Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by सुबोध खरे on Wed, 07/06/2016 - 19:52
प्रतिजैविके समज आणि गैरसमज. सर्वप्रथम सूक्ष्म जीव म्हणजे काय? सर्वात सूक्ष्म म्हणजे विषाणू किंवा व्हायरस. हा सजीव आणि निर्जीव यांच्या सीमेवर असलेला, जीव आणि रसायन यामधील अवस्था. याचे स्फटिकिकरण करता येते आणि हे स्फटिक युगानू युगे तसेच राहू शकतात. हा फक्त दुसऱ्या पेशींच्या अंतर्भागात सक्रिय होऊ शकतो अन्यथा एखाद्या रसायनासारखा मृतप्राय असतो. उदा पोलियो एड्स कांजिण्या इ यानंतरचे काही जीव रिकेटसिया आणि क्लॅमिडिया हे जिवाणू आणि विषाणू यांच्या मध्ये आहेत. यानंतर येतात ते जिवाणू (म्हणजे बॅक्टेरीया) हे एक पेशीय जीव असून यात चयापचय क्रिया (metabolism) चालू असते. उदा स्टॅफिलोकॉकस, टायफॉईड याचे जंतू. या बरोबरच एकपेशीय बुरशीची निर्मिती झाली. उदा यीस्ट/ किणव जगाची सुरुवात झाली तेंव्हा सर्व प्रथम एक पेशीय वनस्पती आणि प्राणी तयार झाले. आणि त्यांच्यात स्पर्धा सुरू झाली. यात स्पर्धेत टिकून राहण्यासाठी त्यांनी वेगवेगळे उपाय शोधण्यास सुरुवात केली. जिवाणू आणि बुरशी (fungus) यांनी त्याच अन्नासाठी स्पर्धा सुरू केली यावेळेस बुरशीच्या पेशींनी जिवाणूची वाढ होऊ नये म्हणून काही गुंतागुंतीची रसायने निर्मिती सुरू केली.आणि ही रसायने त्या आपल्या आजूबाजूच्या वातावरणाचे पाझरून तेथे असणाऱ्या जिवाणूंच्या वाढीस प्रतिबंध करीत हीच रसायने म्हणजे अँटीबायोटिक्स किंवा प्रतिजैविके. यातील पाहिले प्रतिजैविक म्हणजे पेनिसिलीन. याचा शोध डॉ अलेक्झांडर फ्लेमिंग यांना योगायोगानेच लागला. जिवाणू जगत असताना त्याच्या पेशीभिंतीची(cell wall) ची झीज चालू असते. ही झीज तो जिवाणू दुरुस्त करीत असतो. पेनिसिलीन ही झीज दुरुस्त करण्याच्या कामात लागणाऱ्या रसायनांच्या कामात अडथळा आणते. यामुळे जिवाणूच्या भिंती सच्छिद्र बनतात त्यामुळे त्याची पेशी बाहेरील अतिरिक्त पाणी शोषून फुगून येते आणि जिवाणूंचा मृत्यू होतो. प्राण्यांच्या शरीरात पेशींना असलेली भिंत नसतेच तर फक्त एक पटल (membrane) असते त्यामुळे पेनिसिलिनचा प्राण्यांच्या( मानवाच्या) शरीरावर अजिबात परिणाम होत नाही. यामुळे पेनिसिलीन आणि त्याच्या गटातील किंवा तशाच तर्हेचे असलेलं केफ्लॉस्पोरीन गटातील प्रतिजैविकांचा मानवी शरीरावर परिणाम अत्यंत नगण्य होतो. १) विषाणू हे दुसऱ्या पेशींच्या अंतर्भागातच सक्रिय असल्यामुळे त्यांच्यावर प्रतिजैविकांचा मुळीच परिणाम होत नाहीत. यामुळेच प्रतिजैविके ही फक्त जिवाणूजन्य रोगात वापरली जातात विषाणूजन्य रोगात नाही. २) आपल्याला झालेला रोग हा जिवाणूजन्य आहे की विषाणूमुळे आहे की बुरशीमुळे झालेला आहे हे समजून येण्यासाठी साडेपाच वर्षांचा एम बी बी एस हा कोर्स केलेले आणि त्यावर अनेक वर्षे अनुभव घेतलेले डॉक्टर असतात. दुर्दैवाने केवळ लक्षणे पाहून लोक स्वतः औषधे घेतात, कारण मागच्या वेळेस शेजारच्या गण्याला किंवा आपल्या बंडूला अशाच लक्षणांसाठी आपल्या डॉक्टरने हीच औषधे दिलेली असतात. काही लोक मागच्या वेळेस हगवण लागली असताना डॉक्टरांनी एंटेरो क्विनॉल किंवा तत्सम औषध दिले होते म्हणून दुसर्या वेळेसही "स्वतःच" ते औषध घेतात. दुर्दैवाने त्याच्या मागील कार्यकारण भाव माहीत नसल्याने ते काही वेळेस होमियोपथिक डोस घेतात जो झुरळाला किंवा डासाला पुरेल इतका असतो नाहीतर व्हेटरनरी डोस घेतात. ६० किलोच्या माणसाला लागणारा डोस ऐवजी ४०० किलोच्या रेड्याला लागणारा डोस घेतात. ३) किंवा जवळच्या केमिस्टकडे जाऊन त्याच्या कडून घसा फार दुखतो किंवा हगवण लागली आहे या लक्षणांसाठी अशी औषधे मागून घेतात. केमिस्ट सुद्धा आपलं धंदा चालवण्यासाठी किंवा स्वस्तात लोकप्रियता मिळवण्याच्या मागे असल्याने सर्रास अशी औषधे देतात. १००% डॉक्टर असे केमिस्टकडे अर्धवट औषधे घेऊन आलेले रुग्ण रोज पाहत असतात आणि जवळ जवळ १००% केमिस्ट अशी औषधे देतात. अर्ध्य हळकुंडाने पिवळे होण्याचे यापेक्षा दुसरे उदाहरण नाही. १० नंतर २ वर्षे डिप्लोमा केलेले (डी. फ़ार्म) केमिस्टच्या दुकानात बसून डॉक्टरकी करत असतात. ना त्यांना त्यातील रसायन शास्त्राचा गंध असतो ना त्यामागील जीवशास्त्रीय प्रक्रियेचा. ४) लोक सुद्धा अशी औषधे का घेतात. -सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे डॉक्टरच्या फी चे पैसे वाचवणे. यानंतरची कारणे -- तेथे लागणारा वेळ वाचवणे आणि कधी कधी डॉक्टर बाहेरचे अरबट चरबट खाल्ले, दारू पिऊन नको त्या गोष्टी केल्या म्हणून आपली हजेरी घेतील या भीती मुळे. ५) मुद्दामहून पसरविले गैरसमज - बहुसंख्य होमियोपॅथ (८०% च्या वर आपल्या पाथीचा प्रचार करण्यासाठी सर्रास असे सांगताना आढळतात की ऍलोपॅथीचे डॉक्टर अँटीबायोटिक्स देऊन रोग "तिथल्या तिथे दाबून टाकतात". होमियोपॅथी मध्ये आम्ही रोगाचा मुळापासून नायनाट करतो म्हणून आमची औषधे स्लो असली तरी परिणामकारक असतात. आपली रेषा मोठी करण्यासाठी दुसऱ्याची रेषा लहान करण्याची ही हीन प्रवृत्ती आहे. याबद्दल मला अजून काही म्हणायचे नाही. ६) अँटीबायोटिक्स "उष्ण" पडतात. आयुर्वेदाच्या वैद्यांनी हा एक जाणून बुजून पसरविलेला गैरसमज आहे. ऍमॉक्सीसिलीन सारखेच प्रतिजैविक साधारण २५० ते ५०० मिग्रॅ (कॅप्सूल) दिवसात तीन वेळेस दिले जाते. परंतु गनोरिया सारख्या गुप्तरोगावर जेंव्हा रुग्ण परत येण्याची शक्यता कमी असे तेंव्हा आम्ही एक वेळेस ३.