आप की बदमाशियोंके....
"आपकी बदमाशियोंके ये नये अंदाज है" ... आज बर्याच दिवसांनी एका जुन्या सुरेल गाण्याच्या ओळी आठवल्या. पण दरोज जे काही गेल्या २१ दिवसात दिल्लीत चाळे चालले आहेत त्या बदमाशियोंच्या संदर्भात...
वास्तवीक नव्याने सत्तास्थापना केल्यावर कुठल्याही सत्ताधारी पक्षास, त्यांच्यावर टिका करण्याआधी काही काळ देणे योग्य अहे असे वाटते. आम आदमी पार्टी अर्थात आप च्या बाबतीत तर हे जास्तच असावेसे वाटत होते. तसे पाळायचा प्रयत्न देखील करणार होतो, पण हे पठ्ठे जसे महाभारतात श्रीकृष्णाला शपथ मोडायला लावून रणांगणात येण्यास भाग पाडले गेले तसे करत आहेत. अर्थात येथे कोणी कृष्णही नाही आणि त्याला युद्धात उडी मारायला लावणारा कोणी भिष्मही नाही, हा भाग वेगळा. पण सत्तेत येऊ का नये हे जनतेला एस एम एस करून विचारणे हे आता अगदी विचारी कृत्य वाटावे असे चढत्या भाजणीने आप आणि त्यांच्या नेत्यांचे वागणे चालू आहे. २१ दिवसात यांनी जितके रंग दाखवलेत तितके इतर कुठल्याच पक्षाने दाखवले नसतील असे वाटते.
लोकशाहीतले राजकारण हे काही अंशी ग्यानबा-तुकाराम असे म्हणत अर्थात दोन पाउले पुढे एक पाऊल मागे असे करत जात असते. निवडणुकीतल्या घोषणा आणि सत्तेत आल्यावर वास्तवाचे भान या दोन गोष्टींचा विचार केल्यास सत्ताधारी पक्षाने काही माघारी घेतल्या तरी गैर वाटत नाही. आप च्या बाबतीत देखील त्यांनी काही मते बदलली असली किंबहूना "असती" तर विशेष असे वाटले नसते. पण त्यांनी जिथे मते बदलली आणि जिथे बदलली नाहीत त्याच्या जागा चुकीच्या आहेत. भ्रष्टाचारावरून निवडून आलेली ही पार्टी आता शीला दिक्षित यांचे नाव देखील घेण्यास तयार नाही. त्या भ्रष्टाचारी आहेत का नाहीत, मला माहीत नाही. पण केजरीवाल रिपोर्ट घेऊन आध हिंडायचे. बरं आता शक्य वाटत नसले तरी हरकत नाही, पण भाजपच्या हर्ष वर्धन नी पुरावा द्यावा असे म्हणणे म्हणजे अतीच झाले.
वीजदराबाबत आणि पाण्याबाबत निर्णय घेतलेत ते राजकीय घोषणाच अधिक आहेत कारण त्यात किती पैसे उधळले जाणार आहेत आणि नक्की कुणाला फायदा होणार आहे हा मोठा प्रश्न आहे. त्या व्यतिरीक्त काही गोष्टी विधानसभेत संमत झाल्याशिवाय पुढे जाऊ शकणार नाहीत. तेंव्हा काँग्रेस काय करते त्यावर अवलंबून रहाणार.
