मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

घरगुती आकाशकंदील (छायाचित्रांसह)

स्वतन्त्र ·

प्रास 28/10/2011 - 18:05
आता फोटो दिसत असल्याने प्रतिसाद देतोय. छान आहे तुमचा आकाश कंदिल आणि त्याचे फोटोसुद्धा! तो रांगेत लावलेल्या पणत्यांचा फोटोही खूप छान आहे. आवडला. दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा! :-)

प्राजु 28/10/2011 - 19:54
विद्युत पणत्या???????????????????????????? माझ्यासाठी न्युजच आहे ही. अशा लाईटच्या माळेसारख्या पणत्या मिळतात का हल्ली? आवांतर : आकाशकंदील खूप सुंदर आहे.

गणपा 28/10/2011 - 20:06
गेल्या वर्षी ही असली पणत्यांची रांग पाहुन मी फसलो होतो. लांबुन अगदी खर्‍या पणत्याच वाटतात. असाच पारंपारिक आकाश कंदील आम्ही आमच्या ईमारतीसाठी बनवायचो. फक्त आकाराने तो किंचीत मोठा (४ ते ५ फुटी) असायचा. एकदा सांगाडा केला की दरवर्षी केवळ थोडी डागजुगी करावी लागे. वरुन रंगीत कागद लावला की झालं. कणिक भिजवुन खळ म्हणुन वापरायचो. आदल्या रात्री सगळे मित्र मंडळ गच्चीवर एकत्र जमुन टिंगल टवाळी करत रात्र भर जागत भल्या पहाटे पर्यंत आकशकंदील तयार करत असु.

प्रास 28/10/2011 - 18:05
आता फोटो दिसत असल्याने प्रतिसाद देतोय. छान आहे तुमचा आकाश कंदिल आणि त्याचे फोटोसुद्धा! तो रांगेत लावलेल्या पणत्यांचा फोटोही खूप छान आहे. आवडला. दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा! :-)

प्राजु 28/10/2011 - 19:54
विद्युत पणत्या???????????????????????????? माझ्यासाठी न्युजच आहे ही. अशा लाईटच्या माळेसारख्या पणत्या मिळतात का हल्ली? आवांतर : आकाशकंदील खूप सुंदर आहे.

गणपा 28/10/2011 - 20:06
गेल्या वर्षी ही असली पणत्यांची रांग पाहुन मी फसलो होतो. लांबुन अगदी खर्‍या पणत्याच वाटतात. असाच पारंपारिक आकाश कंदील आम्ही आमच्या ईमारतीसाठी बनवायचो. फक्त आकाराने तो किंचीत मोठा (४ ते ५ फुटी) असायचा. एकदा सांगाडा केला की दरवर्षी केवळ थोडी डागजुगी करावी लागे. वरुन रंगीत कागद लावला की झालं. कणिक भिजवुन खळ म्हणुन वापरायचो. आदल्या रात्री सगळे मित्र मंडळ गच्चीवर एकत्र जमुन टिंगल टवाळी करत रात्र भर जागत भल्या पहाटे पर्यंत आकशकंदील तयार करत असु.
लेखनविषय:
लेखनप्रकार
नमस्कार ! ******************************* सर्वप्रथम, गणपा,आपला 'मदत -मिपावर फोटो चिकटवणे.' हा धागा खूपच उपयोगी आहे. वल्ली आणि पैसा -धन्यवाद,तुम्ही मदत केल्यामुळेच मी छायाचित्रे टाकू शकलो. धागा वाचून मला मी केलेली चूक कळाली आहे.मी छायाचित्राच्या 'प्रॉपरटीज' मध्ये जाऊन युआरएल कॉपी न करता ब्रोवसर मधली केली होती म्हणून हा घोळ झाला. पहिला धागा संपादित न करता आल्यामुळे,हा नवीन धागा टाकला आहे. माझी संपादक मंडळाला नम्र विनंती आहे कि त्यांनी पहिला धागा 'घरगुती आकाशकंदील' हा धागा उडवून टाकावा. कदाचित,या आधी धागा संपादित करण्याचा पर्याय उपलब्ध होता.

आकाशकंदिल!!!

उदय के'सागर ·

प्रचेतस 24/10/2011 - 10:49
सुरेखच बनवला आहे आकाशकंदिल त्या खालच्या झिरमुळ्या थोड्या लांब हव्या होत्या अजून.

रेवती 24/10/2011 - 17:52
आकाशकंदील छानच झालाय. नक्षिदार कागद भारी मिळालाय. आम्हाला ग्रेट कागद नाही मिळाले. घरी होते त्यात असाच बनवलाय. प्रिया ब तैंनी यावर्षी अनेक मिपाकरांना कंदील करायला भाग पाडल्याबद्दल धन्यवाद!

प्रचेतस 24/10/2011 - 10:49
सुरेखच बनवला आहे आकाशकंदिल त्या खालच्या झिरमुळ्या थोड्या लांब हव्या होत्या अजून.

रेवती 24/10/2011 - 17:52
आकाशकंदील छानच झालाय. नक्षिदार कागद भारी मिळालाय. आम्हाला ग्रेट कागद नाही मिळाले. घरी होते त्यात असाच बनवलाय. प्रिया ब तैंनी यावर्षी अनेक मिपाकरांना कंदील करायला भाग पाडल्याबद्दल धन्यवाद!
लेखनविषय:
लेखनप्रकार
नमस्कार! आकाशकंदिल बनवणे हा एक अवघड प्रकार असतो असं नेहमीच वाटत असल्यामुळे मी आकाशकंदिल बनवण्याच्या भानगडीत कधीच पडलो नाही. पण काही दिवसांपुर्वीच मिपावर प्रिया-ताईंचा "पारंपारीक आकाशकंदिल" हा धागा वाचला (http://www.misalpav.com/node/19394) आणि वाटलं "अरे!

शिवसेना दसरा मेळावा २०११, ६ ऑक्टोबर

कौन्तेय ·

मन१ 11/10/2011 - 10:05
This keeps happening in India. संदर्भः- झेंडा चित्रपटाचा शेवट. ते तसेच डरकाळ्या अन् शिवराळ सॉरी ठाकरीपणा करणार. तुम्ही तसेच समर्थन वगैरे करणार. आम्ही पब्लिक तसेच बघत बसणार.

गवि 11/10/2011 - 10:42
पण अजूनही फ़क्त बाळासाहेब म्हणजेच सेना असंच चित्र आहे. त्यांचं भाषण संपत येतं आहे हे लक्षात येताच लोक मागच्यामागे उठून जाऊ लागले. मनोरंजन म्हणून लोक येतात झालं. इतर गुळमुळीत लोकांच्यामधे केवळ लोकांच्या मनातलं बोलणारा वक्ता म्हणून उठून दिसणारे बाळासाहेब लोकप्रिय आहेत. त्यांच्याशिवाय जगात शिवसेनेला एक विचारप्रवाह / फिलॉसॉफी म्हणून काय जागा आहे?

In reply to by गवि

कौन्तेय 11/10/2011 - 11:09
फ़िलॉसॉफ़ी, विचारप्रवाह यांबाबतीत म्हणालात ते. पण शिक्का मारलेल्या फ़िलॉसॉफ़ीपेक्षाही कृती महत्वाची. बाळासाहेबांनी शिवशक्ती-भीमशक्तीचा वारसा उद्धवला जर दिला (अजून औपचारिक युतीची घोषणा व्हायचीए) नि सेना-भाजपला दीर्घकाळ टिकणारा मित्र मिळाला तर त्यात सत्ता परिवर्तनासोबतच समाज परिवर्तनाचीही नांदी मजसारखे भाबडे लोक बघू पहात आहेत. गांधीवाद, समाजवाद, साम्यवाद नि हिंदुत्व या सगळ्या शिक्का मारलेल्या विचारधारांनी तरी देशाचं आज काय केलंय?

In reply to by कौन्तेय

गवि 11/10/2011 - 11:14
गांधीवाद, समाजवाद, साम्यवाद नि हिंदुत्व या सगळ्या शिक्का मारलेल्या विचारधारांनी तरी देशाचं आज काय केलंय? १००% खरे. त्यांनीही काही केलंय असं मुळीच नाही किंवा ते शिवसेनेपेक्षा अधिक काही आहेत असं नव्हे. किमान रचना फक्त अस्तित्वात आहे (चौकट) बाकी एकूणच देश आपापत: चाललेला आहे असाच भास होतो.

मराठी_माणूस 11/10/2011 - 11:05
वास्तविक अण्णांना अवमानकारक असं काहीही बाळासाहेब बोललेलेच नव्हते. त्यांनी अण्णांच्या आंदोलनाबद्दल काढलेले उद्गर खचीतच प्रशंसनीय नव्हते

अण्णांना अवमानकारक असं काहीही बाळासाहेब बोललेलेच नव्हते. बाळासाहेबांचे शब्द..'काय तर म्हणे गणपतीला 'मी अण्णा हजारे' अशी टोपी घातली. .....मी 'उंदराला' 'मी अण्णा हजारे' अशी टोपी घातली.' कमीत॑ कमी वेळात राष्ट्रीयस्तरावर एवढी प्रसिद्धी आणि त्यांनी उपस्थित केलेल्या मुद्यांना समाजाकडून मिळालेली स्विकृती पाहता श्री. अण्णा हजारेंना एक महत्त्व प्राप्त झाले आहे. अशा नेत्याचे कौतुक करण्याऐवजी त्याला 'उंदराची' उपमा देणे हा त्यांचा उपमर्द आहे. 'पाकव्याप्त काश्मीरात चीनी सैन्य घुसलंय. त्यांच्यातला एकही सैनिक जीवंत परत जाता नये' हे समोरच्या मराठी गर्दीला ठासून सांगणारा हे सांगण्यात कुठली मर्दुमकी गाजवली. कोणीही सांगू शकेल्.(अगदी मी सुद्धा). 'बाबांनो, तुमची कामं नीट करा. आम्ही चुकलो तर आम्हांलाही सोडू नका. पण भ्रष्ट होउ नका रे' 'पोलीसखात्यातील भ्रष्टाचार खपवून घेतला जाणार नाही.' हे वाक्य अनेकदा मुख्यमंत्री, गृहमंत्री, पोलीस कमिश्नर ह्यांच्या तोंडून ऐकलेले आहे. 'भ्रष्ट होऊ नका रे' हे सांगण्याचा नैतिक अधिकार शिवसेना नेत्यांसहित कुठल्या राजकिय पक्षाच्या नेत्यांना आहे का? अभिनिवेश नाही, आक्रस्ताळे हावभाव - हातवारे नाहीत ... फक्त चेष्टा, आवाजांच्या नकला आणि हिणकस शेरेबाजी. समलिंगी संबंधही अलाउड. हे अलाउ करणारे तुम्ही कोण? तुम्ही याला अलाउ केलंत तर तुम्हाला कसं माहिती हे चालतं? तुम्हाला कसं कळलं?" तुम्हाला कसं माहिती हे चालत???? म्हणजे जे तुम्हा आम्हा सर्वसामान्यांना माहिती आहे ते बाळासाहेबांना माहित नव्हत? ज्यांना ज्यांना समलींगी संबंधाबद्दल माहिती आहे ते ते सर्वजणं असे संबंध ठेवणारे असतात? कुठलाही विचार नाही, मुद्दा नाही, संदेश नाही ... नुसता टाईमपास. हेच संपूर्ण सभेचे सार आहे. उद्धव ठाकऱ्यांनी स्वतःचा नेतृत्वगुण एव्हाना सिद्ध केलेला आहे म्हणूनच दसरा मेळावा ते एकहाती घेऊ शकत नाहीत. अजून बाळासाहेबांच्या 'शिवराळ भाषणांची' कुबडी घेऊन चालावे लागते आहे. विनाकारण बाळासाहेबांची सहीसही नक्कल करण्याचा 'राजरोस' मोह असलाच तर टाळायला हवा. अवतरण चिन्हातील शब्दच राज ठाकरे ह्यांचे वाढते महत्व आणि शिवसेनेची होणारी कोंडी अधोरेखित करतो आहे. सभेची शिस्त मुद्दाम नोंद करावी अशी........... सगळं कसं शिस्तीत!................ ..... त्यांचं भाषण संपत येतं आहे हे लक्षात येताच लोक मागच्यामागे उठून जाऊ लागले. भाषण संपण्याची वाट पाहणं नाही की राष्ट्रगीतासाठी थांबणं. उतार्‍याती सुरुवातीच्या वाक्यांना उतार्‍याच्या शेवटास लेखकाने स्वतःच हरताळ फासला आहे. त्यामुळे नक्की काय म्हणायचे आहे हे कळत नाही. सर्व सैनिकांना फ़क्त सेनेशीच जोडण्याचं काम उद्धवना करायचं आहे. भारताचा आजवरचा इतिहास पाहता ते किती कठीण आहे लेखकाने उद्धव ठाकरे ह्यांनी त्यांचे नेतृत्वगुण आधीच सिद्ध केल्याचे म्हंटले आहे त्या पार्श्वभूमीवर वरील विधान विपरीत वाटते. शिवसेनेबद्दल मलाही भरपूर प्रेम आहे ते त्यांच्या, एकेकाळी असणर्‍या, मराठीप्रेमामुळे. पण काळाच्या ओघात त्यातील फोलपणा उघड झाला आहे. सार्वजनिक व्यासपिठावरून मुसलमानांना 'मुसलमान' असेच संबोधून सर्वात प्रथम टिका करणारे, राज्य सरकारला खडे बोल सुनविणारे बाळासाहेब पहिले राजकिय नेता होते/आहेत. 'अल्प संख्यांक', 'विशिष्ठ धर्माचे लोकं' अशी गुळमट भाषा वापरली नाही कधी. मर्यादीत प्रमाणात शिवसैनिकांनी केलेली दादागिरीही समर्थनिय म्हणावी लागेल. ह्या सगळ्याला भुलून आम जनता शिवसेनेच्या पंखाखाली जमा झाली. पण भविष्यात बहुतेकांचा भ्रमनिरास झाला. गर्दी वरून लोकप्रियता ठरवायची तर राजकिय नेते गर्दी कशी जमवतात हे मी वेगळे सांगायला हवे असे नाही. बाळासाहेबांकडून अपेक्षा होती शिवसेनेला 'मार्ग'दर्शन करण्याची, राज्यातील विविध प्रश्नांना हात घालून त्या त्या समस्यांवर उपाय सुचविण्याची, भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी लोकप्रबोधन करण्याची, (जमल्यास) मराठी भाषेच्या संवर्धनाच्या उपाययोजना सुचविण्याची. पण, बाळासाहेबांना फक्त जहाल आदेश देण्याची सवय आहे. काय तर म्हणे, 'सागरीसेतूला राजीव गांधींचे नांव दिले आहे तो फलक तोडा.', हिणकस शेरेबाजी करण्याची. आर.आर. पाटलांना 'चार्ली चॅप्लीन' संबोधण्याची, सोनिया गांधी, मनमोहन सींग ह्याच्या आवाजाची नक्कल करण्याची. श्री. शंकरशेठ ह्यांच्या महानते विषयी एकदम पुळका येऊन बाळासाहेब म्हणाले, 'शंकरशेठांनी एवढे कार्य केले आहे त्याला काँग्रेस विसरली. त्यांचे नांव का नाही देत एखाद्या स्थळाला.' शिवसेना-भाजपाची राज्यात सत्ता असताना शिवसेनेने किती स्थळांना श्री. शंकरशेठांचे नांव दिले? त्यांनी नाट्यगृहाला 'प्रबोधनकारांचे' नांव दिले. अनेक स्थळांना 'मीनाताई ठाकरे' ह्यांचे नांव दिले. भ्रष्टाचारा विरुद्ध जनजागृती करण्या ऐवजी हा जबाबदार नेता म्हणतो, 'भ्रष्टाचार कधीच जाणार नाही तो असाच राहणार'. मुंबईतील रस्त्यांच्या खड्ड्यांवर भाष्य करण्याऐवजी बाळासाहेब विचारतात, 'फक्त मुंबईतच खड्डे आहेत का? इतर राज्यात नाहीत का?' म्हणजे इतर राज्यातही आहेत म्हणून मुंबईतल्या खड्ड्यांकडे दुर्लक्ष करा?. भ्रष्टाचार कधीच जाणार नाही मग काय त्याला स्विकारायला शिका? दसरा मेळाव्याने आणि माननिय बाळासाहेबांच्या भाषणाने व्यक्तिशः माझी तरी निराशाच झाली.

In reply to by प्रभाकर पेठकर

कौन्तेय 11/10/2011 - 12:03
‘- सिलेक्शन ऑफ़ लेसर एव्हिल’ का काय म्हणतात ते. समोर आहेत त्यांतला ग्राह्यांश तेवढा घ्यावा हेच आपल्या हाती. हरताळाची पूड राखाडी रंगाची असावी. कारण राजकीय सभांच्या शिस्तीच्या कथांत थेट पांढरे - काळे कसे बसवणार? तिथे काही ग्रे-एरिया (राखाडी) असणारच. सेनेच्या सभेला लोकांनी अरेरावीची सीमा गाठून एकमेकांना मारहाण केली नाही ही शिस्तबद्धताच की!

In reply to by प्रभाकर पेठकर

सन्जोप राव 11/10/2011 - 13:47
शिवसेनेबद्दल मलाही भरपूर प्रेम आहे ते त्यांच्या, एकेकाळी असणर्‍या, मराठीप्रेमामुळे. हे एक वाक्य सोडले तर शब्दाशब्दाशी सहमत.

In reply to by प्रभाकर पेठकर

संपूर्ण प्रतिसादाशी सहमत आहे. थोडी वाट पाहा. महापालिका निवडणुका झाल्या की उरलेसुरले दातसुद्धा पडून जातील. रोज कणाकणाने,झिजून झिजून शिवसेना मरते आहे याचा आनंद वाटतो.

In reply to by अप्पा जोगळेकर

मराठी_माणूस 11/10/2011 - 21:43
मतभेद व्यक्त करणे वेगळे , पण खालील विधान विकृत वाटते रोज कणाकणाने,झिजून झिजून शिवसेना मरते आहे याचा आनंद वाटतो. कदाचीत , तुम्हाला मुंबईच्या दंगली बद्दल माहीती नसावी. ज्या लोकानी तो अनुभव घेतला असेल , भले तो शिवसेनेचा विरोधक असो , त्याने शिवसेनेच्या मुंबईतल्या अस्तित्वाबद्दल सकारात्मक मत व्य्क्त केलेले आहे. काही लांडगे तर टपलेलेच आहेत मुंबईला वेगळे करण्यासाठी आणि ते लांडगे ही संघटना कधी नामशेष होईल ह्याच दिवसाची वाट पहात आहेत.

In reply to by मराठी_माणूस

''मुंबई महाराष्ट्रात आहे पण मुंबईत महाराष्ट्र नाही हे वाक्य पंत फार आधी बोलून गेले आहे . त्यामुळे मुंबई महाराष्ट्रापासून कधीच तुटली आहे . सर्व नाड्या परप्रांतीय लोकांच्या हाती त्यानी कर्तुत्वाने ताब्यात घेतल्या आहेत . बाकी दंगली बाबत म्हणाल दोन भूमिपुत्र मुस्लीम व मराठी माणूस ( दोन्ही मोठ्या संख्येने कधीकाळी कोकणातून आलेले ) आपसात दंगलीत भिडले पर्यायाने त्यांचा आवाज शीण झाला . आता मुंबई बिल्डरांना मोकळी आहे . ह्यांना अणु उर्जेला विरोध करता येतो .पण पर्याय देता येत नाही . सत्तेवर आल्यावर विकास कामे नक्की काय करणार ह्याबाबत ठोस घोषणा किंवा धोरण नाही ( किमान झुणका भाकर सारखी एखादी .......) मुळात सत्तेवर येऊ ह्याबाबत आत्मविश्वास नाही . खरे तर सेनेने विरोधी पक्ष भाजपकडे द्यावेत त्यांच्याकडे फडणीस .तावडे असे अनेक योग्य उमेदवार आहेत . बाकी मी सेनेंचा विरोधक अथवा समर्थक नाही . डोंबिवली मधून मुंबईत १९९६ ते २००२ वास्तव्य केले .मुंबईतील अनेक भागात मी मराठीचा एक चकार शब्द कानावर पडायचा नाही . परप्रांतीय अल्प संख्य समूहासाठी राखीव कोटे असलेल्या त्यांच्या एका महाविद्यालयात शिक्षण घेत असताना त्यांची मानसिकता पहिली .त्यांच्यामते ज्या राजकीय पार्टीकडून तुमचे काम निघते तिचा नारा द्यावा . आणि सर्व पार्ट्या अश्या श्रीमंत व्यापारी लोकांशी चांगले संबंध ठेवून असतात .आपण मराठी लोक आंतरजालावर तत्व ,निष्ठा ,मुल्ये ,विचार ,ह्या मुद्यावरून एका पक्षाचे वृथा समर्थन अथवा कडवा विरोध करतो . कुणा निंदू नये वा वंदू नये मला सर्व राजकीय नेते आवडतात .कोणाकडून कसली मदत कोणत्या क्षणी होईल हे सांगता येत नाही . सर्व पर्याय खुले असलेले बरे .

In reply to by निनाद मुक्काम …

'मुंबई महाराष्ट्रात आहे पण मुंबईत महाराष्ट्र नाही हे वाक्य पंत फार आधी बोलून गेले आहे . मनाची पकड घेणारी वाक्ये फेकायची आणि आपला स्वार्थ साधत राहायचा असेच सर्व राजकिय पक्ष वागत आले आहेत. वरील वाक्य फेकणार्‍या पंताच्या शिवसेनेने भाजप पक्षाशी युती केली आणि त्यांची उत्तरप्रदेशी जनते विरोधी धार बोथट झाली. तेंव्हा पंतांचे शिवसेनेत चांगलेच महत्त्व होते. पण त्यांनी ह्या बदलाकडे राजकिय स्वार्थातून दुर्लक्ष केले.

In reply to by मराठी_माणूस

प्रदीप 12/10/2011 - 10:52
तुम्हाला मुंबईच्या दंगली बद्दल माहीती नसावी.
कुठली? पहिली (६८ सालची) की दुसरी (९३ सालची?) पहिली सेनेच्याच कर्तुत्वामुळे सुरू झाली. नंतर ती सेनेच्या नेतृत्वाच्या आटोक्याबाहेर गेली. सरकारने ती आग विझवली. बाय द वे, अडीअडचणीच्या वेळी काँग्रेसला महाराष्ट्रात सेनेपेक्षा दुसरे कुणी जवळचे नसावे. सेनेच्या स्थापनेपासूनच ह्या जवळिकीची सुरूवात झाली. तेव्हा कम्युनिस्टांचे वर्चस्व तोडून काढ्ण्यात वसंतरावांनी सेनेस वापरले. आता अण्णांपासून काँग्रेसचा थोडाबहुत बचाव सेनाच करणार आहे असे दिसू लागले आहे.

In reply to by प्रदीप

सुनील 12/10/2011 - 11:04
बाय द वे, अडीअडचणीच्या वेळी काँग्रेसला महाराष्ट्रात सेनेपेक्षा दुसरे कुणी जवळचे नसावे. सेनेच्या स्थापनेपासूनच ह्या जवळिकीची सुरूवात झाली. तेव्हा कम्युनिस्टांचे वर्चस्व तोडून काढ्ण्यात वसंतरावांनी सेनेस वापरले. शिवसेनेला वसंतसेना उगाच म्हणत नव्हते! आणिबाणीतही सेनेची भूमिका काँग्रेसधर्जिणीच होती.

In reply to by सुनील

पुढे शरद पवार व विलासराव असे दोन गट त्या पक्षात झाले . मुंबईतील कार्यकारणी पूर्वीपासून परप्रांतीयांची असायची व त्यांचे संधान थेट दिल्लीत असायचे . तेव्हा शरद पवार ह्यांनी सेनेचा वापर मुंबईत एक संरक्षक ढाल म्हणून केला .अर्थात ह्यात दोन नेत्यांचे चातुर्य दिसून येते . एका गोष्टीचे नवल वाटते .घराणेशाहीच्या नावाने आरोळ्या ठोकणारे जेव्हा ........... उद्धव ठाकर्यांना सर्व शिवसैनिकांनी एकमुखाने नेता निवडले हे वाक्य रिमोट कंट्रोल असणार्या पक्षात विसंगत वाटते . मात्र आम्ही काय ते मावळे बाकी सर्व गनीम असेच लिहायचे व बोलायचे ठरवले तर पुढे बोलणे खुंटले .

गणेशा 11/10/2011 - 13:32
शरद पवार .. बाळासाहेब ठाकरे आणि आता राज ठाकरे .. हे माझे महराष्ट्रातील तीन आवडते राजकारणी नेते आहेत. बाळासाहेब यांच्या एकहाती लीडरशिप बद्दल नेहमीच आदर होता. परंतु कौंतेय जी, जर तुम्ही त्यांच्या समर्थनार्थ राज ठाकरें बद्दल विनाकारण नक्कल करणारा ' राजरोस' मोह जे लिहिले आहे ते योग्य नाहिच. कुठल्याही नेत्याच्या उद्दात्तकरणासाठी इतर नेत्यांना टारगेट करत असाल तर ते त्या नेत्याच्या कार्याविषयी शंका असल्यासारखेच वाटते. बाकी शिस्त म्हणजे अरेरावी करुन सभेत भांडण न करणे असेल तर सभा सिस्थीत झाली म्हणण्यास हरकत नाहिच. आणि एक 'समान नागरी कायदा' या एकाच मुद्द्यावरुन भाजपा सहित शिवसेना केंद्रात आणि राज्यात निवडुन आल्या होत्या.. पण मग तेंव्हा काय प्रॉब्लेम झाले ?.. या प्रश्नाला का बगल मिळाली .. ? का हा कायदा आला नाही. असे सभेत अश्वासन देणारे सत्यात ते का उतरवु शकले नाहित ? आणि हे जर सभेत जमनारा माणुस नेत्यांना विचारु शकत नाहित तर अश्या प्रश्नांचा अभिमान बाळगण्याचा तरी काय उपयोग आहे ... काँग्रेस, या वेळेस सपशेल अपयशी ठरले आहे, अनेक भ्रष्टाचार उघडकीस आले आहेत, त्यामुळॅ भाजपा-शिवसेना आणि इतर मित्र पक्षांना यावेळेस संधी आहे. आणि त्याचा ही आनंद आहे.. मी स्वता ही काँग्रेस ला मत देणार नाहिये.. पण याचा अर्थ दूसर्‍यांवर डोळे झाकुन विश्वास ठेवावा असे नाही ... आणि एक पत्रकारांना जे बोलले त्यावर तुम्ही २-३ ओळी लिहिल्या आहेत अधिकारवानीच्या .. मला सांगा निखिल वागळे यांच्यावर झालेला हल्ला .. त्या नंतरची मगृरी .. आणि काय हो कोणाअला अटक शिक्षा पण झाली नाही वाटते त्या प्रकरणात मग आपण ठरवायचे बोलण्याकडे भुलायचे का कार्याकडे पहायचे .. असो .. लिहिणार नव्हतोच ,पण बाळासाहेबांबद्दल आदर होता.. पण राजरोस ह्या शब्दामुळे लिहायला लागले.. आणि एक जाता जाता .. बाळासाहेबांनी त्याम्च्या लेवलच्या माणसांबद्दल.. कार्याबद्दल बोलावे असे मला वाटते, त्यांनी शरद पवार, देशमुख, चव्हाण यांच्या बद्दल बोलावे ते शोभुन दिसेल.. राज ठाकरे, अजित पवार या दूसर्या पिढीसाठी तुम्ही म्हणता तसे सक्षम नेतृत्व शिवसेने कडे आहे तर त्यांनीच फक्त ही जबाबदारी संभाळावी असे वाटते.. शिवसेने च्या बर्याच (सर्व नाही) गोष्टींसाठी आदर आहेच, पण स्व विचार आणि आचार यात तफावत मात्र व्होवु नये असे मनापासुन वाटते.

In reply to by गणेशा

श्रीरंग 12/10/2011 - 11:11
माननीय श्री शरच्चंद्ररावजी पवार साहेब काही लोकांचे कोणत्या कारणांमुळे आवडते असू शकतात याबद्दल प्रचंड कुतुहल वाटते.

In reply to by श्रीरंग

गणेशा 12/10/2011 - 12:57
श्रीरंग जी, मला माहिती आहे, महाराष्ट्रातील बरेचसे लोक शरद पवारांचा द्वेष करतात, आणि त्याला कारणे ही तितकीच आहेत. परंतु मी बारामतीचा असल्याने, आणि त्यांच्यामुळे मला.. माझ्या गावाला, शेतीला, व्यवसायाला आणि गावातील लोकांच्या नोकरीला, तसेच शिक्षणाला खुप फायदा झाला असल्याने मला ते आवडतात आणि इतर ही कारणे आहेतच. त्यात विरोधक ही ज्यांना 'साहेब' बोलतात ह्यातच सर्वकाही आहे.. यावर प्लीज अशी प्रतिक्रिया देवु नये की तुम्ही फक्त बारामतीचाच विचार करता, मराठी माणुस हा जसा भावनिकतेचा भाग असतो, तसेच गाव, रोजगार, तेथील शेती पाणी हा सुद्धा जिव्हाळ्याचा विषय असतो... शरद पवार - दूरद्रूष्टी ( ज्यांना 'साहेब' आवडत नाहीत हे त्यांना नाही वाटत हा गुण) बाळासाहेब ठाकरे - एकहाती लिडरशिप, सर्व लोकांना आपल्या शब्दाच्या जरबीवर तोलणाअरा माणुस, सध्याच्या काळात हे अवघड आहे.. पहिल्यांदा राजे लोक असे असायचे.. राज ठाकरे - अभ्यासपुर्ण वाटचाल ... स्वैर वागण्याला ही तितकेच ठोस कारणे.. वरती ३ च नावे घेतली होती चौथे नाव घ्यायचे झाल्यास उद्धव ठाकरे असेल कदाचीत. त्यांची कार्यपद्धती ही धडादीची नसली तरी नेत्यांची उत्कृष्ट साथ मिळाली तर नक्कीच शेतकर्‍यांप्रती उल्लेखनिय काम करण्याची ताकद यआंच्यात आहे असे वाटते. अवांतर : जाउद्या मुद्दा शरद पवारांचा नाहिहे श्रीरंग जी ... मला तर हिटलर आणि गांधी दोघे ही आवडतात .. म्हणुन हिटलरच्या सांहारक वृत्तीचा मी जसा पुरस्कर्ता नाही.. तसेच शरद पवारांच्या पैश्याच्या राजकारणाचा ही मी चाहता नाही .. असो.. पण यावेळेस निवडनुकीला ' म. न. से' आमदार आमच्या येथे उमेदवार असतील तर ९९ % मी त्यांना मत देणार आहे .. नेते आवडतात म्हण्जे त्यांचे सर्व कार्य आवडते असे नसते.. असे डोके गहान ठेवुन जर कोणी कोणाच्या मागे लागले तर काय उपयोग असे माझे मत आहे.. होप मी काय म्हणतोय ते कळाले असेन

In reply to by गणेशा

शाहिर 12/10/2011 - 13:58
बाकी शरद पवार यांना दूरद्रूष्टी आहे हे मान्य करावे लागेल. काहि माणसे पायाळू असतात ..तसे पवार पैसाळू आहेत .. कुठे पैसे मिळेल हे त्यांना बरोबर दिसते ..उदा : आय पी एल , लवासा..

In reply to by गणेशा

श्रीरंग 12/10/2011 - 14:14
गणेशा जी, विनाकारण आक्रमकता टाळून आपण प्रांजळपणे मतप्रदर्शन केलेले बघून खूप बरे वाटले. या धाग्याचा विषय शरद पवार नसल्याने, हा विषय तूर्तास येथेच थांबवतो. :)

पिंगू 11/10/2011 - 15:18
दसरा मेळावा कितीही गर्दीने ओसंडून वाहो.. पण त्या मेळाव्यात फक्त आणि फक्त शेरेबाजी होते. बाकी मुंबईची बकाल अवस्था होण्यामागे शिवसेना आणि इतर पक्ष तितकेच जबाबदार आहेत. - (मुंबईकर) पिंगू

रेवती 11/10/2011 - 18:15
मी बाळासाहेब ठाकर्‍यांचे भाषण पाच मिनिटे एकदाच टिव्हीवर पाहिले होते. सडेतोड बोलणे की कायसे करताना भाषा इकडे तिकडे होते. पण तसे न बोलून तरी चालेल का? भ्रष्टाचारावर कोणत्याही पक्षाने बोलू नये. लोक मात्र त्यांच्या भाषणासाठी जिवाचा कान करून बसलेले असतात. पूर्वी म्हणे ट्रक भरून अन्नपदार्थ लोकांना वाटायला आणत आणि त्यामुळे गरीब जनतेचा भरणा अधिक असे. माझी एक मुंबईकर मैत्रिण टाईमपास म्हणून तूनळीवर बाळासाहेबांची भाषणे ऐकत/बघत बसलेली असते हे समजल्यावर विचित्र वाटले.

In reply to by शाहिर

रेवती 11/10/2011 - 19:06
त्याचं काये की हे मान्यवर असल्याने ठाकरेंचे भाषण म्हणणे योग्य दिसेल पण देशपांडेंचे भाषण/ घर याऐवजी देशपांड्यांचे भाषण/घर वगैरे. कुलकर्ण्यांचे घर हे सहज म्हटले जाते. बाकी तुम्ही सूज्ञ आहातच.

In reply to by रेवती

मान्यवर असल्याने ठाकरेंचे भाषण म्हणणे योग्य दिसेल पण देशपांडेंचे भाषण/ घर याऐवजी देशपांड्यांचे भाषण/घर वगैरे. कुलकर्ण्यांचे घर हे सहज म्हटले जाते नुसते मान्यवर आहे म्हणून नाही तर, आदर व्यक्त करतानाही, बाळासाहेब किंवा उद्धव अशा कोणा एकाच्या भाषणाचा संदर्भ असेल तर 'ठाकरेंचे' भाषण असे म्हणावे. अनेकवचनातील (म्हणजे बाळासाहेब आणि उद्धव दोघांचे भाषण, असे) संदर्भ असेल तर 'ठाकर्‍यांचे' भाषण असे म्हणावे. 'देशपांड्यांचे घर' असे आपण म्हणतो तेंव्हा त्या घरात एकापेक्षा अधिक देशपांडे राहात असतात. देशपांडे नावाचे एकटे गृहस्थ राहात असतील तर 'देशपांडेंचे घर' असे म्हणावे लागेल.

तिमा 11/10/2011 - 19:19
अजुनही काही लोकांना त्यांच्या भाषणाचे आकर्षण वाटते याचे आश्चर्य वाटले. मला पुढील गोष्टी पटल्या नाहीत. मुंबईतल्या खड्ड्यांचे लटके समर्थन. पूर्वी इंदिरा गांघीही म्हणायच्या की जगात भ्रष्टाचार सगळीकडे आहे तर भारताबद्दल का ओरडता ? तसेच हे म्हणाले की खड्डे काय फक्त मुंबईत पडले आहेत का ? सत्ता तुमच्या हातात आहे ना इतकी वर्षं, मग चांगले रस्ते करता येत नाहीत ? मुंबईला महाराष्ट्रापासून तोडणे हा मुद्दा. नवीन मुद्दे, कर्तृत्व हे काहीच नसल्यामुळे काल्पनिक गोष्टींची लोकांना भीति का दाखवायची ? कोळी, भंडारी यांचा अचानक पुळका आला तर मग आग्री का आठवले नाहीत ? तेही मुंबईचे मुळचे रहिवासी आहेत. संपूर्ण भाषणावर एकच कॉमेंट : कडकलक्ष्मीची भीति फक्त लहान मुलांनाच वाटते.

कुंदन 11/10/2011 - 21:02
मुंबई महापालिकेत सेनेची सत्ता असतानाही इतके भय्ये अनधिकृत फेरीवाले म्हणुन धंदा करतातच ना. बाकी र्‍हाउ द्या , आधी मुंबई सांभाळा.

आशु जोग 12/10/2011 - 01:44
उद्धव हा एक बालिश माणूस आहे हे त्याच्या भाषणावरून कुणालाही कळेल आणि बाळासाहेब हे भंपक व्यक्ती. बोलताना कितीही सिंहगर्जना करीत असले तरी, अति भित्रा माणूस पूर्वी काँग्रेस आणि आता राष्ट्रवादीच्या कडेवर बसून राजकारण करतो. म्हणूनच पंतप्रधानपदासाठी शरद पवार यांना पाठिंबा दिला होता आणि राष्ट्रपतिपदासाठी प्रतिभा पाटील यांना राष्ट्रवादी वा काँग्रेस कोणीच वर्ज्य नाही

गवि 12/10/2011 - 11:13
बादवे.. अरे तुम्ही मर्दासारखे मर्द त्या परक्या बाईच्या नादी लागता? आँ??????? मर्दांनी बाईच्या नादी लागू नये.. बाईच्या नादी लागणे मर्दांना शोभत नाही..? की मर्दांनी "परक्या" बाईच्या नादी लागू नये.. (स्वकीय चालेल) की मुळात मर्दांनीच राज्य करावे "बाईने" नव्हेच ? की या सगळ्यापेक्षा: नेता म्हणून बुवा असो वा बाई कोणीच कोणाच्या "नादी" लागून (आहारी जाऊन) राजकारण करु नये.. ? काय म्हणायला हवं होतं आणि काय म्हटलंय? काय सुचवलं जातंय ? "अरे तुम्ही मर्दासारखे मर्द त्या परक्या बाईच्या नादी लागता"" - ही शब्दरचना आपल्या मासेसना (मॉबला म्हणावं का?) अपील होते म्हटल्यावर काय बोलणार..

सुनील 12/10/2011 - 12:35
देशातील अन्य प्रादेशिक पक्षांशी शिवसेनेची तुलना केली तर काय चित्र दिसते? अन्य प्रादेशिक पक्ष (तेलगु देशम, द्रमुक इ.) स्थापनेनंतर थोड्याच काळात आपापल्या राज्यात सर्वदूर पसरले आणि स्वबळावर सत्तादेखिल मिळवू शकले. याउलट शिवसेना वयाची चाळीशी ओलांडूनही राज्यात सर्वत्र पोचली नाही. स्वबळावर सत्ता तर दूरच! हे शिवसेनेचे अपयशच नाही काय?

In reply to by सुनील

मराठी_माणूस 12/10/2011 - 12:41
हे शिवसेनेचे अपयशच नाही काय? निश्चितच अपयश आहे . त्याचे कारण म्हणजे मुंबई सोडुन उर्वरीत महाराष्ट्राची दखलच घेतलि जात नाही.

In reply to by मराठी_माणूस

मुंबई सोडुन उर्वरीत महाराष्ट्राची दखलच घेतलि जात नाही. कारण मुंबईत पैसा आहे. किंवा मुंबई आमची आणि उर्वरित महाराष्ट्र तुमचा अशी श्री. शरद पवारांबरोबर राजकिय वाटणी झाली असावी.

In reply to by प्रभाकर पेठकर

daredevils99 12/10/2011 - 15:11
मूळात शेणेचा जन्म मुंबईतील मराठी माणसांचे रक्षण करण्यासाठी झाला असल्यामुळे त्यांनी मुंबईबाहेर जायची गरज हे का? आता ते रक्षण करतात की भक्षण करतात हा वेगळा प्रश्न हे.

कौन्तेय 15/10/2011 - 23:47
माझा हा ‘मी पाहिलेला दसरा मेळावा’ असा निबंध होता. त्यावर कडाडून चर्चा मला अभिप्रेतच नव्हती (तात्विक / वैचारिक ?!?!). त्यामुळेच काथ्याकूट सदरात न घालता जनातलं-मनातलंमधे तो ठेवला. मी शिवसेनेचा मतदार / पूर्ण पाठीराखा कधीच नव्हतो. कुणा एका पक्षाचं सगळंच मला आवडू शकेल असं मला वाटत नाही. बाळासाहेब हयात असताना एकदा दसरा मेळावा बघून यावा म्हणून हजेरी लावली नि त्यातलं जे नोंद घेण्यासारखं वाटलं ते सर्वांसमोर ठेवलं. पण ज्यांनी ज्यांनी प्रतिक्रीया / टिप्पण्या दिल्या त्यांचा आभारी आहे.

