भूमी अधिग्रहण कायदा
भूमी अधिग्रहण कायदामध्ये सध्याच्या केंद्र सरकारने काही बदल केले आहेत.
त्यामधले मुख्य बदल खालीलप्रमाणे
१. पूर्वी संपादनासाठी 70 टक्के शेतकऱ्यांची संमती बंधनकारक होती . ही अट आता काढून टाकण्यात आली आहे.
यामुळे विरोध असतानाही सरकार बळजबरीने खाजगी / सरकारी प्रकल्पासाठी जमीन ताब्यात घेउ शकते .
२. संपादन केलेली जमीन त्या प्रोजेक्टसाठी जर ५ वर्षात वापरली गेली नाही तर ती जमीन मूळ शेतकर्याला परत करण्यात यावी . ही अट काढून टाकली आहे.
या मुळे जमीनी फक्त संपादीत करून योग्य भावाची वाट बघत पड ठेवण्याचे प्रमाण वाढेल. आणि शेतकर्याकडे असलेला जमिनीचा ट्क्का अजून कमी होइल. उदा : सासवड , फलटण , सांगली येथे MIDC उभारल्या आणि उद्योजकांना जमिनी दिल्या पण तेथे कोणतेही उद्योग सुरू झाले नाहीत . अशा जमिनींचे प्रमाण वाढेल.
३. बागायत / उपजाउ जमीन घेता येणार नाही . किमान दोन पिके घेण्यात येत असलेल्या जमिनीचे अधिग्रहण करता येणार नाही. ही जी अट होती ती पूर्णपणे काढून टाकली आहे . याने उत्पादित क्षेत्र कमी होइल .
या अटीमुळे जे कमी उत्पादीत पडीक क्षेत्र आहे . जे दुष्काळी क्षेत्र आहे त्यांचा पण फायदा झाला असता कारण अशा जमीनींचे अधिग्रहण वाढले असते . ही अट काढल्यामुळे पाणी जवळ असणार्या बागायत / उत्पादीत जमिनींचे क्षेत्र कमी होइल. याचा फटका अन्नधान्य वाढीस बसेल.
४.लोकसुनावणी आणि ग्रामसभा : पुर्वीच्या कायद्यात प्रकल्पाला विरोध असेल तर लोकसुनावणी घेउन , ग्रामसभेची परवानगी लागत असे . ही अट काढून टाकली आहे.
५. बीओटी तत्वांवरील प्रोजेक्टसाठी काहीही उल्लेख नव्या मसुद्यामधे नाही.
नवीन उद्योगांसाठी जमीन लागणार आणि ती मिळाली पाहिजे हे १०० % सत्य आहे . त्याशिवाय उद्योगधंद्याची प्रगती होणार नाही . पण यासाठी पडीक जमीन , कमी उपजाउ जमीन घेतली पाहिजे . सर्व उद्योग धंदे मुंबई- पुणे अशा सुपीक पट्ट्यात सुरू झाले तर इथला शेतकरी विस्थापित होइल . त्यांममुळे जमीन संपादीत करताना उद्योगांना भूमीपुत्रांना नोकरी , पुर्नवसन अशा अटी ठेवायला हव्या होत्या . ५ वर्षात उद्योग सुरू करायसारख्या योग्य अटींसुद्धा काढून टाकल्या आहेत.
त्यामुळे अशा अध्यादेशामुळे हे सरकार शेतकरीविरोधी धोरण राबवत आहे असे वाटत आहे.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
सहमत आहे
भूमी अधिग्रहण कायदा, खरेचखुप
धन्यवाद.
या मुद्द्यावर निदान थोडक्यात
नुसते शेतकरीविरोधीच नाही तर
सुधारणेच्या नावाखाली जमीन लाट्ण्या ची चांगली संधी आहे सरकारला
भारतीय कायदे ईम्ग्रजांच्या
झेरॉक्स कसली.... सगळंच त्याच्यावर अवलंबून आहे...
(No subject)
दुवा मिळेल का?
विकी वर थोडीफार माहिती आहे या कायद्याची
हा म्हणायचा आहे का?
हो
लिंक वर दिलेली बातमी वाचली.
राज्य सभेत विरोध कोण करणार ,
उपजाऊ जमिनी का म्हणुन
सुपीक/पडीक
इंटरेस्ट
+१
नक्की विदा देता येणार नाही.
+१..
कर्माचे अच्छे दिन
भयानक आहे
लिंक
ग्रेट
शेकडो पळवाटा
काहिंना कदाचीत हा कायदा जुलमी
नेमके उदाहरण
या विषयी काहि टंकावं का हा प्रश्नच आहे.
अण्णा जागे झालेत
मी पण अण्णाजींना साथ देणार.
व्हिक्टीम
:(
जमीन अधिग्रहण
+१
मला वाटते..
अलिकडेच( १ महिन्याच्या आसपास)
हि लिंक त्याची
इथे बिका एका धरणग्रस्तांच्या
कुळ कायद्यात आमच्या जमिनी
राज्य सभेत विरोध कोण करणार ,