शा वि कु जी..
सदर टेलिग्रामस चा संदर्भ मला पीत पत्रकारिता आणि त्याबद्दल चा इतिहास इंटरनेट वरती शोधाशोध करताना मिळाला होता..त्यामुळे मी तो ह्या लेखात वापरला आहे. आता त्या तार संदेश बद्दल सत्य असत्य काय असेल त्याबाबत अजून शोधाशोध करायला वाव आहे हे मान्य!
चांगली माहिती आहे. लेखकास धन्यवाद!
अशाच एका वृत्तपत्रास हाताशी धरून फिडेल कॅस्ट्रोने आपली भंपक कम्युनिस्ट क्रांती पुढे रेटली होती. त्या वृत्तपत्रहस्तकाचं नाव हर्बर्ट मॅथ्यूज.
-गा.पै.
फिडेल कॅस्ट्रोने जशी आपली भंपक कम्युनिस्ट क्रांती पुढे लोटली, तशीच क्रांती आजही कम्युनिस्ट पार्टीला भारतात करायची आहे हे विसरू नका.
स्टलिन किंवा कॅस्ट्रो यांनी साम्यवादी राजवट आल्या आल्या आपल्या विरोधकांना गोळ्या घालून ठार केले होते. व्हिएत्नाम मध्ये पण कम्युनिस्ट सत्ता आल्याबरोबर सर्व
साम्यवाद विरोधक त्वरित मारले गेले. म्हणजे अक्षरशः भिंतीलगत उभे करून गोळ्या घालतात हे लोक. तेव्हा कोणतीही ह्युमन राईट्स वाली संघटना काहीच म्हणत नाही.
हाँगकोंग मधून लोकशाहीवादी लोक अचानक गायब होतात ते पण असेच असावेत असा संशय आहेच.
पण त्या लेख मधून आपण काही शिकल पाहिजे.
जगात अनेक देशातील उदाहरणे आहेत.
ज्यांनी खूप छान प्रगती केली आणि ह्या असल्या घाणेरड्या मीडिया मुळे,एकमेकात द्वेष पसरवून त्या वर पोळी भाजनाऱ्या राजकारण्यांना मुळे. त्या देशांची अर्थ व्यवस्था,सामाजिक शांतता धुळीस मिळाली अन्न अन्न दशा झाली.
त्या मधील एक ठळक उदाहरण व्हेनेझुएला देशाचं.
एक वेळ हा देश जगात श्रीमंत होता सर्व जनता सुखात आणि वैभवात होती.
आज त्यांना 2 वेळ चे अन्न मिळत नाही.
आपल्या देशात पण तेच चाललं आहे.
पाकिस्तान दुश्मन देश म्हणून फक्त सरकारी पातळीवर च दुष्मणी असायला हवी होती.
पण देशातील जनतेत द्वेष निर्माण केला गेला त्याचा परिणाम दोन्ही देशाला बसला.
जातीय द्वेष,धार्मिक द्वेष,आक्रमक राष्ट्रीयत्व हे सर्व घातक आहे.
विचार पटले नाहीत की त्याच्या वस्तू वर बहिष्कार टाका, समाज घटकांवर बहिष्कार टाका.असले प्रकार.भारतात वाढत आहेत आणि हे असेच चालू राहिले तर जो आता प्रगतिशील भारत आहे तो भारत जगातील गरीब देशात गणला जाईल.
तेव्हा आता सामान्य लोकांनी सावध राहणे गरजेचं आहे कोणत्याच उन्माद ला बिलकुल थारा दिला नाही पाहिजे.
पाकिस्तान दुश्मन देश म्हणून फक्त सरकारी पातळीवर च दुष्मणी असायला हवी होती.
म्हणजे कसं ?
संसदेवर हल्ला झाला (त्यात डायरेक्ट पाकिस्तानचा हात नव्हता वगैरे मुद्दे कामाचे नाहित) तर ति सरकारी पातळीवर दुश्मनी ठरवुन सरकारने कारवाई करायची.
कसाबने मुंबईवर हल्ला केला (त्यातही पाकिस्तानी सरकारचा हात नव्हताच.. असं म्हणतात) तर तो सरकारी पातळीवर हल्ला नसल्यामुळे लोकांनी फार काहि सिरियसली घ्यायचं नाहि.. असा काहि फरक करायचा का?
विचार पटले नाहीत की त्याच्या वस्तू वर बहिष्कार टाका, समाज घटकांवर बहिष्कार टाका.असले प्रकार.भारतात वाढत आहेत
हे असले प्रकार फार बालिश कॅटॅगरीत मोडतात हे खरं आहे. पण मग ऑर्गनाइझ्ड आणि समंजस पद्धतीने जनतेने कसे वागावे याबद्द्ल कोण पुढाकार घेतोय ?
तेव्हा आता सामान्य लोकांनी सावध राहणे गरजेचं आहे कोणत्याच उन्माद ला बिलकुल थारा दिला नाही पाहिजे.
उन्माद वाईटच. पण मग युद्ध एकदम दाराशी आलं कि जागं व्हायचं का ? कि बर्याच मान्यवरांनी मागे दिला तसा चिनी आक्रमणाला उद्धारकर्ते समजुन पाठिंबा द्यायचा?
माध्यमं अतिशय एकांगी होत चालल्यामुळे मला वाटतं सगळ्यांनीच त्यांच्या मूळ मताच्या विरुद्ध बाजू सतत ऐकली पाहिजे. म्हणजे भारतात मोदी ना मूळ मत असेल तर काँग्रेस, शिवसेना इ पक्षाच्या बाजू सुद्धा ऐकायला हव्यात. माझ्या मताच्या विरुद्ध काहीच ऐकणार नाही, असं करण्यापेक्षा "मी सगळ्याच बाजू ऐकून मत ठरवेन" हे जास्त बरोबर होईल.
अशा कानठळ्या बसवणाऱ्या आरोळ्या रोज रात्री घराघराच्या>>
हे चॅनेल्स लोक कसे बघतात तेच कळत नाही. मरे कुठल्या बाजूने आहात, रोज घरात फुकटचा आरडा ओरडा आणून आपल्या घराचं तापमान वाढवून मनःशांती का घालवायची :(
माध्यमं अतिशय एकांगी होत चालल्यामुळे मला वाटतं सगळ्यांनीच त्यांच्या मूळ मताच्या विरुद्ध बाजू सतत ऐकली पाहिजे.....
आपल्याकडे दोनहजार चौदानंतर हे प्रमाण खूप वाढले, विरोधातलं काहीही ऐकून घ्यायचं नाही, विरोधात असेल ते सर्व व्यवस्थेतून काढून टाकायचं. याचं उत्तम उदाहरण म्हणजे, एबीपी न्युज मधील पुण्यप्रसून बाजपेयीचा राजीनामा आणि त्या सर्व घटना. प्राइम टाइम मधील कार्यक्रमात मा. मोदीसेठ यांच्या एका बातमीचा भंडाफोड केला त्यांना नौकरी गमवावी लागली. मास्टर स्ट्रोक या कार्यक्रमात सरकार विरोधीतलं सत्य समोर आणले आणि प्राइम टाइममधील कार्यक्रम बंद झाला. सवीस्तर व्हीडीयो निवांत बघा. सध्याचं सरकार आपल्यावर खोटं कसे लादल्या जातं त्याचं उत्तम उदाहरण आहे. जरुर पाहावे. माध्यंमांचा भारतीय प्रवास कसा होतोय हे आपल्या सर्वांच्या लक्षात यावे.
-दिलीप बिरुटे
आपल्या देशात सध्या मीडियाचा जो धुडगूस चालू आहे तो फार काही वेगळा नाही.
सहमत....! गोदी मिडियाकडून काय अपेक्षा करणार ? मूळ प्रश्नांकडून आपलं लक्ष दुसरीकडे नेण्याचा उत्तम प्रयोग सुरु असतो. आपण करोनाशी झुंजत असतांना माध्यमं आपल्याला सुशांतसींगच्या आत्महत्त्याभोवती फिरवत राहीले, लावला टीव्ही के सर्वच वाहिन्यांवर तेच. अपवाद होत्याच. रवीशकुमारचं प्राइम टाइम सध्या एकमेव वाहिनी जी घटनांच्या बातम्यांचा उत्तम मागोवा घेत असते. सुशांतसींग-कंगना रावत चालवले, भारत-चीन, आता भारत पाकिस्तान वगैरे चालू ठेवतील. रोजगार, बेकारी, हे तर आता सरकारचे प्रश्नच राहीलेले नाही. महागाई, लोकांच्या प्रश्नांवर माध्यमं बोलत नाहीत. आपण कंटाळून टीव्ही बंद करावा अशा प्रकारे तुम्हाला बातम्यांपासूनही दूर ठेवल्या जातंय. चालायचंच...!