In reply to by कौन्तेय

त्यावर कडाडून चर्चा मला अभिप्रेतच नव्हती (तात्विक / वैचारिक ?!?!). अहो! मग लेखाच्या तळाशी तशी टिप टाकायचीSS....! केवढे श्रम वाचले असते इतर सदस्यांचे. तसे न करता येतील तितके प्रतिसाद येऊ दिलेत. आणि आता प्रतिसाद यायचे बंद झाल्यावर म्हणता, 'मला अशी चर्चा अभिप्रेत नव्हती'?? हे म्हणजे प्रतिसाद देताना, जे काही वैचारिक श्रम आम्ही घेतले त्यांना मोरीत टाकून वर दोन तांब्ये पाणी ओतलेत की. असो. पुढच्यावेळी काळजी घ्या. 'चर्चा अभिप्रेत नाही' अशी छोटीशी पाटी लावलीत लेखाच्या तळाशी की, आम्ही कष्टदायी चर्चा टाळू.

कौन्तेय 17/10/2011 - 17:16
प्रभाकर गुरू, सगळ्यात कळकळून तुम्हीच लिहिलं होतंत. त्यामुळे तुमचा राग समजण्यासारखा आहे (अन बाकीच्यांचाही हो). तस्मात् आमाला क्षमस्वाची कृपया करावी -

कौन्तेय साहेब वाईट वाटून घेऊ नका . . आपल्याला अपेक्षित असे जगात प्रत्येक वेळी घडतेच असे नाही . काही दिवसापूर्वी सामन्यातील एका अग्रलेखाचा मथळा असा होता . '' संघ ,गडकरी .मोदी ह्यांनी नागपुरात चूर्ण .... नी मग फुसकुली . जरा काहीकाळ पाठी गेलो तर महाजन ,मुंडे ,ठाकरे व मातोश्री मध्ये चूर्ण तयार झाले. त्यावर हिंदुत्वाचा वर्ख चढवण्यात आला . ......... पुढचा इतिहास सगळ्यांना ठाऊक आहे . मंदीर प्रकरण मग दंगल व त्यातून मग १३ स्फोट अशी साखळी निर्माण झाली .

श्री. कौन्तेय, त्यामुळे तुमचा राग समजण्यासारखा आहे. राग अजिबात नाही. उद्विग्नता जरूर आहे. राग आला असता तर, 'तुम्ही असे का केले?' असा जाब मी विचारला असता. तसे न करता मिपा सदस्यांचे श्रम वाचविण्यासाठी जेंव्हा जेंव्हा तुम्हाला चर्चा अपेक्षित नसते तेंव्हा तेंव्हा तशी सूचना लेखाच्या तळाशी द्यावी असा सल्ला मी दिला आहे. जे झाले ते झाले. निदान पुढच्या वेळी काळजी घ्यावी असेही मी सुचविले आहे. ह्यात तुम्हाला राग कुठे दिसला? त्यावर कडाडून चर्चा मला अभिप्रेतच नव्हती (तात्विक / वैचारिक ?!?!). ह्या तुमच्या, इतक्या उशीराने आलेल्या, विधानाने विरस झाला. 'खोदा पहाड निकला चुहा' अशी भावना झाली. हे समजून घेऊन स्वतःची चुक स्विकारण्याऐवजी मला 'राग आल्याचा' अपप्रचार आपण करता आहात. कृपया असे करू नका.

मन१ 11/10/2011 - 10:05
This keeps happening in India. संदर्भः- झेंडा चित्रपटाचा शेवट. ते तसेच डरकाळ्या अन् शिवराळ सॉरी ठाकरीपणा करणार. तुम्ही तसेच समर्थन वगैरे करणार. आम्ही पब्लिक तसेच बघत बसणार.

गवि 11/10/2011 - 10:42
पण अजूनही फ़क्त बाळासाहेब म्हणजेच सेना असंच चित्र आहे. त्यांचं भाषण संपत येतं आहे हे लक्षात येताच लोक मागच्यामागे उठून जाऊ लागले. मनोरंजन म्हणून लोक येतात झालं. इतर गुळमुळीत लोकांच्यामधे केवळ लोकांच्या मनातलं बोलणारा वक्ता म्हणून उठून दिसणारे बाळासाहेब लोकप्रिय आहेत. त्यांच्याशिवाय जगात शिवसेनेला एक विचारप्रवाह / फिलॉसॉफी म्हणून काय जागा आहे?

In reply to by गवि

कौन्तेय 11/10/2011 - 11:09
फ़िलॉसॉफ़ी, विचारप्रवाह यांबाबतीत म्हणालात ते. पण शिक्का मारलेल्या फ़िलॉसॉफ़ीपेक्षाही कृती महत्वाची. बाळासाहेबांनी शिवशक्ती-भीमशक्तीचा वारसा उद्धवला जर दिला (अजून औपचारिक युतीची घोषणा व्हायचीए) नि सेना-भाजपला दीर्घकाळ टिकणारा मित्र मिळाला तर त्यात सत्ता परिवर्तनासोबतच समाज परिवर्तनाचीही नांदी मजसारखे भाबडे लोक बघू पहात आहेत. गांधीवाद, समाजवाद, साम्यवाद नि हिंदुत्व या सगळ्या शिक्का मारलेल्या विचारधारांनी तरी देशाचं आज काय केलंय?

In reply to by कौन्तेय

गवि 11/10/2011 - 11:14
गांधीवाद, समाजवाद, साम्यवाद नि हिंदुत्व या सगळ्या शिक्का मारलेल्या विचारधारांनी तरी देशाचं आज काय केलंय? १००% खरे. त्यांनीही काही केलंय असं मुळीच नाही किंवा ते शिवसेनेपेक्षा अधिक काही आहेत असं नव्हे. किमान रचना फक्त अस्तित्वात आहे (चौकट) बाकी एकूणच देश आपापत: चाललेला आहे असाच भास होतो.

मराठी_माणूस 11/10/2011 - 11:05
वास्तविक अण्णांना अवमानकारक असं काहीही बाळासाहेब बोललेलेच नव्हते. त्यांनी अण्णांच्या आंदोलनाबद्दल काढलेले उद्गर खचीतच प्रशंसनीय नव्हते

अण्णांना अवमानकारक असं काहीही बाळासाहेब बोललेलेच नव्हते. बाळासाहेबांचे शब्द..'काय तर म्हणे गणपतीला 'मी अण्णा हजारे' अशी टोपी घातली. .....मी 'उंदराला' 'मी अण्णा हजारे' अशी टोपी घातली.' कमीत॑ कमी वेळात राष्ट्रीयस्तरावर एवढी प्रसिद्धी आणि त्यांनी उपस्थित केलेल्या मुद्यांना समाजाकडून मिळालेली स्विकृती पाहता श्री. अण्णा हजारेंना एक महत्त्व प्राप्त झाले आहे. अशा नेत्याचे कौतुक करण्याऐवजी त्याला 'उंदराची' उपमा देणे हा त्यांचा उपमर्द आहे. 'पाकव्याप्त काश्मीरात चीनी सैन्य घुसलंय. त्यांच्यातला एकही सैनिक जीवंत परत जाता नये' हे समोरच्या मराठी गर्दीला ठासून सांगणारा हे सांगण्यात कुठली मर्दुमकी गाजवली. कोणीही सांगू शकेल्.(अगदी मी सुद्धा). 'बाबांनो, तुमची कामं नीट करा. आम्ही चुकलो तर आम्हांलाही सोडू नका. पण भ्रष्ट होउ नका रे' 'पोलीसखात्यातील भ्रष्टाचार खपवून घेतला जाणार नाही.' हे वाक्य अनेकदा मुख्यमंत्री, गृहमंत्री, पोलीस कमिश्नर ह्यांच्या तोंडून ऐकलेले आहे. 'भ्रष्ट होऊ नका रे' हे सांगण्याचा नैतिक अधिकार शिवसेना नेत्यांसहित कुठल्या राजकिय पक्षाच्या नेत्यांना आहे का? अभिनिवेश नाही, आक्रस्ताळे हावभाव - हातवारे नाहीत ... फक्त चेष्टा, आवाजांच्या नकला आणि हिणकस शेरेबाजी. समलिंगी संबंधही अलाउड. हे अलाउ करणारे तुम्ही कोण? तुम्ही याला अलाउ केलंत तर तुम्हाला कसं माहिती हे चालतं? तुम्हाला कसं कळलं?" तुम्हाला कसं माहिती हे चालत???? म्हणजे जे तुम्हा आम्हा सर्वसामान्यांना माहिती आहे ते बाळासाहेबांना माहित नव्हत? ज्यांना ज्यांना समलींगी संबंधाबद्दल माहिती आहे ते ते सर्वजणं असे संबंध ठेवणारे असतात? कुठलाही विचार नाही, मुद्दा नाही, संदेश नाही ... नुसता टाईमपास. हेच संपूर्ण सभेचे सार आहे. उद्धव ठाकऱ्यांनी स्वतःचा नेतृत्वगुण एव्हाना सिद्ध केलेला आहे म्हणूनच दसरा मेळावा ते एकहाती घेऊ शकत नाहीत. अजून बाळासाहेबांच्या 'शिवराळ भाषणांची' कुबडी घेऊन चालावे लागते आहे. विनाकारण बाळासाहेबांची सहीसही नक्कल करण्याचा 'राजरोस' मोह असलाच तर टाळायला हवा. अवतरण चिन्हातील शब्दच राज ठाकरे ह्यांचे वाढते महत्व आणि शिवसेनेची होणारी कोंडी अधोरेखित करतो आहे. सभेची शिस्त मुद्दाम नोंद करावी अशी........... सगळं कसं शिस्तीत!................ ..... त्यांचं भाषण संपत येतं आहे हे लक्षात येताच लोक मागच्यामागे उठून जाऊ लागले. भाषण संपण्याची वाट पाहणं नाही की राष्ट्रगीतासाठी थांबणं. उतार्‍याती सुरुवातीच्या वाक्यांना उतार्‍याच्या शेवटास लेखकाने स्वतःच हरताळ फासला आहे. त्यामुळे नक्की काय म्हणायचे आहे हे कळत नाही. सर्व सैनिकांना फ़क्त सेनेशीच जोडण्याचं काम उद्धवना करायचं आहे. भारताचा आजवरचा इतिहास पाहता ते किती कठीण आहे लेखकाने उद्धव ठाकरे ह्यांनी त्यांचे नेतृत्वगुण आधीच सिद्ध केल्याचे म्हंटले आहे त्या पार्श्वभूमीवर वरील विधान विपरीत वाटते. शिवसेनेबद्दल मलाही भरपूर प्रेम आहे ते त्यांच्या, एकेकाळी असणर्‍या, मराठीप्रेमामुळे. पण काळाच्या ओघात त्यातील फोलपणा उघड झाला आहे. सार्वजनिक व्यासपिठावरून मुसलमानांना 'मुसलमान' असेच संबोधून सर्वात प्रथम टिका करणारे, राज्य सरकारला खडे बोल सुनविणारे बाळासाहेब पहिले राजकिय नेता होते/आहेत. 'अल्प संख्यांक', 'विशिष्ठ धर्माचे लोकं' अशी गुळमट भाषा वापरली नाही कधी. मर्यादीत प्रमाणात शिवसैनिकांनी केलेली दादागिरीही समर्थनिय म्हणावी लागेल. ह्या सगळ्याला भुलून आम जनता शिवसेनेच्या पंखाखाली जमा झाली. पण भविष्यात बहुतेकांचा भ्रमनिरास झाला. गर्दी वरून लोकप्रियता ठरवायची तर राजकिय नेते गर्दी कशी जमवतात हे मी वेगळे सांगायला हवे असे नाही. बाळासाहेबांकडून अपेक्षा होती शिवसेनेला 'मार्ग'दर्शन करण्याची, राज्यातील विविध प्रश्नांना हात घालून त्या त्या समस्यांवर उपाय सुचविण्याची, भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी लोकप्रबोधन करण्याची, (जमल्यास) मराठी भाषेच्या संवर्धनाच्या उपाययोजना सुचविण्याची. पण, बाळासाहेबांना फक्त जहाल आदेश देण्याची सवय आहे. काय तर म्हणे, 'सागरीसेतूला राजीव गांधींचे नांव दिले आहे तो फलक तोडा.', हिणकस शेरेबाजी करण्याची. आर.आर. पाटलांना 'चार्ली चॅप्लीन' संबोधण्याची, सोनिया गांधी, मनमोहन सींग ह्याच्या आवाजाची नक्कल करण्याची. श्री. शंकरशेठ ह्यांच्या महानते विषयी एकदम पुळका येऊन बाळासाहेब म्हणाले, 'शंकरशेठांनी एवढे कार्य केले आहे त्याला काँग्रेस विसरली. त्यांचे नांव का नाही देत एखाद्या स्थळाला.' शिवसेना-भाजपाची राज्यात सत्ता असताना शिवसेनेने किती स्थळांना श्री. शंकरशेठांचे नांव दिले? त्यांनी नाट्यगृहाला 'प्रबोधनकारांचे' नांव दिले. अनेक स्थळांना 'मीनाताई ठाकरे' ह्यांचे नांव दिले. भ्रष्टाचारा विरुद्ध जनजागृती करण्या ऐवजी हा जबाबदार नेता म्हणतो, 'भ्रष्टाचार कधीच जाणार नाही तो असाच राहणार'. मुंबईतील रस्त्यांच्या खड्ड्यांवर भाष्य करण्याऐवजी बाळासाहेब विचारतात, 'फक्त मुंबईतच खड्डे आहेत का? इतर राज्यात नाहीत का?' म्हणजे इतर राज्यातही आहेत म्हणून मुंबईतल्या खड्ड्यांकडे दुर्लक्ष करा?. भ्रष्टाचार कधीच जाणार नाही मग काय त्याला स्विकारायला शिका? दसरा मेळाव्याने आणि माननिय बाळासाहेबांच्या भाषणाने व्यक्तिशः माझी तरी निराशाच झाली.

In reply to by प्रभाकर पेठकर

कौन्तेय 11/10/2011 - 12:03
‘- सिलेक्शन ऑफ़ लेसर एव्हिल’ का काय म्हणतात ते. समोर आहेत त्यांतला ग्राह्यांश तेवढा घ्यावा हेच आपल्या हाती. हरताळाची पूड राखाडी रंगाची असावी. कारण राजकीय सभांच्या शिस्तीच्या कथांत थेट पांढरे - काळे कसे बसवणार? तिथे काही ग्रे-एरिया (राखाडी) असणारच. सेनेच्या सभेला लोकांनी अरेरावीची सीमा गाठून एकमेकांना मारहाण केली नाही ही शिस्तबद्धताच की!

In reply to by प्रभाकर पेठकर

सन्जोप राव 11/10/2011 - 13:47
शिवसेनेबद्दल मलाही भरपूर प्रेम आहे ते त्यांच्या, एकेकाळी असणर्‍या, मराठीप्रेमामुळे. हे एक वाक्य सोडले तर शब्दाशब्दाशी सहमत.

In reply to by प्रभाकर पेठकर

संपूर्ण प्रतिसादाशी सहमत आहे. थोडी वाट पाहा. महापालिका निवडणुका झाल्या की उरलेसुरले दातसुद्धा पडून जातील. रोज कणाकणाने,झिजून झिजून शिवसेना मरते आहे याचा आनंद वाटतो.

In reply to by अप्पा जोगळेकर

मराठी_माणूस 11/10/2011 - 21:43
मतभेद व्यक्त करणे वेगळे , पण खालील विधान विकृत वाटते रोज कणाकणाने,झिजून झिजून शिवसेना मरते आहे याचा आनंद वाटतो. कदाचीत , तुम्हाला मुंबईच्या दंगली बद्दल माहीती नसावी. ज्या लोकानी तो अनुभव घेतला असेल , भले तो शिवसेनेचा विरोधक असो , त्याने शिवसेनेच्या मुंबईतल्या अस्तित्वाबद्दल सकारात्मक मत व्य्क्त केलेले आहे. काही लांडगे तर टपलेलेच आहेत मुंबईला वेगळे करण्यासाठी आणि ते लांडगे ही संघटना कधी नामशेष होईल ह्याच दिवसाची वाट पहात आहेत.

In reply to by मराठी_माणूस

''मुंबई महाराष्ट्रात आहे पण मुंबईत महाराष्ट्र नाही हे वाक्य पंत फार आधी बोलून गेले आहे . त्यामुळे मुंबई महाराष्ट्रापासून कधीच तुटली आहे . सर्व नाड्या परप्रांतीय लोकांच्या हाती त्यानी कर्तुत्वाने ताब्यात घेतल्या आहेत . बाकी दंगली बाबत म्हणाल दोन भूमिपुत्र मुस्लीम व मराठी माणूस ( दोन्ही मोठ्या संख्येने कधीकाळी कोकणातून आलेले ) आपसात दंगलीत भिडले पर्यायाने त्यांचा आवाज शीण झाला . आता मुंबई बिल्डरांना मोकळी आहे . ह्यांना अणु उर्जेला विरोध करता येतो .पण पर्याय देता येत नाही . सत्तेवर आल्यावर विकास कामे नक्की काय करणार ह्याबाबत ठोस घोषणा किंवा धोरण नाही ( किमान झुणका भाकर सारखी एखादी .......) मुळात सत्तेवर येऊ ह्याबाबत आत्मविश्वास नाही . खरे तर सेनेने विरोधी पक्ष भाजपकडे द्यावेत त्यांच्याकडे फडणीस .तावडे असे अनेक योग्य उमेदवार आहेत . बाकी मी सेनेंचा विरोधक अथवा समर्थक नाही . डोंबिवली मधून मुंबईत १९९६ ते २००२ वास्तव्य केले .मुंबईतील अनेक भागात मी मराठीचा एक चकार शब्द कानावर पडायचा नाही . परप्रांतीय अल्प संख्य समूहासाठी राखीव कोटे असलेल्या त्यांच्या एका महाविद्यालयात शिक्षण घेत असताना त्यांची मानसिकता पहिली .त्यांच्यामते ज्या राजकीय पार्टीकडून तुमचे काम निघते तिचा नारा द्यावा . आणि सर्व पार्ट्या अश्या श्रीमंत व्यापारी लोकांशी चांगले संबंध ठेवून असतात .आपण मराठी लोक आंतरजालावर तत्व ,निष्ठा ,मुल्ये ,विचार ,ह्या मुद्यावरून एका पक्षाचे वृथा समर्थन अथवा कडवा विरोध करतो . कुणा निंदू नये वा वंदू नये मला सर्व राजकीय नेते आवडतात .कोणाकडून कसली मदत कोणत्या क्षणी होईल हे सांगता येत नाही . सर्व पर्याय खुले असलेले बरे .

In reply to by निनाद मुक्काम …

'मुंबई महाराष्ट्रात आहे पण मुंबईत महाराष्ट्र नाही हे वाक्य पंत फार आधी बोलून गेले आहे . मनाची पकड घेणारी वाक्ये फेकायची आणि आपला स्वार्थ साधत राहायचा असेच सर्व राजकिय पक्ष वागत आले आहेत. वरील वाक्य फेकणार्‍या पंताच्या शिवसेनेने भाजप पक्षाशी युती केली आणि त्यांची उत्तरप्रदेशी जनते विरोधी धार बोथट झाली. तेंव्हा पंतांचे शिवसेनेत चांगलेच महत्त्व होते. पण त्यांनी ह्या बदलाकडे राजकिय स्वार्थातून दुर्लक्ष केले.

In reply to by मराठी_माणूस

प्रदीप 12/10/2011 - 10:52
तुम्हाला मुंबईच्या दंगली बद्दल माहीती नसावी.
कुठली? पहिली (६८ सालची) की दुसरी (९३ सालची?) पहिली सेनेच्याच कर्तुत्वामुळे सुरू झाली. नंतर ती सेनेच्या नेतृत्वाच्या आटोक्याबाहेर गेली. सरकारने ती आग विझवली. बाय द वे, अडीअडचणीच्या वेळी काँग्रेसला महाराष्ट्रात सेनेपेक्षा दुसरे कुणी जवळचे नसावे. सेनेच्या स्थापनेपासूनच ह्या जवळिकीची सुरूवात झाली. तेव्हा कम्युनिस्टांचे वर्चस्व तोडून काढ्ण्यात वसंतरावांनी सेनेस वापरले. आता अण्णांपासून काँग्रेसचा थोडाबहुत बचाव सेनाच करणार आहे असे दिसू लागले आहे.

In reply to by प्रदीप

सुनील 12/10/2011 - 11:04
बाय द वे, अडीअडचणीच्या वेळी काँग्रेसला महाराष्ट्रात सेनेपेक्षा दुसरे कुणी जवळचे नसावे. सेनेच्या स्थापनेपासूनच ह्या जवळिकीची सुरूवात झाली. तेव्हा कम्युनिस्टांचे वर्चस्व तोडून काढ्ण्यात वसंतरावांनी सेनेस वापरले. शिवसेनेला वसंतसेना उगाच म्हणत नव्हते! आणिबाणीतही सेनेची भूमिका काँग्रेसधर्जिणीच होती.

In reply to by सुनील

पुढे शरद पवार व विलासराव असे दोन गट त्या पक्षात झाले . मुंबईतील कार्यकारणी पूर्वीपासून परप्रांतीयांची असायची व त्यांचे संधान थेट दिल्लीत असायचे . तेव्हा शरद पवार ह्यांनी सेनेचा वापर मुंबईत एक संरक्षक ढाल म्हणून केला .अर्थात ह्यात दोन नेत्यांचे चातुर्य दिसून येते . एका गोष्टीचे नवल वाटते .घराणेशाहीच्या नावाने आरोळ्या ठोकणारे जेव्हा ........... उद्धव ठाकर्यांना सर्व शिवसैनिकांनी एकमुखाने नेता निवडले हे वाक्य रिमोट कंट्रोल असणार्या पक्षात विसंगत वाटते . मात्र आम्ही काय ते मावळे बाकी सर्व गनीम असेच लिहायचे व बोलायचे ठरवले तर पुढे बोलणे खुंटले .

गणेशा 11/10/2011 - 13:32
शरद पवार .. बाळासाहेब ठाकरे आणि आता राज ठाकरे .. हे माझे महराष्ट्रातील तीन आवडते राजकारणी नेते आहेत. बाळासाहेब यांच्या एकहाती लीडरशिप बद्दल नेहमीच आदर होता. परंतु कौंतेय जी, जर तुम्ही त्यांच्या समर्थनार्थ राज ठाकरें बद्दल विनाकारण नक्कल करणारा ' राजरोस' मोह जे लिहिले आहे ते योग्य नाहिच. कुठल्याही नेत्याच्या उद्दात्तकरणासाठी इतर नेत्यांना टारगेट करत असाल तर ते त्या नेत्याच्या कार्याविषयी शंका असल्यासारखेच वाटते. बाकी शिस्त म्हणजे अरेरावी करुन सभेत भांडण न करणे असेल तर सभा सिस्थीत झाली म्हणण्यास हरकत नाहिच. आणि एक 'समान नागरी कायदा' या एकाच मुद्द्यावरुन भाजपा सहित शिवसेना केंद्रात आणि राज्यात निवडुन आल्या होत्या.. पण मग तेंव्हा काय प्रॉब्लेम झाले ?.. या प्रश्नाला का बगल मिळाली .. ? का हा कायदा आला नाही. असे सभेत अश्वासन देणारे सत्यात ते का उतरवु शकले नाहित ? आणि हे जर सभेत जमनारा माणुस नेत्यांना विचारु शकत नाहित तर अश्या प्रश्नांचा अभिमान बाळगण्याचा तरी काय उपयोग आहे ... काँग्रेस, या वेळेस सपशेल अपयशी ठरले आहे, अनेक भ्रष्टाचार उघडकीस आले आहेत, त्यामुळॅ भाजपा-शिवसेना आणि इतर मित्र पक्षांना यावेळेस संधी आहे. आणि त्याचा ही आनंद आहे.. मी स्वता ही काँग्रेस ला मत देणार नाहिये.. पण याचा अर्थ दूसर्‍यांवर डोळे झाकुन विश्वास ठेवावा असे नाही ... आणि एक पत्रकारांना जे बोलले त्यावर तुम्ही २-३ ओळी लिहिल्या आहेत अधिकारवानीच्या .. मला सांगा निखिल वागळे यांच्यावर झालेला हल्ला .. त्या नंतरची मगृरी .. आणि काय हो कोणाअला अटक शिक्षा पण झाली नाही वाटते त्या प्रकरणात मग आपण ठरवायचे बोलण्याकडे भुलायचे का कार्याकडे पहायचे .. असो .. लिहिणार नव्हतोच ,पण बाळासाहेबांबद्दल आदर होता.. पण राजरोस ह्या शब्दामुळे लिहायला लागले.. आणि एक जाता जाता .. बाळासाहेबांनी त्याम्च्या लेवलच्या माणसांबद्दल.. कार्याबद्दल बोलावे असे मला वाटते, त्यांनी शरद पवार, देशमुख, चव्हाण यांच्या बद्दल बोलावे ते शोभुन दिसेल.. राज ठाकरे, अजित पवार या दूसर्या पिढीसाठी तुम्ही म्हणता तसे सक्षम नेतृत्व शिवसेने कडे आहे तर त्यांनीच फक्त ही जबाबदारी संभाळावी असे वाटते.. शिवसेने च्या बर्याच (सर्व नाही) गोष्टींसाठी आदर आहेच, पण स्व विचार आणि आचार यात तफावत मात्र व्होवु नये असे मनापासुन वाटते.

In reply to by गणेशा

श्रीरंग 12/10/2011 - 11:11
माननीय श्री शरच्चंद्ररावजी पवार साहेब काही लोकांचे कोणत्या कारणांमुळे आवडते असू शकतात याबद्दल प्रचंड कुतुहल वाटते.

In reply to by श्रीरंग

गणेशा 12/10/2011 - 12:57
श्रीरंग जी, मला माहिती आहे, महाराष्ट्रातील बरेचसे लोक शरद पवारांचा द्वेष करतात, आणि त्याला कारणे ही तितकीच आहेत. परंतु मी बारामतीचा असल्याने, आणि त्यांच्यामुळे मला.. माझ्या गावाला, शेतीला, व्यवसायाला आणि गावातील लोकांच्या नोकरीला, तसेच शिक्षणाला खुप फायदा झाला असल्याने मला ते आवडतात आणि इतर ही कारणे आहेतच. त्यात विरोधक ही ज्यांना 'साहेब' बोलतात ह्यातच सर्वकाही आहे.. यावर प्लीज अशी प्रतिक्रिया देवु नये की तुम्ही फक्त बारामतीचाच विचार करता, मराठी माणुस हा जसा भावनिकतेचा भाग असतो, तसेच गाव, रोजगार, तेथील शेती पाणी हा सुद्धा जिव्हाळ्याचा विषय असतो... शरद पवार - दूरद्रूष्टी ( ज्यांना 'साहेब' आवडत नाहीत हे त्यांना नाही वाटत हा गुण) बाळासाहेब ठाकरे - एकहाती लिडरशिप, सर्व लोकांना आपल्या शब्दाच्या जरबीवर तोलणाअरा माणुस, सध्याच्या काळात हे अवघड आहे.. पहिल्यांदा राजे लोक असे असायचे.. राज ठाकरे - अभ्यासपुर्ण वाटचाल ... स्वैर वागण्याला ही तितकेच ठोस कारणे.. वरती ३ च नावे घेतली होती चौथे नाव घ्यायचे झाल्यास उद्धव ठाकरे असेल कदाचीत. त्यांची कार्यपद्धती ही धडादीची नसली तरी नेत्यांची उत्कृष्ट साथ मिळाली तर नक्कीच शेतकर्‍यांप्रती उल्लेखनिय काम करण्याची ताकद यआंच्यात आहे असे वाटते. अवांतर : जाउद्या मुद्दा शरद पवारांचा नाहिहे श्रीरंग जी ... मला तर हिटलर आणि गांधी दोघे ही आवडतात .. म्हणुन हिटलरच्या सांहारक वृत्तीचा मी जसा पुरस्कर्ता नाही.. तसेच शरद पवारांच्या पैश्याच्या राजकारणाचा ही मी चाहता नाही .. असो.. पण यावेळेस निवडनुकीला ' म. न. से' आमदार आमच्या येथे उमेदवार असतील तर ९९ % मी त्यांना मत देणार आहे .. नेते आवडतात म्हण्जे त्यांचे सर्व कार्य आवडते असे नसते.. असे डोके गहान ठेवुन जर कोणी कोणाच्या मागे लागले तर काय उपयोग असे माझे मत आहे.. होप मी काय म्हणतोय ते कळाले असेन

In reply to by गणेशा

शाहिर 12/10/2011 - 13:58
बाकी शरद पवार यांना दूरद्रूष्टी आहे हे मान्य करावे लागेल. काहि माणसे पायाळू असतात ..तसे पवार पैसाळू आहेत .. कुठे पैसे मिळेल हे त्यांना बरोबर दिसते ..उदा : आय पी एल , लवासा..

In reply to by गणेशा

श्रीरंग 12/10/2011 - 14:14
गणेशा जी, विनाकारण आक्रमकता टाळून आपण प्रांजळपणे मतप्रदर्शन केलेले बघून खूप बरे वाटले. या धाग्याचा विषय शरद पवार नसल्याने, हा विषय तूर्तास येथेच थांबवतो. :)

पिंगू 11/10/2011 - 15:18
दसरा मेळावा कितीही गर्दीने ओसंडून वाहो.. पण त्या मेळाव्यात फक्त आणि फक्त शेरेबाजी होते. बाकी मुंबईची बकाल अवस्था होण्यामागे शिवसेना आणि इतर पक्ष तितकेच जबाबदार आहेत. - (मुंबईकर) पिंगू

रेवती 11/10/2011 - 18:15
मी बाळासाहेब ठाकर्‍यांचे भाषण पाच मिनिटे एकदाच टिव्हीवर पाहिले होते. सडेतोड बोलणे की कायसे करताना भाषा इकडे तिकडे होते. पण तसे न बोलून तरी चालेल का? भ्रष्टाचारावर कोणत्याही पक्षाने बोलू नये. लोक मात्र त्यांच्या भाषणासाठी जिवाचा कान करून बसलेले असतात. पूर्वी म्हणे ट्रक भरून अन्नपदार्थ लोकांना वाटायला आणत आणि त्यामुळे गरीब जनतेचा भरणा अधिक असे. माझी एक मुंबईकर मैत्रिण टाईमपास म्हणून तूनळीवर बाळासाहेबांची भाषणे ऐकत/बघत बसलेली असते हे समजल्यावर विचित्र वाटले.

In reply to by शाहिर

रेवती 11/10/2011 - 19:06
त्याचं काये की हे मान्यवर असल्याने ठाकरेंचे भाषण म्हणणे योग्य दिसेल पण देशपांडेंचे भाषण/ घर याऐवजी देशपांड्यांचे भाषण/घर वगैरे. कुलकर्ण्यांचे घर हे सहज म्हटले जाते. बाकी तुम्ही सूज्ञ आहातच.

In reply to by रेवती

मान्यवर असल्याने ठाकरेंचे भाषण म्हणणे योग्य दिसेल पण देशपांडेंचे भाषण/ घर याऐवजी देशपांड्यांचे भाषण/घर वगैरे. कुलकर्ण्यांचे घर हे सहज म्हटले जाते नुसते मान्यवर आहे म्हणून नाही तर, आदर व्यक्त करतानाही, बाळासाहेब किंवा उद्धव अशा कोणा एकाच्या भाषणाचा संदर्भ असेल तर 'ठाकरेंचे' भाषण असे म्हणावे. अनेकवचनातील (म्हणजे बाळासाहेब आणि उद्धव दोघांचे भाषण, असे) संदर्भ असेल तर 'ठाकर्‍यांचे' भाषण असे म्हणावे. 'देशपांड्यांचे घर' असे आपण म्हणतो तेंव्हा त्या घरात एकापेक्षा अधिक देशपांडे राहात असतात. देशपांडे नावाचे एकटे गृहस्थ राहात असतील तर 'देशपांडेंचे घर' असे म्हणावे लागेल.

तिमा 11/10/2011 - 19:19
अजुनही काही लोकांना त्यांच्या भाषणाचे आकर्षण वाटते याचे आश्चर्य वाटले. मला पुढील गोष्टी पटल्या नाहीत. मुंबईतल्या खड्ड्यांचे लटके समर्थन. पूर्वी इंदिरा गांघीही म्हणायच्या की जगात भ्रष्टाचार सगळीकडे आहे तर भारताबद्दल का ओरडता ? तसेच हे म्हणाले की खड्डे काय फक्त मुंबईत पडले आहेत का ? सत्ता तुमच्या हातात आहे ना इतकी वर्षं, मग चांगले रस्ते करता येत नाहीत ? मुंबईला महाराष्ट्रापासून तोडणे हा मुद्दा. नवीन मुद्दे, कर्तृत्व हे काहीच नसल्यामुळे काल्पनिक गोष्टींची लोकांना भीति का दाखवायची ? कोळी, भंडारी यांचा अचानक पुळका आला तर मग आग्री का आठवले नाहीत ? तेही मुंबईचे मुळचे रहिवासी आहेत. संपूर्ण भाषणावर एकच कॉमेंट : कडकलक्ष्मीची भीति फक्त लहान मुलांनाच वाटते.

कुंदन 11/10/2011 - 21:02
मुंबई महापालिकेत सेनेची सत्ता असतानाही इतके भय्ये अनधिकृत फेरीवाले म्हणुन धंदा करतातच ना. बाकी र्‍हाउ द्या , आधी मुंबई सांभाळा.

आशु जोग 12/10/2011 - 01:44
उद्धव हा एक बालिश माणूस आहे हे त्याच्या भाषणावरून कुणालाही कळेल आणि बाळासाहेब हे भंपक व्यक्ती. बोलताना कितीही सिंहगर्जना करीत असले तरी, अति भित्रा माणूस पूर्वी काँग्रेस आणि आता राष्ट्रवादीच्या कडेवर बसून राजकारण करतो. म्हणूनच पंतप्रधानपदासाठी शरद पवार यांना पाठिंबा दिला होता आणि राष्ट्रपतिपदासाठी प्रतिभा पाटील यांना राष्ट्रवादी वा काँग्रेस कोणीच वर्ज्य नाही

गवि 12/10/2011 - 11:13
बादवे.. अरे तुम्ही मर्दासारखे मर्द त्या परक्या बाईच्या नादी लागता? आँ??????? मर्दांनी बाईच्या नादी लागू नये.. बाईच्या नादी लागणे मर्दांना शोभत नाही..? की मर्दांनी "परक्या" बाईच्या नादी लागू नये.. (स्वकीय चालेल) की मुळात मर्दांनीच राज्य करावे "बाईने" नव्हेच ? की या सगळ्यापेक्षा: नेता म्हणून बुवा असो वा बाई कोणीच कोणाच्या "नादी" लागून (आहारी जाऊन) राजकारण करु नये.. ? काय म्हणायला हवं होतं आणि काय म्हटलंय? काय सुचवलं जातंय ? "अरे तुम्ही मर्दासारखे मर्द त्या परक्या बाईच्या नादी लागता"" - ही शब्दरचना आपल्या मासेसना (मॉबला म्हणावं का?) अपील होते म्हटल्यावर काय बोलणार..

सुनील 12/10/2011 - 12:35
देशातील अन्य प्रादेशिक पक्षांशी शिवसेनेची तुलना केली तर काय चित्र दिसते? अन्य प्रादेशिक पक्ष (तेलगु देशम, द्रमुक इ.) स्थापनेनंतर थोड्याच काळात आपापल्या राज्यात सर्वदूर पसरले आणि स्वबळावर सत्तादेखिल मिळवू शकले. याउलट शिवसेना वयाची चाळीशी ओलांडूनही राज्यात सर्वत्र पोचली नाही. स्वबळावर सत्ता तर दूरच! हे शिवसेनेचे अपयशच नाही काय?

In reply to by सुनील

मराठी_माणूस 12/10/2011 - 12:41
हे शिवसेनेचे अपयशच नाही काय? निश्चितच अपयश आहे . त्याचे कारण म्हणजे मुंबई सोडुन उर्वरीत महाराष्ट्राची दखलच घेतलि जात नाही.

In reply to by मराठी_माणूस

मुंबई सोडुन उर्वरीत महाराष्ट्राची दखलच घेतलि जात नाही. कारण मुंबईत पैसा आहे. किंवा मुंबई आमची आणि उर्वरित महाराष्ट्र तुमचा अशी श्री. शरद पवारांबरोबर राजकिय वाटणी झाली असावी.

In reply to by प्रभाकर पेठकर

daredevils99 12/10/2011 - 15:11
मूळात शेणेचा जन्म मुंबईतील मराठी माणसांचे रक्षण करण्यासाठी झाला असल्यामुळे त्यांनी मुंबईबाहेर जायची गरज हे का? आता ते रक्षण करतात की भक्षण करतात हा वेगळा प्रश्न हे.

कौन्तेय 15/10/2011 - 23:47
माझा हा ‘मी पाहिलेला दसरा मेळावा’ असा निबंध होता. त्यावर कडाडून चर्चा मला अभिप्रेतच नव्हती (तात्विक / वैचारिक ?!?!). त्यामुळेच काथ्याकूट सदरात न घालता जनातलं-मनातलंमधे तो ठेवला. मी शिवसेनेचा मतदार / पूर्ण पाठीराखा कधीच नव्हतो. कुणा एका पक्षाचं सगळंच मला आवडू शकेल असं मला वाटत नाही. बाळासाहेब हयात असताना एकदा दसरा मेळावा बघून यावा म्हणून हजेरी लावली नि त्यातलं जे नोंद घेण्यासारखं वाटलं ते सर्वांसमोर ठेवलं. पण ज्यांनी ज्यांनी प्रतिक्रीया / टिप्पण्या दिल्या त्यांचा आभारी आहे.

In reply to by कौन्तेय

त्यावर कडाडून चर्चा मला अभिप्रेतच नव्हती (तात्विक / वैचारिक ?!?!). अहो! मग लेखाच्या तळाशी तशी टिप टाकायचीSS....! केवढे श्रम वाचले असते इतर सदस्यांचे. तसे न करता येतील तितके प्रतिसाद येऊ दिलेत. आणि आता प्रतिसाद यायचे बंद झाल्यावर म्हणता, 'मला अशी चर्चा अभिप्रेत नव्हती'?? हे म्हणजे प्रतिसाद देताना, जे काही वैचारिक श्रम आम्ही घेतले त्यांना मोरीत टाकून वर दोन तांब्ये पाणी ओतलेत की. असो. पुढच्यावेळी काळजी घ्या. 'चर्चा अभिप्रेत नाही' अशी छोटीशी पाटी लावलीत लेखाच्या तळाशी की, आम्ही कष्टदायी चर्चा टाळू.

कौन्तेय 17/10/2011 - 17:16
प्रभाकर गुरू, सगळ्यात कळकळून तुम्हीच लिहिलं होतंत. त्यामुळे तुमचा राग समजण्यासारखा आहे (अन बाकीच्यांचाही हो). तस्मात् आमाला क्षमस्वाची कृपया करावी -

कौन्तेय साहेब वाईट वाटून घेऊ नका . . आपल्याला अपेक्षित असे जगात प्रत्येक वेळी घडतेच असे नाही . काही दिवसापूर्वी सामन्यातील एका अग्रलेखाचा मथळा असा होता . '' संघ ,गडकरी .मोदी ह्यांनी नागपुरात चूर्ण .... नी मग फुसकुली . जरा काहीकाळ पाठी गेलो तर महाजन ,मुंडे ,ठाकरे व मातोश्री मध्ये चूर्ण तयार झाले. त्यावर हिंदुत्वाचा वर्ख चढवण्यात आला . ......... पुढचा इतिहास सगळ्यांना ठाऊक आहे . मंदीर प्रकरण मग दंगल व त्यातून मग १३ स्फोट अशी साखळी निर्माण झाली .

श्री. कौन्तेय, त्यामुळे तुमचा राग समजण्यासारखा आहे. राग अजिबात नाही. उद्विग्नता जरूर आहे. राग आला असता तर, 'तुम्ही असे का केले?' असा जाब मी विचारला असता. तसे न करता मिपा सदस्यांचे श्रम वाचविण्यासाठी जेंव्हा जेंव्हा तुम्हाला चर्चा अपेक्षित नसते तेंव्हा तेंव्हा तशी सूचना लेखाच्या तळाशी द्यावी असा सल्ला मी दिला आहे. जे झाले ते झाले. निदान पुढच्या वेळी काळजी घ्यावी असेही मी सुचविले आहे. ह्यात तुम्हाला राग कुठे दिसला? त्यावर कडाडून चर्चा मला अभिप्रेतच नव्हती (तात्विक / वैचारिक ?!?!). ह्या तुमच्या, इतक्या उशीराने आलेल्या, विधानाने विरस झाला. 'खोदा पहाड निकला चुहा' अशी भावना झाली. हे समजून घेऊन स्वतःची चुक स्विकारण्याऐवजी मला 'राग आल्याचा' अपप्रचार आपण करता आहात. कृपया असे करू नका.
६ ऑक्टोबर २०११ला आयुक्ष्यात पहिलयांदा सेनेच्या दसरा मेळाव्याला शिवाजीपार्कावर हजेरी लावली. तीही बायकोसोबत. बाळासाहेबांची जादू नेमकी काय ते याचि देही याचि डोळां बघणं आवश्यक होतं. माध्यमांवर यांबाबतीत अवलंबून रहाता येतच नाही. पाहिलं तर खरंच, दुसऱ्या दिवशी ‘अण्णा हजाऱ्यांबद्दल ठाकरे असं असं म्हणाले' अशी एक खोडसाळ बातमी पेपरवाल्यांनी सर्व-संगनमताने दिलेलीच होती. मग एका दिवसासाठी व्यवस्थित ठाकरे-हजारे कुस्ती रंगली. वास्तविक अण्णांना अवमानकारक असं काहीही बाळासाहेब बोललेलेच नव्हते. मैदानावरचा प्रत्यक्षदर्शी म्हणून हे मी खात्रीपूर्वक सांगतो. आणखी हेही की बाळासाहेब ठाकरे ही एक जादू आहे.

