिंग तेव्हा पंतप्रधान होते. हा स्वाभिमान ना ? की नाही?

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

अहो माई, देवयानी खोब्रागाडे या भारत सरकारने अमेरिकेत भारतीय दूतावासात नियुक्त केलेल्या अधिकारी होत्या म्हणजे भारताचे प्रतिनिधीत्व करत होत्या आणि भारताचे प्रतिनिधीत्व करणार्‍या अधिकारी असे अमेरिकन सरकारनेही मान्य केले होते. त्या चुकल्या असल्या तरी त्यांच्या कृत्यामुळे भारत सरकारची म्हणजेच भारताची नाचक्की होत होती. त्यामुळे लाजेकाजेस्तव तसे केले. अमेरिकेने हाकललेले १०४ लोक असे भारत सरकारने अधिकृतपणे पाठविले नव्हते आणि व्हिसा घेऊन अमेरिकेतही अधिकृतपणे गेले नव्हते. कोणत्या कोणत्या फ्रॉड एजंट लोकांच्या नादाला लागून असेच ते त्या देशात घुसू बघत होते. मग त्या दोन गोष्टींची तुलना कशी करता येईल? अर्थात तुलना करणारे कसलीही तुलना करतात. विश्वंभार चौधरींच्या फेसबुक भिंतीवर एकाने लिहिले होते की मनमोहन सरकारने कडक भूमिका घेतली म्हणून इटालियन मरीन परत आले. आता त्या इटालीयन मरीनांनी भारतीय मच्छिमारांना ठार मारले होते- आता भारताच्या हद्दीत की आंतरराष्ट्रीय पाण्यात हा वादाचा मुद्दा होता ते क्षणभर बाजूला ठेऊ. काहीही असले तरी त्या इटालीयन लोकांनी भारतीय नागरीकांना ठार मारले होते. तसे काही या केसमध्ये झाले आहे का? मग त्या दोन गोष्टींची तुलना कशी करता येईल? त्या १०४ पैकी बरेचसे लोक पनामा, मेक्सिको वगैरे देशांमधून अमेरिकेत घुसले होते. त्यापैकी किती देशांचे व्हिसा त्यांच्याकडे होते कोणास ठाऊक. आपल्या मर्जीने असले अनधिकृतपणे उद्योग करणार्‍या- खरं तर बेकायदा घुसून त्या देशाचा कायदा मोडणार्‍यांच्या बाजूने उभे राहायचे? कमाल आहे. बादवे, देवयानी खोब्रागाडे प्रकरण होते जानेवारी २०१४ चे. त्या वेळेस नरेंद्र मोदी पंतप्रधानपदाच्या शर्यतीत उतरले होते आणि ते विरोधी पक्षात होते. ते पंतप्रधान बनू शकतील ही शक्यता ध्यानात घेता इतकी वर्षे वाळीत टाकलेल्या मोदींशी संवाद साधायला म्हणून अमेरिकन राजदूत आणि इतर वरीष्ठ अधिकारी मोदींना मुख्यमंत्री कार्यालयात भेटायला गेले होते. तेव्हा मोदींनी या प्रकरणात भारत सरकारची अधिकृत भूमिका होती त्याला साजेशीच भूमिका घेतली होती. मध्यंतरी निज्जर हत्येप्रकरणी भारत आणि कॅनडाचे संबंध ताणले गेले असताना भारत सरकारने कॅनडाच्या राजदूताला हाकलले तेव्हा आताच्या विरोधी पक्षाशी भूमिका कशी होती? भारत सरकारच्या भूमिकेला अनुरूप भूमिका त्यांनी घेतली होती का? नाही ना? त्या विरोधी पक्षांना कशाचेच घेणेदेणे नाही. त्यांचा अजेंडा एकच की मोदींना विरोध करायचा. समजा मोदींच्या सरकारने या १०४ लोकांना हाकलले त्या प्रकरणी तुम्ही म्हणत आहात तशी भूमिका घेतली असती तर सगळ्या विरोधी पक्षांनीच आणि समस्त डापु गँगवाल्या लोकांनी मोदी दुसर्‍या देशात जाऊन तिथला कायदा मोडणार्‍यांच्या बाजूने कसे बोलू शकतात असा हलकल्लोळ केला असता. असो.

बेड्या घालुन नागरिकांना मायदेशी पाठवणे ही अमेरिकेची पद्धत आहे" असे जयशंकर म्हणाले. झालेला खर्च आम्ही देउ असेही विधान केल्याचे वाचले. हीच पद्धत कोलंबियाच्या नागरिकांना का नाही वापरली ? ह्याचे खरे उत्तर परराष्ट्रमंत्री माहीत असून देणार नाहीत इकडे आड तिकडे विहीर अशी अवस्था झाली आहे. आणि भारत सरकारने हा खर्च का उचलावा ? अर्थात परराष्ट्रमंत्री सध्या प्रचंड तणावाखाली असल्यानं ह्याचे उत्तर मिळेल अशी अपेक्षा करणे चुकीचे आहे.

अमेरिकेने अकायदेशीर भारतीय घुसखोरांना हाकलून देणे अनेक वर्षांपासून सुरू आहे. हा वृत्तांत वाचा. देवयानी खोब्रागडे या विषयात भारताला निषेध व विरोध करण्यासाठी वाव होता. पण या अकायदेशीर घुसखोरांवर केलेल्या कारवाई संदर्भात विरोध करण्यासाठी भारताकडे कोणताही प्रबळ मुद्दा नाही. तथापि हकालपट्टी करताना हातकड्या घालू नका इतपतच भारत विनंती करू शकतो. भारताने या विषयावर अमेरिकाविरोधात खूप कडक भूमिका घेणे अव्यवहार्य ठरेल. संबंध बिघडले तर अमेरिकेत शिकायला जाणाऱ्या व कामासाठी जाणाऱ्या हजारो इच्छुकांना प्रवेश अनुमती मिळण्यास अडथळा येऊ शकतो. अकायदेशीर मार्गाने अमेरिकेत घुसलेल्या व हकालपट्टी झालेल्या काहीशे नागरिकांसाठी कायदेशीर मार्गाने अमेरिकेत जाऊ इच्छिणाऱ्या हजारो नागरिकांचे भवितव्य धोक्यात आणणे व्यवहार्य नाही.

