Skip to main content

ताज्या घडामोडी - जून २०२२ (भाग ६)

लेखक मदनबाण यांनी बुधवार, 29/06/2022 20:35 या दिवशी प्रकाशित केले.
आधीच्या भागात १४५ प्रतिसाद झाल्याने नवा भाग काढत आहे. थोड्या वेळा पूर्वीच उदयपुर च्या कन्हैया लाल नावाच्या व्यवसायाने शिंपी [ टेलर ] असणार्‍या व्यक्तीच्या हत्येचा व्हिडियो पाहण्यात आला. आपल्या देशात पिसाळलेले जिहादी कुत्रे कसे मोकाट सुटलेत आणि त्यांचे पाकिस्तानी आका त्यांचे पोषण करत आहेत ते कळुन आले. पाकिस्तानला आपण अजुनही भस्म केलेले नाही आणि त्याचाच हा परिणाम आहे की आपल्या देशात आत अनेक जिहादी कुत्र्यांनी भरलेले पाकिस्तान पोसले गेले आहेत. कन्हैया लाल दोष इतकाच होता की त्याने नुपूर शर्मा चे समर्थन केले होते [ हे मला समजलेले एक कारण, इतर आत्ता तरी ठावूक नाही.] त्या व्हिडियोत त्याने मा. पंतप्रधान नरेन्द्र दामोदरदास मोदी यांना देखील धमकी दिली असुन ती खालील प्रमाणे आहे :- ''नरेंद्र मोदी सुन ले, आग तूने लगाई है और बुझाएंगे हम, इंसाअल्लाह मैं रब से दुआ करता हूं कि यह छुरा तेरी गर्दन तक भी जरूर पहुंचेगा। संख्येने अधिक असुन देखील, हिंदू आजही दुबळेच !

मदनबाण.....


वाचने 34758
प्रतिक्रिया 188

प्रतिक्रिया

आपणच नाही सगळे जग दुबळे करणं ते सगळीकडे मोकाट सुटलेत. आणखी शंभर वर्षांनी इंगजसारखंच कधीही न मावळणारा सूर्य असं असा आमचा देश असं सांगतील.

चला म्हणजे महत्वाच्या विषयावर सुप्रिम कोर्टाने दिवस रात्र एक करुन निवाडा करायला सुरुवात केली म्हणायची. अन्यथा सुप्रिम कोर्टातील सुपारी वकिलांनी गुन्हेगारांना सोडवण्यासाठी रात्री अपरात्री सुप्रिम कोर्टाला काम करायला लावुन आपल्या बाजुने निर्णय द्यायला लावलेले पाहीलेले आहे.

शेवटी भाजपाचा रडीचा डाव यशस्वी झाला आहे.. २.५ वर्षे शेवटी भेटले.. ऑपेरेशन कमळ कळाले.. छान आहे.. कर्नाटक.. गोवा.. मध्य प्रदेश.. ईशान्यकडे पण असेच केले आहे कुठल्यातरी राज्यात?... आणि आता महाराष्ट्र... साम दाम दंड भेद.. निवडणुकी आगोदर काँग्रेस आणि राष्ट्रवादी उभी फोडली आणि लोकं आपल्यात घेतली.. तरी सत्ता आली नाही म्हणुन शिवसेना आता पुर्ण उध्वस्त करून सत्ता पालटवली... वा.. भाजपा सगळीकडे.. असे नाही तर तसे... फडणवीस यांना शेवटी शांती लाभली असेल आता.. २.५ वर्षे खुप तडफड करत काढली... त्यांना शुभेच्छा... माझे मत पुढील निवडणुकी मध्ये शिवसेनेला असेल हे नक्की...

In reply to by गणेशा

माझे मत पुढील निवडणुकी मध्ये शिवसेनेला असेल हे नक्की... माझेही. त्याच बरोबर ह्या पुढे कधीही भाजपला मत देनार नाही.