सीमोल्लंघन

राजेश घासकडवी ·

शुचि 07/10/2011 - 05:34
लेख खूप आवडला. आजचा माझा दिवस वाईट गेला. राहून राहून हेच वाटत राहीलं की - ॐ भद्रं कर्णेभि: शृणुयाम देवा: | भद्रं पश्येमाक्षिभिर्यजत्रा: | स्थिरैरंगैस्तुष्टुवांसस्तनुभि: | व्यशेम देवहितं यदायु: || ओम् शांति: शान्ति: शान्ति: ||. म्हणूनच तो धागा ......

धन्या 07/10/2011 - 05:51
सुंदर स्फुट. ओघवतं झालं आहे लेखन.
आपल्या आत्तापर्यंतच्या आयुष्याच्या मर्यादेत वावरणं सुखाचं असतं. कंफर्ट झोन असतो एक. त्या आखीव चौकटीतून बाहेर पडणं कष्टाचं असेलच असं नाही. पण बऱ्याच वेळा ती कल्पनाच अधिक भीतीदायक असते. मर्ढेकरांच्या भाषेत, नदीवर चांदण्यात डुंबण्यापेक्षा घरातच पाऱ्याच्या पारव्या प्रकाशात तोतऱ्या नळाची धार डोक्यावर घेणं सोपं वाटतं.
कंफर्ट झोनमधून बाहेर पडायचं केवळ या एव्हढया एकच कारणासाठी आम्ही सहा महिन्यांपूर्वी आमची जुनी नोकरी सोडली. कंपनीने आम्हाला साडेचार वर्षांत भरभरुन दिलेलं. आम्हीही कंपनीवर एकनिष्ट पत्नी पतीवर जितकं प्रेम करेल त्यापेक्षा जास्त प्रेम केलेलं. कितीही वाईट दिवस आले तरी आपल्याला गुलाबी प्रेमपत्र मिळणार नाही याची खात्री झालेली. मॅनेजर, त्यांचे मॅनेजर हे बॉस न राहता नऊ - सहाच्या पलिकडे हाक मारता येतील असे मित्र झालेले. पण तरीही कहीतरी खटकायला लागलं. आता जूनी झालेली कात टाकायला हवी याची जाणिव झाली आणि एका नाजूक दिवशी आम्ही सीमोल्लंघन केलं... जाता जाता, तुम्ही प्रियालीतैंच्या सार्‍या लेखांचे दुवे दिले आहेत. पण तिथे तर सार्‍या लक्ष्मणरेखा दिसत आहेत. तैंनी या लक्ष्मणरेखा ओलांडून सीमोल्लंघन केलं असं समजायचं का? ;)

मुक्तसुनीत 07/10/2011 - 06:20
लेख अतिशय आवडला. प्रवासाची मेटाफर जशी एकंदर सर्व गोष्टींना चपखल बसते त्यामधे स्थित्यंतर आलंच. मग त्याला सीमोल्लंघन म्हणा , स्थित्यंतर म्हणा. इंग्रजीतला चपखल वाक्प्रचार आहे "Overstaying one's welcome". तेही लागू आहेच. असो. प्रत्येक सीमोल्लंघनात नव्या वाटा, नवी ठिकाणे आणि नवी क्षितिजे यांची हाक ऐकू येते. जोवर ही वृत्ती आपल्या आत आहे तोवर नव्या गोष्टींना मरण नाही.

क्रेमर 07/10/2011 - 06:32
नव्याच्या आशेने केलेले सीमोल्लंघन बळ देते. जुन्याला कंटाळून केलेले सीमोल्लंघन दुबळे करते. समस्त मानवजातीला विजयादशमीच्या शुभेच्छा.

संपूर्ण लेखातला आशावाद आणि पॉझिटीव्हीटी आवडली. अल्पकाळासाठी वाईट दिसणारी कृतीही दीर्घकालीन फायद्याची ठरू शकते आणि तसे निर्णय घेण्याची दृष्टी आणि क्षमता असावी. व्यक्तीशः मला कंफर्ट झोनमधून बाहेर येण्याची गरज आहे हे पुन्हा एकदा या स्फुटामधून लक्षात आलं. त्याबद्दल औपचारिक आभार मानत नाही. प्रियालीचेही काही चांगले प्लॅन्स असतील त्यासाठी मनापासून शुभेच्छा.

अशी नवीन सुरूवात करणं हे सोपं नसतं. आपल्या आत्तापर्यंतच्या आयुष्याच्या मर्यादेत वावरणं सुखाचं असतं. कंफर्ट झोन असतो एक. त्या आखीव चौकटीतून बाहेर पडणं कष्टाचं असेलच असं नाही. पण बऱ्याच वेळा ती कल्पनाच अधिक भीतीदायक असते. हे तर भारीच.

स्वानन्द 07/10/2011 - 13:41
छान लिहीलंय.... आखीव चौकटीतून बाहेर येणं हे आवश्यकच. पण एक चौकट मोडली किंवा सोडली या आनंदात नवीन चौकटीत रमण्याची शक्यताही आहेच. तेव्हा.. थोडक्यात एका चौकटीची जागा दुसर्या चौकटीने घेतली एवढाच फरक होणार असेल तर तो फारसा मौल्यवान म्हणता येणार नाही.... खर्‍या अर्थाने कोणत्याही चौकटीच्या बंधनाचीच गरज भासणार नाही तो दिवस सोन्याचा!!

स्मिता. 07/10/2011 - 14:14
दसर्‍याच्या निमित्ताने लेखात मांडलेले विचार आवडले. नदीवर चांदण्यात डुंबण्यापेक्षा घरातच पाऱ्याच्या पारव्या प्रकाशात तोतऱ्या नळाची धार डोक्यावर घेणं सोपं वाटतं. बहुतेक वेळा हे असंच होत असतं आणि आपण सहज शक्य असलेले बदल नाकारत जातो. आपल्या सुरक्षीत चौकटीबाहेर पाऊल टाकणे म्हणजेच खरे सीमोल्लंघन हे पटले. जाता जाता प्रियालीताईंच्या लेखांचा दुवा का दिला ते कळलं नाही.

In reply to by मनीषा

कंफर्ट झोन सोडून बाहेर येणं याची नेहमीच गरज असतेच का?
थोडक्यात उत्तर 'गरज नसते'. मात्र आपण आपल्यासाठी जे क्षेत्र आखून घेतलेलं आहे त्याची सीमा ओलांडायची भीती वाटते की त्या क्षेत्रावर आपलं इतकं प्रेम आहे की बाहेर जाण्याची गरज भासत नाही यावर ती गरज ठरते. लेखन करण्याची मनस्वी आवड असणाऱ्याला, 'जा, तू बंजी जंपिंग करून बघ' म्हणण्याचा उद्देश नाही. पण लेखनाच्याच क्षेत्रात आपण नेहमी लिहितो त्यापेक्षा काहीतरी वेगळं लिहून बघणं हे सीमोल्लंघन ठरू शकतं. तेही करण्याची गरज असतेच असंही नाही. पण स्वतःला ती गरज आहे का हा किमान प्रश्न तरी विचारून बघावा, इतकंच.

मस्त प्रकटन, राजेश. कंफर्ट झोन बद्दल लिहिलेले पटले. गेले बरेच दिवस याचाच विचार करत होतो. काल सीमोल्लंघन करायचा निर्णय घेतला आहे. दान मनासारखे पडले तर .... विमे

बर्‍याच लोकांचा असा सुध्दा अनुभव असतो कि , त्यांनी कंफर्ट झोन सोडुन बर्‍याच गोष्टी मिळवल्या पण पुर्वीचे समाधान मात्र हरवले +१ फार किंमत मोजावि लागते.. काहि वेळा घाट्यात येतो माणुस

In reply to by अविनाशकुलकर्णी

बरोबर. मराठी_माणूस व अविनाशकुलकर्णी यांनी उत्तम मुद्दा मांडलेला आहे. आपलं आधी चांगलं चाललं होतं, कशाला या मृगजळाच्या मागे धावून हाती होतं तेही घालवून बसलो, असा प्रश्न पडू शकतो. पण तो दोष सीमोल्लंघनाचा म्हणता येत नाही. आपल्याला नवीन काहीतरी हवं आहे असं एके काळी मनापासून वाटलेलं असतं. ते हाती येईल असंही वाटलेलं असतं. हातचं किती मौल्यवान आहे याची पूर्ण कल्पना आलेली नसते. दुर्दैवाने स्वप्नांच्या मागे धावणं हे वेगवेगळ्या प्रकारच्या धोक्यांनी भरलेलं असतं. ते धोके आहेत म्हणून प्रवास थांबवावा का? जर हाती आहे तेच सर्वोत्तम आहे अशी खात्री असेल तर तुम्हाला स्वप्नांच्या सायरेनपासून धोका नाहीच, कारण तुम्हाला हवं आहे त्याच क्षेत्रात तुम्ही आहात. मात्र 'माझं स्वप्न दूर तिथे कुठेतरी आहे, पण काय करू, या कंफर्ट झोनमध्ये बरं वाटतं', अशी परिस्थिती असेल तर स्वप्नांच्या दिशेने किमान पावलं टाकावीत एवढाच संदेश आहे.

In reply to by राजेश घासकडवी

धन्या 08/10/2011 - 09:26
मराठी माणूस यांची शंका आणि घासूगुरु़जींचे शंका समाधान दोन्हींना +१. कधी कधी स्वप्नांच्या मागे धावताना "आ बैल मुझे मार" होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पण अशा वेळी गुरुजी म्हणत आहेत तशी आपली "अ‍ॅसेसमेंट" चुकली म्हणायची.

In reply to by राजेश घासकडवी

वपाडाव 11/10/2011 - 10:46
माझं स्वप्न दूर तिथे कुठेतरी आहे, पण काय करू, या कंफर्ट झोनमध्ये बरं वाटतं', अशी परिस्थिती असेल तर स्वप्नांच्या दिशेने किमान पावलं टाकावीत एवढाच संदेश आहे.
वाह !! वाह !!! काय निरसन केलंय..... लाजवाब..... गुर्जी लेख तर झ्याक झालायंच अन त्यावर हे वाक्य म्हणजे सोने पे सुहागा...... लगे रहो.....

सन्जोप राव 07/10/2011 - 18:13
लेख रुढार्थाने आवडला. त्यातून क्रिप्टिक अर्थ अभिप्रेत असेल तर त्यात रस नाही. क्षमस्व. सुरक्षिततेचे वलय भेदून बाहेर पाऊल टाकणे, सतत नवनवे धोके पत्करत राहाणे यात एक नशा, झिंग असली तरी ते प्रत्येकालाच जमते किंवा जमावे असे नाही. ती एक मानसिकता असते. कानकाप्या गॉफ, जुगारी दायस्तोवस्की, लिंगपिसाट मोपासां हे एका बाजूला आणि मचूळ, कोमट आयुष्ये रेटत राहाणारी जनता दुसर्‍या बाजूला यांत खरे-खोटे, चूक-बरोबर असे ठरवता येणार नाही. सीमोल्लघंनाची गरज असलेल्यांनी ते जरुर करावे. ( दिल्लीत दूरदर्शनवर पुलं फारच रमताहेत असे ध्यानात आल्यावर त्यांना तसा सावधानतेचा इशारा देणार्‍या सुनीताबाई आणि ताबडतोब जेवणाच्या टेबलावर राजिनामा खरडणारे पुलं - हे अस्सल मराठी उदाहरण आहे.) एरवी काहीतरी फक्त जुने झाले आहे म्हणून ते मोडण्याचा अट्टाहास करण्यात अर्थ नाही. पण परत वर म्हटले तसे. काही लोकांना हे जमते, नव्हे आवश्यकच वाटते; काही सरळ रेषेसारखी आयुष्ये जगत असतात. यांतील दोहोंना दुसरा विचित्र आहे असे वाटते.

चतुरंग 07/10/2011 - 18:46
कित्येकदा इतरेजन जसे उंदीरशर्यतीत उरस्फोड करुन धावत असतात तसे न धावणे आणि आपल्या मनाला जे १००% पटते आहे तीच गोष्ट करणे हे सुद्धा एकप्रकारचे सीमोल्लंघनच म्हणायला हवे. कंफर्ट झोन कधी सुरु होतो? तो सुरु झाला आहे की नाही? हे प्रश्न स्वतःकडे त्रयस्थ नजरेने पाहू शकणार्‍या प्रत्येकाला पडतात किमान पडायला हवेत. नेहेमीच्या दिनक्रमातला उत्साह, न समजणार्‍या कारणाने, भिजलेल्या कागदासारखा लुळा पडत असला तर तुम्ही कंफर्टझोन मधे आहात असे समजायला हरकत नाही. बदलाची भीती ही प्रत्येकाला असते. प्रत्येक बदलात काही मिळवणे आणि काही गमावणे हे सुद्धा असतेच. काहीवेळा परिस्थितीने तुमच्यावर सीमोल्लंघन करण्याची वेळ येते आणि ते खरोखरंच अवघड असते. यात एकतर आगीतून तावून सुलाखून निघालेल्या सोन्यासारखा माणूस झळाळून उठतो किंवा साफ कोलमडून पडतो. करायचे म्हणून सीमोल्लंघन करणे यालाही फारसा अर्थ नाही. जोपर्यंत ती जाणीव तुम्हाला आतूनच अस्वस्थ करत नाही तोपर्यंत असे लादलेले बदल फारसे उपयोगी ठरत नाहीत. -चतुरंग

दिपक 08/10/2011 - 09:39
कधी कधी नवीन सुरूवात म्हणजे केवळ कात टाकणं असतं. कधी ते अनोळखी प्रदेशात जाणं असतं. तर कधी ओळखीचा प्रदेश सोडून देणं असतं. कधी नवीन राज्याची घडी बसवणं असतं तर कधी हरवलेलं, जुनं राज्य ताब्यात घेण्यासाठी शस्त्र हातात घेणं असतं. कधी नवीन अक्षरं गिरवणं असतं, तर कधी पूर्वीची पुसून टाकणं असतं. कधी आहे त्याचा विस्तार करणं असतं तर कधी शून्यापासून सुरूवात करावी लागते.
हे वाचुन एक जुना लेख आठवला !
यंग ऍण्ड एनर्जेटिक.. रहायला तर हवं...पण कसं? भारंभार क्रीम चोपडलं,हजारदा केल्या पार्लर्च्या वार्‍या तरी वयाच्या सुरकुत्या कधी ना कधी चेहर्‍यावर चढणारच ना? कितीही घातले ट्रेण्डी कपडे आणि वापरल्या कार्गो पॅण्टस तरी लागतेच ना धाप चार जिने चढल्यावर? ट्रेकिंगसाठी तुडवलेल्या वाटा आता दमचाक करवतातच... प्रश्न करायचं काय?..........करता येईल खरं तर............ तुमच्या मोबाईल मध्ये वर्षानुवर्षे सेव्ह केलेले काही नंबर्स आहेत? काही मेसेजेस? ताबडतोब डिलीट करुन टाका. जे मोबाईलचं तेच डोक्याचं. जुन्या तारखा , जुनी भांडणं , कधी काळी कमी असलेल्या वजनाचे आकडे, कुणाला कोणत्या तारखेला भेटलो ते तपशील काढुन टाका डोक्यातुन हे सारं कोंबलेलं. बघा ..... हलकं वाटेल. नवं काही सेव्ह करायचं तुमच्या मेमरी मध्ये तर स्पेस नको तयार करायला? अपडेट करा तुमची सिस्टिम!!!!! कोणाशी मैत्री आहे तुमची? जे सारखे किरकिर करतात? त्यांना जगण्यात रस वाटत नाही ? सतत उदासवाणी रडगाणी गातात? आपलं काहीच कसं खरं नाही , सगळं जगच कसं वाईट आहे. लोक कसे वाईट्ट आहेत , आपल्या वाईटावर टपले आहेत अशी सतत भुणभुण करतात तुमच्या डोक्याशी? ताबडतोब मैत्री तोडुन टाका त्यांच्याशी. असे उदास जंतु तुमचं आयुष्य कुजवुन टाकतात. त्यापेक्षा भरभरुन आनंदी जगणार्‍याम्च्या सहवासात रहा. आनंदी रहा... आणि हो तुम्ही कोणत्या गटात येता? ते पण एकदा तपासुन पहा. शिकत रहा. मजा येते शिकताना. काय वाट्टेल ते शिका. तुम्हाला येत नसलेली अगदी लहानात लहान गोष्ट शिका, मेंदुवर गंज चढु देउ नका. मेंदुला सतत उद्योग असलेला बरा. तो खुष, आपण खुष. रिकामं डोकं भुताचं घर असतं माहितेय ना? मेंदुला काम दिल की तो रंग भरायला लागतो. तुम्हाला पाणी पुरी खायला आवडते? भेळ? लालचुटुक बरआहा गोळा? बुढ्ढी के बाल खाताना अजुनही मजा येते? मग करा ना ते !!!!! अगदी लहान छोट्यात छोटी गोष्ट करायला आवडत असेल ते मनापासुन करा. मजा येईल. आपण मोठ्ठे झालो , आता अमुक तमुक करणं बरं दिसेल का असा फ़ालतु विछा आजिबात करायचा नाही. मनापासुन हसा. हसत रहा. ज्यांच्याबरोबर राहुन तुम्हाला हसावसं वाटतं त्यांच्याबरोबर रहा. इतरांना हसवा,दिलखुलास हसा. दिवसातुन एकदा तरी.......!!!!!!!! त्रास होतोच ना..! माणसांचा होतो घटनांचा होतो,शब्दांचाही होतो. पण त्रास झाला की सोडुन द्यायचं. उगीच मन कुरतडत बसायचं नाही. ज्याने त्रास दिला तो एकदाच दिलेला असतो; पण ते सतत आठवुन स्वताचा त्रास वाढवायचा,वागवायचा. त्या त्रासाच्या आणि चिडचिडीच्या ओझ्याने आपलं जगणं गुदमरतं. "गेला उडत" असा बेदरकारपणा इथे वापरायला हरकत नाही. काय मनापासून आवडते तुम्हाला? यादी करा आणि जीव लावून ते करा. आवडतो का तुम्हाला हिमेश रेशमिया ? मग लोक काही का म्हणेनात ऐका न त्याची गाणी ! आवडतात का तुम्हाला चित्र काढायला ? मग चित्र काढा. तुम्ही महान चित्रकार नाही होणार. पण चित्र तर काढा ! मनात काही सलतयं का ? डोळ्यात येतय उगाच पाणी ? कसली तरी लागलीय बोचणी? मग बोलून टाका. काढून टाका तो गिल्ट मनातून . मागायची का कोणाची माफ़ी ? आज मागा. छान हलके वाटेल मनात. कसलीही गिल्ट घेउन जगु नका..... कशाला छाळायचं उगीच स्वत:ला ? प्रेमांच्या माणसांशी बोलून किती दिवस झाले? " तुला ती साडी छान दिसते ! ही नको तीच साडी नेस" आसा आग्रह आईला कधी केला होता? बाबांच्या मित्राच्या तब्बेतीची चौकशी कधी केली, आठवतयं? करा. ज्यांच्यावर तुमचे प्रेम आहे त्याना ते जाणवू द्या. "आय लव्ह यु" म्हणणे सोपे असते म्हणून तर पहा. आणि नसेलच म्हणायचे तर द्या हातात हात..... तो ही पुरेसा बोलका आसतो..... तुमचे घर वाट पाहत तुमची, तिथल्या भिंती, पडदे, खिडक्याच नाही तर भांडीकुंडीही तुमच्या साठी आतुर आसतात. घरी परता. घरात रहा. घराचे होटेल झाले माणसांची मुळं तुटतात .... घरट्यातल्या उबेला विसरु नका.... जगण्यातली उर्जा तिथूनच येते......

पैसा 09/10/2011 - 22:02
नेहमीप्रमाणेच सुरेख लिहिलंय. कम्फर्ट झोनमधून बाहेर येणं हीच फार कठीण गोष्ट आहे. जे हे सहज करू शकतात, तेच असामान्यत्वाच्या एक पाऊल आणखी जवळ जातात. प्रियालीला आणि सीमोल्लंघन करू इच्छिणार्‍या सार्‍यानाच माझ्या मनापासून शुभेच्छा! फक्त हे सीमोल्लंघन खरोखरच सीमा ओलांडणारं ठरू दे.

मन१ 11/10/2011 - 10:09
आवडले. जे मनापस्सोन करावेसे वाटते, ते नक्कीच करावे; ह्या अर्थाने "सीमोल्लंघन " असेल तर नक्कीच करावे. पण "आता काहितरी नवीन करून दाखवतो" असा अभिनिवेश किंवा उसने अवसान आणणे हे चौकटित राहून जगण्यापेक्षाही अधिक घातक असते हे जवळच्या व्यक्तिच्या अनुभवातून शिकलोय.

शुचि 07/10/2011 - 05:34
लेख खूप आवडला. आजचा माझा दिवस वाईट गेला. राहून राहून हेच वाटत राहीलं की - ॐ भद्रं कर्णेभि: शृणुयाम देवा: | भद्रं पश्येमाक्षिभिर्यजत्रा: | स्थिरैरंगैस्तुष्टुवांसस्तनुभि: | व्यशेम देवहितं यदायु: || ओम् शांति: शान्ति: शान्ति: ||. म्हणूनच तो धागा ......

धन्या 07/10/2011 - 05:51
सुंदर स्फुट. ओघवतं झालं आहे लेखन.
आपल्या आत्तापर्यंतच्या आयुष्याच्या मर्यादेत वावरणं सुखाचं असतं. कंफर्ट झोन असतो एक. त्या आखीव चौकटीतून बाहेर पडणं कष्टाचं असेलच असं नाही. पण बऱ्याच वेळा ती कल्पनाच अधिक भीतीदायक असते. मर्ढेकरांच्या भाषेत, नदीवर चांदण्यात डुंबण्यापेक्षा घरातच पाऱ्याच्या पारव्या प्रकाशात तोतऱ्या नळाची धार डोक्यावर घेणं सोपं वाटतं.
कंफर्ट झोनमधून बाहेर पडायचं केवळ या एव्हढया एकच कारणासाठी आम्ही सहा महिन्यांपूर्वी आमची जुनी नोकरी सोडली. कंपनीने आम्हाला साडेचार वर्षांत भरभरुन दिलेलं. आम्हीही कंपनीवर एकनिष्ट पत्नी पतीवर जितकं प्रेम करेल त्यापेक्षा जास्त प्रेम केलेलं. कितीही वाईट दिवस आले तरी आपल्याला गुलाबी प्रेमपत्र मिळणार नाही याची खात्री झालेली. मॅनेजर, त्यांचे मॅनेजर हे बॉस न राहता नऊ - सहाच्या पलिकडे हाक मारता येतील असे मित्र झालेले. पण तरीही कहीतरी खटकायला लागलं. आता जूनी झालेली कात टाकायला हवी याची जाणिव झाली आणि एका नाजूक दिवशी आम्ही सीमोल्लंघन केलं... जाता जाता, तुम्ही प्रियालीतैंच्या सार्‍या लेखांचे दुवे दिले आहेत. पण तिथे तर सार्‍या लक्ष्मणरेखा दिसत आहेत. तैंनी या लक्ष्मणरेखा ओलांडून सीमोल्लंघन केलं असं समजायचं का? ;)

मुक्तसुनीत 07/10/2011 - 06:20
लेख अतिशय आवडला. प्रवासाची मेटाफर जशी एकंदर सर्व गोष्टींना चपखल बसते त्यामधे स्थित्यंतर आलंच. मग त्याला सीमोल्लंघन म्हणा , स्थित्यंतर म्हणा. इंग्रजीतला चपखल वाक्प्रचार आहे "Overstaying one's welcome". तेही लागू आहेच. असो. प्रत्येक सीमोल्लंघनात नव्या वाटा, नवी ठिकाणे आणि नवी क्षितिजे यांची हाक ऐकू येते. जोवर ही वृत्ती आपल्या आत आहे तोवर नव्या गोष्टींना मरण नाही.

क्रेमर 07/10/2011 - 06:32
नव्याच्या आशेने केलेले सीमोल्लंघन बळ देते. जुन्याला कंटाळून केलेले सीमोल्लंघन दुबळे करते. समस्त मानवजातीला विजयादशमीच्या शुभेच्छा.

संपूर्ण लेखातला आशावाद आणि पॉझिटीव्हीटी आवडली. अल्पकाळासाठी वाईट दिसणारी कृतीही दीर्घकालीन फायद्याची ठरू शकते आणि तसे निर्णय घेण्याची दृष्टी आणि क्षमता असावी. व्यक्तीशः मला कंफर्ट झोनमधून बाहेर येण्याची गरज आहे हे पुन्हा एकदा या स्फुटामधून लक्षात आलं. त्याबद्दल औपचारिक आभार मानत नाही. प्रियालीचेही काही चांगले प्लॅन्स असतील त्यासाठी मनापासून शुभेच्छा.

अशी नवीन सुरूवात करणं हे सोपं नसतं. आपल्या आत्तापर्यंतच्या आयुष्याच्या मर्यादेत वावरणं सुखाचं असतं. कंफर्ट झोन असतो एक. त्या आखीव चौकटीतून बाहेर पडणं कष्टाचं असेलच असं नाही. पण बऱ्याच वेळा ती कल्पनाच अधिक भीतीदायक असते. हे तर भारीच.

स्वानन्द 07/10/2011 - 13:41
छान लिहीलंय.... आखीव चौकटीतून बाहेर येणं हे आवश्यकच. पण एक चौकट मोडली किंवा सोडली या आनंदात नवीन चौकटीत रमण्याची शक्यताही आहेच. तेव्हा.. थोडक्यात एका चौकटीची जागा दुसर्या चौकटीने घेतली एवढाच फरक होणार असेल तर तो फारसा मौल्यवान म्हणता येणार नाही.... खर्‍या अर्थाने कोणत्याही चौकटीच्या बंधनाचीच गरज भासणार नाही तो दिवस सोन्याचा!!

स्मिता. 07/10/2011 - 14:14
दसर्‍याच्या निमित्ताने लेखात मांडलेले विचार आवडले. नदीवर चांदण्यात डुंबण्यापेक्षा घरातच पाऱ्याच्या पारव्या प्रकाशात तोतऱ्या नळाची धार डोक्यावर घेणं सोपं वाटतं. बहुतेक वेळा हे असंच होत असतं आणि आपण सहज शक्य असलेले बदल नाकारत जातो. आपल्या सुरक्षीत चौकटीबाहेर पाऊल टाकणे म्हणजेच खरे सीमोल्लंघन हे पटले. जाता जाता प्रियालीताईंच्या लेखांचा दुवा का दिला ते कळलं नाही.

In reply to by मनीषा

कंफर्ट झोन सोडून बाहेर येणं याची नेहमीच गरज असतेच का?
थोडक्यात उत्तर 'गरज नसते'. मात्र आपण आपल्यासाठी जे क्षेत्र आखून घेतलेलं आहे त्याची सीमा ओलांडायची भीती वाटते की त्या क्षेत्रावर आपलं इतकं प्रेम आहे की बाहेर जाण्याची गरज भासत नाही यावर ती गरज ठरते. लेखन करण्याची मनस्वी आवड असणाऱ्याला, 'जा, तू बंजी जंपिंग करून बघ' म्हणण्याचा उद्देश नाही. पण लेखनाच्याच क्षेत्रात आपण नेहमी लिहितो त्यापेक्षा काहीतरी वेगळं लिहून बघणं हे सीमोल्लंघन ठरू शकतं. तेही करण्याची गरज असतेच असंही नाही. पण स्वतःला ती गरज आहे का हा किमान प्रश्न तरी विचारून बघावा, इतकंच.

मस्त प्रकटन, राजेश. कंफर्ट झोन बद्दल लिहिलेले पटले. गेले बरेच दिवस याचाच विचार करत होतो. काल सीमोल्लंघन करायचा निर्णय घेतला आहे. दान मनासारखे पडले तर .... विमे

बर्‍याच लोकांचा असा सुध्दा अनुभव असतो कि , त्यांनी कंफर्ट झोन सोडुन बर्‍याच गोष्टी मिळवल्या पण पुर्वीचे समाधान मात्र हरवले +१ फार किंमत मोजावि लागते.. काहि वेळा घाट्यात येतो माणुस

In reply to by अविनाशकुलकर्णी

बरोबर. मराठी_माणूस व अविनाशकुलकर्णी यांनी उत्तम मुद्दा मांडलेला आहे. आपलं आधी चांगलं चाललं होतं, कशाला या मृगजळाच्या मागे धावून हाती होतं तेही घालवून बसलो, असा प्रश्न पडू शकतो. पण तो दोष सीमोल्लंघनाचा म्हणता येत नाही. आपल्याला नवीन काहीतरी हवं आहे असं एके काळी मनापासून वाटलेलं असतं. ते हाती येईल असंही वाटलेलं असतं. हातचं किती मौल्यवान आहे याची पूर्ण कल्पना आलेली नसते. दुर्दैवाने स्वप्नांच्या मागे धावणं हे वेगवेगळ्या प्रकारच्या धोक्यांनी भरलेलं असतं. ते धोके आहेत म्हणून प्रवास थांबवावा का? जर हाती आहे तेच सर्वोत्तम आहे अशी खात्री असेल तर तुम्हाला स्वप्नांच्या सायरेनपासून धोका नाहीच, कारण तुम्हाला हवं आहे त्याच क्षेत्रात तुम्ही आहात. मात्र 'माझं स्वप्न दूर तिथे कुठेतरी आहे, पण काय करू, या कंफर्ट झोनमध्ये बरं वाटतं', अशी परिस्थिती असेल तर स्वप्नांच्या दिशेने किमान पावलं टाकावीत एवढाच संदेश आहे.

In reply to by राजेश घासकडवी

धन्या 08/10/2011 - 09:26
मराठी माणूस यांची शंका आणि घासूगुरु़जींचे शंका समाधान दोन्हींना +१. कधी कधी स्वप्नांच्या मागे धावताना "आ बैल मुझे मार" होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पण अशा वेळी गुरुजी म्हणत आहेत तशी आपली "अ‍ॅसेसमेंट" चुकली म्हणायची.

In reply to by राजेश घासकडवी

वपाडाव 11/10/2011 - 10:46
माझं स्वप्न दूर तिथे कुठेतरी आहे, पण काय करू, या कंफर्ट झोनमध्ये बरं वाटतं', अशी परिस्थिती असेल तर स्वप्नांच्या दिशेने किमान पावलं टाकावीत एवढाच संदेश आहे.
वाह !! वाह !!! काय निरसन केलंय..... लाजवाब..... गुर्जी लेख तर झ्याक झालायंच अन त्यावर हे वाक्य म्हणजे सोने पे सुहागा...... लगे रहो.....

सन्जोप राव 07/10/2011 - 18:13
लेख रुढार्थाने आवडला. त्यातून क्रिप्टिक अर्थ अभिप्रेत असेल तर त्यात रस नाही. क्षमस्व. सुरक्षिततेचे वलय भेदून बाहेर पाऊल टाकणे, सतत नवनवे धोके पत्करत राहाणे यात एक नशा, झिंग असली तरी ते प्रत्येकालाच जमते किंवा जमावे असे नाही. ती एक मानसिकता असते. कानकाप्या गॉफ, जुगारी दायस्तोवस्की, लिंगपिसाट मोपासां हे एका बाजूला आणि मचूळ, कोमट आयुष्ये रेटत राहाणारी जनता दुसर्‍या बाजूला यांत खरे-खोटे, चूक-बरोबर असे ठरवता येणार नाही. सीमोल्लघंनाची गरज असलेल्यांनी ते जरुर करावे. ( दिल्लीत दूरदर्शनवर पुलं फारच रमताहेत असे ध्यानात आल्यावर त्यांना तसा सावधानतेचा इशारा देणार्‍या सुनीताबाई आणि ताबडतोब जेवणाच्या टेबलावर राजिनामा खरडणारे पुलं - हे अस्सल मराठी उदाहरण आहे.) एरवी काहीतरी फक्त जुने झाले आहे म्हणून ते मोडण्याचा अट्टाहास करण्यात अर्थ नाही. पण परत वर म्हटले तसे. काही लोकांना हे जमते, नव्हे आवश्यकच वाटते; काही सरळ रेषेसारखी आयुष्ये जगत असतात. यांतील दोहोंना दुसरा विचित्र आहे असे वाटते.

चतुरंग 07/10/2011 - 18:46
कित्येकदा इतरेजन जसे उंदीरशर्यतीत उरस्फोड करुन धावत असतात तसे न धावणे आणि आपल्या मनाला जे १००% पटते आहे तीच गोष्ट करणे हे सुद्धा एकप्रकारचे सीमोल्लंघनच म्हणायला हवे. कंफर्ट झोन कधी सुरु होतो? तो सुरु झाला आहे की नाही? हे प्रश्न स्वतःकडे त्रयस्थ नजरेने पाहू शकणार्‍या प्रत्येकाला पडतात किमान पडायला हवेत. नेहेमीच्या दिनक्रमातला उत्साह, न समजणार्‍या कारणाने, भिजलेल्या कागदासारखा लुळा पडत असला तर तुम्ही कंफर्टझोन मधे आहात असे समजायला हरकत नाही. बदलाची भीती ही प्रत्येकाला असते. प्रत्येक बदलात काही मिळवणे आणि काही गमावणे हे सुद्धा असतेच. काहीवेळा परिस्थितीने तुमच्यावर सीमोल्लंघन करण्याची वेळ येते आणि ते खरोखरंच अवघड असते. यात एकतर आगीतून तावून सुलाखून निघालेल्या सोन्यासारखा माणूस झळाळून उठतो किंवा साफ कोलमडून पडतो. करायचे म्हणून सीमोल्लंघन करणे यालाही फारसा अर्थ नाही. जोपर्यंत ती जाणीव तुम्हाला आतूनच अस्वस्थ करत नाही तोपर्यंत असे लादलेले बदल फारसे उपयोगी ठरत नाहीत. -चतुरंग

दिपक 08/10/2011 - 09:39
कधी कधी नवीन सुरूवात म्हणजे केवळ कात टाकणं असतं. कधी ते अनोळखी प्रदेशात जाणं असतं. तर कधी ओळखीचा प्रदेश सोडून देणं असतं. कधी नवीन राज्याची घडी बसवणं असतं तर कधी हरवलेलं, जुनं राज्य ताब्यात घेण्यासाठी शस्त्र हातात घेणं असतं. कधी नवीन अक्षरं गिरवणं असतं, तर कधी पूर्वीची पुसून टाकणं असतं. कधी आहे त्याचा विस्तार करणं असतं तर कधी शून्यापासून सुरूवात करावी लागते.
हे वाचुन एक जुना लेख आठवला !
यंग ऍण्ड एनर्जेटिक.. रहायला तर हवं...पण कसं? भारंभार क्रीम चोपडलं,हजारदा केल्या पार्लर्च्या वार्‍या तरी वयाच्या सुरकुत्या कधी ना कधी चेहर्‍यावर चढणारच ना? कितीही घातले ट्रेण्डी कपडे आणि वापरल्या कार्गो पॅण्टस तरी लागतेच ना धाप चार जिने चढल्यावर? ट्रेकिंगसाठी तुडवलेल्या वाटा आता दमचाक करवतातच... प्रश्न करायचं काय?..........करता येईल खरं तर............ तुमच्या मोबाईल मध्ये वर्षानुवर्षे सेव्ह केलेले काही नंबर्स आहेत? काही मेसेजेस? ताबडतोब डिलीट करुन टाका. जे मोबाईलचं तेच डोक्याचं. जुन्या तारखा , जुनी भांडणं , कधी काळी कमी असलेल्या वजनाचे आकडे, कुणाला कोणत्या तारखेला भेटलो ते तपशील काढुन टाका डोक्यातुन हे सारं कोंबलेलं. बघा ..... हलकं वाटेल. नवं काही सेव्ह करायचं तुमच्या मेमरी मध्ये तर स्पेस नको तयार करायला? अपडेट करा तुमची सिस्टिम!!!!! कोणाशी मैत्री आहे तुमची? जे सारखे किरकिर करतात? त्यांना जगण्यात रस वाटत नाही ? सतत उदासवाणी रडगाणी गातात? आपलं काहीच कसं खरं नाही , सगळं जगच कसं वाईट आहे. लोक कसे वाईट्ट आहेत , आपल्या वाईटावर टपले आहेत अशी सतत भुणभुण करतात तुमच्या डोक्याशी? ताबडतोब मैत्री तोडुन टाका त्यांच्याशी. असे उदास जंतु तुमचं आयुष्य कुजवुन टाकतात. त्यापेक्षा भरभरुन आनंदी जगणार्‍याम्च्या सहवासात रहा. आनंदी रहा... आणि हो तुम्ही कोणत्या गटात येता? ते पण एकदा तपासुन पहा. शिकत रहा. मजा येते शिकताना. काय वाट्टेल ते शिका. तुम्हाला येत नसलेली अगदी लहानात लहान गोष्ट शिका, मेंदुवर गंज चढु देउ नका. मेंदुला सतत उद्योग असलेला बरा. तो खुष, आपण खुष. रिकामं डोकं भुताचं घर असतं माहितेय ना? मेंदुला काम दिल की तो रंग भरायला लागतो. तुम्हाला पाणी पुरी खायला आवडते? भेळ? लालचुटुक बरआहा गोळा? बुढ्ढी के बाल खाताना अजुनही मजा येते? मग करा ना ते !!!!! अगदी लहान छोट्यात छोटी गोष्ट करायला आवडत असेल ते मनापासुन करा. मजा येईल. आपण मोठ्ठे झालो , आता अमुक तमुक करणं बरं दिसेल का असा फ़ालतु विछा आजिबात करायचा नाही. मनापासुन हसा. हसत रहा. ज्यांच्याबरोबर राहुन तुम्हाला हसावसं वाटतं त्यांच्याबरोबर रहा. इतरांना हसवा,दिलखुलास हसा. दिवसातुन एकदा तरी.......!!!!!!!! त्रास होतोच ना..! माणसांचा होतो घटनांचा होतो,शब्दांचाही होतो. पण त्रास झाला की सोडुन द्यायचं. उगीच मन कुरतडत बसायचं नाही. ज्याने त्रास दिला तो एकदाच दिलेला असतो; पण ते सतत आठवुन स्वताचा त्रास वाढवायचा,वागवायचा. त्या त्रासाच्या आणि चिडचिडीच्या ओझ्याने आपलं जगणं गुदमरतं. "गेला उडत" असा बेदरकारपणा इथे वापरायला हरकत नाही. काय मनापासून आवडते तुम्हाला? यादी करा आणि जीव लावून ते करा. आवडतो का तुम्हाला हिमेश रेशमिया ? मग लोक काही का म्हणेनात ऐका न त्याची गाणी ! आवडतात का तुम्हाला चित्र काढायला ? मग चित्र काढा. तुम्ही महान चित्रकार नाही होणार. पण चित्र तर काढा ! मनात काही सलतयं का ? डोळ्यात येतय उगाच पाणी ? कसली तरी लागलीय बोचणी? मग बोलून टाका. काढून टाका तो गिल्ट मनातून . मागायची का कोणाची माफ़ी ? आज मागा. छान हलके वाटेल मनात. कसलीही गिल्ट घेउन जगु नका..... कशाला छाळायचं उगीच स्वत:ला ? प्रेमांच्या माणसांशी बोलून किती दिवस झाले? " तुला ती साडी छान दिसते ! ही नको तीच साडी नेस" आसा आग्रह आईला कधी केला होता? बाबांच्या मित्राच्या तब्बेतीची चौकशी कधी केली, आठवतयं? करा. ज्यांच्यावर तुमचे प्रेम आहे त्याना ते जाणवू द्या. "आय लव्ह यु" म्हणणे सोपे असते म्हणून तर पहा. आणि नसेलच म्हणायचे तर द्या हातात हात..... तो ही पुरेसा बोलका आसतो..... तुमचे घर वाट पाहत तुमची, तिथल्या भिंती, पडदे, खिडक्याच नाही तर भांडीकुंडीही तुमच्या साठी आतुर आसतात. घरी परता. घरात रहा. घराचे होटेल झाले माणसांची मुळं तुटतात .... घरट्यातल्या उबेला विसरु नका.... जगण्यातली उर्जा तिथूनच येते......

