आपणं मस्तं लिखछि... :)
प्रत्येक भाषेचा डौल निराळा, लहेजा निराळा. यानिमित्ताने ओडिसी भाषेची चांगली माहिती मिळाली.
अवांतर - मिपाची सदस्यसंख्या ४००० च्या वर गेल्याबद्दल मालकांचे आणि सर्व मिपाकरांचेदेखील अभिनंदन.
- (छापल्यासारखे बोलणारा) भटोबा
तात्या,
प्रोत्साहन दिल्याबद्दल आपला आणि सर्वांचाच मनापासून आभारी आहे. सांगण्यासारखे काही सापडले तर इथे 'टाकीनच'. बाकी माझी 'शाणपट्टी' इथे असतेच!
आळश्यांचा राजा
राजाभाऊ.... मस्त लिहिलंय. प्रत्येक भाषेची मजा वेगळी. ओडिया सारख्या सहसा संपर्कात न येणार्या भाषेची छान ओळख करून दिली.
अवांतर: आपल्या आवडी जुळत आहेत एकदम.... आळस आणि भाषा वगैरे शिकणे. :)
बिपिन कार्यकर्ते
धन्यवाद! आवडी जुळत आहेत म्हणण्यापेक्षा चरित्रं जुळतात म्हणूया. आळस ही आवड नसून तो पाचवीलाच पुजला आहे. भाषा शिकणे हा देखील छंद नव्हताच, पण शिकायचीच आहे तर कामचलाऊ का, ओडियांपेक्षा चांगली बोलूया - लिहूया असा 'शाणा' भाव त्यामागे आहे! ;)
खोबार वर आपण फिदा आहोत!
आळश्यांचा राजा
म्हनुनच आळश्यांचा राजा अशी आयडी घ्यावीशी वाटली होय. एका बालकथेत "मला किनई लाडू तोंडात टाकायचा कंटाळा येतो" अस म्हणणारा आळशीबाळ आठवला.
सुंदर लेखन अजुन येउ देत.
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
उद्योग करण्याची आवड अशी नाहीच, त्याला काय करणार काका? आपली अनुदिनी पहात असतो. बरं झालं ती नोकरी सोडलीत ते. माझ्यासारखे आळशी असता तर काही तुम्ही सोडली नसती म्हणा ! :)
आळश्यांचा राजा
छान. लेख वाचून "मु तुमोकू भालोपायी" हे वाक्य (आणि तदनुषंगाने अनेक गोष्टी!) आठवल्या. असो.
काही वर्षांपूर्वी ओरीसातील बेरहामपूर येथे महिनाभर राहण्याचा योग आला होता. हा भाग आंध्रच्या जवळ. साहजिकच कटक-पुरी इ. ठिकाणांपेक्षा येथिल भाषा / संस्कृती / खान-पान जरा वेगळेच असावे.
तरीही, एक लक्षात आलेली गोष्ट म्हणजे, सर्वसाधारण उडिया व्यक्तीचे मराठी माणसाबद्दल बरेच गैरसमज आहेत. १८ व्या शतकातील अनेक मराठी सरदारांनी तेथे भयंकर लूटालूट केली त्याचा पगडा तेथील मंडळींच्या मनात अजूनही आहे!
त्याच बरोबर बंगाल्यांच्याबद्दलही ह्यांच्या मनात किंचित असूयेची भावना आहे, असे लक्षात आले होते. त्यांच्या मते, "रसगुल्ला" खरे म्हणजे ओरीसाचा पण बंगाल्यांनी तो पळवला आणि त्याचे व्यवस्थित मार्केटींग करून, "आपलाच" म्हणून जगाला सांगितले! तीच गोष्ट संस्कृतीची. त्यांच्या मते बंगाल्यांची संस्कृती म्हणजे रविंद्र संगीत - जे जेमतेम १०० वर्षांचे जुने आहे. याउलट ओडीसी नृत्यप्रकाराला हजार वर्षांची परंपरा आहे.
आता आळस सोडून अजूनही लिहा. विशेषतः चिलका सरोवर, जगन्नाथ पुरी इ. ठिकाणांबद्दल.