असे बरेच काही २१ दिवसात झाले. पण गेल्या दोन दिवसात झालेली घटना ही केवळ आप पुरतीच नाही तर सगळ्या भारताला लांछनास्पद आहे. ज्या भारताने एकमुखाने, देवायनी खोब्रागडेंशी अमेरीकन पोलीस कायद्यानुसार वागले तरी स्त्री म्हणून आणि राजनैतिक अधिकारी म्हणून योग्य ट्रिटमेंट दिली नाही, म्हणून निषेध केला, त्याच भारतात युगांडातून आलेल्या स्त्रीयांवर कायदा हातात घेऊन (पक्षि: बेकायदेशीर पणे) दिल्ली सरकारातील कायदामंत्र्याने धक्कबुक्की केली, त्या बायकांना त्यांचे युरीन सँपल देण्यास भाग पाडले, ज्यातून काहीच सिद्ध होऊ शकले नाही. असे का करावे? तर त्या जेथे रहात होत्या तिथल्या रहीवाशांची तक्रार होती की ड्रग्ज-वेश्याव्यवसाय वगैरे चालत आहे म्हणून. या कायदा मंत्र्यांनी सोमनाथ भारतींनी पोलीसांना त्यांना पकडायला सांगितले. पोलीसांनी अर्थातच वॉरंट शिवाय पकडणे शक्य नाही म्हणून नाकारले. तर आता त्या पोलीसांनाच सस्पेंड करा म्हणून केजरीवाल ओरडत आहेत आणि ज्या कायदामंत्र्याने लोकशाहीतला कायदा हातात घेतला त्यांची भलावण करत (बेवजा तारीफ करना आप की आदत तो नही?), हे देशाच्या गृहमंत्रालयासमोर धरणे धरून बसायचे जाहीर करत आहेत. या सर्व प्रकरणात भारतीय हे ते ज्या गोर्या लोकांना रेसिस्ट म्हणतात त्यांच्या पेक्षा अधिक रेसिस्ट असल्याचे चित्र जगापुढे येत आहे. आणि त्याला कारण हे केरसुणीवाले नेते आहेत. विचार करा असली सर्कस मुंबई-बंगलोर-चेन्नई सारख्या ठिकाणी येऊन तिथल्या काही म्होरक्यांचे असले हट्ट पुरवायला लागली तर.
व्हिपी सिंग आले आणि साधारण एक-दिड आठवड्यातच भारताने पहील्यांदा दहशतवाद्यांना सोडले जो जनतेने नियम मानून नंतर कंदहार प्रकरणात केवळ राजकारण्यांच्याच मुलांसाठी का म्हणत पुढे रेटला. यात भाजपा-मोदींना निवडण्याचा प्रचार नाही, पण यांच्यापुढे अगदी आजचे भ्रष्ट आणि कोडगे काँग्रेसी नेते पण चालतील, अगदी मुलायम आले तरी चालतील असे म्हणण्यासारखी अवस्था आहे. पण आप च्या मदतीवीना... कारण उद्या हे असले आप-मतलबी नेते जर केंद्रात आले तर काय होईल याचा विचार करून त्यांना उर्वरीत ठिकाणाहून लागण होण्यापासून लांब ठेवणे गरजेचे आहे असे वाटत आहे.
वाचने
122856
वाचनखूण
प्रतिक्रिया
590
In reply to चिकाटी by क्लिंटन
+१
In reply to फरक by विकास
अहो त्यांनी केजारीवालांची
In reply to अहो त्यांनी केजारीवालांची by संपत
दंगली झाल्या तेव्हा गुजरात
In reply to अहो त्यांनी केजारीवालांची by संपत
हा विषय
In reply to हा विषय by विकास
त्या चर्चेचे फलित काय होते हे
In reply to त्या चर्चेचे फलित काय होते हे by बंडा मामा
.
In reply to . by विकास
म्हणजे त्या दृष्टीने चर्चा
In reply to म्हणजे त्या दृष्टीने चर्चा by बंडा मामा
फलित काय होते?
In reply to फलित काय होते? by संजय क्षीरसागर
भाजप 'आप'ला विरोध करणे
In reply to भाजप 'आप'ला विरोध करणे by संपत
पोपट?
In reply to पोपट? by हतोळकरांचा प्रसाद
दिल्लीत प्रचंड काँग्रेस
In reply to पोपट? by हतोळकरांचा प्रसाद
पोपट झाला म्हणजे 'हाथ आया,मुह
In reply to पोपट? by हतोळकरांचा प्रसाद
सत्तेच्या जवळ असतानाही
In reply to सत्तेच्या जवळ असतानाही by संपत
हसणं थांबला असेल तर पुढे चर्चा करू!!