पैसा 09/10/2011 - 22:02
नेहमीप्रमाणेच सुरेख लिहिलंय. कम्फर्ट झोनमधून बाहेर येणं हीच फार कठीण गोष्ट आहे. जे हे सहज करू शकतात, तेच असामान्यत्वाच्या एक पाऊल आणखी जवळ जातात. प्रियालीला आणि सीमोल्लंघन करू इच्छिणार्‍या सार्‍यानाच माझ्या मनापासून शुभेच्छा! फक्त हे सीमोल्लंघन खरोखरच सीमा ओलांडणारं ठरू दे.

मन१ 11/10/2011 - 10:09
आवडले. जे मनापस्सोन करावेसे वाटते, ते नक्कीच करावे; ह्या अर्थाने "सीमोल्लंघन " असेल तर नक्कीच करावे. पण "आता काहितरी नवीन करून दाखवतो" असा अभिनिवेश किंवा उसने अवसान आणणे हे चौकटित राहून जगण्यापेक्षाही अधिक घातक असते हे जवळच्या व्यक्तिच्या अनुभवातून शिकलोय.
लेखनविषय:
दसरा! रावणाशी झालेलं युद्ध संपलं. आणि अश्विन शुद्ध दशमीला विजयादशमी हे नाव पडलं. रावणाने सीतेला पळवून नेल्यानंतर तिचा शोध, त्यासाठी सुग्रीवाशी मैत्री, त्यातून हनुमानाची भक्ती, लंकादहन, सेतूबांधणी व त्यानंतर नऊ दिवसांचं घनघोर युद्ध. अशा लांबलचक चाललेल्या प्रवासाची समाप्ती झाली. एक पर्व संपलं. आणि नवीन रामराज्य सुरू झालं. पांडवांचा अज्ञातवास संपला. अर्जुनाने बृहन्नडेची घुंगरं पायातून काढली आणि हातात गांडिव धारण केलं. भीमाने बल्लवाचार्याचा झारा ठेवला आणि परत गदा धरली. शमीच्या वृक्षावर लपवून ठेवलेली शस्त्रं अज्ञातवासातून पुन्हा बाहेर आली, त्यांच्या टणत्कारासह, खणत्कारासह.

नव्या संपादकांचे अभिनंदन

क्रेमर ·

क्रेमर 05/10/2011 - 19:24
त्यात काही नव्या संपादकांची नावे दिसली.
'काही' हे ''दोन' असे वाचावे.
गणपा हे मला सदस्य म्हणून त्यांच्या अप्रतिम पाककृतींबद्दल माहीत आहेत.
'पाककृतींबद्दल' हे 'पाककृतींमुळे' असे वाचावे.
या दोन्ही सदस्यांवर संपादनाची नव्या जबाबदारीचे ओझे ...
'संपादनाची' हे 'संपादनाच्या' असे वाचावे.

अनामिक 05/10/2011 - 19:26
सात पैकी दोघांचेच अभिनंदन का? खरंतर सगळ्यांचेच अभिनंदन करायला हवे. नवे संपादक असोत किंवा जुने असोत, स्वतःचे व्याप सांभाळून इथे जातीने लक्ष घालणे आणि कचरा साफ करणे जबाबदारीचेच काम आहे. तेव्हा ह्या कामासाठी सगळ्यांना शुभेच्छा!

In reply to by अनामिक

क्रेमर 05/10/2011 - 19:41
सात पैकी दोघांचेच अभिनंदन का?
इतरांचे आधी झालेले आहे म्हणून पुन्हा करत बसलो नाही.
नवे संपादक असोत किंवा जुने असोत, स्वतःचे व्याप सांभाळून इथे जातीने लक्ष घालणे आणि कचरा साफ करणे जबाबदारीचेच काम आहे. तेव्हा ह्या कामासाठी सगळ्यांना शुभेच्छा!
सहमत आहे. सगळे व्याप सांभाळून, विनामोबदला प्रसंगी नोकरी-धंद्याची कामे धाब्यावर बसवून संपादक काम करतात याचे मी आधीही कौतुक केलेले आहे. तुमच्यासारख्या सदस्यांच्या सद्भावना हाच त्यांचा परतावा आहे.

In reply to by क्रेमर

सहमत आहे. सगळे व्याप सांभाळून, विनामोबदला प्रसंगी नोकरी-धंद्याची कामे धाब्यावर बसवून संपादक काम करतात याचे मी आधीही कौतुक केलेले आहे. तुमच्यासारख्या सदस्यांच्या सद्भावना हाच त्यांचा परतावा आहे.
+१ _________ || संपादकांची कृपा ||

चिरोटा 05/10/2011 - 19:28
नव्या संपादकांचे अभिनंदन. हा धागा आणि वरील एराटा टाकल्याबद्दल क्रेमर ह्यांचे अभिनंदन करावे तेवढे थोडेच.

Nile 05/10/2011 - 20:03
सवयीने नीलकांतचा धागा म्हणजे माझ्यावरच कारवाई की काय या भितीने तो धागा आधी उघडला आणि प्रतिसाद देऊन बसलो! तरी पुनश्चः, नविन संपादक आणि सल्लागार मंडळाचे अभिनंदन. गाठीभेटी होतच राहतील.. हॅ हॅ हॅ. ;-) आणि हो, निवृत्त झालेल्या अन माणसात आलेल्या माजी संपादकांचेपण अभिनंदन. ;-) क्रेमर यांनी अभिनंदन कराव्यास पीठ दिल्याने त्यांचे आभार. ;-)

गणेशा 05/10/2011 - 20:08
नविन संपादकांचे मनापासुन अभिनंदन... सभासद आणि संपादक अशी दुहिरी भुमिका येथे संभाळण्यासाठी मनापासुन शुभेच्छा .. जाता जाता.. जुन्या संपादकांचे ही आभार

यकु 05/10/2011 - 20:15
अरे वा!! आजच कळलं. गणपा भाऊ व पैसा या दोघांचेही अभिनंदन!! योग्य निवड. अवांतरः गणपा भाऊ संपादनाच्या नादात पाकृ बंद पडू नयेत हीच इच्छा! ;-)

धनंजय 05/10/2011 - 23:19
दुव्यावरील यादी ही संपूर्ण संपादकमंडळाची आहे काय? (म्हणजे जुनी यादी रद्द आणि दुव्यावरील यादी ही पूर्ण मानायची, की जुन्या यादीला ही नवीन यादी पुरवणी म्हणून मानायची?)

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

इरसाल 06/10/2011 - 11:26
नवीन स्थापन मंडळाचे हार्दिक अभिनंदन. पण अजून बरेच प्रश्न आहेत मनात.(किस्को पुछे) तूर्तास पुन्हा एकदा अभिनंदन.

In reply to by धनंजय

विकास 05/10/2011 - 23:40
मिसळपावच्या नवीन संपादक मंडळाची घोषणा करण्यात येत आहे. या वाक्यात नवीन संपादक मंडळाची घोषणा केली आहे, नवीन संपादकांची नाही. त्यामुळे बहुदा नवीन यादीत नाव नसलेले आधीचे संपादक माजी झाले असावेत. ;)

In reply to by मुक्तसुनीत

विकास 06/10/2011 - 03:03
आजी-माजी या शब्दांशी अनुप्रास जुळणारे आणखी एक विशेषण आठवून गेले ते इतर. ;) (आता पळ काढतो!)

नंदन 05/10/2011 - 23:43
नूतन संपादकांचे आणि सल्लागार मंडळाचे हार्दिक अभिनंदन!

पाषाणभेद 06/10/2011 - 09:14
हॅ हॅ हॅ मला कोणी 'संपादक होणार का?' म्हणून विचारले तर आपण तर नकार देणार बाबा. संपादक झालो तर लिखाण कोण करणार? उगाच त्या तेंडल्यासारखे व्हायचे- कॅप्टन झाल्यावर प्रेशर अन परफॉरमन्स डाऊन. सर्व विजेत्यांचे अभिनंदन.

In reply to by पाषाणभेद

पैसा 06/10/2011 - 09:30
इथे कोण विजेते नाहीत पाभे! पायजे तर बळीचे बकरे म्हणा हवं तर! ;) सीरीयसली, सगळ्यानी जर समजुतीने घेतलं तर संपादकसुद्धा काही लेखन करू शकतील.

घराणेशाही झिदांबाद(आता मजकुरापेक्षा संपादकीयच जास्त(यव्हढे कह्याले लागते हो संपादक)आमचे नीळकंठ सगल्याहींले पुरुन उरले अन नीलकांत थकले

In reply to by श्री गावसेना प्रमुख

क्रेमर 06/10/2011 - 20:45
(यव्हढे कह्याले लागते हो संपादक)
येथे जुनी यादी पहा. सोळा-सतरा होते. संपादक फक्त संपादनासाठी असतात असा तुमचा गैरसमज होऊ देऊ नका.

श्यामल 06/10/2011 - 18:32
नूतन संपादक मंडळाचे आणि सल्लागार मंडळाचे हार्दिक अभिनंदन ! जल्ला मना जुन्या मंडलात कोन मंडली हुती आनि ह्या नव्या मंडलात कोन मंडली हायत, आनी ती कशी हायत ह्ये कायव म्हाईत नाय ! मी कोनालाच वलखत नाय. .............. कोनाच्या बाजुन कोन लिवित हुतं न कोन कोनाच्या ईरुध लिवित हुतं मना काय बी कललं नाय. कोन कुटच्या गुरुपात हाय ते मना कधीच कललं नाय. आनि मना कदी ते समजुन घ्याव आस पन वाटलं नाय. जे वाचावंसं वाटलं (मंग ते कोनीपन लिवलेलं आसुंदे) ते मी वाचलं न ते माज्या भेजात शिरलं, मना आवाडलं तेच्यावर मी पर्तिसाद लिवला. जे नाय आवाडलं तेला "जल्ला ह्याचा म्होरां, करपाटलां कालीज !" असा मनातल्या मनात बोलुन पर्तिसाद न देता पुढंच्या वाटंला लागले......हाय काय नाय काय ?

प्राजु 07/10/2011 - 06:45
नविन संपादक मंडळाचे मनापासून अभिनंदन! सल्लागार मंडळाचेही अभिनंदन. आणि सर्व संपादक आणि सल्लागार यांना शुभेच्छा! मिपा सदस्य म्हणून नेहमीच सहकार्य करत राहीन. :)

व्यक्ती महत्वाचा नाही ,पद महत्वाचे पदाचा मान हा राखल्या गेला पाहिजे हे माझे पूर्वीपासून मत होते . नवीन संपादक मंडळाचे अभिनंदन . एक मिपाकर म्हणून माझ्याकडून तुम्हाला नेहमीच सहकार्य मिळेल. संपादक हा आपल्यासारखाच एक मिपाकर असून त्याच्या दैनंदिन जीवनातील ताणताणाव व नेहमीच्या रहाटगाड्यातून तो ही विनामूल्य सेवा मराठीच्या आणी मराठी माणसाच्या प्रेमाखातर करत आहे ह्याची मला पूर्ण पणे जाणीव आहे .म्हणूनच आजी व माजी संपादक मंडळाचे निर्णय पाळण्यात मी कोणतीही कसूर कधी ठेवली नाही व भविष्यात ठेवणार नाही .

क्रेमर 05/10/2011 - 19:24
त्यात काही नव्या संपादकांची नावे दिसली.
'काही' हे ''दोन' असे वाचावे.
गणपा हे मला सदस्य म्हणून त्यांच्या अप्रतिम पाककृतींबद्दल माहीत आहेत.
'पाककृतींबद्दल' हे 'पाककृतींमुळे' असे वाचावे.
या दोन्ही सदस्यांवर संपादनाची नव्या जबाबदारीचे ओझे ...
'संपादनाची' हे 'संपादनाच्या' असे वाचावे.

अनामिक 05/10/2011 - 19:26
सात पैकी दोघांचेच अभिनंदन का? खरंतर सगळ्यांचेच अभिनंदन करायला हवे. नवे संपादक असोत किंवा जुने असोत, स्वतःचे व्याप सांभाळून इथे जातीने लक्ष घालणे आणि कचरा साफ करणे जबाबदारीचेच काम आहे. तेव्हा ह्या कामासाठी सगळ्यांना शुभेच्छा!

In reply to by अनामिक

क्रेमर 05/10/2011 - 19:41
सात पैकी दोघांचेच अभिनंदन का?
इतरांचे आधी झालेले आहे म्हणून पुन्हा करत बसलो नाही.
नवे संपादक असोत किंवा जुने असोत, स्वतःचे व्याप सांभाळून इथे जातीने लक्ष घालणे आणि कचरा साफ करणे जबाबदारीचेच काम आहे. तेव्हा ह्या कामासाठी सगळ्यांना शुभेच्छा!
सहमत आहे. सगळे व्याप सांभाळून, विनामोबदला प्रसंगी नोकरी-धंद्याची कामे धाब्यावर बसवून संपादक काम करतात याचे मी आधीही कौतुक केलेले आहे. तुमच्यासारख्या सदस्यांच्या सद्भावना हाच त्यांचा परतावा आहे.

In reply to by क्रेमर

सहमत आहे. सगळे व्याप सांभाळून, विनामोबदला प्रसंगी नोकरी-धंद्याची कामे धाब्यावर बसवून संपादक काम करतात याचे मी आधीही कौतुक केलेले आहे. तुमच्यासारख्या सदस्यांच्या सद्भावना हाच त्यांचा परतावा आहे.
+१ _________ || संपादकांची कृपा ||

चिरोटा 05/10/2011 - 19:28
नव्या संपादकांचे अभिनंदन. हा धागा आणि वरील एराटा टाकल्याबद्दल क्रेमर ह्यांचे अभिनंदन करावे तेवढे थोडेच.

Nile 05/10/2011 - 20:03
सवयीने नीलकांतचा धागा म्हणजे माझ्यावरच कारवाई की काय या भितीने तो धागा आधी उघडला आणि प्रतिसाद देऊन बसलो! तरी पुनश्चः, नविन संपादक आणि सल्लागार मंडळाचे अभिनंदन. गाठीभेटी होतच राहतील.. हॅ हॅ हॅ. ;-) आणि हो, निवृत्त झालेल्या अन माणसात आलेल्या माजी संपादकांचेपण अभिनंदन. ;-) क्रेमर यांनी अभिनंदन कराव्यास पीठ दिल्याने त्यांचे आभार. ;-)

गणेशा 05/10/2011 - 20:08
नविन संपादकांचे मनापासुन अभिनंदन... सभासद आणि संपादक अशी दुहिरी भुमिका येथे संभाळण्यासाठी मनापासुन शुभेच्छा .. जाता जाता.. जुन्या संपादकांचे ही आभार

यकु 05/10/2011 - 20:15
अरे वा!! आजच कळलं. गणपा भाऊ व पैसा या दोघांचेही अभिनंदन!! योग्य निवड. अवांतरः गणपा भाऊ संपादनाच्या नादात पाकृ बंद पडू नयेत हीच इच्छा! ;-)

धनंजय 05/10/2011 - 23:19
दुव्यावरील यादी ही संपूर्ण संपादकमंडळाची आहे काय? (म्हणजे जुनी यादी रद्द आणि दुव्यावरील यादी ही पूर्ण मानायची, की जुन्या यादीला ही नवीन यादी पुरवणी म्हणून मानायची?)

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

इरसाल 06/10/2011 - 11:26
नवीन स्थापन मंडळाचे हार्दिक अभिनंदन. पण अजून बरेच प्रश्न आहेत मनात.(किस्को पुछे) तूर्तास पुन्हा एकदा अभिनंदन.

In reply to by धनंजय

विकास 05/10/2011 - 23:40
मिसळपावच्या नवीन संपादक मंडळाची घोषणा करण्यात येत आहे. या वाक्यात नवीन संपादक मंडळाची घोषणा केली आहे, नवीन संपादकांची नाही. त्यामुळे बहुदा नवीन यादीत नाव नसलेले आधीचे संपादक माजी झाले असावेत. ;)

In reply to by मुक्तसुनीत

विकास 06/10/2011 - 03:03
आजी-माजी या शब्दांशी अनुप्रास जुळणारे आणखी एक विशेषण आठवून गेले ते इतर. ;) (आता पळ काढतो!)

नंदन 05/10/2011 - 23:43
नूतन संपादकांचे आणि सल्लागार मंडळाचे हार्दिक अभिनंदन!

पाषाणभेद 06/10/2011 - 09:14
हॅ हॅ हॅ मला कोणी 'संपादक होणार का?' म्हणून विचारले तर आपण तर नकार देणार बाबा. संपादक झालो तर लिखाण कोण करणार? उगाच त्या तेंडल्यासारखे व्हायचे- कॅप्टन झाल्यावर प्रेशर अन परफॉरमन्स डाऊन. सर्व विजेत्यांचे अभिनंदन.

In reply to by पाषाणभेद

पैसा 06/10/2011 - 09:30
इथे कोण विजेते नाहीत पाभे! पायजे तर बळीचे बकरे म्हणा हवं तर! ;) सीरीयसली, सगळ्यानी जर समजुतीने घेतलं तर संपादकसुद्धा काही लेखन करू शकतील.

घराणेशाही झिदांबाद(आता मजकुरापेक्षा संपादकीयच जास्त(यव्हढे कह्याले लागते हो संपादक)आमचे नीळकंठ सगल्याहींले पुरुन उरले अन नीलकांत थकले

In reply to by श्री गावसेना प्रमुख

क्रेमर 06/10/2011 - 20:45
(यव्हढे कह्याले लागते हो संपादक)
येथे जुनी यादी पहा. सोळा-सतरा होते. संपादक फक्त संपादनासाठी असतात असा तुमचा गैरसमज होऊ देऊ नका.

श्यामल 06/10/2011 - 18:32
नूतन संपादक मंडळाचे आणि सल्लागार मंडळाचे हार्दिक अभिनंदन ! जल्ला मना जुन्या मंडलात कोन मंडली हुती आनि ह्या नव्या मंडलात कोन मंडली हायत, आनी ती कशी हायत ह्ये कायव म्हाईत नाय ! मी कोनालाच वलखत नाय. .............. कोनाच्या बाजुन कोन लिवित हुतं न कोन कोनाच्या ईरुध लिवित हुतं मना काय बी कललं नाय. कोन कुटच्या गुरुपात हाय ते मना कधीच कललं नाय. आनि मना कदी ते समजुन घ्याव आस पन वाटलं नाय. जे वाचावंसं वाटलं (मंग ते कोनीपन लिवलेलं आसुंदे) ते मी वाचलं न ते माज्या भेजात शिरलं, मना आवाडलं तेच्यावर मी पर्तिसाद लिवला. जे नाय आवाडलं तेला "जल्ला ह्याचा म्होरां, करपाटलां कालीज !" असा मनातल्या मनात बोलुन पर्तिसाद न देता पुढंच्या वाटंला लागले......हाय काय नाय काय ?

प्राजु 07/10/2011 - 06:45
नविन संपादक मंडळाचे मनापासून अभिनंदन! सल्लागार मंडळाचेही अभिनंदन. आणि सर्व संपादक आणि सल्लागार यांना शुभेच्छा! मिपा सदस्य म्हणून नेहमीच सहकार्य करत राहीन. :)

व्यक्ती महत्वाचा नाही ,पद महत्वाचे पदाचा मान हा राखल्या गेला पाहिजे हे माझे पूर्वीपासून मत होते . नवीन संपादक मंडळाचे अभिनंदन . एक मिपाकर म्हणून माझ्याकडून तुम्हाला नेहमीच सहकार्य मिळेल. संपादक हा आपल्यासारखाच एक मिपाकर असून त्याच्या दैनंदिन जीवनातील ताणताणाव व नेहमीच्या रहाटगाड्यातून तो ही विनामूल्य सेवा मराठीच्या आणी मराठी माणसाच्या प्रेमाखातर करत आहे ह्याची मला पूर्ण पणे जाणीव आहे .म्हणूनच आजी व माजी संपादक मंडळाचे निर्णय पाळण्यात मी कोणतीही कसूर कधी ठेवली नाही व भविष्यात ठेवणार नाही .
लेखनविषय:
मालकांनी संपादनमंडळात केलेल्या बदलांबद्दलची घोषणा वाचनात आली. त्यात काही नव्या संपादकांची नावे दिसली. गणपा आणि पैसा हे मला निश्चितपणे माहीत असलेले नवे संपादक आहेत. घोषणेचा धागा वाचनमात्र असल्याने नव्या संपादकांचे अभिनंदन करता येत नाही. गणपा हे मला सदस्य म्हणून त्यांच्या अप्रतिम पाककृतींबद्दल माहीत आहेत. पैसा यांच्या लेखनाशी फारसा परिचय नसला तरी त्यांच्या प्रतिसादांतून त्यांची संयत भुमिका वेळोवेळी दिसलेली आहे.

शुभेच्छा !!!

अमोल केळकर ·

चिप्लुन्कर 28/09/2011 - 16:05
आज पहिली माळ : ॐ नमो दैव्ये महादैव्ये शिवाय सततं नम:। नम: प्रकृत्यै भद्राये नियता: प्रणता स्म ताम॥ सर्वाना नवरात्रीच्या शुभेछा आपला चिपळूणकर

शुचि 29/09/2011 - 02:15
नगरी प्रवेशले पंडुनंदन| तो देखिले दुर्गास्थान|धर्मराजा करी स्तवन|जगदंबेचे तेधवा||१|| जय जय दुर्गे भुवनेश्वरी|यशोदागर्भसंभवकुमारी|इन्दिरारमणसहोदरी|नारायणी चंडीके अंबीके||२|| जय जय जगदंबे भवानी|मूळप्रकृती प्रणवरुपिणी|ब्रह्मानंदपददायिनी|चिद्विलासिनी जगदंबे||३|| जय जय धराधरकुमारी|सौभाग्यगंगे त्रिपुरसुंदरी|हेरंबजननी अंतरी|प्रवेशी तू अमुचिया||४|| भक्तहृदयारविंद्रभ्रमरी| तुझिया कृपावलोकने निर्धारी|अतिमूढ तो निगमार्थ करी|काव्यरचना अद्भुत||५|| तुझिया आपंगते करून्|जन्मांधासी येती नयन्|पांगुळ धावे पवनाहून|करी गमन त्वरेने||६|| जन्माधाराभ्य जो मुका|होय वाचस्पतीसम बोलका|तू स्वानंदसरोवरमराळिका|होसी भाविका सुप्रसन्न||७|| ब्रम्हानंदे आदि जननी|तव कृपेची नौका करुनी|दुस्तर भवसिंधु लंघोनी|निवृत्ती तटा नेईजे||८|| जय जय आदि कुमारीके|जय जय मूळपीठनायिके|सकल सौभाग्यदायिके|जगदंबिके मूळप्रकृती||९|| जय जय भर्गप्रियभवानी|भवनाशके भक्तवरदायिनी|समुद्रकारके हिमनगनंदिनी|त्रिपुरसुंदरी महामाये||१०|| जय आनंदकासारमराळिके|पद्मनयन दुरितकानन पावके|त्रिविध ताप भवमोचके|सर्व व्यापके मृडानी||११|| शिवमानस कनक लतिके|जय चातुर्य चंपक कलिके|शुंभनिशुंभ दैत्यांतके|निजजनपालके अपर्णे||१२|| तव मुखकमल शोभा देखोनी|इंदुबिंब गेले गळोनी|ब्रम्हादिके बाळे तान्ही|स्वानंदसदनी नीजवीसी||१३|| जीव शीव दोन्ही बालके|अंबे तुवा नीर्मीली कौतुके|जीव तुझे स्वरुप नोळखे|म्हणोनी पडला आवर्ती||१४|| शीव तुझे स्मरणी सावचित्त|म्हणोनी अंबे तो नित्यमुक्त|स्वनंदपद हातासी येत्|कृपे तुझ्या जननीये||१५|| मेळवुनी पंचभूतांचा मेळ्|तुवा रचिला ब्रह्माडगोळ|इच्छा परतता तत्काळ|क्षणात निर्मूळ करीसी तू||१६|| अनंतबालसूर्य श्रेणी|तव प्रभेमाजी गेल्या विरोनी|सकल सौभाग्य शुभकल्याणी|रमा रमणे वरप्रदे||१७|| शंबरारि रिपुवल्लभे|त्रैलोक्यनगरारंभस्तंभे|आदिमाये आदिप्रभे|सकळारंभे मूळप्रकृती||१८|| जय जय करुणामृतसरीते|निजभक्तपालके गुणभरीते|अनंत ब्रह्मांडपालके कृपावंते|आदिमाये अपर्णे||१९|| सच्चिदानंद प्रणवरुपिणी|चराचरजीव सकलव्यापिणी|सर्गस्थित्यंतकारिणी|भवमोचनी महामाये||२०|| ऐकोनी धर्मराजाचे स्तवन्|दुर्गादेवी झाली प्रसन्न|म्हणे तव शत्रू संहारून्|रीज्यी स्थापीन धर्मा तू ते||२१|| तुम्ही वास करावा येथे|प्रकटो नेदी जनाते|शत्रू क्षय पावती तुमचे हाते|सुख अद्भुत तुम्हा होय||२२|| तुवा जे केले स्तोत्रपठण्|हे जो करील पठण श्रवण||त्यासी सर्वदा रक्षीन्|अंतर्बाह्य निजांगे||२३||

चिप्लुन्कर 28/09/2011 - 16:05
आज पहिली माळ : ॐ नमो दैव्ये महादैव्ये शिवाय सततं नम:। नम: प्रकृत्यै भद्राये नियता: प्रणता स्म ताम॥ सर्वाना नवरात्रीच्या शुभेछा आपला चिपळूणकर

शुचि 29/09/2011 - 02:15
नगरी प्रवेशले पंडुनंदन| तो देखिले दुर्गास्थान|धर्मराजा करी स्तवन|जगदंबेचे तेधवा||१|| जय जय दुर्गे भुवनेश्वरी|यशोदागर्भसंभवकुमारी|इन्दिरारमणसहोदरी|नारायणी चंडीके अंबीके||२|| जय जय जगदंबे भवानी|मूळप्रकृती प्रणवरुपिणी|ब्रह्मानंदपददायिनी|चिद्विलासिनी जगदंबे||३|| जय जय धराधरकुमारी|सौभाग्यगंगे त्रिपुरसुंदरी|हेरंबजननी अंतरी|प्रवेशी तू अमुचिया||४|| भक्तहृदयारविंद्रभ्रमरी| तुझिया कृपावलोकने निर्धारी|अतिमूढ तो निगमार्थ करी|काव्यरचना अद्भुत||५|| तुझिया आपंगते करून्|जन्मांधासी येती नयन्|पांगुळ धावे पवनाहून|करी गमन त्वरेने||६|| जन्माधाराभ्य जो मुका|होय वाचस्पतीसम बोलका|तू स्वानंदसरोवरमराळिका|होसी भाविका सुप्रसन्न||७|| ब्रम्हानंदे आदि जननी|तव कृपेची नौका करुनी|दुस्तर भवसिंधु लंघोनी|निवृत्ती तटा नेईजे||८|| जय जय आदि कुमारीके|जय जय मूळपीठनायिके|सकल सौभाग्यदायिके|जगदंबिके मूळप्रकृती||९|| जय जय भर्गप्रियभवानी|भवनाशके भक्तवरदायिनी|समुद्रकारके हिमनगनंदिनी|त्रिपुरसुंदरी महामाये||१०|| जय आनंदकासारमराळिके|पद्मनयन दुरितकानन पावके|त्रिविध ताप भवमोचके|सर्व व्यापके मृडानी||११|| शिवमानस कनक लतिके|जय चातुर्य चंपक कलिके|शुंभनिशुंभ दैत्यांतके|निजजनपालके अपर्णे||१२|| तव मुखकमल शोभा देखोनी|इंदुबिंब गेले गळोनी|ब्रम्हादिके बाळे तान्ही|स्वानंदसदनी नीजवीसी||१३|| जीव शीव दोन्ही बालके|अंबे तुवा नीर्मीली कौतुके|जीव तुझे स्वरुप नोळखे|म्हणोनी पडला आवर्ती||१४|| शीव तुझे स्मरणी सावचित्त|म्हणोनी अंबे तो नित्यमुक्त|स्वनंदपद हातासी येत्|कृपे तुझ्या जननीये||१५|| मेळवुनी पंचभूतांचा मेळ्|तुवा रचिला ब्रह्माडगोळ|इच्छा परतता तत्काळ|क्षणात निर्मूळ करीसी तू||१६|| अनंतबालसूर्य श्रेणी|तव प्रभेमाजी गेल्या विरोनी|सकल सौभाग्य शुभकल्याणी|रमा रमणे वरप्रदे||१७|| शंबरारि रिपुवल्लभे|त्रैलोक्यनगरारंभस्तंभे|आदिमाये आदिप्रभे|सकळारंभे मूळप्रकृती||१८|| जय जय करुणामृतसरीते|निजभक्तपालके गुणभरीते|अनंत ब्रह्मांडपालके कृपावंते|आदिमाये अपर्णे||१९|| सच्चिदानंद प्रणवरुपिणी|चराचरजीव सकलव्यापिणी|सर्गस्थित्यंतकारिणी|भवमोचनी महामाये||२०|| ऐकोनी धर्मराजाचे स्तवन्|दुर्गादेवी झाली प्रसन्न|म्हणे तव शत्रू संहारून्|रीज्यी स्थापीन धर्मा तू ते||२१|| तुम्ही वास करावा येथे|प्रकटो नेदी जनाते|शत्रू क्षय पावती तुमचे हाते|सुख अद्भुत तुम्हा होय||२२|| तुवा जे केले स्तोत्रपठण्|हे जो करील पठण श्रवण||त्यासी सर्वदा रक्षीन्|अंतर्बाह्य निजांगे||२३||
लेखनविषय:
लेखनप्रकार
आजपासून शारदीय नवरात्र उत्सव सुरु होत आहे. सर्व मिपाकरांना हार्दीक शुभेच्छा ! अमोल केळकर ------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------ मला इथे भेटा

मोबाईल फंडे आणं मोठं मोठे गंडे

VINODBANKHELE ·

VINODBANKHELE 23/09/2011 - 14:22
नाहि हो शिंदे सरकार, बुडति हे जन देखवेना डोळा, आपल्या सायबर क्याफे मधे असे खुप जन येतात, त्यांचि परिस्थिती नसते तरि कर्ज वगैरे काढुन उद्योग करतात. सगळे त्यांचेच अनुभव आहेत. कालच एक जन आला होता मोबाईल टा॓वर साठी ७००० रु भरले होते.महानुभाव पन्थिय साधु होता. खुप दिवसां पासुन पहातोय आज अगदिच राहवले नाहि म्हनुन हा पत्र प्रपंच.

विनीत संखे 23/09/2011 - 14:49
धनबक्षिसाचे जे ईमेल किंवा एसेमेस कांड आजच्या जगात होतात ते होत राहतात कारण कुणीनाकुणीतरी बकरा त्यांना बळी पडत राहतोच. आमच्या कॉलनीत एका बँकेत काम करणारी एक काकू ह्या प्रलोभनाला बळी पडली. तिला युरोप टूर फ्री च एसेमेस आला होता. त्यासाठी तिनं विझा बनवण्यासाठी त्या निनावी एजण्टला दहा हजार रूपये भरले. कमालीची गोष्ट म्हणजे त्या एजण्टने कुठलीही कागदपत्र ... अगदी पासपोर्ट सुद्धा तिच्याकडून मागितला नाही. आता इतकी सुशिक्षित माणसं बावळटपणा करू शकतात तर अशिक्षित बावळटांची काय कहाणी कथन करावी?

In reply to by विनीत संखे

VINODBANKHELE 24/09/2011 - 13:13
हि जमात पण भारी अक्कलवान असते, माझ्या कडे आलेल्या अनेक अश्या बकर्यां पैकी जवळपास प्रत्येक जण बँकेत काम करणार्या कुनाला तरी भेटुन त्यांचा सल्ला घेउन मग पैसे भरुन पावती ईमेल करायला येतात. एका महाभागाला मी फोन केला तर ते बेणं मला म्हनालं ते पॅन कार्ड पण मागतात म्हणजे खरोखर देतिल पैसे. आता काय म्हणणार या युक्तिवादा वर?

प्रचेतस 23/09/2011 - 14:56
मस्त लिहिलयं विनोदराव. अवांतरः लेण्याद्रीजवळील पाताळेश्वराचा सचित्र वृत्तांत टाका की राव एकदा. यावेळी ते मंदिर बघायचं राहूनच गेलं.

In reply to by प्रचेतस

VINODBANKHELE 24/09/2011 - 10:12
लेण्याद्रीजवळील पाताळेश्वराचा सचित्र वृत्तांत ........... वल्ली भाई , आपन मिपाकर जाउयात एकदा पाताळेश्वर ला ........ आणि दिवाळी नंतर कधितरी हरिश्चन्द्रगडा वर दोन तिन दिवस मुक्कामी.

दीप्स 23/09/2011 - 16:10
विनोद्जी छान लिहिले आहे तुम्ही आणि खरेही आहे ते. अहो माझा स्वतःचा अनुभव सांगते. कॉलेजेचे विद्यार्थी पण काही कमी नाही माझे आजोबा खूप आजारी होते त्यांना भेटायला मी गावी गेले आणि आक्षार्षां दिवसभर त्या मुलांनी फोन करून हैराण केले. दर १५ - २० मिनिटाने वेगवेगळ्या नंबर वरून फोन करून राकेश आहे का ?असे विचारायचे आणि मी रोंग नंबर सांगायचे (इथे मला नाव आठवत नाही म्हणून मी राकेश नाव वापरले आहे). असे करत करत संध्याकाळचे सहा वाजले आणि आता मात्र हद्द झली असे म्हणून मी त्या आलेल्या फोनवर भडकले यावेळी एक मुलगी होती तिने मला सोरी म्हणायला फोन केला होता तेव्हा तिने मला सांगितले कि आम्ही रोज काही नंबर जमाकारतो आणि त्यातून लकी नंबर काढतो व दिवसभर त्या व्यक्तीला फोन करून टाईम पास करतो. हे ऐकल्यावर तर माझे चांगलेच सटकले ती तिला चांगलेच झापले आणि समजून सांगितले कि आज मी दवाखान्यात होते माझ्यावरचा प्रसंग काय होता याची कल्पना आहे का तुला? आणि तुम्ही तिकडे मजा करत होते. (मांजराच खेळ होतो उंदराचा मात्र जीव जातो अशी गम्मत ) मग बरेच बोलणे झाल्यावर तिने मला प्रोमिस केले आता पुन्हा ते असे नाही करणार... तसे बघायला गेलेतर जाश्या नाण्याला दोन बाजू असतात तसेच प्रत्येक गोष्टीला दोन बाजू असतात चांगली बाजू कुठली ते आपण बघायचे असते. असेच या फोनचे पण आहे याच चांगल्यात चांगला उपयोग किवा सदुपयोग असा करायचं हे आपल्यावर असेते .

५० फक्त 23/09/2011 - 19:17
जाम भारी वाटलं वाचुन, पुर्वी एकदा एका अशा लफड्यात पडलो होतो आणि जवळपास रु.१४०० घालवुन बसलो आहे. आणि त्यानंतर ते सागाचे झाडे लावणॅ, पण ह्या सगळ्या फसवणूकी लग्नापुर्वीच्या आहेत, त्यानंतर जी काय अक्कल आली की ज्याचं नाव ते, आता असे फोन आले की मी सऱळ सांगतो, ' मला जरा मोठ्या चेकवर सह्या करायच्या आहेत माझ्या सेक्रेटरीशी बोला' अन फोन बायकोला देतो..

In reply to by ५० फक्त

आता असे फोन आले की मी सऱळ सांगतो, ' मला जरा मोठ्या चेकवर सह्या करायच्या आहेत माझ्या सेक्रेटरीशी बोला' अन फोन बायकोला देतो.. त्यापेक्षा असं सांगा की "आता माला वाईच टेबलं पुसायची हायती. तुमी जरा आमच्या मॅडमसायबांशी बोला!". असं म्हणुन बायकोकडे फोन द्या.... बायको फोनशी तर डील करेलच पण मॅडमसायेब म्हटल्याबद्दल नंतर तुम्हाला काहीतरी गोड-गुलाबी मिळण्याची शक्यता वाढेल!!!! :) आपला अनुभवी, नाना फडणवीस ;)

In reply to by पिवळा डांबिस

५० फक्त 24/09/2011 - 07:06
असं काय काका,किमान एखाद्या अनोळखी पोरीसमोर तरी आपल्याला आपल्या घरात बायकोपेक्षा मोठं स्थान आहे हे सांगण्याची मजा का हिरावुन घेताय ओ, तेवढंच आत्मिक समाधान. असं खरंखुरं वास्तव जगासमोर विस्कटुन मांडुन कसं चालेल सांगा बरं? उगा ' कशी नशिबानं थट्टा आज मांड्ली ; म्हणण्यापेक्षा ' नको न्याह्याळु नितळ काया'; म्हणलं की कसं बरं वाटतं. ना ?

मदनबाण 23/09/2011 - 20:37
असे बरेच लॉटरीवाले समस हल्ली जवळपास रोज येतात. ! डिलीट करुन करुन वैताग आला आहे. :( फालतु फोन देखील येतात.एकदम वैतागवाडी आहे हा सर्व प्रकार. डु नॉट डिस्टर्बच्या यादीत नाव नोंदवुन देखील परिस्थीतीत काही फरक पडलेला नाय.समस बद्धल आधी तक्रार करायचो...मग समस कोणत्या नंबर वरुन आलाय,समस मधे काय लिवलय इं चौकश्या झाल्या की तक्रार नोंदवुन घेतली जाते,पण समस येणे काही बंद झाले नाहीये. :( कारण दर वेळी वेगवेगळ्या नंबर वरुन समस पाठवले जातात. सध्या तरी समस डिलीटवण्या पलिकडे काहीच पर्याय नाही. :(

असले एसेमेस खूप येतात..आपण तर बुवा तात्काळ उडवतो..पण फोनही येतात, मी एकाला---तूला माझा 'फायदा' करून द्यायचाय ना?...मग हे पहिले पैसे पण तूच मला आणून दे..मग मी ते तूला पाहिजे तिथे भरतो...असा उलट बाण मारला होता... त्या कोल्ह्यानी तात्काळ फोन कट केला.... वस्तुतः आंम्ही तुमचं 'कल्याण' करायला आलोय...(आणी नंतर तुमची डोंबीवली करणार आहोत...)...अशी वाक्य कुणीही उच्चारली तरी समजावं ''धोका'' आहे...कारण एम.एल.एम... हे ही असलच आधुनिक बुवाबाजीचं जाळं आहे,,,इथलीही भाषा,साधनं,शैली..हे सर्व काही फसव,मधुर,शीघ्र परिणाम कारक स्वरुपाचं असतं... त्यांनाही हेच उत्तर द्याव--माझे पहिले सगळे पैसे तुंम्ही गुंतवा... लगेच ती गिधाड पुढच्या फांदीवर नव भक्ष शोधायला जातात... अवांतर- एम.एल.एम.ची आंतरीक उद-घोषणा ---आमचे येथे स्वतःच स्वतःला फुकटात फसवुन मिळेल..... ;-)

In reply to by नगरीनिरंजन

शैलेन्द्र 24/09/2011 - 00:03
त्यांच मत ते मुख्यमंत्र्यांबरोबरच्या बैठकीत देतीलच.. आणी त्यावर शासनाचा जी आर पण निघेल.. थोडा दम काढा.

In reply to by शैलेन्द्र

असे (https://docs.google.com/viewer?a=v&pid=explorer&chrome=true&srcid=0B9-2hmnBdOPQMTY4NTRiMjEtODk4OC00ZmMxLTg5NTMtZWY1NTU0NzhiNDk2&hl=en_US) जर एखादे गंभीर प्रकरण असते तर त्यांच्या कडे तक्रार केलीही असती, आणि त्यांनी नक्कीच दखल घेतली असती, पण ज्या समस्या आपल्या पातळीवर सोडविता येण्याजोग्या असतात त्याकरिता त्यांना त्रास कशाला द्यावा? (अवांतर: उद्या कोणी म्हणेल मिसळपाव वर नको ते प्रतिसाद देऊन जेरीस आणणार्‍या सदस्यांचा बंदोबस्त करण्याकरिताही मुख्यमंत्र्यांकडे बैठक भरवा. अशा किरकोळ बाबींकरता त्यांची मदत मागायची तर मग सरकार कोणी चालवायचे?)