उद्याच बहुमत चाचणी घ्या सुप्रीम कोर्टाचा अपेक्षेप्रमाणे निकाल आला --- बाकी, हा भाकरीचा जाहीरनामा हा संसदेचा रंडीखाना ही देश नावाची आई राजरोस निजते कुबेराच्या सोबत हे नामदेव ढसाळांच वाक्य आठवलं हा फक्त योगायोग.

In reply to by गणेशा

+१ राज्यपालानी फडणवासना १४ दिवसांची मुदत दिली होती. पण ठाकरेंना दुसर्याच दिवशी बहुमत चाचणी घ्यायला लावली, १२ आमदारांची यादी मात्र पाऊने दन वर्षे लटकवून ठेवली. ईतर पक्षातील नेते भाजपात गोले की ईडी चौकशी थांबते. भाजपचा हा राज्यपाल नी ईडीचा गैरवैपर पाहून भाजप बद्दल शिसारी येतेय. २०१४ ला चुकून मत दिलं गेलं भाजपला. यापुढे कधीही नाही. लोक ऊगाच काॅंग्रेसला नावं ठेवतात. काॅंग्रेस पक्ष ईतकाही दुबळा व्हायला नको होता. लोकशाहीत कुठल्याही पक्षाला राक्षसी बहुमत मिळू नये. हे लिब्रांडू, विचारजंत वगैरे म्हणून ज्यांना हिनवले जाते ते का सांगतात हे आज कळाले.

चला १०५ अडीच वर्षे घरी बसवले हेही नसे थोडके. परत एकदा पवार-ठाकरेंनी एकत्र येऊन हे सरकार पाडावे.

मुंबई महानगरपालिका निवडणूक शिवसेनेसाठी खुप महत्वाची ठरणार आहे . आर्थिक'', सामाजिक, नैतिक, सांस्कृतिक, मानसिक दृष्ट्या!

मुंबई महानगरपालिका निवडणूक शिवसेनेसाठी खुप महत्वाची ठरणार आहे . आर्थिक'', सामाजिक, नैतिक, सांस्कृतिक, मानसिक दृष्ट्या!

फडणवीसांच्या मार्गात अजूनही तांत्रिक अडचणी आहेत असे मला वाटते. फडणवीसांना बहुमताचा दावा करण्यासाठी शिंदे गटातील सर्व सेना आमदारांचे पाठिंब्याचे पत्र द्यावे लागेल. ते सर्व आमदार अधिकृतपणे अजूनही शिवसेनेत आहेत. कोणत्याही पक्षाचा फक्त गटनेता पक्षाच्या पाठिंब्याचे पत्र देऊ शकतो. २० जूनपूर्वी एकनाथ शिंदे गटनेता होते. परंतु २१ जूनपासून अजय चौधरीची गटनेतेपदी नेमणूक करण्यात आली आहे. ती कायदेशीर आहे की नाही हे अजून ठरलेले नाही. अशा परिस्थितीत एकनाथ शिंदे शिवसेनेतर्फे फडणवीसांना पाठिब्याचे पत्र देऊ शकतील का? न्यायालय ते मान्य करेल का? शिवसेनेचे नवीन प्रतोद सुनील प्रभू आहेत. फडणवीसांच्या विश्वासदर्शक ठरावाविरूद्ध मत द्या असा त्यांनी व्हिप काढला तर तो एकनाथ शिंदेंसह सेनेच्या सर्व ५५ आमदारांवर बंधनकारक असेल. एकंदरीत बरीच कायदेशीर गुंतागुंत आहे. तसेच या सर्व ३९ (सेना) +११ (इतर) आमदारांना मंत्रीपद किंवा महामंडळाचे अध्यक्षपद वगैरे देणे कितपत शक्य होईल? तसेच हा फुटीर गट काही महत्त्वाच्या खात्यांचे मंत्रीपद मागू शकतो. उदाहरणार्थ गृह, अर्थ, नगरविकास, महसूल वगैरे. ही खाती आपल्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात भाजपकडे ठेवली होती. आता काय करतील हे माहिती नाही.

In reply to by रात्रीचे चांदणे

त्यांना कुठल्यातरी पक्षात विलीन व्हावंच लागेल. नाहीतर आमदारकी धोक्यात तसेच पुढील पाच वर्षे निवडणूक लढवन्यावर बंदी.