-दिलीप बिरुटे
अतिशय रोचक लेख !
या युद्धाबद्द्ल नविन माहिती कळाली !
दोघांचे भांडण तिसर्याचा लाभ अशी मराठीत म्हण आहे पण लाभासाठी भांडणे लावणारे म्हणजे मढ्यावरचं लोणी खाणारी जमात !
अगतिकता वाईट असते !
धन्यवाद सर्वांचे !! तसं बघायला गेलं तर हा लेख थोडा घाबरत घाबरत टाकला होता...कारण हाच लेख मी माझ्या फेबु भिंतीवर पोस्ट केलाच होता पण तिकडून काय फक्त अंगठे मिळाले..सकारात्मक किंवा नकारात्मक असे काहीच प्रतिसाद मिळाला नाहीत..मग म्हणले खरे जाणकार आणि अनुभवी मंडळींचा समूह म्हणजे मिपा..तिथे पाठवून बघू!!पुन्हा एकदा आभार !!
एस.बी.,
तुम्ही मिपावर लेख प्रकाशित करायचा अत्यंत योग्य निर्णय घेतला आहे. बिनधास्त लिहा इथे. आंतरराष्ट्रीय विषयांवर मराठीतनं व्यक्त व्हावंसं वाटणं ही मराठीची ताकद आहे. तिचा पुरेपूर वापर होऊ द्या.
धन्यवाद.
आ.न.,
-गा.पै.
विकृत व्यापारी मानसिकतेमधून तयार झाली आहे... म्हणजे सगळे व्यापारी विकृत असतात?
छुपा साम्यवाद म्हणतात तो असाच पसरवला जात असावा का?
हेच गुलाबजाम साम्यवादी होते आणि असतात तेव्हा मात्र सगळे गुळण्या धरून बसतात हे पण नोंदवलेच पाहिजे.
सध्या द हिंदु सारखे साम्यवादी पेपर चालवत असलेला चीनी प्रपोगंडा हे पण विषारी गुलाबजामच आहेत. जर आक्षेप असेल तर तो सर्व प्रकारांवर असावा. फक्त व्यापारी संदर्भ घ्यायचा आणि साम्यवादी प्रपोगंडा सोडायचे असे योग्य नाही.
रशियन केजीबी ने नोवोस्टी या संस्थे मार्फत संपुर्ण भारतीय मिडिया आपल्या ताब्यात ठेवला होता. प्रमुख पत्रकार आणि संपादक सुद्धा रशियन पे रोल वर होते असे म्हणतात. तेव्हा सुद्धा विषारी गुलाबजामच दिले जात होते. आपले परराष्ट्र खाते सुद्धा रशिया चालवत होते अशी शंका तेव्हा व्यक्त होत असे. हा इतिहास विसरता येण्यासारखा नाही. जे काय वाईट होत असे ते सर्व सीआयए करते असे धड्धडीत छापुन आणले जात असे. खाली मित्रोखिन आर्काव्हज दुवा दिला आहे.
या भयंकर षडयंत्राची माहिती मुळातून वाचण्यासारखी आहे.
अधिक माहिती:
https://www.cia.gov/library/readingroom/docs/CIA-RDP86T00586R0004004900…https://mitrokhinarchiveii.blogspot.com/
निनाद जी
सध्या तरी मी छुपा किंवा जाहीर असा कुठल्याच इजम चा नाही आहे..
विकृत व्यापारी हा शब्द मी केवळ त्या लेखातील २ वर्तमानपत्र समूह साठी वापरला होता. आणि सद्य परिस्थितीत माध्यमं जे वृत्तांकन आणि टीव्ही ट्रायल चालवत आहेत त्यावरून पीत पत्रकारिता हा शब्द वाचनात आला आणि तेंव्हा अजून माहिती मिळवताना ह्या वरील नमूद सर्व घटना निदर्शनास आल्या त्या स्वतच्या शब्दात संकलित करून आणि सद्य परिस्थितीत समर्पक वाटल्या म्हणून सर्वांसमोर मांडल्या.
पण ह्यात कोणत्या एक विशेष विचारधारेचा उदो उदो करायचा आहे आणि दुसऱ्या विचारधारेचे प्रतिमा हनन करावयाचे आहे असे बिलकुल नाही..
आणि हिंदू पेपर म्हणाल तर तो फक्त लोकसेवा आयोगाच्या परीक्षे मधल्या मार्क पुरता वापरात आहे!( माझ्याबाबत बोलले तर!! )
मग तसे लेखनातून मला वाटले नाही. अगदी छुपे लिबरल्स जसे लिहितात त्या पद्धतीचा लेख वाटला म्हणून तसे स्पष्ट लिहिले. पीत पत्रकारिता ही फार जुनी आहे. अनेक वर्षे भारतात चाललीच आहे. सुमार केतकर ते गिरिष चोरबाजार काय लिहितात हे हे पाहा. त्यांचा कोणताही लेख काढला तर त्यातल्या सगळ्या पिवळ्या छटा स्पष्ट दिसतात.
जर आक्षेप असेल तर तो सर्व प्रकारांवर असावा. फक्त व्यापारी संदर्भ घ्यायचा आणि साम्यवादी प्रपोगंडा सोडायचे असे योग्य नाही.
सहमत .. पण झोपलेल्याला उठवता येते , झोपेचे सोंग घेतलेल्याला नाही तसे ..
सत्ताधारी पक्षातील अति टोकाच्या विचारसरणीच्या लोकांचा विरोध झाला पाहिजे पण तो करताना इंग्रजीत म्हणतात तसे " चेरी पिकिंग " करतात काही पत्रकार / लेखक ..
अंगावर यायला लागला कि अळी मिळी गुप चिळी! मग सगळ्या मेणबत्या कपाटात बंद
अजूनही गुजराथत दंग्यांचा विषय निघाला कि सुरवात का झाली ते मात्र सोयीस्कर रित्या विसरायचे लुटन च्या दिल्ली ग्यांग मध्ये हेच शिकवले जाते ..
शेवटी साम्यवादी आणि छुपे लिबरल्स हेच तर करत राहतात.
सामान्य माणसाला सारखे सांगत रहायचे:
देश चांगला चाललेला नाही.
लोकशाही सिसिटिम्स बरोबर नाही,
समाज चांगला नाही,
माध्यमे चांगली नाहीत
कुणावरच विश्वास ठेऊ नका...
डिस र्मेशन चे कँपेन करून सामान्य माणसाला भंडावून टाकायचे आणि एक वैचारिक गोंधळ तयार करायचा. कोणतीही राष्ट्रवादी राष्ट्रहिताची संवेदना तयार होऊ द्यायची नाही. पण तेच उघडे पडले की 'मला असे म्हणायचेच नव्हते असा कांगावा करायचा.
ही फार जुनी मोडस ऑपरंडी आहे या इको सिस्टिमची.
लेख रोचक आहे या बद्दल शंका नाही आणि एका जुन्या "बातमी युद्धची" माहिती मिळाली ..
क्युबा हे अमेरिकेच्या उंबरठयावर घुसलेली डोकेदुखी आहे पूर्वीपासून ... त्याबद्दल अजून माहिती मिळाली
सध्या तुमच्या आजूबाजूला अशाच अनेक विषारी मिठाई वाल्यांच्या चुलीवर कढई तापत ठेवलेल्या दिसतील...
पण आपली हि शेवटची ओळ वाचली आणि खेदाने असे म्हणावेसे वाटते कि याचा रोख तोच आहे जो सकाळ सारख्या माध्यमातून श्र्रीअम पवारांसारखे थथाकथित "स्वतंत्र" पत्रकार करतात जो रतीब घालतात तोच ...
काह्ही करा पण अधून मधून हे छापून आणा "भारतात कशी एकाधिकारशाही चालू आहे बातमी देण्याचे स्वत्रंत नाही राहिले .. वैगरे ..."
