भगवान श्रीराम मांसाहारी होते काय ?

परिकथेतील राजकुमार's picture
परिकथेतील राजकुमार in काथ्याकूट
25 Dec 2008 - 2:09 pm
गाभा: 

भगवान श्रीराम हे मांसाहारी होते काय ?
बरेच दिवस माझे आमच्या टोळक्यात ह्या विषयावरुन वाद विवाद सुरु आहेत. रामायणात तसा उल्लेख आहे का नाही ह्यावरुनही वाद सुरु आहेत. ज्यांचे म्हणणे राम मांसाहारी होता असे आहे ते पुराव्या दाखल सुंदर कांडातला एक श्लोक पुढे करतात , जो हनुमानानी सिता मातेला तिच्या अपहरणानंतर रामाची झालेली अवस्था वर्णन करताना वपरला आहे , " ना मांसम राघवा भुंक्ते , ना चैव मधु सेवते, वन्यम सुविहितम नित्यम भक्तमस्नाती पंचमाम."
गुगलची मदत घेतली असता अजुनच रंजक माहिती हाती आली ,
The verse that comes in question in this regard in the Valmiki Ramayana, Sundarakanda, Skanda 36, Sloka 41, says: “Na mamsam Raghava bhunkte, na chaiva madhu sevate, Vanyam suvihitam nityam bhaktamsnati panchamam.”

The literal translation of this verse is: “Sri Rama does not take meat or honey. He partakes everyday of wild fruits and boiled (wild) rice fully sanctioned (for an ascetic) in the evening.”

Faulty English translations have put it as something like this: Hanuman to Sita, “When you were away, Sri Rama did not even take deer meat.” This incorrectly implies that Rama normally may have ate meat but did not do so while Sita was away from Him.

(संदर्भ येथे पहावा )
आपल्या येथे संन्स्कॄतचे अनेक जाणकार आहेत, कोणी मला मदत करुन ह्या श्लोकाचा नक्की अर्थ सांगेल काय ? तसेच वल्मीकी रामायणा मध्ये कुठे राम शाकाहारी असल्याचा उल्लेख आहे काय ?

प्रतिक्रिया

अवलिया's picture

25 Dec 2008 - 2:11 pm | अवलिया

हम्म.
पुन्हा शाकाहारी मांसाहारी जुंपणार...

चालु द्या.

(मिळेल ते खाणारा) अवलिया

अवलियाची अनुदिनी

shweta's picture

25 Dec 2008 - 2:15 pm | shweta

हो मांसाहारीच असणार.
इतकी वर्षे वनवासात काय शाकाहारी जेवण करुन जगणं शक्य आहे का ?

सुनील's picture

25 Dec 2008 - 2:21 pm | सुनील

श्रीराम हे क्षत्रिय होते. क्षत्रियांना मांसभक्षण निषिद्ध नव्हते. त्यातून असेही मानण्यास जागा आहे की, वल्कले नेसून, १४ वर्षांचा वनवास भोगण्यास आलेल्या सीतेला अचानक हरणाच्या कातडीची चोळी नेसण्याची इच्छा का व्हावी? बहुधा ती मृगहत्या भोजनासाठीच झाली असण्याची शक्यता आहे!

असो, राम मांसाहारी असो वा नसो, त्यावरून तुम्हाला नक्की काय सिद्ध करायचे आहे?

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

विसोबा खेचर's picture

25 Dec 2008 - 2:26 pm | विसोबा खेचर

बहुधा ती मृगहत्या भोजनासाठीच झाली असण्याची शक्यता आहे!

सहमत आहे! त्या दिवशी बहुधा बुधवार किंवा रविवार असावा त्यामुळे शितामाईला हरणाचं कालवण करावंसं वाटलं असणार! :)

तात्या.

झुमाक्ष's picture

2 Jan 2009 - 10:06 pm | झुमाक्ष (not verified)

त्या दिवशी बहुधा बुधवार किंवा रविवार असावा त्यामुळे शितामाईला हरणाचं कालवण करावंसं वाटलं असणार!

अहो पण त्या हरणाचं कालवण करण्यापायी शितामाईचंच हरण झालं त्याचं काय?

- झुरळ मारणारा क्षत्रिय.

परिकथेतील राजकुमार's picture

25 Dec 2008 - 2:28 pm | परिकथेतील राजकुमार

>>असो, राम मांसाहारी असो वा नसो, त्यावरून तुम्हाला नक्की काय सिद्ध करायचे आहे?
== सिद्ध काहिच करायचे नाहिये, मला फक्त पुरावा म्हणुन देण्यात येणार्‍या ह्या श्लोकाचा खरा योग्य अर्थ हवा आहे आणी जमल्यास त्याकाळच्या रामाच्या आहाराविषयी काहि उल्लेख रामायणात आहे का ह्याचे मार्गदर्शन हवे आहे.
|!¤*'~` प्रसाद `~'*¤!|
"समर्थाचिया सेवका वक्र पाहे । असा सर्व भूमंडळी कोण आहे ।।"
आमचे राज्य

अवलिया's picture

25 Dec 2008 - 2:31 pm | अवलिया

राम सगळ्या प्रकारचे आहार करत असे. अर्थातच पोटाला पचेल, ओठाला रुचेल असेच. श्रावण वगैरे काही पाळत नसत...

-- अवलिया
अवलियाची अनुदिनी

सुनील's picture

25 Dec 2008 - 2:46 pm | सुनील

मला फक्त पुरावा म्हणुन देण्यात येणार्‍या ह्या श्लोकाचा खरा योग्य अर्थ हवा आहे
तो मिपावरील संस्कृतज्ञ देतीलच!

जमल्यास त्याकाळच्या रामाच्या आहाराविषयी काहि उल्लेख रामायणात आहे का ह्याचे मार्गदर्शन हवे आहे.
राम बोरे खात असल्याचा उल्लेख रामायणात आहे, असे वाटते.

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

मदनबाण's picture

25 Dec 2008 - 3:00 pm | मदनबाण

राम बोरे खात असल्याचा उल्लेख रामायणात आहे, असे वाटते.
टेस्टेड ऍड प्रोव्हाडेड बाय शबरी...
(चण्या मण्या बोर आवडीने खाणारा)
मदनबाण.....

"Its God's Responsibility To Forgive The Terrorist Organizations
It's Our Responsibility To Arrange The Meeting Between Them & God."

- Indian Armed Forces -

पुष्कर's picture

3 Jan 2009 - 8:22 pm | पुष्कर

शबरी हे त्याकाळचे "Quality assurance and inspection department" होते असं म्हणायला वाव आहे तर मग!

शाल्मलि's picture

4 Jan 2009 - 8:58 pm | शाल्मलि

आवडल बुवा तुमच ; मग कधी arrange kartay meeting?

हर्षद आनंदी's picture

25 Dec 2008 - 3:32 pm | हर्षद आनंदी

>> सिद्ध काहिच करायचे नाहिये, मला फक्त पुरावा म्हणुन देण्यात येणार्‍या ह्या श्लोकाचा खरा योग्य अर्थ हवा आहे आणी जमल्यास त्याकाळच्या रामाच्या आहाराविषयी काहि उल्लेख रामायणात आहे का ह्याचे मार्गदर्शन हवे आहे.

नसता खटाटोप कशाला? श्लोकाचा अर्थ काही असला तरी श्रध्देत फरक पडणार आहे का?

रामाचा आहार काय होता यापेक्षा रामाचा आचार-विचार जाणुन घ्यायची गरज जास्त आहे.
रामायणातुन आहार शोधण्या पलीकडेही रामायणात बरेच काही शोधण्यासारखे आहे. रामाने रावणाचा (अधर्माचा) नाश केला, हे जाणुन घेता आले तरी पुरे आहे.

तरी... त्या काळी, आत्ता : यज्ञात बळी दिल्यानंतर, प्रसाद म्हणुन मांस सेवन केले जाते
शाकाहारी प्राणी (ससा, हरीण, काळवीट व.) आणि अनेक पक्षी यांचे मांस औषधी म्हणुन वापरण्यात येते.
आयुर्वेदात मांसाहार हा त्याज्य नाही, किंबहुना योग्य प्रकारे अग्नि-संस्कार करून केलेला मांसाहार श्रेष्ठ मानण्यात आलेला आहे.

या वरून शंका निरसन झाले असेल असे वाटते......

