मला गेले ३ वर्शे अजिबात बोलायची सवय नाहिये, सासु सासरे आले तेव्हा दिवसभर बोलत राहायचे 8| , सवय नस्ल्याने ३-४ दिवस जडच गेले :< . कोणीजर २-३ मिनिटाच्यावर फोन वर बोलले तरी मला सान्गावेसे वाटते कि सरळ च्याटला येउन काय त्या गप्पा मार. :P असा आहे सवयीचा परिणाम :S
चुचु
तुमचा लेख वाचून मर्ढेकरांची कविता आठवली. चांदण्याची आणि नदीची जुनी ओढ, पुन्हा त्या विश्वात जाण्याची इच्छा आहे पण...
आज अंतरात भीती
खुल्या चांदण्याची थोडी;
आणि नदीचा प्रवाह
अंगावर काटा काढी
बरा म्हणून हा इथे
दिवा पारवा पाऱ्याचा
बरी तोतऱ्या नळाची
शिरी धार, मुखी ऋचा
शाळेत असताना नीट कळली नव्हती. असल्या गोष्टी नंतरच कळतात.
राजेश
छान लिहिलंय! लगे रहो मुन्नाभाई या चित्रपटातील सुरुवातीच्या प्रसंगाची आठवण झाली ज्यात जान्हवी म्हणते:
गुड मॉर्निंग मुंबाय!
शहर की इस दौड मे दौडके करना क्या है? जब यही जीना है तो दोस्तों मरना क्या है?
पहली बारीश मे ट्रेन लेट होने की फिक्र है, भूल गये भीगते हुए टहलना क्या है?
सीरिअल्स के किरदारोंका सारा हाल मालूम है, पर मां का हाल पूछनेकी फुरसत किसे है?
अब रेत पे नंगे पाँव टहलते क्यों नही, १०८ है चॅनल फिर दिल बहलते क्यों नही,
इंटरनेट की दुनिया के तो टच मे है, लेकिन पडोस में कौन रहता है ये जानते तक नहीं,
मोबाईल, लँड्लाईन सब की भरमार है, लेकिन जिगरी दोस्त तक पहुंचे ऐसे तार कहां है?
कब डूबते हुए सूरज को देखा था याद है? याद है शाम का गुजरना क्या है??
...
खरंच .. कालाय तस्मै नमः॥
-- मेघवेडा
भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते
मी संध्याकाळी गातो, तू मला शिकवीली गीते..!
मेघवेडा!
मस्तपैकी घड्याळाच्या गजराने, रेडीओवरच्या "वंदे मातरम" ने होणारी सकाळ अनुभवावी. सकाळी मोकळ्या हवेत फिरायला जावं, घरी आल्यावर आईने केलेले गरम गरम पोहे, उकरपेंडी असं खावं. बादलीतल्या पाण्याने आंघोळ , मग शाळेचा गृहपाठ, थोडं इकडे तिकडे उंडारुन, देवाच्या पूजेची तयारी.....आईला फुलं तोडून द्यावी....मस्तपैकी जेवून सायकलवर शाळेत जावं. शाळेत पण दामटून अभ्यास, खेळ, कानगोष्टी, एकमेकांच्या डब्यातला खाऊ, कधी मैत्रिणींशी कट्टी तर कधी गट्टी. रमत गमत घरी आल्यावर दूध प्यायलं की निघावं खेळायला. फ्रीजमधल्या थंड पाण्याऐवजी ते वाळा घातलेलं माठातलं पाणी,
नेटाचं व्यसन लैच बेक्कार. कधी-कधी नेटावर खूप वेळ गेलेला असतो
आणि हाती फार काही आलेले नसतं. तेव्हा या व्यसनापासून दूर राहिलं पाहिजे असे वाटते.
आणि नेट बंद असले आणि नेटावर आलो नाही तर, अस्वस्थपणा अगदी आपल्यासारखाच...! :)
-दिलीप बिरुटे
अगं, अगदी असच काल मनात आलं, जेंव्हा नवर्याच्या कॉप्युटरला व्हायरल इन्फेक्शन झालं ;) आणि माझ्या एकटीच्या कॉम्प्युटरवरच सगळे जण अवलंबून होतो (म्हणजे आहोत सध्या)!
बराचवेळ चुकल्याचुकल्यासारखं वाटत होतं.
बाकि तुझं लेखन अगदी सगळ्यांच्या मनातलं!