In reply to by श्रीगुरुजी

तथापि हकालपट्टी करताना हातकड्या घालू नका इतपतच भारत विनंती करू शकतो. सरकारने ही विनंती का केली नाही ? एक तर ह्यापूर्वी अमेरिकेने अशी कारवाई केली आहे, तेव्हा बेड्या का घालत नव्हते? आणि ह्यावेळी मिलिटरी विमान वापरले, त्याला आपल्या सरकारने काहीच विरोध केला नाही. ह्याचा अर्थ ट्रम्पने भारतावर दबाव आणण्याची खेळी केली असावी आणि त्याला भारत सरकार विरोध करू शकला नाही. बाकी कायदेशीरपणे भारतीय नागरिकांना अमेरिकेत जाण्यास अडथळा येईल ही सरकारला भीती वाटत असेल तर त्यास काहीच आधार नाही, शुद्ध भित्रेपणा आहे सरकारचा.

In reply to by आग्या१९९०

अशी विनंती केली असेल सुद्धा किंवा बेड्या घालून विमान उडल्र्यानंतरच तशी माहिती मिळाली असेल. मुळात कोणत्या देशातील नागरिकांशी कसे वागावे हे प्रत्येक देश आपल्या धोरणानुसार ठरवितो. कायमस्वरूपी वास्तव्याची अनुमती देण्यासाठी किती कालमर्यादा असावी याविषयात अमेरिकेचे सर्व देशांसाठी समान धोरण नाही. कोणत्या देशाच्या नागरिकांना आपल्या देशात पूर्वानुमतीविना प्रवेश द्यायचा व कोणत्या देशाच्या नागरिकांना अधिकृत अनुमतीपश्चात प्रवेश द्यायचा हे प्रत्येक देश आपल्या हितानुसार ठरवितो. अनेक दक्षिण अमेरिकन देशात अमेरिका किंवा इंग्लंड पारपत्रधारकांना पूर्वानुमतीविना प्रवेश देतात, परंतु भारतीय पारपत्रधारकांना पूर्वानुमतीपश्चात प्रवेश करता येतो. या धोरणाला भारत विरोध करू शकतो का? तसेच कोलंबिया नागरिकांना बेड्या नाहीत पण भारतीयांना का हे विचारण्यात अर्थ नाही. सौदी अरेबियात गंभीर गुन्हा केलेल्या भारतीय नागरिकांचा शिरच्छेद केला जातो. या शिक्षेला भारत विरोध करू शकतो का? ज्या ज्या देशात कायदा पाळणाऱ्या भारतीयांवर अन्याय केला जातो, त्या त्या देशात भारताने विरोध करून शक्य ती कायदेशीर मदत दिली आहे. परंतु अकायदेशीर घुसखोरांना भारत मदत करू शकणार नाही. भारतात घुसलेल्या अकायदेशीर घुसखोरांना वाटेल ती मदत करण्यासाठी निधर्मांध जिवाचे रान करतात. परंतु इतर देशात असे देशद्रोही क्वचितच आढळतील.

In reply to by श्रीगुरुजी

अशी विनंती केली असेल सुद्धा किंवा बेड्या घालून विमान उडल्र्यानंतरच तशी माहिती मिळाली असेल. संसदेत ह्यावर परराष्ट्रमंत्री स्पष्ट उत्तर का देत नाही ? गोल गोल उत्तर देतात. तसेच कोलंबिया नागरिकांना बेड्या नाहीत पण भारतीयांना का हे विचारण्यात अर्थ नाही. का अर्थ नाही? कोलंबिया सरकारने बेड्या घळूनाये अशी विनंती केली आणि ती मान्य झाली. आपण अशी विनंती केली की नाही हेच माहीत नाही. परंतु अकायदेशीर घुसखोरांना भारत मदत करू शकणार नाही. बरोबर आहे, सरकारने त्यांना आणायचा खर्च त्यांच्याकडूनच वसूल करावा, करदात्यांच्या पैशातून नव्हे. भित्रट सरकार ह्यापैकी काहीही करणार नाही ह्याची खात्री आहे.

१९९५-९९ या काळात मुंबईत सापडलेल्या अकायदेशीर बांगला घुसखोरांना महाराष्ट्र पोलिसांनी पकडून रेल्वेत बसवून बांगला सीमेवर सोडायला महाराष्ट्र पोलीस गेले होते. रेल्वे पश्चिम बंगालमधील एका स्थानकावर थांबली असताना बंगालमधील डाव्या आघाडीच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांवर हल्ला करून घुसखोरांना मुक्त करून पळून जाण्यास मदत केली होती..

भारताने प्रत्येकवेळेस कायदेशीर नागरीकाना परत आणण्यासाठी प्रत्येकवेळेस स्वतःचे विमान पाठवले होते. रशिया/युक्रेन मधून किंवा येमन मधून लोकाना सन्मानाने परत आणले होते. पण घुसखोर हे कायद्याला बगल देऊन तेथे गेले होते. नशीब समजा की तिथल्या जेल सडण्यापेक्षा त्याना परत पाठवले जातेय.

