जत्रा
निर्जीव देवतांच्या करतात येथ जत्रा
जातात जीव तरीही भरतात येथ जत्रा
ओझे परंपरांचे ठरतेय जीवघेणे
वेठीस बापुड्यांना धरतात येथ जत्रा
तो देव का दयाळू होई असा कठोर?
प्रश्नांसमोर असल्या हरतात येथ जत्रा
झाले ठिकाण जत्रा, चिंता आणि भयाचे
चिरडून सर्व श्रद्धा सरतात येथ जत्रा
आता पुढील वर्षी पुन्हा नवीन गर्दी
असले धडे कधी ना स्मरतात येथ जत्रा.
-अविनाश ओगले
Taxonomy upgrade extras
| लेखनविषय: |
|---|
वाचने
3771
प्रतिक्रिया
11
मिसळपाव
प्रतिक्रिया
सुंदर गझल...
भावभक्तीने/मौजमजेने एकत्र येणे, हा मानव्य भाव
असेच म्हणतो
In reply to भावभक्तीने/मौजमजेने एकत्र येणे, हा मानव्य भाव by धनंजय
असेच म्हणतो
In reply to असेच म्हणतो by बेसनलाडू
हेच म्हणतो..
In reply to असेच म्हणतो by बेसनलाडू
वा वा ओगलेशेठ!
का हो इतका
सुरेख
जत्रेबद्दल!
गझल
सहमत आहे.
In reply to गझल by ऋषिकेश