रेवती
अगदी सध्याचे वास्तव मांडले आहेस गं! नुस्ता एखादे दिवशी मोबाईल हाताशी नसला की हात शिवशिवत आणि नजर भिरभिरत राहाते. इंटरनेट, कॉम्प्युटरला कसली बाधा झाली असेल तर चुटपुटल्यासारखे होते. मला वाटते, आपणच स्वतःला ह्या सवयींचे गुलाम करून घेतो. म्हणूनच अधून मधून इंटरनेट, कॉम्प्युटर, मोबाईल उपवास शरीर व मनःस्वास्थ्यासाठी फार उत्तम!!! :-)
अरुंधती
http://iravatik.blogspot.com/
आपणच कदाचित कारण असू ह्या गुलामीसाठी. पण आहे हे असं आहे. ह्यामुळे कितीतरी गोष्टी करायच्या राहून जातात. सगळा वेळ नेटावरच निघून जातो.
किती दिवसात हातात पुस्तक घेऊन वाचायचं राहून जातं. कितीतरी दिवसात जुना किशोर ऐकलेला नसतो, कितीतरी दिवसात चांदण्यांनी भरलेलं आकाश सुद्धा बघितलं नसतं.....वेळच नसतो. आयुष्य हळुच निसटून जातं आणि शेवटी काय काय करायचं राहून गेलं ह्याची फक्त यादीच जवळ राहते.
असो........ अरुंधती म्हणतेय तसा एकेक दिवस उपास करुन बघायला हवा :)
प्रतिक्रियांबद्दक्ल खूप खूप धन्यवाद :)
खरे आहे. लेखातल्या भावनेशी सहमत!
आता तपशील विसरले, पण मला वाटते सुधीर गाडगिळांच्या मुद्रा का अशाच कोणत्या पुस्तकात एका मराठी कुटुंबाचे वर्णन असे आहे, की ते आठवड्यातला एक दिवस सगळ्या आधुनिक सोयी-सुविधांपासून दूर काढतात - ठरवून आणि लहानांपासून मोठ्यांपर्यंत. तसे करण्याचा मोह होतो, पण जमतेच असे नाही.
गरज्...मनाची...कोणाला तरी आपल्या भावना सांगण्याची गरज्,कुठेतरी स्वतःला व्यक्त करण्याची गरज्... कुठेतरी आपलं अस्तित्व आहे हे दाखवण्याची गरज... या मायाजालाची सवय ज्याला लागते तो व्यसनाधीन होतोच होतो. :)
जितका जास्त वेळ जो इथे घालवतो तितकाच जास्त तो याच्या अधिन होतो.
जरी हे आभासी जग असलं तरी ते खर्या लोकांनीच बनवल आहे आणि त्यांची यातील भावनिक गुंतवणुक देखील तितकीच खरी आहे.जितकी भावनिक गुंतवणुक जास्त तितकाच त्रास देखील जास्त...म्हणुनच ज्या प्रमाणे पाण्याबाहेर काढलेल्या माशाची तडफड होते त्याच प्रमाणे नेट ग्रस्त व्यक्तीची नेट बंद झाल्यावर तीच गत होते.
उपाय :--- आधी नेट नव्हतं तेव्हाही जग चालतच होत तेव्हा अधुन मधुन नेटशी स्वत:हुन कट्टी फू करायच आणि आभासी जगास काही काळ लांब ठेवायच.
अर्थात हे सांगण सोप आहे आणि तसं वागण कठीण... ;) पण स्वतःला टेस्ट करत राहायच.
मदनबाण.....
मोती बनून शिंपल्यात राहण्यापेक्षा दवबिंदू होऊन चातकाची तहान भागविणे जास्त श्रेष्ठ.
www.mazeyoutube.blogspot.com
पण हा कोष आपण स्वतःच बांधुन घेतलाय....तोडुन टाका पाश! मुक्त व्हा!!!
जाणीवपुर्वक यंत्रापासुन लांब रहा, घरी जाताना २ स्टॉप अलिकडे ऊतरुन चालत जा, नविन माणसे दिसतील, नविन ओळखी होतील. सकाळी लवकर ऊठुन फीरायला जा, रात्री कट्ट्यावर ५ मिनिटे हजेरी लावा.. वेळ झालाच तर शेजारच्या आजींशी बोला, एखाद्या लहान मुलाचे लाड करा, सुटीच्या दिवशी चार लोकांच्या घरी जा, जुन्या मित्राला, मैत्रिणीला भेटा..आठ्वणींना ऊजाळा द्या!!
हे असले तुणतुणे जरा जास्त पैसे बाळगुन असलेली लोकंच वाजतात, असे आढळुन आले आहे. पैसे आले की गरज भासु लागते, मग अजुन पैसे, मग परत नवी गरज...मग पैसा!! हळु हळु माणुस मशीन बनतो ..मग कसल्या आल्यात भावना??
आई, वडील, भाऊ, बहीण अश्या भरलेल्या घरातुन ४ खोल्यांच्या घरात नवरा-बायको आणि मुले असा एकसुरी संसार मांडताना मनाला वेदना होत नाहीत? आई-बापाला मायदेशी ठेवुन करीयरचे गोंडस कारण देऊन परदेशी जाताना, काहीच वाटत नाही?
