संस्कृतची ऍलर्जी का?
कारण ती किचकट, कठीण व अत्यंत दुर्बोध भाषा आहे. शिवाय ती भाषा येणारे बहुतेक लोक आणि त्या भाषेचे पुरस्कर्ते स्वत:ला लैइ शाणे समजतात व सगळीकडी शाणपट्टी करत असतात. किंबहुना, ह्याच भिकारचोट लोकांमुळे मला तरी संस्कृत भाषेची ऍलर्जी आहे! :)
मराठी संकेतस्थळाचे सरपंच या नात्याने त्यांचे काहीतरी करताय काय? त्यांचा चावटपणा पाहून किव येऊ लागली आहे.
अजून मिपावर आणिबाणी सुरू आहे त्यामुळे ह्या संदर्भात लवकरच एक वटहुकूम जारी केला जाईल! :)
तात्या.
.... शिवाय ती भाषा येणारे बहुतेक लोक आणि त्या भाषेचे पुरस्कर्ते स्वत:ला लैइ शाणे समजतात व सगळीकडी शाणपट्टी करत असतात. किंबहुना, ह्याच भिकारचोट लोकांमुळे मला तरी संस्कृत भाषेची ऍलर्जी आहे!
१००% सहमत.
अहो ते लोक (समोरच्याला संस्कृत फारसे समजत नाही ह्याची खात्री झाली की )तसले उच्चार ऐकवुन समोरच्याला
घाबरवुन टाकतात.
आपलेच,
असल्या विद्वानांना टरकलेले
जन सामान्यांचे मन.
किंबहुना, ह्याच भिकारचोट लोकांमुळे मला तरी संस्कृत भाषेची ऍलर्जी आहे!
ह्यातुन तुम्हाला त्या *** लोकांची ऍलर्जी पाहिजे संस्कृतची कशाला? संस्कृतच्या ऍलर्जीसाठी ती किचकट, कठीण व अत्यंत दुर्बोध भाषा आहे इतके पुरेसे आहे.
शाणपट्टी करणार्या लोकांची लोकांची जगात ददात नाही पण म्हणून कशाकशाची ऍलर्जी लावून घेणार?
बायको सोडुन द्यायची?
ते किमान या जन्मी तरी शक्य नाही. तिच्या बरोबर सात जन्माची नातीचरामी अशी शपथ घेतली आहे
(बहुतेक हा तिच्या बरोबरचा सातवा जन्म असावा ( ह घ्या :) ) )
बहुतेक हा तिच्या बरोबरचा सातवा जन्म असावा ( ह घ्या )
काय वाट्टेल ते काय विजुभाऊ? गेला जन्म सातवा होता. हा बोनस जन्म आहे. (सात जन्म बायकोशी नीट वागल्या बद्दल.)
एक चांगला गोषवारा दिल्याबद्दल अजानुकर्णाचे अनेक आभार.
एक सामान्य मराठी भाषिक , वाचक नि नागरिक म्हणून मला असे दिसते की, कुठल्याही गोष्टीच्या बाबतीत लागू होणारे "अति सर्वत्र वर्जयेत्" हे सूत्र भाषेच्या बाबतीतही लागू पडतेच. भाषाशुद्धीकरणाच्या नावाखाली बोजड संस्कृत शब्द माथी मारणे हे जसे चुकीचे , तसेच ऊर्दु, फारसी, इंग्रजी, या पैकी कुठल्याही भाषेची शिरजोरी/प्राबल्य होऊ देणेही चुकीचेच.
शेवटी भाषेच्या शुद्धीचा प्रश्न दुय्यम ठरतो. महत्त्वाचा प्रश्न हा की लोकशाही व्यवस्थेमधला जो महत्त्वाचा घटक - सामान्य जनता - त्यांना डोळ्यासमोर ठेवून भाषेची धोरणे अमलात यायला हवीत. गावाकडचा शेतकरी , इतर व्यावसायिक या लोकांना सरकारी कागदपत्रे भरायची असतील , शरी असो की ग्रामीण , अक्षरओळख असणार्या कुणाला सरकारी व्यवस्थेशी संपर्क साधायचा असेल तर सर्वप्रथम ते कामकाज मराठीमधे व्हायला हवे. नंतर महत्त्वाचे म्हणजे ती भाषा त्याना समजेल अशी सुलभ असायला हवी. बस्स. मग त्यात ऊर्दु, फारसी, इंग्रजी, संस्कृत या भाषेतले शब्द येवोत - न येवोत.
