✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

चिन्यांचा उपद्व्याप

क
कोमल यांनी
Fri, 04/26/2013 - 15:45  ·  लेख
लेख
दोन तीन दिवसांपूर्वीच्या पेपर मध्ये आलेल्या बातमीने मनात खळबळ माजवली.
  • चीनी हेलिकॉपर्ट्सची भारतीय हवाई हद्दीत ३०० किमी पर्यंत घुसखोरी
  • चीनी सैन्याची देप्सांग खोऱ्यात सुमारे १० किमी पर्यंत घुसखोरी, ६ दिवसांनंतर भारताला खबर
आणि यावर संरक्षण मंत्रांचे वक्तव्य काहीसे असे होते- "चीनकडून होत असलेल्या घुसखोरीच्या मुद्द्यावर 'शांततापूर्ण' मार्ग काढण्यासाठी विविध पातळ्यांवर 'चर्चा' सुरू आहेत. देशाची एकात्मता आणि सुरक्षा यांचे रक्षण करण्यासाठी सरकार आवश्‍यक ती सर्व पावले उचलत आहे." ghusakhori आहोत कुठे आपण?? नक्की काय सुरु होणार आहे?? कि झालं आहे पण आपल्याला अजून सुगावा लागलेला नाहीये? १९६२ च्या युद्धाची ऐंशीत आणि नव्वदीत जन्मलेल्या आमच्या सारख्यांना फारच पुसट (किंवा अगदी नाहीच) झळ लागलेली. इंडो चायना वॉर बद्दल आम्ही ऐकल आमच्या आजी आजोबांकडून, तत्सम व्यक्तींकडून, वाचलं आंतरजालावरील माहितीपर लेखांतून किंवा भा. रा. भागवतांच्या मानस पुत्र फा. फे. कडून. फा. फे. चा गमतीचा मुद्दा सोडला तर आम्हाला फक्त एवढंच माहित आहे कि चीन सारखा बलाढ्य शत्रू खिशात सुरा घेऊन आपल्या शेजारी येउन बसला होता आणि संधी साधून त्याने आपल्यावर हल्ला केला. तात्कालिक राजकीय परिस्थितीमुळे म्हणा किंवा हिमालयात लष्करास आलेल्या अडचणींमुळे म्हणा आपला त्या युद्धामध्ये पराभव झाला. आता पुन्हा जर फिरून तशी परिस्थिती निर्माण झाली तर परिणाम काय होऊ शकतील? आजवर चीन ने या न त्या मार्गाने भारतासाठी प्रश्न निर्माण केले आहेतच. पाकिस्तानला केलेले अप्रत्यक्ष सहकार्य, गेल्या ३ वर्षांत ६०० वेळा केलेली घुसखोरी, याव्यतिरिक्त चिनी साहित्यांनी भारताची बाजारपेठ आणि खाद्यपेठ मोठ्याप्रमाणात बळकावली आहेच. "हिंदी चीनी भाई भाई(??)" म्हणत म्हणत या भाईने तर दादागिरी दाखवायला सुरुवात केली आहे असे वाटते. भारताचा आणि किती भूभाग हा भाई घशात घालणार आहे कुणास ठाऊक?? आजच्या घडीला भारतात असलेली राजकीय परिस्थिती किंवा राजकीय इच्छाशक्ती(!!)(एका दैनिकाच्या संपादकांच्या मते) चीन ला थोपवू शकेल का? (चीनी बातम्यांनी सुन्न झालेली) कोमल फोटो गूगल कडून साभार
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
102709 वाचन

💬 प्रतिसाद (164)

प्रतिक्रिया

मला तर फार आनंद झाला

प्रसाद१९७१
Fri, 04/26/2013 - 16:40 नवीन
चीन्यांनी येउन भारत च ताब्यात घ्यावा अश्या मताचा मी झालो आहे हल्ली. नाहीतरी दिवसेंदिवस नरक च होत चालला आहे भारताचा
  • Log in or register to post comments

चीन ने येऊन भारतावर राज्य

पिलीयन रायडर
Fri, 04/26/2013 - 18:53 नवीन
चीन ने येऊन भारतावर राज्य करयची वाट पहाण्यापेक्षा तुम्हीच का नाही चीन मध्ये जात..?? कशाला ह्या नरकात रहाता? उगीच लोकशाही वगैरे... मस्त पैकी चीनमध्ये जायचं न गप बसुन राहायच.. (बोलायची सोय नाही म्हणे तिथे..)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद१९७१

अगं त्यांनी उपरोधाने,

शुचि
Fri, 04/26/2013 - 18:56 नवीन
अगं त्यांनी उपरोधाने, वैतागाने म्हटले आहे. अर्थात त्यांची बाजू नाही घ्यायची. एका प्रतिसादावर त्यांनी मला "मूर्ख" म्हणून झालेले आहे. तेव्हा मला काही फार सहानुभूती नाही ;) पण वेल ..... त्रागा असावा असे नीरीक्षण मांडू इच्छिते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर

उपरोधाने.. असेल बाई..