In reply to by नगरीनिरंजन

तुमचा मोबाईल नंबर डू नॉट डिस्टर्ब लिस्ट मध्ये नोंद केलेला असतानाही नको असलेले कॉल वा संदेश येत असतील तर ट्राय कडे तक्रार नोंदवा. दोषींना अडीच लाख रूपये दंड होईल. अर्थात याकरिता आपला वेळ खर्चावा लागतो व पाठपुरावा करावा लागतो. मी एक सोपा उपाय केला. स्नॅपडील वाले मला रोज संदेश पाठवित. एकदा तर त्यांनी मला रात्री अडीच वाजता संदेश पाठविला. मग मी सरळ त्यांच्या संकेतस्थळावरून एक Cash On Delivery पद्धतीने order नोंदविली. प्रत्यक्षात वस्तु माझ्यापर्यंत पोचल्यावर ती घेण्याचे नाकारले. त्यानंतर कंपनीतून फोन आला, "तुम्ही वस्तु मागविली आणि नंतर पैसे भरून ती स्वीकारण्यास नकार का दिलात?" मग उत्तरादाखल मी त्यांना सांगितले की माझा फोन डू नॉट डिस्टर्ब मध्ये नोंद असूनही तुमचे संदेश येत असतात. मला मनस्ताप होतो, म्हणून तुम्हालाही दिला (मी कुणाचंच काही फुकट घेत नाही, अगदी मनस्ताप देखील). बाई काय समजायचं ते समजल्या. माफी मागत पुन्हा असा प्रकार घडणार नाही याची त्यांनी ग्वाही दिली. आता त्यांच्याकडून संदेश यायचं बंद झालंय. मला नको असणारे संदेश पाठविणार्‍या बहुतेक सर्व कंपन्यांना मी असा दणका देतच असतो. त्यामुळे आंतरजालावर अनेक ठिकाणी अगदी उघडपणे माझा मोबाईल क्रमांक प्रकाशित असला तरी सहसा त्यावर आता मनस्ताप देण्याची आगळीक कुठली कंपनी करीत नाही.

शिल्पा ब 24/09/2011 - 07:00
कोणी कोणतीही गोष्ट आपल्याला फुकट का देतयं? पैसे कधी कोणी फुकट देतं का? जरा विचार करावा...बाकी अनोळखी समस वर विश्वास अज्जिबात ठेउ नये...कंपनी मुलाखतीसाठी समस पाठवते का, पैसे मागते का? लोकं पण कशावरही विश्वास ठेवतात.

In reply to by शिल्पा ब

कोणी कोणतीही गोष्ट आपल्याला फुकट का देतयं? पैसे कधी कोणी फुकट देतं का? जरा विचार करावा... >> पूर्णत: सहमत. ज्यांना कमी कष्टात जास्त मिळवायची हाव असते तेच असला जुगार खेळायची जोखीम पत्करतात आणि सर्वस्व गमावून बसतात. मेहनत करून त्याचा योग्य मोबदला मिळण्याची आशा ठेवलीत तर माणूस सहसा फसत नाही.

VINODBANKHELE 23/09/2011 - 14:22
नाहि हो शिंदे सरकार, बुडति हे जन देखवेना डोळा, आपल्या सायबर क्याफे मधे असे खुप जन येतात, त्यांचि परिस्थिती नसते तरि कर्ज वगैरे काढुन उद्योग करतात. सगळे त्यांचेच अनुभव आहेत. कालच एक जन आला होता मोबाईल टा॓वर साठी ७००० रु भरले होते.महानुभाव पन्थिय साधु होता. खुप दिवसां पासुन पहातोय आज अगदिच राहवले नाहि म्हनुन हा पत्र प्रपंच.

विनीत संखे 23/09/2011 - 14:49
धनबक्षिसाचे जे ईमेल किंवा एसेमेस कांड आजच्या जगात होतात ते होत राहतात कारण कुणीनाकुणीतरी बकरा त्यांना बळी पडत राहतोच. आमच्या कॉलनीत एका बँकेत काम करणारी एक काकू ह्या प्रलोभनाला बळी पडली. तिला युरोप टूर फ्री च एसेमेस आला होता. त्यासाठी तिनं विझा बनवण्यासाठी त्या निनावी एजण्टला दहा हजार रूपये भरले. कमालीची गोष्ट म्हणजे त्या एजण्टने कुठलीही कागदपत्र ... अगदी पासपोर्ट सुद्धा तिच्याकडून मागितला नाही. आता इतकी सुशिक्षित माणसं बावळटपणा करू शकतात तर अशिक्षित बावळटांची काय कहाणी कथन करावी?

In reply to by विनीत संखे

VINODBANKHELE 24/09/2011 - 13:13
हि जमात पण भारी अक्कलवान असते, माझ्या कडे आलेल्या अनेक अश्या बकर्यां पैकी जवळपास प्रत्येक जण बँकेत काम करणार्या कुनाला तरी भेटुन त्यांचा सल्ला घेउन मग पैसे भरुन पावती ईमेल करायला येतात. एका महाभागाला मी फोन केला तर ते बेणं मला म्हनालं ते पॅन कार्ड पण मागतात म्हणजे खरोखर देतिल पैसे. आता काय म्हणणार या युक्तिवादा वर?

प्रचेतस 23/09/2011 - 14:56
मस्त लिहिलयं विनोदराव. अवांतरः लेण्याद्रीजवळील पाताळेश्वराचा सचित्र वृत्तांत टाका की राव एकदा. यावेळी ते मंदिर बघायचं राहूनच गेलं.

In reply to by प्रचेतस

VINODBANKHELE 24/09/2011 - 10:12
लेण्याद्रीजवळील पाताळेश्वराचा सचित्र वृत्तांत ........... वल्ली भाई , आपन मिपाकर जाउयात एकदा पाताळेश्वर ला ........ आणि दिवाळी नंतर कधितरी हरिश्चन्द्रगडा वर दोन तिन दिवस मुक्कामी.

दीप्स 23/09/2011 - 16:10
विनोद्जी छान लिहिले आहे तुम्ही आणि खरेही आहे ते. अहो माझा स्वतःचा अनुभव सांगते. कॉलेजेचे विद्यार्थी पण काही कमी नाही माझे आजोबा खूप आजारी होते त्यांना भेटायला मी गावी गेले आणि आक्षार्षां दिवसभर त्या मुलांनी फोन करून हैराण केले. दर १५ - २० मिनिटाने वेगवेगळ्या नंबर वरून फोन करून राकेश आहे का ?असे विचारायचे आणि मी रोंग नंबर सांगायचे (इथे मला नाव आठवत नाही म्हणून मी राकेश नाव वापरले आहे). असे करत करत संध्याकाळचे सहा वाजले आणि आता मात्र हद्द झली असे म्हणून मी त्या आलेल्या फोनवर भडकले यावेळी एक मुलगी होती तिने मला सोरी म्हणायला फोन केला होता तेव्हा तिने मला सांगितले कि आम्ही रोज काही नंबर जमाकारतो आणि त्यातून लकी नंबर काढतो व दिवसभर त्या व्यक्तीला फोन करून टाईम पास करतो. हे ऐकल्यावर तर माझे चांगलेच सटकले ती तिला चांगलेच झापले आणि समजून सांगितले कि आज मी दवाखान्यात होते माझ्यावरचा प्रसंग काय होता याची कल्पना आहे का तुला? आणि तुम्ही तिकडे मजा करत होते. (मांजराच खेळ होतो उंदराचा मात्र जीव जातो अशी गम्मत ) मग बरेच बोलणे झाल्यावर तिने मला प्रोमिस केले आता पुन्हा ते असे नाही करणार... तसे बघायला गेलेतर जाश्या नाण्याला दोन बाजू असतात तसेच प्रत्येक गोष्टीला दोन बाजू असतात चांगली बाजू कुठली ते आपण बघायचे असते. असेच या फोनचे पण आहे याच चांगल्यात चांगला उपयोग किवा सदुपयोग असा करायचं हे आपल्यावर असेते .

५० फक्त 23/09/2011 - 19:17
जाम भारी वाटलं वाचुन, पुर्वी एकदा एका अशा लफड्यात पडलो होतो आणि जवळपास रु.१४०० घालवुन बसलो आहे. आणि त्यानंतर ते सागाचे झाडे लावणॅ, पण ह्या सगळ्या फसवणूकी लग्नापुर्वीच्या आहेत, त्यानंतर जी काय अक्कल आली की ज्याचं नाव ते, आता असे फोन आले की मी सऱळ सांगतो, ' मला जरा मोठ्या चेकवर सह्या करायच्या आहेत माझ्या सेक्रेटरीशी बोला' अन फोन बायकोला देतो..

In reply to by ५० फक्त

आता असे फोन आले की मी सऱळ सांगतो, ' मला जरा मोठ्या चेकवर सह्या करायच्या आहेत माझ्या सेक्रेटरीशी बोला' अन फोन बायकोला देतो.. त्यापेक्षा असं सांगा की "आता माला वाईच टेबलं पुसायची हायती. तुमी जरा आमच्या मॅडमसायबांशी बोला!". असं म्हणुन बायकोकडे फोन द्या.... बायको फोनशी तर डील करेलच पण मॅडमसायेब म्हटल्याबद्दल नंतर तुम्हाला काहीतरी गोड-गुलाबी मिळण्याची शक्यता वाढेल!!!! :) आपला अनुभवी, नाना फडणवीस ;)

In reply to by पिवळा डांबिस

५० फक्त 24/09/2011 - 07:06
असं काय काका,किमान एखाद्या अनोळखी पोरीसमोर तरी आपल्याला आपल्या घरात बायकोपेक्षा मोठं स्थान आहे हे सांगण्याची मजा का हिरावुन घेताय ओ, तेवढंच आत्मिक समाधान. असं खरंखुरं वास्तव जगासमोर विस्कटुन मांडुन कसं चालेल सांगा बरं? उगा ' कशी नशिबानं थट्टा आज मांड्ली ; म्हणण्यापेक्षा ' नको न्याह्याळु नितळ काया'; म्हणलं की कसं बरं वाटतं. ना ?

मदनबाण 23/09/2011 - 20:37
असे बरेच लॉटरीवाले समस हल्ली जवळपास रोज येतात. ! डिलीट करुन करुन वैताग आला आहे. :( फालतु फोन देखील येतात.एकदम वैतागवाडी आहे हा सर्व प्रकार. डु नॉट डिस्टर्बच्या यादीत नाव नोंदवुन देखील परिस्थीतीत काही फरक पडलेला नाय.समस बद्धल आधी तक्रार करायचो...मग समस कोणत्या नंबर वरुन आलाय,समस मधे काय लिवलय इं चौकश्या झाल्या की तक्रार नोंदवुन घेतली जाते,पण समस येणे काही बंद झाले नाहीये. :( कारण दर वेळी वेगवेगळ्या नंबर वरुन समस पाठवले जातात. सध्या तरी समस डिलीटवण्या पलिकडे काहीच पर्याय नाही. :(

असले एसेमेस खूप येतात..आपण तर बुवा तात्काळ उडवतो..पण फोनही येतात, मी एकाला---तूला माझा 'फायदा' करून द्यायचाय ना?...मग हे पहिले पैसे पण तूच मला आणून दे..मग मी ते तूला पाहिजे तिथे भरतो...असा उलट बाण मारला होता... त्या कोल्ह्यानी तात्काळ फोन कट केला.... वस्तुतः आंम्ही तुमचं 'कल्याण' करायला आलोय...(आणी नंतर तुमची डोंबीवली करणार आहोत...)...अशी वाक्य कुणीही उच्चारली तरी समजावं ''धोका'' आहे...कारण एम.एल.एम... हे ही असलच आधुनिक बुवाबाजीचं जाळं आहे,,,इथलीही भाषा,साधनं,शैली..हे सर्व काही फसव,मधुर,शीघ्र परिणाम कारक स्वरुपाचं असतं... त्यांनाही हेच उत्तर द्याव--माझे पहिले सगळे पैसे तुंम्ही गुंतवा... लगेच ती गिधाड पुढच्या फांदीवर नव भक्ष शोधायला जातात... अवांतर- एम.एल.एम.ची आंतरीक उद-घोषणा ---आमचे येथे स्वतःच स्वतःला फुकटात फसवुन मिळेल..... ;-)

In reply to by नगरीनिरंजन

शैलेन्द्र 24/09/2011 - 00:03
त्यांच मत ते मुख्यमंत्र्यांबरोबरच्या बैठकीत देतीलच.. आणी त्यावर शासनाचा जी आर पण निघेल.. थोडा दम काढा.

In reply to by शैलेन्द्र

असे (https://docs.google.com/viewer?a=v&pid=explorer&chrome=true&srcid=0B9-2hmnBdOPQMTY4NTRiMjEtODk4OC00ZmMxLTg5NTMtZWY1NTU0NzhiNDk2&hl=en_US) जर एखादे गंभीर प्रकरण असते तर त्यांच्या कडे तक्रार केलीही असती, आणि त्यांनी नक्कीच दखल घेतली असती, पण ज्या समस्या आपल्या पातळीवर सोडविता येण्याजोग्या असतात त्याकरिता त्यांना त्रास कशाला द्यावा? (अवांतर: उद्या कोणी म्हणेल मिसळपाव वर नको ते प्रतिसाद देऊन जेरीस आणणार्‍या सदस्यांचा बंदोबस्त करण्याकरिताही मुख्यमंत्र्यांकडे बैठक भरवा. अशा किरकोळ बाबींकरता त्यांची मदत मागायची तर मग सरकार कोणी चालवायचे?)

In reply to by नगरीनिरंजन

तुमचा मोबाईल नंबर डू नॉट डिस्टर्ब लिस्ट मध्ये नोंद केलेला असतानाही नको असलेले कॉल वा संदेश येत असतील तर ट्राय कडे तक्रार नोंदवा. दोषींना अडीच लाख रूपये दंड होईल. अर्थात याकरिता आपला वेळ खर्चावा लागतो व पाठपुरावा करावा लागतो. मी एक सोपा उपाय केला. स्नॅपडील वाले मला रोज संदेश पाठवित. एकदा तर त्यांनी मला रात्री अडीच वाजता संदेश पाठविला. मग मी सरळ त्यांच्या संकेतस्थळावरून एक Cash On Delivery पद्धतीने order नोंदविली. प्रत्यक्षात वस्तु माझ्यापर्यंत पोचल्यावर ती घेण्याचे नाकारले. त्यानंतर कंपनीतून फोन आला, "तुम्ही वस्तु मागविली आणि नंतर पैसे भरून ती स्वीकारण्यास नकार का दिलात?" मग उत्तरादाखल मी त्यांना सांगितले की माझा फोन डू नॉट डिस्टर्ब मध्ये नोंद असूनही तुमचे संदेश येत असतात. मला मनस्ताप होतो, म्हणून तुम्हालाही दिला (मी कुणाचंच काही फुकट घेत नाही, अगदी मनस्ताप देखील). बाई काय समजायचं ते समजल्या. माफी मागत पुन्हा असा प्रकार घडणार नाही याची त्यांनी ग्वाही दिली. आता त्यांच्याकडून संदेश यायचं बंद झालंय. मला नको असणारे संदेश पाठविणार्‍या बहुतेक सर्व कंपन्यांना मी असा दणका देतच असतो. त्यामुळे आंतरजालावर अनेक ठिकाणी अगदी उघडपणे माझा मोबाईल क्रमांक प्रकाशित असला तरी सहसा त्यावर आता मनस्ताप देण्याची आगळीक कुठली कंपनी करीत नाही.

शिल्पा ब 24/09/2011 - 07:00
कोणी कोणतीही गोष्ट आपल्याला फुकट का देतयं? पैसे कधी कोणी फुकट देतं का? जरा विचार करावा...बाकी अनोळखी समस वर विश्वास अज्जिबात ठेउ नये...कंपनी मुलाखतीसाठी समस पाठवते का, पैसे मागते का? लोकं पण कशावरही विश्वास ठेवतात.

In reply to by शिल्पा ब

कोणी कोणतीही गोष्ट आपल्याला फुकट का देतयं? पैसे कधी कोणी फुकट देतं का? जरा विचार करावा... >> पूर्णत: सहमत. ज्यांना कमी कष्टात जास्त मिळवायची हाव असते तेच असला जुगार खेळायची जोखीम पत्करतात आणि सर्वस्व गमावून बसतात. मेहनत करून त्याचा योग्य मोबदला मिळण्याची आशा ठेवलीत तर माणूस सहसा फसत नाही.
मोबाईल आजच्या युगातला अल्लाउद्दिनाचा दिवाच जणू , अगदी लहान मुला पासून वयोवृद्ध पर्यंत प्रत्येकाच्या हातात असायलाच हवे असे नव्या युगाचे आयुध , अडी अडचणीला , वेळ प्रसंगाला नव्हे तर अगदी सदा सर्वदा हातात , खिशात पर्स मध्ये असणारा मानवाचा ट्रेड मार्कच जणू . अगदी शेतकरी राजा सुद्धा मोबाईल द्वारे आपल्या विहिरी वरची मोटार चालू आणि बंद सुद्धा करायला लागला , भिकारी एका गल्लीतून दुसर्या गल्लीतील भिकार्याची हाल हवाल विचारायला लागला ,बळी राजाला अगदी देश परदेशातला शेतमालाचा भाव ह्या मोबाईल च्या कृपेने आपल्

वाढदिवसाच्या शुभेच्छा

३_१४ विक्षिप्त अदिती ·

In reply to by मुक्तसुनीत

ढब्बू पैसा 14/09/2011 - 07:29
पंगाशेठना आमच्याही शुभेच्छा! हल्ली दिसत नाहीत ते मिपावर, कुठे असतात? अवखळकर बै तुम्ही किडन्याप तर नै केलं ना त्याना?

पंगांच्या प्रतिसादशैली मार्मिकपणे पकडण्याचा प्रयत्न आवडला. त्यात 'वाढदिवसाच्या शुभेच्छा' हा जालीय वाक्प्रयोग त्यांनीच प्रसिद्ध केला असं ऐकून आहे. तेव्हा त्यांना यावेळी अशा शुभेच्छा देणं हा काव्यात्म न्यायच ठरतो. प्रवाहाविरुद्ध पोहण्याची, वारा वळेल तशी पाठ न फिरवता आपल्याला हव्या त्या दिशेला तोंड करण्याची (कधीकधी मुद्दामून वाऱ्याला सामोरं जाण्याची) त्यांची ख्याती आहे. पंगा ही खरं तर सविनय बंडखोरीची प्रवृत्तीच म्हणता येईल. त्यांच्या वाढत्या वयाबरोबरच त्यांच्या प्रतिसादांची लांबी (कंस, सुपरस्क्रिप्टं, तळटिपा, राखाडी अक्षरं यांसकट) वाढत जावो ही शुभेच्छा.

सहज 14/09/2011 - 07:31
पंगा यांचे निलंबन अतिशय क्लेषदायक गोष्ट आहे. मिपाच्या स्थापनेपासुन मी मिपासदस्य आहे. इथे संपादन, व्यवस्थापन विषयावर बोलायला बंदी आहे किंवा ठरावीक लोकांनी बोललेले चालून जाते हेही पाहीले आहे. व्यवस्थापनाला आपले व्याप सांभाळून अनेक कटकटींना सामोरे जावे लागते याचाही पूर्ण अंदाज आहे. सहानुभूतीदेखील आहे. पण मिपा हे मी पाहीलेल्या काही मोजक्या मराठी संस्थळात वेगळे, पारदर्शक कारभार असलेले संस्थळ वाटले होते. दोन एक वर्षापुर्वी मिपाच्या माध्यमातून (हो हो गहजब नको पण मिपाच्या व्यनितून ऑफर, विनंत्या आल्या म्हणून माध्यम म्हणत आहे)काही चुकीचे प्रकार झाले त्यातुन मग पुढे काही व्यवस्थापन बदल होउन पुन्हा गाडे सुरळीत होताच अजुन एक इंटरनेट प्रायव्हसीचे प्रकरण ऐकू येउ लागले. यावर खाजगीत बरेच काही बोलले जाउ लागले पण जाहीर ना सवाल केला गेला की खुलासे दिले गेले जणू काही घडलेच नाही. ही पारदर्शकता!! मिपावर रोज उठून राजकारणी कसे भ्रष्ट आहेत, कसे दडवतात असे जो तो बोलतो पण जेव्हा आपल्याकडून चुका होतात त्याची कबूली द्यायला, सामान्य लोकात किती धैर्य असते अथवा जबाबदारी वाटते? बर त्या त्रुटी अगदी समजवुन घेतल्या तरी मिपावर दिसुन आलेल्या एका गोष्टीचा मला अतिशय त्रास झाला. तो म्हणजे सदस्य निलंबनातील मनमानी. सर्व्हरवर कीडे अथवा कोणाचे वैयक्तिक नुकसान असे काही झाल्यास निलंबन होणे समजु शकतो. पण केवळ आपले विचार जुळत नाहीत म्हणून एखाद्या आयडीला परस्पर जालकंटक समजुन, कारणे न देता उडवणे हे जबाबदार व्यवस्थापना भूषणावह नाही. यातुन हाच संदेश जातो की तुम्ही विशिष्ट कंपूत हवा अथवा विरोध न करणारे सदस्य हवात अन्यथा तुमचे खाते कधीही उडवले जाउ शकते. रिकामटेकडा (मिपा आयडी आठवत नाही बहुदा टोपणनाव) , व आता पंगा हे दोन आयडी अतिशय ज्ञानी व उत्तम वादविवादपटू आयडी. भले त्यांची काही मते पटत नसतील पण प्रतिसादातुन आपल्या चातुर्याची, लोकांना दुसरी बाजु उत्तमपणे उलगडवून दाखवयाची हातोटी वाखाणण्याजोगी. या दोघांच्या प्रतिसादातुन अनेक लोकांचे प्रबोधन किमान मनोरंजन तर नक्कीच झाले असेल. माझ्या माहीतीनुसार हे दोन्ही आयडी आपल्या लेखनातुन भले आक्रमक वाटू शकतील पण अविवेकी आणि आक्रस्ताळे नव्हे. किमान सभ्यता पाळायचे. आपल्या दाव्याच्या पुष्टर्थ्य योग्य दुवे देणे, मुद्यांचा प्रतिवाद करणे प्रसंगी (श्री पंगा) वेगळा मुद्दा जाणवून दिल्याबद्दल विरोधकांना धन्यवाद दिल्याचेही पाहीले होते. एक तर अश्या लोकांना एकतर्फी कोणतीच सुचना न देता उडवणे मिपाकरांना योग्य वाटते का? इथे अनेक वेळा लोक निनावी आयडीने राजकीय नेते, पक्ष, धर्म याबाबत वाट्टेल ती अनुचित विधाने करतात ते चालून जाते पण केवळ आपल्याला गैरसोयीची वाटतात व ह्या आयडींचा कोणत्या कंपूत समावेश नसणे ह्या कारणाने फटकन निलंबन केले जाते हे अतिशय चुकीचे वाटते. मिपाच्या स्थापनेपासुन मी कायम व्यवस्थापनाला माझे मत सांगीतले आहे की वर उल्लेख केलेले प्रकार वगळता कोणाला निलंबीत करु नका फार तर काही दिवस वाचनमात्र करा. पण अजुनही मिपावरही मनमानी दिसुन येते आहे. मिपावर प्रसंगी कट्टर वाटेल असा विरोध चालवून घेतला जात नाही हा एकमेव संदेश व्यवस्थापन देत असेल तर ते मला चुकीचे वाटत आहे. मी इथे मागणी करतो की श्री पंगा व श्री टोपणनाव यांचे निलंबन रद्द करुन त्यांचे खाते पूर्ववत केले जावे. किमान नक्की कोणत्या कारणास्तव ह्या दोघांना काढले गेले त्याचे स्पष्टीकरण द्यावे. जेणेकरुन इतरांना त्यापासुन बोध घेता येईल. मिपा स्वताला म्हणवते तितके पारदर्शक, जबाबदार संस्थळ आहे का याचाही ज्याला त्याला अर्थ लावता येईल. ह्या प्रतिसादाचा (बहुदा धाग्याचाही) व्यवस्थापनाला अडचणीत आणण्याचा कोणताही हेतु नाही पण जर आपल्या हातून काही चुकीचे निर्णय घेतले गेले तर केवळ इगो जपण्याकरता ते निर्णय तसे ठेवण्यापेक्षा ते निर्णय बदलण्याचा दिलदारपणा बघायला मिळावा ही अपेक्षा. मिपाकरांना ह्या दोघांच्या निलंबनाबद्दल काय वाटते हे विचारावेसे वाटते.

In reply to by मुक्तसुनीत

चिंतामणी 14/09/2011 - 10:26
सहजराव , बॅकप घेतला आहे ना ? सगळ्यांनीच या धाग्यावरचे पोस्टचे बॅकअप घ्यावे. कारण सर्वांनीच ह्याकडे दुर्लक्ष केलेले आहे असे दिसते. नमस्कार, रोजच्या गप्पाटप्पा करण्यासाठी,वाढदिवस, बातम्या आणि इतर अश्याच तात्कालीक चर्चांसाठी हा खरडायचा फळा आहे. येथे खुप लेखन करू नये. कारण तीन दिवसांनी हे लेखन उडवल्या जाईल.

In reply to by सहज

ढब्बू पैसा 14/09/2011 - 07:48
खूप धक्का बसला होता खरं तर. आणि तेही कुठल्याही अधिकृत माध्यमातून कळले नव्हते. कारण तर आत्ता तुमच्य सविस्तर प्रतिक्रियेतून कळतंय आणि हे सगळं ज्या भावनेतून मिपा सुरू झालं होतं त्याच्याशी विसंगत आहे. पंगा यांचे लेखन म्हणजे नेहमीच (माझ्यासाठी तरी) एनलाईटनिंग ह्या प्रकारातले होते. आणि कुठलाही सूज्ञ वाचक जालकंटक आणि उत्तम वादविवादपटू ह्यातला फरक ओळखू शकेलच. पण लेखन हा क्रायटेरिआ न लावता केवळ वैयक्तीक आकसातून कार्यवाही झाली असेल तर हे दुर्दैवी आहे असं मी म्हणेन! >>ह्या प्रतिसादाचा (बहुदा धाग्याचाही) व्यवस्थापनाला अडचणीत आणण्याचा कोणताही हेतु नाही पण जर आपल्या हातून काही चुकीचे निर्णय घेतले गेले तर केवळ इगो जपण्याकरता ते निर्णय तसे ठेवण्यापेक्षा ते निर्णय बदलण्याचा दिलदारपणा बघायला मिळावा ही अपेक्षा.>>> ह्यासाठी सहजकाका, तुम्हाला अनुमोदन :)

In reply to by सहज

नितिन थत्ते 14/09/2011 - 08:13
सहज यांच्याशी सहमत आहे. मिपा इतके पारदर्शक* संस्थळ दुसरे नाही हे खरे असले तरी त्यामुळेच अपेक्षा जास्त आहेत. पंगा यांई सदस्यत्व घेतले तेव्हा त्यांच्या मराठेतर भाषेतील प्रतिसादांना आक्षेप घेऊन त्यांचे खाते गोठवावे का? असा कौल मीच स्वतः काढला होता. त्या आक्षेपावर आत्ता (१ वर्ष ४ महिन्यांनी) कारवाई झाली आहे की काय? *हे माझे परसेप्शन आहे कारण अडीच वर्षाहून अधिक काळ इथे वावरत आहे. काही सदस्य आणि संपादकांशी ओळख आहे/झाली आहे. कदाचित नव्या सदस्यांना अशा प्रकारचे प्रतिसाद आणि धागे उडवले जाताना पाहून तसे न वाटण्याची शक्यता आहे. खुलासा व्हावा अशी अपेक्षा आहे. नितिन थत्ते

In reply to by नितिन थत्ते

थ्यँक्स नितिन. तुझ्यामुळे आज चक्र पूर्ण झाल्याचं लक्षात आलं. १ वर्ष चार महिन्यांपूर्वी पंगाशेटने मला वाढदिवसाच्या शुभेच्छा स्पानिशमधे दिल्या होत्या हे लक्षात आलं. (बंगालीचे होतकरू प्राध्यापक) पं. डि(ली)त गागाभट्ट यांनी बंगालीची होतकरू विद्यार्थिनी अदिती हिच्याकडून शुभेच्छा स्वीकाराव्यात.

In reply to by सहज

सुनील 14/09/2011 - 10:11
मी इथे मागणी करतो की श्री पंगा व श्री टोपणनाव यांचे निलंबन रद्द करुन त्यांचे खाते पूर्ववत केले जावे. किमान नक्की कोणत्या कारणास्तव ह्या दोघांना काढले गेले त्याचे स्पष्टीकरण द्यावे. जेणेकरुन इतरांना त्यापासुन बोध घेता येईल. मिपा स्वताला म्हणवते तितके पारदर्शक, जबाबदार संस्थळ आहे का याचाही ज्याला त्याला अर्थ लावता येईल. सहमत.

सुधीर काळे 14/09/2011 - 07:40
पंडित गागाभट्ट यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा! त्यांना निलंबित केल्याचे माहीत नव्हते (आताच वाचले). तरी कृपया आमच्या शुभेच्छा त्यांच्यापर्यंत पोचविण्याची विनंती अदितीला करत आहे!!

नगरीनिरंजन 14/09/2011 - 07:48
पंगा यांच्यावर आमचे दशांगुळे आणि त्यांचे आमच्यावर आभाळाएवढे प्रेम होते आणि आहे. म्हणूनच मी अतिशय सद्गदित अंतःकरणाने त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. ईश्वर त्यांना परत येण्याची आणि व्यवस्थापनावरील प्रेम आमच्यावर काढण्याची बुद्धी देवो.

In reply to by नगरीनिरंजन

ननि यांच्या या प्रतिसादातून मला एक कल्पना सुचली आहे. पंगाशेट नेहेमीच आपल्याला वेगवेगळ्या लिंका, कंस देतात, सोरि, सोरि, द्यायचे. कृपया पंगाशेटला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना तुम्हीही त्यांच्या आवडलेल्या प्रतिसादांच्या लिंका द्या. म्हणजे पंगाशेटच्या एकसेएक भारी प्रतिसादांचं संकलन याच धाग्यावर होऊन जाईल.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

नगरीनिरंजन 14/09/2011 - 10:56
प्रेमाच्या ट्रान्झिटीव्हिटीवर पंगा यांनी लिहिलेला एक प्रतिसाद देण्याचा मोह टाळण्यात आलेला आहे असे नमूद करण्याचा मोह आवरत नाही.

कृपया पंगाशेटला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना तुम्हीही त्यांच्या आवडलेल्या प्रतिसादांच्या लिंका द्या. म्हणजे पंगाशेटच्या एकसेएक भारी प्रतिसादांचं संकलन याच धाग्यावर होऊन जाईल.
मी सुरूवात करतो, कारण त्यांच्या पहिल्या काही प्रतिक्रियांपैकी एक माझ्या लेखावर होती. सगळेजण त्या लेखाला चान चान म्हणत असताना ट्रैश असं त्यांनी म्हटलं होतं. शशिकांत ओकांच्या नाडीविषयाची थोडीशी चेष्टा केल्यावर, 'एखाद्याला किती उगाच हाणायचं... ' असं मत पंगांनी मांडलेलं होतं. (त्यावेळी ते गंमत म्हणून प्रतिसाद हिंदीमध्ये लिहीत असत. ) प्रवाहाच्या विरुद्ध जाऊन मत मांडण्याची तयारी दाखवणाऱ्या अगदी थोड्या लोकांपैकी ते एक.

In reply to by राजेश घासकडवी

सहज 14/09/2011 - 11:19
अश्लीलते कडे झुकत चाललेल्या थिल्लर धाग्यावर काय सणसणीत प्रहार केला होता की कोणत्याही संस्कृती रक्षकाला पंगा यांचा अभिमान वाटावा :-)

In reply to by सहज

Nile 14/09/2011 - 11:36
आज आधीच पंगाशेठच्या आठवणीने विव्हळलो होतो त्यात पुन्हा सैपाकाची आठवण कशाला करून दिलीत? वर्ष उलटून गेलं तरी आजून आम्ही सैपाक कलेत करंटेच ह्या आठवणीने अजून कळवळलो... असो..

नंदन 14/09/2011 - 08:10
शून्य खाजगीपणा आणि गैरसोयीच्या मंडळींचे 'लिक्विडेशन' ही ग्रेट पर्जची व्यवच्छेदक लक्षणं होती म्हणे. असो, पंगाशेठना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

Nile 14/09/2011 - 08:47
असं कसं झालं रेssss!!! कीत्ती कीत्ती गोष्टी शिकायच्या होत्या मला पंगाशेठकडूनssss! आता कोण शिकवणार मलाssss!!! असा कोणत्या नियतीनं घाला घातला आमच्या पंगाशेठवरssss!! आता कोणाकडे बघायचं आम्हीssss???

ऋषिकेश 14/09/2011 - 14:14
अरेच्या! हे कधी झालं? 'पंगा' यांच्या खात्याला गोठवल्याचं माहित नव्हतं :( ते विविध दृष्टीकोनातून मुद्दी मांडण्यात निष्णात होते हे नक्की. त्यांना अयोग्य वाटेल / असहमती असेल तेथे वाद घालत पण वितंडवाद-अतार्किक वाद घातल्याचे आठवत नाही. (माझ्याबरोबरही कोणत्याशा धाग्यावर असहमती झाली होती मात्र मुद्दा सोडून वैयक्तीक वार केल्याचे आठवत नाही) सारी मराठी संस्थळे खाजगी मालकीची आहेत हे सारे जाणतातच, मात्र वर सहजराव म्हणाले तसं बर्‍यापैकी पारदर्शक असल्याने मिपा व्यवस्थापनाकडून कारण समजणे अपेक्षित आहे. अरे हो वाढदिवसाच्या शुभेच्छा राहिल्याच होत्या.. श्री. पंगा यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा

अर्धवट 14/09/2011 - 11:22
पंगासेठचे खाते गोठवण्याचा निर्णय आत्ताच समजला.. निर्णय आश्चर्यचकीत करणारा आहे आणि वेदनादायीही. त्यांच्या लेखनातील तर्कशुद्धता आणि एकएक शब्द तपासुन घेण्याची प्रवृत्ती या गोष्टी शिकता आल्या असत्या.. अत्यंत संयत भाषेत वाद घालणे यासाठी मी त्यांचा फॅन आहे. त्यांच्या निलंबनाला काही सबळ आणि तितकेच महत्वाचं कारण असावं अशी आशा बाळगून आहे. ते कारण तितकंसं खाजगीही नसावं अशीही अपेक्षा आहे. बघू.. पुढेमागे कधितरी ते एखाद्या खुल्या अथवा कमराबंद चर्चेतून कळेलच.. पंगा यांचे प्रतिसाद वाचुन तयार झालेल्या त्यांच्या प्रतिमेशी अशी शक्यता विसंगत वाटत आहे.. पण "सगळ्यांना सगळं कळलंच पाहिजे असा नियम नाही" आणि "समाज ही गुंतागुंतीची चीज आहे" या दोन आधारांवर विसंबून "गप्प बसायचे ठरवले आहे" पण या निलंबनाचे कारण म्हणजे केवळ त्यांचे टीका करणारे, जनप्रवाहाविरूद्ध जाणारे, न पटलेल्या गोष्टीला संयत आक्षेप नोंदवणारे प्रतिसाद इतकंच असेल तर.. व्यवस्थापनाचा निषेध नोंदवत आहे.. अवांतर - पंगा यांचा मेल आयडी घ्यायचा राहिला ही हुरहूर राहीलीच. कुणाकडे पंगा या आयडी मागचा चेहेरा अथवा त्यांचा मेल आयडी अथवा त्यांचा दुसर्‍या संस्थळावरचा आयडी अथवा याच संस्थळावरचा दुसरा आयडी असेल तर तो मला इथे (ardhawat@gmail.com) पाठवावा ही जाहीर विनंती करत आहे. उपकृत होइन.

या निमित्तानं व्होल्तेअरचं एक उद्धृत द्यायचा मोह टाळता येत नाही: As long as people believe in absurdities they will continue to commit atrocities. आणि पुन्हा पुन्हा असे धागे काढणारे आणि त्यांना हौतात्म्य देणारे या दोहोंसाठी व्होल्तेअरचं अजून एक उद्धृतः It is dangerous to be right in matters where established men are wrong.

गणपा 14/09/2011 - 13:46
सर्वप्रथम पंगाशेटना खर्‍या खुर्‍या वाढदिवसाच्या शुभेच्छा !!! पंगाशेटनी कुणाच्या/कुठल्या दुखर्‍या नशीवर बोट ठेवले माहीत नाही. पण त्यांच्या अचानक अदृश्य होण्याचा अचंबा वाटला होता. (निलंबन झाले की ते स्वत:हुन गेलेत याबद्दल संस्थळ चालकच सांगु शकतील.) पण सहजरावांनी व इतरांनी वर जे पंगाशेट बद्दल मतप्रदर्शन केलेय त्याचाशी सहमत आहे. पंगाशेट मिपावर परत यावेत ही माझीही इच्छा आहे.

श्री. पंगा यांचा खरोखरच वाढदिवस असल्यास त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा! त्यांच्याबद्दल फक्त एक हुशार सदस्य एवढीच ओळख आहे / होती. संपर्क रहावा असे आवर्जून वाटावे असे एक व्यक्तिमत्व. त्यांचे खाते का गोठवले वगैरेंबद्दल काही स्पष्टीकरण आल्यावर मगच काही मत मांडता येईल. अन्यथा, त्यांनी स्वतःहून खाते गोठवण्याची विनंती केली असे समोर आले तर केलेले मतप्रदर्शन चुकीचेच ठरेल, नाही का?

In reply to by बिपिन कार्यकर्ते

छोटा डॉन 14/09/2011 - 14:46
>>श्री. पंगा यांचा खरोखरच वाढदिवस असल्यास त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा! त्यांच्याबद्दल फक्त एक हुशार सदस्य एवढीच ओळख आहे / होती. संपर्क रहावा असे आवर्जून वाटावे असे एक व्यक्तिमत्व. हेच म्हणतो. त्यांचा आज खरोखर वाढदिवस असेल तर त्यांना मनापासुन शुभेच्छा :) बाकी धाग्याचे ठिक आहे. ही चौकशी करण्याचे इतर मार्गही उपलब्ध आहेत, पण हरकत नाही, चालू द्यात एवढेच म्हणतो. वैयक्तिकरित्या हा धागा पटला नाही असे स्पष्टपणे सांगतो. - छोटा डॉन

In reply to by बिपिन कार्यकर्ते

मुक्तसुनीत 14/09/2011 - 17:24
त्यांचे खाते का गोठवले वगैरेंबद्दल काही स्पष्टीकरण आल्यावर मगच काही मत मांडता येईल. अन्यथा, त्यांनी स्वतःहून खाते गोठवण्याची विनंती केली असे समोर आले तर केलेले मतप्रदर्शन चुकीचेच ठरेल, नाही का? पण हा धागा तर वाढदिवसाचा आहे की :-)

In reply to by बिपिन कार्यकर्ते

नितिन थत्ते 15/09/2011 - 15:49
>>त्यांचे खाते का गोठवले वगैरेंबद्दल काही स्पष्टीकरण आल्यावर मगच काही मत मांडता येईल. अन्यथा, त्यांनी स्वतःहून खाते गोठवण्याची विनंती केली असे समोर आले तर केलेले मतप्रदर्शन चुकीचेच ठरेल, नाही का? सहमत आहे. पण म्हणजे स्पष्टीकरणाची अपेक्षा धरावी की कसे?

प्रास 14/09/2011 - 14:08
बातमी नवीन आहे. म्हण्टलं तर पंगाशेठ यांच्या वाढदिवसाची बातमीही नवीनच आहे. गेल्या काही दिवसातीलच हे घटना असावी. तेव्हा योग्य क्रमानुसार प्रथम पंगाशेठना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! आता मुख्य - पंगाशेठांच्या निलंबनाची बातमी नवी आहे. कारवाई योग्य का अयोग्य माहित नाही पण दु:खद जरूर आहे. पंगाशेठांनी नेहमीच स्वतःच्या विचारांशी असलेली बांधिलकी राखलेली दिसून आलेली आहे आणि आपले विचार व्यक्त करण्याची त्यांची शैलीही त्यांच्या विचारांइतकीच असाधारण असल्याचे जाणवले होते. त्यांच्याशी प्रत्यक्ष संपर्क कधी झाला नव्हता पण कधीतरी व्हावा अशी इच्छा जरूर होती. पंगाशेठांचे मिपावर पुन्हा दणक्यात आगमन व्हावे ही सदिच्छा!