जाता जाता - भुवनेश्वर हे राजधानीचे शहर अतिशय सुबक, सुंदर आणि नीट-नेटके आहे. किंबहुना ज्या फ्रेन्च नगररचनाकाराने चंडीगडची निर्मिती केली त्यानेच भुवनेश्वरही बांधले.
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
तरीही, एक लक्षात आलेली गोष्ट म्हणजे, सर्वसाधारण उडिया व्यक्तीचे मराठी माणसाबद्दल बरेच गैरसमज आहेत. १८ व्या शतकातील अनेक मराठी सरदारांनी तेथे भयंकर लूटालूट केली त्याचा पगडा तेथील मंडळींच्या मनात अजूनही आहे!
खरे आहे. रा.स्व.स. चा इथे पगडा नसण्याचे कारणच हे आहे. संघाचे मुख्यालय नागपूर. नागपूरच्याच भोसल्यांनी ओडिशाला पिळून काढले. पण आता त्या आठवणी हळू हळू धूसर होत आहेत.
त्याच बरोबर बंगाल्यांच्याबद्दलही ह्यांच्या मनात किंचित असूयेची भावना आहे, असे लक्षात आले होते. त्यांच्या मते, "रसगुल्ला" खरे म्हणजे ओरीसाचा पण बंगाल्यांनी तो पळवला आणि त्याचे व्यवस्थित मार्केटींग करून, "आपलाच" म्हणून जगाला सांगितले! तीच गोष्ट संस्कृतीची. त्यांच्या मते बंगाल्यांची संस्कृती म्हणजे रविंद्र संगीत - जे जेमतेम १०० वर्षांचे जुने आहे. याउलट ओडीसी नृत्यप्रकाराला हजार वर्षांची परंपरा आहे.
हे पण बरोबर. मुळात इथे फार मोठा identity crisis आहे. ओडिशा नावाचे राज्य १९३५ पूर्वी अस्तित्त्वातच नव्ह्ते. बराचसा भाग बंगाल प्रांतात, काही मद्रास आणि उरलेला मध्य प्रांतात अशी वाटणी होती. बंगाल्यांवर यांचा विशेष राग आहे. रसगुल्ला सोडा, बंगाल्यांनी आमचे जयदेव (गीतगोविंद) आणि नेताजी सुभाषचंद्र पण पळवले म्हणतात! नेताजी कटकला लहानाचे मोठे झाले. हे लोक पण जबाबदार आहेत. यांच्यात उद्यम नाही. ओडिसी नृत्य, कोणार्कचे भग्नावशेष, खारवेलाचा धूसर, शंकास्पद इतिहास, आणि प्रभू जगन्नाथ यापलीकडे जाऊन आपली ओळख शोधावी असे कुणाला वाटत नाही. पण परिस्थिती बदलत आहे. मोठे उद्योग येत आहेत. लोकांकडे पैसा येत आहे. चित्र बदलेल.
भुवनेश्वर हे नियोजित शहर आहे. पण चंडीगड ची सर त्याला नाही. गेल्या दोन अडीच वर्षांत फार प्रगती झाली आहे खरी. सध्याच्या म्युनिसिपल कमिशनर एक फार चांगल्या अधिकारी आहेत. त्या चांगले वळण लावत आहेत.
आळश्यांचा राजा
अतिशय आवडला. 'अ' च्या 'ओ/ऑ' करण्याने बर्याचदा 'ध'चा 'मा' होऊ शकतो. कॉलेजमधल्या एका उडिया मुलाने हरमन नावाच्या पंजाबी मुलाला सगळ्यांसमोर 'हॉर्मोन' म्हणून गोरेमोरे केले होते, तो धमाल किस्सा आठवला :)
प्रतिक्रिया
वा!!
लेखिछन्ति!
लेख अंमळ
धन्यवाद !
आपणं मस्तं लिखछि........ सहमत!!!!
धन्यवाद!
मस्त आहे
आभारी
आळशी
उद्योग
मु तुमोकू भालोपायी...
खरे आहे
मस्त
उत्तम लेख
बैलोबा,
वाह सही
उत्तम लेख
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी