ताज्या घडामोडी - जून २०२२ (भाग ५)
आधीच्या भागात १५०+ प्रतिसाद झाल्याने नवा भाग काढत आहे. आधीच्या भागातील प्रतिसादांविषयी काही लिहायचे असेल तर त्या भागात लिहावे आणि नवीन मुद्दा लिहायचा असेल तर तो या भागात लिहावा ही विनंती. अन्यथा महिन्याच्या २७ तारखेला नवा भाग काढला नसता पण यावेळी घडामोडी खूप वेगाने होत असल्याने या भागातही १५० प्रतिसाद झाले तर नवल वाटायला नको.
काल लोकसभेच्या ३ जागा आणि विविध राज्यातील विधानसभांच्या ७ जागांच्या पोटनिवडणुकांसाठी मतमोजणी झाली. लोकसभेच्या तीनही जागांचे निकाल धक्कादायक लागले आहेत.
२०१९ मध्ये पंजाबमधील संगरूर लोकसभा मतदारसंघातून आम आदमी पक्षाचे भगवंत मान निवडून गेले होते. ते पक्षाचे लोकसभेतील एकमेव खासदार होते. मार्च महिन्यात पंजाबचे मुख्यमंत्री झाल्यावर त्यांनी लोकसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला. ही पोटनिवडणुक आम आदमी पक्षासाठी प्रतिष्ठेची होती. तिथून माजी आय.पी.एस अधिकारी आणि अकाली दल (अमृतसर) या गटाचे नेते सिमरनजीतसिंग मान यांनी आम आदमी पक्षाचे गुरमेल सिंग यांचा ५८२२ मतांनी पराभव करून खळबळ माजवून दिली. या मतदारसंघातून शिरोमणी अकाली दलाने पंजाबचे माजी मुख्यमंत्री बिअंतसिंग यांच्या हत्येसाठी तुरूंगात असलेल्या बलवंतसिंग राजोनाची बहिण कमलजीत कौर राजोनाला उमेदवारी दिली होती तर भाजपने २०१९ मध्ये भगवंत मान यांच्याविरोधात काँग्रेसचे उमेदवार म्हणून पराभूत झालेल्या केवलसिंग धिल्लो यांना उमेदवारी दिली होती. काँग्रेसने माजी आमदार दलवीरसिंग खंगुरा (गोल्डी) यांना उमेदवारी दिली होती. इतर तीनही उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली. सिमरनजीतसिंग मान यांनी १९८४ मध्ये ऑपरेशन ब्लू स्टारच्या निषेध करण्यासाठी त्यांनी आय.पी.एसचा राजीनामा दिला होता. नंतरच्या काळात ते खलिस्तानचे समर्थक आहेत असे आरोपही झाले होते आणि त्यात तथ्यही होते. २०१८ मध्ये उत्तर प्रदेशात गोरखपूर आणि फुलपूर या अनुक्रमे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य यांनी रिकाम्या केलेल्या जागेवर भाजप उमेदवारांचा पराभव झाला त्याच्या आदल्याच वर्षी भाजपने उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुक जवळपास चार-पंचमांश बहुमताने जिंकली होती. तशीच आम आदमी पक्षाने २०२२ ची पंजाब विधानसभा निवडणुक जिंकली आहे. २०१८ मध्ये योगींना दणका, योगींची (आणि मोदींची) लाट ओसरली वगैरे बरेच चर्वितचर्वण झाले होते तसे आम आदमी पक्षाचा तीन महिन्यातच हा पराभव झाल्यानंतर होते का हे बघायचे.
उत्तर प्रदेशात आझमगड आणि रामपूर या दोन लोकसभा जागांचे निकालही असेच खळबळजनक आहेत. २०१९ मध्ये आझमगडमधून अखिलेश यादव अडीच लाखांपेक्षा जास्त मतांनी जिंकले होते. त्या जागेवर भाजपच्या दिनेशलाल यादव निरहुआ यांनी यादव कुटुंबातील धर्मेंद्र यादव यांचा जवळपास ८ हजार मतांनी पराभव केला. अखिलेशना २०१९ मध्ये मोठे मताधिक्य मिळाले होते त्यात बहुजन समाज पक्षाच्या मतांचा वाटा मोठा होता असे दिसते. या मतदारसंघात बसपाचा जोर आहे. पूर्वी ही जागा बसपाने जिंकली पण आहे. आता पक्षाची बरीच पडझड झाली असली तरी बसपाने आपली मते राखली आहेत. सपा-बसपा मधील मतविभागणीचा फायदा भाजपला मिळाला असे दिसते.
रामपूरमधील निकाल अजून धक्कादायक आहेत. हा लोकसभा मतदारसंघ मुस्लिमबहुल आहे. इथून भाजपने पूर्वी विजय मिळवला आहे पण त्यावेळेस सपा/बसपा/काँग्रेस यांच्यातील मुस्लिम मतदारांमध्ये मते विभागली जाऊन त्याचा फायदा भाजप उमेदवाराला मिळाला आहे. पण यावेळेस तसे झालेले नाही. बसपा आणि काँग्रेसने इथून उमेदवार दिला नव्हता. तसेच तीन महिन्यापूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये बघितलेल्या कलाप्रमाणे समाजवादी पक्षामागे मोठ्या प्रमाणावर मुस्लिम मतांचे ध्रुवीकरण होणे अपेक्षित होते. तसेच २०१९ मध्ये ही जागा समाजवादी पक्षाच्या आझमखानने जिंकली होती त्याचाही त्या भागात जोर आहे. असे असताना सपाचा उमेदवार आरामात जिंकेल असे वाटत होते. पण भाजपच्या घनश्याम लोधींनी जवळपास ५२% मते मिळवत ही जागा आरामात जिंकली.
विधानसभा पोटनिवडणुकांमध्ये त्रिपुरात ४ पैकी ३ जागा सत्ताधारी भाजपने तर एक जागा काँग्रेसने जिंकली. भाजपच्या विजयी उमेदवारांमध्ये मुख्यमंत्री माणिक साहा यांचाही समावेश आहे. काँग्रेसने आगरतळ्याची जागा जिंकली. या जागेवरून २०१८ मध्ये विधानसभा निवडणुकांमध्ये जिंकलेल्या भाजप उमेदवाराने काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्याने ही पोटनिवडणुक जिंकली. उरलेल्या तीन विधानसभा जागा त्या त्या राज्यातील सत्ताधारी पक्षांनी जिंकल्या. आंध्र प्रदेशातील आत्माकूरमधून वाय.एस.आर काँग्रेसने, दिल्लीतील राजिंदर नगरमधून आम आदमी पक्षाने तर झारखंडमधील मंदार या जागेवर काँग्रेसने विजय मिळवला.
वाचने
15807
वाचनखूण
प्रतिक्रिया
151
गुवाहाटीत आमदार अनास्थशायी ?
In reply to गुवाहाटीत आमदार अनास्थशायी ? by गामा पैलवान
??
In reply to गुवाहाटीत आमदार अनास्थशायी ? by गामा पैलवान
हायला
In reply to हायला by सुबोध खरे
पुर्वी म्हणजे काही
In reply to हायला by सुबोध खरे
शंकानिरसन
मुख्यमंत्री म्हणतात की या
राउतांनाच ते आमदार परत यायला
राउतांनाच ते आमदार परत यायला नको आहे असे दिसतेय.हेच मी आधी लिहिलंय.In reply to राउतांनाच ते आमदार परत यायला by श्रीगुरुजी
राउत लै भारी आहेत
खैरेंना ठाकरेंनी केव्हाच
In reply to खैरेंना ठाकरेंनी केव्हाच by श्रीगुरुजी
एकंदरीत शिवसेना नेत्यांची
३० जूनला विधानसभेचे विशेष
ही बातमी खोटी आहे असं
अटलबिहारी वाजपेयी व सोनिया
In reply to अटलबिहारी वाजपेयी व सोनिया by कानडाऊ योगेशु
अश्या सर्व संध्या त्यांनी
In reply to अश्या सर्व संध्या त्यांनी by अमरेंद्र बाहुबली
ऊध्दव ठाकरेंनी शेवट पर्यंत
In reply to ऊध्दव ठाकरेंनी शेवट पर्यंत by यश राज
मुंबईतून कार्यालये गुजरातला
In reply to मुंबईतून कार्यालये गुजरातला by अमरेंद्र बाहुबली
सेना म्हणजे महाराष्ट्र.
सेना म्हणजे महाराष्ट्र.
आणि इन्दिरा इज इन्डीया शिवाजी महाराज, संभाजी महाराज , बाजीराव पेशव्यापासून अहिल्याबाई होळकर, ज्ञानेश्वर तुकाराम पासून गाडगेबाबा पर्यंत सर्व संत, शाहू, फुले आंबेडकर वासुदेव बळवंत फडके पासून सावरकर लोकमान्य टिळक पासून ते संयुक्त महाराष्ट्रासाठी आपले बलिदान देणारे हुतात्मे, श्री पा वा काणे पासून श्रीमती लता मंगेशकर, श्री भीमसेन जोशी सारखे भारतरत्न या सर्व महाराष्ट्रातील दिग्गजांना आणि तळागाळातील सामान्य जनता पासून महाराष्ट्राच्या विकासासाठी झटणाऱ्या सर्व लहान मोठ्या माणसांपर्यंत आपण एका लेखणीच्या फटकार्यात नष्टप्राय करून टाकलेत बाळा साहेब ठाकऱ्यांच्याच शब्दात अरे चाटायची तरी किती ? जिभेला काही विश्रांती तरी द्याल कि नाहीIn reply to सेना म्हणजे महाराष्ट्र. by सुबोध खरे
अरे चाटायची तरी किती ? जिभेला
अरे चाटायची तरी किती ? जिभेला काही विश्रांती तरी द्याल कि नाहीहेच म्हणतो. किती भाजपमाता की जय म्हणाल?? कधीतरी भारत माता की जय देखील म्हणा.In reply to अरे चाटायची तरी किती ? जिभेला by अमरेंद्र बाहुबली
सेना म्हणजे महाराष्ट्र?