पिलीयन रायडर
Fri, 04/26/2013 - 19:03 नवीन
उपरोधाने.. असेल बाई.. पण त्यांच्या १-२ ठिकाणी त्यांचे प्रतिसाद वाचुन मला असं वाटलं की भारत खरच नरक वाटत असेल त्यांना..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शुचि

अगं ते गिरिजा प्रसाद काका

जेनी...
Sat, 04/27/2013 - 23:54 नवीन
अगं ते गिरिजा प्रसाद काका आहेत बहुतेक .. लक्ष नै द्याचं ... बाकि पिलु तैशी एक्दम समत ..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर

कोण फुझाअंटी का ?

अग्निकोल्हा
Sun, 04/28/2013 - 11:58 नवीन
कै च्याल्लेय अंटी ? आपल्या पिलु तैशी मी पन समत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेनी...

हे काय गिल्फुकाका

जेनी...
Mon, 04/29/2013 - 04:14 नवीन
:-/ हे काय गिल्फुकाका :-/ असं नै बै चिड्वाचं :-/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अग्निकोल्हा

त्रागाच आहे, काही चांगले होणार नाही ह्यातुन आलेला

प्रसाद१९७१
Mon, 04/29/2013 - 12:19 नवीन
तुमचे बरोबर आहे. माझा त्रागाच आहे, ह्या देशात काही चांगले होणार नाही ह्यातुन आलेला
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शुचि

तुम्हीच का नाही चीन मध्ये.....

खादाड_बोका
Fri, 04/26/2013 - 22:21 नवीन
एका नरकातुन दुसर्यात जाण्यात काय अर्थ आहे? पण खरी गोष्ट अशी आहे की आपण सुध्धा चीनला धमकावले पाहीजे. नाहीतर हे दिवसेंदिवस वाढतच जाईल. पण आपल्या देशातील नपूंसक पुढार्यांकडुन हे अपेक्शीत नाही. आणी.... जर धमकावले व चीन ने आक्रमण केले, व अमेरीका आपल्या मदतीला नाही आला तर, आपला बँड वाजायला जास्त वेळ लागणार नाही. पण त्यानंतर.....कमीत कमी पुन्हा एक नवीन सुरवात तर करता येईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर

गप्प तर मला भारतात पण रहावे लागते

प्रसाद१९७१
Mon, 04/29/2013 - 12:18 नवीन
तुम्हाला कोणी सांगितले की भारतात खरे ते बोलता येते. माझ्या इथला ( आणि तुमच्या इथला पण ) नगरसेवक, आमदार खोर्‍यानी पैसा खातो आहे. पण हे सत्य जर मी सार्वजनिक रित्या बोललो तर माझे हात पाय एक दिवस पण जागेवर रहाणार नाहीत. ह्याला तुम्ही लोकशाही म्हणता का? अल्पवयिन मुली वर ( ५ वर्षाच्या ) बलात्कार केला म्हणुन तक्रार करायला गेलेल्या बापाला पोलिस २००० रुपये घे आणि गप्प बस असे सांगतात. ह्याला तुम्ही कायदा आणि सुव्यवस्था आहे असे म्हणता का? त्या पेक्षा चीन काय वाईट. कष्ट केले तर नीट जगता तरी येते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर

३०० किमी?

पैसा
Fri, 04/26/2013 - 18:39 नवीन
हेलिकॉप्टर्स ३०० किमी आत येऊन कोणाला कळले नाही?
  • Log in or register to post comments

हो ना..

कोमल
Fri, 04/26/2013 - 19:14 नवीन
आणि आजच अजून एक बातमी वाचनात आली..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

असल्या बातम्या वाचुन डोक्याला

अमोल खरे
Fri, 04/26/2013 - 19:09 नवीन
असल्या बातम्या वाचुन डोक्याला शॉट लागतो. काय होणार काय माहिती. देश कसा काय चालतो असा प्रश्न मला अनेकदा पडतो. चीन समोर आपण काहीच नाही हे सत्य आहे, पण अमेरिका वगैरेला मधे आणुन काही करता आलं तर बरं.
  • Log in or register to post comments

अमेरिका

कोमल
Fri, 04/26/2013 - 19:28 नवीन
अमेरिका अगदी बेभरवशाचा मित्र आहे.. अमेरिका चायना (साय्नो-अमेरिकन)संबंध पण multi-faced आहेत असे म्हणतात..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमोल खरे

अमेरिका अगदी बेभरवशाचा मित्र

मदनबाण
Fri, 04/26/2013 - 19:42 नवीन
अमेरिका अगदी बेभरवशाचा मित्र आहे अमेरिका हे आपले शत्रुराष्ट्र आहे. जर पाकिस्तान आपला शत्रु आहे,आणि त्याला हरप्रकारे अमेरिका मदत करतो,मग शत्रुचा मित्र आपला मित्र कसा असु शकतो ? हिंदीत याच्या उलट एक म्हण आहे,दुष्मन का दुष्मन अपना दोस्त होता है !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कोमल

फनी!