In reply to by विजुभाऊ

भारतातील एका मोठ्या उद्योगपतीवर अमेरिकेत वॉरंट आहे. हे वॉरंट तेथील ज्युरीनी काढले आहे(एफ बी आय ने पुरावे दिल्याची खात्री झाल्यावर) भारताचे सुरक्षा सल्लागार- अजित दोवाल ह्यांच्यावर समन्स आहे. ह्यांना भारताने वाचवायचा प्रयत्न करायचा की तिकडचे कायदे मोडलेत, तुमचे तुम्ही बघुन घ्या. म्हणुन सांगायचे? की ह्यांना वाचवण्यासाठी भारत आता जे काही अमेरिका करत आहे ते निमुटपणे सहन करतोय? सुरुवात झाली आहे. हार्ले डेविह्डसन ह्या अमेरिकन बाईकसवरील आयात शुल्क भारताने कमी केले. https://www.ndtv.com/auto/govt-cuts-import-duties-on-high-capacity-bike… महिन्याभरात बंद पडलेली फोर्ड मोटर्स- भारत परत चालु होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ह्याउलट चीनचा प्रतिसाद बघा- China has accused the US of making "unfounded and false allegations" about its role in the fentanyl trade to justify tariffs on Chinese products. https://www.bbc.com/news/articles/c805m1r4m5no China retaliates with additional tariffs of up to 15% on select U.S. imports starting Feb. 10 https://www.cnbc.com/2025/02/04/china-levies-tariffs-on-select-us-impor… ह्याला म्हणतात प्रत्युत्तर आणि स्वाभिमान! चीनच्या अध्यक्षांना व्हाईट हाउसने शपथविर्धीचे आमंत्रण देऊनही चीनने अजिबात भीक घातली नाही. भारतही हे करू शकला असता असे आमचे मत. पण उद्योगपतींना सोडवायचे आहे. ट्रम्प पुरेपुर किंमत वसुल करणार असे वाटत आहे.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

माई जो बायडन सारखं तुमचं पण वय झालंय. आणि चष्म्याचा नंबर पण बदललाय. भारताच्या याच सरकारने रशिया कडून जगभर निर्बंध असताना तेल घेतलं आणि आमचा जेथे फायदा आहे तेथे आम्ही व्यापार करणार हे अमेरिकेला सुनावलं, अमेरिकेच्या कडक निषेधांना न जुमानता इराणच्या चाबहार बंदरात गुंतवणूक केलीय आणि अमेरिकेच्या कॅटसा कायद्याला फाट्यावर मारून रशियाकडून S - ४०० हि क्षेपणास्त्र प्रणाली विकत घेण्याचा करार केला ते आपण विसरलात असं दिसतंय. तेंव्हा हे सरकार भित्रं नसून ताठ कण्याचं आहे असं तुम्हाला वाटलं नाही? कूटनीती हा फार वेगळा विषय आहे. उगाच फडतूस गोष्टींमध्ये प्रश्न प्रतिष्ठेचा बनवून आपल्या पायावर धोंडा पाडून घेण्या इतके श्री मोदी किंवा श्री डोभाल बुळे नाहीत. ट्रम्प साहेबाना आपण बोलतो ते करून दाखवतो हे त्यांच्या मतदारांना दाखवणे हि राजकीय अपरिहार्यता आहे. त्यांनी कॅनडा आणि मेक्सिको ला टेरिफ लावले आणि दुसऱ्याच दिवशी त्याला स्थगिती दिली पण चीन वर लावलेल्या निर्बंधांना स्थगिती दिलेली नाही. त्यामुळे अमेरिकेशी वागताना चीनला जशास तसे वागणे आवश्यक आहे. उगाच त्याला स्वाभिमान वगैरे पालूपदे लावण्याची गरज नाही. राजकीय आणि व्यापारी गणिते हि आपल्या स्वतः च्या फायद्यावर अवलंबून असतात हे आपलेही राजकारणी व्यवस्थित जाणतात. बाकी जालावर हातात कळफलक आला कि बडवणारे अनेक लोक आपण महापालिकेच्या उंदीर मारण्याच्या विभागात आहोत हे विसरतात हि वस्तुस्थिती.

हार्ले डेविह्डसन ह्या अमेरिकन बाईकसवरील आयात शुल्क भारताने कमी केले. जीवनावश्यक वस्तूत समाविष्ट करण्यात आले आहे हर्लेला ह्या बजेटमध्ये.

In reply to by आग्या१९९०

हार्ले डेव्हिडसन च्या किमती हा ट्रम्प यांनी एक प्रचाराचा मुद्दा केला होता. केवळ प्रश्न प्रतिष्ठेचा न करता त्यांना चुचकारण्यासाठी त्यावरील कर सरकाने कमी केला आवळा देऊन कोहळा काढण्याचा प्रकार आहे हा. पण डाव्या लोकांना समजून न समजल्यासारखे करतात. मोदींच्या वर टीका करण्या साठी कितीही भुक्कड मुद्दा सुद्धा ते उचलून धरतात. त्यातून त्यांची ४०० सीसी ची मोटार सायकल हिरो बरोबर सहकार्याने भारतात स्वस्तात आलीच आहे. बाकी मोठ्या मोटारसायकल किती विकल्या जातील हा एक मोठा प्रश्न आहेच बाकी हार्ले डेव्हिडसनची एकंदर आर्थिक स्थिती फारशी चांगली नाही Harley-Davidson's Revenue Absolutely Tanked Last Year, Future Isn't Looking Bright How bad is it? Yearly, it's down by nearly 60%. Ouch. https://www.rideapart.com/features/749731/harley-davidson-q4-2024-annua…

In reply to by सुबोध खरे

आयत शुलक कमी करुन भारताने नक्की कसला कोहळा काढला आहे?आता फोर्ड मोटर्स परत चालु होणार असल्याच्या बातम्या येत आहेत.ह्या कंपन्यांना विरोध नाही पण हे नक्की भारत कशासाठी करत आहे? मुख्य मुद्दा ज्या अपमानास्पद पद्धतीने भारतियांना आणले गेले त्याचा आहे. ट्रम्प-मोदी ह्यांची मैत्री होती तर हा अपमान थांबवता आला नसता का? की भारत सरकारने सांगितले आणि अमेरिकेने फाट्यावर मारले? ईतर देश जशास तसे उत्तर देत असताना नेहमी पत्रकारांना निरुत्तर करुन टाळ्या मिळवणारे जयशंकर गुळगुळीत का बोलत आहेत ? असो.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