प्रियाली 14/09/2011 - 14:42
वाढदिवसांच्या धाग्यावर प्रतिक्रिया द्यायला मला कधीही आवडत नाही परंतु हा धागा पाहून तळपायाची आग मस्तकात गेली. मिसळपाव हे एक खाजगी संकेतस्थळ असून ते एका व्यक्तीच्या मालकाचे आहे ही साधी गोष्ट धागाकर्ती आणि तिला पाठींबा देणार्‍या दोन-चार लोकांच्या लक्षात आली नसावी. दोन चार बड्या लोकांनी या संकेतस्थळाला लोकाभिमुख इ. म्हटले तरी इथे एकाधिकारच कामी येतो हे येथील ज्येष्ठ सदस्यांच्या वारंवार ध्यानात आलेले नाही काय? मालक आणि त्यांची मर्जी सांभाळून वागणारे संपादक मंडळ यांच्या कार्यशैलीवर टिप्पणी करणारा हा धागा क्लेशदायक आहे. तेवढे पुरेसे नाही काय म्हणून घासकडवी, मुक्तसुनीत, सहज आणि इतर मंडळी आगीत तेल टाकायला हजर आहेतच. संपूर्ण धाग्यात एकच मॅच्युअर प्रतिसाद दिसला आणि तो म्हणजे आमच्या बिपिनदांचा. अदितीने त्यांच्याकडून काहीतरी शिकावे. जमल्यास स्वतःच्या गुर्जींनाही शिकवणी लावावी. असो. मालकांना आणि त्यांच्या संपादकांना या धाग्यामुळे अत्यंत क्लेश होतील असे वाटते. तरी त्यांनी मिळून किमान अदिती, मुक्तसुनीत, राजेश घासकडवी आणि सहज यांची खाती लगोलग गोठवून टाकावी ही विनंती.

In reply to by प्रियाली

१. पंगा यांचे खाते गोठवले असल्याचे मला या धाग्यातून समजले. धागा आणि माझे प्रतिसाद नीट वाचले असता तुमच्या हे लक्षात येईलच. २. पंगा हा माझ्या आवडत्या जालआयडींपैकी एक आहे. तर आपल्या आवडत्या लेखक-प्रतिसादकाला शुभेच्छा देण्यात काय गैर आहे? मागे देवकाकांनी सिद्धहस्त लेखकांची यादी काढली होती, पिडांकाकांनी लोणच्याची रेसिपी टाकत स्वातीताईची प्रशंसा केली होती, त्यातलाच हाही एक प्रकार. या लेखनप्रकारात काही आक्षेपार्ह आहे काय? तसे असल्यास संस्थळाच्या धोरणात मला ते सापडले नाही. तसं काही असल्यास ते शोधण्यात तुम्ही कृपया मदत करावी. ३. धाग्यात कोणाच्याही कार्यशैलीवर टीप्पणी नाही. असलीच तर ती पंगाशेटच्या तार्कीक असण्यावर आहे आणि त्यात निखळ प्रशंसाच आहे. ४. वाढदिवसाच्या धाग्यांकडे तुम्ही दुर्लक्ष करत असालही पण हा धागा निव्वळ शुभेच्छांसाठी आहे. मिपावरील एक ज्येष्ठ आयडी या नात्याने तुम्हाला "वाढदिवसाच्या शुभेच्छा" याचा अर्थही मी समजवण्याची गरज पडावी हे पटण्यासारखं नाही. ५. सर्व लेखकांचे चांगले धागे संकलित करण्याची कल्पना निघाली तशी चांगल्या प्रतिसादांचेही संकलन व्हावे असं माझ्या बालबुद्धीला वाटलं. पंगाशेटने फार धागे काढल्याचं माझ्या स्मरणात नाही, पण त्यांचे प्रतिसाद वाचनीय असायचे. त्यांचे संकलन या धाग्यात व्हावे अशी माझी इच्छा होती. ते धोरणाबाहेर किंवा व्यवस्थापनास क्लेषदायक असेल असं मला खरोखर वाटलं नाही. काही जुने धागे काढून मी स्वतः बराच वेळ हसत होते. ६. इतर मंडळी आगीत तेल ओततात यात माझा दोष काय? सबब, मी शेंगा खाल्ल्या नाहीत, मी टरफलं उचलणार नाही. सरकारवर, मौलवींवर टीका करणारे धागे चालतात तर एखाद्या आयडीची प्रशंसा करणारा धागा का टोचावा?

In reply to by प्रियाली

Nile 14/09/2011 - 20:57
>>ते वढे पुरेसे नाही काय म्हणून घासकडवी, मुक्तसुनीत, सहज आणि इतर मंडळी आगीत तेल टाकायला हजर आहेतच. नाहीतर काय, आगलावे कुठले!!! (मला दिले असते वढे तर काय बिघडलं असतं??) >>संपूर्ण धाग्यात एकच मॅच्युअर प्रतिसाद दिसला आणि तो म्हणजे आमच्या बिपिनदांचा. आमच्या डान्याला पण आपले म्हणा हो काकू!! >>मालकांना आणि त्यांच्या संपादकांना या धाग्यामुळे अत्यंत क्लेश होतील असे वाटते. तरी त्यांनी मिळून किमान अदिती, मुक्तसुनीत, राजेश घासकडवी आणि सहज यांची खाती लगोलग गोठवून टाकावी ही विनंती. व्यवस्थानपनाला सुचना करू नये या धोरणाचे उल्लंघन केल्याने प्रियाली काकूंचेही खाते गोठवावे अशी 'विनंती' करतो.

राही 14/09/2011 - 15:04
मराठी जालस्थलांवर गेली कित्येक वर्षे (बहुतांशी फक्त वाचनमात्र) वावर आहे. वाढदिवसाच्या किंवा अश्या स्वरूपाची वैयक्तिक माहिती जाहीर मांडणार्‍या धाग्यावर प्रतिसाद देणे आतापर्यंत कटाक्षाने टाळले होते. पण या धाग्यामध्ये श्री. पंगा यांच्या निलंबनाचा मुद्दा उपस्थित झाल्यामुळे लिहावेसे वाटले. श्री पंगा यांचे प्रतिसाद बहुतेक वेळा नर्म विनोदी,वादपटुत्व, वादचातुर्य आणि वादरुची दर्शवणारे,संदर्भांच्या रेलचेलीमुळे व्यासंगाची कल्पना देणारे,हिरीरीने बाजू मांडतानासुद्धा कधीही कटुता येऊ न देणारे असत. अर्थात ते अत्यंत वाचनीय असत हे वेगळे सांगायला नको.निलंबनाविषयी याच धाग्यातून कळल्यामुळे आणि तपशील माहित नसल्यामुळे मतप्रदर्शन टाळीत आहे. वाढदिवसानिमित्त शुभेच्छा. (श्रद्धांजली देखील अर्पण करावी का?)

In reply to by राही

प्रियाली 14/09/2011 - 15:33
श्रद्धांजली देखील अर्पण करावी का?
श्राद्धपक्ष सुरू झाला ना? मग विचारणा कशाला करायची? जो पर्यंत आपले श्राद्ध घातले जात नाही तोपर्यंत दुसर्‍याचे श्राद्ध घालायला आपण मोकळेच आहोत. या निमित्ताने इतर काही उडवलेल्या आयडींचेही श्राद्ध घालावे ही विनंती. ;)

In reply to by प्रियाली

Nile 14/09/2011 - 20:57
>>या निमित्ताने इतर काही उडवलेल्या आयडींचेही श्राद्ध घालावे ही विनंती. आमच्या श्राद्धाला तुम्ही सोईस्कररीत्या विसरला होतात हे नम्रपणे निदर्शनास आणून देऊ इच्छितो!! अजूनही वेळ गेलेली नाही, कधी येऊ श्राद्धाचं जेवायला? श्राद्धाचे 'वढे' मला फार आवडतात! ;-)

आदिजोशी 14/09/2011 - 19:59
पंगा जर निलंबीत झाले असतील तर त्याचे अजिबात आश्चर्य वाटले नाही. मधून मधून अशी अनेक मंडळी निलंबीत होत राहतात. असे झटके येत राहतात. पण अमाप गोंधळ घालणारी अनेक मंडळी अजून मिपा वर असल्याचे मात्र नेहेमीच आश्चर्य वाटते आणि वाटत राहील.

In reply to by क्रेमर

अगदी ... अगदी जुन्या आठवणी जाग्या झाल्या. ह्या धाग्या पासून वाचतोय पंगा शेठ ला. पंगा शेठ ला वाढविसाच्या शुभेच्छा !

बाळकराम 15/09/2011 - 02:24
(हा प्रतिसाद प्रकाशित होण्याची फारशी अपेक्षा नाही!) गेले कित्येक महिने मिपावर एक सामान्य मिपाकर या नात्याने माझा वावर आहे. कार्यबाहुल्यामुळे म्हणा किंवा लेखनात मुळातच फारशी गती नसल्यामुळे म्हणा हातून फारसे लेखन जरी घडले नाही तरी इथे नियमित येणार्‍या अनेक अभ्यासपूर्ण आणि विद्वत्तापूर्ण लेखांनी जसे प्रभावित केलं तसेच इथल्या अनेक खट्याळ धाग्यांवर येणार्‍या तितक्याच महा खट्याळ प्रतिसादांनी करमणूक देखील केली. अशा विद्वानांच्या आणि अभ्यासूंच्या मांदियाळीत जी काही थोडी नावं त्यांच्या उपजत लेखन कौशल्याने, प्रतिभेने आणि सर्वांगीण ज्ञानाने उठून दिसली त्यात श्री पंगा यांचा समावेश नक्कीच करावा लागेल. श्री पंगा यांनी नक्की कोणता अपराध केला होता हे समजण्यास मलातरी जागा नाही, पण अशा अपमानास्पद रीतिने त्यांना निलंबित करण्याइतका त्यांनी कुठला गंभीर गुन्हा केला असावा असं त्यांच्या आत्तापर्यंतच्या मिपावरील वावरावरुन तरी वाटत नाही. ( अर्थात आंतरजालावरील कुठलाच गुन्हा निलंबन करावा अशा पातळीचा सहसा असणार नाही- गुन्हेगारी वा तत्सम अपराध वगळता- असं मला तरी वाटतं.) मिपाची मालकी व व्यवस्थापन खाजगी आहे असं वरच्या काही प्रतिसादातून कळलंच. ते जर खरं असलं तर आपल्याला गैरसोयीचे ठरणारे विचार वा व्यक्ती यांना नारळ देण्याचा व्यवस्थापनाचा हक्क अबाधित आहेच. पण तरी सुद्धा श्री पंगा यांना अशातर्‍हेने निलंबन करण्याचं कारण मिपा व्यवस्थापनाने स्पष्ट केलं पाहिजे. श्री पंगा यांच्यासारखे अनेक सिद्धहस्त लेखक लिहितात म्हणून आमच्या सारखे अनेक लोक मिपावर वारंवार यायला प्रवृत्त होतात हे दुर्लक्षू नये. एवढी मस्ती दाखवायला मिपा म्हणजे काही फेसबुक नव्हे! तेवढे मोठे व्हाल तेव्हा ही गुर्मी सुद्धा सहन करु! एवढंसं ते मिपा काय- आंतरजालावरच्या अगणित संस्थळांपैकी एक- त्यात कुणा एकाबरोबर पटत नसल्याने त्याला बाहेर काढण्याचा तो प्रकार काय! केवळ दुबळे आणि भ्याड लोकच असा अधिकार गाजवायला बघतात. असाच माज दाखवत राहिलात तर जी काही चार टाळकी आज मिपावर येताहेत ती सुद्धा बंद होतील आणि काटकुळ्या दंडातल्या बेटकुळ्या दाखवायला कुणी उरणार नाही याची आग्रहपूर्वक नोंद घ्यावी ही विनंती!

In reply to by धनंजय

पाषाणभेद 15/09/2011 - 03:13
पण नामकरण समारंभ पुन्हा करून किंवा गॅझेटमध्ये 'नाव बदललेले आहे' असे करून पंगा पुन्हा मंगा असे नाव घेवू शकतात ना? एक आठवण सांगतो. सुरूवातीला हे पंगा फक्त हिंदी या मला न समजणार्‍या लिपीतच ल्याहायचे. त्यांना एकदोन वेळा समजही दिली होती. मग मात्र बोळा सुटला अन ते मराठी झाले. असो.

मराठमोळा 15/09/2011 - 17:33
अरे वा. छान. तसा मी अदितीच्या धाग्यावर प्रतिक्रिया द्यायचं कटाक्षाने टाळतोच, पण हा धागा पाहून रहावलं नाही. उत्तम धागा आणि चर्चा. बाकी चालु द्या. ;)

वाहीदा 16/09/2011 - 13:33
अतिशय सुद्य्न अभ्यासू, वैचारिक , उत्तम वादविवाद पटू असलेले पंगा यांची कमालिची तर्कशुध्दता त्यांच्या प्रत्येक प्रतिसादात जाणवायची, सहज यांच्या वरिल प्रतिसादाशी सहमत पंगा यांचे खाते गोठविणे ही निव्व्ळ खेदाची बाब :-( मी निरिक्षण केल्याप्रमाणे त्यांनी एका धाग्यात श्री हुप्प्या यांना प्रतिसाद देताना रा स्व संघ यांच्या प्रार्थनेबध्द्ल काही लिहीले होते अन त्यानंतर त्यांचा तो प्रतिसाद ही गायब झाला अन ते ही ....

In reply to by वाहीदा

मी निरिक्षण केल्याप्रमाणे त्यांनी एका धाग्यात श्री हुप्प्या यांना प्रतिसाद देताना रा स्व संघ यांच्या प्रार्थनेबध्द्ल काही लिहीले होते अन त्यानंतर त्यांचा तो प्रतिसाद ही गायब झाला अन ते ही ....
अच्छा म्हणजे पंगा ह्यांचे खाते उडण्यामागे संघाचा हात आहे तर.

In reply to by परिकथेतील राजकुमार

अच्छा म्हणजे पंगा ह्यांचे खाते उडण्यामागे संघाचा हात आहे तर.
गप्प बसण्याचे ठरवलेले नाही, पण लिंका शोधायचा कंटाळा आला आहे.

In reply to by मुक्तसुनीत

ढब्बू पैसा 14/09/2011 - 07:29
पंगाशेठना आमच्याही शुभेच्छा! हल्ली दिसत नाहीत ते मिपावर, कुठे असतात? अवखळकर बै तुम्ही किडन्याप तर नै केलं ना त्याना?

पंगांच्या प्रतिसादशैली मार्मिकपणे पकडण्याचा प्रयत्न आवडला. त्यात 'वाढदिवसाच्या शुभेच्छा' हा जालीय वाक्प्रयोग त्यांनीच प्रसिद्ध केला असं ऐकून आहे. तेव्हा त्यांना यावेळी अशा शुभेच्छा देणं हा काव्यात्म न्यायच ठरतो. प्रवाहाविरुद्ध पोहण्याची, वारा वळेल तशी पाठ न फिरवता आपल्याला हव्या त्या दिशेला तोंड करण्याची (कधीकधी मुद्दामून वाऱ्याला सामोरं जाण्याची) त्यांची ख्याती आहे. पंगा ही खरं तर सविनय बंडखोरीची प्रवृत्तीच म्हणता येईल. त्यांच्या वाढत्या वयाबरोबरच त्यांच्या प्रतिसादांची लांबी (कंस, सुपरस्क्रिप्टं, तळटिपा, राखाडी अक्षरं यांसकट) वाढत जावो ही शुभेच्छा.

सहज 14/09/2011 - 07:31
पंगा यांचे निलंबन अतिशय क्लेषदायक गोष्ट आहे. मिपाच्या स्थापनेपासुन मी मिपासदस्य आहे. इथे संपादन, व्यवस्थापन विषयावर बोलायला बंदी आहे किंवा ठरावीक लोकांनी बोललेले चालून जाते हेही पाहीले आहे. व्यवस्थापनाला आपले व्याप सांभाळून अनेक कटकटींना सामोरे जावे लागते याचाही पूर्ण अंदाज आहे. सहानुभूतीदेखील आहे. पण मिपा हे मी पाहीलेल्या काही मोजक्या मराठी संस्थळात वेगळे, पारदर्शक कारभार असलेले संस्थळ वाटले होते. दोन एक वर्षापुर्वी मिपाच्या माध्यमातून (हो हो गहजब नको पण मिपाच्या व्यनितून ऑफर, विनंत्या आल्या म्हणून माध्यम म्हणत आहे)काही चुकीचे प्रकार झाले त्यातुन मग पुढे काही व्यवस्थापन बदल होउन पुन्हा गाडे सुरळीत होताच अजुन एक इंटरनेट प्रायव्हसीचे प्रकरण ऐकू येउ लागले. यावर खाजगीत बरेच काही बोलले जाउ लागले पण जाहीर ना सवाल केला गेला की खुलासे दिले गेले जणू काही घडलेच नाही. ही पारदर्शकता!! मिपावर रोज उठून राजकारणी कसे भ्रष्ट आहेत, कसे दडवतात असे जो तो बोलतो पण जेव्हा आपल्याकडून चुका होतात त्याची कबूली द्यायला, सामान्य लोकात किती धैर्य असते अथवा जबाबदारी वाटते? बर त्या त्रुटी अगदी समजवुन घेतल्या तरी मिपावर दिसुन आलेल्या एका गोष्टीचा मला अतिशय त्रास झाला. तो म्हणजे सदस्य निलंबनातील मनमानी. सर्व्हरवर कीडे अथवा कोणाचे वैयक्तिक नुकसान असे काही झाल्यास निलंबन होणे समजु शकतो. पण केवळ आपले विचार जुळत नाहीत म्हणून एखाद्या आयडीला परस्पर जालकंटक समजुन, कारणे न देता उडवणे हे जबाबदार व्यवस्थापना भूषणावह नाही. यातुन हाच संदेश जातो की तुम्ही विशिष्ट कंपूत हवा अथवा विरोध न करणारे सदस्य हवात अन्यथा तुमचे खाते कधीही उडवले जाउ शकते. रिकामटेकडा (मिपा आयडी आठवत नाही बहुदा टोपणनाव) , व आता पंगा हे दोन आयडी अतिशय ज्ञानी व उत्तम वादविवादपटू आयडी. भले त्यांची काही मते पटत नसतील पण प्रतिसादातुन आपल्या चातुर्याची, लोकांना दुसरी बाजु उत्तमपणे उलगडवून दाखवयाची हातोटी वाखाणण्याजोगी. या दोघांच्या प्रतिसादातुन अनेक लोकांचे प्रबोधन किमान मनोरंजन तर नक्कीच झाले असेल. माझ्या माहीतीनुसार हे दोन्ही आयडी आपल्या लेखनातुन भले आक्रमक वाटू शकतील पण अविवेकी आणि आक्रस्ताळे नव्हे. किमान सभ्यता पाळायचे. आपल्या दाव्याच्या पुष्टर्थ्य योग्य दुवे देणे, मुद्यांचा प्रतिवाद करणे प्रसंगी (श्री पंगा) वेगळा मुद्दा जाणवून दिल्याबद्दल विरोधकांना धन्यवाद दिल्याचेही पाहीले होते. एक तर अश्या लोकांना एकतर्फी कोणतीच सुचना न देता उडवणे मिपाकरांना योग्य वाटते का? इथे अनेक वेळा लोक निनावी आयडीने राजकीय नेते, पक्ष, धर्म याबाबत वाट्टेल ती अनुचित विधाने करतात ते चालून जाते पण केवळ आपल्याला गैरसोयीची वाटतात व ह्या आयडींचा कोणत्या कंपूत समावेश नसणे ह्या कारणाने फटकन निलंबन केले जाते हे अतिशय चुकीचे वाटते. मिपाच्या स्थापनेपासुन मी कायम व्यवस्थापनाला माझे मत सांगीतले आहे की वर उल्लेख केलेले प्रकार वगळता कोणाला निलंबीत करु नका फार तर काही दिवस वाचनमात्र करा. पण अजुनही मिपावरही मनमानी दिसुन येते आहे. मिपावर प्रसंगी कट्टर वाटेल असा विरोध चालवून घेतला जात नाही हा एकमेव संदेश व्यवस्थापन देत असेल तर ते मला चुकीचे वाटत आहे. मी इथे मागणी करतो की श्री पंगा व श्री टोपणनाव यांचे निलंबन रद्द करुन त्यांचे खाते पूर्ववत केले जावे. किमान नक्की कोणत्या कारणास्तव ह्या दोघांना काढले गेले त्याचे स्पष्टीकरण द्यावे. जेणेकरुन इतरांना त्यापासुन बोध घेता येईल. मिपा स्वताला म्हणवते तितके पारदर्शक, जबाबदार संस्थळ आहे का याचाही ज्याला त्याला अर्थ लावता येईल. ह्या प्रतिसादाचा (बहुदा धाग्याचाही) व्यवस्थापनाला अडचणीत आणण्याचा कोणताही हेतु नाही पण जर आपल्या हातून काही चुकीचे निर्णय घेतले गेले तर केवळ इगो जपण्याकरता ते निर्णय तसे ठेवण्यापेक्षा ते निर्णय बदलण्याचा दिलदारपणा बघायला मिळावा ही अपेक्षा. मिपाकरांना ह्या दोघांच्या निलंबनाबद्दल काय वाटते हे विचारावेसे वाटते.

In reply to by मुक्तसुनीत

चिंतामणी 14/09/2011 - 10:26
सहजराव , बॅकप घेतला आहे ना ? सगळ्यांनीच या धाग्यावरचे पोस्टचे बॅकअप घ्यावे. कारण सर्वांनीच ह्याकडे दुर्लक्ष केलेले आहे असे दिसते. नमस्कार, रोजच्या गप्पाटप्पा करण्यासाठी,वाढदिवस, बातम्या आणि इतर अश्याच तात्कालीक चर्चांसाठी हा खरडायचा फळा आहे. येथे खुप लेखन करू नये. कारण तीन दिवसांनी हे लेखन उडवल्या जाईल.

In reply to by सहज

ढब्बू पैसा 14/09/2011 - 07:48
खूप धक्का बसला होता खरं तर. आणि तेही कुठल्याही अधिकृत माध्यमातून कळले नव्हते. कारण तर आत्ता तुमच्य सविस्तर प्रतिक्रियेतून कळतंय आणि हे सगळं ज्या भावनेतून मिपा सुरू झालं होतं त्याच्याशी विसंगत आहे. पंगा यांचे लेखन म्हणजे नेहमीच (माझ्यासाठी तरी) एनलाईटनिंग ह्या प्रकारातले होते. आणि कुठलाही सूज्ञ वाचक जालकंटक आणि उत्तम वादविवादपटू ह्यातला फरक ओळखू शकेलच. पण लेखन हा क्रायटेरिआ न लावता केवळ वैयक्तीक आकसातून कार्यवाही झाली असेल तर हे दुर्दैवी आहे असं मी म्हणेन! >>ह्या प्रतिसादाचा (बहुदा धाग्याचाही) व्यवस्थापनाला अडचणीत आणण्याचा कोणताही हेतु नाही पण जर आपल्या हातून काही चुकीचे निर्णय घेतले गेले तर केवळ इगो जपण्याकरता ते निर्णय तसे ठेवण्यापेक्षा ते निर्णय बदलण्याचा दिलदारपणा बघायला मिळावा ही अपेक्षा.>>> ह्यासाठी सहजकाका, तुम्हाला अनुमोदन :)

In reply to by सहज

नितिन थत्ते 14/09/2011 - 08:13
सहज यांच्याशी सहमत आहे. मिपा इतके पारदर्शक* संस्थळ दुसरे नाही हे खरे असले तरी त्यामुळेच अपेक्षा जास्त आहेत. पंगा यांई सदस्यत्व घेतले तेव्हा त्यांच्या मराठेतर भाषेतील प्रतिसादांना आक्षेप घेऊन त्यांचे खाते गोठवावे का? असा कौल मीच स्वतः काढला होता. त्या आक्षेपावर आत्ता (१ वर्ष ४ महिन्यांनी) कारवाई झाली आहे की काय? *हे माझे परसेप्शन आहे कारण अडीच वर्षाहून अधिक काळ इथे वावरत आहे. काही सदस्य आणि संपादकांशी ओळख आहे/झाली आहे. कदाचित नव्या सदस्यांना अशा प्रकारचे प्रतिसाद आणि धागे उडवले जाताना पाहून तसे न वाटण्याची शक्यता आहे. खुलासा व्हावा अशी अपेक्षा आहे. नितिन थत्ते

In reply to by नितिन थत्ते

थ्यँक्स नितिन. तुझ्यामुळे आज चक्र पूर्ण झाल्याचं लक्षात आलं. १ वर्ष चार महिन्यांपूर्वी पंगाशेटने मला वाढदिवसाच्या शुभेच्छा स्पानिशमधे दिल्या होत्या हे लक्षात आलं. (बंगालीचे होतकरू प्राध्यापक) पं. डि(ली)त गागाभट्ट यांनी बंगालीची होतकरू विद्यार्थिनी अदिती हिच्याकडून शुभेच्छा स्वीकाराव्यात.

In reply to by सहज

सुनील 14/09/2011 - 10:11
मी इथे मागणी करतो की श्री पंगा व श्री टोपणनाव यांचे निलंबन रद्द करुन त्यांचे खाते पूर्ववत केले जावे. किमान नक्की कोणत्या कारणास्तव ह्या दोघांना काढले गेले त्याचे स्पष्टीकरण द्यावे. जेणेकरुन इतरांना त्यापासुन बोध घेता येईल. मिपा स्वताला म्हणवते तितके पारदर्शक, जबाबदार संस्थळ आहे का याचाही ज्याला त्याला अर्थ लावता येईल. सहमत.

सुधीर काळे 14/09/2011 - 07:40
पंडित गागाभट्ट यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा! त्यांना निलंबित केल्याचे माहीत नव्हते (आताच वाचले). तरी कृपया आमच्या शुभेच्छा त्यांच्यापर्यंत पोचविण्याची विनंती अदितीला करत आहे!!

नगरीनिरंजन 14/09/2011 - 07:48
पंगा यांच्यावर आमचे दशांगुळे आणि त्यांचे आमच्यावर आभाळाएवढे प्रेम होते आणि आहे. म्हणूनच मी अतिशय सद्गदित अंतःकरणाने त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. ईश्वर त्यांना परत येण्याची आणि व्यवस्थापनावरील प्रेम आमच्यावर काढण्याची बुद्धी देवो.

In reply to by नगरीनिरंजन

ननि यांच्या या प्रतिसादातून मला एक कल्पना सुचली आहे. पंगाशेट नेहेमीच आपल्याला वेगवेगळ्या लिंका, कंस देतात, सोरि, सोरि, द्यायचे. कृपया पंगाशेटला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना तुम्हीही त्यांच्या आवडलेल्या प्रतिसादांच्या लिंका द्या. म्हणजे पंगाशेटच्या एकसेएक भारी प्रतिसादांचं संकलन याच धाग्यावर होऊन जाईल.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

नगरीनिरंजन 14/09/2011 - 10:56
प्रेमाच्या ट्रान्झिटीव्हिटीवर पंगा यांनी लिहिलेला एक प्रतिसाद देण्याचा मोह टाळण्यात आलेला आहे असे नमूद करण्याचा मोह आवरत नाही.

कृपया पंगाशेटला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना तुम्हीही त्यांच्या आवडलेल्या प्रतिसादांच्या लिंका द्या. म्हणजे पंगाशेटच्या एकसेएक भारी प्रतिसादांचं संकलन याच धाग्यावर होऊन जाईल.
मी सुरूवात करतो, कारण त्यांच्या पहिल्या काही प्रतिक्रियांपैकी एक माझ्या लेखावर होती. सगळेजण त्या लेखाला चान चान म्हणत असताना ट्रैश असं त्यांनी म्हटलं होतं. शशिकांत ओकांच्या नाडीविषयाची थोडीशी चेष्टा केल्यावर, 'एखाद्याला किती उगाच हाणायचं... ' असं मत पंगांनी मांडलेलं होतं. (त्यावेळी ते गंमत म्हणून प्रतिसाद हिंदीमध्ये लिहीत असत. ) प्रवाहाच्या विरुद्ध जाऊन मत मांडण्याची तयारी दाखवणाऱ्या अगदी थोड्या लोकांपैकी ते एक.

In reply to by राजेश घासकडवी

सहज 14/09/2011 - 11:19
अश्लीलते कडे झुकत चाललेल्या थिल्लर धाग्यावर काय सणसणीत प्रहार केला होता की कोणत्याही संस्कृती रक्षकाला पंगा यांचा अभिमान वाटावा :-)

In reply to by सहज

Nile 14/09/2011 - 11:36
आज आधीच पंगाशेठच्या आठवणीने विव्हळलो होतो त्यात पुन्हा सैपाकाची आठवण कशाला करून दिलीत? वर्ष उलटून गेलं तरी आजून आम्ही सैपाक कलेत करंटेच ह्या आठवणीने अजून कळवळलो... असो..

नंदन 14/09/2011 - 08:10
शून्य खाजगीपणा आणि गैरसोयीच्या मंडळींचे 'लिक्विडेशन' ही ग्रेट पर्जची व्यवच्छेदक लक्षणं होती म्हणे. असो, पंगाशेठना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

Nile 14/09/2011 - 08:47
असं कसं झालं रेssss!!! कीत्ती कीत्ती गोष्टी शिकायच्या होत्या मला पंगाशेठकडूनssss! आता कोण शिकवणार मलाssss!!! असा कोणत्या नियतीनं घाला घातला आमच्या पंगाशेठवरssss!! आता कोणाकडे बघायचं आम्हीssss???

ऋषिकेश 14/09/2011 - 14:14
अरेच्या! हे कधी झालं? 'पंगा' यांच्या खात्याला गोठवल्याचं माहित नव्हतं :( ते विविध दृष्टीकोनातून मुद्दी मांडण्यात निष्णात होते हे नक्की. त्यांना अयोग्य वाटेल / असहमती असेल तेथे वाद घालत पण वितंडवाद-अतार्किक वाद घातल्याचे आठवत नाही. (माझ्याबरोबरही कोणत्याशा धाग्यावर असहमती झाली होती मात्र मुद्दा सोडून वैयक्तीक वार केल्याचे आठवत नाही) सारी मराठी संस्थळे खाजगी मालकीची आहेत हे सारे जाणतातच, मात्र वर सहजराव म्हणाले तसं बर्‍यापैकी पारदर्शक असल्याने मिपा व्यवस्थापनाकडून कारण समजणे अपेक्षित आहे. अरे हो वाढदिवसाच्या शुभेच्छा राहिल्याच होत्या.. श्री. पंगा यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा

अर्धवट 14/09/2011 - 11:22
पंगासेठचे खाते गोठवण्याचा निर्णय आत्ताच समजला.. निर्णय आश्चर्यचकीत करणारा आहे आणि वेदनादायीही. त्यांच्या लेखनातील तर्कशुद्धता आणि एकएक शब्द तपासुन घेण्याची प्रवृत्ती या गोष्टी शिकता आल्या असत्या.. अत्यंत संयत भाषेत वाद घालणे यासाठी मी त्यांचा फॅन आहे. त्यांच्या निलंबनाला काही सबळ आणि तितकेच महत्वाचं कारण असावं अशी आशा बाळगून आहे. ते कारण तितकंसं खाजगीही नसावं अशीही अपेक्षा आहे. बघू.. पुढेमागे कधितरी ते एखाद्या खुल्या अथवा कमराबंद चर्चेतून कळेलच.. पंगा यांचे प्रतिसाद वाचुन तयार झालेल्या त्यांच्या प्रतिमेशी अशी शक्यता विसंगत वाटत आहे.. पण "सगळ्यांना सगळं कळलंच पाहिजे असा नियम नाही" आणि "समाज ही गुंतागुंतीची चीज आहे" या दोन आधारांवर विसंबून "गप्प बसायचे ठरवले आहे" पण या निलंबनाचे कारण म्हणजे केवळ त्यांचे टीका करणारे, जनप्रवाहाविरूद्ध जाणारे, न पटलेल्या गोष्टीला संयत आक्षेप नोंदवणारे प्रतिसाद इतकंच असेल तर.. व्यवस्थापनाचा निषेध नोंदवत आहे.. अवांतर - पंगा यांचा मेल आयडी घ्यायचा राहिला ही हुरहूर राहीलीच. कुणाकडे पंगा या आयडी मागचा चेहेरा अथवा त्यांचा मेल आयडी अथवा त्यांचा दुसर्‍या संस्थळावरचा आयडी अथवा याच संस्थळावरचा दुसरा आयडी असेल तर तो मला इथे (ardhawat@gmail.com) पाठवावा ही जाहीर विनंती करत आहे. उपकृत होइन.

या निमित्तानं व्होल्तेअरचं एक उद्धृत द्यायचा मोह टाळता येत नाही: As long as people believe in absurdities they will continue to commit atrocities. आणि पुन्हा पुन्हा असे धागे काढणारे आणि त्यांना हौतात्म्य देणारे या दोहोंसाठी व्होल्तेअरचं अजून एक उद्धृतः It is dangerous to be right in matters where established men are wrong.

गणपा 14/09/2011 - 13:46
सर्वप्रथम पंगाशेटना खर्‍या खुर्‍या वाढदिवसाच्या शुभेच्छा !!! पंगाशेटनी कुणाच्या/कुठल्या दुखर्‍या नशीवर बोट ठेवले माहीत नाही. पण त्यांच्या अचानक अदृश्य होण्याचा अचंबा वाटला होता. (निलंबन झाले की ते स्वत:हुन गेलेत याबद्दल संस्थळ चालकच सांगु शकतील.) पण सहजरावांनी व इतरांनी वर जे पंगाशेट बद्दल मतप्रदर्शन केलेय त्याचाशी सहमत आहे. पंगाशेट मिपावर परत यावेत ही माझीही इच्छा आहे.

श्री. पंगा यांचा खरोखरच वाढदिवस असल्यास त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा! त्यांच्याबद्दल फक्त एक हुशार सदस्य एवढीच ओळख आहे / होती. संपर्क रहावा असे आवर्जून वाटावे असे एक व्यक्तिमत्व. त्यांचे खाते का गोठवले वगैरेंबद्दल काही स्पष्टीकरण आल्यावर मगच काही मत मांडता येईल. अन्यथा, त्यांनी स्वतःहून खाते गोठवण्याची विनंती केली असे समोर आले तर केलेले मतप्रदर्शन चुकीचेच ठरेल, नाही का?

In reply to by बिपिन कार्यकर्ते

छोटा डॉन 14/09/2011 - 14:46
>>श्री. पंगा यांचा खरोखरच वाढदिवस असल्यास त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा! त्यांच्याबद्दल फक्त एक हुशार सदस्य एवढीच ओळख आहे / होती. संपर्क रहावा असे आवर्जून वाटावे असे एक व्यक्तिमत्व. हेच म्हणतो. त्यांचा आज खरोखर वाढदिवस असेल तर त्यांना मनापासुन शुभेच्छा :) बाकी धाग्याचे ठिक आहे. ही चौकशी करण्याचे इतर मार्गही उपलब्ध आहेत, पण हरकत नाही, चालू द्यात एवढेच म्हणतो. वैयक्तिकरित्या हा धागा पटला नाही असे स्पष्टपणे सांगतो. - छोटा डॉन

In reply to by बिपिन कार्यकर्ते

मुक्तसुनीत 14/09/2011 - 17:24
त्यांचे खाते का गोठवले वगैरेंबद्दल काही स्पष्टीकरण आल्यावर मगच काही मत मांडता येईल. अन्यथा, त्यांनी स्वतःहून खाते गोठवण्याची विनंती केली असे समोर आले तर केलेले मतप्रदर्शन चुकीचेच ठरेल, नाही का? पण हा धागा तर वाढदिवसाचा आहे की :-)

In reply to by बिपिन कार्यकर्ते

नितिन थत्ते 15/09/2011 - 15:49
>>त्यांचे खाते का गोठवले वगैरेंबद्दल काही स्पष्टीकरण आल्यावर मगच काही मत मांडता येईल. अन्यथा, त्यांनी स्वतःहून खाते गोठवण्याची विनंती केली असे समोर आले तर केलेले मतप्रदर्शन चुकीचेच ठरेल, नाही का? सहमत आहे. पण म्हणजे स्पष्टीकरणाची अपेक्षा धरावी की कसे?

प्रास 14/09/2011 - 14:08
बातमी नवीन आहे. म्हण्टलं तर पंगाशेठ यांच्या वाढदिवसाची बातमीही नवीनच आहे. गेल्या काही दिवसातीलच हे घटना असावी. तेव्हा योग्य क्रमानुसार प्रथम पंगाशेठना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! आता मुख्य - पंगाशेठांच्या निलंबनाची बातमी नवी आहे. कारवाई योग्य का अयोग्य माहित नाही पण दु:खद जरूर आहे. पंगाशेठांनी नेहमीच स्वतःच्या विचारांशी असलेली बांधिलकी राखलेली दिसून आलेली आहे आणि आपले विचार व्यक्त करण्याची त्यांची शैलीही त्यांच्या विचारांइतकीच असाधारण असल्याचे जाणवले होते. त्यांच्याशी प्रत्यक्ष संपर्क कधी झाला नव्हता पण कधीतरी व्हावा अशी इच्छा जरूर होती. पंगाशेठांचे मिपावर पुन्हा दणक्यात आगमन व्हावे ही सदिच्छा!

प्रियाली 14/09/2011 - 14:42
वाढदिवसांच्या धाग्यावर प्रतिक्रिया द्यायला मला कधीही आवडत नाही परंतु हा धागा पाहून तळपायाची आग मस्तकात गेली. मिसळपाव हे एक खाजगी संकेतस्थळ असून ते एका व्यक्तीच्या मालकाचे आहे ही साधी गोष्ट धागाकर्ती आणि तिला पाठींबा देणार्‍या दोन-चार लोकांच्या लक्षात आली नसावी. दोन चार बड्या लोकांनी या संकेतस्थळाला लोकाभिमुख इ. म्हटले तरी इथे एकाधिकारच कामी येतो हे येथील ज्येष्ठ सदस्यांच्या वारंवार ध्यानात आलेले नाही काय? मालक आणि त्यांची मर्जी सांभाळून वागणारे संपादक मंडळ यांच्या कार्यशैलीवर टिप्पणी करणारा हा धागा क्लेशदायक आहे. तेवढे पुरेसे नाही काय म्हणून घासकडवी, मुक्तसुनीत, सहज आणि इतर मंडळी आगीत तेल टाकायला हजर आहेतच. संपूर्ण धाग्यात एकच मॅच्युअर प्रतिसाद दिसला आणि तो म्हणजे आमच्या बिपिनदांचा. अदितीने त्यांच्याकडून काहीतरी शिकावे. जमल्यास स्वतःच्या गुर्जींनाही शिकवणी लावावी. असो. मालकांना आणि त्यांच्या संपादकांना या धाग्यामुळे अत्यंत क्लेश होतील असे वाटते. तरी त्यांनी मिळून किमान अदिती, मुक्तसुनीत, राजेश घासकडवी आणि सहज यांची खाती लगोलग गोठवून टाकावी ही विनंती.

In reply to by प्रियाली

१. पंगा यांचे खाते गोठवले असल्याचे मला या धाग्यातून समजले. धागा आणि माझे प्रतिसाद नीट वाचले असता तुमच्या हे लक्षात येईलच. २. पंगा हा माझ्या आवडत्या जालआयडींपैकी एक आहे. तर आपल्या आवडत्या लेखक-प्रतिसादकाला शुभेच्छा देण्यात काय गैर आहे? मागे देवकाकांनी सिद्धहस्त लेखकांची यादी काढली होती, पिडांकाकांनी लोणच्याची रेसिपी टाकत स्वातीताईची प्रशंसा केली होती, त्यातलाच हाही एक प्रकार. या लेखनप्रकारात काही आक्षेपार्ह आहे काय? तसे असल्यास संस्थळाच्या धोरणात मला ते सापडले नाही. तसं काही असल्यास ते शोधण्यात तुम्ही कृपया मदत करावी. ३. धाग्यात कोणाच्याही कार्यशैलीवर टीप्पणी नाही. असलीच तर ती पंगाशेटच्या तार्कीक असण्यावर आहे आणि त्यात निखळ प्रशंसाच आहे. ४. वाढदिवसाच्या धाग्यांकडे तुम्ही दुर्लक्ष करत असालही पण हा धागा निव्वळ शुभेच्छांसाठी आहे. मिपावरील एक ज्येष्ठ आयडी या नात्याने तुम्हाला "वाढदिवसाच्या शुभेच्छा" याचा अर्थही मी समजवण्याची गरज पडावी हे पटण्यासारखं नाही. ५. सर्व लेखकांचे चांगले धागे संकलित करण्याची कल्पना निघाली तशी चांगल्या प्रतिसादांचेही संकलन व्हावे असं माझ्या बालबुद्धीला वाटलं. पंगाशेटने फार धागे काढल्याचं माझ्या स्मरणात नाही, पण त्यांचे प्रतिसाद वाचनीय असायचे. त्यांचे संकलन या धाग्यात व्हावे अशी माझी इच्छा होती. ते धोरणाबाहेर किंवा व्यवस्थापनास क्लेषदायक असेल असं मला खरोखर वाटलं नाही. काही जुने धागे काढून मी स्वतः बराच वेळ हसत होते. ६. इतर मंडळी आगीत तेल ओततात यात माझा दोष काय? सबब, मी शेंगा खाल्ल्या नाहीत, मी टरफलं उचलणार नाही. सरकारवर, मौलवींवर टीका करणारे धागे चालतात तर एखाद्या आयडीची प्रशंसा करणारा धागा का टोचावा?