५ "ग्राम" म्हणजे २०५ मि ग्रॅम च्या १४ कॅप्सूलच्या समकक्ष औषध रुग्णास द्रवस्वरूपात देत असू शिवाय ते औषध (शरीरात जास्त काळ राहावे) मूत्रपिंडातून बाहेर पडू नये म्हणून २ ग्रॅम प्रोबेनेसीड हे दुसरे औषद्ध देत असू. शेकडो रुग्णांना असा एकच डोस देऊन त्यांचे गुप्त रोग बरे झालेले मी स्वतः पाहिलेले आहेत. सांगण्याचे तात्पर्य हे की औषध "उष्ण" पडते हा मुद्दाम पसरवलेला गैरसमज आहे. ७) आम्हाला अतिशय अशक्तपणा, चक्कर येणे, घाम येणे उलटीची संवेदना होणे किंवा तोंडाला चव नसणे अशी लक्षणे औषध घेतल्यावरच का होतात? आम्ही काय खोटं बोलतो का असे रुग्ण विचारतात. याचे साधे उत्तर असे आहे की आपल्या शरीरात जंतूंनी प्रवेश केलेला असतो तुमची प्रतिकार शक्ती जेंव्हा जंतूंचा नाश करण्यास कमी पडते तेंव्हाच तुम्हाला रोग होतो आणि हे शरीरात शिरलेले जंतू दर २४ तासात दुप्पट या वेगाने प्रजनन करीत असतात. तुमच्या शरीरातील खर्वनिखर्व जंतू जेंव्हा प्रतिजैविके दिल्यावर मृत्यू पावतात तेंव्हा त्यांच्या पेशीतील विषे तुमच्या शरीरात पसरतात. आणि यामुळे तुम्हाला अतिशय आजारी असल्याची ही सर्व लक्षणे दिसू लागतात. देवनारच्या कचरा मुंबई भर पसरलं तर मुंबईची काय परिस्थिती होईल तशीच ही परिस्थिती आहे. जोवर या सर्व कचर्याचा निचरा होत नाही तोवर आपल्याला आजारी असल्याची संवेदना असते. दुर्दैवाने बहुसंख्य आधुनिक डॉक्टरना या गोष्टी समजावून सांगायला (आणि रुग्णांना समजावून घ्यायला) वेळच नसतो. यामुळे काय होते रुग्ण दोनच दिवस औषध घेऊन बंद करतात आणि रोगाचे जंतू पूर्ण नष्ट व्हायच्या अगोदरच प्रतिजैविक बंद केल्याने शरीराच्या प्रतिकारशक्तीवर जंतुनाशाच्या अतिरिक्त कामाचा ताण पडतो आणि रुग्णाला अजूनच अशक्तपणा जाणवतो. या आगीत तेल ओतायला आणि आपली पोळी भाजून घ्यायला होमियोपाथ किंवा आयुर्वेदिक तज्ज्ञ तयारच असतात. ८) प्रतिजैविके ही शेवटी रसायनेच असतात त्यांचा आपला जसा परिणाम असतो तसे काही दुष्परिणाम असतोच. पण हे साईड इफेक्ट्चे तुणतुणे इतर पॅथीचे लोक इतके वाजवतात की लोकांना तेच जास्त खरे वाटू लागते. काही प्रतीजैविके यकृत (लिव्हर) मूत्रपिंड (किडनी) वर परिणाम करतात. त्यामुळे कोणत्या रोगात कोणते औषध घ्यायचे हे सुशिक्षित डॉक्टर ला नक्की माहिती असते. अर्ध शिक्षित किंवा अशिक्षित केमिस्ट कडून किंवा सर्वज्ञ रुग्णाने स्वतः अशी प्रतिजैविके घेतल्यास त्याला जबाबदार कोण? "अँटी बायोटिक च्या सेवनाने कीडनि निकामी होऊ शकते".हे अत्यंत अपुऱ्या माहितीवर केलेले अज्ञान मुलक विधान आहे. हे जर खरे मानले तर मूत्रपिंडाच्या संसर्गाला(urinary tract infection-- UTI ) कोणते औषध देणार? हा रोग ३३% स्त्रियांना केंव्हाना केंव्हा तरी होतोच. ९) औषध कंपन्या , केमिस्ट आणि डॉक्टर यांचे हितसंबंध गुंतलेले असतात. ही गोष्ट "नवीन" नाही. पण यात "अँटीबायोटिकच जास्त" घेतले जाते असे नसून बऱ्याच वेळेस झिंक सेलेनियम सारखी सूक्ष्म द्रव्ये किंवा जीवनसत्त्वे आणि खनिजे जिनसेंग, स्पायरुलीना सारखी सुपर फूड याचा मोठा वाटा आहे.शिवाय ही औषधे जीवनावश्यक वर्गात मोडत नसल्याने त्याच्या किमतीवर नियंत्रण नाही. याविरुद्ध बरीच प्रतिजैविके हिची जीवनावश्यक श्रेणीत असल्याने त्यांच्या किमतीवर निर्बंध आहेत. अशा टॉनिक सारख्या औषधांचा डोस कितीही दिवस देता/ घेता येतो. अँटीबायोटिक तुम्ही फार तर पाच दिवस घ्याल. यानंतर एक फार महत्त्वाचा विषय मी मांडू इच्छितो-- "अँटी बायोटिकला प्रतिकार करणाऱ्या जिवाणूंची वाढ" मुळात तुम्ही जेंव्हा दोन दिवस प्रतिजैविक घेता तेंव्हा सुरुवातीला त्याला सर्वात जास्त संवेदनशील(SENSITIVE) असणारे जिवाणू मरतात आणि जे जिवाणू त्या प्रतिजैविकाला कमी संवेदनशील(resistant) असतात ते जिवंत राहतात. यानंतर आपण जर प्रतिजैविक बंद केले तर हे कमी संवेदनशील(resistant)जिवाणू शरीरात जिवंत राहतात आणि त्यांची पुढची पिढी मुळात त्या प्रतिजैविकास कमी प्रतिसाद देणारी (resistant)जन्मास येते. ही प्रक्रिया वारंवार घडल्याने प्रतिजैविकास अजिबात दाद ना देणारे जिवाणू शिल्लक राहतात आणि जे संवेदनशील असतात ते जिवाणू नष्ट होतात. असे करत करत अनेक प्रतिजैविकाना दाद न देणारे(multi drug resistant) जिवाणू नैसर्गिक निवड तत्वाने(natural selection) जिवंत राहतात. अशा जिवाणूंचा फार वेगाने प्रसार होतो. अशाच जिवाणूची एक जात म्हणजे NDM १ पहा https://en.wikipedia.org/wiki/New_Delhi_metallo-beta-lactamase_1 १०) एकंदरीतच अँटी बायोटिक चे अनेक वाईट दूरगामी परिणाम असतात हा परत बऱ्याच इत्तर पॅथीच्या व्यावसायिकांनी जाणून बुजून पसरविलेला अत्यंत दुर्दैवी गैरसमज आहे. १९४२ मध्ये पेनिसिलिनचा वापर सुरू होण्याच्या अगोदर लोक शेकड्यानीच नव्हे तर हजारांनी प्लेग, कॉलरा, हगवण किंवा विषमज्वर या रोगांनी मरत होते. या काळात आयुर्वेद किंवा होमियोपॅथी सारख्या इतर पद्धती होत्याच परंतु त्यांना या कोणत्याही रोगाचा प्रसार थांबवता आला नाही ही वस्तुस्थिती आहे. कित्येक अकाली मृत्यू त्यांना थांबवता आले नाहीत ही वस्तुस्थिती नाकारून ते एकंदरीतच अँटी बायोटिकला शिव्या देताना आढळतात यापेक्षा दैवदुर्विलास दुसरा नसेल. बालविधवांच्या पिढ्याच्या पिढ्या अशा रोगांमुळे दुःखात खितपत पडलेल्या अशा कथा त्या कालच्या साहित्यात सहज वाचायला मिळतात.प्रत्येक एकत्र कुटुंबात अशी एखादी बालविधवा सर्रास असे. प्रतिजैविकांचा अतिरिक्त वापर करणार्यात केवळ इतर पॅथीचे व्यावसायिक केमिस्ट आणि स्वतः औषधे घेणारे रुग्णच नव्हे तर आधुनिक डॉक्टरही दिसतात याची काही कारणे १) रुग्णाला आजच्या झटपट काळात एक दिवसात बरे व्हायचे असते त्यामुळे तो डॉक्टरवर दबाव टाकताना दिसतो. :"डॉक्टर परवा माझे प्रेझेन्टेशन आहे तेंव्हा परवापर्यंत काहीही करून मला बरे करा. नवीन व्यवसाय सुरू केलेल्या डॉक्टरला याला नकार देणे शक्य नसते. आणि जुन्या डॉक्टरला नेहमी येणार माणूस असेल तर त्याला नकार देणे वैयक्तिक संबंधामुळे शक्य नसते २) जेंव्हा रोग निदान नक्की नसते की हा विषाणूमुळे रोग झाला आहे का जिवाणूमुळे अशा वेळेस डॉक्टर स्वतःच्या सुरक्षिततेचा उपाय( to be on safer side) अँटीबायोटिकचा एक कोर्स लिहून देतात.रुग्ण दोन दिवसात बरा झाला तर अर्ध्या वेळेस स्वतः हून औषध थांबवतो. ३) मोठ्या शल्यक्रियेनंतर सर्जन परत उगाच धोका( why take chances) नको म्हणून एकदम उच्च दर्जाचे प्रतिजैविक देतात. antibiotic resistanceची चिंता मी कशाला करू हा विचार त्यामागे असतो. ४) दीड शहाणे किंवा सर्वज्ञ रुग्ण डॉक्टरवर दबाव टाकतात आणि सांगतात की मला चांगले अँटी बायोटिक द्या. अशा वेळेस डॉक्टर "माझ्या बापाचे काय जाते" म्हणून लिहून देतात. हा विषय कित्येक पी एच डी करता येईल इतका खोल आणि विस्तृत आहे. त्यात खोलवर जाण्याची माझी लायकी नाही यास्तव इथेच थांबतो.
  • Log in or register to post comments
  • 129479 views