पिवळा डांबिस
Fri, 05/03/2013 - 10:01 नवीन
फनी! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण

अमेरीका फक्त स्वत:चा स्वार्थ

शिल्पा ब
Fri, 05/03/2013 - 10:14 नवीन
अमेरीका फक्त स्वत:चा स्वार्थ पाहते. हा देश कोणाचाही "मित्र" नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण

असहमत

पिवळा डांबिस
Fri, 05/03/2013 - 10:40 नवीन
अमेरिका हा ब्रिटनचा, इस्त्रायलचा, जपानचा, तैवानचा मित्र आहे. उद्या या देशांवर जर कुणी दुसर्‍या देशाने हल्ला केला तर अमेरिका नि:संशय आपले सैन्य तिथे उतरवेल... वरील लिस्टमध्ये भारताचा समावेश नाही याचं दु:ख्ख जरूर आहे, पण तो देश कुणाचाही मित्र नाही हे विधान पटण्यास कठीण आहे. रच्याकने: भारत वर दिलेल्या कसोटीवर कुठल्या दुसर्‍या देशाचा मित्र आहे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिल्पा ब

मूळ विषया पासुन विषयांतर होत

मदनबाण
Fri, 05/03/2013 - 11:05 नवीन
मूळ विषया पासुन विषयांतर होत आहे तरी सुद्धा इथे एक संदर्भ देतो :- ndian frigate INS Khukri was sunk by the PNS Hangor (S131), while INS Kirpan (1959) was damaged on the west coast. In the Bay of Bengal, the aircraft carrier INS Vikrant (R11) was deployed to successfully enforce the naval blockade on East Pakistan. Sea Hawk and the Alizés aircraft from INS Vikrant sank numerous gunboats and Pakistani merchant marine ships.[25] To demonstrate its solidarity as an ally of Pakistan, the United States of America sent Task Force 74 centred around the aircraft carrier USS Enterprise into the Bay of Bengal. संदर्भ :-Indian Navy जो देश एखाद्या युद्धात पाकिस्तानच्या बाजुने आपले युद्ध पोत हिंदुस्थानाच्या विरोधात पाठवतो,तो हिंदुस्थाना शत्रु नाही का ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस

मित्र आणी शत्रू

सुबोध खरे
Fri, 05/03/2013 - 11:17 नवीन
राजकारणात आणी देश्कारणात कोणीही कोणाचा कायमचा शत्रू किंवा कायमचा मित्र नसतो. उद्या पाकिस्तानने जर आपल्या काश्मीर वरील हक्क सोडून दिला, दहशतवाद्यांना आधार देणे सोडले आणी आपल्याशी व्यापार वाढवला तर त्यांचा फार मोठा फायदा होईल. असे झाल्यास त्यांच्याशी शत्रुत्व ठेवण्याचे आपल्या कारणच राहणार नाही. ( शक्यता >० .१ %)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण

निक्सनने एन्टरप्राईझ

पिवळा डांबिस
Fri, 05/03/2013 - 11:38 नवीन
निक्सनने एन्टरप्राईझ बंगालच्या उपसागरात पाठवायचं ते पाउल भारताच्या विरोधातच मानलं गेलेलं होतं. पण त्याला फक्त भारतविरोधी शतृत्व हा एकच रंग नव्हता. ती आंतरराष्ट्रिय राजकारणातली एक खेळी होती. अमेरिकेला त्यावेळी चीनशी संवाद प्रस्थापित करायचा होता आणि त्यात पाकिस्तान हा सहाय्यक होत होता. भारताच्या बांगला युद्धाने ते राजकारण बिघडत होतं. म्हणून ते तसं करण्यात आलं, उलट जेंव्हा भारत स्वतंत्र झाला तेंव्हा हे एक नविन लोकशाही राष्ट्र आपलं (एका लोकशाही राष्ट्राचं)मित्र होईल अशीच अमेरिकन राज्यकर्त्यांची कल्पना होती. पण भारताच्या तत्कालीन राज्यकर्त्यांना तेंव्हा समाजवादाचे डोहाळे लागलेले होते. आणि साम्यवादी/समाजवादी युएसेसार त्यावेळेस अमेरिकेचा हाडवैरी होता. याचा फायदा पाकिस्तानने अचूक उचलला आणि स्वतःला अमेरिकेचा मित्र बनवलं. पुढे स्तालिनने आपल्या करणीने आपल्या समाजवादी राज्यकर्त्यांचे डोळे खाडकन उघडले, ते सोडा... एक सांगतो, भारत-पाकिस्तानच्या रिलेशनमध्ये जेंव्हा भारत किंवा पाकिस्तान काही करतात तेंव्हा ते त्याच संदर्भात करतात. जेंव्हा तिसरा देश काही अ‍ॅक्शन घेतो (मग ते अमेरिकेचं एन्टरप्राईझ असो की अग्नी मिसाईलच्या चाचणीनंतर ऑस्ट्रेलियाने केलेला आपला निषेध असो), त्याला आंतरराष्ट्रिय रंग असतात. प्लीज डोन्ट गेट फिक्सेटेड लोकली, ट्राय टू सी द होल बोर्ड!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण

अमेरिकेने पीएल४८० {पब्लीक लॉ

मदनबाण
Fri, 05/03/2013 - 22:27 नवीन
अमेरिकेने पीएल४८० {पब्लीक लॉ ४८०) च्या अंतर्गत अगदी निष्कॄष्ठ दर्जाचा गहु (तिथे जनावर पण या गव्हाला तोंड लावायचे नाहीत म्हणे !) भारतात धाडला होता,१९६५ च्या पाकिस्तान बरोबरच्या युद्धात आपली सरशी झाली तेव्हा आपली बाजु घेण्या ऐवजी अमेरिकेने पाकिस्तानचीच बाजु उचलुन धरली आणि आपल्या व्हिक्टरी मार्चला थांबण्यास सांगितले,त्यावेळी देशात धान्याची कमी होती,मग अमेरिकेने हाच निष्कॄष्ठ दर्जाचा गहु पीएल४८० गहु तुम्हाला देणार नाही असा दबाव शास्त्रीजींवर आणला,शास्त्रीजींनी धडाक्यात सांगितले आम्हाला तुमचा गहु नको. आपल्याला "जय जवान जय किसान" ही घोषणा ठावुक असेलच... ती शास्त्रीजींनीच दिली.त्यावेळी देशात अन्नाची कमी आहे तेव्हा दर सोमवारी उपास करा असे शास्त्रीजींनी आपल्या देशातल्या लोकांना आवाहन केले,आणि लोकांनी ते आचरणात देखील आणले. अशी अनेक आणि असंख्य उदाहरणे देता येतील... असो सध्या चीन कडेच पाहुया.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस

पिडां काकांचा वरचा प्रतिसाद

मदनबाण
Fri, 09/06/2013 - 14:17 नवीन
पिडां काकांचा वरचा प्रतिसाद परत वाचला, हा लेख वर आला आणि त्यांच्या प्रतिसादातल्या रिचर्ड निक्सन यांचा उल्लेख वाचला...आज चीन विषक लेख शोधताना निक्सन देखील सापडले. भारत पर हमला करने की फिराक में था अमेरिका, वजह था पाकिस्तान! असो...हल्ली रशिया आणि चीनची मैत्री फार घट्ट झालेली दिसते आहे !तेल करार आणि इतर वेगवेगळे करार. बरं तो प्रिझम चे भांडाफोड करणारा स्नोडेन हॉकाँग मधुन सरळ रशियात गेला तेव्ह्या या दोघांच्या गहन मैत्रीची कल्पना आली. जाता जाता :- पाकड्यांना भारता विरुद्ध लढाईत Patton टँक देणारी अमेरिकाच होती. धन्य तो अब्दुल हमीद ज्याने खेमकरण मधे या टॅंकची कबरच बांधुन टाकली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण

जाऊ द्या हो. चिनही एके काळी

मराठे
Fri, 04/26/2013 - 19:11 नवीन
जाऊ द्या हो. चिनही एके काळी भारताचाच भाग होता (अगदी जपान सुद्धा) इतक्यात विसरलात काय? रच्याकने: एक संवाद भारतः ए चिन, का रे दादा आलास? चिनः काय नाय सहज फिरत फिरत आलो, कोणी दिसेना इथं, म्हटलं बघू कुठे गेलायस तू. भारतः ए असं नाय करायचं हा! मी कट्टी करीन. चिनः कशी कट्टी करशील? मी तर क्रिकेटपण खेळत नाही. पण तुझ्या क्रिकेटच्या ब्याटी मीच बनवतो! भारतः ए अमेरीका.. बघ ना कसा हा दादा! चिडवायचा हाच ह्याचा धंदा!
  • Log in or register to post comments

वा हो मराठे..