In reply to by प्रियाली

Nile 14/09/2011 - 20:57
>>ते वढे पुरेसे नाही काय म्हणून घासकडवी, मुक्तसुनीत, सहज आणि इतर मंडळी आगीत तेल टाकायला हजर आहेतच. नाहीतर काय, आगलावे कुठले!!! (मला दिले असते वढे तर काय बिघडलं असतं??) >>संपूर्ण धाग्यात एकच मॅच्युअर प्रतिसाद दिसला आणि तो म्हणजे आमच्या बिपिनदांचा. आमच्या डान्याला पण आपले म्हणा हो काकू!! >>मालकांना आणि त्यांच्या संपादकांना या धाग्यामुळे अत्यंत क्लेश होतील असे वाटते. तरी त्यांनी मिळून किमान अदिती, मुक्तसुनीत, राजेश घासकडवी आणि सहज यांची खाती लगोलग गोठवून टाकावी ही विनंती. व्यवस्थानपनाला सुचना करू नये या धोरणाचे उल्लंघन केल्याने प्रियाली काकूंचेही खाते गोठवावे अशी 'विनंती' करतो.

राही 14/09/2011 - 15:04
मराठी जालस्थलांवर गेली कित्येक वर्षे (बहुतांशी फक्त वाचनमात्र) वावर आहे. वाढदिवसाच्या किंवा अश्या स्वरूपाची वैयक्तिक माहिती जाहीर मांडणार्‍या धाग्यावर प्रतिसाद देणे आतापर्यंत कटाक्षाने टाळले होते. पण या धाग्यामध्ये श्री. पंगा यांच्या निलंबनाचा मुद्दा उपस्थित झाल्यामुळे लिहावेसे वाटले. श्री पंगा यांचे प्रतिसाद बहुतेक वेळा नर्म विनोदी,वादपटुत्व, वादचातुर्य आणि वादरुची दर्शवणारे,संदर्भांच्या रेलचेलीमुळे व्यासंगाची कल्पना देणारे,हिरीरीने बाजू मांडतानासुद्धा कधीही कटुता येऊ न देणारे असत. अर्थात ते अत्यंत वाचनीय असत हे वेगळे सांगायला नको.निलंबनाविषयी याच धाग्यातून कळल्यामुळे आणि तपशील माहित नसल्यामुळे मतप्रदर्शन टाळीत आहे. वाढदिवसानिमित्त शुभेच्छा. (श्रद्धांजली देखील अर्पण करावी का?)

In reply to by राही

प्रियाली 14/09/2011 - 15:33
श्रद्धांजली देखील अर्पण करावी का?
श्राद्धपक्ष सुरू झाला ना? मग विचारणा कशाला करायची? जो पर्यंत आपले श्राद्ध घातले जात नाही तोपर्यंत दुसर्‍याचे श्राद्ध घालायला आपण मोकळेच आहोत. या निमित्ताने इतर काही उडवलेल्या आयडींचेही श्राद्ध घालावे ही विनंती. ;)

In reply to by प्रियाली

Nile 14/09/2011 - 20:57
>>या निमित्ताने इतर काही उडवलेल्या आयडींचेही श्राद्ध घालावे ही विनंती. आमच्या श्राद्धाला तुम्ही सोईस्कररीत्या विसरला होतात हे नम्रपणे निदर्शनास आणून देऊ इच्छितो!! अजूनही वेळ गेलेली नाही, कधी येऊ श्राद्धाचं जेवायला? श्राद्धाचे 'वढे' मला फार आवडतात! ;-)

आदिजोशी 14/09/2011 - 19:59
पंगा जर निलंबीत झाले असतील तर त्याचे अजिबात आश्चर्य वाटले नाही. मधून मधून अशी अनेक मंडळी निलंबीत होत राहतात. असे झटके येत राहतात. पण अमाप गोंधळ घालणारी अनेक मंडळी अजून मिपा वर असल्याचे मात्र नेहेमीच आश्चर्य वाटते आणि वाटत राहील.

In reply to by क्रेमर

अगदी ... अगदी जुन्या आठवणी जाग्या झाल्या. ह्या धाग्या पासून वाचतोय पंगा शेठ ला. पंगा शेठ ला वाढविसाच्या शुभेच्छा !

बाळकराम 15/09/2011 - 02:24
(हा प्रतिसाद प्रकाशित होण्याची फारशी अपेक्षा नाही!) गेले कित्येक महिने मिपावर एक सामान्य मिपाकर या नात्याने माझा वावर आहे. कार्यबाहुल्यामुळे म्हणा किंवा लेखनात मुळातच फारशी गती नसल्यामुळे म्हणा हातून फारसे लेखन जरी घडले नाही तरी इथे नियमित येणार्‍या अनेक अभ्यासपूर्ण आणि विद्वत्तापूर्ण लेखांनी जसे प्रभावित केलं तसेच इथल्या अनेक खट्याळ धाग्यांवर येणार्‍या तितक्याच महा खट्याळ प्रतिसादांनी करमणूक देखील केली. अशा विद्वानांच्या आणि अभ्यासूंच्या मांदियाळीत जी काही थोडी नावं त्यांच्या उपजत लेखन कौशल्याने, प्रतिभेने आणि सर्वांगीण ज्ञानाने उठून दिसली त्यात श्री पंगा यांचा समावेश नक्कीच करावा लागेल. श्री पंगा यांनी नक्की कोणता अपराध केला होता हे समजण्यास मलातरी जागा नाही, पण अशा अपमानास्पद रीतिने त्यांना निलंबित करण्याइतका त्यांनी कुठला गंभीर गुन्हा केला असावा असं त्यांच्या आत्तापर्यंतच्या मिपावरील वावरावरुन तरी वाटत नाही. ( अर्थात आंतरजालावरील कुठलाच गुन्हा निलंबन करावा अशा पातळीचा सहसा असणार नाही- गुन्हेगारी वा तत्सम अपराध वगळता- असं मला तरी वाटतं.) मिपाची मालकी व व्यवस्थापन खाजगी आहे असं वरच्या काही प्रतिसादातून कळलंच. ते जर खरं असलं तर आपल्याला गैरसोयीचे ठरणारे विचार वा व्यक्ती यांना नारळ देण्याचा व्यवस्थापनाचा हक्क अबाधित आहेच. पण तरी सुद्धा श्री पंगा यांना अशातर्‍हेने निलंबन करण्याचं कारण मिपा व्यवस्थापनाने स्पष्ट केलं पाहिजे. श्री पंगा यांच्यासारखे अनेक सिद्धहस्त लेखक लिहितात म्हणून आमच्या सारखे अनेक लोक मिपावर वारंवार यायला प्रवृत्त होतात हे दुर्लक्षू नये. एवढी मस्ती दाखवायला मिपा म्हणजे काही फेसबुक नव्हे! तेवढे मोठे व्हाल तेव्हा ही गुर्मी सुद्धा सहन करु! एवढंसं ते मिपा काय- आंतरजालावरच्या अगणित संस्थळांपैकी एक- त्यात कुणा एकाबरोबर पटत नसल्याने त्याला बाहेर काढण्याचा तो प्रकार काय! केवळ दुबळे आणि भ्याड लोकच असा अधिकार गाजवायला बघतात. असाच माज दाखवत राहिलात तर जी काही चार टाळकी आज मिपावर येताहेत ती सुद्धा बंद होतील आणि काटकुळ्या दंडातल्या बेटकुळ्या दाखवायला कुणी उरणार नाही याची आग्रहपूर्वक नोंद घ्यावी ही विनंती!

In reply to by धनंजय

पाषाणभेद 15/09/2011 - 03:13
पण नामकरण समारंभ पुन्हा करून किंवा गॅझेटमध्ये 'नाव बदललेले आहे' असे करून पंगा पुन्हा मंगा असे नाव घेवू शकतात ना? एक आठवण सांगतो. सुरूवातीला हे पंगा फक्त हिंदी या मला न समजणार्‍या लिपीतच ल्याहायचे. त्यांना एकदोन वेळा समजही दिली होती. मग मात्र बोळा सुटला अन ते मराठी झाले. असो.

मराठमोळा 15/09/2011 - 17:33
अरे वा. छान. तसा मी अदितीच्या धाग्यावर प्रतिक्रिया द्यायचं कटाक्षाने टाळतोच, पण हा धागा पाहून रहावलं नाही. उत्तम धागा आणि चर्चा. बाकी चालु द्या. ;)

वाहीदा 16/09/2011 - 13:33
अतिशय सुद्य्न अभ्यासू, वैचारिक , उत्तम वादविवाद पटू असलेले पंगा यांची कमालिची तर्कशुध्दता त्यांच्या प्रत्येक प्रतिसादात जाणवायची, सहज यांच्या वरिल प्रतिसादाशी सहमत पंगा यांचे खाते गोठविणे ही निव्व्ळ खेदाची बाब :-( मी निरिक्षण केल्याप्रमाणे त्यांनी एका धाग्यात श्री हुप्प्या यांना प्रतिसाद देताना रा स्व संघ यांच्या प्रार्थनेबध्द्ल काही लिहीले होते अन त्यानंतर त्यांचा तो प्रतिसाद ही गायब झाला अन ते ही ....

In reply to by वाहीदा

मी निरिक्षण केल्याप्रमाणे त्यांनी एका धाग्यात श्री हुप्प्या यांना प्रतिसाद देताना रा स्व संघ यांच्या प्रार्थनेबध्द्ल काही लिहीले होते अन त्यानंतर त्यांचा तो प्रतिसाद ही गायब झाला अन ते ही ....
अच्छा म्हणजे पंगा ह्यांचे खाते उडण्यामागे संघाचा हात आहे तर.

In reply to by परिकथेतील राजकुमार

अच्छा म्हणजे पंगा ह्यांचे खाते उडण्यामागे संघाचा हात आहे तर.
गप्प बसण्याचे ठरवलेले नाही, पण लिंका शोधायचा कंटाळा आला आहे.
लेखनविषय:
लेखनप्रकार
वेळोवेळी 'डेव्हिल्स अ‍ॅडव्होकेट' बनून विचार आम्हांस करण्यास प्रवृत्त करणार्‍या पंगाशेटना वाढदिवसाच्या शुभेच्छा. पंगाशेट हे आमच्या काही आवडत्या जाल-आयडींपैकी एक. आमचं शिव्या देणं असो वा प्रश्न विचारणं, पंगाशेटने सदैव तार्किक मुद्द्यांवर सहमती वा असहमती दाखवत आम्हांस विचार करण्यास भाग पाडलं. कधी थोडे चिमटे काढत पंगाशेटने कधी आमची निखळ करमणूकही केली. पंगाशेटना मी "जिवेत शरदः शतम्।" असं म्हणून शुभेच्छांची चार वाक्य संपवते.

मरणावेळेच्या शूटिंगची सोय आणि इतर सेवा पुरवल्या जातील. अधिक माहीतीसाठी वाचा..

Nile ·

चित्रगुप्त 11/09/2011 - 15:02
सदर शूटिंग चे वेळी ड्यूटीवर असणार्‍या आमच्या हापिसातील यमदूतांना त्यांचे कमिशन आगाऊ दिल्याशिवाय ते त्यांचे काम पूर्ण करणार नाहीत. तसेच कॉन्ट्र्याक्ट साईन करण्यापूर्वी आमच्या हापिसाकडून त्यादिवशी पुरेसे यमदूत उपलब्ध होतील की नाही, याची आगाऊ खात्री करून घेणे. यासाठी www.yamaraaj.com इथे चवकशी करावी. हॉलिवूड मधून नट्या आणल्यास, आमच्या दूतांना त्या आवडल्यास त्यांनाही उचलून आणले जाऊ शकते, याची नोंद घ्यावी.

In reply to by चित्रगुप्त

Nile 12/09/2011 - 11:35
तुमचं आमचं 'गुप्त' डील असताना ते 'चित्र' असं पब्लिकसमोर कशाला मांडांयचं? काही कमी जास्त झालं असेल तर आपण करु की नीट. कधी बसायचं? ;-)

@- हॉलिवूड मधून नट्या आणल्यास, आमच्या दूतांना त्या आवडल्यास त्यांनाही उचलून आणले जाऊ शकते, याची नोंद घ्यावी. .खिक्क...ह्ही ह्ही ह्हा ह्हा ह्हा :bigsmile: मला यमदूताची नोकरी हवी आहे ;-) आणी तसेही आंम्ही हॉलीवूड मध्ल्या अनेक नट्यांवर मरतोच :-p ,त्यामुळे नोकरी पूर्व म्रुत्यू ची अट घालू नये :-)

In reply to by अत्रुप्त आत्मा

चित्रगुप्त 11/09/2011 - 19:04
यमदूताच्या नोकरीसाठी आवश्यक पात्रता: शिक्षणः मार्तिक पास अनुभवः १. कमित कमी शंभर मनुष्यांना यमसदनी पाठवण्याचा अनुभव. (हा एकाच जन्मातील असणे आवश्यक नाही, मात्र मनुष्ययोनी खेरीज अन्य योनीतील अनुभव ग्राह्य धरला जाणार नाही). २. दीड योजन अंतरावरून अचूकपणे फास टाकून त्यात वस्तू धरता येण्याचे कौशल्य. ३. बारा महिने चोवीस ड्यूटी बजावण्याचा अनुभव (किमान पाच जन्मांचा) असणे आवश्यक. इच्छुक व्यक्तिंनी फोटो (स्वतःचे व ठारलेल्या लोकांचे) फास टाकण्याचे व्हिडो शूटिंग, तसेच पाच जन्मातील अनुभवाचे प्रमाणपत्र तयार ठेवावे. आमचे दूत स्वतः येऊन घेऊन जातील. याखेरीज आपापली नाडी काढवून घेणे आवश्यक. नाडीसाठी बिंग कमादर ठोक यांचेशी संपर्क करावा.

In reply to by चित्रगुप्त

:bigsmile: यम दूताच्या नोकरीसाठी पात्र आवश्यकता--- शिक्षणः @-मार्तिक पास :-D हा परीक्षा निकाल समजावा काय? ;-) आमचा निकाल 'जगणे फेल' असा लागलाय,चालेल का? अनुभवः १. कमित कमी शंभर मनुष्यांना यमसदनी पाठवण्याचा अनुभव. (हा एकाच जन्मातील असणे आवश्यक नाही, मात्र मनुष्ययोनी खेरीज अन्य योनीतील अनुभव ग्राह्य धरला जाणार नाही). @-अन्य योनीत माणुस मारल्याचा अनुभव कसा येणार ? :puzzled: २. दीड योजन अंतरावरून अचूकपणे फास टाकून त्यात वस्तू धरता येण्याचे कौशल्य...ह्ही ह्ही ह्हा ह्हा @-नक्की कोणाची व कोणती वस्तू धरावी ;-) ,याचा उलगडा होइल काय? ३. बारा महिने चोवीस ड्यूटी बजावण्याचा अनुभव (किमान पाच जन्मांचा) असणे आवश्यक. @-कुणाच्या? मरणाय्रांच्या की आमच्या? :-D आणी चोवीस ड्यूटी हे काय प्रकरण आहे,ते ही विस्तारून सांगावे... :-) इच्छुक व्यक्तिंनी फोटो (स्वतःचे व ठारलेल्या लोकांचे) फास टाकण्याचे व्हिडो शूटिंग, तसेच पाच जन्मातील अनुभवाचे प्रमाणपत्र तयार ठेवावे. आमचे दूत स्वतः येऊन घेऊन जातील.@-नुसताच डेटा नेणार की आंम्हालाही? ..नेणार? ;-) याखेरीज आपापली नाडी काढवून घेणे आवश्यक. नाडीसाठी बिंग कमादर ठोक यांचेशी संपर्क करावा.@- यांच बींग आमी कवाच ठोकून फोडलय...आनी तशी बी आपल्याला नाड्या सोडायची हौस नाय... :bigsmile:

In reply to by अत्रुप्त आत्मा

Nile 12/09/2011 - 11:39
तुम्हाला यमदुताची नोकरी मिळावी अशा शुभेच्छा व्यक्त करतो. एवीतेवी तुम्ही मरणार्‍याच्या जवळपास त्याच्या मृत्युसमयी असालच तेव्हा कॅमेरामचा जॉबही यमदुतांनाच द्यावा अशी डील आम्ही चित्रगुप्तांना दिली आहे. यमदुत झाल्यानंतर मुंबईच्या मसणात कॅमेराचे ट्रेनिंग देण्यात येईल. हँडसम सॅलरी आणि महिन्याला एक नटी असा छानसा मोबदला मिळेल. ;-)

In reply to by Nile

@- एवीतेवी तुम्ही मरणार्‍याच्या जवळपास त्याच्या मृत्युसमयी असालच तेव्हा कॅमेरामनचा जॉबही यमदुतांनाच द्यावा अशी डील आम्ही चित्रगुप्तांना दिली आहे--- ''हमकू फसाता है क्या?'' ;-) निळूभाऊ करती डाकु-डाव...डाकुडाव । २/२ सुपाय्रांना एकच-भाव एकच भाव ॥...आमाले न इचारता...डिल ठरवलं बी... ऊं ऊं ऊं...आमी नाइ ज्जा....हा काम-गारांवरचा अन्याय आहे...माझ्या सर्व काम-गार यमदूत बंधूंन्नो व --- त्यांच्या भगिनींन्नो :-D ...आज रात्री ठीक १२च्या पुढे कधीही- वैकुंठ-दहनखड्डा क्रमांक-३ ''मधेच'' आपल्यावर अन्याय करणाय्रा या भांडवलशाहांचा 'मडकी' फोडून निषेध करायचा आहे ...तेंव्हा सर्वांन्नी जमून यमदूत ऐक्य दाखवून देऊ.... काम-गारे-ग्गार चळवळीचा विजय असो :angry: @!- हँडसम सॅलरी आणि महिन्याला एक नटी असा छानसा मोबदला मिळेल. -- या ऐवजी आपण आंम्हास उभय पक्षी ;-) मान्य केलेला एक पगार मंजेच ''एक सेलरी व हेंडसम नटी :-p इतके दिलेत तरी आंम्ही मिसळला तर्री फुकट मिळाल्यासारखे आनंदाने कब्बड्डी खेळू... हीह्ह्ह्ह्हा हा हा ;-)

In reply to by नितिन थत्ते

रमताराम 12/09/2011 - 14:30
फक्त 'हँड'सम (मुठीत मावणारी असा अर्थ निघू नये म्हणून) 'अट्रॅक्टिव सॅलरी' अशी दुरुस्ती सुचवतो. तसेही हँडसम नटी वाचून ह. ह. पु. वा. जोरदार 'फोरहँड' असणारी मार्टिना नवरातिलोवाच एकदम डोळ्यासमोर आली... मेलो. सामान्यपणे बाईला ब्यूटीफुल म्हणतात हो, बाप्या हँडसम असतो.

In reply to by नितिन थत्ते

@---"हॅण्डसम" नटीपेक्षा 'एक हॅण्डसम सॅलरी आणि नटी' हेच ठीक आहे.---आइच्या गावात....! खरच की राव.... आमचा अनुभव कमी पडला म्हणायचा ;-) ,,,तुम्हाराच बाराब्बर हाय.''श्यालरी हेंडसम---तो नटी पचास'' :-p

In reply to by अत्रुप्त आत्मा

चित्रगुप्त 11/09/2011 - 19:04
यमदूताच्या नोकरीसाठी आवश्यक पात्रता: शिक्षणः मार्तिक पास अनुभवः १. कमित कमी शंभर मनुष्यांना यमसदनी पाठवण्याचा अनुभव. (हा एकाच जन्मातील असणे आवश्यक नाही, मात्र मनुष्ययोनी खेरीज अन्य योनीतील अनुभव ग्राह्य धरला जाणार नाही). २. दीड योजन अंतरावरून अचूकपणे फास टाकून त्यात वस्तू धरता येण्याचे कौशल्य. ३. बारा महिने चोवीस ड्यूटी बजावण्याचा अनुभव (किमान पाच जन्मांचा) असणे आवश्यक. इच्छुक व्यक्तिंनी फोटो (स्वतःचे व ठारलेल्या लोकांचे) फास टाकण्याचे व्हिडो शूटिंग, तसेच पाच जन्मातील अनुभवाचे प्रमाणपत्र तयार ठेवावे. आमचे दूत स्वतः येऊन घेऊन जातील. याखेरीज आपापली नाडी काढवून घेणे आवश्यक. नाडीसाठी बिंग कमादर ठोक यांचेशी संपर्क करावा.

मी धाग्याचं शीर्षक वाचलं आणि उडालोच. मला वाटलं मरण्याच्या वेळी गोळ्या घालण्याची सुविधा पुरवताय की काय! व्हिडिओ शूटिंग म्हटल्यावर जरा हायसं वाटलं. बाकी धागा वाचून 'ही गोळी डोकेदुखीच्या बरोब्बर पंधरा मिनिटं आधी घेतली तर डोकं दुखत नाही' ही जाहिरात आठवली.
इतर उपयुक्त मार्केटिंग टिप्स देणार्‍यास कंपनी नफ्यात हिस्सा देण्यास तयार आहे,
मी काय म्हणतो, तुम्ही तुमचं प्याकेज वाढवलं पाहिजे. शिवाय चुकीचं डेमोग्राफिक टारगेट करताय असंही वाटतं. आता आपण अमुक दिवशी मरावं आणि त्याचं व्हिडिओ शूटिंग करून घ्यावं असं वाटणारे लोक किती? आणि त्यांच्याकडे तुम्हाला देण्यासाठी पैसे असतीलच याची खात्री काय? त्यापेक्षा नातेवाईकांकडे मार्केट करा ना. आपल्या नात्यातलं अमुकतमुक मरावं असं वाटणारे खूप असतील. बरं, त्यांच्याकडे पैसे असण्याची पण गरज नाही. विमा उतरवण्यासाठी तुम्ही त्यांना मार्गदर्शन केलं की झालं. मग बघा तुमच्याकडे क्लायंट्सचा कसा ओघ येईल ते. आणि लोकं बरोब्बर त्या दिवशी मरतील. सुपाऱ्या घेण्याचं कॉंट्रॅक्ट घ्यायला सुरूवात केलीत की तुमचं पॅकेज परिपूर्ण होईल. मरणात खरोखर जग जगते... हे वाक्य जगापुरतं लागू झालं नाही तर तुमच्यापुरतं तरी निश्चितच लागू होईल. (हा प्रतिसाद केवळ गमतीदार असून कोणी कोणाचे खून करावे अशा मताचा मी नाही. मिसळपाव व्यवस्थापन गोत्यात येऊ नये यासाठी हा खुलासा)

In reply to by राजेश घासकडवी

Nile 12/09/2011 - 11:33
मनुष्य बळाच्या कमतरतेमुळे हे पॅकेज देता येणार नाही. मात्र तुमची लोकांना मारायची एजन्सी असेल तर तुमच्याशी कोलॅबरेशन करण्यासंबंधी विचार करू.

In reply to by राजेश घासकडवी

साती 12/09/2011 - 12:57
गुर्जी मी पण बी "मरणवेळी शुटींगची वेळ " मजी शुटींग करून मरणवेळची सोय करतात की काय असं समजले. उगाच आम्हा डॉक्टरांच्या पोटावर पाय देतात की काय निळेभाऊ असं वाटलं. :)

In reply to by साती

गोळ्या घालून मारणे याबाबतीत डॉक्टरांचा हात कोण धरणार? :) निळेभाऊ, तुमच्या प्याकेजमध्ये डॉक्टरांनासुद्धा समाविष्ट करून घ्या. रोग्याला (किंवा निरोग्यालाही खरं तर) योग्य वेळी मरण येणं, आणि त्याआधी हॅलुसिनोजेन देऊन तोंडून चित्रविचित्र कहाण्या वदवणं, यासाठी डॉक्टर हवेच तुमच्या टीममध्ये. (समस्त डॉक्टरांनी ह. घ्या.) डॉ. राजेश घासकडवी.

In reply to by राजेश घासकडवी

धनंजय 12/09/2011 - 23:30
"गोळ्यांनी मारले" असे वाचून मला सन्माननीय सदस्य श्री. गोळे यांनी घेतलेले बळी (उदहरणार्थ १, आणि २) क्षणभर आठवले.

In reply to by राजेश घासकडवी

Nile 13/09/2011 - 02:47
डाक्टरच्या पोटावर पाय देऊच कसे! एकाच धंद्यात असलेल्या लोकांबरोबर वैर ठेवू नये म्हणतात! ;-) बाकी गुर्जींशी सहमत आहे. योग्य डॉं भेटले तर मरणार्‍यावर अभिनयासाठी विसंबून रहावे लागणार नाही, डॉ. लोक गोळ्यावगैरे देऊन हवं तसं घडवून आणतील याची खात्रीच आहे. ट्यार्पी वाढेलच आणि कंपनीचे पैसेही वाचतील. बाकी यावरून आमच्या ग्रेगरी हाऊसचा 'केन अँड एबल' हा एपिसोड आठवला. रसिकांनी जरूर पहावा. http://www.usanetwork.com/series/house/theshow/episodeguide/episodes/s3_caneandable/index.html

In reply to by साती

Nile 13/09/2011 - 21:44
(आमाना जल्ला कटशिवाय दुसरा सुचना नाय! Smile ) साते, भागिदारीत परशेंटेज मागतत कट नाय.
पेशंट्सचे गळे* कापायची सवय असल्यामुळे असेल. ;-) *हळव्या हृदयाच्या लोकांनी हा शब्द 'खिसे' असा वाचावा. धन्यवाद.

इतर उपयुक्त मार्केटिंग टिप्स देणार्‍यास कंपनी नफ्यात हिस्सा देण्यास तयार आहे, तेव्हा लागा कामाला आणि खाली प्रतिसादात टिपा लिहा.-----अता लीहिलेले टीपा--- ;-) मरण मार्केटींग अ‍ॅड कंपनी प्रा.लिमिटेड... आमचे येथे घाऊक दरात मरणाचं मार्केटींग करणाय्रांच्या जाहिराती स्विकारल्या जातील...याच धाग्यावर भेटा अथवा लिहा- ''यमदूत'' अपार्मेंटस,प्रेतयात्रा लेन, जुन्या स्मशाना जवळ मु.पो.- वेताळवाडी,तिरडीखाना,वैकुंठ-दक्षिण.... ;-)

नितिन थत्ते 11/09/2011 - 18:27
आपण कॉण्ट्रॅक्ट साईन करायला तयार आहोत. परंतु निळे आणि कं यांच्याशी केलेले कॉण्ट्रॅक्ट निळे आणि कं च्या वारसदारांस बंधनकारक असणार का? नाही, आमच्या आधीच निळे (किंवा 'आणि कं') खपले तर काय?

नंदन 12/09/2011 - 12:16
चांगली स्कीम आहे. बादवे, अशीच योजना जालीय आयडींबद्दलही आहे का? काही आयडी अलीकडेच धारातीर्थी पडल्याचे समजते. (सुनीलकाका शेट्टी म्हणतात तसे पंगा ना ले)

In reply to by नंदन

सहज 13/09/2011 - 06:57
पण मसंवर 'जालकंटक' आयडींना भूत म्हणून सुखाने नांदायचा अधीकार आहे पण कडक शब्दात निषेध / वेगळे मत नोंदवणार्‍या व कंपूत नसलेल्या आयडींना पुनर्जन्म नाही.

एक सुशिक्षित एरोनॉटिक्स इंजिनीयर मुडदेफरास झाल्याचे बघून ड्वाळे पानावले!!!!! रिसेशन रिसेशन म्हणतात ते हेच का? :)

In reply to by पिवळा डांबिस

नंदन 12/09/2011 - 12:21
तसेही निळोबा taking a dig at someone च्या कलेत प्रवीण असल्याने, त्यांनी मुडदे-फरासीकडे वळणं तसं नैसर्गिकच ;)

In reply to by पिवळा डांबिस

Nile 13/09/2011 - 02:09
एस डब्बल ओ आर आय! आमच्या क्लायंटने डोळे मिटले की आमचा कॅमेरापण बुब्बुळ मिटणार. आमचा करार तिथेच संपला. मुडद्याची जबाबदारी कंपनीची नाही!! पुढे मागे इन्शूरंस कंपनीचा कोणी क्लायंट भेटल्यास मूडद्याला काही सवलती मिळणार असतील तर चौकशी करू. ;-)

In reply to by पाषाणभेद

Nile 13/09/2011 - 02:51
धंदा बहरला तर थोडा मेलोड्रामा अ‍ॅड करता येईल. पाभेंना लिरीक्स डिपार्टमेंट अन ऋला परलौकिक अनुभवाचे स्क्रिप्ट ल्हायला घेऊ! ;-)

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

पाषाणभेद 13/09/2011 - 05:40
"प. वि. वर्तक" म्हणजे जसे शेअर मार्केट मध्ये एखादा नवीन इश्यू आला तर प्रवर्तक असतात तसली काही पोष्ट आहे काय? तसे असल्यास "प. वि. वर्तक" म्हणजे मोठा माणूस (जाड या अर्थाने नव्हे तर पद या अर्थाने) आहे. काही सेटींग असेल तर मुलाखतीविना त्या कंपनीत वर्णी लागेल काय? काये की रेसेशन सुरू झाली तर पंचाईत नको. आलेला माणूस कधीतरी जाणारच. त्याला मरण नाही. (म्हणजे माणसाच्या येण्याजाण्याला हो.) हा धंद म्हणजे केसकटिंग च्या धंद्यासारखा आहे. कापलेले केस उगवतीलच. नको ते बेभरवशाचे आयटी फियटी.

In reply to by पाषाणभेद

पा.भे...हा प. वि. वर्तक, म्हणजे आजच्या काळातला स्मूक्ष्म देहाचा आद्य प्रवर्तक-तो म्हणे सूक्ष्म देहानी चंद्रावर/मंगळावर वगैरे जातो,,,तसेच भूतकाळात जाऊन आपले आधीचे जन्म वगैरे पाहुन येतो...असा म्हणे त्याच्या नावाचा दबदबा आहे,पण हाच मानव,शाम मानवांनी दिलेले -''सुक्ष्मदेहानी शेजारच्या खोलीत जा,व तिथे आंम्ही ठेवलेल्या वस्तू पाहुन या,व सांगा '' हे दिलेले साधे आव्हान नाकारतो...असला यांचा दबदबा---बदाबदा खाली पडणारा...

In reply to by Nile

ऋषिकेश 13/09/2011 - 11:17
आरे वा! लवकर धंदा तेजीत येवो म्हंजे सध्याच्या नोकरीच्या योग्य भागावर योग्य त्या पद्धतीने आघात करून आपण मढ्याच्या शुटींगसोबत त्याचे पारलौकीक अनुभव (चवीचवीने!) सांगून वर पैसे कमवायला मोकळे!

मला विसरलास काय? माझे लिखाण वाचुन कित्येक जण धारातिर्थी पडतात.(विच्चार करुन करुन) बोल पार्टनर शिप देतोस काय?

In reply to by विनायक प्रभू

Nile 13/09/2011 - 02:11
मरणाची दिलेली डेट जवळ आली तरी क्लायंट काय हवी ती चिन्हं दाखवत नसेल तर तुमच्या समुपदेशनाचे सेशन्स ठेवायचे आमच्या प्लानात आहेच!! ;-)

एक 13/09/2011 - 22:48
ते मेट्रीक्स-२ मधे कसं transparent ghost लोकांच्या अंगावर जातं तसं काहीतरी करायचा विचार आहे. ३डी असेल तर लोकांची जास्त टरकावता येईल. ती सोय असेल तर आम्ही विचार करू. -एक इच्छूक.

चित्रगुप्त 11/09/2011 - 15:02
सदर शूटिंग चे वेळी ड्यूटीवर असणार्‍या आमच्या हापिसातील यमदूतांना त्यांचे कमिशन आगाऊ दिल्याशिवाय ते त्यांचे काम पूर्ण करणार नाहीत. तसेच कॉन्ट्र्याक्ट साईन करण्यापूर्वी आमच्या हापिसाकडून त्यादिवशी पुरेसे यमदूत उपलब्ध होतील की नाही, याची आगाऊ खात्री करून घेणे. यासाठी www.yamaraaj.com इथे चवकशी करावी. हॉलिवूड मधून नट्या आणल्यास, आमच्या दूतांना त्या आवडल्यास त्यांनाही उचलून आणले जाऊ शकते, याची नोंद घ्यावी.

In reply to by चित्रगुप्त

Nile 12/09/2011 - 11:35
तुमचं आमचं 'गुप्त' डील असताना ते 'चित्र' असं पब्लिकसमोर कशाला मांडांयचं? काही कमी जास्त झालं असेल तर आपण करु की नीट. कधी बसायचं? ;-)

@- हॉलिवूड मधून नट्या आणल्यास, आमच्या दूतांना त्या आवडल्यास त्यांनाही उचलून आणले जाऊ शकते, याची नोंद घ्यावी. .खिक्क...ह्ही ह्ही ह्हा ह्हा ह्हा :bigsmile: मला यमदूताची नोकरी हवी आहे ;-) आणी तसेही आंम्ही हॉलीवूड मध्ल्या अनेक नट्यांवर मरतोच :-p ,त्यामुळे नोकरी पूर्व म्रुत्यू ची अट घालू नये :-)

In reply to by अत्रुप्त आत्मा

चित्रगुप्त 11/09/2011 - 19:04
यमदूताच्या नोकरीसाठी आवश्यक पात्रता: शिक्षणः मार्तिक पास अनुभवः १. कमित कमी शंभर मनुष्यांना यमसदनी पाठवण्याचा अनुभव. (हा एकाच जन्मातील असणे आवश्यक नाही, मात्र मनुष्ययोनी खेरीज अन्य योनीतील अनुभव ग्राह्य धरला जाणार नाही). २. दीड योजन अंतरावरून अचूकपणे फास टाकून त्यात वस्तू धरता येण्याचे कौशल्य. ३. बारा महिने चोवीस ड्यूटी बजावण्याचा अनुभव (किमान पाच जन्मांचा) असणे आवश्यक. इच्छुक व्यक्तिंनी फोटो (स्वतःचे व ठारलेल्या लोकांचे) फास टाकण्याचे व्हिडो शूटिंग, तसेच पाच जन्मातील अनुभवाचे प्रमाणपत्र तयार ठेवावे. आमचे दूत स्वतः येऊन घेऊन जातील. याखेरीज आपापली नाडी काढवून घेणे आवश्यक. नाडीसाठी बिंग कमादर ठोक यांचेशी संपर्क करावा.

In reply to by चित्रगुप्त

:bigsmile: यम दूताच्या नोकरीसाठी पात्र आवश्यकता--- शिक्षणः @-मार्तिक पास :-D हा परीक्षा निकाल समजावा काय? ;-) आमचा निकाल 'जगणे फेल' असा लागलाय,चालेल का? अनुभवः १. कमित कमी शंभर मनुष्यांना यमसदनी पाठवण्याचा अनुभव. (हा एकाच जन्मातील असणे आवश्यक नाही, मात्र मनुष्ययोनी खेरीज अन्य योनीतील अनुभव ग्राह्य धरला जाणार नाही). @-अन्य योनीत माणुस मारल्याचा अनुभव कसा येणार ? :puzzled: २. दीड योजन अंतरावरून अचूकपणे फास टाकून त्यात वस्तू धरता येण्याचे कौशल्य...ह्ही ह्ही ह्हा ह्हा @-नक्की कोणाची व कोणती वस्तू धरावी ;-) ,याचा उलगडा होइल काय? ३. बारा महिने चोवीस ड्यूटी बजावण्याचा अनुभव (किमान पाच जन्मांचा) असणे आवश्यक. @-कुणाच्या? मरणाय्रांच्या की आमच्या? :-D आणी चोवीस ड्यूटी हे काय प्रकरण आहे,ते ही विस्तारून सांगावे... :-) इच्छुक व्यक्तिंनी फोटो (स्वतःचे व ठारलेल्या लोकांचे) फास टाकण्याचे व्हिडो शूटिंग, तसेच पाच जन्मातील अनुभवाचे प्रमाणपत्र तयार ठेवावे. आमचे दूत स्वतः येऊन घेऊन जातील.@-नुसताच डेटा नेणार की आंम्हालाही? ..नेणार? ;-) याखेरीज आपापली नाडी काढवून घेणे आवश्यक. नाडीसाठी बिंग कमादर ठोक यांचेशी संपर्क करावा.@- यांच बींग आमी कवाच ठोकून फोडलय...आनी तशी बी आपल्याला नाड्या सोडायची हौस नाय... :bigsmile:

In reply to by अत्रुप्त आत्मा

Nile 12/09/2011 - 11:39
तुम्हाला यमदुताची नोकरी मिळावी अशा शुभेच्छा व्यक्त करतो. एवीतेवी तुम्ही मरणार्‍याच्या जवळपास त्याच्या मृत्युसमयी असालच तेव्हा कॅमेरामचा जॉबही यमदुतांनाच द्यावा अशी डील आम्ही चित्रगुप्तांना दिली आहे. यमदुत झाल्यानंतर मुंबईच्या मसणात कॅमेराचे ट्रेनिंग देण्यात येईल. हँडसम सॅलरी आणि महिन्याला एक नटी असा छानसा मोबदला मिळेल. ;-)

In reply to by Nile

@- एवीतेवी तुम्ही मरणार्‍याच्या जवळपास त्याच्या मृत्युसमयी असालच तेव्हा कॅमेरामनचा जॉबही यमदुतांनाच द्यावा अशी डील आम्ही चित्रगुप्तांना दिली आहे--- ''हमकू फसाता है क्या?'' ;-) निळूभाऊ करती डाकु-डाव...डाकुडाव । २/२ सुपाय्रांना एकच-भाव एकच भाव ॥...आमाले न इचारता...डिल ठरवलं बी... ऊं ऊं ऊं...आमी नाइ ज्जा....हा काम-गारांवरचा अन्याय आहे...माझ्या सर्व काम-गार यमदूत बंधूंन्नो व --- त्यांच्या भगिनींन्नो :-D ...आज रात्री ठीक १२च्या पुढे कधीही- वैकुंठ-दहनखड्डा क्रमांक-३ ''मधेच'' आपल्यावर अन्याय करणाय्रा या भांडवलशाहांचा 'मडकी' फोडून निषेध करायचा आहे ...तेंव्हा सर्वांन्नी जमून यमदूत ऐक्य दाखवून देऊ.... काम-गारे-ग्गार चळवळीचा विजय असो :angry: @!- हँडसम सॅलरी आणि महिन्याला एक नटी असा छानसा मोबदला मिळेल. -- या ऐवजी आपण आंम्हास उभय पक्षी ;-) मान्य केलेला एक पगार मंजेच ''एक सेलरी व हेंडसम नटी :-p इतके दिलेत तरी आंम्ही मिसळला तर्री फुकट मिळाल्यासारखे आनंदाने कब्बड्डी खेळू... हीह्ह्ह्ह्हा हा हा ;-)

In reply to by नितिन थत्ते

रमताराम 12/09/2011 - 14:30
फक्त 'हँड'सम (मुठीत मावणारी असा अर्थ निघू नये म्हणून) 'अट्रॅक्टिव सॅलरी' अशी दुरुस्ती सुचवतो. तसेही हँडसम नटी वाचून ह. ह. पु. वा. जोरदार 'फोरहँड' असणारी मार्टिना नवरातिलोवाच एकदम डोळ्यासमोर आली... मेलो. सामान्यपणे बाईला ब्यूटीफुल म्हणतात हो, बाप्या हँडसम असतो.