प्रतिक्रिया

Submitted by कैलासवासी सोन्याबापु on Tue, 07/12/2016 - 14:46

In reply to डॉक्टर साहेब, धाग्याच्या by धनंजय माने

Permalink

ससुरे तोहर कारण हमर अंतडीया

ससुरे तोहर कारण हमर अंतडीया हस हस के लपेटा मार देईस, पहले हमर अंतडीया ठीक करने का इलाज म जो लागत आयेगा ओकर भुगतान करीबे करो तुम =)) =)) =))
  • Log in or register to post comments

Submitted by आनंदी गोपाळ on Tue, 07/12/2016 - 14:47

In reply to ससुरे तोहर कारण हमर अंतडीया by कैलासवासी सोन्याबापु

Permalink

इ का कहत हो बापू? मिलिटरी

इ का कहत हो बापू? मिलिटरी अस्पतालवा बंद हुई गवा का ;)
  • Log in or register to post comments

Submitted by कैलासवासी सोन्याबापु on Tue, 07/12/2016 - 14:50

In reply to इ का कहत हो बापू? मिलिटरी by आनंदी गोपाळ

Permalink

लो तेरी तो! आपको का बताए

लो तेरी तो! आपको का बताए पॅरामिलिटरी का भंगटा!!, ऐसा समझो हमारे वास्ते बंद है अस्पताल औरो उपरसे इ धनंजया हमर जबडा भी दुखाई दिया हसा के
  • Log in or register to post comments

Submitted by टवाळ कार्टा on Tue, 07/12/2016 - 15:02

Permalink

ज्या रोगांमुळे माणसे मरतात

ज्या रोगांमुळे माणसे मरतात (जर वेळेत उपचार नाही झाले तर...उदा. टिबी)...अश्या रोगांसाठी होमिओपदीकडे औषधे आहेत का?
  • Log in or register to post comments

Submitted by असंका on Tue, 07/12/2016 - 20:09

In reply to ज्या रोगांमुळे माणसे मरतात by टवाळ कार्टा

Permalink

तुम्ही कुठून आले!!!