माई रबिंदर सिंह सारख्या अगोदर लष्करात मेजर आणि नंतर रॉ मध्ये काम करणाऱ्या गुप्तहेराने सी आय ए साठी काम सुरु केले. हे भारतीय गुप्तचर खात्याच्या लक्षात आल्यावर त्याला सी आय ए ने खोट्या पासपोर्ट आणि व्हिसा वर अमेरिकेत नेले आणि उपयोग होता तोवर पोसले भारत सरकारने यांबद्दल बराच गदारोळ केला परंतु अमेरिकेने त्याला भारताला सुपूर्द केले नाही. आता हा प्रश्न प्रतिष्ठेचा बनवून अमेरिकेशी संबंध तोडायला हवा होता का? त्यासाठी तुम्ही डॉ मनमोहन सिंह याना कणाहीन बुळबुळीत म्हणून नावे ठेवणार का? https://en.wikipedia.org/wiki/Rabinder_Singh_(intelligence_officer) उगाच फडतूस प्रश्न मानापमानाचा बनवायला श्री मोदी किंवा डोव्हल साहेबाना म्हातारचळ लागलेला नाही. वय झालं कि माणसं मान अपमान याचा फार बाऊ करतात

खर तर अमेरिकेने त्या घुसखोरांकडून त्यांना भारतात सोडण्याचा खर्च पण भारताकडून घ्यायला पाहिजे आणि आपण त्यांच्या कडून वसूल करायला पाहिजे. असताना

कोणत्याही देशात अवैध राहणारे नागरिक परत पाठवले पाहिजेत, यात काही वाद नाही. बाकी, अमेरिकेत अवैध वास्तव्य करणा-या सर्व भारतीयांना पूरण-पोळीचा स्वयंपाक करुन, जेवणानंतर मसाला पान देऊन. नै म्हणुन हातात शंभर शंभर रूपये देऊन प्रत्येकाच्या कपाळावरुन मायेने बोटं कड़ाकड़ा मोडून, गालावर मुक्के घेवून पाठवले पाहिजेत अशी, अमेरिकेकडून अपेक्षा नाही. अमेरिकेचं आपलं धोरण आहे, आपली छबी ते लहान सहान गोष्टीनी दाखवून देत असतात आणि ते जपतात. भारतीयांना बेड्या घालून आणले, हे त्यांची पद्धत असली तरी, एक भारतीय म्हणुन सहन झालं नाही. राष्ट्रवादाच्या पोकळगप्पा असतात त्यावर राजकारण करता येतं. वगैरे असे म्हणून स्वतःची समजूत घातली. अशा प्रकारे, भारतीय नागरिकांचा केलेला अपमान सहन केला जाणार नाही, वगैरे बोलायलाही धाडस लागतं. इकडच्या गल्लीत जो विश्वगुरुचा खयाली पुलाव आहे, तो देशभर माहिती आहे. आपण जे काही कायम कशा कशात जगात अव्वल नंबरवर आहोत, या बाता मारतो तो नुसता धुर आहे, हेही अनेकांना माहिती आहे. भारतीयांना सन्मानाने आणायला पाहिजे होतं वगैरे टीका करणारे असे राज्यसभेचे सदस्य वगैरे बोलतात ते राजकारण करीत असतात, यात काही अपमान वगैरे मानायचा नसतो. आणि झालाच असेल अपमान तर, दोन दोन थेंब गोमुत्र शिंपडले की, अपमान वगैरे शिल्लक राहात नाही, त्यामुळे आपण काही वाटून घ्यायचं नाही. कोलंबियाचे अध्यक्ष गुस्ताव पेट्रो यांनी जी भूमिका घेतली त्याला साला आपला सॅल्यूट आहे. आपल्याकडूनही कानात प्रॉम्टर घालून अस्पष्ट 'निषेध करता हू' इतकं जरी बोलले असते तरी, कुंभमेळ्यातलं पुण्य मिळालं असतं. अभिमान वाटला असता. डोळे भरुन आले असते. पण आडातच नै तर पोह-यात तरी येणार कुठून. बाय द वे, प.नेहरुंच्या काळात भारतीयांना असे बेड्या घालून पाठवले होते का ? सध्या सायंकाळी बागेत फिरायला आलेल्या वयस्कर लोकांचा त अभ्यास सध्या सुरु आहे, काही माहिती मिळाली की इकडे लिहीनच. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

+१

Colombia backs down on accepting deportees on military planes after Trump’s tariffs threats बिरुटे सर तुमचा मोदी द्वेष आपल्या जागी असू द्या परंतु वस्तुस्थिती काही वेगळी आहे. अमेरिकेने धमकी दिल्यावर कोलंबियाने शेपूट घातली आहे. Colombia said Sunday evening it had agreed to “all of President Trump’s terms,” including the “unrestricted acceptance” of immigrants who entered the US illegally, after two US military planes carrying deportees were blocked from entering the country.https://edition.cnn.com/2025/01/26/politics/colombia-tariffs-trump-depo… बाकी "अपमान , बेड्या बिड्या ठोकणे " हे चहाबरोबर चघळायला मुद्दा म्हणून ठीक आहे

In reply to by सुबोध खरे

डॉक्टर साहेब, आपलं गोबरप्रेम आम्हाला काही नवं नाही, ते सर्वश्रुत आहे. पण या देशाला एक दोन हजार चौदापासून एक गद्दळ-वाईट सवय लागली आहे, ती म्हणजे वाईटाचं समर्थन करण्याची. उदा. घ्यायचं तर, समजा तडीपार जरी देशाचा गृहमंत्री झाला तरी म्हणायचं चांगलं झालं. एखाद्याची हत्त्या जरी झाली तरी त्या गुंडप्रवृत्तीचं समर्थन करायला रस्त्यावर उतरायचं. महागाई वाढली तरी ती महागाई कशी चांगली आहे, त्याचं समर्थन करायचं. अगदी बेड्या बीड्या हा चहाचा मुद्दा वगैरे ठीक म्हणून वगैरे इत्यादी. गेली दोन दिवस भारतीयांना बेड्या घालण्यावरुन भारतीयांनी आपल्या ज्या भावना व्यक्त केल्या त्याचे परिणाम शेवटी निर्लज्ज सत्ताधारी राजकारण्यांवर झाले. परराष्ट्र मंत्रालयाला भूमिका घ्यावी लागली. 'अमेरिकी प्रशासनाला अशा प्रकारची वागणूक टाळता आली असती'' निषेध सौम्य असला तरी, ट्रम्पच्या ढुंगाला चिमटा बसणार नाही, इतकं सौम्यपणे का होईना, उशिरा का होईना अक्कल आली याचं कौतुक वाटलं. जवळ जवळ अजून दहा हजार असे बेकायदा अमेरिकेत वास्तव्य करीत असलेले नागरिक टप्प्या टप्प्याने अमेरिका परत पाठवणार आहे, बाकीच्यांना आता ते कसे पाठवतात त्याची उत्सुकता आहे. आपली अमेरिकेशी मैत्री आहे. आपण त्यांच्या स्वागतासाठी आपली गरीबी लपवली. माय फ्रेंड ट्रम्प दोस्तीका कुछ तो खयाल करो. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