श्री उठा यांनी बंडे झाले त्याच वेळी राजिनामा द्यायला हवा होता. श्री शप यांचा सल्ला घेतला, आता तेलही गेले आणि तुपही गेले.

चला आता १२ विधान परिषदेच्या नैमणुका होतील. त्यात मेधाताई, पंकजाताई वगैरे बरेच सामावले जातील. आता १८ खासदारांचे प्रकरण सुरू होईल. तेव्हां आता जरा नविन मुद्यांवर बोला. तेच तेच वाचून कंटाळा आलाय.

In reply to by श्रीगुरुजी

ते मतांचे राजकारण आहे. ते तसंच चालणार. अंतर्गत लाथाळ्यातही मला रस नाही. सगळेच महत्वाकांक्षी असतात. कोणितरी जिंकतं, कोणितरी हरतं. खरतर हे अंतर्गत राजकारण असतं त्यातलं हिमनगाच्या टोकाइतकेच आपल्या पर्यंत पोहोचतं. त्यामुळे माझा पास. मी फक्त जिंकणारा विकास करतो की नाही व तोही कमीत कमी भ्रष्टाचारात, एवढेच पाहातो. मला नाही निदान माझ्या पोराला, नातवाला प्रगत महाराष्ट्र मिळाला तरी खूप झालं इतकी माफक इच्छा आहे माझी.

In reply to by शाम भागवत

ही माफक इच्छा योग्य आहे. परंतु फडणवीस ती कितपत पूर्ण करतील याची खात्री नाही, कारण कोणत्याही परिस्थितीत आपली खुर्ची टिकविणे व त्यासाठी सर्व कारस्थाने करून वेळ पडल्यास सहकाऱ्यांच्या, समर्थकांच्या पाठीत खंजीर खुपसून विश्वासघात करणे यातून त्यांना वेळ मिळणार नाही.

In reply to by श्रीगुरुजी

माझा मोदींच्या हुषारीवर जास्त विश्वास असल्याने त्यांच्या निवडीबाबत मला शंका नाही. माझा पास.

सगळ्यात जास्त कीव नवाब मलिक व अनिल देशमुखांची येतेय. त्यांनी पार सर्वोच्च न्यायालयात जाऊन मत देण्यासाठी उपस्थित राहण्याची परवानगी मिळविली. पण परवानगी मिळाल्यानंतर २-३ तासातच उठांनी राजीनामा दिल्याने निदान ४-५ तास तरी तुरूंगाबाहेर येऊन माध्यमांना बाईट वगैरे देण्याचं त्यांचं स्वप्न हवेतच विरलं. आता त्यांना २८ जुलैपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार.

In reply to by शाम भागवत

खडसे उलट नशीबवान म्हणायला पाहिजे, हेच बंड १५ दिवस आदी झाले असते तर मिळाली ती आमदारकीही मिळाली नसती

In reply to by शाम भागवत

फडणवीस - पंगतीत बसल्यानंतर वाढपी माझ्या ताटापाशी आल्यानंतरच प्रत्येक वेळी पुरणपोळ्या कशा काय संपतात?

In reply to by श्रीगुरुजी

जसा दृष्टिकोन असतो त्याप्रमाणे टोमणे मारता येतात. :) काहींना आपला राग व्यक्त करायला मुद्देच शिल्लक राहिलेले नसल्याने......... :) दिर्घकालीन राजकारण लक्षात घेऊन, पंगतीत फडणीसांजवळ पुरणपोळ्या आल्याबरोबर फडणवीस पंगतीतून उठून गेले. ;)

In reply to by शाम भागवत

फडणीसांजवळ पुरणपोळ्या आल्याबरोबर फडणवीस पंगतीतून उठून गेले. ;) ऊठले की ऊठवले गेले? त्यांना केंद्रातून आदेश आला असं भाजप नेतेच सांगताहेत. आता फडणवींसानी सत्तर आमदारांचा गट घेऊन बाहेर पडावं, कायद्याचा नवीन अभ्यास करण्याची नाहीच. :)

In reply to by अमरेंद्र बाहुबली

काय ते एकदा ठरवा, खालील पैकी तुमचा दुश्मन कोण ते ? १. एकनाथ शिंदे २. संजय राऊत ३. शरद पवार ४. देवेद्रं फडणवीस ५. भाजपा पक्ष परिस्थिती प्रमाणे तुम्ही गोल पोस्ट बदलत आहात.