तुम्ही कुठून आले!!! ज्या रोगांमुळे माणसं मरत नाहीत (..उदा मायग्रेन/अर्धशिशी) ...अश्या रोगांसाठी मॉडर्न मेडिसीन्कडे औषधे आहेत का?
  • Log in or register to post comments

Submitted by टवाळ कार्टा on Tue, 07/12/2016 - 20:39

In reply to तुम्ही कुठून आले!!! by असंका

Permalink

म्हणजे ज्या रोगांमुळे माणसे

म्हणजे ज्या रोगांमुळे माणसे मरू शकतात ते रोग होमिओपॅथीने बरे नाही होत?
  • Log in or register to post comments

Submitted by असंका on Tue, 07/12/2016 - 20:59

In reply to म्हणजे ज्या रोगांमुळे माणसे by टवाळ कार्टा

Permalink

म्हणजे जे रोग प्राणघातक

म्हणजे जे रोग प्राणघातक सुद्धा नाहीत तेही मॉडर्न मेडीसीनने बरे होत नाहीत?
  • Log in or register to post comments

Submitted by टवाळ कार्टा on Tue, 07/12/2016 - 21:17

In reply to म्हणजे जे रोग प्राणघातक by असंका

Permalink

एका साध्या विचारलेल्या

एका साध्या विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर प्रश्नानेच.....तुम्ही पुण्याचे का?
  • Log in or register to post comments

Submitted by असंका on Tue, 07/12/2016 - 21:22

In reply to एका साध्या विचारलेल्या by टवाळ कार्टा

Permalink

तुम्ही मला थोडीच विचारत होतात

तुम्ही मला थोडीच विचारत होतात? तुम्ही तुमचे प्रश्न विचारतो होतात, मी माझे प्रश्न विचारत होतो इतकंच. म्हणलं सगळे प्रश्न एकत्र असले की उत्तर मिळायचा चान्स वाढेल कदाचित. थोडी वाट बघू या. कुणी ना कुणी नक्कीच आपल्या प्रश्नांना उत्तरं देइल.
  • Log in or register to post comments

Submitted by टवाळ कार्टा on Tue, 07/12/2016 - 23:01

In reply to तुम्ही मला थोडीच विचारत होतात by असंका

Permalink

तुम्ही तुमचे प्रश्न विचारत

तुम्ही तुमचे प्रश्न विचारत होता तर "तुम्ही कुठून आले!!!" असे का विचारले माझया प्रतिसादावर बाकी तुम्ही उत्तर ना देता शेपूट घालणार हे माहीतच होते झेपत नाही तर उंटाच्या बुडख्याचा मुका घ्यायला जावेच का =)) टीप - वरील वाक्यात काहीही अश्लील नाहीये, पुलंनीच लिहिले आहे ते
  • Log in or register to post comments

Submitted by असंका on Tue, 07/12/2016 - 23:22

In reply to तुम्ही तुमचे प्रश्न विचारत by टवाळ कार्टा

Permalink

आपलं पहिलं वाक्य तर्क

आपलं पहिलं वाक्य तर्क दृष्ट्या चुकीचं वाटतं. तुम्ही आलात का अरे वा...!! असं म्हणलं असतं आणि मग प्रश्न विचारला असता तर? बाकी मी जर शेपूट घातली असेल, तर तुम्हीही तेच केले आहे. पण माहितच होते म्हणताय ते कसं काय? तुम्ही काय खरंच मला विचारत होते काय हे प्रश्न? अहो मी डॉक्टर नाही... आणि अश्लिल वगैरे कुठे विचार करता ? इतक्या गोष्टी इतक्या नामांकित आय डींनी ऐकवल्या आहेत की बोलायची सोय नाही भोळसट, मूर्ख, इर्रॅशनल, प्रगल्भ बुद्धी, सर्वज्ञ, लो आय क्यू . काही कसर राहिली असेल तर तुम्हीही पूर्ण करा.
  • Log in or register to post comments

Submitted by असंका on Tue, 07/12/2016 - 23:34

In reply to आपलं पहिलं वाक्य तर्क by असंका

Permalink

"तुम्ही कुठून आलात" म्हणजे

"तुम्ही कुठून आलात" म्हणजे तुम्ही इतका वेळ या धाग्यावर कुठे दिसत नव्हता, तर कुठे होतात असं मला म्हणायचं होतं. खाली एक जण काहीतरी वेगळेच अर्थ लावत आहे या वाक्याचे त्यामुळे हा खुलासा करत आहे. माझ्या डोक्यात असले विचार येत नाहीत. कुणाच्या तरी डोक्यात येउ शकतील हेही माझ्या लक्षात आलं नाही, नाही तर मी असं लिहिलंच नसतं. तरीही तुम्हाला माझ्या प्रश्नाचा त्रास झाला असल्यास क्षमस्व....
  • Log in or register to post comments

Submitted by आनंदी गोपाळ on Tue, 07/12/2016 - 23:59

In reply to "तुम्ही कुठून आलात" म्हणजे by असंका

Permalink

आमचाही दिल साफ असतो. अगदी क्लीन!

आमच्याही डोक्यात सब्य इच्चारच अस्तात. http://www.misalpav.com/comment/856894#comment-856894 हाच संदर्भ घेऊन लिहिलंय तिथे. आता तुम्हाला वैट्ट वाट्टे तं आम्ही काय करावं बा? बाकी दांभिक म्हणजे काय रे भाऊ?
  • Log in or register to post comments

Submitted by टवाळ कार्टा on Wed, 07/13/2016 - 10:09

In reply to "तुम्ही कुठून आलात" म्हणजे by असंका

Permalink

"तुम्ही कुठून आलात" म्हणजे

"तुम्ही कुठून आलात" म्हणजे तुम्ही इतका वेळ या धाग्यावर कुठे दिसत नव्हता, तर कुठे होतात असं मला म्हणायचं होतं.
कोणत्या धाग्यावर कधी यायचे याचे काही नियम असतात का? इतका वेळ या धाग्यात जी चर्चा सुरु आहे त्यावरुन मला एक शंका विचारावीशी वाटलेली...कोणीही "उत्तर" दिले असते तरी चालले असते...ते न होता तुम्हीच सरसकट मला अ‍ॅलोपॅथीवाल्यांमध्ये ढकलून उलट प्रश्न विचारत आहात
तरीही तुम्हाला माझ्या प्रश्नाचा त्रास झाला असल्यास क्षमस्व....
झाले गेले गंगेला मिळाले...माझ्याबाजूने कोणताही वैयक्तीक आकस नाही
  • Log in or register to post comments

Submitted by आनंदी गोपाळ on Tue, 07/12/2016 - 23:44

In reply to आपलं पहिलं वाक्य तर्क by असंका

Permalink

काही कसर राहिली असेल तर

संवेदनशील, सुसंस्कृत, सलज्ज राहिलं होतं. दांभिक पण अ‍ॅडवू का? :)
  • Log in or register to post comments

Submitted by असंका on Tue, 07/12/2016 - 23:49

In reply to काही कसर राहिली असेल तर by आनंदी गोपाळ

Permalink

मी काय दांभिकपणा केलाय?

