व्देष, तिरस्कार, घृणा, सामाजिक वर्चस्ववाद की आणखी काही?
सध्या बहुजन समाज मोर्चा पासुन महाराष्ट्रात एक वेगळीच घुसळण सुरु आहे. जातीच्या संवेदना तशा गेल्या १० वर्षात हळुहळु टोकदार होत होत्या. ओबीसी आंदोलनाने त्यास चांगलीच हवा दिली. भाजपा केंद्रात आणि राज्यात सत्तेत आल्यापासुन या प्रकाराला धार चढली. भुजबळ अटकेत गेल्यावर कोणाचा नंबर येतो याकडे जनतेचे आणि दोन्ही काँग्रेसींचे लक्ष होते. कोपर्डी हे तत्कालीन कारण ठरले.
या मोर्चापासुन सामाजिक प्रगटीकरणाच्या साधनांवर समाजातील दोन्ही बाजुंकडुन आपाआपली मते जोरदारपणे मांडली जात आहेत. या मुद्द्यांचा विचार केला असता, त्यात खालील बाबी जाणवतात,
१ - मागील घटनांचा उल्लेख करुन त्यावर भाष्य होतांना दिसते.
२ - या मोर्चात दृश्यपणे आरक्षण आणि जातीविषयक कायदा बदल या मुख्य मागण्या समोर आल्या.
३ - दलित आणि ईतर समाजानेही आपले शक्ती प्रर्दशन करुन आपण लढण्यास तयार आहोत हे दाखवले.
४ - त्या नंतरच्या स्थानिक निवडणुकीत या सगळ्यांचा भाजपाला फटका बसेल असे वाटत होते तो अंदाज चुकला.
५ - यानंतर ब्राम्हणांना दोन्ही बाजुंकडुन भुतकाळातील घटनांवरुन लक्ष करण्यात आले.
रोज या मुद्द्यावर आम्ही चेपु, काय अप्पा वर अत्यंत टोकाचे विचार ऐकतो, वाचतो. हे वाचतांना काही बाबी फार खटकल्या,
१ - फार कमी लोक यावर संयमित प्रतिक्रिया देतात.
२ - आजची स्थिती काय? आजचे आपले सामाजिक, आर्थिक, राजकीय संबंध पणाला लावण्याची तयारी धरावी इतकी गरज
आहे का? याचा विचार केला जात नाही.
३ - आपल्या दैवताबाबत अवास्तव कल्पना आणि भ्रामक समजुती, संदर्भहीन अणि बिनबुडाच्या कथा बिनदिक्कतपणे सांगितल्या जातात.
४ - यात २० वर्ष प्राथमिक शिक्षक आणि डॉक्टर म्हणुन सेवा केलेले लोकही मनापासुन भाग घेतांना दिसतात हे फार निराशाजनक.
५ - भाषा वापरण्याचे संकेत, सामाजिक प्रतिष्ठा यांचा विचार न करता असभ्य आणि समोरच्याचा अत्याधिक अपमान कसा होईल याचा
प्रकर्षाने विचार करुन पोस्ट टाकल्या जातात? याची खरच गरज आहे का?
६ - बहुजन समाजाला मुस्लीम आपले मित्र ही मांडणी भविष्यात काही कामात येईल का?
हे प्रथम मान्य करतो की वरील विचारांमध्ये मुख्यतः मराठा समाजाने अधिक जबाबदारीने वागावे ही अपेक्षा आहे. मी ना ब्राम्हण, ना मराठा, ना अल्पसंख्यांक, ना माझ्या जातीत कोणी महापुरुष आला. (याचा मला आज आनंद वाटतो.) सामाजिक उतरंडीत आम्ही अधे मधे, राजकीय बाबीत शुन्य, आणि आर्थिक आहे त्यात सुखी.
आमच्या सारख्यांची मोठी गोची होते, ब्राम्हण, मराठा आणि दलित या सगळ्यांत मित्र असल्याने या मित्राच्या विचारांमधील बदल, जुने मित्र जेव्हा मराठा, दलित, मुस्लीम म्हणुन भेटतात तेव्हा फार वाईट वाटते. या सगळ्या घडामोडींचा आपल्या समाजावर आणि विकासावर फार परिणाम होतील असे मला वाटते. ही एकमेकांविषयीची मते म्हणजे नेमके काय आहे याचा विचार आपण करावा. परिणाम काय होतील याचाही विचार करा. चुका असतील तर दुरुस्त करायच्या की त्याच्या आधारावर अधिक मोठ्या चुका तर आपण करत नाही ना? याचा उहापोह आपण करावा.
कृपया मागील घटनांचा / ईतिहासाचा उल्लेख न करता यावर मते मांडावीत ही अपेक्षा.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
आजूबाजूला काय होतंय यावर
किती साळसुद प्रतिक्रिया दिलीय
=))
हहपुवा
साळसुद नाही, निरागस म्हणा हवं
गुरूजींच्या
खूप सून्दर विचार मान्ड्ले आहेत.
खुप छान विचार
रास्त आहे
असेच जातिआधारीच राजकारण करत
आमच्या सारख्यांची मोठी गोची
अरुण जोशींच्या प्रतिपादनातील काही निसटत्या बाजू
भारतातील जात हि संस्था
क्लाससंस्थेच्या मर्यादा मान्य
४) जातसंस्था सामाजिक आणि
@अरुण भौ, तुम्ही विचार छान
पारधी म्हणून एक जमात आहे,
वचन पाळण्याचा राजपूतांचा
वचन पाळण्याचा राजपूतांचा विशेष गुण आहे याचा अर्थ इतर जातीचे लोक वचन पाळण्यात ढिसाळ आहेत असा होतो.हे कसं काय ?अनुसया ही जगातली सर्वश्रेष्ठ पतिव्रता आहे म्हणजे इतर बायका स्लखनशील, चालू टाईप आहेत काय?अजिबात नाही. जर कोणी असा विचार करत असेल तर ते चूक आहे.