In reply to by शाम भागवत

जसा दृष्टिकोन असतो त्याप्रमाणे टोमणे मारता येतात. :) हे खडसेंना मारलेल्या टोमण्यावरून दिसतच आहे. दिर्घकालीन राजकारण लक्षात घेऊन, पंगतीत फडणीसांजवळ पुरणपोळ्या आल्याबरोबर फडणवीस पंगतीतून उठून गेले. ते उठून गेले नाहीत. पुरणपोळ्यांवर आडवा हात मारण्याचे ते मनातल्या मनात मांडे खात होते. परंतु वाढपी त्यांच्या पानाशी आल्यावर यजमानांनीच त्यांना ताटावरून उठवलं. मोदी-शहांचा फडणवीसांवर पूर्ण विश्वास आहे व जेव्हा सत्तास्थापनेची वेळ येईल तेव्हा ते फडणवीसांचीच निवड करतील असं तुम्ही पूर्वी अनेकदा सांगितलंय. परंतु काल सत्तास्थापनेची वेळ आल्यावर मोदी-शहांनी फडणवीसांना खड्यासारखे दूर करून पक्षाबाहेरील व्यक्तीवर विश्वास ठेवला.

In reply to by शाम भागवत

त्रागा करून टोमणे मारणे हे शिवसेनेचे व्यवच्छेदक लक्षण आहे. तसे न करता आपले अंदाज चुकले हे मान्य करा.

In reply to by श्रीगुरुजी

हत तेरी. येवढेच होय. चुकला माझा अंदाज. आता झालं का समाधान. :)) मी तज्ञ वगैरे नक्कीच नाही. माझे अंदाज नेहमी बरोबर येतात असा माझा दावाही नाही. :) पण मोदींचा फडणवीसांवर विश्वास आहे हे नक्की. मला एवढे पुरेसे आहे. :) ते पंप्र बनतील, बनणार नाहीत. त्यांचे पाय ओढणे चाललंय वगैर गॉसीपमधे मला खरोखरच रस नाही. मविआ सरकारची कार्यशैली मला पटत नव्हती. कोणी विरोधात गेले की, त्याच्यावर केसेस घालणे पटत नव्हते. उठा हे अजिबात कार्यक्षम व कार्यकुशल नाहीत व ते मुमं पदाला लायक नाहीत असे वाटत असे. आता जे काही घडतंय त्यात महाराष्ट्राचे भले आहे असं वाटतंय. शिंदे नक्कीच उठापेक्षा कित्येक पटीने सरस आहेत. शिवाय त्यांचा राष्ट्रवादीला विरोध आहे एवढे मला पुरेसे आहे. महाराष्ट्राची वाटचाल वाईटातून चांगल्याकडे आता होईल एवढे मला पुरेसे आहे. ती अमूक एका व्यकिच्या हातून व्हावी असे काही नाही. पण हा बदल घडवताना फडणवीसांनी दाखवलेली हुषारी ही कायम लक्षात राहणारी असणार आहे. तसेच पक्षशिस्त पाळणे म्हणजे काय याचे इतके उत्तम उदाहरण त्यांनी घालून दिले आहे की, पंकजाताई किंवा पर्रिकरांचा मुलगा ह्यांच्या सारख्यांना त्यातून खूप शिकता येईल. मोदी गुजराथच्या कारभारात ढवळाढवळ करतात ( प्रत्यक्षात त्यांचेमुळे संबंधीतांना मनमानी करता येत नव्हती) म्हणून त्यांना पक्षाने आदेश दिला होता की त्यांनी गुजराथच्या राजकारणात लक्ष घालू नये. इतकेच नव्हे तर त्यांनी गुजराथेत येऊही नये. एकप्रकारची तडीपारीच. त्यांना हरियानाची जबाबदारी देऊन दिल्लीला जायला सांगितले होते. मोदी पूर्णपणे बरोबर असूनही त्यांनी आदेशाचे पालन केले होते. २००० च्या अगोदरची गोष्ट आहे ही. अगदी याच पध्दतीने फडणवीस वागत असतील तर मोदींना त्यांचेबद्दल काय वाटत असेल? बस्स. एवढेच तुमच्या फडणवीसांबद्दलच्या राग द्वेषाबद्दल शुभेच्छा. आता तरी झाले का समाधान? :))))))