एकदा लोकहिताबद्दलचे उद्दिष्ट स्पष्ट असेल तर धोरणे तशी अमलात येतील. नाहीतर मनॉपली, हितसंबंध जपण्याकरता , विशिष्ट गटाने चालवलेला अजेंडा भाषेच्या बाबतीत कार्यान्वित होत रहातो हे आताचे सत्य आहेच.
ती भाषा त्याना समजेल अशी सुलभ असायला हवी. ....एकदा लोकहिताबद्दलचे उद्दिष्ट स्पष्ट असेल तर धोरणे तशी अमलात येतील. नाहीतर मनॉपली, हितसंबंध जपण्याकरता , विशिष्ट गटाने चालवलेला अजेंडा भाषेच्या बाबतीत कार्यान्वित होत रहातो हे आताचे सत्य आहेच. ....
आता हे वाक्य किती खेडूतांना समजेल?
म्हणजे शासकिय वेगळी आणि अशासकिय वेगळी अशा दोन मराठी भाषा प्रत्येकाला आल्या पाहिजेत.
शाळे पासूनच सर्वांना 'खेडवळ' भाषा शिकवावी. त्यात पुन्हा, कोकणातील खेडं वेगळं, विदर्भातील खेडं वेगळं आणि देशावरील खेडं वेगळं. कोळ्या-आगर्यांची मराठी वेगळी, बाल्यांची मराठी वेगळी, वसईच्या ख्रिश्चनांची मराठी वेगळी. शाळेपासून ह्या सर्व मराठी भाषा प्रत्येकाने शिकल्या पाहीजेत. त्याच बरोबर हेही शिकले पाहीजे की भटा-बामनाची मराठी संस्कृतोद्भव असल्या कारणाने एकदम अशुद्ध आहे. ती खरी मराठी नाहीच.
ह ह पु वा झाली प्रभाकरपन्त! अचूक निशाणा!
>>>>> त्याच बरोबर हेही शिकले पाहीजे की भटा-बामनाची मराठी संस्कृतोद्भव असल्या कारणाने एकदम अशुद्ध आहे
ग्यानबाची खरी मेख तिथच हे प्रभाकरपन्त! भाषा (शुद्ध वा अशुद्ध) हे केवळ निमित्त!
आपला, लिम्बुटिम्बु (मायबोलीवरुन विनाभार ट्रान्स्फर) :D :P
आता हे वाक्य किती खेडूतांना समजेल?
मिसळपाववर लिहीलेले प्रत्येक वाक्य महाराष्ट्रातल्या प्रत्येक भागातल्या प्रत्येक खेडुताला समजावे असा तुमचा इशारा दिसतोय. इतके म्हणून तुम्ही "शासकीय" चुकलो , "शासकिय" असा शब्द वापरलातच. असो .
अक्षरओळख असणार्या कुणाला सरकारी व्यवस्थेशी संपर्क साधायचा असेल तर सर्वप्रथम ते कामकाज मराठीमधे व्हायला हवे. नंतर महत्त्वाचे म्हणजे ती भाषा त्याना समजेल अशी सुलभ असायला हवी.
ह्या तुमच्याच मागणीनुसार सरकारी (शासकिय की शासकीय?) आणि मिपावरील भाषा वेगवेगळी असावी असे सूचित केले आहे.
