भारतीय संघाचे अभिनन्दन
भारतीय क्रिकेट संघाने १९८३ नंतर आज वर्ल्ड कप जिंकला.
विश्वचशक स्पर्धेतील गेल्या तीन मॅचेस मध्ये ऑस्ट्रेलीया पाकिस्तान च्या चित्तथरारक लढतीनंतर फायनल ला श्रेलंकेविरुद्ध महत्वाची मॅच जिंकून भारताने विश्वचषक जिंकला आहे.
भारतीय संघातील सर्व खेळाडुंचे अभिनन्दन.
भारतीय संघ पुर्वी चांगल्या अवस्थेतून अडचणीत येण्यासाठी प्रसिद्ध होता.
पण या विश्वचषक स्पर्धेत मात्र भारतीय संघ अडचणीवर मात करून अत्यंत टेन्स सिच्यूएशन असतानाही तणावावर मात करून जिंकू शकतो हे दाखवून दिले.
आजच्या मॅचमधले तुम्हाला आवडलेले काही क्षण सांगा.
मला आवडलेले काही
१) धोनीने मारलेला शेवटचा षटकार...त्यावेळेस चेंडूसिक्सरसाठी त्याच्या चेहेर्यावर डोळ्यात यशाचे प्रतिबिंब. याची तुलना १९८३ च्या स्पर्धेचे बक्षीस स्वीकारताना कपीलदेव चे डोळे अक्षरशः चमकत होते
२) भारतीय संघाची फिल्डींग अप्रतीम झाली
३) जहीर खानचा भेदक पहीला स्पेल
४) लसीत मलिंगने घेतलेली सेहवगची विकेट
वाचन
5789
प्रतिक्रिया
0