कृत्य कुणाचे, “खाप”र कुणावर?
भारताच्या सारख्या प्रजासत्ताक राष्ट्रात अजूनही बऱ्याच राज्यांमध्ये विशेषतः ग्रामीण भागात स्त्रीला अतिशय हीन दर्जाची वागणूक मिळते हे खरंच दुर्दैव म्हणावे लागेल. एकीकडे दुर्गा, कालीमाता, लक्ष्मी इ. देवी रूपांची पूजा करायची आणि दुसरी कडे स्त्रियांची विटंबना … हे कुठल्या शास्त्रात बसतं? नातेसंबंधांमध्ये ज्या प्रमाणे एखाद्या पुरुषाची रूपे आहेत तितकेच किंबहुना भावनिक दृष्ट्या जास्त महत्वाचे पैलू स्त्री रुपाला आहेत. अगदी कुठल्याही पुरुषासाठी जन्म देण्यापासून ते शय्यासोबत करायला देखील स्त्रीच असते. ज्या स्त्रीला हिंदू संस्कृतीने देवता रूप दिलं तिच्यावर आज अनन्वित अत्याचार होतात. नामशेष होणाऱ्या प्रजातीला वाचवण्या साठी ज्या प्रमाणे आवाहन केलं जातं त्याच सुरात “मुलगी वाचवा” असे ओरडून सांगावे लागते? जनावराचा “माणूस” व्हायला खूप काळ जावा लागला पण सद्य परिस्थिती वरून असे वाटते की उलटी गणती चालू झाली असावी …. त्यामुळे माणसांमध्ये “जनावरे” वाढायला लागली आहेत.
हरियाणा (नावात “हरी” …बाकी सगळं शिव शिव) या सार्वभौम भारताच्या एका राज्यात गेल्या एका महिन्यात १५ बलात्काराच्या घटना घडल्या. त्यात बहुतांश घटना या सामुहिक बलात्काराच्या होत्या. ज्या प्रमाणे ४-५ जनावरे श्वापादावर तुटून पडतात त्या प्रमाणे पिडीत स्त्रियांच्या मनाचे आणि शरीराचे लचके तोडले गेले. पोलिसांनी तक्रार नोंदवून घेण्यात पण कुचराई केली. शेवटी प्रसार माध्यमांचा वाढत्या दबावापुढे प्रशासनाला झुकावे लागले आणि चौकशीचे आदेश दिले गेले. अर्थात किती जण पकडले जातील आणि किती जणांना शिक्षा होईल ते हरीच जाणो.
या सगळ्या प्रकारावर कडी केली ते खाप पंचायत आणि माजी मुख्यमंत्री चौटाला यांनी. यांनी उधळलेल्या मुक्ताफळांमुळे सद्सद्विवेकबुद्धी जागृत असणारी समस्त मानव जाती यांच्यावर हसत असेल. खाप पंचायत म्हणते बलात्काराचे प्रमाण कमी करायचे असेल तर मुलींच्या लग्नाची वयोमर्यादा कमी करायला हवी. म्हणजे त्या भरकटणार नाहीत? कसला सॉलिड जावई शोध आहे या पंचायतीचा. १६व्या वर्षी मुलीचे लग्न केल्यावर बलात्कार कमी होतील?? आणि या निर्णयाला चौटाला यांनी चक्क पाठिंबा दिला. नुसताच पाठींबा देऊन ते शांत नाही बसले, त्यांनी बलात्कारांच्या घटनांच्या निषेधार्थ राज्यपालांना आवेदन पत्र पण दिले. ज्या दिवशी सोनिया गांधी हरियाणातील पिडीत मुलीला भेटण्यासाठी गेल्या होत्या त्याच दिवशी बलात्काराच्या ४ घटना घडल्या.
खाप पंचायतीच्या सुचने कडे बघितल्यास खरंच हसावं का रडावं तेच कळत नाही. बलात्काराची व्याख्या यांना सांगायची वेळ आली आहे. बलात्कार कोण करतं? यात सध्यातरी मक्तेदारी पुरुषांकडे आहे. अजून तरी ऐकिवात नाही की एका स्त्रीने पुरुषावर बलात्कार केला. कुठलीही स्त्री स्वतः हून म्हणेल का … ये रे पुरुषा माझ्यावर बलात्कार कर. आणि तिची संमती असेल तर तो बलात्कार होईलच कुठे? असो तर पुरुष जर हे घृणास्पद कृत्य करत असेल तर १६व्या वर्षी लग्न करण्याचे जाच स्त्री करता का? लग्न झालेल्या स्त्रीवर बलात्कार होत नाहीत असं म्हणायचय का खाप ला? उलट कधी कधी खुद्द नवरा नामक नराकडून देखील जबरदस्ती होते आणि ती मुकाट्याने सहन करावी लागते. अशी सूचना हेच करू शकतात. बघा ना. गावातली मुलगी १६ ची झाली रे झाली की तिचं लग्न लावून दिलं. अश्या सगळ्या मुलींचे लग्न जर १६ व्यात झालं की त्या नराधमांना मुलीच मिळणार नाहीत बलात्कारासाठी. आहे की नी गंमत. खाप वाले म्हणतील कसं फसवलं त्या पुरुषांना … आता बसतील हलवत …. काय मुर्खपणा आहे हा. जो अत्याचार करतो तो मुक्त फिरत राहणार आणि जिच्यावर अत्याचार होतो तिचे वैयक्तिक सगळे हक्क डावलून त्या कोवळ्या जीवाला संसाराच्या जोखडाला रेटायच? हे म्हणजे चोर सोडून संन्याश्याला फाशी दिल्यासारखे आहे.