बिरुटे सर आपलं गोबरप्रेम आम्हाला काही नवं नाही, आपले वैफल्य असे भाषेचा स्तर खाली येण्यातून दिसू नये. सध्या सगळीकडे विरोधकांना वैफल्य यावे अशीच स्थिती आहे परंतु पु ल देशपांडेंच्या भाषेत पुरुषोत्तम तू आता प्रोफेसर झालास जरा गंभीरपणे वागायला शिक

In reply to by सुबोध खरे

वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा. ;) -दिलीप बिरुटे

In reply to by सुबोध खरे

आजपासून त्यांना सुतक आहे. सायंकाळी डोक्याला टापशी गुंडाळून, एका हातात गोवऱ्या पेटवलेलं मडकं घेऊन, अल्लानाम सत्य आहे अश्या घोषणा देत ते आआपला खांदा देणार आहेत.

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

" 'अमेरिकी प्रशासनाला अशा प्रकारची वागणूक टाळता आली असती'' बरोब्बर. जरातरी निषेध व्यक्त केला हेही खूप झाले. कोलंबिया/ब्राझिल ह्यांनी ताबड्तोब निषेध व्यक्त केला. नंतर कोलंबियाने नमते घेतले. ते घ्यावे लागणारच होते. ट्रम्प ह्यांनी 'कॅनडा अमेरिकेचे ५१ वे राज्य व्हावे' असे बोलल्यावर वॉट्स-अ‍ॅप विद्यापीठावर हेटाळणीचे विषय झालेल्या कॅनडाचे पंतप्रधान ह्यांची प्रतिक्रिया बघा- There isn’t a snowball’s chance in hell that Canada would become part of the United States.” https://www.hindustantimes.com/world-news/trudeau-says-trump-s-intent-t… उगीच अमेरिका आपला शेजारी आहे, सांभाळून घेऊ, कुटनिती करत बसूया.. असले काही नाही.

सो मि वरिल मला भावलेली प्रतिक्रिया : त्यांना परत पाठवायला हवंच होतं. जे बेकायदेशीर कुठल्याही देशात घुसतील त्यांना त्यांच्या देशात परत पाठवायलाच हवं. ..... फक्त वाईट वाटलं ते ज्याप्रकारे त्यांना हातात पायात बेड्या ठोकून पाठवलं त्याचं. त्यांनी अमेरिकेत घुसून केलं ते बेकायदेशीर होतं पण अमानवीय नव्हतं. ..... अमेरिकेने जे केलं ते कायदेशीर होतं पण अमानवीय होतं. बस एवढंच. बेड्या घालुन पाठवणे यात त्या लोकांनी चिडून हल्ला करु नये किंवा इतर उपद्व्याप करू नयेत याच्या साठीच असेल का अशी शंका आली. हे मुकाट पणे सहन करण्याचा भारताचा काय उद्देश असेल ? मुत्सद्देगिरी, मास्टरस्ट्रोक ? अनावश्यक बलाढ्य शक्तिशी आंतरराष्ट्रिय वाद टाळणे ?

In reply to by चौथा कोनाडा

त्यांना परत पाठवायला हवंच होतं. जे बेकायदेशीर कुठल्याही देशात घुसतील त्यांना त्यांच्या देशात परत पाठवायलाच हवं. ..... फक्त वाईट वाटलं ते ज्याप्रकारे त्यांना हातात पायात बेड्या ठोकून पाठवलं त्याचं. त्यांनी अमेरिकेत घुसून केलं ते बेकायदेशीर होतं पण अमानवीय नव्हतं. ..... अमेरिकेने जे केलं ते कायदेशीर होतं पण अमानवीय होतं. बस एवढंच.
त्याला माझे उत्तर अशा बेकायदेशीर घुसखोरांमध्ये भारतीय लोकांचा आकडा बराच कमी आहे आणि ते अपेक्षितही आहे. जास्त लोक दक्षिण अमेरिका खंडातून आले आहेत. एकदम गोग्गोड, कधीही कोणीही खोट काढू शकणार नाही असे एकदम सफाईदार बोलणार्‍या एकदम सभ्य, सज्जन, सोवळ्या जो बायडनने अध्यक्ष असताना बेकायदेशीरपणे घुसणार्‍यांना लाल गालिचा अंथरला. बहुदा त्या सगळ्यांना अमेरिकेचे नागरिकत्व देऊन स्विंग स्टेट्समध्ये स्थायिक करून यापुढची कित्येक वर्षे डेमॉक्रॅटिक पक्षाचाच अध्यक्ष बनेल अशी व्यवस्था बहुदा आजोबांना करायची होती. त्यामुळे अमेरिकेत मोठ्या प्रमाणावर असंतोष पसरला होता त्याचे प्रतिबिंब मतदानात उमटलेच. तसे अमेरिकेत बेकायदेशीरपणे कित्येक दशकांपासून लोक घुसत आले आहेत पण इतक्या प्रमाणावर लोक घुसणे आणि सरकारचा त्यांना आशीर्वाद असणे ही घटना अभूतपूर्व होती. त्यामुळे अशी कडक भूमिका घेऊन बेकायदेशीर घुसलेल्या लोकांना स्वतःहून जायला भाग पाडायचे अशी बेड्या घालून पाठविण्यामागे भूमिका कशावरून नसेल? निदान मेक्सिको आणि अमेरिका खंडातील इतर घुसखोरांना स्वतःहून परत जाता येणे शक्य आहे. इतक्या लाखांनी लोकांना परत पाठवायचा खर्च भरपूर असणार आणि तो अमेरिकेच्या करदात्यांनी का भरायचा? तेव्हा त्यातील काही तरी घाबरून स्वतःहून निघून जावेत यासाठी तसे कशावरून केले नसेल? असल्या लोकांचा फालतूचा पुळका वाटायची अजिबात गरज नाही. बांगलादेशातून घुसलेल्यांना इतक्या सौजन्याने नाही तर चाबकाचे फटके मारत हाकलून दिले तर त्याला मी तरी अगदी खुल्या दिलाने समर्थन देईन. असले घुसखोर मला माझ्या देशात नको असतील तर ट्रम्पतात्यांनाही अवैधपणे घुसलेले लोक त्यांच्या देशात नको असतील आणि ते स्वतःहून जायला तयार नसतील तर त्यांना बेड्या घालून किंवा अन्य प्रकारे बांधून किंवा चाबकाचे फटके मारत हाकलून द्यावेसे वाटले तर त्यात काही चुकीचे आहे असे मला तरी वाटत नाही. असो.