परिकथेतील राजकुमार's picture

25 Dec 2008 - 4:07 pm | परिकथेतील राजकुमार

>>नसता खटाटोप कशाला? श्लोकाचा अर्थ काही असला तरी श्रध्देत फरक पडणार आहे का?
== का करु नये ? आपल्या पुराणात, वेदात नक्की काय दिले आहे आपल्याला माहिती नको ? रामाविषयी आपल्याला पुर्ण माहिती नको ? कोणीतरी अतिशहाणा काहीतरी वाचुन येउन , रामायणातला दाखला म्हणुन काहितरी सांगणार आणी आपण आ वासुन ते ऐकत बसायचे फक्त ? आपल्या शंकेचे समाधान नको करुन घ्यायला ? हान आता रामायण वाचणे किंवा त्यावर चर्चा करणे ह्याला 'अ नाईट इन कॉलसेंटर' किंवा 'व्हाईट टायगर' ह्या वरील चर्चे सारखे ग्लॅमर नसेल कदाचित म्हणुन ते फार चुकिचे वगैरे आहे किंवा हा व्यर्थ खटाटोप आहे असे मला वाटत नाही. नुसती श्रद्धा काय कामाची ? जेंव्हा त्या श्रद्धास्थानाविषयी काही चर्चा होते किंवा काहि वाद विवाद होतात तेंव्हा आपल्याला सत्यापर्यंत जाणे गरजेचे आहे असे मला वाटते. उद्या पाश्च्यात जगातील लोकांनी येउन ह्या श्लोकाचे अर्थ काढले की आपण अगदी कौतुकानी ते ऐकणार त्यावरील पुस्तके विकत घेउन वाचणार, त्या पेक्षा आपल्या माणसांकडून झालेले शंका निरसन मला जास्ती महत्वाचे वाटते ! अर्थात हे माझे वैयक्तीक मत आहे, ते ग्राह्य धरलेच जावे हा आग्रह नाही .

|!¤*'~` प्रसाद `~'*¤!|
"समर्थाचिया सेवका वक्र पाहे । असा सर्व भूमंडळी कोण आहे ।।"
आमचे राज्य

संताजी धनाजी's picture

25 Dec 2008 - 9:18 pm | संताजी धनाजी

याकदोम बरोबर. हेच म्हणतो :)
ज्यांना उत्सुकता आहे त्यांनी पु ना ओकांचे "वर्ल्ड वेदीक हेरीटेज" हे पुस्तक वाचावे. त्या पुस्तकाला ग्रंथही म्हणु शकता. सध्याच्या ज्याला काही आपण इतिहास म्हणतो त्याला दणदणीत टोले दिले आहेत त्यांनी, अर्थात पुरावे देवुन.
मी तर त्यांचा पंखा झालो आहे.
- संताजी धनाजी

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

25 Dec 2008 - 6:13 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

नसता खटाटोप कशाला? श्लोकाचा अर्थ काही असला तरी श्रध्देत फरक पडणार आहे का?
रामाचा आहार काय होता यापेक्षा रामाचा आचार-विचार जाणुन घ्यायची गरज जास्त आहे.

मला वाटतं, इथे दोन वेगवेगळ्या विचारांत गोंधळ आहे. आपला आजचा आहार काय असावा यासाठी रामाचा आहार बघण्याची गरज नाही. जे काही उपलब्ध आहे, जे आपल्याला पचतं, रुचतं, परवडतं आणि आपल्या वातावरणाशी सुसंगत आहे ते खावं, आणि या पलिकडे कोणत्याही आहारासाठी काहीही स्पष्टीकरण देण्याचं कारण नाही. उन्हाळा मी म्हणत असताना गुळाच्या पोळ्या खाण वाईट आणि पचनशक्ती कमी झालेली असताना चणा डाळ!

रामाचा आचार-विचार जरूर जाणून घ्यावा, पण उलट विचार करायचा असेल तर चांगलंच वागायचं असेल तर राम जाणून घ्यायची काय गरज? अनेक आदीवासी पाड्यांवर मी राम-रावण या नावांपुढे माहित नसलेले अतिशय सज्जन 'पुढारी' पाहिलेले आहेत.

इतिहास असो वा विज्ञान, भाषा असोत वा मानसशास्त्र, माहित करुन घ्यायची काय गरज हा प्रश्नच चुकीचा आहे. माहिती असण्यात काहीही गैर नाही, माहिती मिळवण्यासाठी लोकांना विचारणं, वाचन करणं, विचार करणं हे उपायही चुकीचे नाहीत. पण अनेकदा चांगल्या चर्चाही चुकीच्या मार्गाने जातात, पण म्हणून माहिती असण्याची गरजच काय हा विचार अतिशय घातक आहे.

(विचारांती शाकाहारी) अदिती

अवलिया's picture

25 Dec 2008 - 6:51 pm | अवलिया

रामायणातुन आहार शोधण्या पलीकडेही रामायणात बरेच काही शोधण्यासारखे आहे. रामाने रावणाचा (अधर्माचा) नाश केला, हे जाणुन घेता आले तरी पुरे आहे.

आपण एकीकडे रामायणात बरेच काही शोधण्यासारखे आहे असे म्हणुन पुढील वाक्यातच राम रावण युद्धाला धर्मयुद्ध घोषित करुन त्याला केवळ धर्मात बंदिस्त करत आहात. हे चुकीचे असावे असे मला वाटते.
रामायण हा राम नावाच्या राजपुत्राच्या आयुष्याचा इतिहास आहे.
बाकी रामाचा रामा पासुन भगवान श्रीराम असा प्रवास होतांना अनेक गोष्टी त्यात घुसल्या. राम रावण युद्ध तसेच सीताहरण नंतर रामाचे आक्रमण हा तत्कालीन भारतीय राजकारणाचा हिस्सा आहे. धर्म अधर्म काही नाही. (हे माझे मत आहे)

-- अवलिया
अवलियाची अनुदिनी

संताजी धनाजी's picture

25 Dec 2008 - 9:24 pm | संताजी धनाजी

रामायण हा राम नावाच्या राजपुत्राच्या आयुष्याचा इतिहास आहे.
अतिशय बरोबर :)
राम हा एक योद्धा होता पण आपण त्याला देव बनवले. तो जर देव असला असता तर सीतेला मिळवायला त्याला इतके उपद्व्याप करायला लागले नसते.
हां, आता तो विष्णुचा अवतार होता की नाही हा भाग अलहिदा.
- संताजी धनाजी

टग्या's picture

25 Dec 2008 - 7:12 pm | टग्या (not verified)

त्यातून असेही मानण्यास जागा आहे की, वल्कले नेसून, १४ वर्षांचा वनवास भोगण्यास आलेल्या सीतेला अचानक हरणाच्या कातडीची चोळी नेसण्याची इच्छा का व्हावी?

यातून तार्किकदृष्ट्या

बहुधा ती मृगहत्या भोजनासाठीच झाली असण्याची शक्यता आहे!

हा निष्कर्ष काढता येतोच की नाही याची कल्पना नाही, परंतु सीता हरणाच्या मागे लागल्यामुळेच तिचे हरण झाले असे मानण्यास मात्र निश्चित जागा आहे.

विसुनाना's picture

25 Dec 2008 - 2:26 pm | विसुनाना

होतेच. श्रीराम क्षत्रिय होते. त्यांच्या मांसाहाराचे आताच्या काळातही विशेष वाटू नये.
आणि वेदकालीन ब्राह्मणही मांसाहारी होते.
या 'शाक-मांस आहार' आणि 'पेय-अपेय पान' विषयांवरील चर्चा आंतरजालावर पूर्वी अनेकदा झाली आहे.
कृपया शोध घ्यावा.

विसोबा खेचर's picture

25 Dec 2008 - 2:28 pm | विसोबा खेचर

आणि वेदकालीन ब्राह्मणही मांसाहारी होते.

सहमत आहे!

आपला,
(कपुराप्रेमी वेदकालीन ब्राह्मण!) तात्या :)

विनायक प्रभू's picture

25 Dec 2008 - 3:35 pm | विनायक प्रभू

म्या पन बामन हाय. मांसाहार करनारा, श्री रामाना मानणारा.

निखिलराव's picture

25 Dec 2008 - 4:30 pm | निखिलराव

म्या पन क्षत्रिय हाय. मांसाहार करनारा, श्री रामांना मानणारा.