हरियाणात अश्याच काही कन्व्हर्ट झालेल्या जनावरांनी कायद्याला फाट्यावर मारलय आणि अश्या आजूबाजूच्या व्यवस्थेमुळे त्यांच्या अतिरेकाला खतपाणीच मिळत आहे. खरे तर अश्या जनावरांना वेळीच वेसण घातली पाहिजे आणि अश्या प्रवृत्तींना वाचक दिला पाहिजे. नाहीतर उद्या सामान्य माणूस हेच म्हणेल एकीकडे मुलगी जगवा असे आवाहन करायचे आणि दुसरी कडे तिच्याच अब्रुचे धिंडवडे काढायला ही जनावरे टपलेली आहेतच. तिची अवहेलना होण्यासाठी तिला जन्म द्यायचा का असा विचार माझ्यातला “बाप” कायम करत राहील. हरियाणाला लागलेली ही नराधमांची कीड इतरत्र पसरू नये हीच इच्छा.वर्गीकरण
प्रतिक्रिया
बलात्कार
फक्त हरियाणा?
सहमत
हाच तो दुटप्पीपणा...
हरयाणा आणि दिल्ली
गल्फमध्य असल्यामुळे?
:-) जन्माच्या वेळचे प्रमाण, बालपणातले प्रमाण
आज अजून एक भयानक बातमी आलेली
६३ वर्षांच्या म्हातार्याने
६३ वर्षांच्या म्हातार्याने १३ वर्षांच्या मुलीवरती ४ महिने बलात्कारवटवाघुळ मानवा अरे रानटीपणा करणारे हे असे अनेक नराधम समाजात मोकाट हिंडत आहेत. देशभरात बलात्कारांच्या संख्येत आणि बातमीत रोज भर पडत आहे ! या वरील घटनेतील मुलीला आता शाळेतुन देखील काढुन टाकण्यात आले आहे ! :( गेल्या ५ आठवड्यात हरियाणात जळपास १९ बलात्काराच्या घटना घडल्या आहेत ! समाजतला विकॄतपणा दिवसेनदिवस वाढताना दिसुन येत आहे,ज्यात मध्यंतरी एका विकॄत हैवानाने १३ महिन्यांच्या चिमुरडीवर बलात्कार केला होता ! :( सामान्य जनतेचे जिणे भयावह झाले असुन कायद्याचा धाक उरलेला दिसत नाही,शेवटी नागरिकांचा उद्रेक होतो आणि त्याचा परिणाम गुंडांना ठेचुन मारण्यात होत आहे...........
असे किळसवाणे विकृत प्रकार का
वाढत नसावेत...
+१.
लोकांसमोर येण्याचे प्रमाण
लोकांसमोर येण्याचे प्रमाण वाढलेय, निव्वळ संख्या नाही.अहं,असं नाही ! नॅशनल क्राईम रिपोर्टच्या अहवालानुसार का वाढणारा ट्रेंड आहे, दिल्ली बहुधा या बाबतीत आघाडीवर असावी.देशातील स्त्रीयांवर बलात्कार होतात,त्याच प्रमाणे विदेशी महिला पर्यटकांवर देखील बलात्कार होण्याचे प्रमाण वाढले आहे. दोन्ही गोष्टींमुळे देशाचे नाव जागतिक पातळीवर खाली जात आहे,महिला आपल्या देशात सुरक्षित नाही हा संदेश सर्वदूर पसरत आहे. संदर्भः- Rape, the fastest growing crime in India Rape biggest crime trend in India: National Crime Record Bureau The rapes will go onअसे किळसवाणे विकृत प्रकार का
असे किळसवाणे विकृत प्रकार का वाढत असावेत?जर तुमचा युग प्रभावावर विश्वास असेल तर मग.. युद्धिष्ठीर आणि मार्कडेय मुनी यांचातला संवाद वाचला होता,तो इथे देतो. Vana Parva: Markandeya-Samasya Parva