आपण खालील गोष्टीत जर केल्यात तर मग खरंच म्हणता येईल कि लेखक दोन्ही बाजू विचार करून लिहितो
- निनाद यांनी पुढे दाखवले तसे समाजवादी / कम्युनिस्ट राज्यकारणांनी भांडवलशानसारखेच जे काही चुकीचे जगात केले ते हि उघडकीला येउद्यात त्यावर लिहा
- भारतात जर खरंच "बातम्यांचे विषारी गुलाबजाम वाटले जात" असतील तर ते काय फक्त एकच बाजू वाटते? शेखर गुप्ता, सरदेसाई बरखा इत्यादी ग्यांग काय समतोल पणाचे अमृत वाटत असतात का? अधःपाव अधःपाव प्रत्येकी !
- संपूर्ण लोकशाही पद्धतीने दोनदा निवडून आलेल्या आपल्याला ना पटणाऱ्या सरकारचे वाभाडे काढणाऱ्यांनी आणीबाणी लादणारी "भारतमाता आणि तिचे सुपुत्र पिढ्यान पिढ्या चालतातात ! तेवहा नवहते गुलाबजाम वाटले जात ?
उगाच काहीतरी एकांगी
लेखकाने कम्युनिझमशी कोणतीही संलग्नता दाखवली नाहीये, कम्युनिझम निष्पाप आहे असा कोणताही दावा केला नाहीये, किंबहुना कोणत्याच एका विचारधारेवर टिका केली नाही. अशा वेळेस कम्युनिष्ठांचे नाव काढणे ही शुद्ध व्हॉटअबाउटरी आहे (असे माझे मत.)
लेखकाने कम्युनिझमशी कोणतीही संलग्नता दाखवली नाहीये,
नाही? मग सध्या असे गुलाबजाम कोण वाटतंय ? हे तरी स्पष्ट कर्ववे , टीव्ही ला ना घाबरता! लेखकाने
ताकाला जाऊन भांडं कशाला लपवायचं ?
सरळ म्हणा ना न संघ परिवार प्रणित विकलेली माध्यमे विषारी गुलाबजाम वाटत आहेत किंवा निदान साम्यवादी राजवटीतील २ उद्धरणे द्यावी "ब्यालंस" म्हणून ! काय ?
अर्णब गोस्वामी वाटतोच आहे विषारी गुलाबजाम. लेखकाने नाव नाही लिहिले हा त्यांचा मोठेपणा आहे. कॉन्सर्व्हेटिव्ह विचारांचा पत्रकार वेड्यासारखा वागतो आहे असे म्हणल्याने माणूस कम्युनिस्ट होत नसतो.
संघ प्रणित वैगेरे तुमचा मुद्दा आहे, तुम्हाला त्यावर लिहिण्यासारखे वाटत असेल तर लिहु शकता, आणि त्या लेखात या लेखाचा दुवा देऊ शकता.
ब्यालॅन्स चा आग्रह केल्यापेक्षा ज्यावर लिहिले जावे असे वाटत आहे त्यावर आपण लिहावे. इतरांना ह्यावर का नाही लिहिलं आणि त्यावर का नाही लिहिलं विचारणं म्हणजेच व्हॉट अबौट्री.
अर्णब गोस्वामी तसे करत असेल तर गेली वीस वर्षे नाराजदीप वाटत होता ते काय निराळ्या प्रकारचे विषारी गुलाबजाम होते का?
पहिल्यांदाच या लिबरल्स ना तडाखा मिळाला आहे. त्यांना जश्यास तशी उत्तरे मिळायला लागली आहेत. नाराजदीप आणि त्याची गँग जे खोटे आणि विषारी गुलाबजाम निर्वेध पणे वाटत होते. युट्युबमुळे त्यातले विष उघड करून दाखवले जाऊ लागले आहे. म्हणून तर यांना हे सगळे बंद व्हायला हवे आहे. त्यांची ईको सिस्टिम ढासळायला लागली आहे. म्हणून तर हे विविध मार्गांनी गळे काढत आहेत.
तुम्ही परवाच व्हॉट आबाऊटरी कम्युनिस्ट कावा आहे असे म्हणत होता, तर तुमचा व्हॉट आबाऊटरीला विरोध आहे असे समजतो. इथे राजदीप आणि बरखा वैगेरे मला विचारून तुम्ही तेच करत आहात. माझी या लोकांबद्दल काय मते आहेत तुम्हाला माहित नाहीयेत, आणि अर्णब गोस्वामी बद्दल बोलायचे असेल तर यांचा निषेध करूनच बोलावे लागेल असे मी मानत नाही. मी अर्णब गोस्वामीला शिव्या घालत असलो, आणि राजदिपचे हायपोथॅटिकली समर्थन करत असतो तरी माझे अर्णब बद्दलचे म्हणणे निराधार होत नाही. अ वाईट आहे म्हणल्यावर ब क ड बद्दल बोलणे यालाच व्हॉट अबौट्री म्हणतात.
(गरज नसली तरीही- तुमची राजदीप बरखा इत्यादी मते बव्हँशी मान्य आहेत. पण मी एखादा शिक्का मारला कि वैचारिक जबाबदारी संपत नाही अश्या मताचा आहे. एखादा माणूस संघी किंवा कम्युनिस्ट असण्याने त्याचे म्हणणे आपसूक चूक किंवा बरोबर होत नाही. त्यामुळे कम्युनिस्ट माणसाची आणि संघी माणसाची हि कम्युनिस्ट किंवा संघी आयडेंटिटी आउट ऑफ कंटेक्सट वर आणू नये, अशा मताचा मी आहे. म्हणजेच, अर्णब असो वा राजदीप. त्यांचे प्रत्येक म्हणणे चूक किंवा बरोबर नसते.)
राजदीप बरखा इत्यादी तुमच्या मते विषारी गुलाबजाम वाटत आहेत, तर हे असे वागणे कोणत्याही सुविचारी माणसाला पटणार नाही.
पण तुम्ही हा लेख केवळ अर्णबच्या गटावर आहे असे समजले. म्हणजेच इतरत्र वाईट गोष्टी दिसत असून लेखक त्यावर बोलत नाही, म्हणजेच लेखक कम्युनिस्ट प्रोपौगंडयांशी सहमत आहे असा तर्क तुम्ही लढवला. जे माझ्या मते अयोग्य आहे. लिबरल, कम्युनिस्ट असे लेबल तुमच्या दृष्टीने "वाईट, मूर्ख, दुष्ट, देशद्रोही" यांच्या समानच आहेत असे वाटले (चुभुद्याघ्या.) आणि ते लेबल तुम्ही लेखकाला चिकटवून टाकलेत, ह्याचे मला वाईट वाटले.
हा लेख तुम्ही उल्लेखलेल्या "वैट्ट, दुष्ट" पत्रकारांवर आहे असे समजण्याचे तुमच्याकडे पुरेपूर स्वातंत्र्य होते.
तुम्ही अर्णब गोस्वामी चे नाव घेतले म्हणून मी इतर नावे घेतली. मला सोईस्कर असेल तेव्हा माझा व्हॉट आबाऊटरीला विरोध आहे आणि राहील.
असा तर्क तुम्ही लढवला. मी सरळ सरळ प्रश्न केला आहे की छुपा साम्यवाद असाच पसरवला जातो का?
मी काय आणि कसा विचार करावा याचे स्वातंत्र्य तरी मला असावे.
तुम्ही हवा तसा विचार करा.
तुम्हाला सोयीस्कर असेल तेव्हा विरोध आहे-
ओकेच. हेच तर मी म्हणत होतो.
वैचारिक स्वातंत्र लेखकाला पण आहे. त्याच्या लेखाला तुम्ही डबकं म्हणत असाल तर ह्या त्यांच्या वैचारिक स्वातंत्र्याचे तुमचे दुर्लक्ष झाले असावे , म्हणूनच मी आठवण करून द्यावी म्हणलं.
(गामा पैलवान यांनी तुमचाच मुद्दा संयतपणे आणि योग्य प्रकारे मांडला आहे असे मला वाटले. त्यासाठी व्हॉट आबाऊटरी करण्याची गरज त्यांना वाटली नाही.)
ते लेबल तुम्ही लेखकाला चिकटवून टाकलेत, ह्याचे मला वाईट वाटले.
तुम्ही आनंदाने काय वाईट वाटायचे ते वाईट वाटून घ्या. माझा त्याला आक्षेप नाही! तो तुमचा वैयक्तिक स्वातंत्र्याचा भाग आहे. पण अमक्या तमक्याला ढमका फलाणा असे बोलला म्हणून तुम्हाला वाईट वाटले - याची मात्र मौज वाटली.
आता लेखकाने चिखलाच्या डबक्याचा विषय काढला तर चार शिंतोडे येणारच.