मी काय दांभिकपणा केलाय?
  • Log in or register to post comments

Submitted by आनंदी गोपाळ on Tue, 07/12/2016 - 23:53

In reply to मी काय दांभिकपणा केलाय? by असंका

Permalink

आपल्या पहिल्या प्रतिसादापासून

आपल्या पहिल्या प्रतिसादापासून वाचा व आपणच सांगा महोदय, आपण दांबहिकपणाव्यतिरिक्त काय केले आहेत?
  • Log in or register to post comments

Submitted by टवाळ कार्टा on Wed, 07/13/2016 - 10:09

In reply to आपलं पहिलं वाक्य तर्क by असंका

Permalink

आपलं पहिलं वाक्य तर्क

आपलं पहिलं वाक्य तर्क दृष्ट्या चुकीचं वाटतं. तुम्ही आलात का अरे वा...!! असं म्हणलं असतं आणि मग प्रश्न विचारला असता तर?
दोन्हीत बराच फरक आहे
बाकी मी जर शेपूट घातली असेल, तर तुम्हीही तेच केले आहे.
इतका वेळ जशी उत्तरे तुम्ही दिलित तसेच मीही करत आहे
पण माहितच होते म्हणताय ते कसं काय? तुम्ही काय खरंच मला विचारत होते काय हे प्रश्न? अहो मी डॉक्टर नाही...
मुळात प्रश्न तुमच्यासाठी अथवा कोणा एकासाठी नव्हताच...जे लोक होमिओपॅथीची बाजू घेत आहेत त्यांच्यासाठी होता...तुम्ही स्वतःवर ओढून घेतलात
आणि अश्लिल वगैरे कुठे विचार करता ? इतक्या गोष्टी इतक्या नामांकित आय डींनी ऐकवल्या आहेत की बोलायची सोय नाही
ते संपादकांसाठी होते ;)
भोळसट, मूर्ख, इर्रॅशनल, प्रगल्भ बुद्धी, सर्वज्ञ, लो आय क्यू . काही कसर राहिली असेल तर तुम्हीही पूर्ण करा.
असे काही करण्यापेक्षा बरीच इतर चांगली कामे आहेत माझ्याकडे
  • Log in or register to post comments

Submitted by आनंदी गोपाळ on Tue, 07/12/2016 - 21:01

In reply to तुम्ही कुठून आले!!! by असंका

Permalink

तुम्ही जिथून आले, तिथूनच तेही आलेत. आईच्या पोटातून.

"ज्या लोकांना अर्धशिशी आहे, त्यांनी एरंडेल घ्यावे. म्हणजे त्यांना पूर्ण शिशी होईल" << आजचेच व्हॉट्सॅप फॉर्वर्ड. बाकी, मायग्रेन म्हणजे नक्की काय, त्यात शरिरात काय होते? (रक्तवाहिन्यांना), सिंटिलेटिंग स्कोटोमा म्हणजे काय? ट्रिगर फॅक्टर्स कोणते, अर्गट अल्कलॉईड्स काय असतात, कॉफीचा व मायग्रेनचा काय संबंध, इ. प्रश्न होम्योपाद्सना जरा इच्चारून बघा, मग मॉडर्न मेडिसिनातल्या मायग्रेन उपचारांबद्दल बोलणे सुरू करा. तुमच्यासारख्या कुशाग्र बुद्धीमत्तेच्या माणसानं, किमान गूगल तरी करून पहायचं होतं, असं मला तरी वाटतं बा!
  • Log in or register to post comments

Submitted by आनंदी गोपाळ on Tue, 07/12/2016 - 21:03

In reply to तुम्ही जिथून आले, तिथूनच तेही आलेत. आईच्या पोटातून. by आनंदी गोपाळ

Permalink

वरील प्रतिसाद 'असका' नामक

वरील प्रतिसाद 'असका' नामक तैलबुद्धी, व सर्वज्ञानी व्यक्तीमत्वास आहे, हे नमूद करतो.
  • Log in or register to post comments

Submitted by टवाळ कार्टा on Tue, 07/12/2016 - 22:56

In reply to वरील प्रतिसाद 'असका' नामक by आनंदी गोपाळ

Permalink

इतके समजते हो डॉक्टर ;)

इतके समजते हो डॉक्टर ;)
  • Log in or register to post comments

Submitted by आनंदी गोपाळ on Tue, 07/12/2016 - 23:19

In reply to इतके समजते हो डॉक्टर ;) by टवाळ कार्टा

Permalink

तुम्हाआम्हाला समजते,

तुम्हाआम्हाला समजते, कारण तुम्ही आम्ही सामान्य आहोत. ते असामान्य, कुशाग्र बुद्धीमत्तेचे, सर्वज्ञ, तैलबुद्धी इ. आहेत. त्यांना समझवून साम्गावे लागते, की सगळेच आपापल्या आईच्या पोटातून येतात. आपण चुकीच्या ठिकाणून आलो नसलोत, तर कोण कुठून आले हा प्रश्न मुळातच गैरलागू व स्वतःचे प्रगाढ ज्ञान प्रदर्शित करणारा असतो, हे यांना उमजेल तो सुदिन. ;)
  • Log in or register to post comments

Submitted by असंका on Tue, 07/12/2016 - 23:48

In reply to तुम्हाआम्हाला समजते, by आनंदी गोपाळ

Permalink

इतकी घाण भाषा?

इतकी घाण भाषा?
  • Log in or register to post comments

Submitted by आनंदी गोपाळ on Tue, 07/12/2016 - 23:52

In reply to इतकी घाण भाषा? by असंका

Permalink

यात नक्की काय घाण आहे?

यात नक्की काय घाण आहे?
  • Log in or register to post comments

Submitted by आनंदी गोपाळ on Tue, 07/12/2016 - 23:55

In reply to यात नक्की काय घाण आहे? by आनंदी गोपाळ

Permalink

ते "खाली ते एक चुकीचा अर्थ

ते "खाली ते एक चुकीचा अर्थ लावत आहेत" तसे "वर ते एक चुकीचा अर्थ लावत आहेत" असे लोकांना दिसत नाही, असे यांना वाटते का?
  • Log in or register to post comments

Submitted by आनंदी गोपाळ on Tue, 07/12/2016 - 20:55

In reply to ज्या रोगांमुळे माणसे मरतात by टवाळ कार्टा

Permalink

ह्यँ!

कैतरीच काय! एड्सपासून क्यान्सरपर्यंत सगळे आजार बरे होतात. आहात कुठं तुम्ही?
  • Log in or register to post comments

Submitted by चंपाबाई on Tue, 07/12/2016 - 20:36

Permalink

..