कोमल
Fri, 04/26/2013 - 19:22 नवीन
अगदी बरोब्बर संवाद.. नाहीतरी कट्टी म्हणुन आपण काय करु शकतो?? क्रिकेटच खेळत नाही न फारफार.. :))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठे

२०१० पासुन चीनने आपल्या देशात

मदनबाण
Fri, 04/26/2013 - 19:39 नवीन
२०१० पासुन चीनने आपल्या देशात ६०० पेक्षा जास्तवेळा घुसखोरी केलेली आहे.चीनची वॄत्ती दुरगामी विचार करण्याची आहे.माझ्या मता नुसार चीन या घुसखोरीतुन हिंदुस्थानच्या सर्व बाबींचा अभ्यास करत असावा,म्हणजे घुसखोरी झाल्यावर आपल्या देशातुन पहिली प्रतिक्रिया काय उमटते,राजकिय हालचालींना केव्हा आणि कितपत वेग येतो,तसेच आपल्या सैंन्यांची हालचाल नेमक्या कोणत्या प्रकारे केली जाते. याचा एक पॅटर्न तयार होतो ज्याचा चीन अभ्यास करत असावा.मागच्या वेळी मिपावर जपान मधल्या अमेरिकी तळांबद्धल मी एक प्रतिसाद दिला होता,त्यावेळी चीन जपानशी आगळीक करेल असा अंदाज होता,आता तसे घडले आहे हे जगजाहिर आहे.हीच गोष्ट ग्वादार बंदराला देखील लागु होते. येत्या काही काळात चीन चे एक मोठ्ठे एअरक्राफ्ट कॅरिअर समुद्रात उतरवले जाईल ज्याची बांधणी सध्या चालु आहे,सध्या त्यांच्याकडे रशियन बनावटीचे एकच एअरक्राफ्ट कॅरिअर आहे.चीन आणि जपान यांचे संबंध तणावाचे असतानाच चीन आपल्या देशात आपल्याच जमिनीवर येउन बसला आहे आणि मागे हटण्यास तयार दिसत नाही. आपल्या देशाचे प्रंतप्रधान त्यांच्या मौना बद्धल प्रसिद्ध आहेत्,या घटने बद्धल त्यांचे मत अजुन तरी माझ्या वाचनात आलेले नाही,पण जपानचे प्रंतप्रधान चीनला काय सांगतात ते इथे वाचता येईल. आपल्या दॄष्टीने विचार करायचा झाला तर चीनची खरी ताकद ही त्यांच्या निर्यातीत आहे,त्यावर अंकुष आणायला हवा,म्हणजे आपल्या देशाशी होणार्‍या व्यापारामुळे त्यांना जो फायदा होतो आहे त्यावर अंकुष लावणे आपल्या हातात आहे,तसेच जपान आणि चीनच्या इतर राष्ट्रांशी उत्तम घनिष्ठ संबंध स्थापन करणे. बाकी सध्याची आपली परिस्तिती पाहता सर्व लक्ष आर्मी चिफ विक्रम सिंग यांच्यावरच आहे...
  • Log in or register to post comments

चीनच्या इतर राष्ट्रांशी उत्तम

मदनबाण
Fri, 04/26/2013 - 19:44 नवीन
चीनच्या इतर राष्ट्रांशी उत्तम घनिष्ठ संबंध स्थापन करणे. हे चीनच्या जवळ असणार्‍या राष्ट्रांशी उत्तम घनिष्ठ संबंध स्थापन करणे असे हवे आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण

जपान सारखे

कोमल
Fri, 04/26/2013 - 20:03 नवीन
जपान सारखे राष्ट्र एवढेसे* असुनही चिन्यांना टक्कर देतंय, आणि आपली चिन्यांनी खोडी काढली की आप्ल्याला फक्त चर्चाच कराव्याश्या वाटतात... *एवढेसे हे म्हणणे क्षेत्रफळाच्या बाबतीत आहे टेक्नॉलॉजी बाबत नव्हे..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण

नुसती टक्कर नाही. दुसर्‍या

डॉ सुहास म्हात्रे
Fri, 05/31/2013 - 02:38 नवीन
नुसती टक्कर नाही. दुसर्‍या महायुद्धाअगोदर जपानने चीनचा बराच भाग काबीज केला होता. जर दुसर्‍या महायुद्धात जपानचा पराभव झाला नसता तर कदाचित आजचा चीन आस्तित्वातच नसता. Image removed. (नकाशा आंतरजालाच्या सौजन्याने)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कोमल

वरच्या नकाशातला तांबड्या

डॉ सुहास म्हात्रे
Fri, 05/31/2013 - 02:43 नवीन
वरच्या नकाशातला तांबड्या रंगात दाखविलेला चीनचा भाग जपानने काबीज केला होता. देशाचे कर्तृत्व त्याच्या क्षेत्रफळाच्या मोठेपणापेक्षा त्याच्या नेतृत्वात किती धमक आहे यावर अवलंबून असते... नाहीतर ब्रिटन सारख्या छोट्या बेटाचे जगभर (कधीच सूर्य न मावळण्याएवढे मोठे) साम्राज्य झाले नसते !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