त्याने आज आज बेत काय करावा असा विषय घेतला असता तर आज आंबे मिळाले असते! अपना अपना चॉइस है!
अर्णब गोस्वामी वाटतोच आहे विषारी गुलाबजाम. = खरे असले तरी एकांगी लिहिणे
अर्णव आणि राजदीप बरखा हे सगळेच थोडयाफार फरकाने विषारी गुलाबजाम वाटत आहेत = दोन्ही बाजू मांडणे
सध्याची खास करून अर्बन नक्षल लोकांची आवडती पद्धत
- आव आणायचा " सद्य परिस्थितीवर लिहितो म्हणून आणि टीका मात्र एकाच अंगाने करायची
- धर्मावरून राजकारण नको म्हणायचं आणि धर्मावर बेतलेले आरक्षण पुढे करायचे
- भारतातही सगळे अवघड प्रश्न जणू गेल्या सात वर्षात निर्माण झाले असा कांगावा करायचा
- भारतात अल्पसंख्यांक अगदी केवीलवानाय परिस्थितीत आहेत असा जगभर प्रचार करायचा
= सगळा ढोंगीपणा
मला हवा त्याबर बोलीन मी, निष्पक्ष असो वा नसो. तुम्ही उलटतपासणी घेण्याचे काय कारण ? राजदीपवर मत दिल्यावरच अर्णव वर मत व्यक्त करायची जबरदस्ती काय लॉजिकवर करत आहात ?
प्रिय चौकस जी..
मी माझ्या लेखात अर्णब चा उल्लेख विशेष केला नाही किंवा इतर कोणत्याही कोणाचे नाव घेऊन हे पहा किती चांगलं वार्तांकन करतात आणि नाहीतर (तुम्ही म्हणता तसं संघाची माध्यम ) हे पहा किती वाईट वार्तांकन करतात अशी गटबाजी करणारी तुलना मुद्दाम केली नाही..
या उलट लेखा मध्ये दोन माध्यमांची स्पर्धा जी की त्यांच्या वैयक्तिक उद्देशाने प्रेरित झाली होती त्याच्या दावणीला कशी जनता सरसकट बांधली गेली आणि शासनाला पण मग कृत्रिमरीत्या निर्मित जनप्रक्षोभाला शांत करण्यासाठी कसे युद्धजन्य परिस्थिती मध्ये जावे लागले हे सांगणे एवढंच अपेक्षित होते..
त्याच मुळे मी माध्यमांची ही काही हातघाई सुरू आहे त्यात नाव घेऊन एकाची बाजू घेणे टाळले..पण आपण सोयीस्करपणे माझा लेख म्हणजे फक्त आणि फक्त एका व्यक्ती, किंवा पक्षा चा विरोधात आहे असा समजून वाचलात
माझा हेतू माध्यमांना वाईट ठरवणं हा बिलकुल नसून त्यांच्या स्पर्धेला बळी जाणाऱ्या नागरिकांनी गटबाजी करून एकमेकात हेवेदावे करणे,आणि वादविवाद करणे...एकमेकावर दोषारोप करणे की तू अमुक अमुक गटाचा आहेस म्हणून असे बोलतोस असे सत्ताधारी विरुद्ध विरोधी पक्ष बनून आपल्या नागरिकत्वाची निष्पक्ष परिक्षकाची भूमिका सोडण्याबाबत व्यक्त होणे एवढाच आहे .
आता ह्या स्पर्धेचा परिणाम नाहीतर अजून काय म्हणायचं ..??
की तुम्ही सरळ सरळ मला संघ माध्यम विरोधी, अर्णब विरोधी लिखाण करणारे ठरवून मोकळे झालात आणि इतरांची नावे का नाही घेतलीत याचा जाब विचारू लागले!!
एस.बी
अहो मग करा ना तुलना.. अर्णव येडे पण करत आहे तर बोला तसे.. मोकळे आहात बोलायला .. पण त्याचा बरोबर द quint/ वागले वैगरे किती एकांगी गरळ ओकतात हे हि लिहा
"सद्य परिस्थिती" वर लिहिताय ना मग दोन्ही बाजू मांडा .. एवढेच म्हणणे होते
आपण पोटतिडकीने लिहिले आहेत हे कळतंय .. पण जर समतोल नसेल तर मग विकले गेलेल्या माध्यमात आणि आपलय सारख्या प्रांजळ पणे लिहिणाऱ्या लेखात फरक तो काय ?
विषाचे गुलाब जाम/ देशभक्तीची अफू / माध्यमाची गळचेपी वगैरे जणू आज जन्माला आले असे भासवणारे लेख आले तर प्रतिक्रिया पण तशीच येणार ना ?
असो
खुलासा( अर्णव जे गुराढोरांवर ओरडावे तसा ओरडतो हे लांशांदस्पद आहे आणि त्यामानाने शेखर गुप्ता सारखे जास्त शोभनाराय पद्धतीने आपलं मुद्दा मांडतात हे मला हि मान्य आहे )
अहो, येथील दोनचार आयडी भक्तांकडे दुर्लक्ष करुन लिहित राहा तुम्ही. मिपाच्या भाषेत फाट्यावर मारणे म्हणतात. हे गोदीभक्त चांगलं काहीही लिहू देत नाही.
लेखन आवडले लिहिते राहा शुभेच्छा....!
-दिलीप बिरुटे
आता हेच बघा सदर लेखाचा विषय काय होता..
माध्यमे आणि त्यांची वैयक्तिक स्पर्धा आणि शासन आणि नागरिकांवर पडणारा प्रभाव आणि त्यामुळे एका देशात इतिहासामध्ये कसा परिणाम झाला ते सांगणे एवढंच ...
पण आता लेखावर चर्चेचे स्वरूप काय होत आहे बघा
१) लेखक फक्त अर्णव विरोधी का लीहतो?
२) ह्यात इतर माध्यमाची नावे का नाहीत?
३) या पूर्वी असे प्रकार घडले तेंव्हा का नाही बोललात?
४) लेखक एका विशिष्ट समूहाचा द्वेष करणारे आहेत का??
थोड्याच वेळात ह्या चर्चेत
१) राहुल
२) शेठ
३) पप्पू
४) जमाई सरकार
५) ७० वर्षे
६) ५६ इंच
असे शब्द पुन्हा पुन्हा आढळू लागले तर मला आश्चर्य बिलकुल वाटणार नाही!!!
माध्यमे आणि त्यांची वैयक्तिक स्पर्धा आणि शासन आणि नागरिकांवर पडणारा प्रभाव आणि त्यामुळे एका देशात इतिहासामध्ये कसा परिणाम झाला ते सांगणे एवढंच याच्याशी सुसंगत प्रतिसाद दिला आहे. नोव्होस्टी ने भारतीय शासन आणि नागरिकांवर प्रभाव कसा पाडला याचे उदाहरण दिले आहे.
जो पर्यंत सामान्य माणसाला स्वत: चे हीत कशात आहे ते समजत नाही तो पर्यंत असेच चालेल.
(उदा: एका अभिनेत्याचे आत्महत्या प्रकरण. सध्याचे महत्वाचे मुद्दे सोडुन लोक हे प्रकरण चघळत बसलेत)
दूरदर्शनवर काय आरडा ओरडा चालू आहे किंवा कोणति आत्महत्या चघळली जात आहे
याचे सामान्य माणसाला फार काही पडलेले असते असे वाटत नाही.
बाकी महत्त्वाच्या मुद्द्यावर कोणतेच सरकार काही करत नाही
सामान्य माणसाला आपले रोजचे जीवन कोण जास्त सुसह्य करेल त्याला मत देणे एवढे सोडून काही फरक पडत नाही.
त्या चर्चा सामान्य माणूस च्यूईंग गम सारख्या चघळतो आणि स्वाद संपला कि थुंकून टाकतो.
सुशांत राजपूत झाला, कंगना राणावतचा बंगला पाडून झाला हाथरस झालं, आता आपले राज्यपाल आणि मुख्यमंत्री यातील खडा जंगी झाली,
अर्णब गोस्वामी वि. परमबीर सिंघ झालं.
यानंतर आरे ची मेट्रो कारशेड झाली. जलयुक्त शिवार झालं.
आता अवकाळी पाऊस आणि त्यामुळे होणारं नुकसान आणि बळीराजा हे नित्य नियमाने येणारं यशस्वी च्युईंग गम घेतलं जाईल चघळायला.