निखिल सुर्यवंशी

१४ वर्ष जंगलात राहुन फक्त शाकाहारी राहता येणे खुप कठिण आहे. तसेच ते क्षत्रिय असले मुळे मांसाहार त्याना चालत होता.फक्त कातड्यासाठी हरण मारणे शक्य नाही.त्यामुळे हरण त्यानी मांसासाठी देखिल मारले असण्याची शक्यता आहे.
(मिश्राहारी)वेताळ

प्रियाली's picture

25 Dec 2008 - 6:35 pm | प्रियाली

मांसाहारी होते काय? तर हो नुसते मांसाहारी नव्हते तर ते आणि सीतामाई (अ)पेयपानही करून होते. रामायण काळातील ब्राह्मण मांसाहारी होतेच आणि क्षत्रिय तर होतेच होते. एवढेच नव्हे तर सीतेने गंगेला १०० घट दारू देईन असा नवसही बोलला होता. ;) (नेमके आठवत नाही पण अयोध्या कांडाचा शेवट किंवा अरण्यकांडाची सुरुवात येथे हे प्रकरण आहे. इच्छुकांनी तपासून पहावे.)

आता कोणाला पुढील प्रश्न पडला तर त्याचेही उत्तर देते.

भगवान श्रीकृष्ण मांसाहारी होते आणि दारू प्यायचे का? तर हो तेही हे सर्व करायचे.

कालच रात्री महाभारतातील खांडव-दाह पर्व वाचत होते. त्यातील काही भाग असा -

कृष्ण आणि अर्जुन क्रिडेसाठी यमुनातिरी गेले असता, सोबत सर्व राजस्त्रियांना घेऊन गेले. तिथे त्यांनी मनसोक्त क्रिडा केली. द्रौपदी आणि सुभद्रा पिउन इतक्या तर्र झाल्या होत्या की आपली उंची वस्त्रे आणि आभूषणे त्यांनी इतरांना वाटून टाकण्यास सुरुवात केली. दारूच्या नशेतील काही स्त्रिया खेळत होत्या, गात होत्या, नाचत होत्या अगदी भांडाभांडीही सुरु झाली होती. कृष्ण आणि अर्जुन या सर्व क्रिडांची गंमत लुटत होते. पांडवांच्या वैभवाची साक्ष देता येईल असे वातावरण तेथे होते. यानंतर त्यांनी काही वेळ एकांतात घालवण्याचे ठरवले आणि ते उठून एका निर्जन स्थळी गेले. तेथे त्यांनी आपल्या भूतकाळाच्या आणि शौर्याच्या खूप गप्पा मारल्या.

अचानक एक तेजपुंज ब्राह्मण त्यांच्यासमोर उभा राहीला. त्याची झळाळती कांती आणि दाढी उगवत्या सूर्याची आठवण करून देत होती. त्याने या दोघांकडे त्याला तृप्त करण्याची अभिलाषा प्रकट केली. अर्जुन आणि श्रीकृष्णाने अधिक विचारता त्याने सांगितले की तो साक्षात अग्नी असून त्याची भूक प्रचंड आहे आणि ती एखाद्या प्राण्याने मिटण्यासारखी नसून संपूर्ण खांडववनच त्याची क्षुधाशांती करू शकेल.

हे शब्दशः भाषांतर नाही, एक थोडक्यातला अनुवाद आहे.

अवलिया's picture

25 Dec 2008 - 6:41 pm | अवलिया

प्रियाली ताई

वरती आधी लिहायचे ना... ही भयकथा नाही.
लोक समजायचे की ही प्रियाली ताईंची नवी भयकथा आहे..जुन्या पात्रांच्या नावाने. ;)

बाकी माहितीशी पुर्णपणे सहमत

-- अवलिया
अवलियाची अनुदिनी

पिवळा डांबिस's picture

25 Dec 2008 - 11:49 pm | पिवळा डांबिस

वरती आधी लिहायचे ना... ही भयकथा नाही.
नाना, अहो प्रियालीने जे लिहिलंय ते म्हणजे रामायण महाभारतातल्या पात्रांवर ठार विश्वास असणार्‍यांसाठी भयकथाच आहे हो!!!:)
प्रियाली, आप लगे रहो....
:)

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

25 Dec 2008 - 6:46 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

असं प्रियालीताईचं नाव पाहून नेहेमीप्रमाणे म्हणणार होते. पण ही चर्चा काव्याबद्दल सुरू आहे असं लक्षात आलं!

विकास's picture

25 Dec 2008 - 6:54 pm | विकास

मांसाहारी होते काय? तर हो नुसते मांसाहारी नव्हते तर ते आणि सीतामाई (अ)पेयपानही करून होते. रामायण काळातील ब्राह्मण मांसाहारी होतेच आणि क्षत्रिय तर होतेच होते. एवढेच नव्हे तर सीतेने गंगेला १०० घट दारू देईन असा नवसही बोलला होता. ;)

ह्याचा संदर्भ मंगळ रीटर्नड प.वि.वर्तकांच्या "वास्तव रामायणा"त आहे. त्यांनी वाल्मिकी रामायणातील संदर्भ श्लोकपण दिले आहेत. आत्ता, हा चर्चा विषय पाहीला आणि त्याचीच आठवण झाली होती! पुस्तक शोधून हवा असल्यास संदर्भ देईन.

बाकी रामच कशाला, रामकृष्ण परमहंस/स्वामी विवेकानंद पण मासे खायचे (बंगालमधे मांसे हे स्वतःला शाकाहारी समजणारेपण खातात असे कधीतरी ऐकले आहे).

प्रियाली's picture

25 Dec 2008 - 7:04 pm | प्रियाली

पण मूळ रामायणात मी संदर्भ शोधून खात्री करून घेतलेली आहे.

विकास's picture

25 Dec 2008 - 7:21 pm | विकास

पण मूळ रामायणात मी संदर्भ शोधून खात्री करून घेतलेली आहे.

मी पण त्यांनी लिहीलेले या बाबतीत "अवास्तव रामायण" नाही याची खात्री करून घेतली होती म्हणूनच "त्यांनी वाल्मिकी रामायणातील संदर्भ श्लोकपण दिले आहेत." असे म्हणले. फक्त रामायणाचे खंड भारतातील घरी आहेत येथे नाहीत त्यामुळे तो श्लोक जालावर शोधण्याची तसदी न घेता मला करायचा असेल तर वास्तव रामायण हा एकच दुवा राहतो असे म्हणले होते. :-)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

25 Dec 2008 - 6:58 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सीतामाई (अ)पेयपानही करून होते.

आपल्या प्रतिसाबद्दल शंका नाही. पण सितामाई अपेयपान करत असतील का ?
सिता चरित्रावरुन कधी असा विचार वाचला नाही. तुर्तास प्रतिसाद राखून ठेवतो.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अवलिया's picture

25 Dec 2008 - 7:02 pm | अवलिया

सिता चरित्रावरुन कधी असा विचार वाचला नाही. तुर्तास प्रतिसाद राखून ठेवतो.

सीता चरित्र कोणी लिहिलेले वाचले?
मुळ वाल्मिकी रामायण वाचणे (ते ही संस्कृत मधले ;) ) हेच शंकांचे निरसन करण्यासाठी योग्य असावे. नाही का?
उगाच कोणी काही तरी स्वतःच्या धार्मिक धारणेने प्रेरित लिहिलेले वाचायचे आणि आपला ग्रह तसाच करुन घ्यायचा हे ठीक नाही.

-- अवलिया
अवलियाची अनुदिनी

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

25 Dec 2008 - 7:08 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

वाल्मिकी रामायणातील संस्कृत जाणकार यांचे काय मत आहे. ते तपासून पाहु !
कोणाचा धार्मिक प्रेरणा काय आहे, त्याच्याशी आम्हाला काय घेणं देणं ?
जे असेल ते अभ्यासायचे, नाही पटले तर, द्यायचे सोडून !

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अवलिया's picture

25 Dec 2008 - 7:23 pm | अवलिया

वाल्मिकी रामायणातील संस्कृत जाणकार यांचे काय मत आहे. ते तपासून पाहु !

तपासनीस म्हणुन माझे नाव सुचवतो :)

-- अवलिया
अवलियाची अनुदिनी

प्रियाली's picture

25 Dec 2008 - 7:05 pm | प्रियाली

वाल्मिकी रामायण वाचलेले आहे. महाभारताचा अनुवाद वाचते आणि त्यावरच विश्वास ठेवते. :) इतर संदर्भांवर विश्वास ठेवण्याची गरज मला वाटत नाही.