सहमत

कोमल
Fri, 05/31/2013 - 09:50 नवीन
देशाचे कर्तृत्व त्याच्या क्षेत्रफळाच्या मोठेपणापेक्षा त्याच्या नेतृत्वात किती धमक आहे यावर अवलंबून असते
सहमत आणि हिच धमक भारताच्या नेतृत्वात प्रभावी नाहिये असं म्हणावं लागेल का??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

>>> आणि हिच धमक भारताच्या

श्रीगुरुजी
Fri, 05/31/2013 - 11:36 नवीन
>>> आणि हिच धमक भारताच्या नेतृत्वात प्रभावी नाहिये असं म्हणावं लागेल का?? भारताचे वर्तमान नेतृत्व अत्यंत दुर्बल आहे ही वस्तुस्थिती आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कोमल

तसेच जपान आणि चीनच्या जवळ

मदनबाण
गुरुवार, 05/30/2013 - 15:38 नवीन
तसेच जपान आणि चीनच्या जवळ असणार्‍या राष्ट्रांशी उत्तम घनिष्ठ संबंध स्थापन करणे. चला मनमोहन सिंग यांना लव्ह इन टोकियोझाले तर...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण

कॉलींग सुधीर काळे

धर्मराजमुटके
Fri, 04/26/2013 - 20:31 नवीन
कॉलींग सुधीर काळे !
  • Log in or register to post comments

घ्या,आत्ता पर्यंत १० किमी

मदनबाण
Fri, 04/26/2013 - 21:12 नवीन
घ्या,आत्ता पर्यंत १० किमी सांगत होते आता १९ किमी सांगत आहेत ! Chinese troops have entered 19 km inside Indian territory; what is govt doing?
  • Log in or register to post comments

इतकं होउनसुद्धा पुन्हा

शिल्पा ब
Fri, 04/26/2013 - 23:33 नवीन
इतकं होउनसुद्धा पुन्हा काँग्रेसच येणार निवडुन ! बाकी चीनने तिबेट घेतला, अरुणाचलवर हक्क सांगताहेत अन आता फौजा आत घुसायला लागल्यात तरी आपले सरकार गप्पच...अन लोकांना पडली क्रिकेटची चिंता. उत्तम.
  • Log in or register to post comments

.चीन शत्रू

आशु जोग
Fri, 04/26/2013 - 23:38 नवीन
सध्या मी म्हन्तो संरक्षण मंत्री कोण आहे ? फार पूर्वी एक होते संरक्षण मंत्री ते बारामतीतून पाकिस्तानला सज्जड दम देत असत. पाकिस्तानी कुरापती खपवून घेतल्या जाणार नाहीत. वगैरे आता असा दम देणारी माणसे राहिली नाहीत. त्यामुळे शेजार्‍यांचं फावतय.
  • Log in or register to post comments

.

आशु जोग
Fri, 04/26/2013 - 23:45 नवीन
१९६२ च्या चीनबरोबरच्या युद्धात खरे म्हणजे भारतीयांची सरशी होत होती. एक भारतीय सैनिक पाच चीनी सैनिकांना भारी पडत होता पण त्यांची संख्याच अफाट, आपण टिकाव धरू शकलो नाही.. एक भारतीय सैनिक पाच चीनी सैनिकांना भारी इ इ अशा थापा यावेळी मारू नयेत ही विनंती.
  • Log in or register to post comments

चीन.

विनोद१८
Sat, 04/27/2013 - 00:27 नवीन
वरील सर्वान्शी सहमत....!!
२०१० पासुन चीनने आपल्या देशात ६०० पेक्षा जास्तवेळा घुसखोरी केलेली आहे
याचा पत्ता भारतीय नागरिकाना लागण्यास ३ वर्षे लागली याला काय म्हणावे ??? ज्याना याची जाणीव होती ते यावर कसली उपाययोजना करत होते ?? याचे उत्तर मिळेल काय ?? आम्ही नेहमीच इतके गाफिल का असतो ?? विषेशता शत्रुरास्।ट्रा इतिहास आम्हाला अवगत असताना व पूर्वानुभव असताना ?? हे असे किती दिवस होत राहणार व कधी थाबणार ?? शांततापूर्ण' मार्ग काढण्यासाठी विविध पातळ्यांवर 'चर्चेने' हा प्रश्ण सुटेल का ?? यावर कोणी जाणकार मिपाकर जरा प्रकाश टाकतील का ?? 'इन्दिराबाई असताना चीनने असे कधी केल्याचे ऐकिवात नाही..' आज बाईन्ची आठवण प्रकर्षाने येते अशावेळी, कारण त्यान्ची कारकीर्द पाहिली आहे, असा खम्बीर पन्तप्रधान या देशाला दुर्दैवाने पुन्हा लाभला नाही, निदान अशा प्रसन्गी कणखर भूमिका घेणारी व देशाला आधारभूत वाटणारी दुसरी व्यक्ती आज तरी दुर्दैवाने आजच्या आमच्या भारतीय राजकार्णात दिसत नाही. जर हे प्रकरण चिघळले तर ते आजच्या परिस्थितीत आप्ल्याला ( जनतेलाच फक्त = आजचा सरकारी आम आदमी ) केव्हढ्याला पढेल ?? हासुद्धा एक गम्भीर प्रश्णच आहे. विनोद१८
  • Log in or register to post comments