यातल्या एका तरी प्रकरणाची तड लावली गेली आहे का?
च्युईंग गमचं पाकीट आणून च्युईंग गम चघळत राहायचं स्वाद संपला कि थुकून टाकायचं.
आणि पाकीट संपलं कि नवीन आणायचं
एकदम मान्य सुबोध जी!!
सामान्य माणसाला रोजची भाकरीची लढाई करायची असते ...
त्या मुळे चुईंग गम चघळून पोट भरत नाही हे सत्य उमगले की चुईंग गम फेकून पुन्हा भाकरीचा पाठलाग सुरू होतो दरवेळी!!
१)न्यूयॉर्क जर्नल - विल्यम हर्श्ट
२) न्यूयॉर्क जर्नल वर्ल्ड - जोसेफ पुलित्झर
... आता हे दोन माध्यमे आणि त्यांचे मालक यांनी नेमके युद्ध कसे पेटवले ते बघुयात..
मूळ घटनेतील माध्यमांची नावे लेखकाने स्पष्टपणे उल्लेखिली आहेत.
पण या घटनेचा सध्याच्या भारताशी संबंध लावताना -
सध्या तुमच्या आजूबाजूला अशाच अनेक विषारी मिठाई वाल्यांच्या चुलीवर कढई तापत ठेवलेल्या दिसतील...
या घटनेतील / घटनाक्रमातील माध्यमांची नावे उल्लेखण्यास - लेखक विसरला आहे / अनावधानाने राहून गेले आहे/ प्रयोजन नव्हते / टाळले आहे / सोयीस्कर बगल दिली आहे / अजून कोणत्या कारणाने नावे आलेली नाहीत.
हरकत नाही.
आता एका प्रतिसादात धागा लेखकाने, विषारी मिठाई वाल्यांच्या चुलीवर कढई तापत ठेवलेल्या माध्यमांची नावे स्पष्टपणे उल्लेखावित.
तसेच सध्या म्हणजे किती काळापासून हेही स्पष्ट करावे.
वाद संपुष्टात आणण्याचा हा एक उत्तम मार्ग आहे, नाही का?
सकारात्मक + माहितीपूर्ण प्रतिसादाच्या प्रतीक्षेत असलेला
वामन जी
मी त्या अमेरिकन माध्यमाची नावे स्पष्ट पणे घेतली कारण त्यांच्या कृती आणि स्पर्धा यांचा अंतिम परिणाम युद्ध मध्ये झाल्याने त्यांचावर आपण थेट संबंध जोडून चर्चा करू शकतो
या उलट भारतीय संबंधात बोलताना सदर प्रक्रिया जवळपास सारख्याच प्रमाणात सुरू आहे एवढंच मला म्हणायचं आहे..आणि भारतीय प्रक्रियेचा अजून दृश्य आणि सर्वमान्य असा बरावाईट परिणाम निष्पन्न झालेला नाही आहे कारण ती प्रक्रिया अजून गतिमान आहे तर अशा परिस्थितीत उगाच ह्याची त्याची नावे मांडून हे चांगले आणि ते वाईट असा न्याय निवाडा करणे मला योग्य वाटले नाही म्हणून त्यांचा उल्लेख केला नाही.
"भारतीय प्रक्रियेचा अजून दृश्य आणि सर्वमान्य असा बरावाईट परिणाम निष्पन्न झालेला नाही आहे"
असं म्हणता पण अवॉर्ड वापसी ग्यांग तर म्हणतेय फार परिणाम झालाय// वाट लागलीय.. खास करून हि मंडळी जेव्हा भारताबाहेरील माध्यमांना मुलाखती देतात ना तेवहा "भारतात काय अराजक " माजलाय असंच दाखवतात ...
जाऊदे ...भारतातील पत्रकारितेतील फार थोडे अपवाद सोडले तर सुमार दर्जाची आहे असेच खेदाने म्हणावे लागते ... एकावेळी ८ जण "पॅनल " वर घेऊन काय आरडा ओरडा चालू असतो... हे राम...
एस बी क्षमा करा परंतु आपण प्रश्नाला बगल देताय...
अहो वामन जी
अवॉर्ड वापसी वाट्टेल ते म्हणते ..आणि सरकार च समर्थन करणारे गट पण वाट्टेल ते बोलून आपलाच ढोल बडवत बसतात...
अवॉर्ड वापसी गॅंग आपल्याला सोयीस्कर असा प्रक्रियेचा अर्थ लावून भारतीय पत्रकारितेवर नामउल्लेख करून दोषारोप करत असतील ...पण माझ्या मते पत्रकारिता हे एक असे क्षेत्र आहे की ज्याच काम नजर ठेवणे आहे दृष्टिकोन पुरवणे नाही. ह्या सीमारेषा पुसट होऊन जी अंधाधुंद माजत आहे त्यावर बोलायचे म्हणून लेखात सरसकट सर्वांचा उल्लेख माध्यमे असा केला !पण आता सुरुवातीला कोणी मला अर्णब बद्दल जोडून जाब विचारू पाहिले तर आता तुम्ही अवॉर्ड वापसी सोबत माझा बादरायण संबंध जोडता आहात!!!
ज्याचा फायदा होत आहे तो वर्ग म्हणतो देश चांगला चालला आहे ! हा वर्ग कोण आहे हे इथे लिहायची गरज नाही ! ज्याचे त्याच्या अपेक्षेपेक्षा वाईट चालले आहे तो म्हणतो हा देश वाईट चालला आहे . आपला देशाच्या प्रगतीत व्यक्तिगत फायदा काय हे प्रथम पाहिले जाते .ते आयडीयोलोजी वगरे सब झूठ नसते पण त्याला ऐकूण महत्व कमी !
प्रोपगंडाचे वस्त्रहरण करणारे लेखन वाचायला आवडत असल्याने लेखातील माहिती ह्यापूर्वीच माझ्या वाचनात आलेली असली तरी हा लेख आवडला! लेखात आपण स्पॅनिश-अमेरिकी युद्धाचे एकच उदाहरण दिल्याने तो थोडा त्रोटक वाटला असेही नमूद करतो.
जानेवारी ते डिसेंबर २०१७ ह्या काळात लोकसत्ता मध्ये श्री. रवी आमले ह्यांचे प्रचारभान नावाचे सदर येत असे, त्यात अशा अनेक गोष्टींची रोचक माहिती त्यांनी दिली आहे. त्या लेखांचे संकलन करून ‘प्रोपगंडा : प्रचार | जाहिरात |अपमाहिती | आणि बरेच काही...’ नावाचे पुस्तकही प्रकाशित झालेले आहे.
वरती एका प्रतिसादात आपण लिहिले आहे कि,
सद्य परिस्थितीत माध्यमं जे वृत्तांकन आणि टीव्ही ट्रायल चालवत आहेत त्यावरून पीत पत्रकारिता हा शब्द वाचनात आला आणि तेंव्हा अजून माहिती मिळवताना ह्या वरील नमूद सर्व घटना निदर्शनास आल्या त्या स्वतच्या शब्दात संकलित करून आणि सद्य परिस्थितीत समर्पक वाटल्या म्हणून सर्वांसमोर मांडल्या.
त्यामुळे ह्या विषयात रस असलेल्या आपल्या सारख्या लेखक आणि इतर वाचकांना वरील माहिती उपयोगी पडू शकेल असे वाटल्याने ती दिली आहे. अर्थात तटस्थपणे रवी आमले ह्यांचे लेखन वाचताना त्यांच्यावर असलेला लोकसत्ता दैनिकाच्या अजेंड्याचा दबाव स्पष्टपणे जाणवत असला तरी ते सदर खूप माहितीपूर्ण आहे!
धन्यवाद.
भारतीय लोकांना पाकिस्तानी जनतेचा भयंकर राग येतो आणि पाकिस्तानी पण भारतीय नागरिकांचा तीव्र द्वेष करतात.
हिंदू आणि मुस्लिम हे एकमेकांचे शत्रू आहे त असे दोन्ही समाजातील लोक का समजायला लागली.
उच्च जाती आणि कनिष्ठ जाती एकमेकांविषयी चांगला विचार च करू शकत नाहीत म्हणून आमच्याच जातीचा लोकप्रतिनिधी असावा ,अधिकारी असावा
ही मानसिकता कधी निर्माण झाली.
चांगल्या सवयी सोडून लोक फास्ट फूड च्या नादाला का लागली.
दुसरा गट आपल्यावर अन्याय करतोय ही मानसिकता कशी निर्माण झाली.