In reply to by चौथा कोनाडा

हाकलून देताना इतकी मानहानी करायची आणि त्रास द्यायचा की भविष्यात परत अमेरिकेत अकायदेशीर मार्गाने घुसण्याआधी १० वेळा विचार करावा हा उद्देश असू शकतो. भविष्यात घुसू पाहणाऱ्या इतरांनाही भय वाटावे हा सुद्धा उद्देश असावा. फ्रान्समध्ये तुरूंगात इतक्या भीषण व गलिच्छ अवस्थेत डांबून ठेवतात की त्या गुन्हेगाराला शिक्षा, तुरूंगवास इ. विषयी कमालीची भीति व किळस निर्माण व्हावी. तसेच या प्रकरणातही असावे.

In reply to by श्रीगुरुजी

गुड न्युज. भारत सरकारने बेड्या प्रक्रियेबद्दल अमेरिकन सरकारला सुनावले. यापुढे असला प्रकार खपवला जाणार नाही, प्रत्युत्तर दिले जाईल असा इशारा दिला. विरोधी पक्ष जागरूक आणि सत्ताधारी पक्ष लवचीक असल्यास लोकशाहीला मरण नसते.

In reply to by श्रीगुरुजी

मला तर असे वाटले होते की भारताचे नाव खराब केल्याबद्द्ल ह्या लोकांना विमानातुन उतरल्यावर भारत सरकारने १०० कोडे मारावे. पण भारत लोकशाही मार्गाने चालणारा देश असल्यामुळे असली तालीबानी शिक्षा देता येत नाही. ह्या लोकांना आता भारतात कुठल्याही सोयी (कर्जमाफी / घर योजना किंवा तत्सम शासकीय सुवेधा) देउ नये. असेही त्यांना भारतात रहायचे नव्हतेच. दुसरी आनंदाची बातमी म्हणजे आमच्या इथल्या गावातील (सिअ‍ॅटल) एक महा पाताळयंत्री बाई (क्षमा सावंत) हिला भारत सरकारने विसा द्यायला २ वेळा नकार दिला आहे. सिअ‍ॅटल ची काउन्सिल मेंबर असताना ह्या बाई ने वेळ व जागा मिळेल तिथे भारता विरुध्द गरळ ओकली होती. आता ती मला आईला भेटायला जाउ देत नाही म्हणुन आकांडतांडव करते आहे.

In reply to by सुक्या

"भारताचे नाव खराब केल्याबद्द्ल ह्या लोकांना विमानातुन उतरल्यावर भारत सरकारने १०० कोडे मारावे" गौतम अदानीवर अमेरिकेत वॉरंट आहे.भारतात लोकांना लाच दिल्याबद्दल. भारताचे नाव खराब केल्याबद्दल सरकारने किती कोडे मारायचे अदानीला? एफ बी आय ने सगळे पुरावे कोर्टात सादर केले होते. न्यु यॉर्क मधील ग्रॅन्ड ज्युरीनी खात्री केली आणी मग वॉरंट काढले.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

गौतम अदानीवर अमेरिकेत वॉरंट आहे.भारतात लोकांना लाच दिल्याबद्दल. भारताचे नाव खराब केल्याबद्दल सरकारने किती कोडे मारायचे अदानीला?
=)) चांगला होता. भारी. -दिलीप बिरुटे

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

भारतात लोकांना लाच दिल्याबद्दल. भारताचे नाव खराब केल्याबद्दल सरकारने किती कोडे मारायचे अदानीला? मस्त माई. जबरजस्त होता! :)

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

माईसाहेब, वॉरंट आहे हो. गुन्हा सिद्ध झालेला नाहिये. गुन्हा सिद्ध झाला की मारा की कोडे. हाय काय आन नाय काय. बाकी ते हिन्डन्बर्ग अदानी च्या नादाला लागला आनी गेला १२ च्या भावात. असो. बाकी नेहेमीचे होयबा अपेक्षित होते तसे आले .. मजा वाटली ...

गौतम अदानीवर अमेरिकेत वॉरंट आहे.भारतात लोकांना लाच दिल्याबद्दल. भारताचे नाव खराब केल्याबद्दल सरकारने किती कोडे मारायचे अदानीला? एफ बी आय ने सगळे पुरावे कोर्टात सादर केले होते. न्यु यॉर्क मधील ग्रॅन्ड ज्युरीनी खात्री केली आणी मग वॉरंट काढले. काय हे माई. इतक्या शतकांचे तुम्ही आणि तुमचे 'हे' साक्षीदार. तुम्ही शिवशाही, पेशवाई, ब्रिटिश सत्ता सुद्धा अनुभवलेली. तरीही असं खुळचटासारखं लिहिता. नुसतं वॉरंटघ काढलंय ना. काही सिद्ध झालंय का? ते पुरावे अदानीला दाखवलेत का? पण लगेच अदानीला जोडे मारायचे? मग रिबेका मार्कला तर अमेरिकेने वीजेच्या खुर्चीत बसवायला हवं होतं. आता निवृत्त व्हा माई. तुमचं विश्लेषण चुकायला लागलंय.