म्हाराष्त्रातल्या टग्याला

अविनाशकुलकर्णी
Sat, 04/27/2013 - 09:17 नवीन
म्हाराष्त्रातल्या टग्याला पाठवा त्या बाजुला सारे चिनि पाय लावुन पळुन जातिल.
  • Log in or register to post comments

China has moved new advanced

अविनाशकुलकर्णी
Sat, 04/27/2013 - 09:24 नवीन
Image removed. China has moved new advanced longer range CSS-5 missiles close to the borders with India and developed contingency plans to shift airborne forces at short notice to the region, according to Pentagon. Despite increased political and economic relationship between India and China, the Pentagon in a report to the US Congress said, tensions remain along the Sino-India borders with rising instances of border violation and aggressive border patrolling by Chinese soldiers.
  • Log in or register to post comments

भारताने तिबेट चीन चा भुभाग मान्य केल्यामुळे

वेताळ
Sat, 04/27/2013 - 10:26 नवीन
ही परिस्थिती आली आहे.शेजारी लायक असेल तर त्याच्याबरोबर शांतीपुर्ण संबध ठेवा. अन्यथा नाठाळाच्या माथी काठी..... आपण जर चीनच्या त्या सैनिकाना भारतिय हद्दीत प्रवेश करुन चौकी उभी केल्याच्या आरोपाखाली अटक केली तरच ह्या ठिकाणी आपण बाजी मारु अन्यथा ती चौकी वास्तविक नियत्रंण रेषा बनेल.
  • Log in or register to post comments

.

आशु जोग
Sat, 04/27/2013 - 11:03 नवीन
२ वर्षांपूर्वी अण्णा हजारे यांचे आंदोलन सुरू होते. त्यावेळी सी बी आय चे लोक अण्णांनी जिथे बालपण घालवले त्या नगर, भिंगार या भागात हिंडत होते तरुणपणी अण्णांकडून काही वावगे घडले आहे का याचा शोध घेण्यासाठी. पण ते सापडले नाही. मग हे लोक अगदी लहानपणी शाळेत असताना एखाद्या मुलीबरोबर अण्णंची मैत्री होती का याचा शोध घेऊ लागले. फार नाही पण पाटीवरच्या पेन्सिलीची देवाण घेवाण करीत असतील तर शोधावे आणि प्रसिद्ध करून टाकावे म्हणजे भ्रष्टाचारविरोधी आंदोलनाची धार कमी होइल असा मनिमोहन यांचा अंदाज होता. यात अण्णांच्या संस्थेला इन्कम टॅक्स खात्याची खोटी नोटीस आणि मग माफी. हेही प्रकार झाले. (ही माफी सध्याचे मुख्यंत्री यांनी मागितली) या भंपकांनी(मनिमोहन, दिग्गी, चिदंबरम) एवढे डोके सरहद्दींच्या रक्षणासाठी लावले असते तर बरे झाले असते.
  • Log in or register to post comments

यावेळची स्थिती जराशी वेगळी

मदनबाण
Sat, 04/27/2013 - 11:12 नवीन
यावेळची स्थिती जराशी वेगळी वाटत आहे,कारण आत्ता पर्यंत जितके वेळा चीनने घुसखोरी केली तितके वेळा ते परत देखील गेले,जाताना सिगरेटची पाकिटे टाकुन जाणे,दगडांवर लाल रंगाने खुणा करणे इत्यादी उद्योग चीनी सैन्याने केले.पण आता मात्र ते जागेवरुन हलण्यास तयार नाहीत.काही जणांचे म्हणणे आहे,की सरकारने कठोर निर्णय घेतला नाही तर कारगिल सदॄष्य परिस्थिती सुद्धा उद्भवु शकते. आपल्या लष्कराच्या दौलत बेग ओल्डी मधे हालचाली सुरु झाल्याच्या बातम्या आहेत...भारतीय वायुसेना Mi-17-V5 या चॉपर हॅलिकॉप्टरसा वापर करुन सामुग्री पोहचवण्याचे काम करत आहे. खालच्या दुव्यात तुम्हाला सध्या ज्या क्षेत्रात जिथे या घडामोडी चालु आहेत त्याची सॅटलाईट पोझिशन कळुन येईल.(थॅक्स टू विकिमॅपिया) यात दैलत बेग ओल्डी येथील अ‍ॅडवान्स लँन्डींग ग्राउंड तसेच depsang plains पहायला मिळेल.(डाविकडे वरती) सॅटेलाईट व्ह्यू :- http://is.gd/l26qGv
  • Log in or register to post comments

खरंय..