ह्याला फक्त आणि फक्त माध्यमांनी चालवलेला अजेंडा च कारणीभूत आहे.
मध्याम स्वतः अजेंडा तयार करतात .का
तर ह्या प्रश्नाचे उत्तर नाही आहे.
लबाड,ढोंगी,दृष्ट विचाराची लोक अजेंडा तयार करून मीडिया मार्फत लोकांमध्ये राबवतात आणि हा अजेंडा हा वाईट हेतू नीच पसरवला जातो.
त्या मुळे अर्णव ,आणि बरखा ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत.
ह्या मध्ये हा चांगला हा वाईट असा कोणी नाही .
दोघे ही वाईटच आहेत.त्यांच्या मुळे कोणत्याच समाजाचे भले होणार नाही,देशाचे भले होणार नाही.
मुळात अजेंडा हा वाईट घडावे ,नुकसान व्हावे म्हणूनच चालवला जातो.
विषेरी झाडाला फळ ही विषारी च येणार.
हिंदू आणि मुस्लिम हे एकमेकांचे शत्रू आहे त असे दोन्ही समाजातील लोक का समजायला लागली.
ह्याला फक्त आणि फक्त माध्यमांनी चालवलेला अजेंडा च कारणीभूत आहे.
अजिबात असहमत ...या दोन धर्मांमध्ये असलेली तेढ हि केवळ राजकारणी किंवा माध्यम यांचयामुळे असे ढकलून मूळ प्रश्न लपविला जातो
- विविध देशातील मुस्लमानन बरोबर वेळ घालवल्यानंतर १-२ गोष्टी लक्षात आल्या त्यावरून लिहितोय ( यात मी नोकरी हि मुसलमानांकडे केलीय आणि माझा भाडेकरू हि मुसलमान होता )
१) धर्म आणि देश हा प्रश्न आला कि जेवढया सहजतेने बरेच हिंदू "देश आधी" असे म्हण्याला तयार असतात तेवढे कितीतरी मुसलमान नसतात किंवा टाळतात
२) जेथे राहतो तिथे खाणे पिणे यात समरसून जाताना हिंदूंना फारशी अडचण येत नाही , मुसलमानांना येताना दिसते आणि याला कारण फक्त धर्म
३) इस्लाम फोफावला तो आक्रमकतेने ,, ख्रिस्ती धर्म हि फोफावला पण आज भारतीय हिंदूंचायत आणि मुसलमानातच का जास्त भांडणे ? त्यामानाने हिंदू आणि ख्रिस्ती लोकान्चायत कमी दिसतात का? हिंदू जर हलकट असतील तर आधी ख्रिस्ती मग बुद्ध आणि मग पारशी यांना वाटेला लावतील ना ? झालाय तसं? फारसा नाही ना!
कारण हे इतर धर्म इस्लाम एवढे आंधळे वागताना दिसत नाहीत म्हणून
४) वरील प्रश्न थोडयाफार फरकाने इस्लाम आणि इतर धर्मांमध्ये पण दिसतात ( मियांमार ) त्यामुळे एकटे हिंदूच मुस्ल्माननचं विषयी मनात अढी धरून आहेत हे विधान खोटे पडते
५) जगभरचे ओझे वाहने ( इराकी मुसलमान भाडेकरू मला सांगायला लागला कि भारतात मुसलमानाची वाईट परिस्थिती वैगरे मी त्याला म्हणाला अरे भारतात कितीतरी इराकी बसतील तेवढे मुसलमान आहेत ,, आला सध्याचा सरकार आणि झाला का त्यांचा ऑश्वित्झ कॅम्प ? " किंवा भारतातील मुसलमान जयने माझेकडून घर खरेदी केले त्याची मखलाशी कि इसिस कसे तसे वाईट नाही ...! ( काही वर्षांपूर्वी)
तेव्हा हा गुलाबी चष्मा जरा बाजूला ठेवावा.. आणि बघावे अवती भवती... त्यासाठी चड्डीवाला संघी होण्याची काहीच जरुरी नाही
मूळ प्रश्न हाच आहे कि कोणत्याही मुसलमानाला विचार कि धर्म आधी कि देश/ लोकशाही?
.. मेख तिथेच आहे , इंग्रजीत म्हणतात तसे "मिलियन डॉलर QUESTION "
समाजातील विविध घटकांनी एकमेकाला दोषी ठरवून एकमेकाच्या विरूद्ध विचार व्यक्त करायची काही गरज नाही.
देश हित,राज्य हित आणि आपले स्वतःचे हित अबाधित ठेवायचे असेल तर कोणत्याच उन्माद निर्माण करणाऱ्या,द्वेष निर्माण करणाऱ्या प्रचाराला सामान्य लोकांनी बळी पडू नये.
बळी पडला तर अशा गोष्टींचा शेवट शेवटी सामान्य लोकांचा बळी जाण्यातच होतो.
जगात अनेक जिवंत उदाहरणे अस्तित्वात असताना परत आपण त्याच चुका करत असू तर भवितव्य नक्कीच अवघड आहे.
राजेश भाऊ मी अनुभवातून बोललो .. अजून पण उद्धरणे या समाजाची मी आधी दिली आहेत ... ती हवे तर खोदून काढा किंवा तुमची उद्धरे द्या
अजून एक उद्धरण आहहेत आणि मी आधी हि दिली आहेत ( अफगाणी मुसलमानाने माझे शाकाहारी जेवण पण नाकारणे , सांगलीतलंय तरुण मुसलमानाचे अचानक कडवे धार्मिक बनणं इत्यादी )
माझा भाडेकरू हेंद्राबादी मुसलमान आणि त्याची बायको
येथे बरेचदा प्रत्यक्ष भाडेकरूला भेटावे सुद्धा लागत नाही महिनोन महिने तरी काही कारणाने एकदा भेटलो .. त्याने चहा विचारला आणि सोबत खजूर खाणार का म्हणून विचारले.. म्हणले हो चालेल .. समोर आले ते लांबुडकाय गुलाबजाम / किंवा बिस्कीट सारखे... छान होते पण मला कळले नाही कि याला तो खजूर का म्हणतोय...
मी धूर्तपणे विचारून त्याच्याकडून काढून घेतले
अरबस्तानातील खजूर चांगले + आपण मुसलमान + म्हणून जणू आपण बनवणाऱ्या मिठाईला अरबस्तानाची आठवण म्हणून खजूर नाव!
हे म्हणजे कसे झाले माहिती का , पाकिस्तानी लोक स्वतःला उगाचच अरबी वंशाचे समजतात ( हे मी म्हणत नाही अनेक विद्यमान मुस्लिम सुद्धा हि टीका करतात ताहीर गोरा यांचे भाष्य पहा )
म्हणजे काय तर वहाबी इस्लाम कसा नसानसात पसरेल याचे हे उदाहरण...
उगाच आपलं सगळं कस आलबेल आहे असे समजू नका .. अब्राहमीक धर्मांचा सरळ जग भर प्रसाराचा कार्यक्रम आहे . त्यात भरकटलेला समाजवादी+ कम्युनिस्ट खात घालायला . आपण वेन्धले पण करून आपण नाहीसे होऊ एकदिवस ... मग बस तुम्ही आपल्या
अहो धर्मांध पणा कोणालाच नकोय हो .. प्रत्येक हिंदू काही संघी नाही कि त्याला हिंदुराष्ट्र्र हि नकोय पण या चापलुसी चा आता जाम कंटाळा आणि उबग आलाय ..मग ती चहा ची जाहिरात असो नाहीतर बोटचेपी धोरणे असोत ... एकवेळ ओवेसी परवडला त्याच्याशी दोन हात तरी करता येतात पण कान्हया नको . एकवेळ काँग्रेस परवडली पण हे शॅम्पेन पिट सामाजिक न्याय बोलणारे भडभुंजे समाजवादी नकोत ( अरुंधती रॉय, प्रयाग राज इत्यादी )
असे समजले तरी .
जो धर्म देशापेक्षा त्यांचा धर्म श्रेष्ठ मानतो,त्याची निष्ठा देशाशी नसून धर्माशी आहेत.
पर धर्मीय लोकांना नष्ट करणे ही त्या धर्माची शिकवण आहे .
हे सर्व च्या सर्व खरे आहे असे मानले .
तरी त्या धर्माच्या लोकाचा द्वेष करून,त्यांच्या वर मीडिया मधून टीका करून,त्यांना मारझोड करून हा प्रश्न सुटेल का.