In reply to by श्रीगुरुजी

नुसते वॉरंट? ते १६ न्यायाधीशांनी(ग्रॅन्ड ज्युरी) नी काढले आहे. एफ बी आय ने दिलेले पुरावे विश्वासार्ह वाटल्याने ते वॉरंट काढले आहे. आता सत्ताबदल झाला आहे आणि ट्रम्प ह्यांच्या विश्वासातले कश्यप पटेल हे एफ बी आयचे मुख्य झाले आहेत. अदानींना ह्यातुन बाहेर काढण्यासाठी ट्रम्प भारताला काय काय करायला लावतात ते बघायचे.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

वॉरंट कोणी का काढेना, सिद्ध झालंय का काही? जे काय पुरावे आहेत ते अदानीला दाखवलेत का? तसं भारताने सुद्धा ललित मोदी, नीरव मोदी, मल्या, मेहुल चोक्सी, क्वात्रोकीमामा अश्या अनेका़च्या विरोधात वॉरंट काढलंय. मग ते ज्या देशात राजरोसपणे राहताहेत त्या देशांनी त्यांना कोडे मारले पाहिजे का?

दिल्लित 'आप'चा पराभव. केजरीवाल्/सत्येंद्र जैन पराभूत. योगेंद्र यादव्,अण्णा हजारे ह्यांच्या मुलाखती पाहिल्या. दोघांच्याही चेहर्यावरचा आनंद लपून राहत नव्ह्ता.!

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

कुमार विश्वासचा पण आनंद लपत नव्हता, राज्यसभा दिली नाही. आणि दिल्ली सरकारात महत्वाचं पद दिलं नव्हतं म्हणून हे वनवासात होते. हींदी कविता आणि प्रवचन चांगलं बस्तान बसवलंय त्यांनी. अपने अपने अपने राम. छान मांडणी असते. श्री अण्णा हजारे आता थेट पुढील निवडणूकीत दिसतील आता. :) -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

हींदी कविता आणि प्रवचन चांगलं बस्तान बसवलंय त्यांनी.
कुमार परिपक्व माणुस झालाय ! राजकारण म्हणजे वराहांची राडाक्रिडा हे ओळखुन वेगळं डोमेन शोधलंय !

संभल : तख्तियां लहराकर पहुंचे हिंदू, कहा- हमें अल्पसंख्यक का दर्जा दो... https://www.amritvichar.com/article/520907/hindus-arrived-after-waving-… -------- "संभल" बद्दल जितकी माहिती गोळा करावी,तितकी कमीच आणि भविष्यात देखील "संभल" बद्दल बरीच माहिती येण्याची शक्यता आहे. ------

भारत-बांग्लादेश बॉर्डर पर BSF और घुसपैठियों में झड़प:बंगाल के दिनाजपुर में हुए हमले में एक जवान घायल; हथियार लेकर घुसे थे, एक को पकड़ा https://www.bhaskar.com/national/news/india-bangladesh-border-infiltrat… --------

कोणत्याही देशाचे पोलीस गुन्हेगारांना बेड्या का घालतात ? याची वास्तविक कारणे काय आहेत ? -- उदा. गुन्हेगाराने पळून जाऊ नये, स्वतःलाच जखमी करून घेऊ नये, पोलिसांची हत्यारे हिसकावून घेऊन गोळीबार करणे, दगडफेक करणे, मारामारी करणे वगैरे प्रकार करू नयेत म्हणून बेड्या घालत असावेत. अमेरिकेत पिस्तुले, बंदुका वगैरे सहज विकत घेता येत असल्याने अशी खबरदारी घेणे आवश्यकच आहे. --- जाणकारांनी यावर प्रकाश टाकावा.

In reply to by चित्रगुप्त

अमेरिकेत पिस्तुले, बंदुका वगैरे सहज विकत घेता येत असल्याने अशी खबरदारी घेणे आवश्यकच आहे.
त्या भारतियांना प्रवासाआधी १०/१२ दिवस जेलमध्ये ठेवण्यात आले होते.विमानात चढ्ण्याआधी त्यांची झडती घेतलेली असणारच.त्या सर्व १०४ प्रवाशांसाठी विमानात एकच टॉयलेट होते. मोदी आणी ट्रम्प मित्र आहेत असे अनेक्जण म्हणतात. त्यामुळे ट्रम्प्/अमेरिका जे काही निर्णय घेइल त्याचे आंधळे समर्थन करण्याचे प्रयत्न भारतात चालु होते/आहेत. मात्र विरोधी पक्षांनी आणी अनेकानी आवा़ज उठवल्यावर सरकारकडुन शेवटी सौम्य निषेध झाला. हे बरे झाले. आमचे रामदासबुवा आठवलेही ह्यावर बोलते झाले हेही नसे थोडके- Wrong to send undocumented immigrants in shackles: Union minister Athawale https://www.deccanherald.com/india/wrong-to-send-undocumented-immigrant… भारतियांना मिळालेली ही वागणूक कोणाला अमानवी/अपमानास्पद वाटत नसेल तर कठिण आहे.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

ते फक्त भारतीयच नव्हते तर गुन्हेगार भारतीय होते. अजून वाईट वागणूक मिळायला पाहिजे होती. अतिशय शांत डोक्याने गुन्हे करणारे गुन्हेगार होते. अमेरिकेत जाताना दिवसेंदिवस उपाशी राहून, मगरी असलेल्या पाण्यातून, हिंस प्राणी असलेल्या जंगलातून, जीवघेण्या थंडीतून आणि वाटेत लागणाऱ्या देशांचे कायदे मोडून गेलेल्या लोकांना ४० बेड्या घालून प्रवास म्हणजे काहीच नाही. याची जबाबदारी म्हणून अमेरिकेने झालेला सगळा खर्च भारताकडून वसूल केला पाहिजे. बेड्या नसत्या घातल्या तर कदाचित वैमनिकावराही hlla केला असता त्या लोकांनी.