चार पैसे कमी मिळाले तरी चालतील.. पण मानसिक समाधान महत्वाचे!!
दुर्जनं प्रथमं वंदे सज्जनं
तदनन्तरं | मुखप्रक्षालनात पूर्वं गुदप्रक्षालनं यथा ||
का लोकं आंतर्जालाविषयी तक्रार करतात मला समजत नाही. गेल्या दहा वर्षात माझ्या जितक्या नवीन, समधर्मी लोकांशी ओळखी झाल्या नाहीत तितक्या माझ्या गेल्या दोन महिन्यात उपक्रम व मिपा वर लेखन केल्यामुळे झाल्या. कित्येकांनी माझ्या लेखनावर साधकबाधक चर्चा केली, प्रतिसाद दिले, कौतुक केलं, आणि उणीवाही दाखवल्या. हे खऱ्या जगातल्या तोंड असलेल्या मित्रांमध्ये मला शक्य झालं नव्हतं. ज्यांना मी आत्तापर्यंत लेखन दाखवलं त्यांनी 'वा चांगलं आहे' या मैत्री/नात्यातून येणाऱ्या प्रतिक्रियेपलिकडे कधी काही सांगितलं नाही.
माझ्या शेजाऱ्याशी माझी ओळख नसेल, पण माझ्यापासून हजारो मैल दूर राहाणाऱ्या मुक्तसुनीत, धनंजय, शुची, बिपिन, आणि आणखीन अनेक कितीतरी लोकांशी मी आंतर्जालाशिवाय कसा संवाद साधू शकलो असतो? चेहेरा दिसणे, स्पर्श करता येणे या वाईट गोष्टी नाहीत. पण त्या चेहेऱ्यावर असलेल्या तोंडातून व आत असलेल्या मेंदूतून जर मला हव्याशा वाटणाऱ्या कवितांविषयीच्या चर्चा नसतील, आणि त्याच्या पोरांच्या शाळेविषयीच्या पंचवीस वेळा ऐकलेल्या तक्रारी असतील तर मी का खरा चेहेरा अधिक चांगला मानावा?
शेवटी योग्य संतुलन चांगलं हे खरंच, पण केवळ आपण लहानपणी एक विशिष्ट जीवनपद्धती जगलो, आणि लहानपणी जीवन सुंदर होतं म्हणून ती जीवनपद्धती चांगली असं नाही. किंवा आजची वाईट असंही नाही. उगाच मॅसोचिस्टीक स्वबडवेगिरी का करावी? लहानपणी आपण स्वच्छंद, आवडेल तसं मनसोक्त केलं. मग आज जर आपल्याला आंतर्जाल आवडत असेल तर ते मनसोक्त का उपभोगू नये? (अधूनमधून मोकळ्या हवेत जाऊनच, अर्थात...)
राजेश
राजेश..... तुम्ही म्हणताय ते सगळं अगदी पटलं. नेटचे तुम्ही म्हणताय तसे खूप फायदे आहेत.....नक्कीच ते मान्य करायला हवेत. म्हणणं फक्त इतकच की त्याच्या आहारी जाऊ नये. दूर देशातल्या कुणा ८-१० अनोळखी लोकांच्या ओळखीसाठी आपली घरची मंडळी दुर्लक्षिल्या जायला नकोत इतकंच :)
आपल्या लहानपणी जसं आयुष्य सुंदर होतं..तसंच ते आजही आहे पण ते तसंच सुंदर ठेवण्यासाठी स्वतःला काही बंधनं, शिस्त नक्कीच घालायला हवीत.
राजेश यांची प्रतिक्रिया पटली.
या नवनवीन सोयी सुविंधामुळे खरच खुप फायदे झाले आहेत. गुगलबाबाने तर कमाल केली आहे. यापुढेही उत्क्रांती ही होतच रहाणार. मला नाही माणसं लांब गेली आहेत उलट जवळच आली आहेत.
शेवटी आपण या सगळ्या गोष्टींचा ताळ्मेळ कसा करतो हे आपल्याच हातात आहे.
प्रतिक्रिया
मला गेले ३
लै भारी !!
ट्टॉक !!!!
किती तरी दिवसांत, नाही चांदण्यात गेलो...
+१
मस्त!
मस्तपैकी
+१
मस्त लिहिलंय...!
छान
अगं, अगदी
सांभाळून रहा
मलाही जाम
अगदी
आपणच
अगदी अगदी!!
इन्टरनेटा
हम्म
आवडलं लेखन
गरज्...मनाच
सुरवंट झालाय...
आंतर्जालाच्या बाजूने काही...
वेगळा
राजेशचा
राजेश.....
राजेश