तर नाही.
त्या साठी देशातील वातावरण शांत हवे,आर्थिक विकास सर्व स्तरावर हवा.
मीडिया नी फक्त बातम्याच द्याव्यात न्यायाधीश बनू नये.
उत्तम दर्जाचे सरकार ,आणि सर्वोत्तम प्रशासन देशात स्थापित झाले की तुम्ही म्हणता त्या वर आरामात नियंत्रण ठेवता येईल.
त्यांना कायद्या नी राहण्यास भाग पाडता येईल.
त्यांच्याच समाजातील लोक मदतीचा हात पुढे करतील.
द्वेषातून काहीच निष्पन्न होणार नाही.
द्वेषातून काहीच निष्पन्न होणार नाही.
हो बरोबर अहो कोणाला वेळ आहे द्वेष करण्यात...आणि इच्छा
पण हि नाराजी का आहे हे तपासून पाहण्याचा मोकळे पण तरी दाखवा हो.. हिंदूंना साहिशुनतेचा सल्ला देण्या पेक्षा
संघ गेला खड्यात , भाजप गेलं खड्यात, मी गाय खाणारा, देवळात फारसा ना जाणारा केवळ जन्माने हिंदू आहे तरी मला या मुसलमानांच्या असल्या वागण्याचा प्रथम कंटाळा मग उबग आणि मग राग येतो ते का? कधी विचार केलाय तुमच्यासारख्यांनी आणि हे सर्व आधी लिहिल्याप्रमाणे जगातील भारतासह २ /३ देशातील वर्तणूक पाहून मग लिहीत आहे तेव्हा मुद्य्यांचा बोला .. उगा लोकांनी शांत राहावे भडकू नये वैग्रे गप्पा खूप झाल्या ..
आणि जातीबद्दल बोलताय तर हे हि लक्षात ठेवा कि इसिस ( विचाराने) नाग्या तलवारी घेऊन आल्यावर तो काय हे बघणार आहे कि तुम्ही जोशी कि पाटील कि कांबळे ? तुम्ही आम्ही काफीरच ... जगाच्या अंतापर्यंत
धृविकरण कसे होते याचा उत्तम नमूना.
हेच काँग्रेस, समाजवादी, पुरोगामी व कम्युनिस्टांना अजून समजलेले नाही. भाजपाला विरोध करण्याची तीच जुनी पध्दत अवलंबणे अजूनही चालू आहे. यातून भाजप दिवसेंदिवस बळकटच होत चालला आहे.
ज्यांचा भाजपाशी काहीही संबंध नाही अशी लोकं भाजपाकडे वळवण्यात या लोकांचा मोठा हात आहे. मुख्य म्हणजे अशा नव्या लोकांना संघी / भक्त म्हणून हिणवल्यामुळे तर ही नवीन लोकं जाम चिडतात. त्यामुळे त्यांच्या आजूबाजूची लोकंपण (जी नेहमी राजकारणापासून चार हात लांब राहतात) भाजपकडे वळायला लागतात.
पण काँग्रेस, समाजवादी, पुरोगामी व कम्युनिस्ट अजूनही आपले जुने व बोथट झालेले हत्यार बदलायला तयार नाहीत. त्यामुळे त्यांना फक्त भाजपाला जोरदार विरोध केल्याचे मानसिक समाधान मिळते. मते मिळत नाहीत असे दिसून येतंय.
मतदान टक्केवारीच्या अभ्यासात तरत्या मतदारांना खूप महत्व दिले जाते. हे तरते मतदार मोठ्या संख्येने भाजपकडे ढकलले जात आहेत. त्यांनाही "काँग्रेस + समाजवादी + पुरोगामी + कम्युनिस्ट" यांना कोणताही पर्याय न मिळाल्याने भाजपाला मत देण्याशिवाय पर्याय राहात नाही.
असो. चालायचेच. इश्वरेच्छा बलियसी.
मुस्लिम ब्रॉदरहूड या संकल्पनेत सर्व गोष्टींची उत्तरे दडलीयेत. जिथे राहतोय त्यापेक्षा इतर इस्लामिक जगात काय चालल्ये त्याकडे बारीक लक्ष.
उदा. स्वातंत्र्य पूर्व काळात गांधीजींनी दिलेल्या खलिफा आंदोलनास दिलेला पाठिंबा आठवा.
प्रश्न होता तुर्कस्थान मधला आणि इथले मुस्लिम लोकं ( ज्यांना त्या सगळ्याने काहीही फरक पडणार नव्हता ) पेटून उठली होती.. आणि गांधीजी सारख्या सेकुलर ( ठो.. ) माणसाने मुस्लिम लोकांनी भारतातील स्वातंत्र्य लढ्यात भाग घ्यावा किंवा त्यांचा पाठिंबा मिळावा म्हणून खिलाफत आंदोलन दिलेला पाठिंबा..
इस्राईल चा द्वेष भारतीय मुस्लिमांनी करण्याचे काय कारण?? इस्राईल भारतासाठी नेहमीच भरोश्याचा मित्र राहिला आहे मग इस्राईल चे नाव घेतल्यावर भारतीय मुस्लिमांना शिसारी येण्याचे कारण काय?
रोहिंग्या मुस्लिमांना भारतात अवैध रित्या ठेवून घ्या म्हणण्याची प्रवृत्ती.
इथले खाऊन, मोठे होऊन, ISIS साठी लढण्यासाठी इराक कडे जाणे.
काय च्या काय लॉजिक.
अश्या प्रकारचे conflicts फक्त इस्लाम मानणाऱ्या लोकांमध्येच होतात. हेच लोकं माय पेक्षा मावशी आणि शेजारीण यांची जास्त काळजी करताना दिसतात. त्यामध्ये अशिक्षित, सुशिक्षित, श्रीमंत, गरीब असं काहीच नाहीये.. अपवाद आहेत पण फारच कमी आहेत.
ह्या गोष्टी बरेचसे लोकं दुर्लक्ष करतात का तर म्हणे हे सगळे नेत्यांनी किंवा राजकारण्यांनी चालवलेल्या गोष्टी आहेत. पण हे इतके सोपे नाही. थोडा जनसंपर्क वाढवा. गुळगुळीत आणि गोड गोड वाक्यांनी टाळ्या मिळतात, वस्तुस्थिती झाकली जात नसते.
आणि कसले हिंदू मुस्लिम,दलित,ब्राह्मण करत बसलाय.
देशाची अर्थ व्यवस्था गाळात गेली आहे
प्रशासन काय लायकीचे आहे ते सांगण्याची गरज नाही.
न्याय व्यवस्था चा दर्जा खालावत चालला आहे तिथे न्याय मिळेल ह्याची खात्री नाही.
न्यायाधीश पण पण कायद्या ला फाट्यावर मारून स्वतःची मत वापरून न्यायदान करत आहेत.
जगातील सर्वात जास्त गरीब भारतात राहतात.
ही स्थिती पाहिली सुधारणे गरजेचे आहे.
हिंदू ,मुस्लिम,दलित,अमका ह्या असल्या फालतू गोष्टीत ताकत वाया घालवण्यात काही अर्थ नाही.
अराजक?? बाप रे??
ते आणि कधीपासून माजलेय? गेल्या 4-5 वर्ष्यापासून का??
बाकी प्रश्नाला आणि प्रॅक्टिकल मुद्द्यांना छान बगल देता तुम्ही..
बॉडी मध्ये कँसर डेव्हलोप होत असताना सर्दी खोकला आणि डोकेदुखी कडे लक्ष देण्यासारखं झाले..
कँसर चा पहिल्यांदा काही डायरेक्ट त्रास होत नाही त्यामुळे त्याच्यासमोर इतर दुखणी मोठी मानून त्यांच्यात गुंग होऊन जाणे सोपे आहे.. पण नंतर पुढच्या स्टेज ला गेल्यावर कँसर एकतर अवयव तरी घेऊन जातो किंवा संपूर्ण शरीर (जीव )
असो चालुद्या..
एकच धर्म असलेली राष्ट्र फक्त उन्माद मुळे बुडाली.
त्याचे सर्वात ठळक उदाहरण पाकिस्तान.
मुस्लिम राष्ट्र आज त्यांची काय अवस्था आहे.
उर्दू भाषिक मुस्लिम,हिंदी भाषिक मुस्लिम, बांगला भाषिक मुस्लिम ह्या उन्माद मध्ये देशोधडीला लागले .
आफ्रिकेतील अनेक राष्ट्र एक धर्मीय आहेत .
बुडाली ती लोकांची अवस्था खराब आहे.
केनिया ,येमेन ETC.
UAE मुस्लिम राष्ट्र पण धर्म घरात ठेवला आज श्रीमंत आहेत.
Abhganisthan एक धर्मीय मुस्लिम राष्ट्र आहे काय आहे त्यांची अवस्था.
भारताने ह्या मार्गाने जावू नये.
फक्त राज्य घटनेणी सांगितल्या प्रमाणे तंतोतंत राज्य कारभार करावा.
आणि फक्त प्रगती करावी.
कायद्याचे च राज्य असावे.
प्रतिक्रिया
महत्वाचा लेख.
...
In reply to महत्वाचा लेख. by शा वि कु
शा वि कु जी..
In reply to ... by शा वि कु
असेच म्हणतो...!
In reply to महत्वाचा लेख. by शा वि कु
चांगली माहिती
त्या वृत्तपत्र आणि फिडेल
In reply to चांगली माहिती by गामा पैलवान
अजूनही
In reply to चांगली माहिती by गामा पैलवान
छान!
धन्यवाद!!
In reply to छान! by उपयोजक
लेख तर छान च आहे
पाकिस्तान दुश्मन देश म्हणून फक्त सरकारी पातळीवर च दुष्मणी...
In reply to लेख तर छान च आहे by Rajesh188
माध्यमं अतिशय एकांगी होत
सहमत.
In reply to माध्यमं अतिशय एकांगी होत by वीणा३
मस्त लेख ! आपल्या देशात सध्या
धन्यवाद!! पण आपली अंतिम
In reply to मस्त लेख ! आपल्या देशात सध्या by दुर्गविहारी
प्लस वन.
In reply to मस्त लेख ! आपल्या देशात सध्या by दुर्गविहारी
अतिशय रोचक लेख !
धन्यवाद सर्वांचे !! तसं
In reply to अतिशय रोचक लेख ! by चौथा कोनाडा
अत्यंत योग्य निर्णय ....
In reply to धन्यवाद सर्वांचे !! तसं by एस.बी
लेखक छुपे लिबरल वाटतात
निनाद जी
In reply to लेखक छुपे लिबरल वाटतात by निनाद
मग तसे
In reply to निनाद जी by एस.बी
झोपेचे सोंग
In reply to लेखक छुपे लिबरल वाटतात by निनाद
विकृत व्यापारी मानसिकतेमधून
In reply to लेखक छुपे लिबरल वाटतात by निनाद
हेच
In reply to विकृत व्यापारी मानसिकतेमधून by सुबोध खरे
अगदी बरोबर....!
In reply to हेच by निनाद
लेख रोचक आहे
लेखकाने
लेखकाने कम्युनिझमशी कोणतीही
In reply to लेखकाने by शा वि कु
हो
In reply to लेखकाने कम्युनिझमशी कोणतीही by चौकस२१२
मग
In reply to हो by शा वि कु
तुम्ही
In reply to मग by निनाद
तुम्ही अर्णब गोस्वामी
In reply to तुम्ही by शा वि कु
नक्कीच.
In reply to तुम्ही अर्णब गोस्वामी by निनाद
तुम्ही
In reply to तुम्ही by शा वि कु
आवडती पद्धत
In reply to हो by शा वि कु
आजिबात नाही.
In reply to आवडती पद्धत by चौकस२१२
सक्ती !
In reply to आजिबात नाही. by शा वि कु
का ?
In reply to सक्ती ! by चौकस२१२
प्रिय चौकस जी..
In reply to लेखकाने कम्युनिझमशी कोणतीही by चौकस२१२
एस.बी
In reply to प्रिय चौकस जी.. by एस.बी
लिहिते राहा....!
In reply to प्रिय चौकस जी.. by एस.बी
विषय बदल कसा होतो त्याच स्मॉल स्केल उदाहरण
सुसंगत
In reply to विषय बदल कसा होतो त्याच स्मॉल स्केल उदाहरण by एस.बी
जो पर्यंत सामान्य माणसाला
दूरदर्शनवर काय आरडा ओरडा चालू
त्या चर्चा सामान्य माणुसच
त्या चर्चा सामान्य माणूस
यातल्या एका तरी प्रकरणाची तड लावली गेली आहे का?
च्युईंग गमचं पाकीट आणून च्युईंग गम चघळत राहायचं स्वाद संपला कि थुकून टाकायचं. आणि पाकीट संपलं कि नवीन आणायचंखरे एकदम खरे बोललात..
In reply to त्या चर्चा सामान्य माणूस by सुबोध खरे
१)न्यूयॉर्क जर्नल - विल्यम
वामन जी
In reply to १)न्यूयॉर्क जर्नल - विल्यम by वामन देशमुख
"भारतीय प्रक्रियेचा अजून
In reply to वामन जी by एस.बी
अवॉर्ड वापसी गॅंग मधे कुठे सोडता मला नेऊन वामन जी
In reply to "भारतीय प्रक्रियेचा अजून by चौकस२१२
आमचा आपला एक थिअरम
प्रोपगंडाचे वस्त्रहरण करणारे लेखन वाचायला
नवं पुस्तक..!! धन्यवाद!!
In reply to प्रोपगंडाचे वस्त्रहरण करणारे लेखन वाचायला by टर्मीनेटर
पुस्तक ऑर्डर करायचे की नाही
In reply to नवं पुस्तक..!! धन्यवाद!! by एस.बी
Madhy
"मिलियन डॉलर QUESTION "
प्रत्येक वाक्याशी सहमत.
In reply to "मिलियन डॉलर QUESTION " by चौकस२१२
पूर्णपणे सहमत
In reply to "मिलियन डॉलर QUESTION " by चौकस२१२
हा विषय असा आहे की
सगळं कस आलबेल आहे
In reply to हा विषय असा आहे की by Rajesh188
तुमची मत योग्य आहेत तुमचे अनुभव योग्य आहेत
In reply to सगळं कस आलबेल आहे by चौकस२१२
द्वेषातून काहीच निष्पन्न होणार नाही.
In reply to तुमची मत योग्य आहेत तुमचे अनुभव योग्य आहेत by Rajesh188
.
In reply to द्वेषातून काहीच निष्पन्न होणार नाही. by चौकस२१२
✓
धृविकरण कसे होते याचा उत्तम नमूना. हेच काँग्रेस, समाजवादी, पुरोगामी व कम्युनिस्टांना अजून समजलेले नाही. भाजपाला विरोध करण्याची तीच जुनी पध्दत अवलंबणे अजूनही चालू आहे. यातून भाजप दिवसेंदिवस बळकटच होत चालला आहे. ज्यांचा भाजपाशी काहीही संबंध नाही अशी लोकं भाजपाकडे वळवण्यात या लोकांचा मोठा हात आहे. मुख्य म्हणजे अशा नव्या लोकांना संघी / भक्त म्हणून हिणवल्यामुळे तर ही नवीन लोकं जाम चिडतात. त्यामुळे त्यांच्या आजूबाजूची लोकंपण (जी नेहमी राजकारणापासून चार हात लांब राहतात) भाजपकडे वळायला लागतात. पण काँग्रेस, समाजवादी, पुरोगामी व कम्युनिस्ट अजूनही आपले जुने व बोथट झालेले हत्यार बदलायला तयार नाहीत. त्यामुळे त्यांना फक्त भाजपाला जोरदार विरोध केल्याचे मानसिक समाधान मिळते. मते मिळत नाहीत असे दिसून येतंय. मतदान टक्केवारीच्या अभ्यासात तरत्या मतदारांना खूप महत्व दिले जाते. हे तरते मतदार मोठ्या संख्येने भाजपकडे ढकलले जात आहेत. त्यांनाही "काँग्रेस + समाजवादी + पुरोगामी + कम्युनिस्ट" यांना कोणताही पर्याय न मिळाल्याने भाजपाला मत देण्याशिवाय पर्याय राहात नाही. असो. चालायचेच. इश्वरेच्छा बलियसी.😀
मुस्लिम ब्रॉदरहूड या
In reply to सगळं कस आलबेल आहे by चौकस२१२
देशात अराजक माजले आहे
In reply to मुस्लिम ब्रॉदरहूड या by बाप्पू
अराजक?? बाप रे??
In reply to देशात अराजक माजले आहे by Rajesh188
एकच धर्मीय राष्ट्र बुडाली
In reply to अराजक?? बाप रे?? by बाप्पू