मानवी ज्ञानभांडार
मानवी ज्ञानभांडार: यनावाला
पृथ्वीवरील चराचर सृष्टी निसर्गनियमांनुसार निर्माण झाली आहे. सर्व नैसर्गिक घटना या नियमांनुसारच घडतात. हे निसर्गनियम कोणी बदलू शकत नाही. त्यांचे अतिक्रमण म्हणजे उल्लंघन कोणी करू शकत नाही. मात्र हे निसर्गनियम शोधून काढण्याची क्षमता मानवी बुद्धीत आहे. हे निसर्गनियम सर्व ठिकाणी, सर्वकाळी सारखेच असतात. भौतिकी, रसायन, जीवशास्त्र, अशा विविध ज्ञान क्षेत्रांतील संशोधकांनी अथक प्रयत्न करून अनेक निसर्गनियम शोधले. त्या नियमांची सत्यासत्यता ठरविण्यासाठी वैज्ञानिक पद्धत विकसित केली . तदनुसार हे नियम तपासले. पुन:पुन्हा पडताळले. त्यांतील सत्यनियमांचा संग्रह म्हणजे मानवी अर्जितज्ञानभांडार. अर्जित म्हणजे (निसर्गातून) प्राप्त केलेले. हे नियम मानवाने निर्माण केले नाहीत. निरीक्षणे, कल्पनाशक्ती, तर्कशक्ती आणि अपोहन (तर्कशुद्ध निष्कर्ष काढण्याची बुद्धीची क्षमता) यांच्या आधारे निसर्गातून शोधले.
केवळ सत्यासत्यतेच्या वैज्ञानिक कसोट्यांना उतरणार्या तत्त्वांचा, नियमांचा मानवी ज्ञानभांडारात समावेश असतो. त्यामुळे या भांडारातील सर्व नियम आणि तत्त्वे विश्वसनीय असतात. या तत्त्वांच्या आधारे निर्माण झालेले तंत्रज्ञान इच्छित कार्य करतेच, असा सार्वत्रिक अनुभव येतो. त्यामुळे मानवाच्या या अधिकृत ज्ञानभांडाराची विश्वासार्हता वादातीत आहे. आपण शाळा-कॉलेजांत मानवअर्जित ज्ञान म्हणून शिकतो ते या भांडारातील असते. जगभरातील सर्व अधिकृत शिक्षणसंस्थांत हेच ज्ञान शिकवितात. या ज्ञानावर कोणाचा एकाधिकार (मोनापॉली) नाही. (तंत्रज्ञानावर असू शकतो.) सर्वांना ते मुक्तपणे उपलब्ध आहे. या भांडारातील तत्त्वे, नियम सत्य मानणे म्हणजे ग्रंथप्रामाण्य मानणे नव्हे.
खगोलशास्त्राच्या पुस्तकात ग्रह-तारे यांची माहिती असते. आपल्या सूर्यमालेतील सर्व ग्रह, प्रत्येकाचे वस्तुमान, आकारमान, भ्रमणकक्षा ,भ्रमणकाळ, सूर्यापासून अंतर अशा सर्व गोष्टी या पुस्तकात असतात. नक्षत्रे, राशी, सूर्य-चंद्राची ग्रहणे यांविषयी परिपूर्ण माहिती असते. पण खगोलशास्त्राच्या कोणत्याही अधिकृत पुस्तकात शनीची साडेसाती, मंगळाची बाधा, गुरुपुष्ययोग, कालसर्पयोग, त्रिकोणयोग, लाभयोग अशा गोष्टींचा उल्लेख कधीही नसतो. माणसाच्या जीवनावर ग्रह-तार्यांचा काही परिणाम होतो असेही कुठे लिहिलेले नसते. कारण हे (शनीची साडेसाती इ.) सत्यज्ञानाचे विषय नाहीत. ते भ्रमित ज्ञानाचे म्हणजे अज्ञानाचे विषय आहेत. त्यांना अधिकृत मानवी ज्ञानभांडारात स्थान नाही.
जीवशास्त्राच्या पुस्तकात उत्क्रांतिवादाचे विवरण असते. पृथ्वीवर जीवसृष्टी कशी निर्माण झाली याविषयी लिहिलेले असते. पण ,"ईश्वराने ही सृष्टी निर्माण केली." असे विधान जीवशास्त्राच्या कुठल्याही अधिकृत पुस्तकात नसते. ईश्वर या शब्दाचा उल्लेखही नसतो. तसेच शरीरशास्त्राच्या पुस्तकात हृदय, मेंदू, यकृत अशा सर्व इंद्रियांविषयी सांगोपांग लिहिलेले असते. पण त्यात तथाकथित हृदयस्थ आत्म्याचा उल्लेख कुठेही नसतो.
आपण शाळा-कॉलेजात शिकलेले ज्ञानविषय आठवा. म्हणजे हे पटेल. थोडक्यात म्हणजे देव-धर्म-श्रद्धा, आत्मा-पुनर्जन्म-मोक्ष अशा कुठल्याही गोष्टीचा अंतर्भाव मानवाच्या सत्यज्ञानभांडारात नाही. तसेच जगात वैज्ञानिक शिक्षणाच्या अनेक संस्था आहेत. त्यांतील कुठल्याही संस्थेच्या ग्रंथालयात बायबल, कुराण, वेद, गीता, ब्रह्मसूत्रे अशा कुठल्याही धर्मग्रंथाला स्थान नाही.
यावरून देव-धर्म-श्रद्धा-आत्मा-पुनर्जन्म, मोक्ष -परलोक हे ज्ञानाचे विषय नाहीत हे स्पष्ट होते. तसेच मेंदुविज्ञानाच्या पुस्तकात अतींद्रिय शक्ती, परामानसशास्त्र, दिव्यदृष्टी, सूक्ष्म देह अशा कोणत्याही कल्पनेला स्थान नसते. म्हणून तेही ज्ञानाचे विषय नव्हेत.
हे सर्व इतके स्पष्ट असताना अनेक सुशिक्षित माणसे फलज्योतिषाच्या नादी का लागतात ? आत्मा, पुनर्जन्म मोक्ष अशा भ्रामक कल्पनांवर श्रद्धा का ठेवतात ? अन्त्यसंस्कारांत दहावे- बारावे-तेरावे- मासिक श्राद्ध करून सहस्रावधी रुपये व्यर्थ का घालवतात ? ज्यावर काही निरर्थक अक्षरे कोरली आहेत असा वीस रुपये किंमतीचा निरुपयोगी पत्रा ५००/रु.ना विकत घेऊन श्रीयंत्र म्हणून त्याची पूजा का करतात? अशी पूजा केल्यावर आपल्यावर लक्ष्मी प्रसन्न होईल असे त्यांना कशाच्या आधारे वाटते ? अशी लक्ष्मीकृपा होत असती तर समाजात इतके दारिद्र्य कसे दिसले असते? असे सोपे प्रश्न त्यांच्या डोक्यात कधीच कसे येत नाहीत ? माणसाची बुद्धी इतकी रसातळाला कशी जाते ? खरोखर आता आपण अज्ञानाचा त्याग करून ज्ञानाची कास धरायला हवी.
*****************************************************************************
वर्गीकरण
प्रतिक्रिया
:)
काही शंका आहेत.
मागच्या लेखाच्या वेळेस जराशी
मागच्या लेखाच्या वेळेस जराशी
खरेतर मी असे बोलणे उचित नाही,
आला आला यनावाला सरांचा नवीन
लेखामागची तळमळ समजते आहे....
हे सर्व इतके स्पष्ट असताना
निरीक्षणे, कल्पनाशक्ती,
केवळ सत्यासत्यतेच्या
जीवशास्त्राच्या पुस्तकात
हे सर्व इतके स्पष्ट असताना
पण खगोलशास्त्राच्या कोणत्याही
माणसाची बुद्धी इतकी रसातळाला
ज्यावर काही निरर्थक अक्षरे
यनावाला यांचे लेख मंजे
भारतातील महत्वाचे वैज्ञानिक
डॉ.अब्दुल कलाम
ही त्याची लिंक http://www