In reply to by शाम भागवत

कोणी विरोधात गेले की, त्याच्यावर केसेस घालणे पटत नव्हते. +१ तसेच ईडी ही राज्यसरकारी संस्था भाजप नेत्यांच्या मागे लावणेही चुकीचे होते. भाजपातील नेते शिवसेनेत गेले की ईडी चौकशी बंद व्हायची, ह्यामुळे तर मला महाविकास आघाडीची किळस यायची. पण हा बदल घडवताना फडणवीसांनी दाखवलेली हुषारी ही कायम लक्षात राहणारी असणार आहे. सहमत. ईतर राज्यात राज्यपाल, केंद्रीय यंत्रनांचा गैरवापर करून सत्तापालट होत असताना लोकशाही मार्गाने सत्ता मिळवन्याची फडणवींसांची हुशारी कायम लक्षात राहनारी आहे.

In reply to by शाम भागवत

आधी टोमणे मारून त्रागा करण्याऐवजी आणि नंतर एवढा मोठा निबंध लिहिण्याऐवजी माझा अंदाज चुकला एवढं वाक्य पुरेसं होतं. असो. फडणवीसांबद्दल माझा जो काही राग आहे (द्वेष नाही) त्यामागे सबळ कारणे आहेत. जोपर्यंत ते कार्यपद्धती बदलत नाहीत तोपर्यंत राग राहणारच.

मुख्य म्हणजे आपली एसटी, कंकाकांची आवडती. त्या सेवकांच्या पदरात काही पडतंय का त्यावरही लक्ष ठेवायचं. छे. कामाची यादी वाढतच चाललीय. ठाकरेंच सरकारच होतं तेच रं होतं. ;)

In reply to by शाम भागवत

स्टेट ट्रानस्पोर्ट. यातून गरीब रयतेची सेवा देणे हे नफ्यापेक्षा अधिक उच्च ध्येय असतं. त्यावर हल्ले करून बंद पाडली की खाजगी कंत्राटदारांचं फावतं. केरळ,कर्नाटकात पन्नास टक्के खाजगी बसेस आहेत तरीही एसटी दणदणीत चालते. त्यांचे वेगवेगळे डेपो आहेत. स्वच्छ. पण दुर्दैवाने भाजपच्याच राजस्थान, मप्रमध्ये एसटी चालत नाही. ------------------ कामांबद्दल बोलायचं तर वीस वर्षे रुंदिकरणात रखडलेला गोवा रस्ता एक वर्षांत तयार होईल पाहा. --------- सामनाचा अग्रलेख आज काय छापतो याची उत्सुकता होती. "सत्ता मिळवली पण पुढे काय?" असा अनपेक्षित गुळमुळीत लेख आहे. ---------------- पुढे काय ? तर ठाकरेंची पावर संपवणे हेच दिल्लीतील भाजपचे ध्येय आहे. आणि यासाठी यशस्वी बंड करू शकणारा दिघेसेनेतून आलेला नेता हेच उत्तर आहे. म्हणूनच फडणवीसांना बाजूला ठेवले आहे. पवार आणि ठाकरेंचे लक्ष्यच भाजपने काढून घेतले आहे आणि ही खेळी जबरदस्त आहे. ठाकरे सेना संपवली की मुंबईची पेटी भाजपकडे जाणार. या धोरणापुढे एकट्या फडणविसांचे करिअर दुय्यम ठरते. बाकी अजितदादा काहीही बोलले की त्यावर पांघरूण घालणे आणि अजितला काही कळत नाही हे सांगणे एवढेच मोठ्या काकांचे काम उरले आहे. सुळेताईंचे ममतापूर्ण सल्ल्यांना राजकारणात काही वजन असेल असं वाटत नाही. ((पावसात भिजणे, पेंग्विन,वाइल्डलाइफ,पुरणपोळ्या ,फोटोग्राफी, यावरच्या टोमण्यांसाठी फेसबुक आणि वाटसप आहेच. ))