अवलिया's picture

25 Dec 2008 - 7:07 pm | अवलिया

इतर संदर्भांवर विश्वास ठेवण्याची गरज मला वाटत नाही.

टाळ्या !!!!

योग्य पद्धत.

-- अवलिया
अवलियाची अनुदिनी

ब्रिटिश's picture

26 Dec 2008 - 4:18 pm | ब्रिटिश

जल्ला राम टाईट, सीतामाय टाईट
ऊंद्या शॅटरडे नाईट

एन्जॉय !!!

राम, सीता दोगावजनांचा आदर्श ठेवनारा
मिथुन काशिनाथ भोईर
(जल्ला सगला काय नावानच हाय)

म्हणजे नक्की काय केल?

llपुण्याचे पेशवेll's picture

27 Dec 2008 - 5:23 am | llपुण्याचे पेशवेll

जोवर क्रिडेला 'काम' शब्द जुळत नाही तोवर क्रिडा म्हणजे खेळ. :)
( क्रिडांगण म्हणजे खेळण्याची जागा, मैदान असे असते म्हणजे क्रिडा म्हणजे खेळ हा तर्क बरोबर असावा)

(अतार्किक)
पुण्याचे पेशवे
Since 1984

विसोबा खेचर's picture

3 Jan 2009 - 8:25 am | विसोबा खेचर

भगवान श्रीकृष्ण मांसाहारी होते आणि दारू प्यायचे का? तर हो तेही हे सर्व करायचे.

सहमत आहे.. आमचा किसन्या तर बर्‍याचदा टाईटच असे! :)

आपला,
तात्या.

चिगो's picture

10 Feb 2012 - 2:51 pm | चिगो

>>अर्जुन आणि श्रीकृष्णाने अधिक विचारता त्याने सांगितले की तो साक्षात अग्नी असून त्याची भूक प्रचंड आहे आणि ती एखाद्या प्राण्याने मिटण्यासारखी नसून संपूर्ण खांडववनच त्याची क्षुधाशांती करू शकेल.

माझ्या माहितीप्रमाणे ती स्टोरी अशी आहे : त्यांना एक गलेलठ्ठ ब्राम्हण भेटला. त्याने सांगितले की तो अग्नी असून यज्ञांत आहुती दिलेल्या तुपामुळे तो असा लठ्ठ आणि सुस्त झाला आहे. आता एखादी प्रचंड आगच त्याचा मेद जाळून त्याला चपळ बनवू शकेल.. त्यानंतर खांडव-वन दहन करण्यात आले..

मुळ धाग्याविषयी : राम क्षत्रिय असल्याने मांसभक्षण आणि सोमरसपान त्यांना अलाऊड होते.. काही इतिहासकारांच्या मते वेदीक काळात ब्राम्हण गोमांस-भक्षणही करत असत. (पाहुण्यासाठी "गोघ्न" म्हणजे गाय खाणारा हा शब्द होता.. संदर्भ : NCERT - Ancient India) पुढे, बौद्ध धर्म त्यातील अहींसेच्या प्रचारामुळे पॉप्युलर व्हायला लागला (खासकरुन शेतकरी समाजात) तेव्हा हिंदु धर्मातही ती सुधारणा करण्यात आली, हाही एक मतप्रवाह आहे..

आर्य's picture

25 Dec 2008 - 6:40 pm | आर्य

वा ! रामायणा वरुन रामायण !
रामायण-महाभारत काळातील समाज व्यवस्थे विषयीची माहिती -'आर्य संस्कृतीचा उत्कर्षापकर्ष 'या ग्रंथात महादेव शास्त्री दिवेकर, वाई (१८५१)यांनी सविस्तर दिला आहे. त्यात त्यात वनस्पती-आहार आणि मासांहाराचा स्पष्ट उल्लेख आहे. रामही मांसाहारी होता.

आणखी काही रोचक माहिती - त्याकाळी चतुर्वर्ण समाजव्यवस्था अस्तिव्यात होती आणि ब्राम्हणही शेती, पौरोहीत्य आणि अन्य व्यवसाय करीत, सगळे तपस्वी नव्ह्ते, त्याकाळी बहुपत्नी हा भुषणावह व्यवहार असला तरी, बहुपती हाप्रकार केवळ चंद्रवंशीयांमद्धे होता (राम-सुर्यवंशी होता). वानर, राक्षस, मानव, यक्ष-किन्नर, नाग या सर्व समाज व्यवस्था ऐकाच वेळी अस्तीवात होत्या. वसिष्ठांनी राम वनात गेल्यास त्याच्या अर्धांगीस म्हणजे सितेस राज्याभीषेक करावा असा मार्ग सुचवला होता.

आपला
(रामभक्त)आर्य

टग्या's picture

25 Dec 2008 - 7:11 pm | टग्या (not verified)

... राम मांसभक्षक होते की नाही याने नेमका काय फरक पडतो ते कळले नाही. ते जे काही खायचे त्याच्या रेसिप्या शोधून तसे स्वतः बनवून खाण्यात रस असेल तर गोष्ट वेगळी.

प्रियाली's picture

25 Dec 2008 - 7:53 pm | प्रियाली

राममहाशय जे खायचे ते फार चविष्ट होते की नाही याबद्दल मला शंका आहे. ;) काय आहे की त्यावेळी, मसाले, वाटण-घाटण, मांसाला मुरवणे इ. इ. प्रकार किती प्रचलीत होते त्याबद्दल फारसे वाचनात आलेले नाही.

रामायण काळात साखर नव्हती असा निष्कर्ष काही तज्ज्ञांनी काढला होता हे मागे उपक्रमावर चर्चिले आहेच. गरम मसाला, मालवणी मसाला, गोवानीज बॉटल मसाला, दह्यातील मुघलाई मसाले, टिक्का मसाला, तंदूरी मसाला वगैरे वगैरेही तेव्हा फार प्रचलीत नसावेत तेव्हा तत्कालीन रेसिप्या फार चविष्ट नसाव्यात असे मला वाटते. ;)

टग्या's picture

26 Dec 2008 - 2:48 am | टग्या (not verified)

राममहाशय जे खायचे ते फार चविष्ट होते की नाही याबद्दल मला शंका आहे. काय आहे की त्यावेळी, मसाले, वाटण-घाटण, मांसाला मुरवणे इ. इ. प्रकार किती प्रचलीत होते त्याबद्दल फारसे वाचनात आलेले नाही.

असेच काही नाही. रामभाऊंनी हरणाचा ष्टेक खाल्ला असल्यास त्यात वाटण-घाटण प्रकार निश्चितच उद्भवला नसावा आणि मसाले, मांसाला मुरवणे वगैरे प्रकार आलेच असल्यास अत्यंत माफक प्रमाणात कामी आले असावेत (किंवा बहुधा त्यांची फारशी गरज पडली नसावी), आणि तरीही प्रकार चविष्ट लागला असावा, असे मानायला जागा आहे.

किंवा हरणाला विस्तवावर रोटिसेरी पद्धतीने ('शोले'तला गब्बर 'अहमद'ला मारायच्या आदेशाचे रूपक म्हणून हातावर चढलेला मुंगळा मारतो त्या प्रसंगी आडवा पडून भाजताना बघत असतो त्याप्रमाणे) भाजताना त्यावर जंगलातल्या जडीबूटी वगैरे अगोदर फासून (आणि भाजताभाजता अधूनमधून चोळून) 'हर्ब-रोस्टेड' (उच्चारी 'अर्ब-रोस्टेड') हरण खाल्ले असावे की काय, कोणास ठाऊक. एकंदरीत प्रकार चविष्ट नसेलच असे सांगता येणार नाही. (मुळात मांसाची अंगभूत चव महत्त्वाची; मसाले काय किंवा जडीबुटी काय, त्या चवीला थोडी उभारी देण्यापुरतेच!)

गरम मसाला, मालवणी मसाला, गोवानीज बॉटल मसाला, दह्यातील मुघलाई मसाले, टिक्का मसाला, तंदूरी मसाला वगैरे वगैरेही तेव्हा फार प्रचलीत नसावेत तेव्हा तत्कालीन रेसिप्या फार चविष्ट नसाव्यात असे मला वाटते.

काय सांगता! मग मध्यंतरी भारतात 'रामराज्य' परत आणण्याची जी एक जोरदार चळवळ चालू होती, ती यशस्वी झाली नाही ते चांगलेच झाले म्हणायचे! त्यापेक्षा 'मोगलाई' काय वाईट होती? ;)

असो.