तीन दिवस टीबी ट्रेनिंगमध्ये बिजि असल्याने लिहिता आले नव्हते. १. ट्रेनिंग का होते हे महत्वाचे. २००० साली सरकारने टीबीसाठी एक आड एक दिवस उपचाराची नवीन पद्धत आणली, तेंव्हा सांगितले होते की जुनी रोज औषध घ्यायची पद्धत तितकीशी चांगली नाही, म्हणून ही नवी पद्धत आणली आहे. आज २०१६ साली, पुन्हा तीच जुनी पद्धतच चांगली आहे यावर सरकार, जागतिक आरोग्य संघटना व सर्व तज्ञांचे एकमत झाले असुन पुन्हा जुनी पद्धत आता सुरु होणार आहे. तात्पर्य : एखादी प्रचलित पद्धत चुकीची / निरुपयोगी आहे, असे नंतर सिद्ध झाले, हे अ‍ॅलोपथीतही होऊ शकते. मग होमिओपथीची एखादी वॉटर मेमरीची थेअरी नंतर चुकीची निघाली यावर अ‍ॅलोपथी तज्ञानी शिमगा करणे कितपत योग्य आहे? २. होमिओपथीची कुठलीही थेअरी म्हणे लाच घेऊन मांडली होती. असे अ‍ॅलोपथीत घडत नसेल की काय ? का, अ‍ॅलोपथीवाले सारे सोने चांदी मृत्तिकेसमान मानणारे संत आहेत ? ३. एका रेडिओलोजिस्टला कुणी विचारले की तुम्ही जनरल प्रॅक्टिशनर नाही. मग औशाधे का प्रिस्क्राइब करता ? ते बोल्ले : आँ ! असे कसे ? मी एम बी बी एस ही आहे. मला डिग्री देणारे ते मिनिस्ट्री ऑफ म्याजिक उर्फ एम एम सी सरकारमान्य - अधिकृत आहे. मग शंका का घेताय ? होमिओपथीवाल्यांची डिग्री व त्यांचे महामंडळही सरकारमान्यच आहे. त्यांच्यावर शंका का घ्यायची म्हणे? पुढार्‍यानी काढलेली कॉलेजेस / कमी मार्कवाले अ‍ॅलोपथीला न मिळालेले तिथे जातात म्हणे , इ इ फोडणी घालुन त्यांच्यावर चिखलफेक व्हायला नको होती. ४. ट्रिचुरेशन / खलणे इ वर भाष्य करायची आमची ताकत नाही. पण घोटून केलेली कॉफी , पाण्यात उकळून मग दूध घालणे, दुधात कॉफी मिसळणे... वस्तू त्याच ठेउन पद्धत बदलली तरी चव बदलते. मिक्सरमधली चटणी व पाट्यावरली चटणी यात फरक असतो, इतके लिहायचे ज्ञान नक्कीच आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by चंपाबाई on Tue, 07/12/2016 - 20:49

In reply to .. by चंपाबाई

Permalink

... दुरुस्ती

होमिओपथीची कुठलीशी थेअरी ....
  • Log in or register to post comments

Submitted by सुबोध खरे on Tue, 07/12/2016 - 21:20

In reply to .. by चंपाबाई

Permalink

मोगाखानहोमिओपथीची एखादी वॉटर

मोगाखान होमिओपथीची एखादी वॉटर मेमरीची थेअरी नंतर चुकीची निघाली यावर अ‍ॅलोपथी तज्ञानी शिमगा करणे कितपत योग्य आहे? पण ती थिअरी चुकीची आहे असे होमे पदीचे लोक म्हणत नाहित ना तिथेच तर गोची आहे. त्यानि आपली थिअरी बदलावी (मग सगळंच डोलारा कोसळेल ना). एका रेडिओलोजिस्टला कुणी विचारले की तुम्ही जनरल प्रॅक्टिशनर नाही. मग औशाधे का प्रिस्क्राइब करता ? ते बोल्ले : आँ ! असे कसे ? मी एम बी बी एस ही आहे. मला डिग्री देणारे ते मिनिस्ट्री ऑफ म्याजिक उर्फ एम एम सी सरकारमान्य - अधिकृत आहे. मग शंका का घेताय ? उगाच ताकाला जाऊन भांडे कशाला लपवताय? मी एम बी बी एस केलं त्यानंतर तीन वर्षे सगळे रुग्ण पाहिले त्यानंतर परत अखिल भारतीय स्तरावर प्रवेश परीक्षा देऊन रेडियोलॉजिस्ट झालो त्यानंतरही लष्करात २० वर्षे नोकरी करेपर्यंत आपल्याला सर्वच रोगी पाहायला लागतात हेही त्याच प्रतिसादात लिहिले होते त्याचे तुम्हाला विविक्षित विस्मरण(selective amnesia) झाले काय. मूळ मुद्दा मी आधुनिक शास्त्रातच एम बी बी एस केले आहे होमेपदी किंवा युनानी नव्हे. तेंव्हा ती औषधे देण्याचा मला हक्क कायद्याने दिलेला आहेच. (आपल्या माहितीसाठी इंडियन मेडिकल कौन्सिल ऍक्ट १९५७) होमिओपथीवाल्यांची डिग्री व त्यांचे महामंडळही सरकारमान्यच आहे -- मग त्यांनी आपलीच औषधे द्यावीत की कशाला सरकारकडे भीक मागावी की आम्हाला पण आधुनिक औषधे द्यायची परवानगी द्या. आणि कशाला आधुनिक औषधाच्या साईड इफेक्ट्स चा डांगोरा पिटावा ते त्रिचूरेशन आणि सक्सेशन करून त्यात ६६ भाग लॅक्टोज आणि ९९ भाग पाणी मिसळतात तेवढे वाचले नाही वाटतं. आणि त्यातील परत एक भाग घेऊन त्यात ६६ भाग लॅक्टोज /९९ भाग पाणी घालतात. असे २० वेळा केले की ते औषध २० पटीने "स्ट्रॉन्ग" होते. घोटून केलेली कॉफी मध्ये १५ लिटर पाणी घालून पिता काय? किंवा पाण्यात उकळून मग दूध घालणे यात १००० लिटर पाणी मिसळता काय? रच्याकने --तुम्ही होमे पदी वाले काय ? की टी बी ला होमेपदी देता येते काय याचे ट्रेनिंग घ्यायला गेला होतात? तीन दिवसांच्या "बिझि" नेस चा डोंगर पोखरून उंदीर सुद्धा नाही झुरळच निघाले. असो. कुठे तरी जळल्याचा वास येतोय
  • Log in or register to post comments

Submitted by रुस्तम on Tue, 07/12/2016 - 21:29

In reply to मोगाखानहोमिओपथीची एखादी वॉटर by सुबोध खरे

Permalink

+१

हा हा हा
  • Log in or register to post comments

Submitted by रुस्तम on Tue, 07/12/2016 - 21:27

In reply to .. by चंपाबाई

Permalink

टीबी ट्रेनिंगमध्ये

टीबी ट्रेनिंगमध्ये :O चंपाबाई पण (होमिओपॅथी) डॉक्टर की काय?
  • Log in or register to post comments

Submitted by आनंदी गोपाळ on Tue, 07/12/2016 - 21:41

In reply to .. by चंपाबाई

Permalink

जामोप्या,

ये कुछ जम्या नै. "तिथे" मी तुमची बाजू घेऊन भांडलो होतो. इथे, तुम्ही चुकीचे भांडण करीत आहात हे नमूद करतो. होम्योपदीची बाजू व्यक्तिगत रागातून घेऊन तुम्ही संपूर्ण बावळटपणा करीत आहात. (असंच काहीसं तिथेही यांच्याकडून झालं होतं, त्याबद्दल मी बरंच अकांडतांडवनृत्य केलं होतं) तेंव्हा, आवरा, ही विनंती.
  • Log in or register to post comments

Submitted by आनंदी गोपाळ on Tue, 07/12/2016 - 21:42

In reply to जामोप्या, by आनंदी गोपाळ

Permalink

अरे हो,

तुमच्या पोलिटिकल व्ह्यूजबद्दल सॉफ्टकॉर्नर असल्याने प्रतिसाद थोडा मवाळच दिलाय नै? ;)
  • Log in or register to post comments

Submitted by चंपाबाई on Tue, 07/12/2016 - 22:17

In reply to अरे हो, by आनंदी गोपाळ

Permalink

मला राग नाही हो.