महाराष्ट्र सरकारने अत्ता लवकरात लवकर जैतापूर आणि नाणार प्रकल्पावर काम सुरू करायला पाहिजे. मुंबई मेट्रोचे कामही लवकर संपवायला पाहिजे.

In reply to by रात्रीचे चांदणे

असे काही मोठे प्रकल्प infrastructure म्हणून आणण्यासाठी केंद्र सरकार ( कोणतेही असो) आंतरराष्ट्रीय करार करत असते. बऱ्याच प्रकल्पांना समुद्रकिनारा लागतो. भारत सरकारचा प्रकल्प म्हटला तरी जमीन कोणत्यातरी राज्य सरकारने द्यायची असते. तर याबाबतीत बंगाल,तमिळनाडू, केरळ,कर्नाटकवाले पक्के विरोध करतात. उरले ओडिशा, गुजरात आणि महाराष्ट्र. परत त्यांतील आमदारांचा त्यांच्या मतदारविभागाचा विरोध होतो. राणे यातच अडकले. प्रकल्प वेळेत सुरू करायला दिला नाही तर काम तर नाहीच आणि पेनल्टी बसते. आंतरराष्ट्रीय नकारात्मक रेटिंगही वाढते. एन्रॉन कितीदा बुडवलं आणि वर काढलं हे आपल्याला माहिती आहेच. त्या निखाऱ्यांवर पोळ्या भाजल्याच.

ठाकरे सुसंस्कृत मुख्यमंत्री म्हणून नेहमी आठवणीत राहतील। आजचा विजय हा कुनीतीचा.. लाचारीचा आणि आमदार खरेदी विक्रीचा आहे.. ज्याने आपल्याच पक्षातील निस्टावंताना दूर केले त्याने निदान आता तरी आक्रस्ताळेपणा सोडून काम करावे हि इच्छा... 2.5 वर्षे चांगले काम करण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांना शुभेच्छा.. निदान पुढच्या निवडणुका साठी फोडाफोड न करता कामाच्या जीवा वर मत मागतील हि अपेक्षा

In reply to by अमरेंद्र बाहुबली

आनंद नाही का होणार?

In reply to by श्रीगुरुजी

>>>मला तर अत्यानंद झालाय. 'फौजदाराचा हवालदार' झाला म्हणून...! ;) -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>मला तर अत्यानंद झालाय. 'फौजदाराचा हवालदार' झाला म्हणून...! ;) मलाही. त्याच बरोबर आमदार वडील तसेच मंत्री काकू अश्या घराणेशाहीतून आलेल्या फडणवीसांना मुख्यमंत्री न बनवता जनसमान्यातून ऊठलेल्या, मातीशी नाळ जूळलेला शिंदेंना मुख्यमंत्री बनवलं ह्याचा आनंदंही वाटला. :)

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

बिरुटे सर, फडणविस तर मुख्यमंत्री या पदावरुन उपमुख्यमंत्री पदावर तरी गेले. अशोक चव्हाणांचे काय मुख्यमंत्री या पदावरुन थेट मविआ सरकार मधे कॅबिनेट मंत्री तेही PWD. याला काय म्हणाल तुम्ही ? 'फौजदाराचा वॉचमन' झाला म्हणून...! ;))