In reply to by नितिन थत्ते

@---"हॅण्डसम" नटीपेक्षा 'एक हॅण्डसम सॅलरी आणि नटी' हेच ठीक आहे.---आइच्या गावात....! खरच की राव.... आमचा अनुभव कमी पडला म्हणायचा ;-) ,,,तुम्हाराच बाराब्बर हाय.''श्यालरी हेंडसम---तो नटी पचास'' :-p

In reply to by अत्रुप्त आत्मा

चित्रगुप्त 11/09/2011 - 19:04
यमदूताच्या नोकरीसाठी आवश्यक पात्रता: शिक्षणः मार्तिक पास अनुभवः १. कमित कमी शंभर मनुष्यांना यमसदनी पाठवण्याचा अनुभव. (हा एकाच जन्मातील असणे आवश्यक नाही, मात्र मनुष्ययोनी खेरीज अन्य योनीतील अनुभव ग्राह्य धरला जाणार नाही). २. दीड योजन अंतरावरून अचूकपणे फास टाकून त्यात वस्तू धरता येण्याचे कौशल्य. ३. बारा महिने चोवीस ड्यूटी बजावण्याचा अनुभव (किमान पाच जन्मांचा) असणे आवश्यक. इच्छुक व्यक्तिंनी फोटो (स्वतःचे व ठारलेल्या लोकांचे) फास टाकण्याचे व्हिडो शूटिंग, तसेच पाच जन्मातील अनुभवाचे प्रमाणपत्र तयार ठेवावे. आमचे दूत स्वतः येऊन घेऊन जातील. याखेरीज आपापली नाडी काढवून घेणे आवश्यक. नाडीसाठी बिंग कमादर ठोक यांचेशी संपर्क करावा.

मी धाग्याचं शीर्षक वाचलं आणि उडालोच. मला वाटलं मरण्याच्या वेळी गोळ्या घालण्याची सुविधा पुरवताय की काय! व्हिडिओ शूटिंग म्हटल्यावर जरा हायसं वाटलं. बाकी धागा वाचून 'ही गोळी डोकेदुखीच्या बरोब्बर पंधरा मिनिटं आधी घेतली तर डोकं दुखत नाही' ही जाहिरात आठवली.
इतर उपयुक्त मार्केटिंग टिप्स देणार्‍यास कंपनी नफ्यात हिस्सा देण्यास तयार आहे,
मी काय म्हणतो, तुम्ही तुमचं प्याकेज वाढवलं पाहिजे. शिवाय चुकीचं डेमोग्राफिक टारगेट करताय असंही वाटतं. आता आपण अमुक दिवशी मरावं आणि त्याचं व्हिडिओ शूटिंग करून घ्यावं असं वाटणारे लोक किती? आणि त्यांच्याकडे तुम्हाला देण्यासाठी पैसे असतीलच याची खात्री काय? त्यापेक्षा नातेवाईकांकडे मार्केट करा ना. आपल्या नात्यातलं अमुकतमुक मरावं असं वाटणारे खूप असतील. बरं, त्यांच्याकडे पैसे असण्याची पण गरज नाही. विमा उतरवण्यासाठी तुम्ही त्यांना मार्गदर्शन केलं की झालं. मग बघा तुमच्याकडे क्लायंट्सचा कसा ओघ येईल ते. आणि लोकं बरोब्बर त्या दिवशी मरतील. सुपाऱ्या घेण्याचं कॉंट्रॅक्ट घ्यायला सुरूवात केलीत की तुमचं पॅकेज परिपूर्ण होईल. मरणात खरोखर जग जगते... हे वाक्य जगापुरतं लागू झालं नाही तर तुमच्यापुरतं तरी निश्चितच लागू होईल. (हा प्रतिसाद केवळ गमतीदार असून कोणी कोणाचे खून करावे अशा मताचा मी नाही. मिसळपाव व्यवस्थापन गोत्यात येऊ नये यासाठी हा खुलासा)

In reply to by राजेश घासकडवी

Nile 12/09/2011 - 11:33
मनुष्य बळाच्या कमतरतेमुळे हे पॅकेज देता येणार नाही. मात्र तुमची लोकांना मारायची एजन्सी असेल तर तुमच्याशी कोलॅबरेशन करण्यासंबंधी विचार करू.

In reply to by राजेश घासकडवी

साती 12/09/2011 - 12:57
गुर्जी मी पण बी "मरणवेळी शुटींगची वेळ " मजी शुटींग करून मरणवेळची सोय करतात की काय असं समजले. उगाच आम्हा डॉक्टरांच्या पोटावर पाय देतात की काय निळेभाऊ असं वाटलं. :)

In reply to by साती

गोळ्या घालून मारणे याबाबतीत डॉक्टरांचा हात कोण धरणार? :) निळेभाऊ, तुमच्या प्याकेजमध्ये डॉक्टरांनासुद्धा समाविष्ट करून घ्या. रोग्याला (किंवा निरोग्यालाही खरं तर) योग्य वेळी मरण येणं, आणि त्याआधी हॅलुसिनोजेन देऊन तोंडून चित्रविचित्र कहाण्या वदवणं, यासाठी डॉक्टर हवेच तुमच्या टीममध्ये. (समस्त डॉक्टरांनी ह. घ्या.) डॉ. राजेश घासकडवी.

In reply to by राजेश घासकडवी

धनंजय 12/09/2011 - 23:30
"गोळ्यांनी मारले" असे वाचून मला सन्माननीय सदस्य श्री. गोळे यांनी घेतलेले बळी (उदहरणार्थ १, आणि २) क्षणभर आठवले.

In reply to by राजेश घासकडवी

Nile 13/09/2011 - 02:47
डाक्टरच्या पोटावर पाय देऊच कसे! एकाच धंद्यात असलेल्या लोकांबरोबर वैर ठेवू नये म्हणतात! ;-) बाकी गुर्जींशी सहमत आहे. योग्य डॉं भेटले तर मरणार्‍यावर अभिनयासाठी विसंबून रहावे लागणार नाही, डॉ. लोक गोळ्यावगैरे देऊन हवं तसं घडवून आणतील याची खात्रीच आहे. ट्यार्पी वाढेलच आणि कंपनीचे पैसेही वाचतील. बाकी यावरून आमच्या ग्रेगरी हाऊसचा 'केन अँड एबल' हा एपिसोड आठवला. रसिकांनी जरूर पहावा. http://www.usanetwork.com/series/house/theshow/episodeguide/episodes/s3_caneandable/index.html

In reply to by साती

Nile 13/09/2011 - 21:44
(आमाना जल्ला कटशिवाय दुसरा सुचना नाय! Smile ) साते, भागिदारीत परशेंटेज मागतत कट नाय.
पेशंट्सचे गळे* कापायची सवय असल्यामुळे असेल. ;-) *हळव्या हृदयाच्या लोकांनी हा शब्द 'खिसे' असा वाचावा. धन्यवाद.

इतर उपयुक्त मार्केटिंग टिप्स देणार्‍यास कंपनी नफ्यात हिस्सा देण्यास तयार आहे, तेव्हा लागा कामाला आणि खाली प्रतिसादात टिपा लिहा.-----अता लीहिलेले टीपा--- ;-) मरण मार्केटींग अ‍ॅड कंपनी प्रा.लिमिटेड... आमचे येथे घाऊक दरात मरणाचं मार्केटींग करणाय्रांच्या जाहिराती स्विकारल्या जातील...याच धाग्यावर भेटा अथवा लिहा- ''यमदूत'' अपार्मेंटस,प्रेतयात्रा लेन, जुन्या स्मशाना जवळ मु.पो.- वेताळवाडी,तिरडीखाना,वैकुंठ-दक्षिण.... ;-)

नितिन थत्ते 11/09/2011 - 18:27
आपण कॉण्ट्रॅक्ट साईन करायला तयार आहोत. परंतु निळे आणि कं यांच्याशी केलेले कॉण्ट्रॅक्ट निळे आणि कं च्या वारसदारांस बंधनकारक असणार का? नाही, आमच्या आधीच निळे (किंवा 'आणि कं') खपले तर काय?

नंदन 12/09/2011 - 12:16
चांगली स्कीम आहे. बादवे, अशीच योजना जालीय आयडींबद्दलही आहे का? काही आयडी अलीकडेच धारातीर्थी पडल्याचे समजते. (सुनीलकाका शेट्टी म्हणतात तसे पंगा ना ले)

In reply to by नंदन

सहज 13/09/2011 - 06:57
पण मसंवर 'जालकंटक' आयडींना भूत म्हणून सुखाने नांदायचा अधीकार आहे पण कडक शब्दात निषेध / वेगळे मत नोंदवणार्‍या व कंपूत नसलेल्या आयडींना पुनर्जन्म नाही.

एक सुशिक्षित एरोनॉटिक्स इंजिनीयर मुडदेफरास झाल्याचे बघून ड्वाळे पानावले!!!!! रिसेशन रिसेशन म्हणतात ते हेच का? :)

In reply to by पिवळा डांबिस

नंदन 12/09/2011 - 12:21
तसेही निळोबा taking a dig at someone च्या कलेत प्रवीण असल्याने, त्यांनी मुडदे-फरासीकडे वळणं तसं नैसर्गिकच ;)

In reply to by पिवळा डांबिस

Nile 13/09/2011 - 02:09
एस डब्बल ओ आर आय! आमच्या क्लायंटने डोळे मिटले की आमचा कॅमेरापण बुब्बुळ मिटणार. आमचा करार तिथेच संपला. मुडद्याची जबाबदारी कंपनीची नाही!! पुढे मागे इन्शूरंस कंपनीचा कोणी क्लायंट भेटल्यास मूडद्याला काही सवलती मिळणार असतील तर चौकशी करू. ;-)

In reply to by पाषाणभेद

Nile 13/09/2011 - 02:51
धंदा बहरला तर थोडा मेलोड्रामा अ‍ॅड करता येईल. पाभेंना लिरीक्स डिपार्टमेंट अन ऋला परलौकिक अनुभवाचे स्क्रिप्ट ल्हायला घेऊ! ;-)

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

पाषाणभेद 13/09/2011 - 05:40
"प. वि. वर्तक" म्हणजे जसे शेअर मार्केट मध्ये एखादा नवीन इश्यू आला तर प्रवर्तक असतात तसली काही पोष्ट आहे काय? तसे असल्यास "प. वि. वर्तक" म्हणजे मोठा माणूस (जाड या अर्थाने नव्हे तर पद या अर्थाने) आहे. काही सेटींग असेल तर मुलाखतीविना त्या कंपनीत वर्णी लागेल काय? काये की रेसेशन सुरू झाली तर पंचाईत नको. आलेला माणूस कधीतरी जाणारच. त्याला मरण नाही. (म्हणजे माणसाच्या येण्याजाण्याला हो.) हा धंद म्हणजे केसकटिंग च्या धंद्यासारखा आहे. कापलेले केस उगवतीलच. नको ते बेभरवशाचे आयटी फियटी.

In reply to by पाषाणभेद

पा.भे...हा प. वि. वर्तक, म्हणजे आजच्या काळातला स्मूक्ष्म देहाचा आद्य प्रवर्तक-तो म्हणे सूक्ष्म देहानी चंद्रावर/मंगळावर वगैरे जातो,,,तसेच भूतकाळात जाऊन आपले आधीचे जन्म वगैरे पाहुन येतो...असा म्हणे त्याच्या नावाचा दबदबा आहे,पण हाच मानव,शाम मानवांनी दिलेले -''सुक्ष्मदेहानी शेजारच्या खोलीत जा,व तिथे आंम्ही ठेवलेल्या वस्तू पाहुन या,व सांगा '' हे दिलेले साधे आव्हान नाकारतो...असला यांचा दबदबा---बदाबदा खाली पडणारा...

In reply to by Nile

ऋषिकेश 13/09/2011 - 11:17
आरे वा! लवकर धंदा तेजीत येवो म्हंजे सध्याच्या नोकरीच्या योग्य भागावर योग्य त्या पद्धतीने आघात करून आपण मढ्याच्या शुटींगसोबत त्याचे पारलौकीक अनुभव (चवीचवीने!) सांगून वर पैसे कमवायला मोकळे!

मला विसरलास काय? माझे लिखाण वाचुन कित्येक जण धारातिर्थी पडतात.(विच्चार करुन करुन) बोल पार्टनर शिप देतोस काय?

In reply to by विनायक प्रभू

Nile 13/09/2011 - 02:11
मरणाची दिलेली डेट जवळ आली तरी क्लायंट काय हवी ती चिन्हं दाखवत नसेल तर तुमच्या समुपदेशनाचे सेशन्स ठेवायचे आमच्या प्लानात आहेच!! ;-)

एक 13/09/2011 - 22:48
ते मेट्रीक्स-२ मधे कसं transparent ghost लोकांच्या अंगावर जातं तसं काहीतरी करायचा विचार आहे. ३डी असेल तर लोकांची जास्त टरकावता येईल. ती सोय असेल तर आम्ही विचार करू. -एक इच्छूक.
काही लोकांनी मरणाचेवेळी त्यांचे व्हिडो शुटिंग केले जावे अशी अपेक्षा आम्हाजवळ व्यक्त केली. सदर इच्छेची दखल घेऊन आम्ही इनिशीएटीव्ह घेतलेला आहे. त्या धाग्यावर अवांतर होऊन इतर सदस्यांना भलते सलते अनुभव येऊ नयेत म्हणून आम्ही हा प्रतिसाद वेगळ्या धाग्यात हलवत आहोत. मूर्खांसाठी, गाढवांसाठी अन नीट न वाचता येणार्‍यांसाठी विशेष सूचना.( रडारडी करायच्या आधी धागा कोणत्या सदरांत आहे हे पहावे. ) वरील सर्व मरणेच्छुक लोकांना विडो शुटिंगचा लाभ देण्याची सोय आम्ही करू.

मिपाला चौथ्या वर्धापनदिनाच्या शुभेच्छा

क्लिंटन ·

सहज 01/09/2011 - 09:13
लेखातील शब्दान शब्दाशी व भावनेशी सहमत आहे! :-) हॅपी बर्थ डे टु मिपा!!

आता तर मिपाशिवाय पूर्वी कसे राहत होतो असाच प्रश्न पडू लागला आहे.
१०१% सहमत. मला मिपावर येऊन फक्त दीड वर्षच झालंय हे अजूनही खरं वाटत नाही. मिपाला, म्हणजे सर्व मिपाकरांना व व्यवस्थापनाला, वर्धापनदिनानिमित्त शुभेच्छा.

मदनबाण 01/09/2011 - 17:00
क्लिंटनरावांच्या शब्दा शब्दाशी सहमत... :) मलाही या संकेत स्थळावर राहुन 3 वर्षे 27 आठवडे पूर्ण झाले आहेत याचे नवल वाटायला लागले आहे,कारण हा सर्व काळ कसा गेला ते कळलेच नाही. :) हे संकेतस्थळ असेच अजुन बहारदार होवो... आणि नवनविन सदस्यांची त्यात भर पडो हीच इच्छा व्यक्त करतो. गणपती बाप्पा मोरया ! मंगलमूर्ती मोरया !

या नीमित्त आम्हाला आनंद घारे यांचा मिसळपाववरील पहिले वर्ष हा लेख आठवतो. तसेच राजेश घासकडवींचा वर्धापन दिना नीमित्त मिपाला शुभेच्छा हा ही लेख ही आठवतो.

गणपा 01/09/2011 - 13:08
मिपाला तिथीनुसारच्या चौथ्या वाढदिवसाच्या शुभेच्छा !!! तात्या निलकांत आणि संपादकां सोबतच मिपावर लिहिणार्‍या (मग ते प्रतिसाद का असेनात) समस्त लेखक /लेखिकांचे ही आभार. :) जुग जुग जियो मिपा. :)

In reply to by नावातकायआहे

ऋषिकेश 03/09/2011 - 10:57
मिपाला ह्याप्पी वाल्या बड्डेच्या बिलेटेड शुभेच्छा! :)

01/09/2011 - 11:47
चौथ्या वर्धापनदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!!!! "जियो" मिपा....

केशवसुमार 01/09/2011 - 12:49
क्लिंटनशेठशी १००१% सहमत... सर्व मिपाकरांना मिपा वर्धापनदिनाच्या हर्दिक शुभेच्छा!! केशवसुमार

सुहास झेले 01/09/2011 - 14:06
मिपाकरांना चौथ्या वर्धापनदिनाच्या हार्दिक शुभेच्छा .. मिपाला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा आणि माझ्यातर्फे जमेल तितके सहकार्य करण्याचे वचन :) :) ऑल द बेश्ट :)

मिपाच्या चौथ्या वर्धापनदिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. नीलकांत सोबत मिपाच्या तांत्रिक गोष्टी सांभाळणार्‍या टीमचेही अभिनंदन. -दिलीप बिरुटे

विकास 01/09/2011 - 15:59
क्लिंटन यांच्याशी सहमत! चार वर्षात अनेक मित्र-मैत्रिणी झाले, अनेक नवीन गोष्टी कळल्या-समजल्या ज्या मुद्दामून वाचायला गेलो नसतो. त्यामुळे या निमित्ताने अशा सर्वच लेखक-कवी-आणि खरडकांना देखील शुभेच्छा! आणि तुमच्या मुळे माझ्यासारख्याच्या माहितीत-ज्ञानात भर पडत राहोत ही विनंती!

चित्रा 01/09/2011 - 16:32
चौथ्या वर्धापनदिनानिमित्त सर्व मिपाकरांचे अभिनंदन आणि हार्दिक शुभेच्छा!

क्रान्ति 01/09/2011 - 16:43
मिपाच्या चौथ्या वर्धापनदिनानिमित्त मिपाला आणि समस्त मिपाकरांना हार्दिक शुभेच्छा आणि अभिनंदन! मिपाची उत्तरोत्तर अशीच प्रगती होत राहो, ही गणरायाच्या चरणी प्रार्थना. :)

मृत्युन्जय 01/09/2011 - 17:53
मिपाच्या चौथ्या वर्धापनदिनानिमित्त मिपाला आणि समस्त मिपाकरांना हार्दिक शुभेच्छा आणि अभिनंदन! मिपाची उत्तरोत्तर अशीच प्रगती होत राहो, ही गणरायाच्या चरणी प्रार्थना.

कलंत्री 01/09/2011 - 19:09
मिपाशी सलंग्न राहणे हा एक चांगला अनूभव होता आणि आहे. पूर्वी दिवस उजाडयाचा तो मिपावर येण्यासाठीच. सध्या पूर्वीसारखे जमत नाही याची खंत वाटते. तात्याचे मिपासाठी असलेले योगदान हे मराठीच्या मार्गातील एक महत्त्वाचे असे स्थान आहे आणि मला त्याचे ॠण मानण्यातच आनंद असेल. नीलकांत हे या टप्प्यावरचे मिळालेले एअक महत्त्वाचे मित्र म्हणून संचित आहे. त्याचबरोबर अनेक मित्र मिळाले, बरेच प्रेम मिळाले हे कसे विसरता येईल? अश्या काळाच्या टप्प्यावर हे सर्व आठवता येते याच साठी ही वर्धापनदिने असतात हेच खरे!!!

In reply to by कलंत्री

विकास 01/09/2011 - 19:19
मिपाशी सलंग्न राहणे हा एक चांगला अनूभव होता यातील "होता" हा शब्द खटकला. :( सध्या पूर्वीसारखे जमत नाही याची खंत वाटते. आशा करतो, सर्व व्यवस्थित चालू आहे. आपण सारखे नाही पण मधून मधून येऊन का होईना पण लेखन चालू ठेवावेत ही विनंती. अश्या काळाच्या टप्प्यावर हे सर्व आठवता येते याच साठी ही वर्धापनदिने असतात हेच खरे!!! सहमत! सिंहावलोकनासाठीच वर्धापनदिन साजरे करण्याची प्रथा पडली असावी.

चतुरंग 01/09/2011 - 19:17
क्लिंटन यांच्याशी १००% सहमत. गेली साडेतीन वर्षे मिपाच्या सान्निध्यात कशी सरली ते खरंच समजलं नाही. इतके प्रेम करणारे जिव्हाळ्याचे लोक मिपाने दिलेत की मी स्वतःला भाग्यवान समजतो. हे सगळे सुहृद मिळवून देणार्‍या मिसळपावला चौथ्या वर्धापनदिनाच्या शुभेच्छा! मिपाच्या सर्व सदस्यांनाही मनःपूर्वक शुभेच्छा आणि पुढील वाटचाल अशीच समृद्ध करणारी असूदे अशी श्रीगजाननाचरणी प्रार्थना! :) (आनंदित) चतुरंग

किसन शिंदे 01/09/2011 - 19:26
मिसळपावला ४थ्या वर्धापनदिनाच्या आणी मिपाकरांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा...! येणार्‍या पुढील वर्षात मिपाची अशीच प्रगती होत राहो हि गणरायाचरणी प्रार्थना. :)

अंतु बर्वा 01/09/2011 - 19:52
मिपाचं व्यसन लागलं आहे आता... आणी हे व्यसन असच चालू राहो.... चौथ्या वर्धापन दिनाच्या शुभेच्छा... मिपाच्या यशाचा आलेख असाच उत्तरोत्तर वाढत राहो... गणपती बाप्पा मोरया..!!!

प्रचेतस 01/09/2011 - 19:54
मिपाला चौथ्या वर्धापनादिनाच्या अनेकानेक शुभेच्छा. मिपानेच अनेक मिपाकर मैत्र म्हणून दिलेत त्याबद्दल मिपा, मिपाकर आणि मिपाव्यवस्थापनाचे अनेक आभार.

समीरसूर 01/09/2011 - 20:11
नमस्कार, आज गणरायाचे मंगल आगमन झाले. श्री गणेश आपल्या आगमनासोबतच सुख, समृद्धी, समाधान, मांगल्य, आणि पावित्र्य घेऊन येवो ही सदिच्छा! सगळ्यांना गणेशचतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा! आणि चौथ्या वर्धापनदिनानिमित्त समस्त मिपापरिवाराला हार्दिक शुभेच्छा!! मिपा म्हणजे माझा एक सच्चा मित्र आहे; मिपा म्हणजे माझ्यापासून काही क्षण विलग होत मलाच सार्थपणे व्यक्त करणारं माझंच एक निराळं, अनोखं, अस्तित्व आहे; मिपा माझा तो हक्काचा कट्टा आहे जो कॉलेजनंतर हळू-हळू आयुष्यातून संपत जातो आणि लग्नानंतर ज्याचा मागमूसही आयुष्यात राहत नाही. मिपा म्हणजे चार क्षणांची मनाची खरी विश्रांती आहे; मिपा म्हणजे आजच्या गतिमान जीवनातली कधीकाळी वाट्याला येणारी घनदाट जंगलातली मनसोक्त भटकंती आहे. सगळे मिपाकर या मनसोक्त भटकंतीतले सवंगडी आहेत, हात धरून फेर धरायला लावणारे, दिलखुलास दाद देणारे मित्र आहेत. सगळ्या मिपाकरांना मिपाच्या वर्धापनदिनानिमित्त अनेकोत्तम शुभेच्छा. मिपा असे शेकडो वर्धापनदिन साजरे साजरे करेल यात शंकाच नाही. गणरायाने मिपावर आपली कृपादृष्टी सतत असू द्यावी ही त्यास नम्र प्रार्थना! समीर

शुचि 01/09/2011 - 20:26
मिपा ला खूप खूप शुभेच्छा. विविध प्रकृतीच्या, आवडी-निवडीच्या सदस्यांना सामावून घेऊन, मिपा असेच फुलत, बहरत रहावो ही त्या सुमुखाच्या, विघ्नहर्त्याच्या चरणी प्रार्थना.

५० फक्त 01/09/2011 - 20:37
मिपाला आणि सगळ्यांनाच शुभेच्छा. हा केक आपण जगात भारी आहोत म्हणुन हा श्री,.निलकांत साठी हा केक, असो त्या नाहित आता इथं, आर या म्हणलं तरी येणार नाही. आणि हा शेवटचा मिपा हे हक्काचं कुरण आहे दंगा करायचं म्हणुन.

In reply to by प्रदीप

विकास 02/09/2011 - 02:12
प्रकाश घाटपांडे व कलंत्री हेही इथे पुन्हा दिसले, ह्याचाही आनंद आहे. सहमत. आता त्यांचे लेखनही दिसुंदेत ही विनंती!

आत्मशून्य 01/09/2011 - 21:59
मिपाला चौथ्या वर्धापनादिनाच्या हार्दीक शुभेच्छा. आणी सर्व व्यवस्थापकांचे विषेश आभार व अभिनंदन. विविध गूण, प्रकृती व प्रवॄत्तिच्या लोकांना मिपाकर म्हणून एकत्र नांदताना बघताना खरच आनंद वाट्तो....

मिपा असेच चालत राहो हीच गणरायाच्या चरणी प्रार्थना..... :-) मंगलमूर्ती प्रसिद्ध आठ गणपती,या पुण्यनगरी मधे। कसबा,गुपचुप,मोदी,माती,चिमण्या..च्या दर्शना जाऊ दे॥ सारसबाग तळ्यातला गणपती,त्याच्यापुढे दशभुजा। आठवा उंबरजा असे गणपती,कार्यासी बोलवीत जा॥....मंगलमूर्ती मोरया,गणपतीबाप्पा मोरया....

जाई. 02/09/2011 - 00:07
मिपाच्या वर्धापनादिनानिमित्त मिपाला तसेच सर्व मिपाकराना शुभेच्छा मिपाची उत्तरोत्तर प्रगती व्हावी ही ईश्वरचरणी प्रार्थना

नाखु 02/09/2011 - 08:58
सर्व मि.पा.परिवारचे अभिनंदन आणि उत्तरोत्तर प्रगतिसाठी शुभेच्छा.. यानिमित्ताने सर्व ज्ञात अज्ञात संपादक, सिद्धहत लेखकांचे आभार (त्यापेक्शा ऋणी आहे कसे वाटते)

प्यारे१ 02/09/2011 - 09:13
हार्दिक हार्दिक शुभेच्छा...!!! व्यक्तिगत कसोटीच्या कालखंडांमध्ये (मिपाशी ओळख झाल्यापासून आतापर्यंत दोन वेळा) मिपामुळे अनुक्रमे तणाव आणि दु:ख किमान मागे टाकू शकलो त्याबद्दल मिपाच्या सगळ्या लेखक, वाचक, प्रतिसादकर्ते, संपादक, सरपंच, व्यवस्थापक, मालक आणि सगळ्यांचे हार्दिक आभार.... - प्यारे

असुर 02/09/2011 - 09:38
मिपाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!! मिपाची उत्तरोत्तर प्रगती होत राहो आणि समस्त मिपाकरांची लेखणी कायम बहरत राहो हीच गणरायाचरणी प्रार्थना!!! :-) --असुर

श्यामल 02/09/2011 - 15:39
माझ्या आयुष्याच्या अतिशय कठीण कालखंडात जगण्याची उर्मी देणार्‍या संजीवक मिपाची मी शतशः आभारी आहे ! मिपाच्या मालक, व्यवस्थापक,संपादक मंडळ, आणि सर्व लेखकांचे हार्दिक आभार.......... मिपाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! मिपाने असे हजारो वर्धापनदिन साजरे करावे ही गणरायाचरणी प्रार्थना !!!!!!!!!!!!!!!!!

सहज 01/09/2011 - 09:13
लेखातील शब्दान शब्दाशी व भावनेशी सहमत आहे! :-) हॅपी बर्थ डे टु मिपा!!

आता तर मिपाशिवाय पूर्वी कसे राहत होतो असाच प्रश्न पडू लागला आहे.
१०१% सहमत. मला मिपावर येऊन फक्त दीड वर्षच झालंय हे अजूनही खरं वाटत नाही. मिपाला, म्हणजे सर्व मिपाकरांना व व्यवस्थापनाला, वर्धापनदिनानिमित्त शुभेच्छा.

मदनबाण 01/09/2011 - 17:00
क्लिंटनरावांच्या शब्दा शब्दाशी सहमत... :) मलाही या संकेत स्थळावर राहुन 3 वर्षे 27 आठवडे पूर्ण झाले आहेत याचे नवल वाटायला लागले आहे,कारण हा सर्व काळ कसा गेला ते कळलेच नाही. :) हे संकेतस्थळ असेच अजुन बहारदार होवो... आणि नवनविन सदस्यांची त्यात भर पडो हीच इच्छा व्यक्त करतो. गणपती बाप्पा मोरया ! मंगलमूर्ती मोरया !

या नीमित्त आम्हाला आनंद घारे यांचा मिसळपाववरील पहिले वर्ष हा लेख आठवतो. तसेच राजेश घासकडवींचा वर्धापन दिना नीमित्त मिपाला शुभेच्छा हा ही लेख ही आठवतो.

गणपा 01/09/2011 - 13:08
मिपाला तिथीनुसारच्या चौथ्या वाढदिवसाच्या शुभेच्छा !!! तात्या निलकांत आणि संपादकां सोबतच मिपावर लिहिणार्‍या (मग ते प्रतिसाद का असेनात) समस्त लेखक /लेखिकांचे ही आभार. :) जुग जुग जियो मिपा. :)

In reply to by नावातकायआहे

ऋषिकेश 03/09/2011 - 10:57
मिपाला ह्याप्पी वाल्या बड्डेच्या बिलेटेड शुभेच्छा! :)

01/09/2011 - 11:47
चौथ्या वर्धापनदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!!!! "जियो" मिपा....

केशवसुमार 01/09/2011 - 12:49
क्लिंटनशेठशी १००१% सहमत... सर्व मिपाकरांना मिपा वर्धापनदिनाच्या हर्दिक शुभेच्छा!! केशवसुमार

सुहास झेले 01/09/2011 - 14:06
मिपाकरांना चौथ्या वर्धापनदिनाच्या हार्दिक शुभेच्छा .. मिपाला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा आणि माझ्यातर्फे जमेल तितके सहकार्य करण्याचे वचन :) :) ऑल द बेश्ट :)

मिपाच्या चौथ्या वर्धापनदिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. नीलकांत सोबत मिपाच्या तांत्रिक गोष्टी सांभाळणार्‍या टीमचेही अभिनंदन. -दिलीप बिरुटे

विकास 01/09/2011 - 15:59
क्लिंटन यांच्याशी सहमत! चार वर्षात अनेक मित्र-मैत्रिणी झाले, अनेक नवीन गोष्टी कळल्या-समजल्या ज्या मुद्दामून वाचायला गेलो नसतो. त्यामुळे या निमित्ताने अशा सर्वच लेखक-कवी-आणि खरडकांना देखील शुभेच्छा! आणि तुमच्या मुळे माझ्यासारख्याच्या माहितीत-ज्ञानात भर पडत राहोत ही विनंती!

चित्रा 01/09/2011 - 16:32
चौथ्या वर्धापनदिनानिमित्त सर्व मिपाकरांचे अभिनंदन आणि हार्दिक शुभेच्छा!

क्रान्ति 01/09/2011 - 16:43
मिपाच्या चौथ्या वर्धापनदिनानिमित्त मिपाला आणि समस्त मिपाकरांना हार्दिक शुभेच्छा आणि अभिनंदन! मिपाची उत्तरोत्तर अशीच प्रगती होत राहो, ही गणरायाच्या चरणी प्रार्थना. :)

मृत्युन्जय 01/09/2011 - 17:53
मिपाच्या चौथ्या वर्धापनदिनानिमित्त मिपाला आणि समस्त मिपाकरांना हार्दिक शुभेच्छा आणि अभिनंदन! मिपाची उत्तरोत्तर अशीच प्रगती होत राहो, ही गणरायाच्या चरणी प्रार्थना.

कलंत्री 01/09/2011 - 19:09
मिपाशी सलंग्न राहणे हा एक चांगला अनूभव होता आणि आहे. पूर्वी दिवस उजाडयाचा तो मिपावर येण्यासाठीच. सध्या पूर्वीसारखे जमत नाही याची खंत वाटते. तात्याचे मिपासाठी असलेले योगदान हे मराठीच्या मार्गातील एक महत्त्वाचे असे स्थान आहे आणि मला त्याचे ॠण मानण्यातच आनंद असेल. नीलकांत हे या टप्प्यावरचे मिळालेले एअक महत्त्वाचे मित्र म्हणून संचित आहे. त्याचबरोबर अनेक मित्र मिळाले, बरेच प्रेम मिळाले हे कसे विसरता येईल? अश्या काळाच्या टप्प्यावर हे सर्व आठवता येते याच साठी ही वर्धापनदिने असतात हेच खरे!!!

In reply to by कलंत्री

विकास 01/09/2011 - 19:19
मिपाशी सलंग्न राहणे हा एक चांगला अनूभव होता यातील "होता" हा शब्द खटकला. :( सध्या पूर्वीसारखे जमत नाही याची खंत वाटते. आशा करतो, सर्व व्यवस्थित चालू आहे. आपण सारखे नाही पण मधून मधून येऊन का होईना पण लेखन चालू ठेवावेत ही विनंती. अश्या काळाच्या टप्प्यावर हे सर्व आठवता येते याच साठी ही वर्धापनदिने असतात हेच खरे!!! सहमत! सिंहावलोकनासाठीच वर्धापनदिन साजरे करण्याची प्रथा पडली असावी.

चतुरंग 01/09/2011 - 19:17
क्लिंटन यांच्याशी १००% सहमत. गेली साडेतीन वर्षे मिपाच्या सान्निध्यात कशी सरली ते खरंच समजलं नाही. इतके प्रेम करणारे जिव्हाळ्याचे लोक मिपाने दिलेत की मी स्वतःला भाग्यवान समजतो. हे सगळे सुहृद मिळवून देणार्‍या मिसळपावला चौथ्या वर्धापनदिनाच्या शुभेच्छा! मिपाच्या सर्व सदस्यांनाही मनःपूर्वक शुभेच्छा आणि पुढील वाटचाल अशीच समृद्ध करणारी असूदे अशी श्रीगजाननाचरणी प्रार्थना! :) (आनंदित) चतुरंग

किसन शिंदे 01/09/2011 - 19:26
मिसळपावला ४थ्या वर्धापनदिनाच्या आणी मिपाकरांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा...! येणार्‍या पुढील वर्षात मिपाची अशीच प्रगती होत राहो हि गणरायाचरणी प्रार्थना. :)

अंतु बर्वा 01/09/2011 - 19:52
मिपाचं व्यसन लागलं आहे आता... आणी हे व्यसन असच चालू राहो.... चौथ्या वर्धापन दिनाच्या शुभेच्छा... मिपाच्या यशाचा आलेख असाच उत्तरोत्तर वाढत राहो... गणपती बाप्पा मोरया..!!!

प्रचेतस 01/09/2011 - 19:54
मिपाला चौथ्या वर्धापनादिनाच्या अनेकानेक शुभेच्छा. मिपानेच अनेक मिपाकर मैत्र म्हणून दिलेत त्याबद्दल मिपा, मिपाकर आणि मिपाव्यवस्थापनाचे अनेक आभार.

समीरसूर 01/09/2011 - 20:11
नमस्कार, आज गणरायाचे मंगल आगमन झाले. श्री गणेश आपल्या आगमनासोबतच सुख, समृद्धी, समाधान, मांगल्य, आणि पावित्र्य घेऊन येवो ही सदिच्छा! सगळ्यांना गणेशचतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा! आणि चौथ्या वर्धापनदिनानिमित्त समस्त मिपापरिवाराला हार्दिक शुभेच्छा!! मिपा म्हणजे माझा एक सच्चा मित्र आहे; मिपा म्हणजे माझ्यापासून काही क्षण विलग होत मलाच सार्थपणे व्यक्त करणारं माझंच एक निराळं, अनोखं, अस्तित्व आहे; मिपा माझा तो हक्काचा कट्टा आहे जो कॉलेजनंतर हळू-हळू आयुष्यातून संपत जातो आणि लग्नानंतर ज्याचा मागमूसही आयुष्यात राहत नाही. मिपा म्हणजे चार क्षणांची मनाची खरी विश्रांती आहे; मिपा म्हणजे आजच्या गतिमान जीवनातली कधीकाळी वाट्याला येणारी घनदाट जंगलातली मनसोक्त भटकंती आहे. सगळे मिपाकर या मनसोक्त भटकंतीतले सवंगडी आहेत, हात धरून फेर धरायला लावणारे, दिलखुलास दाद देणारे मित्र आहेत. सगळ्या मिपाकरांना मिपाच्या वर्धापनदिनानिमित्त अनेकोत्तम शुभेच्छा. मिपा असे शेकडो वर्धापनदिन साजरे साजरे करेल यात शंकाच नाही. गणरायाने मिपावर आपली कृपादृष्टी सतत असू द्यावी ही त्यास नम्र प्रार्थना! समीर

शुचि 01/09/2011 - 20:26
मिपा ला खूप खूप शुभेच्छा. विविध प्रकृतीच्या, आवडी-निवडीच्या सदस्यांना सामावून घेऊन, मिपा असेच फुलत, बहरत रहावो ही त्या सुमुखाच्या, विघ्नहर्त्याच्या चरणी प्रार्थना.

५० फक्त 01/09/2011 - 20:37
मिपाला आणि सगळ्यांनाच शुभेच्छा. हा केक आपण जगात भारी आहोत म्हणुन हा श्री,.निलकांत साठी हा केक, असो त्या नाहित आता इथं, आर या म्हणलं तरी येणार नाही. आणि हा शेवटचा मिपा हे हक्काचं कुरण आहे दंगा करायचं म्हणुन.

In reply to by प्रदीप

विकास 02/09/2011 - 02:12
प्रकाश घाटपांडे व कलंत्री हेही इथे पुन्हा दिसले, ह्याचाही आनंद आहे. सहमत. आता त्यांचे लेखनही दिसुंदेत ही विनंती!

आत्मशून्य 01/09/2011 - 21:59
मिपाला चौथ्या वर्धापनादिनाच्या हार्दीक शुभेच्छा. आणी सर्व व्यवस्थापकांचे विषेश आभार व अभिनंदन. विविध गूण, प्रकृती व प्रवॄत्तिच्या लोकांना मिपाकर म्हणून एकत्र नांदताना बघताना खरच आनंद वाट्तो....

मिपा असेच चालत राहो हीच गणरायाच्या चरणी प्रार्थना..... :-) मंगलमूर्ती प्रसिद्ध आठ गणपती,या पुण्यनगरी मधे। कसबा,गुपचुप,मोदी,माती,चिमण्या..च्या दर्शना जाऊ दे॥ सारसबाग तळ्यातला गणपती,त्याच्यापुढे दशभुजा। आठवा उंबरजा असे गणपती,कार्यासी बोलवीत जा॥....मंगलमूर्ती मोरया,गणपतीबाप्पा मोरया....

जाई. 02/09/2011 - 00:07
मिपाच्या वर्धापनादिनानिमित्त मिपाला तसेच सर्व मिपाकराना शुभेच्छा मिपाची उत्तरोत्तर प्रगती व्हावी ही ईश्वरचरणी प्रार्थना

नाखु 02/09/2011 - 08:58
सर्व मि.पा.परिवारचे अभिनंदन आणि उत्तरोत्तर प्रगतिसाठी शुभेच्छा.. यानिमित्ताने सर्व ज्ञात अज्ञात संपादक, सिद्धहत लेखकांचे आभार (त्यापेक्शा ऋणी आहे कसे वाटते)

प्यारे१ 02/09/2011 - 09:13
हार्दिक हार्दिक शुभेच्छा...!!! व्यक्तिगत कसोटीच्या कालखंडांमध्ये (मिपाशी ओळख झाल्यापासून आतापर्यंत दोन वेळा) मिपामुळे अनुक्रमे तणाव आणि दु:ख किमान मागे टाकू शकलो त्याबद्दल मिपाच्या सगळ्या लेखक, वाचक, प्रतिसादकर्ते, संपादक, सरपंच, व्यवस्थापक, मालक आणि सगळ्यांचे हार्दिक आभार.... - प्यारे

असुर 02/09/2011 - 09:38
मिपाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!! मिपाची उत्तरोत्तर प्रगती होत राहो आणि समस्त मिपाकरांची लेखणी कायम बहरत राहो हीच गणरायाचरणी प्रार्थना!!! :-) --असुर

श्यामल 02/09/2011 - 15:39
माझ्या आयुष्याच्या अतिशय कठीण कालखंडात जगण्याची उर्मी देणार्‍या संजीवक मिपाची मी शतशः आभारी आहे ! मिपाच्या मालक, व्यवस्थापक,संपादक मंडळ, आणि सर्व लेखकांचे हार्दिक आभार.......... मिपाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! मिपाने असे हजारो वर्धापनदिन साजरे करावे ही गणरायाचरणी प्रार्थना !!!!!!!!!!!!!!!!!
लेखनविषय:
नमस्कार मंडळी, आज गणेश चतुर्थी! आज आपलं लाडकं मिपा (तिथीने) चार वर्षाचं झालं. गेल्या चार वर्षात मिपावर अनेकविध विषयांवर दर्जेदार चर्चा वाचता आल्या, त्यात भागही घेता आला. तसेच मिपामुळे अनेक नव्या ओळखी झाल्या, मित्रपरिवार वाढला. आता तर मिपाशिवाय पूर्वी कसे राहत होतो असाच प्रश्न पडू लागला आहे. असे हे उत्तम, दर्जेदार आणि सुंदर संकेतस्थळ चालू करून माझ्यासारख्या अनेकांना मायमराठीतून इतरांबरोबर संवाद साधायची संधी दिल्याबद्दल तात्या आणि नीलकांतचे आभार मानावेत तेवढे थोडेच आहेत.