In reply to हसणं थांबला असेल तर पुढे चर्चा करू!! by हतोळकरांचा प्रसाद
तुम्हाला असे म्हणायचे आहे कि
In reply to तुम्हाला असे म्हणायचे आहे कि by संपत
तुम्हाला असे म्हणायचे आहे कि
In reply to फलित काय होते? by संजय क्षीरसागर
माझ्या `लेख अत्यंत उथळ आणि
केजरीवाल दिल्लीत आणि स्कोर
तोंडघशी
प्रसाद हातोळकर!
In reply to प्रसाद हातोळकर! by संजय क्षीरसागर
सरजी, आपने और आआप ने तो हमारी
In reply to सरजी, आपने और आआप ने तो हमारी by प्यारे१
अॅक्टींग शिकवायला लागत नाही, दांभिक माणूस ती आपसूक करतो
In reply to अॅक्टींग शिकवायला लागत नाही, दांभिक माणूस ती आपसूक करतो by संजय क्षीरसागर
लांबलचक प्रतिसादाबद्दल माफी असावी!
In reply to लांबलचक प्रतिसादाबद्दल माफी असावी! by हतोळकरांचा प्रसाद
संजय क्षीरसागर!
In reply to संजय क्षीरसागर! by हतोळकरांचा प्रसाद
दादा, तुमची लिंक `एकतास सोळा मिनीटं' आहे
In reply to दादा, तुमची लिंक `एकतास सोळा मिनीटं' आहे by संजय क्षीरसागर
धन्यवाद!!
In reply to धन्यवाद!! by हतोळकरांचा प्रसाद
तीन महत्त्वाच्या घटना!
In reply to तीन महत्त्वाच्या घटना! by संजय क्षीरसागर
मोदींना चर्चेत कुणी आणलं
In reply to मोदींना चर्चेत कुणी आणलं by प्यारे१
स्वतःकडे मुद्दा तर काही नाही पण
In reply to स्वतःकडे मुद्दा तर काही नाही पण by संजय क्षीरसागर
>>> चोमडेपणाची सवयं जाईल तर
In reply to >>> चोमडेपणाची सवयं जाईल तर by प्यारे१
धन्यवाद
In reply to तीन महत्त्वाच्या घटना! by संजय क्षीरसागर
>>> मी शेवटचं सांगतो, तुम्ही
उप्स!
In reply to उप्स! by विकास
जी मंडळी सत्तेसाठी
>>> जी जनता अरविंदसारख्या
In reply to >>> जी जनता अरविंदसारख्या by श्रीगुरुजी
काँग्रेसचा पाठिंबा हा मुद्दा किती वर्ष लावून धरणार?
In reply to काँग्रेसचा पाठिंबा हा मुद्दा किती वर्ष लावून धरणार? by संजय क्षीरसागर
>>> केजरीवाल स्वतः काय
In reply to >>> केजरीवाल स्वतः काय by श्रीगुरुजी
तुमच्या आणि माझ्या विचारशैलीत फक्त हाच फरक आहे
In reply to तुमच्या आणि माझ्या विचारशैलीत फक्त हाच फरक आहे by संजय क्षीरसागर
>>> तुम्ही सगळी
व्हिव्हिआयपी आम आदमी ध्वज वंदनाविना
In reply to व्हिव्हिआयपी आम आदमी ध्वज वंदनाविना by विकास
विकास!
In reply to विकास! by संजय क्षीरसागर
धन्यवाद
In reply to धन्यवाद by विकास
हा लेख आणि चर्चा केजरीवाल यांच्यावर होती!
>>> शाब्बास! मोदींविषयी
In reply to >>> शाब्बास! मोदींविषयी by श्रीगुरुजी
तुम्ही रिवर्स लॉजिक वापरतायं
In reply to तुम्ही रिवर्स लॉजिक वापरतायं by संजय क्षीरसागर
>>> मनमोहनसिंगांची इतर विधानं
In reply to >>> मनमोहनसिंगांची इतर विधानं by श्रीगुरुजी
ते खालच्या पातळीवर गेलेले नाहीत?
In reply to ते खालच्या पातळीवर गेलेले नाहीत? by संजय क्षीरसागर
>>> तुम्हाला प्रतिवाद करता
In reply to >>> तुम्हाला प्रतिवाद करता by श्रीगुरुजी
श्रीगुरुजींचा (आयडी एका
गरम परोठे ?