In reply to by प्रसाद_१९८२

एखाद्या मुख्यमंत्र्याने भविष्यात एखाद्या सरकारमध्ये मुख्यमंत्री न होता कॅबिनेट मंत्रीपद स्वीकारण्याचा प्रसंग महाराष्ट्रात व इतर राज्यातही आलेला आहे. १९७५-७७ - शंकरराव चव्हाण मुख्यमंत्री १९७८-८० - शरद पवार मुख्यमंत्री व शंकरराव चव्हाण कॅबिनेट मंत्री १९९९ - नारायण राणे मुख्यमंत्री २००५-१४ - सुशीलकुमार शिंदे, विलासराव देशमुख, अशोक चव्हाण व पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना राणे कॅबिनेट मंत्री २००८-१० - अशोक चव्हाण मुख्यमंत्री २०१९-२२ - ठाकरे मुख्यमंत्री व अशोक चव्हाण कॅबिनेट मंत्री १९९६-९७ - गुजरातमध्ये सुरेश मेहता मुख्यमंत्री १९९८-२००१ - केशुभाई पटेल मुख्यमंत्री व सुरेश मेहता कॅबिनेट मंत्री सिंगापूर या देशात सुद्धा १९६१ पासून प्रदीर्घ काळ ली क्वान यू हे पंतप्रधान होते. पण १९९० नंतर पंतप्रधान झालेल्या गोह चॉक टॉंग यांच्या मंत्रीमंडळात ते मंत्री होते व त्यांचा उल्लेख सिनिअर मिनिस्टर असा होत होता.

In reply to by गणेशा

ठाकरे सुसंस्कृत मुख्यमंत्री - असतील ना पण त्याचा संबंध काय इथे? इथे विषय होता मूलतः जनतेने १०६+५६ कौल डायल आणि अतिशय सांधर्न्हहीन अशी युती सेनेनी केली टवाय लोक ( सेनेतील आणि सेनेचे बाहेरील हितचिंतक हा होता , आणि अश्या सुसंकृत व्यक्तील श्री संजय उवाच काय पातळीवर जाऊन बोलत होते ते दिस ला नाही? सुसंकृत माणूस नुस्ताचह स्वतःचं वर्तत सुसंकृत असून चहाला नाही तर आपल्या पक्षाचे हे "मुख पंटर आणि त्याचाच संपादक" काय बोलतो ते हि कसे असावे यावर लक्ष ठेऊन असावा लागतो आजचा विजय हा कुनीतीचा--- २. वर्षांपूर्वी जनतेला फसवलं तेव्हा जथे गेली होती नीती? जनतेनी नव्हती दिली माता ५६+४४+५२ साठी विसरतंय सोयीस्कर रित्या काकांनी खेळी खेळली तर ते चाणक्य आणि भाजप ने तसे काही केली ती कूनीती .. वाह रे वाह फडणवीस यांना शुभेच्छा.. निदान पुढच्या निवडणुका साठी फोडाफोड न करता कामाच्या जीवा वर मत मागतील हि अपेक्षा आमची हि मुळात इच्छा अशीच होती कि सेनेने स्व बळावर सत्तेवर यावे ,, आणि मग उर बडवावे कि बघा "बाळासाहेबांची इच्छा पूर्ण केली ! या शिवाय हे बंड सुरु झाल्यावर लोकांचं सहानुभूती साठी जो काही कांगावा चालला होता ( मी वर्षा सोडतो पण राजीनामा देण्यासाठी कोणतरी एकानी सामोरे बोलावे,,,, ४० निघून गेले भीतीने ते दिसत नाही ( भाटी = राऊत मुडदे येतील म्हणून बोलतात ! ) तेवढेच काय स्वतः काकानी पण आयुष्ता स्व बळावर सत्ता मिळवली असती तर त्यांना सेमी चाणक्य तरी म्हणलो असतो ... मुळात लोकशाहीत काँग्रेस इतरांना पण सत्तेत यायचा अधिकार आहे हे ६०-७० वर्शे सत्ता म्हणजे फक्त काँग्रेस हेच असे गृहीत दाहरणाऱ्यांनी विचहर बदल्याची तयारी ठेवलाय पाहिजे त्या लडाख असो भाजप सत्तेत ना येता आता परत निवडणूक व्हावया हेच जनतेसाठी जास्त चांगले असे वाटते