माझे डिग्री व माझे कौन्सिल सरकारमान्य आहे असे ठासुन सांगणारा मनुक्ष इतरांची डिग्री व कोर्सही सर्कारमान्य आहे , हे विसरतो याचे नवल वाटले.
  • Log in or register to post comments

Submitted by आनंदी गोपाळ on Tue, 07/12/2016 - 22:23

In reply to मला राग नाही हो. by चंपाबाई

Permalink

"सरकारमान्य"

सरकारमान्य हा शब्द तुम्ही बीफ ब्यान, स्वच्छ भारत सेस, इ. बाबींबद्दल मान्य करता का? झालं ना एकदा? ट्राय टु फर्गेट पर्सनल व्हेंडेटा..
  • Log in or register to post comments

Submitted by चंपाबाई on Tue, 07/12/2016 - 22:42

In reply to "सरकारमान्य" by आनंदी गोपाळ

Permalink

हो.

माझ्या इच्छेविरुद्ध असले तरी सरकारचा नियम मानावाच लागेल ना ?
  • Log in or register to post comments

Submitted by आनंदी गोपाळ on Tue, 07/12/2016 - 22:53

In reply to हो. by चंपाबाई

Permalink

तुमच्या इच्छेचे सरकार आणण्यास

तुमच्या इच्छेचे सरकार आणण्यास आम्ही कटिबद्ध आहोत ;) चला. जवळ-जवळ झोपायची वेळ झाली.
  • Log in or register to post comments
Profile picture for user गामा पैलवान

Submitted by गामा पैलवान on Wed, 07/13/2016 - 03:41

In reply to "सरकारमान्य" by आनंदी गोपाळ

Permalink

लोकां सांगे ....

आगोबुवा, >> ट्राय टु फर्गेट पर्सनल व्हेंडेटा.. हाहाहा. तुम्ही म्हणजे लोकां सांगे ब्रह्मज्ञान .... ! माझ्यावर वैयक्तिक टिप्पणी करतांना उपरोक्त निकष आठवलं नाही वाट्टे? आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments

Submitted by चंपाबाई on Tue, 07/12/2016 - 22:39

In reply to मला राग नाही हो. by चंपाबाई

Permalink

..

आणि आयुर्वेदवाल्याना महाराष्ट्रात अ‍ॅलोपथीची परवानगी पुर्वीपासुनच आहे... होमिओपथीवाल्याना नवीन अ‍ॅलोपथीचा अ‍ॅडिशनल कोर्स केल्यावर तेही आता ही औषधे वापरु शकतील. आता वादाचे मुद्देच संपुष्टात आले ना ? अर्जुन बोलला होता.... हा सूतपुत्र आहे. राजकुमार नाही. तसंच झालं. सरकार बोललं ... आता त्यानाही फार्म्याकॉलॉजीचा अभिषेक करतो. झाले ना आता बरोबरीचे ?आता लढा !
  • Log in or register to post comments

Submitted by अजया on Tue, 07/12/2016 - 22:19

Permalink

चंपाबाई असे प्रतिसाद देऊन काय

चंपाबाई असे प्रतिसाद देऊन काय मिळालं? तुम्ही क्वालिफाईड डाॅक्टर आहात ना? मग तुमच्यातला डाॅ असा विचित्र प्रतिसाद कसा देऊ शकतो? आपले राजकीय धार्मिक व्ह्यु काहीही असले तरी आपल्या व्यवसायाशी प्रतारणा करुन लोकांचा गोंधळ होईल असे प्रतिसाद का द्यावा? या धाग्यावर डाॅ खरे पोटतिडकीनं लोकांचे गैरसमज दूर करायचा प्रयत्न करत आहेत.तुम्ही बरोबर उलट करत आहात असे वाटत नाही का तुम्हाला? नुसता अचरट टाइमपास करण्यापेक्षा प्रशिक्षित डाॅक्टर असाल तर या विषयावर लेखमाला लिहून प्रबोधन करुन दाखवा.
  • Log in or register to post comments

Submitted by रुस्तम on Wed, 07/13/2016 - 00:24

In reply to चंपाबाई असे प्रतिसाद देऊन काय by अजया

Permalink

+111

बाडीस
  • Log in or register to post comments

Submitted by अर्धवटराव on Wed, 07/13/2016 - 00:04

Permalink

होमिओपॅथीचं माहित माहित नाहि...

पण मिपावर एकही होमिओपेथी तज्ञ असु नये हि मिपाची लिमिटेशन नक्कीच जाणवली :) होमिओपॅथीचा किल्ला लढवणारे अगदीच फुसके बार निघाले इथे. चॅम्पस् बाई बद्दल बोलणं म्हणजे लहान तोंडी मोठा घास झाला, पण इतरांनी केवळ अनुभवाधारीत प्रतिवाद केले आहेत. थेरपीचं तार्कीक वर्णन कुणीच केलं नाहि. अवांतरः माझा मोठा भाऊ होमिओपेथीचच औषध घेतोय व त्याला त्याचा फायदादेखील होतो आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by सतिश गावडे on Wed, 07/13/2016 - 08:45

In reply to होमिओपॅथीचं माहित माहित नाहि... by अर्धवटराव

Permalink

माझा एक होमिओपाथ मित्र आणि

माझा एक होमिओपाथ मित्र आणि त्याला गुरुस्थानी असणारे एक ज्येष्ठ होमिओपाथ मिपावर होते. (या ज्येष्ठ होमिओपाथ मिपाकराचे काही महिन्यापूर्वी निधन झाले) मात्र ते होमिओपथी विरोधी भडीमाराला तोंड देऊ शकले नाहीत. आणि त्यांनी होमिओपथीबद्दल लिहिणे बंद केले. काही दिवसांपूर्वी मी या धाग्याचा दुवा त्याला दिला होता आणि त्याच्याशी चर्चाही केली होती. या चर्चेतून दोन मुद्दे समोर आले: १. होमिओपथी औषधं कशी काम करतात हे अजून स्पष्ट झालेले नाही. मात्र ती काम करतात हे मात्र नक्की. २. काही होमिओपाथनी अवास्तव दावे करुन होमिओपथीला बदनाम केले आहे. इथे एक मुद्दा काहींनी विचारात घेतलेला नाही तो म्हणजे काही होमिओपाथ क्लासिकल होमिओपथीची प्रॅक्टिस करतात. ते कधीच अ‍ॅलोपथिक किंवा आयुर्वेदिक औषधं देत नाहीत. जर अशा औषधांची गरज भासल्यास ते आपल्या पेशंटला त्या क्षेत्रातील तज्ञ डॉक्टरांना रेफर करतात. अवांतर: १. पुण्यातील डॉ. शैलेश देशपांडे हे "होमिओपथिक क्युअर फॉर कॅन्सर" यावर संशोधन करत आहेत. २. वरील संशोधनावर आधारीत शिवराज गोर्ले यांचे "होय, होमिओपॅथी तुम्हाला वाचवू शकते" नावाचे पुस्तक आहे. हे पुस्तक बुकगंगावर उप्लब्ध आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by अर्धवटराव on Wed, 07/13/2016 - 13:06

In reply to माझा एक होमिओपाथ मित्र आणि by सतिश गावडे

Permalink

अत्यंत आभारी आहे.