In reply to by रात्रीचे चांदणे

पण मी काय म्हणतो, मोदींसारखा हिरा पंतप्रधान भारताला मिळाला असताना नी भारतात अमृतकाळ सुरू असताना ती लोक जीवावर उदार होऊन अमेरिकेत गेलीच का? :)

In reply to by रात्रीचे चांदणे

ते फक्त भारतीयच नव्हते तर गुन्हेगार भारतीय होते. आणि याची जबाबदारी म्हणून अमेरिकेने झालेला सगळा खर्च भारताकडून वसूल केला पाहिजे. किती हा विरोधाभास ? भारतीय ( गुन्हेगार असले तरी ) आहेत म्हणून बेड्या घालून पाठवू नये असे सरकारने अमेरिकेला सांगितले ह्यात काय चूक आहे. चुकीचे असले तरी भारत सरकारने का खर्च सोसावा ?

In reply to by आग्या१९९०

जबाबदारी म्हणून. आणि गुन्हेगारांना बेड्याच घालायला पाहिजे. जे भारतात पाठवले गेलेत त्यांच्यावर भारतीय कायद्याप्रमाणे गुन्हे नोंदवायला पाहिजे आणि लवकरात लवकर शिक्षा होईल ह्याची काळजी घ्यायला पाहिजे, नाहीतर आपल्याला भारतात सहानुभूती मिळत आहेत हे लक्षात आल तर अजून गुन्हे करायला मागे पुढे पाहणार नाहीत. अखिलेश यादव ने तर सरकार ने भरपाई करावी म्हणून मागणी केली आहे.

In reply to by रात्रीचे चांदणे

भारतात संधी नाहीत म्हणून ते अमेरिकेत गैरमार्गाने गेले ना? संधी नसण्याला सरकार जबाबदार नाही का?

In reply to by अमरेंद्र बाहुबली

नक्कीच आहे त्यासाठी लोकशाही प्रकियेत भाग घेऊन सरकार बदलता येऊ शकत. जस दिल्लीच्या लोकांनी कालच केल. किंवा जायचच असेल तर आपले स्किल्स वाढवून नियमाप्रमाणे जायला हव.

In reply to by रात्रीचे चांदणे

जायचच असेल तर आपले स्किल्स वाढवून नियमाप्रमाणे जायला हव. का? जास्त स्कीलला भारतात संधी नाही का ?

In reply to by आग्या१९९०

पंजाब/गुजरातमधुन परदेशात जाणार्यांची संख्या सर्वात जास्त आहे.आताच्या भाषेत म्हणतात तो FOMO(Fear of missing out) प्रकार आहे. माझे भाउ न्युयॉर्कला आहेत, मित्र सिडनीला/लंडनला आहेत.. मग मलाही वाट्टेल ते करुन बाहेर गेले पाहिजे ही मानसिकता तिकडे आहे. "माझा मुलगा भारतात रेल्वेत ईन्जिनियर आहे ह्यापेक्षा माझा मुलगा न्युयॉर्कला टॅक्सी चालवतो हे सांगण्यात तिकडे लोकांना अभिमान वाटतो. ९०/२०००च्या दशकात एच-वन बी व्हिसाचे सर्वात जास्त आकर्षण आंध्र/तामिळनाडुत होते. बायोडेटात वाट्टेल ते फेरफार करायचे, खोट्या डिग्र्या/कोर्सेसची सर्टिफिकेट्स जोडायची आणि पैसे देउन व्हिसा मिळवायचा. कायद्याच्या चौकटीत राहुन ,कसा फ्रॉड करायचा ते ह्यांच्याकडुन शिकावे. त्यांच्या सुदैवाने हे लोक तिकडे ग्रीन कार्ड/नागरिकत्व मिळाल्यावर स्थिरावले.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

पंजाब/गुजरातमधुन परदेशात जाणार्यांची संख्या सर्वात जास्त आहे. पंजाबच ठिकाय पण गुजरातमधूनही? गुजरात मध्ये भाजपची सत्ता कितीतरी वर्षापासून आहे, खुद्द मोदी कितीतरी वर्षे मुख्यमंत्री होते, महाराष्ट्रातून अनेक प्रकल्प नि सरकारी कार्यालये गुजरातला हलवली तरीही गुजरातची ही अवस्था?

In reply to by अमरेंद्र बाहुबली

मनोरंजक प्रतिसाद.... तुम्ही खरेच काही अभ्यास न करता लिहायचा पण केला तर का? थोडी तरी परिपक्वता दाखवा की.... किती वर्षे इतरांच्या कडून तोंडघशी पडणार? चार ठिकाणी फिरा. स्वतः माहिती घ्या.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

राखीव जागा व वाढता जातीद्वेष यामुळे सुशिक्षित सवर्ण बाहेर जाण्याची संधी शोधतात. गुजराती, पंजाबी इ. मुळातच स्थलांतर व स्वतंत्र व्यवसाय मनोवृत्तीचे आहेत. त्यासाठी दुसऱ्या प्रदेशात जाऊन कितीही कष्ट, साहस करण्याची त्यांची तयारी आहे. भारतात किराणा दुकान कितीही जोरात चालत असले तरी अमेरिकेत तसेच दुकान डॉलर्समध्ये उत्पन्न देते याचे प्रचंड आकर्षण त्यांना असते. भारतात आर्थिक स्थिती सुधारली असली, नवीन तंत्रज्ञान अनेक स्वरूपात उपलब्ध असले तरी कोणताही राज्यकर्ता भारतातील प्रचंड गर्दी, अस्वच्छता, जातीयवाद, राखीव जागा, अत्यंत शिस्तहीन समाज इ. बदलू शकत नाही. त्यामुळे परदेशाचे आकर्षण कमी होणे अशक्य आहे.