In reply to अश्या सर्व संध्या त्यांनी by अमरेंद्र बाहुबली
अहो साहेब इतकेही सैरभैर होऊ
Carrot and Stick Policy
सुप्रियाबाईंनी प्रेमळ सल्ला दिलाय.
पाकिस्तानी खाती ब्लॉक
संदर्भ :- जाता जाता :-
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Devachiye Dwari (Suresh Wadkar)In reply to संदर्भ :- जाता जाता :- by मदनबाण
पराभव
ठाकरे सरकारला उद्या बहुमत सिध्द करायचे आदेश
In reply to ठाकरे सरकारला उद्या बहुमत सिध्द करायचे आदेश by क्लिंटन
एकनाथ शिंदे उद्या मुंबईत येणार
राज्यपालांनी गुरुवारी सकाळी
In reply to राज्यपालांनी गुरुवारी सकाळी by श्रीगुरुजी
हं
In reply to हं by इरसाल
राष्ट्रपती राजवट
In reply to राष्ट्रपती राजवट by क्लिंटन
साहेब
In reply to हं by इरसाल
MVA will have to move SC
अजित पवार व भुजबळांना कोरोना
उद्याचे अधिवेशन रद्द करावे
ठाकरे आज राजीनामा देणार- सूत्रांची बातमी
हे म्हणजे एका आठवड्यात तिसर्
पक्षफूट टाळायची असेल ठाकरेंनी
In reply to पक्षफूट टाळायची असेल ठाकरेंनी by श्रीगुरुजी
पक्षफूट टाळायची असेल ठाकरेंनी
In reply to पक्षफूट टाळायची असेल ठाकरेंनी by श्रीगुरुजी
पक्षफूट टाळायची असेल ठाकरेंनी
पक्षफूट टाळायची असेल ठाकरेंनी राजीनामा देऊन भाजप सरकारला पाठिंबा द्यावाआजीबात नको. ठाकरेंनी काही झाले तरी भाजपला पाठींबा देऊ नये. नाहीतर ठाकरे आमदारांपुढे झूकले असा संदेश सामान्य शिवसैनिकात जाईल, त्यामुळे सेनेत ठाकरेंपेक्षा आमदारांचे वजन वाढेल. हे आमदार गेले तरी चालतील ह्यातील बहुतांश सोनेच्या जिवावर जिंकलेले आहेत. सेना त्या जागी नवे आमदार निवडूण आणू शकते. ठाकरे आमदार किंवा भाजप पुढे झूकले की सेना संपलीच म्हणून समजा.जर विश्वासदर्शक ठराव मान्य झाला नाही तर पक्षही फुटलेला असेल व मुख्यमंत्रीपद व सत्ताही गेलेली असेल.ते चालेल. सत्ता येत जात असते. पण सेनेच्याच आमदारांमुळे सत्ता गेली तर ह्या आमदारांची चांगलीच बदनामी होनार. त्यातही विश्वासदर्शक ठरावावेळी किती आमदार खरोखर भाजप नी बंडखोरांसोबत आहे हे देखील कळेल. सुदैवाने काही आमदारानी मविआ च्या बाजूने मतदान केले नी सरकार तरले तर मग एकनाथ शिंदे नी ईतरांचे काय होते हे पाहणे मजेशीर असेल.In reply to पक्षफूट टाळायची असेल ठाकरेंनी by अमरेंद्र बाहुबली
आजीबात नको. ठाकरेंनी काही
साहेब
कोशारी यांनी फडणीस यांना
In reply to कोशारी यांनी फडणीस यांना by अमरेंद्र बाहुबली
राज्यपालपद हे तटस्थपद असते
सेना म्हणजे महाराष्ट्र
सेना म्हणजे महाराष्ट्र
आहे ना ? मग उद्धव साहेब म्हणतात ती पूर्व दिशा नाही का? नागरिकशास्त्र तर कुठेच नाहीमंत्री मंडळात खालील नामांतर
पुण्याचे नाव जिजाऊनगर करा असा
एखाद्या शहराचे किंवा
सर तन से जुदा !! राजस्तान मधिल हत्या
In reply to सर तन से जुदा !! राजस्तान मधिल हत्या by डँबिस००७
राजस्तान सरकारने ह्या
राजस्तान सरकारने ह्या गुन्ह्यानंतर नेहमी प्रमाणे आपले हात झटकुन टाकलेले आहेत. उलट केंद्र सरकारलाच राज्य सरकारने जवाबदार धरलेल आहे.शेवटी आलंच. मुख्यमंत्री गेहलोत ह्यानी ह्या दोघाना पकडनार्या पाच पोलिसांना बढती दिलीय.राजीनामा!