१. होमिओपथी औषधं कशी काम करतात हे अजून स्पष्ट झालेले नाही. मात्र ती काम करतात हे मात्र नक्की.
असं सर्वमान्य असेल तर वादच मिटला. एक पेशंट म्हणुन आपल्याला रोग बरा होण्याशी मतलब. तसं खात्रीने होत असेल तर होमिओपेथीने एलोपेथीच्या निकषांवर स्वतःला सिद्ध केलं काय, न केलं काय, काहि फरक पडत नाहि. होमिओपॅथीचं गुढ कधितरी उकलेलच. तोवर त्या थेरपीचे सिद्धांत समजले नाहि तरी फॉर्म्युले सेट होऊन त्याची परिणामकारकता सिद्ध झाले तरी पुष्कळ आहे. तसंही आयुष्य जगताना आपण क्वचीतच कार्य-कारणभावाच्या नादी लागतो :)
  • Log in or register to post comments

Submitted by अप्पा जोगळेकर on Wed, 07/13/2016 - 18:31

In reply to अत्यंत आभारी आहे. by अर्धवटराव

Permalink

सगळेच पेशंट कार्यकारण

सगळेच पेशंट कार्यकारण भावाच्या मागे लागले तर ते एकंदरच कोणत्याच पॅथीवाल्यांना परवडणारे नाही. अडचणीत आणणारा प्रश्न विचारला तर समोरच्याला इतकी भव्य दिव्य, वैद्यकीय संज्ञांनी खचाखच भरलेली माहिती दिली जाते की झाले. प्रश्नकर्ता बिचारा मूळ प्रश्न काय होता हे स्वतःच विसरुन जातो.
  • Log in or register to post comments

Submitted by सुबोध खरे on Wed, 07/13/2016 - 18:43

In reply to अत्यंत आभारी आहे. by अर्धवटराव

Permalink

अर्धवटराव साहेब

अर्धवटराव साहेब कुणाच्या कोंबड्याने उजाडले तरी चालेल ही गोष्ट मान्य आहे. पण अंधारात विजेरी दाखवून तोच सूर्य आहे आणि तुम्ही खड्यात पडलात तर तुमचे नशीब असे असेल तर कसे चालेल ? असे अनेक रोग आहेत जेथे सहज सहजी कोणती पॅथी काम करते की नाही हे स्पष्टपणे दाखवता येते तेथेही हे लोक लंब्याचवड्या बाता मारून शेंडी लावत असतात. कालच एक मिपाकर माझ्याकडे गप्पा मारायला आले असता एक रुग्ण पित्ताशयातील खडे घेऊन परत सोनोग्राफीसाठी आली होती. त्यांना त्यांच्या "आयुष" व्यावसायिकाने औषध देऊन खात्रीने खडे बरे होतील सांगितले होते. १८ दिवस औषध घेऊन बरोबर १९ व्या दिवशी सोनोग्राफी करा. सर्वच्या सर्व खडे जैसे थे होते याबद्दल काय म्हणायचे? या बाबत निदान आधुनिक पद्धती बरी. आमच्या कडे या रोगाला औषध नाही शल्यक्रिया हाच उपाय असे स्पष्ट सांगतात. उगाच रुग्णाला चोळत बसत नाही. असो तोच मुद्दा उगाळण्यात काही मजा नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by अर्धवटराव on Wed, 07/13/2016 - 22:21

In reply to अर्धवटराव साहेब by सुबोध खरे

Permalink

डॉक्टर साहेब...

शेंडी लावण्याचे प्रकार आपल्याकडे नवीन नाहितच. आरोग्याशी खेळ करणारे सर्वपॅथी डॉक्टर्स, स्वतः पेशंट, सल्ला देणारे 'हितचंतक', जाणुनबुजुन किंवा खोट्या अभिमानापाई अवैद्यकीय उपाय करणारे... असे अनेक लोक आपापले कंदील घेऊन केवळ रोग्यालाच नव्हे तर प्रत्यक्ष्य सूर्याला देखील प्रकाश दाखवायला कमि करायचे नाहि. तो वेगळा विषय आहे. माझा मुद्दा इतकाच कि एखाद्या थेरपीची वैधता ठरवताना त्याची मोजता येण्याजोगी परिणामकारकता पुरेशी असावी काय? आणि होमिओपॅथी तो निकष पूर्ण करतो काय? त्यातला ग्रे एरीया साफ करायला होमिओपॅथीवाल्यांनी स्वतः प्रयत्न करायला हवेत हे कबूल. पण एकुणच विवेकाशी वावडं असणार्‍या आपल्या सिस्टीममधे अशा अनेक ग्रे/काळ्या एरीयांची सफाई व्ह्यायला अजुन अवकाश आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by चंपाबाई on Wed, 07/13/2016 - 23:15

In reply to डॉक्टर साहेब... by अर्धवटराव

Permalink

...

प्रॅक्टिस करणे व वैधता तपासणे या दोन स्वतंत्र कहाण्या आहेत. मी कुठल्या का पॅथीची प्रॅक्टिस करेना , सरकारमान्य व पुस्तकात आहे ते सर्व वैधच आहे असेच मी बाय डिफॉल्ट मानून चालणार . वैधता तपासणे हे प्रॅक्टिशनरचे काम नाही. अजुन एक उदाहरण टीबी बाबतच... काही वर्शापुर्वी टी बी एलायजा ही टेस्ट बाजारात उपलब्ध होती.. जेंव्हा एक्स रे बडखा कशातच टीबी दिसत नसेल पण टीबीची शंका असेल तर रक्ताची एलायझा टीबी करुन त्या आधारे उपचार दिले जात. काही वर्षानी सरकार बोल्ले .. हॅ टेस्ट निरुपयोगि आहे. बंद करा. सध्या ही टेस्ट कुणी करत नाही. प्रॅक्टिस करणार्‍या माणसाने प्रत्येक औषध / तपासणीची वैधता पडताळ्य्न पहाणे हे अशक्य आहे. जे आज पुस्तकात आहे व सर्कारमान्य आहे ते त्या दिवसाकरिता वैधच असते
  • Log in or register to post comments

Submitted by अप्पा जोगळेकर on Wed, 07/13/2016 - 01:11

Permalink

प्रतिजैविकांची चर्चा बाजूला

प्रतिजैविकांची चर्चा बाजूला राहून वैयक्तिक लढाया सुरु झाल्या.
  • Log in or register to post comments

Submitted by चंपाबाई on Wed, 07/13/2016 - 06:28

In reply to प्रतिजैविकांची चर्चा बाजूला by अप्पा जोगळेकर

Permalink

.

मिसळपावाचे सर्व धागे वीरगळाने सुरु होतात व गधेगाळाने संपतात.
  • Log in or register to post comments

Pagination

  • First page « First
  • Previous page ‹ Previous
  • पान 1
  • पान 2
  • पान 3
  • पान 4
  • पान 5
  • पान 6
  • पान 7
  • Next page Next ›
  • Last page Last »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com