लेखकअनन्त्_यात्रीयांनी शुक्रवार, 12/07/2019 17:16 या दिवशी प्रकाशित केले.
काल धरण बांधिले
खेकड्यांनी हो तोडिले
येरू म्हणे बघा नीट
विठू चरणीची वीट
सृष्टीचा जो तोले भार
त्यासी विटेचा आधार
युगे अठ्ठावीस ठेला
विठू विटेवरी भला
वीट अजूनी अभंग
बघणारे होती दंग
मूळ माल जर नीट
(जशी विठ्ठलाची वीट)
तर फिजूल बोभाट
नको खेकडी खटपट
बरोबर आहे.
भारताच्या राजकारणाला लागलेला हा खेकडारोग (कर्करोग) नागरिकांच्या कराला आणि इतर संसाधनांना भगदाडे पाडत असतो. तो समूळ नष्ट झाला पाहिजे, तरच उज्वल भवितव्याची आशा ठेवता येईल !
खेकड्याची औलाद म्हणता म्हणता
बापालाच आरोपी केलं
हर्रामी राहिले असेच मोकळे
गाव वाहून गेलं
कुणी बांधलं , कसं बांधलं
बसेल समिती आता
तोपर्यंत साले हादडून घेतील
मग निवांत खातील लाथा
प्रतिक्रिया
बरोबर आहे.
20 वर्षापुर्वी हे धरण बांधले गेले.
समयोचित कविता
चपखल कविता.
प्रतिसाद