कोमल
Sat, 04/27/2013 - 11:54 नवीन
यावेळची स्थिती जराशी वेगळी वाटत आहे
हे आपल्या सारख्याला पटतयं आणि भारताच्या "संयमी" धोरणाने काय धोका उद्भवू शकतो हे ही आपण ओळखू शकतो.. अजून किती दिवस आपण मनमोहन मोड वर राहणार आहोत सरकारलाच ठाउक..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण

बिजेपी प्रेस रिलीज

मदनबाण
Sat, 04/27/2013 - 11:21 नवीन
  • Log in or register to post comments

हम्म...

दादा कोंडके
Sat, 04/27/2013 - 13:05 नवीन
वरचा भारताच्या नकाशाचा भाग म्हणजेच विनोद आहे.
  • Log in or register to post comments

चीनने वेळ अगदी अचूक साधली आहे

श्रीगुरुजी
Sat, 04/27/2013 - 14:17 नवीन
चीनने वेळ अगदी अचूक साधली आहे. एक अत्यंत निष्क्रीय व्यक्ती (यशवंत सिन्हांच्या भाषेत 'निकम्मा') पंतप्रधानपदावर कळसूत्री बाहुलीसारखी बसविलेली आहे. त्या व्यक्तीच्य आडून वेगळ्याच व्यक्ती कारभार चालवितात. या व्यक्तीची व सरकारची गेली ९ वर्षे देशाला लुटण्यात गेली. कोळसा घोटाळा, २जी घोटाळा, राष्ट्रकुल स्पर्धा घोटाळा, आदर्श घोटाळा, हेलिकॉप्टर घोटाळा, वड्राच्या भानगडी . . . मोजदाद करता येणे अशक्य आहे. हे सरकार सर्व बाजूंनी भ्रष्टाचारात आकंठ बुडालेले आहे. एक घोटाळा निस्तरायच्या पुढचा घोटाळा बाहेर येतो. पंतप्रधान आपल्या घोटाळेखोर मंत्र्यांना वाचविण्यात गर्क आहेत. हे सर्व सुरू असताना देश खड्ड्यात चालला आहे याचे कोणालाही भान नाही. निर्णयशक्तीचा संपूर्ण अभाव असलेले निष्क्रीय पंतप्रधान, लूटमार करून देशाची संपत्ती ओरपण्यात मग्न असलेले सरकार, याच लोकांना पुन्हापुन्हा निवडून देणारी जनता व भ्रष्टाचार्‍यांना संरक्षण देण्यात मग्न असलेली नोकरशाही या सर्वांचा पुरेपूर फायदा उठवून चीनने १९६२ नंतर पुन्हा एकदा भारताचा भूभाग बळकावला आहे. भारताचे नेतृत्व अत्यंत दुर्बल असून देशापेक्षा स्वत:ची तुंबडी भरण्यातच ते गर्क आहेत, आपल्याला कणभरही प्रतिकार होणार नाही व केवळ तोंडी निषेधाची वाफ दवडली जाईल हे ओळखण्याइतका चीन धूर्त आहे. १९६२ मध्ये चीनने बळकावलेला भूभाग आजतगायत परत मिळविता आलेला नाही. चीनने आज बळकावलेला भूभाग परत मिळविणे अत्यंत अवघड आहे. १९६२ नंतर पुन्हा एकदा भारताला एक अत्यंत दुर्बल पंतप्रधान मिळाला हे भारताचे दुर्दैव आहे.
  • Log in or register to post comments

पूर्णपणे सहमत

आजानुकर्ण
Mon, 05/06/2013 - 00:20 नवीन
पूर्णपणे सहमत. मी म्हणतो मिपाकरांना ज्या गोष्टी सहजपणे कळतात त्या गोष्टी सरकारमध्ये बसलेल्या दुढ्ढाचार्यांना कशा कळत नाहीत. इतके मूर्ख सरकार यापूर्वी कधीही मिळाले नव्हते. काँग्रेस पक्षाने चीन सरकारबरोबर संगनमत करुन त्यांना कर्नाटक मतदान होईपर्यंत तात्पुरती माघार घ्यायला लावलेली दिसते आहे. एकदा लोकसभेच्या मध्यावधी निवडणुका झाल्या की पुन्हा एकदा चीनला मोकळे रान द्यायला काँग्रेजी नेते मोकळे होतील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

कदाचित

आजानुकर्ण
Mon, 05/06/2013 - 00:22 नवीन
कदाचित लोकसभा निवडणुकीत भाजपाला बहुमत मिळून मोदी पंतप्रधान व्हायची शक्यता असल्याची कुणकुण चीनला लागली असावी व त्यांनी घाबरुन माघार घेतली असावी असाही एक कयास करता येईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा