प्रेम पुन्हा एकदा असफल होते तेव्हाच्या या हताश भावना. पण छातीमध्ये, हाताना लागली नाही तरी सुरावट त्याला जाणवत राहाते, हाच आशेचा मंत्र, हेच त्याचे माणूसपण.
नन्दू, ही कविता तुमची नसली तरी मूळ कवीकडून तुम्ही परवानगी घेतलीच असेल. कवीला माझे अभिनंदन कळवावे.
तो भितो
नीरव रात्री वाद्यांच्या किंचाळण्याला
त्याचे हात थरथरतात अपराध्यासारखे
दळभद्री,कुचकामी हात ऊचलुन
मनातल्या मनात तो वाद्यांना सांगतो
तुम्ही जड आहात्
तुम्हाला कळणार नाहित जुलमींनो
माझ्या काळजातल्या अलवार सुरावटी
नाजुक अनि सुक्ष्म
नंन्दु,
कवीला कळवा फारच वेदना घेऊन येणारी कविता आहे, अस्वस्थेतेचा हुंकार वाद्यांच्या निमित्ताने सहीच आला आहे.
कविता खूप काही बोलणारी आहे, कविता आणि शब्द खूपच आवडले !!!
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
सुंदर कल्पना
छान..
मस्त