मला व्यक्तिशः मराठी भाषेत आजपर्यंत रुळलेल्या इतरभाषांतील शब्दांबद्दलही तिव्र आक्षेप नाही आणि संस्कृतातून आलेल्या शब्दाबद्दलही आक्षेप नाही. माझ्याकडून जमेल तेंव्हा जमेल तितके (मला समजणारे)शुद्ध मी लिहीतो/बोलतो. कधी 'मूड' नसला तर इतर भाषिक शब्दही वापरतो. पण तो माझा भाषिक स्वभाव नाही. हे म्हणजे रोज घरी 'सात्विक' जेवण जेवल्यावर कधी कधी कंटाळा येऊन बाहेर हॉटेलातील 'तामसी' जेवणही जेवतो. पण रोजच्या जीवनात 'सात्विक'तेचा आग्रह धरतो, पुरस्कार करतो.
ही सर्व चर्चा मला तरी रुचली नाही. मुद्यांना मुद्यांनी उत्तरे देण्यापेक्षा चर्चा वैयक्तिक पातळीवर भरकटली. संबंधितांनी तशी भरकटवू दिली ह्याचे दु:ख आहे.
इतके म्हणून तुम्ही "शासकीय" चुकलो , "शासकिय" असा शब्द वापरलातच. असो .
माझे मराठी १००% शुद्ध आहे असा मी दावा कधीच केलेला नाही. मिपावर 'शुद्धते'चा बाऊ केला जात नाही, शुद्धीचिकित्सक मला सापडला नाही, त्यामुळे र्हस्व-दीर्घच्या चुका जशा माझ्या होतात तशा इतरांच्याही होतातच. पण त्यालाही मी आक्षेप घेतलेला नाही. ह्म्म! कोणी मुद्दामहून चुकीचे मराठी लिहून वाचकांच्या वेळेचा अपव्यय करीत असेल तर त्याला जरूर आक्षेप घेतला आहे. मिपावर शुद्धिचिकित्सक सुरू केला तर तो मी आनंदाने आवर्जून वापरेन. माझे लेखन र्हर्स्व-दीर्ध चुकांविरहीत असेल तर मला स्वतःलाच वाचायला आवडेल. स्वान्तसुखाय म्हणतात तसे.
मुद्दाम जड-जड संस्कृत शब्द जोडून मराठीला पर्यायी शब्द बनविणारे एक गंमत म्हणून असे शब्द बनवित असतात. सर्वांनी ते वापरावेच असा आग्रह नसतो. जे संस्कृतोद्भव मराठी शब्द आहेत ते समजायला, वापरायला कठीण असतील तर कोणी कितीही जंग जंग पछाडले तरीही ते शब्द वापरात येणार नाहीत. 'शासकीय' भाषेत कॉरिडरला 'छन्न विभाग' असा शब्द आहे. 'लिफ्ट' ला 'उद्वाहक' असा शब्द आहे. कोण वापरतो? पण 'वेतन' हा समजायला, वापरायला सोपा शब्द असेल तर तो फक्त संस्कृतोद्भव शब्द आहे (अस मी वरील चर्चेतून अर्थ काढला आहे) म्हणून वापरायचा नाही का? माझ्या माहिती नुसार, 'पगार' हा शब्द 'आश्रीताला खर्चासाठी दिलेली रक्कम' अशा अर्थी आहे. आपण नोकर्या करून वेतन मिळवितो त्याला 'पगार' म्हणून स्वतःला आश्रीत घोषित करायचे का? आपण आश्रीत असतो का? त्या पेक्षा 'वेतन' शब्दात सन्मानही आहे. असो.
भाषा विषयावर माझा अभ्यास तरी बराच उथळ आहे. त्यांमुळे भाषा शास्त्रातले मोठमोठ्या संशोधकांचे दाखले मी देऊ शकत नाही. ह्याहून जास्त वाद मी घालू शकणार नाही, माझी इच्छाही नाही.
लाथाळ्यांपेक्षा चांगले विचार, चांगले साहित्य वाचायला मिळावे म्हणून मी मिपावर येतो. असेच चालणार असेल तर मिपा उघडून बसण्यापेक्षा दुसरे कांही महत्त्वाचे काम करणे मी पसंद करीन.
धन्यवाद.
प्रतिक्रिया