सुनील's picture

26 Dec 2008 - 5:42 pm | सुनील

हरणाला विस्तवावर रोटिसेरी पद्धतीने ('शोले'तला गब्बर 'अहमद'ला मारायच्या आदेशाचे रूपक म्हणून हातावर चढलेला मुंगळा मारतो त्या प्रसंगी आडवा पडून भाजताना बघत असतो त्याप्रमाणे) भाजताना त्यावर जंगलातल्या जडीबूटी वगैरे अगोदर फासून (आणि भाजताभाजता अधूनमधून चोळून) 'हर्ब-रोस्टेड' (उच्चारी 'अर्ब-रोस्टेड') हरण खाल्ले असावे की काय, कोणास ठाऊक. एकंदरीत प्रकार चविष्ट नसेलच असे सांगता येणार नाही

हरीण नव्हे पण अशीच रोटिसेरी पद्धतीने भाजलेली मेंढी खाल्ली आहे (श्वार्मा). मेंढी जर इतकी चविष्ट लागत असेल तर हरीण नक्कीच असावे!

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

टग्या's picture

26 Dec 2008 - 6:45 pm | टग्या (not verified)

रोटिसेरी पद्धतीने ('शोले'तला गब्बर 'अहमद'ला मारायच्या आदेशाचे रूपक म्हणून हातावर चढलेला मुंगळा मारतो त्या प्रसंगी आडवा पडून भाजताना बघत असतो त्याप्रमाणे)

तांत्रिकदृष्ट्या, 'रोटिसेरी' म्हणून गणले जाण्यासाठी मांस सातत्याने फिरवले जाण्याची गरज आहे. ('शोले'तल्या 'त्या' प्रसंगी ते तसे सातत्याने फिरवले जात होते ही नाही ते निश्चित आठवत नाही.) पहिला प्रतिसाद देताना हा मुद्दा नजरेतून निसटला होता हे मान्य करतो.

अर्थात, अशा कामांकरताच वनवासात लक्ष्मणाला बरोबर नेण्यात आले असावे असे मानण्यास जागा आहे.

जयेश माधव's picture

25 Dec 2008 - 7:35 pm | जयेश माधव

शाकाहार ...मा॑साहार...
अरे काय चालले आहे? उगाच कोणाच्या श्रदध्येशी खेळु नको रे बा॑बानो! ज्या॑ना आपण देव मानतो,त्या॑च्या अस्तीत्वाविषयी आपण श॑का घेणे योग्य आहे का?भगवान श्रीराम हे मांसाहारी होते काय ? हाच प्रश्न जर कोणी मुसलमान व्यक्तीने विचारला असता तर आपणच त्याच्यावर तुटुन पड्लो नसतो का? आता चित्रकार एम.एफ. हुसेनचच॑ घ्या ना,त्या॑नी आपल्या देवता॑ची उघडी नागडी चित्रे काढ्ली म्हणुन आपणच त्याच्यावर ब॑दी घातली ना? मग आपणच हे काय चालविले आहे?आपण खुप शीकलो म्हणुन देव देवता॑च्याही पुढे जायचेय काय? आणि उगाच त्याविषयी श॑का कुश॑का काढत बसायच्या का?....

जयेश माधव

निखिलराव's picture

26 Dec 2008 - 11:55 am | निखिलराव

काकांशी १००% सहमत........

हे "रामराज्य" होवो ही श्रींची इछा.......

मृगनयनी's picture

26 Dec 2008 - 4:19 pm | मृगनयनी

जयेश जी,

सहमत!

|| रामो राजमणि सदा विजयते, रामं रमेशं भजे ||
|| रामेणाभिहता निशाचरचमू, रामाय तस्मै नमः ||
|| रामान्नास्ति परायणं परतरं, रामस्य दासोस्मह्यम् ||
|| रामे चित्तलया सदा भवतु मे, भो राम माम् उद्धर ||

|| राम रामेति रामेति, रमे रामे मनोरमे ||
|| सहस्त्रनाम तत्तुल्यम्, रामनाम वरानने ||

राम हा विष्णुचा सातवा अवतार होता. हे त्रिकालाबाधित सत्य आहे.
रामाच्या आहारापेक्षा, रामाचे आचार- विचार उपयोगात आणण्याची गरज आज सर्वांत जास्त आहे.

| हरि ओम |

स्वानन्द's picture

25 Dec 2008 - 7:36 pm | स्वानन्द

>>... राम मांसभक्षक होते की नाही याने नेमका काय फरक पडतो ते कळले नाही. ते जे काही खायचे त्याच्या रेसिप्या शोधून तसे स्वतः बनवून खाण्यात रस असेल तर गोष्ट वेगळी.

अहो पण एखाद्याला माहिती हवी असेल तर काय वाईट आहे त्यात? आणि आपल्याच धार्मिक ग्रन्थात काय लिहिले आहे ते समजून घेतले तर चूक काय ?

---रामानन्द

घाटावरचे भट's picture

25 Dec 2008 - 11:10 pm | घाटावरचे भट

अरुण गोविल मांसाहारी होता काय? त्यावरून काही निष्कर्ष निघू शकेल....

प्रियाली's picture

26 Dec 2008 - 2:26 am | प्रियाली

अरुण गोविल मांसाहारी असल्याबद्दल माहित नाही परंतु एकदा चित्रिकरणा दरम्यान जमलेल्या लोकांनी त्याच्या (म्हणजे प्रभू रामचंद्रांच्या) सिग्रेट पिण्यावर आक्षेप घेतला होता असे ऐकून आहे. ;)

इनोबा म्हणे's picture

26 Dec 2008 - 2:32 am | इनोबा म्हणे

म्हणजे प्रभू रामचंद्र(अरुण गोविल) मांसाहारी असले/नसले तरी त्यांना चैतन्यनलीकेचे वावडे नव्हते एवढे मात्र खरे.
चला चर्चेतून काही ना काही तरी निष्पन्न झाले म्हणायचे.

कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं
: कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये.
-इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर

आजानुकर्ण's picture

26 Dec 2008 - 8:04 am | आजानुकर्ण

हो ना.

शिवाय भारतीय जन्ता पक्षाच्या बाजूने रावण (अरविंद त्रिवेदी) प्रचार करायचा असे वाचून आश्चर्य वाटले होते. काव्यगत न्याय यालाच म्हणत असावेत

आपला
(बिभीषण) आजानुकर्ण

अवलिया's picture

26 Dec 2008 - 10:39 am | अवलिया

काय हो लघुशंकाग्रस्त

मगाशी निमित्त व निमित्य यातला फरक नजरेस पडला पण जनता मधील पुर्ण न व जन्ता मधला पायतुटका न फरक दिसला नाही श्रीमान लघुशंकाग्रस्त?

म्हणतात ना... लोका सांगे..

-- अवलिया
अवलियाची अनुदिनी

आजानुकर्ण's picture

26 Dec 2008 - 5:35 pm | आजानुकर्ण

अवलियापंत,

खरे म्हणजे जंता असे लिहिणार होतो. पण नंतर विचार बदलला आणि थोडे कन्सेशन देण्यासाठी जन्ता असा केला.

बाय द वे, 'पुर्ण' हे चुकीचे आहे 'पूर्ण' असे हवे.

आपला
(शुद्ध) आजानुकर्ण

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

26 Dec 2008 - 10:15 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

अरुण गोविल मांसाहारी असल्याबद्दल माहित नाही परंतु एकदा चित्रिकरणा दरम्यान जमलेल्या लोकांनी त्याच्या (म्हणजे प्रभू रामचंद्रांच्या) सिग्रेट पिण्यावर आक्षेप घेतला होता असे ऐकून आहे.

आणि म्हणे सीता (दीपिका) लक्ष्मणा(याचं नाव आठवत नाही)बरोबर पबमधे जायची!

घाटावरचे भट's picture

26 Dec 2008 - 10:34 am | घाटावरचे भट

तो आधुनिक रामायणाचा भाग असावा.

मृगनयनी's picture

26 Dec 2008 - 4:21 pm | मृगनयनी

आणि म्हणे सीता (दीपिका) लक्ष्मणा(याचं नाव आठवत नाही)बरोबर पबमधे जायची!

»

अदिती,
दिपीका लक्ष्मणाबरोबर नाही, भरताबरोबर (स्वर्गीय अभिनेता :संजय जोग) जायची. ;)

अर्थात, "दिपीका" सीतेचा अभिनयही..खरोखर अप्रतिम करत असल्यामुळे, (तिच्या आणि संजयच्या ही) रामायणातील प्रतिमांना जराही धक्का पोचला नाही.

:)

आजानुकर्ण's picture

26 Dec 2008 - 5:37 pm | आजानुकर्ण

सीतेचे काम करणारी दीपिका काँग्रेसची खासदार होती म्हणे.

आपला
(ऐकीव) आजानुकर्ण

सुक्या's picture

26 Dec 2008 - 3:19 am | सुक्या

मी रामाला देव किंवा भगवान मानत नाही. माझ्या मते राम ही एक आदर्श व्यक्तीरेखा होती. ज्या काळी समाजप्रबोधनासाठी अगदी नगन्य साधने उपलब्ध होती तेव्हा लोकांना आदर्श जिवन जगण्यास प्रव्रुत्त करण्यासाठी राम / लक्षमण / सिता वगेरे व्यक्तीरेखा अस्त्तीत्वात आल्या. राम हा अस्तीत्वात नव्हता , तो काल्पनीक आहे हा वाद मला घालायचा नाही. परंतु सर्वसामान्य मनुष्यासमोर जगण्याचे एक आदर्श उदाहरण ठेउन समाजात शांतता निर्माण करने हा एक त्याचा उद्देश होता असे मला वाटते. पुर्वाश्रमीच्या दरोडेखोराने रामचरीत्र लिहुन आदर्श जिवनाचा पुरस्कार करावा ह्यातच सगळे आले. वनसंपदा मुबलक उपलब्ध असताना मांसाहार हा होतच असावा. रामही मांसाहारी असावा. त्या काळाचे जिवनमान पाहता मांसाहार त्यज्य असेल असे मला तरी वाटत नाही.

(मांसाहारी ) सुक्या (बोंबील)
मु. पो. डोंबलेवाडी ( आमच्या गावात पोस्ट हापीस नाय. लिवायचं म्हुन लिवलं.)

JAGOMOHANPYARE's picture

26 Dec 2008 - 11:42 am | JAGOMOHANPYARE

हे घ्या... वाचा...

http://www.maayboli.com/node/2802

फकीरा's picture

26 Dec 2008 - 3:36 pm | फकीरा

Vishay nivdatana japun nivdave.Udya tumhi Ram daru pit hota ka yavar kathyakut karal.Aani ase sapraman sangal ki sitaharan zalyavar ramane pine chalu kele.

सुनील's picture

26 Dec 2008 - 5:20 pm | सुनील

sitaharan zalyavar ramane pine chalu kele
तर, रामायणाऐवजी देवदासायन ह्या महाकाव्याचा जन्म झाला असता.

;)

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

परिकथेतील राजकुमार's picture

26 Dec 2008 - 5:44 pm | परिकथेतील राजकुमार

आपल्याला काय म्हणायचे आहे , ते समजले नाही !
रामायणातच राम मांस खायचा असा उल्लेख आहे, तो फक्त योग्य आहे का नाही हि चर्चा चालु केली होती मी. त्यात माझ्या अक्कलेचा कुठलाही भाग मी घुसडलेला न्हवता ! त्यात दारु पिण्याचा उल्लेख असता तर आम्ही तो ही विषय चालु केला असता. उगाच चुकिचा समज करुन घेउ नये. नुसते विषय वाचुन मत देण्यापेक्षा पुर्ण विषय वाचुन मत द्यावे. आणी देव करतो ते सगळे बरोबर ? मग धर्माचा अवतार युधीष्ठीराने बायकोला पणाला लावले म्हणुन उद्या अजुन कोणी लावले तर त्याला माफ करायचे ? देवाधर्माच्या कल्पना आता बदलायला लागणार बुव्वा ! धोनीचे पण मंदीर बांधत आहेत आता =))
|!¤*'~` प्रसाद `~'*¤!|
"समर्थाचिया सेवका वक्र पाहे । असा सर्व भूमंडळी कोण आहे ।।"
आमचे राज्य

फकीरा's picture

27 Dec 2008 - 1:34 pm | फकीरा

krupaya gairsamaj karun ghevu naye.Maze evdhech mhanane aahe ki charcha aani vaad yaat farak aahe.
Vaad nirman hotil,konachi shradhasthane dukhavtil ase vishay talave.Te kaam rajkarnyanche aaple nahi.

विजुभाऊ's picture

26 Dec 2008 - 6:39 pm | विजुभाऊ

राम मांसाहारी असेल किंवा नसेल त्याने काय फरक पडतो.
आयुर्वेदात कोणत्या प्राण्याच्या/ पक्ष्याच्या मांसाचे आयुर्वेदीय उपयोग कायकाय आहेत याची सखोल चर्चा आहे.
प्राचीन काळी ऋषीमुनीना हे ज्ञान मांसभक्षण केल्यावरच प्राप्त झाले असेल ना?
यज्ञात बळी दिल्या पशुंचा उपयोग नन्तर खाण्यासाठीच होत असे.
एक गोष्ट आवर्जुन लक्षात येते की बहुसंख्य उच्चवर्गियांचे देव गणपती विष्णु याना शाकाहारी नैवेद्य लागतो तर बहुजन समाजाचे देव म्हसोबा भैरोबा खंडोबा म्हाळसाई मांढरदेवी काळूबाई याना मांसाहारी नैवेद्य लागतो.
रामायणातल्या एका गोष्टीचे मला नेहमी अश्चर्य वाटते की परशुरामाने पृथ्वी १९वेळा नि:क्षत्रीय केली होती. पहिल्यांदा नि:क्षत्रीय केल्याननतर क्षत्रीय परतपरत कसे निर्माण झाले

आपण एखादा विचार ;एखादी गोष्ट करतो किंवा करायचे टाळतो ते आनन्द मिळवणे किंवा वेदना टाळणे या दोन्ही साठीच

घाटावरचे भट's picture

26 Dec 2008 - 11:54 pm | घाटावरचे भट

रामायणातल्या एका गोष्टीचे मला नेहमी अश्चर्य वाटते की परशुरामाने पृथ्वी १९वेळा नि:क्षत्रीय केली होती. पहिल्यांदा नि:क्षत्रीय केल्याननतर क्षत्रीय परतपरत कसे निर्माण झाले

परशुरामाने फक्त क्षत्रिय पुरुषांना मारले असावे. आणि त्यावेळी जर काही क्षत्रिय स्त्रिया गरोदर असतील, तर ती क्षत्रिय पोरे अर्थातच पुढच्या बॅचमधे परशुराम मारणार, नाही का?

इनोबा म्हणे's picture

27 Dec 2008 - 12:18 am | इनोबा म्हणे

मग त्याच्या पुढच्या बॅचमधे क्षत्रिय कुठून आले?

कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं
: कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये.
-इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर

घाटावरचे भट's picture

27 Dec 2008 - 12:29 am | घाटावरचे भट

ती सायक्लिक प्रोसेस आहे.

llपुण्याचे पेशवेll's picture

27 Dec 2008 - 12:31 am | llपुण्याचे पेशवेll

अरे इनोबा,
असे बघ पहील्या बॅच मधले सगळे पुरुष (लहान मुले सोडून) समजा त्याने मारली. तर जी लहान मुले मोठी झाली त्यानी यथावकाश पुढची बॅच निर्माण केली असणार.
पुढची बॅच मोठी झाल्यावर त्याना मारले असेल पण तत्पूर्वी त्या पुढच्या बॅचने त्यापुढची बॅच निर्माण करण्याचे कार्य चालू केले नसेल कशावरून? :)
२१ वेळा नि:क्षत्रिय पृथ्वी म्हणजे वारंवार राजांशी युद्ध करून राजाला आणि त्याच्या सेनेला २१ वेळा पराभूत केले असेल. :)
पुण्याचे पेशवे
Since 1984

झुमाक्ष's picture

2 Jan 2009 - 10:02 pm | झुमाक्ष (not verified)

परशुरामाने पृथ्वी १९वेळा नि:क्षत्रीय केली होती.

पण त्यातून दरवेळी मी सहीसलामत निसटलो की नाही? हा: हा: हा:!

- झुरळ मारणारा क्षत्रिय.

