संपर्क ईश्वराचा
अवघड आहे ....कलियुग आहे बाबा.........असले शब्द आजकाल फार कानावर पडत आहेत. कारण तसेच आहे;
जिकते तिकडे बजबजपुरी माजल्यासारखी वाटते, बारीक सारीक गोष्टींमध्ये माणसाचा तोल ढळलाय आणि अजून
ढळत चालला आहे असे स्पष्ट दिसते. कलियुग विक्षिप्तपणे ब्रह्मदेवांसमोर नाचत आले तेंव्हा त्याने विधान केले
होते कि, जे लोक कलियुगात देखील परमेश्वराचे चिंतन स्मरण करतील, आणि जे सत्याची कास धरून जगतील,
त्यांच्या वाटेला मी जाणार नाही.
हे वाक्य खूप साधे सोपे वाटते ऐकायला, पण नक्की काय करावे हे समजत नाही. सत्याची कास; चांगले वागणे
म्हणजे नक्की काय?, याच्या व्याख्या आपण कशा आणि कुठल्या बुद्धीच्या सामर्थ्यावर करणार?. काही लोक कसेही
वाईट वागोत, त्यांचीच चलती आहे, आपण कुठले साधे काम करायला गेलो तर डोंगराएवढ्या अडचणी समोर येतात
मग आपण म्हणतो आमचेच काम होत नाही, काय पण ! देव आहे का नाही तेच कळत नाही. ती गोष्ट आहे ना;
कि महाभारतामध्ये कुंतीने श्रीकृष्णाकडे सतत दु:ख मागितले, जेणे करून ती सतत दु:ख निवारण्यासाठी माधवाचे
नाव घेत राहील, उद्देश हा कि तिला कृष्ण स्मरणापासून चुकूनही; अगदी सुखाच्या ओझ्याखाली असताना देखील
दूर जायचे नव्हते. मग आपण काय म्हणावे? कृष्ण आपल्यावर प्रसन्न आहे/ नाही, का तो सतत दु:ख /अडचणी
देतोय, मग काम नाही झाले कि आपण; अरे देवा ! म्हणतो. जसा प्रसंग येतो तसे विचारांचे घोंघावणे चालू होते.
उत्कर्षाला सीमा असते अध:पतनाला नसते असे थोर लोक सांगून गेले आहेत. खरे वाटते, आजूबाजूला; वर्तमानपत्रात
आणि बातम्या ऐकले कि हे खरे वाटते, उत्कर्ष म्हणजे पैसा-आडका, गाड्या, बंगले हि अतिउच्च भौतिक सुखे, त्यावर
पुढे जाऊन अध्यात्मिक बैठक साधून कुठे परमेश्वरी संकेत मिळाले; दृष्टांत जरी झाला तरी संपले, एक अत्त्युच बिंदू
गाठला, पण वाईट/सत्वहीन, असंग संग, व्यभिचार, चौर्य, माणुसकीची अवहेलना कितीही करा त्याला कुठे बंधन
दिसत नाही. आपण म्हणतो कि "पापाचा घडा भरतो" पण असे वाटते कि आजकाल वाक्य बदलावे लागेल,
"पापाचा रांजण भरतो" असे म्हणावे लागेल. कि परमेश्वरानेच प्रत्येकाचा पापभाग वाढवला कि काय? असे वाटायला
कारण; आज-काल लगेच घडा भरत असावा इतके माणसाचे वाईट वागण्याचे प्रमाण अधिक आहे, जो तो चढाओढ
करतो आहे; पापानुकरण करून एका अर्थाने अंधळ्या शर्यतीत कितीतरी पुढे पण सात्विकतेने तितकाच मागे पडत
जात आहे. कुठेतरी हिशोब द्यावयाचा आहे हे सोयीस्करपणे विसरून माणूस धावतोय, निश्चित शेवट असलेल्या
दिशेने अमर्याद भ्रमंतीचे खोटे अवसान आणून उधळला आहे.
जसा कलियुगाचा प्रभाव वाढत चालला आहे, आजूबाजूचे वातावरण कलुषित होत आहे, तसा परमेश्वर प्राप्तीचा मार्ग
बिकट होत चालला आहे, "हवे ईश्वरी अनुसंधान तर ल्यावे सात्विक अवधान", मला वाटते ज्या प्रश्नांची उत्तरे
मिळत नाहीत; ती हवी असल्यास योग्य गुरु शोधणे अथवा, उच्चकोटीची साधना करून परमेश्वराशी संपर्क साधणे,
जेणे करून शंका समाधान होईल. तूर्तास इतुकेच वाटते कि आपण परमेश्वरी संपर्क क्षेत्राच्या बाहेर आहोत,
चला संपर्क करण्याचा प्रयत्न करूयात.
- सार्थबोध
वर्गीकरण
प्रतिक्रिया
तुम्ही किंवा स्टीफन काय नवीन सांगताहात?
परत आभारी आहे.
त्याना
तूर्तास इतुकेच वाटते कि आपण परमेश्वरी संपर्क क्षेत्राच्या
याड्रेस लई सोप्प्पा !!!
बरोब्बर ..
+१
हे सर्व देव शोधणे किंवा गुरु
असहमत
ठीक आहे. "सतरा ठिकाणाहून
गविंना प्रतिसाद द्यायचा म्हणजे ...
जरा कळफलक थरथरतोयच..
राहीना का प्रश्न शिल्लक..
गविंना उत्तर देण्याचा प्रयत्न
प्रतिसाद आवडला
राहीना का प्रश्न शिल्लक..
याचं कारण मूळ धारणेत आहे.
ज्याला ईश्वर म्हणतात ते सर्व कारणांचं मूळ कारण आहे?
अतिशय रोचक प्रतिसाद.
हो तर.
तुम्ही लाईन ऑफ आर्ग्युमंट कशी ठेवता?
धन्यवाद.
हिंदू मान्यतेनुसार...
अरे बाप्रे!!!
घाबरू आणि घाबरवू नका.
अरे बाप्रे!!!
काका !
माऊ
वीटेकर काका बरोबर ना?
धन्यवाद
ईश्वराचा संपर्क
तुमचा हा प्रतिसाद भारतीय
फार छान लिहलयं.
+१
दुधात साखर.
कलियुगात फाष्ट पुण्य मिळतं हे
जमिनी विकून एका रात्रीत गबर
पाप नै म्हणूनच पुण्यवान
पण गबर असण्यात वाईट काय?
मग तुमच्याकडे अरे ओ सांबा आहे
नाहीच वाईट! गब्बर होणार्
गब्बर होण्यासाठि आधि...
हे बाकी खरं! रामगढ़
जमिनी विकून एका रात्रीत गबर होणारे
जो देतो तो देव, देव कोणी
लेख नाहि पटला.
???
हे घ्या.
म्हणजे थोडक्यात, विकिपिडिया
म्हणजे थोडक्यात, विकिपिडिया