हुप्प्या's picture

27 Dec 2008 - 2:51 am | हुप्प्या

राम नावाचा राजा खरोखर अस्तित्त्वात होता असे सिद्ध करणारे काय पुरावे आहेत? नाणी, शिलालेख आहेत का? असल्यास कुठल्या काळात?
मला वाटते आज उपलब्ध असणारे पुरावे बघता रामायण हे एक काव्य आहे आणि राम हा त्याचा काल्पनिक नायक आहे.
काव्यात उल्लेखलेल्या जागा खर्‍या आहेत पण म्हणून सगळ्या व्यक्ती असतील असे नाही.
तेव्हा पुरावा मिळेपर्यन्त असे म्हणता येईल की राम हा काल्पनिकच होता.
एक काल्पनिक पात्र शाकाहारी होते का मान्साहारी ह्याचा वाद निरर्थक आहे.

गौरिसन्जय's picture

30 Dec 2008 - 10:29 pm | गौरिसन्जय

shri ram he aatmagyani hote...... evdech mala mahatvache vatate.... jyala he kalale--- "aatma-gyani" ya shabdacha aarth ---- tyala manat shri ramavishai shanka yenarch nahi... tyanche gyaan evade mothe aahe.. ki tyapudhe asha charcha karun vel phukatach ghalavala yachi prachiti yeiel. shri ram sakshat aatmagyani , maryada purushotam hote ... tyache vaganukiche aapan aacharan karu shakalo tar kharach janam phukat janar nahi. te vegi hote ki nahi yala kadiche mahatva rahanar nahi....

नितिन थत्ते's picture

31 Dec 2008 - 11:42 am | नितिन थत्ते

मला वाटते त्याप्रमाणे राम मान्साहारी होता की नाही या चर्चेचा हेतू श्रद्धास्थानान्ची बदनामी करणे हा नाही. राम मटण खात होता म्हणून आपण त्याला कमी लेखणार नाही. (मासाहारी शब्द नीट लिहिता आला नाही म्हणून मटण हा शब्द लिहीत आहे. जाणकारानी मार्गदर्शन करावे).

मुख्य हेतू हा हिन्दू धर्म हा सध्या आहे तसाच अनन्त काळापासून आहे ही समजूत खोडून काढणे हा आहे.

मी कलकत्त्याला असताना तेथे इस्कॉनचे एक उपहारग्रह (पुन्हा टायपिन्गची अडचण) होते. तेथे फक्त शाकाहारी जेवण मिळे. चौकशी केली तेव्हा भगवान की जगहमे नॉन व्हेज कैसे दे सकते है असे उत्तर मिळाले. तेव्हा माझ्याही मनात हाच विचार आला होता.

पिवळा डांबिस's picture

31 Dec 2008 - 12:15 pm | पिवळा डांबिस

आम्हाला ही सगळी चर्चा अगदी निरर्थक वाटते....
आम्ही स्वतः अट्ट्ल मांसाहारी आहोत...
श्रीरामांविषयी आम्हाला अत्यंत आदर आहे..

आता,
श्रीराम मांसाहारी होते?
आनंद आहे, आमच्यापैकीच होते....
श्रीराम मांसाहारी नव्हते?
अरेरे, जीवनातला एक अत्युकृष्ट आनंद ते अनुभवू शकले नाहीत...

श्रीराम मांसाहारी नसले तरी आमचा त्यांच्याविषयीचा आदर कमी होत नाही....
श्रीराम कितीही महान असले तरीही ते केवळ मांसाहारी नाहीत म्हणून आम्ही त्यांचा त्याबाबतीतला आदर्श आम्ही आचरणात आणू इच्छित नाही.....
कोणत्याही भूतकालीन व्यक्तीच्या आचरणापेक्षा आम्ही आमच्या अनुभवाला जास्त महत्व देतो....

जय श्रीराम!
:)

धम्मकलाडू's picture

31 Dec 2008 - 2:51 pm | धम्मकलाडू

भगवान श्रीराम हे मांसाहारी होते काय ?

म्हणजे काय? नक्कीच. अगदी गोमांसही खात असतील. थोडक्यात त्यांचा आहार अगदी वैदिक असेल. तसेही राजसी आहारात मटण, चिकन, मासे येऊ शकतात. फक्त तेलाऐवजी तूप वापरणे इष्ट. मात्र तिखट, मसाले अगदी माफक प्रमाणात असायला हवे. मंडळी, प्रत्यक्ष सीतामाईने बनविलेल्या पाककृत्या इथे कुणाला देता आल्या तर किती उत्तम होईल! अहाहा!!!

(मटणमार्तंड) धम्मकलाडू

|| राम रमेशं भजे ||
ज्याला भजी आवडत नाही तो खरा रामभक्त असूच शकत नाही.

सुन्या कोकणी's picture

2 Jan 2009 - 6:05 pm | सुन्या कोकणी

अरे रामाचो मांसाहार सोडा
येकदा आमच्या कोकणांतला माशांचा तिकला खावन बघा.
सगलो मांसाहार इसारतलाय...
.......सुन्या कोकणी

सुनील's picture

2 Jan 2009 - 10:50 pm | सुनील

भारतीयांना मिरचीचा शोध पोर्तुगीझांनी १६व्या शतकात लावून दिला. तत्पूर्वी भारतीय पदार्थ तिखट करण्यासाठी काय वापरीत असावेत? मिरी/ लवंग?

(मासांहारी पदार्थ हे सहसा तिखट स्वरूपात अधिक रुचकर लागतात )

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

नितिन थत्ते's picture

3 Jan 2009 - 5:23 pm | नितिन थत्ते

पोर्तुगीजांनी मिरचीची ओळख करून दिली तसाच बटाटा ही त्याच सुमारास माहित झाला. त्यापूर्वी उपासाला काय खात असावेत?

चिगो's picture

10 Feb 2012 - 3:07 pm | चिगो

काय राव? काळी मिरी (ब्लॅक पेपर) वापरत असतील.. तसाही भारत देश आणि दक्षिण-पुर्व आशिया मसाल्याच्या व्यापारासाठीच प्रसिद्ध होता तेव्हा..

गौरिसन्जय's picture

3 Jan 2009 - 12:27 am | गौरिसन्जय

khare aahe Iscoon mandiratil sevekaaryanche. non-veg he panchendriya (5 sence)madhe modate aani vegetables he eekendirya(one sence)madhe modate . chicken etc nonveg food manjhe jiva-la marun , hatya karun , dukha devun aapan swatasathi sukhachi aapekshya kashi karu shakato.... aani aatma sukh kase milauu shaakato? dusaryala kuthalyahi nimitane dukh deuun aapan swatasathi sukh nahi milauu shakat mang te kunache maan dukhavne aasoo...va pashu hatya karun sugraas non-veg dish karun khane aasoo... chicken ,fish madhe pan tocha aatmaram vas ato jo tumachya aamchya, chara-charat vaas karato....

नितिन थत्ते's picture

3 Jan 2009 - 5:30 pm | नितिन थत्ते

अहो गौरिसन्जय, तुम्ही विन्ग्रजी लिपीतून का लिहिता? वाचायला वेळ लागतो. आणि मुद्दा पटकन लक्षात येत नाही.

मांसाहार करून आमच्या शरीराला आनन्द मिळतो, आत्म्याला नव्हे. आणि बोकडाच्या शरीराला मारतो आत्म्याला नाही (नैनं छिन्दन्ति शस्त्राणि असे गीतेतच नाही का सान्गितलेले?)

गौरिसन्जय's picture

4 Jan 2009 - 2:20 pm | गौरिसन्जय

Because of presence of aatma , we all r alive. pan mala saanga jar tumachya mulala koni marun khalle tar tumhala aanand hoyel ki dukh hoye? ...............te chicken or goat is also baby of someone.. so it will charge u paap karama..... kalale ka aaplyala?

to type in marathi , it takes so much time(as i am not so good for type in marathi) and i do't have much time in my hand.

परिकथेतील राजकुमार's picture

4 Jan 2009 - 4:16 pm | परिकथेतील राजकुमार

पण जीव तर पान, फुले, झाडे, तृणधान्ये, फळे, भाज्या ह्यांमध्ये सुद्धा असतोच की मग त्यांना खाल्याने पाप लागत नाही ?? फळे, भाज्या हे झाडाचे अवयव काढुन घेतल्याने त्याला दु:ख , वेदना होत नसतील ? त्यानी पाप लागत नसेल ?

शाकाहारी शंकासुर
|!¤*'~` प्रसाद `~'*¤!|
"समर्थाचिया सेवका वक्र पाहे । असा सर्व भूमंडळी कोण आहे ।।"
आमचे राज्य

नितिन थत्ते's picture

4 Jan 2009 - 10:11 pm | नितिन थत्ते

इस्कॉनचे उदाहरण क्षत्रिय देवाचे सुद्धा ब्राह्मणीकरन कसे होते हे दाखवण्यासाठी लिहिले होते.

वेताळ's picture

4 Jan 2009 - 3:45 pm | वेताळ

किती सुरेख विष्लेशन केले आहात गौरीसंजय तुम्ही.अजुन एक शंका ह्या जन्मी केलेले पाप किती झाले आहे हे आपल्याला कसे कळेल?ते कमी करता येईल काय? चिकन,मटण व मासे ह्यामधले काय ज्यादा पापी आहे.म्हणजे खाल्ले की पाप ज्यादा लागते.
वेताळ

गौरिसन्जय's picture

5 Jan 2009 - 7:02 pm | गौरिसन्जय

जीव तर पान, फुले, झाडे, तृणधान्ये, फळे, भाज्या ह्यांमध्ये सुद्धा असतोच की मग त्यांना खाल्याने पाप लागत नाही ?? फळे, भाज्या हे झाडाचे अवयव काढुन घेतल्याने त्याला दु:ख , वेदना होत नसतील ? त्यानी पाप लागत नसेल ?

खरे आहे तुमचे . पा प तर लागते. पन तुमिच सागा कि, आप् न plastic, rubber, iron , steel जिवन्त राहण्यासाथि खाउ शकतो का? नक्किच नाहि. आपन सजिव आहोत आनि मनुन आपन निर्जिव पदार्थ खाउ शकत नाहि. it is neccesity to eat vegetables , fruits etc to stay alive. फळे , भाजिपाला हे सर्वे एकेन्दिर्य आहेत. They are not develope as human beings or animals (body, speech, intellectual, chit and egoisum). but animala and human being have one common thing is पन्चेन्द्रिय (body, speech, intellectual, chit and egoisum).

and one thing when we eat vegetables it is our ncecessity to stay alive.

but when we eat goat, chicken etc nov-veg . food it only for pleaure . we have another option with our hand to eat vege food but still we intentionlly kill animals and cook it with intention to get pleasure of eating non -vegetraian food. so it will charge u definetly a big sin (paap karama ) for next life.............i

अजुन एक शंका ह्या जन्मी केलेले पाप किती झाले आहे हे आपल्याला कसे कळेल?ते कमी करता येईल काय? चिकन,मटण व मासे ह्यामधले काय ज्यादा पापी आहे.म्हणजे खाल्ले की पाप ज्यादा लागते.

yes !

everything which we are enjoying or suffering is all becacause of all karma we charged in our last birth. this birth is discharge of our last charge karmas. आपण प्र् ति क्रमन करुन नक्किच सुटु शक्तो.. .
u want more information.... u please go on this site.... u will find !! रिअल truth about your self.!! and all answers for ur qurries......

www.dadabhagawan.org

नितिन थत्ते's picture

5 Jan 2009 - 7:53 pm | नितिन थत्ते

मराठीतून लिहायचा प्रयत्न केल्याबद्दल अभिनंदन. चालू ठेवा.

बोकड किंवा कोंबडी खातो ते मजा म्हणून हे मात्र मान्य नाही. अनेक दुर्गम भागात गरज म्हणूनच मांसाहार करावा लागतो.

असो. चर्चेचा विषय राम मांसाहारी होता की नाही हा आहे.

शैलेन्द्र's picture

10 Feb 2012 - 6:43 pm | शैलेन्द्र

"it is neccesity to eat vegetables , fruits etc to stay alive. फळे , भाजिपाला हे सर्वे एकेन्दिर्य आहेत. They are not develope as human beings or animals (body, speech, intellectual, chit and egoisum)."

अहो, बोकड आणि मणुस तरी कुथे सारखे डेव्हलप होतात? आनी फळे भजीपाला एकेन्द्रीय असतात, हे कोणी सांगीतल तुम्हांला?

वेताळ's picture

5 Jan 2009 - 11:01 pm | वेताळ

पण खुपच त्रोटक माहिती आहे. कर्मयोग व कर्मकांडे ह्याची गल्लत करु नये असे मला वाटते.काय खावे ,काय प्यावे ,कशी कपडे घालावी इत्यादी व्यक्तिगत गोष्टीत धर्माने लक्ष घालावे हे पटत नाही.समाजात वावरताना आपल्या वर्तुणुकीचा दुसर्‍याला त्रास होऊ नये हे पहाणे खुप गरजेचे आहे.निदान माणसानी माणसांसारखे वागावे ही अपेक्षा ठिक आहे.
आपल्या धर्मात नित्य कोणी मासांहार करत नाही.कधीतरी बदल म्हणुन तो केला जातो. म्हणुन मासांहार करणारे पापी व न करणारे पुण्यवान अशी पाप,पुण्याची गणती करता येणार नाही.दुध व दह्यात देखिल असे किती तरी जिवाणु असतात ,ज्याचे आपण भक्षण केल्यानंतर हत्या होत असते.मग हे पापकृत्य एक बोकड मारण्यापेक्षा कित्येक पटीने अधिक आहे.
अजुन एक शंका आहे ती म्हणजे पृथ्वीवर देवाने जे काही अवतार घेतले आहेत ते कुणा ना कुणा पापीला मारण्यासाठीच घेतले आहेत. मग ती देखिल एकप्रकारची हत्याकांडेच आहे ना? कारण पाप केले की त्याची शिक्षा तुम्हाला नरकात मिळणारच असते,मग त्याची हत्या इथे पृथ्वीवर करण्यामागचे कारण काय आहे? अजुन एक कल्पना आहे की जे कोणी ह्या जन्मी पाप करतात त्याना दुसरा जन्म प्राण्याचा मिळतो. म्हणजे ते एकप्रकारचे पुर्वजन्मी पापीच होते त्याची ह्या जन्मी मांसासाठी हत्या केली जाते , मग ही हत्या पाप का समजले जाते.अशा खुप बाष्कळ कल्पना आहेत. अशाच कर्मकांडामुळे पहिलेच हिंदुधर्माची खुप हानी झाली आहे.आपल्या फायद्यासाठी कोणत्या ना कोणत्या गोष्टीला पाप,पुण्य ठरवणे बंद करा.जीवन जगताना अशा पापपुण्याच्या कल्पना केल्या तर जीवन जगणे मुश्किल होवुन जाईल.

वेताळ

गौरिसन्जय's picture

5 Jan 2009 - 11:45 pm | गौरिसन्जय

अर्जुनाने पन युध्ध केले पन तो मोक्शा ला गेला. कर्म करत अस्ताना अकर्म दशेने केले तर मोक्श मिळ्तो. एवदेच इथे मी सागु शकते. कर्मकांड आनि
आत्म् ग्यान यात खुप फरक आहे. तुम्हि जे कहि लिहिले आहे ते ते तुमच्या view point -ne बरोबर आहे. पन जर खरे-खुरे उत्तर हवे आहे तर ते तुम्हाला आत्म-ग्यनिच देऊ शक्तात.

so i have humble request u to go on site for qurisity.............www.dadabhagawan.org i am sure that ur all answer will in ur hand. i can tell this much only after our disscussion. thank u all for ur opinions. !! jai satchitaanad.!!

शैलेन्द्र's picture

10 Feb 2012 - 6:47 pm | शैलेन्द्र

अहो , आताशी तर चर्चा तापयला लागलीय, लगेच जै सछिदनन्द नका करु..

विकि's picture

6 Jan 2009 - 12:17 am | विकि

राम मांसाहारी की शाकाहारी या विषयावरील वाद वाचायला मजा आली. आपण फुलटू खुष झालो.

गौरिसन्जय's picture

6 Jan 2009 - 8:59 pm | गौरिसन्जय

http://www.dadabhagwan.org/ आभरि आहे. व्यवस्थित आहे. उत्तरे मिळ् तिल. नक्किच. ..........

रामाच्या आहाराविषयीच्या जागृत चर्चा पाहून डॉले पानावले! Smiley

बाकी सिता माईच्या रेसिपिज रामायण ग्रंथात आहेत का?
तसे वाल्मिकी हे त्या काळचे फेमस साईटर होते त्यांनी नक्कीच त्यांच्या नॉवेलमध्ये या रेसिपिज दिल्या असल्या पाहीजेत.